पुणे महापालिकेचा गजब कारभार
पुणे : पुण्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ‘फुल्ल’ झालेली असूनही धनकवड़ी आणि दक्षिण पुण्यातील काही भागात पावसाळ्यात देखीलपाणी कपात सुरुच आहे. गेली असंख्य वर्षे पालिकेत येवू न ही या भागांना रोज सकाळी 3 तास पाणी पुरवठा होत आला आहे अशा स्थितीत गेल्या 2 वर्षापासून दर सोमवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो आहे. या पुढे हीआठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कायम ठेवला असून पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पालिकेच्या वडगाव जलशुध्दीकरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात आठवड्यातून एक दिवस पाणी सोडले जात नाही. या निर्णयामुळे सिंहगड रस्त्याचा बहुतांश भाग, सहकारनगर, धनकवडी, भारती विद्यापीठ परिसर, कात्रज गाव, पद्मावतीनगर, आंबेगावासह (खु) परिसरातील पाणी पुरवठा बाधित होत आला आहे.गेल्या 2 वर्षा पासून वडगाव जलशुध्दीकरण प्रकल्पांतर्गत पाणीकपात केली जात आहे. याबाबत रहिवाशांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
पुढील महिना-सव्वामहिना अशा प्रकारे पाणी पुरविले जाईल. त्यानंतर तो पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर यांनी सांगितले. खडकवासला धरण साखळीतील धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणेकरांना रोज पुरेशा दाबाने पाणी मिळण्याची आशा आहे.
या परिसरांमधील पाणी पुरवठ्यासाठी 1 कोटी 30 लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या टाक्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून या पाणीपुवठा सुरळीत होईल, असे पावसकर यांनी सांगितले असले तरी त्यावर विश्वास ठेवण्यासाठी कोणी राजी होताना दिसत नाही.