पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याला आग लागली . या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापौरांनी सांगितली आहे.
सीरम इंस्टीट्यूटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीचा लस निर्मितीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. तसेच, इमारतीमध्ये किती लोक आहेत, याची माहिती मिळू शकली नाही.बीसीजी लसीचे उत्पादन सुरू असलेल्या सीरम इंस्टीट्यूटच्या मांजरी येथील नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आज गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लागली. सुदैवाने कोव्हिशील्ड लस सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचे काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही. कोव्हिशील्ड लस बनवली जात असलेली जागा सुरक्षित आहे.कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. परंतु, लसीची निर्मिती ही सीरम इन्स्टिट्यूटच्या जुन्याच इमारतीत करण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती मिळत आहे
दरम्यान पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात, असे निर्देश दिले.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहोचले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केले आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटला लागलेल्या आगीचे वृत्त समजताच मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी राज्यातील संसद सदस्यांच्या समवेत सुरू असलेल्या बैठकीतूनच या घटनेची दखल घेतली व तातडीने कृती करण्याच्या सूचना दिल्या.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याच्या आणि मदत कार्यात सहभागी आहेत. पुणे आयुक्तांकडून या संदर्भातील माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास प्राधान्य देण्यात येत आहे. असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी स्पष्ट केले आहे.