वाईन आणि दारू यात फरक उगाच गैरसमज केला जातोय
पुणे:आघाडी सरकारने घेतलेला बारा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्त केले आहे.त्यावर विविध नेत्याच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.त्यावर हा निर्णय विधिमंडळाने घेतला होता. सर्वोच न्यायालयाच्या निर्णयानंतर कायदे तज्ञ लोकांशी चर्चा करून पुढचा निर्णय विधिमंडळाचे पदाधिकारी घेतील . असे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला.सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ इन शॉप या पद्धतीने वाईनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे.त्यावर अजित पवार म्हणाले,वाईन आणि दारू यात फरक उगाच गैरसमज केला जातोय,अनेक गोष्टीतून वाईन तयार केली जाते,वाईन पिण्याचे प्रमाण आपल्याकडे कमी आहे,आम्ही सरकार मध्ये असताना जनतेच हित पाहून करू,काही लोकांनी व्हीडीओ काढून सरकार विरोध प्रचार करत आहेत,जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जातोय .असे अजित पवार म्हणाले.
एसटी या अजूनही खेडेगावात सुरू झाल्या नाहीत.त्यामुळे खेडेगावातील शाळकरी मुलांचे हाल होत आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली आहे. यामुळे एसटी आता पूर्वपदावर यायला पाहिजे. एसटी बाबत अनिल परब यांनी शेवटची संधी दिली. माझी कामगारांना विनंती आहे की सर्वसामान्यांसाठी सामंजस्यची भूमिका घ्यायला हवी. असे आवाहन त्यांनी केले आहे.मंत्रिमंडळाच्या बेठकित मास्क्मुक्ती बाबत चर्चा होऊन निर्णय झाल्याच्या बातम्या काल काहींनी दिल्या पण .त्यावर असा कोणताही निर्णय झाला नाही.याबाबतची बातमी धादांत खोटी आहे.अशाप्रकारे जनतेत गैरसमज पसरवू नये. मास्क हा सगळ्यांनी वापराला पाहिजे .असे अजित पवार म्हणाले.