Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पाण्याच्या रेल्वेची 27 वी फेरी…

Date:

लातूर : शहरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन रेल्वेने पाणी पुरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने लातूर शहरासाठी रेल्वेने शनिवारी 25 लाख लिटर पाण्याची 18 वी फेरी केली. त्यानुसार दि. 12 एप्रिल रोजी रेल्वेच्या पहिल्या फेरीत 10 वॅगनमधून सुमारे पाच लाख लिटर पाणी आणण्यात आले. दि. 12 ते दि. 19 एप्रिल या कालावधीत या पद्धतीने नऊ फेऱ्या पूर्ण होऊन सुमारे 45 लाख लिटर पाणी आणण्यात आले.

दि.20 एप्रिलपासून 50 वॅगनद्वारे 25 लाख लिटर पाणी आणले जात असून या 50 वॅगनद्वारे रेल्वेच्या 18 फेऱ्यांमधून आजवर सुमारे 4 कोटी 50 लाख लिटर पाणी आणण्यात आले. 10 वॅगनच्या 9 आणि 50 वॅगनच्या आजवरच्या 18 फेऱ्याद्वारे आजपर्यंत एकूण सुमारे 4 कोटी 95 लाख लिटर पाणी आणण्यात आले.

रेल्वेने आणलेले पाणी रेल्वे स्थानकाजवळील एस.आर. देशमुख यांच्या शेतातील विहिरीत साठवले जाते. विहिरीतील पाणी पाईप लाईनद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नेले जात असून तेथून त्याचे वितरण टँकरद्वारे केले जाते. महापालिकेमार्फत पाणी वितरीत करण्यात येणाऱ्या टँकरवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. दररोज वितरीत करण्यात आलेल्या आणि दुसऱ्या दिवशी करण्यात येणाऱ्या पाण्याची सविस्तर माहिती नागरिकांना महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...