महिला सक्षमीकरणासाठी ब्रिजस्टोन, ‘फिक्की फ्लो’चा पुढाकार

Date:

पराग सातपुते यांचे मत; ब्रिजस्टोन, हेडीडी व फिक्की फ्लो यांच्यातर्फे २०० महिलांना प्रशिक्षण,

पुणे : “महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले, तर संपूर्ण कुटुंब प्रगती करते. त्यामुळे ब्रिजस्टोन इंडियाने महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. सरकारने ‘सीएसआर’ बंधनकारक केला म्हणून ब्रिजस्टोन हे करत नसून, संस्थेच्या स्थापकांनी समाजाच्या विकासात योगदान देण्याचे सूत्र बांधलेले आहे. त्यामुळे ‘सीएसआर’च्या पलीकडे जाऊन आम्ही काम करत आहोत. भारतातील महिलांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असून, फिक्की फ्लो हे अतिशय योग्य व्यासपीठ आहे. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून फिक्की फ्लोबरोबर विविध उपक्रमात एकत्रित काम करत आहोत. येत्या ८ डिसेम्बरला मगरपट्टा सिटीमध्ये होत असलेल्या हाफ मॅरेथॉनच्या माध्यमातून या महिला रायडर्स आपले कौशल्य दाखवतील. भविष्यातही अनेक उपक्रम राबवून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे मत ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते यांनी व्यक्त केले.
गेल्या वर्षीच्या फ्लो हाफ मॅरेथॉनमधून उभा राहिलेल्या निधीतून ब्रिजस्टोन इंडिया, हेडीडी आणि फिक्की फ्लो पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने २०० महिला रायडर्सना कौशल्य आणि नोकरी प्रशिक्षण वर्ग राबविण्यात आले. त्या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात पराग सातपुते बोलत होते. पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी  ब्रिजस्टोनचे कार्यकारी संचालक अजय सेवेकरी, फिक्की फ्लो पुणेच्या अध्यक्षा रितू प्रकाश छाब्रिया, वरिष्ठ उपाध्यक्षा अनिता सणस, उपाध्यक्षा उषा पूनावाला, खजिनदार राणू कुलश्रेष्ठ, सहखजिनदार अनिता अग्रवाल आदी उपस्थित होते.
रितू छाब्रिया म्हणाल्या, “ब्रिजस्टोन, हेडीडी आणि फिक्की फ्लो या तिन्ही संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या २०० तरुण महिला रायडर्सचे प्रशिक्षण पूर्णत्वास गेले. या महिलांना एका नव्या क्षितिजाकडे झेप घेण्याचे पंख मिळाले, त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आणि आर्थिक स्थैर्यही या उपक्रमामुळे शक्य झाले आहे. पुणे चॅप्टर पुढील काळातही महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवणार आह. त्याचाच भाग म्हणून ब्रिजस्टोन, टाटा स्ट्राइक आणि फिक्की फ्लो यांच्यामध्ये १४७ मुलींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी होत असलेल्या हाफ मॅरेथॉनमधून उभा राहणार निधी महिला सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.”
“मी हेडीडीसोबत काम करत आहे. या रायडिंग प्रशिक्षणामधून मला खूप काही शिकायला मिळाले. माझा आत्मविश्वास वाढला. शिवाय मी आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत आहे, याचा मला आनंद वाटतो. या संधी आणि प्रशिक्षणाबद्दल ब्रिजस्टोन आणि फिक्की फ्लो संस्थेचे आभार व्यक्त करते,” अशी भावना एका प्रशिक्षणार्थी तरुणीने व्यक्त केली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...