ग्रंथालय, स्मारक उभारून ढाले यांचा सन्मान करणार -रामदास आठवले

Date:

पुणे : “चळवळीला पुढे नेण्यासह आपल्या परखड साहित्यातून चुकीच्या गोष्टींवर प्रहार करण्याची त्यांची शैली होती. त्यांचे लिखाण मार्मिक होते. पुस्तके हाच त्यांचा ध्यास होता आणि नव्या पिढीला साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रंथालय उभारण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी माझ्या खासदार निधीतून रमाबाई आंबेडकर नगरात ग्रंथालय उभारण्यासाठी ४० लाखांचा निधीही मंजूर केला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे तो मिळण्यास विलंब झाला आणि राजा ढाले ग्रंथालय उभारण्याआधीच निघून गेले. त्यांच्या हयातीत ग्रंथालय उभारले असते, तर त्यांना फार आनंद झाला असता. आता त्यांचे ग्रंथालय उभारण्याचे अपुरे स्वप्न पूर्ण करून व त्यांचे चांगले स्मारक उभारून त्यांचा सन्मान करणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित ‘राजा ढाले आणि आंबेडकर चळवळ’ परिसंवादावेळी कालकथित राजा ढाले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रामदास आठवले बोलत होते. मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमावेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, ढाले यांच्या पत्नी दिक्षा, मुलगी गाथा, सीमा रामदास आठवले, लेखक अर्जुन डांगळे, शरणकुमार लिंबाळे, इंदिरा आठवले, डॉ. विजय खरे, चंद्रकांता सोनकांबळे, समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.
रामदास आठवले  म्हणाले,”कालकथित राजा ढाले लढवय्या नेते होते. सिद्धार्थ वसतिगृहात असल्यापासून माझा-त्यांचा स्नेह होता. दलित पँथर चळवळीत त्यांचे काम आम्हाला प्रभावित करीत होते. त्यांच्यात आणि माझ्यात संवाद कमी होता. मात्र, आमच्यामध्ये वाद नव्हते. आंबेडकरी चळवळीमुळेच मला मंत्रिपदापर्यंत पोहचता आले. डॉ. आंबेडकरांप्रमाणेच ढाले नेहमी वाचनाला महत्व देत. कोणतीही बाजू अत्यंत खंबीरपणे आणि परखडपणे मांडत. राजा ढालेंनी चळवळीला एक व्यापक स्वरूप दिले होते. प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर होता.”
अविनाश महातेकर म्हणाले, “राजा ढाले यांचे विचार ऐकायला तरुण वर्ग नेहमी आतुर असायचा. रिपब्लिकन पक्ष मध्यंतरी खिळखिळा झाला होता. तरुण पडीही आंबेडकरांना मानायची. मात्र, रिपब्लिकन पक्षाला मानत नव्हती. तेव्हा ढाले यांनी पँथर पक्षाची स्थापना करून आंबेडकरी विचारांच्या लोकांना एकत्रित आणले आणि आंबेडकरी चळवळीतून बाहेर पडणारा वर्ग थांबवला. त्यांनी अनेक पर्यायी शब्द उपलब्ध
करून दिले. त्यामधील कालकथित हा शब्द जास्त गाजला. त्यांची शब्दांवर पकड होती. त्यांचा तर्कशास्त्रावर गाढा अभ्यास होता.” यावेळी राज्याचे पाहिले मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासोबत ढाले यांच्या भेटीच्याही काही आठवणी महातेकरांनी सांगितल्या.

इंदिरा आठवले म्हणाल्या, “राजा ढाले हे लढवय्या होते. त्यांच्या समतेच्या लढाईची आजही गरज आहे. दलित साहित्य नावारूपाला येण्याचे श्रेय ढाले यांना जाते. त्यांनी बाबासाहेबांच्या लढ्याला रस्त्यावर उतरून पाठींबा दिला. सांस्कृतिक चळवळीसाठी पँथरची लढाई उपयुक्त होती. शेवटच्या माणसापर्यंत समतेची लढाई लढली गेली पहिजे, असे ते म्हणायचे. साहित्याला अनेक नवनवीन शब्द दिले. तर्कशुद्ध आणि विज्ञानवादी दृष्टीकोनातून त्यांचे साहित्य आधारलेले होते.”
शरणकुमार लिंबाळे म्हणाले, “राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांनी दलित पँथरची चळवळ उभी केली. दोघांनीही आंबेडकर यांच्यानंतर तरुणांना प्रभावित केले. या दोघांनी आंबेडकर चळवळ जिवंत ठेऊन त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला. त्यांची अनेक आंदोलने आणि भाषणे नेहमी प्रसिध्दीच्या झोतात राहायची. अनेकदा यामुळे वाद देखील निर्माण व्हायचे. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यामुळे चळवळ जोर पकडू शकली नाही, हे दोघे जर एकत्र राहिले असते तर आज आंबेडकर चळवळ खूप पुढे गेली असती.”परशुराम वाडेकर प्रस्ताविकात म्हणाले, “लहानपणीच पँथर चळवळीत जोडला गेलो. राजा ढाले यांचा सहवास ऊर्जा देणारा होता. ढाले अतिशय आक्रमक आणि ठाम भूमिका घेणारे होते. पँथरच्या आंदोलनामुळे अनेकांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्या, मात्र, या चळवळीकडे लक्ष दिले नाही. आजचे कार्यकर्ते फक्त सोशल मीडियावर चळवळ उभी करत आहेत.” अर्जुन डांगळे यांनी राजा ढाले यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. विजय खरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दीपक मस्के यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

अप्रकाशित साहित्य करणार प्रकाशित : दीक्षा व गाथा ढाले
“दलित पॅंथर, आंबेडकर चळवळीला पुढे नेण्यासह राजा ढाले यांनी शेवटपर्यंत लिखाण केले. शेवटच्या दिवसात विस्मृतीचा त्रास सुरू झाला होता. चिडचिड वाढली होती. मात्र, लिखाण बंद नव्हते. १०० पेक्षा जास्त प्रस्तावना लिहून झाल्या होत्या. लेखन, कामाचा ताण आणि अखेरच्या काळात चळवळीत आलेला एकाकीपणा यामुळेही ते खचले होते. आठवले यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. निळ्या झेंड्याखाली राहून रामदास समाजाच्या हिताचे काम करतोय, असे ते नेहमी संगत. चळवळीत काम करताना त्यांना पैशांची छानछान भासत असे. पण त्यांनी कधीच त्याचा बाऊ केला नाही. रात्रंदिवस चळवळ आणि साहित्यासाठी राबलेल्या राजा ढाले यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करणार आहे. त्यांचे पुस्तकालय उभारण्याचे स्वप्न साकारणार असून, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र उभारणार आहे, असे दीक्षा आणि गाथा ढाले यांनी सांगितले.   

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...