नाहक भीतीपोटीच रखडताहेत अणुऊर्जा प्रकल्प-डॉ. नीलिमा राजूरकर

Date:

पुणे : “हिरोशिमा व नागासाकीवर झालेले अणुस्फोट, किरणोत्सर्गाबाबत (रेडिएशन) असलेले गैरसमज यामुळे लोकांच्या मनात भीती बसली आहे. अणुऊर्जा प्रकल्प हे अतिशय काळजीपूर्वक चालवले जातात. तसेच या प्रकल्पांचा सामान्य लोकांना किंवा तेथे काम करणाऱ्यांना कोणताही त्रास होत नाही. मात्र नाहक भीती आणि राजकीय कुरघोडी यांच्यात अणुऊर्जा प्रकल्प अडकतात. राजकीय पोळी भाजण्यासाठी अनेकजण अणुप्रकल्पाविषयी भीती पसरवितात. अणुऊर्जा प्रकल्प अतिशय सुरक्षित असून, आपल्याला इंधननिर्मिती, विद्युतनिर्मितीसाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता अणुऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीला प्रोत्साहन द्यायला हवे,” असे स्पष्ट मत रसायनशास्त्रज्ञ डॉ. नीलिमा राजूरकर यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अणुऊर्जा : मिथक आणि सत्य’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. राजूरकर बोलत होत्या. शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानावेळी परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., कार्यवाह संजय मालती कमलाकर, भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरमधील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. एस. जी. मराठे यांच्यासह विज्ञानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. राजूरकर म्हणाल्या, “दुसऱ्या महायुद्धात जपानमध्ये हिरोशिमा, नागासाकी येथे टाकलेले अणुबॉम्ब, १९७९ मध्ये अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियातील तीन माईल आयलंड व १९८६ मध्ये युक्रेन, चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात झालेले अपघात याची भीती सामान्यांच्या मनात घर करून बसली आहे. परंतु, इतर क्षेत्रातील अपघातांप्रमाणेच हे अपघात होते. त्याच भीतीपोटी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पालाही विरोध होतो आहे. मात्र, अणुऊर्जा अतिशय सुरक्षित आणि भविष्यात उपयुक्त असलेली गोष्ट आहे. आज भारताकडे ७७८० मेगावॅट क्षमतेचे ७ अणुऊर्जा प्रकल्प आहेत. कार्बनमुक्त असलेल्या या अणुऊर्जेचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. किरणोत्सारी पदार्थांचा पुनर्वापर होतो. पुढील १०० वर्षे पुरेल इतका युरेनियमचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे.”
विनय र. र. म्हणाले, “आग, पाणी, वाहतूक यांच्या अपघातामध्येही हजारो माणसे मारतात. म्हणून काही आपण ते वापराने बंद करत नाही. अपघात होणार नाहीत, याची पुरेशी काळजी घेऊन पर्यावरणपूरक अणुऊर्जेचा वापर वाढविणे गरजेचे आहे. आज तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित झाले असून, त्याचा सुरक्षेसाठी उपयोग करून अणुऊर्जेला आपण प्राधान्य द्यायला हवे. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अशा प्रकारचे जागृतीपर कार्यक्रम उपयुक्त ठरतील.”
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहरातून नऊ गुंड तडीपार:पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांची कारवाई

पुणे- शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केट यार्ड परिसरात दहशत...

नागरिकांच्या जीवनात सकारात्क बदल घडविण्यावर महसूल विभागाचा प्रयत्न-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महसुली सेवा गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर महसूलमंत्र्यांच्या हस्ते...