Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

समाजमनाची वैचारिक स्वच्छता हे गाडगेबाबांचे स्वप्न -प्रा. तेज निवळीकर

Date:

पुणे : “संत गाडगेबाबा हे कृतिशील सुधारक होते. विचार, निर्णय आणि कृती या त्रिसूत्रीचा अवलंब करून कीर्तनातून समाजात जागृती केली. गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक परिवर्तनासाठी वेचले. त्यांचे विचार परखड असले, तरी त्यांना फारसा विरोध झाला नाही. कारण त्यांच्या विचारात आणि आचारात एकवाक्यता होती. आपल्या भोवतालच्या परिसराच्या स्वच्छतेबरोबरच समाजमनाची स्वच्छता व्हावी, हे गाडगेबाबांचे स्वप्न होते,” असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते आणि गागडेबाबांचे अभ्यासक प्रा. तेज निवळीकर यांनी केले. साहित्यातून सामाजिक सुधारणेचा विचार पुढे नेण्यासाठी कायमच प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

भोसरी येथील प्रितम-प्रकाश महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रकाश पगारिया व्याख्यानमालेतच्या समारोपप्रसंगी प्रा. तेज निवळीकर बोलत होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. ललिता सबनीस, मुख्य संयोजक डॉ. अशोककुमार पगारिया, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक प्रकाश रोकडे, प्रीतम-प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, बंधुता प्रतिष्ठानचे प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख, व्याख्याते प्रा. तेज निवळीकर यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’, तर पीपल्स बॅंकेचे चेअरमन बबनराव भेगडे यांना ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार’ डॉ. सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “संविधानाचा विचार सगळीकडे पोहोचविण्यासाठी बंधुता हे मूल्य अतिशय आवश्यक आहे. आर्थिक श्रीमंतीपेक्षाही वैचारिक श्रीमंती अधिक महत्वाची असते. त्यामुळे बंधुतेचे हे तत्वज्ञान श्रीमंतांपर्यंत पोहोचवायला हवे. आज समाजात अशांतता असण्याचे कारण हे बंधुतेचा अभाव आहे. स्वातंत्र्य, समता यासह बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांनाही आपण प्राधान्य दिले पाहिजे. माणसांच्या मनातील भेद जाळण्यासाठी बंधुता मनात रुजायला हवी.”

प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुतेचा विचार घेऊन गेली वीस वर्षे समाजात जागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजाला दिशा देणारे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या भावनेतून राष्ट्रीय बंधुता संमेलने घेतली जात आहेत. रा. ग. जाधव यांच्यापासून डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यापर्यंत अनेक मान्यवर साहित्यिकांनी या संमेलनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. ही परंपरा यापुढेही अशीच चालू राहील.”

यावेळी एकविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अशोककुमार पगारिया यांची निवड करण्यात आली. बबनराव भेगडे, डॉ. अशोक शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. बाळासाहेब जवळकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमआरडीए प्रकल्पातून २७ गावांना मिळणार प्रगत सांडपाणी व्यवस्थापन!

१६ क्लस्टर्समध्ये ₹१,२०९ कोटींचा खर्च; पर्यावरण रक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान...

संस्कृती, परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ सातारा :...

‘नवा भारत समजून घ्यायला हवा’

पुणे, १६ डिसेंबरभारत महाशक्ती म्हणून पहिल्यांदाच सिद्ध होत असल्यामुळे...