पुणे : सुमारे 26 वर्षापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बिहारमध्ये अटक करणारे तत्कालिन अधिकारी आर के सिंह (आयएएस) हे केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्री बनले आहे.तर तत्कालीन गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्याशी वाद घालून त्यांचे राजकीय खच्चीकरण करू पहाणारे, पुण्याचे माजी पोलीस आयुक्त, सत्यप्रकाश सिंग देखील केंद्रात मंत्री बनले आहेत .एकंदरी देशात आयपी एस आणि आय ए एस अधिकाऱ्यांमध्ये अनेक राजकारण्यांचे ‘दूत’असल्याचे नेहमी बोलले जाते . जसे प्रकार अनेक हिंदी सिनेमातून दिसत आले आहेत .
ऑक्टोबर 1990 मध्ये अडवाणी यांनी गुजरात ते उत्तरप्रदेश अशी रथ यात्रा काढली होती. या यात्रेची देशभर चर्चा सुरू होती. धर्मनिरपेक्ष नेत्यांनी या यात्रेला विरोध केला होता. 26 वर्षापूर्वी बिहारमध्ये लालूप्रसाद मुख्यमंत्री होते आणि आर. के. सिंह हे बिहार सरकारचे सेक्रटरी होते. त्यावेळी मुख्यमंत्री लालूप्रसाद यांनी अडवाणी यांना अटक करण्याचा आदेश दिला होता. त्यावेळी सिंह यांनी अडवाणींना अटक केल्याने हिंदुत्त्वादी संघटनांनी टीका करीत देशभर निदर्शने आणि आंदोलनेही केली होती.
सत्यपाल सिंग यांनी पुण्यात पोलीस आयुक्त असताना तत्कालीन गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा पासपोर्ट अडवून सुरक्षा व्यवस्था हि काढून घेतली होती .बागवे यांच्यावर त्यावेळी ज्या 3 राजकीय स्वरूपाच्या केसेस पेंडिंग होत्या . . त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक सुदर्शन यांच्या विरोधातील घेराव , भाजपचे पूर्वीचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी लाच घेतल्याचे प्रकरण गाजले होते, तेंव्हा त्याविरोधात काँग्रेसच्या वतीने निदर्शने केली होती. आणि तिसरी केस सोनिया गांधी यांच्या विरोधात विदेशी नागरित्वाच्या मुद्याच्या निमित्ताने भाजपने जे राजकारण सुरू केले होते, त्याविरोधात डेक्कनला झालेल्या रास्ता रोको आंदोलनाची केस होती. याचा आधार घेत सत्यपाल सिंग यांनी गृहराज्यमंत्री असलेल्या बागवेंना शह देण्याचे काम केले होते .

