Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

२०२६ पर्यंत ५ वीं आर्थिक महसत्ता म्हणून भारताचा उदय-खासदार संजय सेठ

Date:

एमआयटी डब्ल्यूपीयूत मिटसॉगच्या १८व्या बॅचचा  शुभारंभ

पुणे, १६ नोव्हेंबरः“ मंदीच्या काळानंतर भारतात १ लाख ३० हजार कोटींचा जीएसटी जमा झाला होता. आता हा जीएसटी १ लाख ५४ हजार कोटी पर्यंत जमा होतांना देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. त्यामुळे २०२६ पर्यंत भारत संपूर्ण विश्वात ५वीं आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल,”असे विचार झारखंड येथील रांचीचे खासदार संजय सेठ यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतिने आयोजित मास्टर इन पॉलिटिकल लिडरशीप अँड गव्हर्नमेंट (एमपीजी) १८ व्या बॅचच्या शुुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी राज्यसभा सदस्य डोला सेन, राज्य सभा सदस्य गुलाम अली खताना  विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड होते.
तसेच यूपीएससीचे माजी अध्यक्ष डी.पी.अग्रवाल, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन व प्रा. परिमल माया सुधाकर उपस्थित होते.
संजय सेठ म्हणाले ,“ राष्ट्रभाव, दूरदृष्टी, आणि भाषेवर नियंत्रण हे गुण राजकारणात येतांना अंगी बाळगावे. पण तत्पूर्वी समाजकारणात प्रवेश करावा. वर्तमानकाळात राजकारणाची परिभाषा बदलताना दिसत आहे. पूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक मोठ्या प्रमाणात होते परंतू आता सुशिक्षित युवकांची संख्या वाढली आहे. राजकीय क्षेत्रात तुलनात्मक अध्ययन करण्याची सवय लावून घ्यावी.”
गुलाम अली खताना म्हणाले,“युवकांना राजकारणात नाही लोकतंत्रला सशक्त करण्यासाठी यावे लागेल. येथे आल्यावर लक्ष्य निर्धारित करून त्या दिशेने स्वतःला झोकून घ्यावे. लोकशाहीमध्ये कोणताही व्यक्ती गोंधळला जाणार नाही असे कार्य करावे. युवकांनी राजकारणाचे प्रशिक्षण घेतांना शिक्षणाची कॉपी न करता आपल्या पॅशन नुसार कार्य करावे. नेता बनल्या नंतर जनतेशी सदैव संवाद साधत रहावे.”
डोला सेन म्हणाल्या ,“जनता, समाज आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी चांगल्या सुशिक्षित व्यक्तींनी राजकारणात यावे. वाढत जाणार्‍या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशिक्षित राजकारणी लोकांची गरज आहे. येथील गरीबी, उपसमार, लहान मुलांची समस्या सोडण्यासाठी सर्वांनी समोर यावे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“आजदी के अमृत महोत्सव च्या काळात देशाची स्थिती बदलण्याची गरज आहे. राजकारणात तंत्रज्ञानाचा उपयोग कसा केला जावा यासाठी भर देण्याची गरज आहे. वर्तमानकाळात राजकारणावर संशोधन करण्याची वेळ आली आहे. २००५ मध्ये सुरू केलेल्या या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्ष व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहेत. हेच आमचे यशाचे गमक आहे.”
परिमल माया सुधाकर यांनी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगितली. तसेच राहुल कराड यांच्या मार्गदर्शनात देशात प्रथमच राष्ट्रीय विधायक परिषदेचे आयोजन करण्याचा उद्देश सांगितले. राजकारणात चांगल्या व्यक्तींनी येण्याचे आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी विद्यार्थी के सूजाता व शिवम कोटियाल यांनी विचार मांडले.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक व स्वागत पर भाषण केले.
प्रा.डॉ. पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. गिरीसन यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमआरडीए प्रकल्पातून २७ गावांना मिळणार प्रगत सांडपाणी व्यवस्थापन!

१६ क्लस्टर्समध्ये ₹१,२०९ कोटींचा खर्च; पर्यावरण रक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान...

संस्कृती, परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ सातारा :...

‘नवा भारत समजून घ्यायला हवा’

पुणे, १६ डिसेंबरभारत महाशक्ती म्हणून पहिल्यांदाच सिद्ध होत असल्यामुळे...