पुणे परिमंडलात कृषी ग्राहकांना वीजबिल थकबाकीमध्ये मिळणार 533 कोटींची माफी

Date:

पुणे, दि. 3 फेब्रुवारी 2021: राज्य शासनाने जाहीर केलेल्या कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 अंतर्गत पुणे परिमंडलातील प्रामुख्याने कृषिपंपधारकांसह 1 लाख 25 हजार 192 कृषी वीजग्राहकांना थेट लाभ मिळणार आहे. या कृषी ग्राहकांकडे सद्यस्थितीत 921 कोटी 89 लाख रुपयांची एकूण थकबाकी असून त्यामध्ये निर्लेखन, व्याज व दंड माफीचे एकूण 144 कोटी 9 लाख रुपये माफ करण्यात आले आहे. उर्वरित मूळ थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीचे तब्बल 388 कोटी 90 लाख रुपये माफ करण्यात येणार आहे.

       कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020 मध्ये प्रामुख्याने कृषिपंपासह सर्व उच्च व लघुदाब तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या 5 वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर 2015 पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार 100 टक्के माफ करून व्याज 18 टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत मुळशी, वेल्हे, हवेली, जुन्नर, आंबेगाव, मावळ, व खेड तालुक्यांमध्ये 1 लाख 25 हजार 192 कृषी ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांकडे व्याज व विलंब आकारासह एकूण 921 कोटी 89 लाख रुपयांची थकबाकी आहे. महावितरणकडून निर्लेखनाद्वारे या कृषिग्राहकांना 41 कोटी 92 लाख रुपयांची सूट मिळाली आहे. तर व्याज व विलंब आकारातील एकूण 102 कोटी 17 लाखांची सूट अशी एकूण 144 कोटी 9 लाखांची सूट देण्यात आली आहे. नव्या धोरणाप्रमाणे या कृषी ग्राहकांकडे आता 777 कोटी 81 लाख रुपयांची मूळ थकबाकी उरली आहे. योजनेनुसार या सर्व कृषी ग्राहकांनी त्यांच्या मूळ थकबाकीच्या 50 टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येणार आहे. म्हणजेच येत्या वर्षभरात 1 लाख 25 हजार 192 कृषीग्राहकांनी मूळ थकबाकीच्या 388 कोटी 90 लाख रुपयांचा भरणा केल्यास उर्वरित थकबाकीचे 388 कोटी 90 लाख रुपये माफ करण्यात येणार आहे. मात्र, ज्या ग्राहकांनी या योजनेत दोन किंवा तीन वर्षांसाठी सहभाग घेतला त्यांनी त्या-त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के माफ करण्यात येईल. तसेच मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीजबिलांची रक्कम भरणे देखील आवश्यक आहे.

  कृषी ग्राहकांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची असल्याने पुणे परिमंडलामध्ये कृषी ग्राहकांशी थेट संवाद साधून या योजनेची माहिती देण्यात येत आहे. तसेच वीजबिलांबाबत शंका किंवा तक्रारी असल्यास त्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी संबंधीत कार्यालयांना दिल्या आहेत. त्यांच्यासह ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार तसेच सर्व अभियंता व कर्मचारी कृषी ग्राहकांशी थकबाकीमुक्ती योजनेबाबत थेट संवाद साधत आहेत. या योजनेतून तसेच चालू वीजबिलांतून वसुल झालेल्या एकूण रकमेपैकी 33 टक्के रक्कम ग्रामपंचायत क्षेत्रात तर 33 टक्के रक्कम जिल्हास्तरीय क्षेत्रात नवीन उपकेंद्र, वाहिन्यांसह वीज यंत्रणेच्या सक्षमीकरण तसेच विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे कृषी ग्राहकांना संबंधीत वीजबिलांची थकबाकी, माफी व भरावयाची रक्कम आदींचा तपशील महावितरणने https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/ या वेबपोर्टलवर मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून दिला आहे. केवळ ग्राहक क्रमांक सबमीट केल्यानंतर योजनेतील संबंधीत बिलाचा संपूर्ण तपशील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...