फरार घोषित होऊ नये म्हणून तत्कालीन गृहमंत्री ईडी समोर हजर-आ. चंद्रकांत पाटलांचा टोला

Date:

पुणे-आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली . आज अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील या वर म्हणाले की, ‘अनिल देशमुख हे आज प्रकट झाले पण मग ते या पूर्वीच का आले नाहीत? आता काय कारवाई करायचे ते ईडी ठरवले. जर ते आज ईडीसमोर आले नसते तर त्यांना फरार घोषित करण्यात आले असते. ते टाळण्यासाठीच ते आज ईडी कार्यालयातमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्व प्रयत्न अटक टाळण्यासाठी करेले जात तआहेत. मात्र, त्यांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी या पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे

संकटात सापडलेले शेतकरी, महिलांवरील वाढलेले अत्याचार, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून कोणाला तरी उभे केले जाते. त्याच पद्धतीने अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक बेछूट आरोप करत आहेत. पण भारतीय जनता पार्टी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या वादात ओढण्याचे गंभीर परिणाम मलिक यांना भोगावे लागतील.नवाब मलिक यांनी ‘एनसीबी’चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बेछूट आरोप केले. वानखेडे यांच्या पाठीशी समाज उभा आहे. भारतीय जनता पार्टीही अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.नीरज गुंडे हे चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत.तरीही त्यांच्याविरोधात काही पुरावे आढळले तर चौकशी करा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि कोणाच्या विरोधात काही पुरावे असतील तर बिनधास्त चौकशी करावी.पण प्रसिद्धी माध्यमांसमोर आक्रोश कशाला करता ? रोज तोंडाची वाफ का दवडता, असे पाटील यांनी सांगितले.

भाजपाच्या अनेक योजनांवर मविआ सरकारने आरोप केले, चौकशी केली. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. सरकार तुमचे आहे आणि तुम्हीच अन्यायाचा कसला आक्रोश करत आहात ? जर तुमच्यावर अन्याय होत आहे, तर त्याचीही चौकशी करा !

मविआ सरकार महत्त्वाच्या प्रश्नांना बाजूला सारून इतर गोष्टींकडे जास्त रस दाखवते. महाराष्ट्रात लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले, एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, कोविडमध्ये घोषित केलेल्या पॅकेजचा थांगपत्ता नाही, या सर्व प्रश्नांवर मविआ सरकार का बोलत नाही ?

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने आमच्यासोबत बसून चर्चा करावी. हे आरक्षण कोणामुळे गेलं ते सगळं बाहेर पडेल. राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव जी यांनीतरी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे !

‘देवेंद्र फडणवीसांनी कधी कोणाच्या बायकोवर आरोप केले का? रोज उठून अमृता फडणवीसांवर आरोप करत आहात. त्यांनी किती संयम बाळगायचा? आमच्याकडून राऊत किंवा पवार साहेबांच्या कुटुंबियांवर कोणी बोलले नाही. दरवेळी तुम्हाला बोलण्यासाठी अमृता फडणवीसांचे नाव का लागते? त्या शांत राहतात त्यामुळे आम्हाला वाईट वाटते. तुम्ही शांत का बसता असे विचारल्यावर त्या ठीक आहे, मोदींकडून काही शिकले पाहिजे की नाही असे म्हणतात. मोदी कधी बोलत नाही, पत्रकार परिषद घेत नाही. शांतपणे काम करत असतात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, सरकारमध्ये असतानाही शिवसेनेची बाहेर पडण्याची हिंमत नव्हती. त्यावेळी ते कोरे कागद घेऊन फिरायचे. राज्यात ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे त्याची सुरुवात कोणी केली ते एकदा तपासले पाहिजे. तुम्ही रोज उठून नरेंद्र मोदींना चौकीदार चोर हे म्हणता, हे चालणार नाही. रोज उठून मोदींना चौकीदार चोर हे म्हणायचे. आई वडिलांपेक्षा सुद्धा श्रद्धा आहे आमची मोदींवर आहे. गप्प बसणार नाही. असंही ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...