Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

चक्क देवेंद्र फडणवीस म्हणाले,’ पुन्हा बोलावले, तर मी येणार नाही…!!

Date:

पुणे – ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिले वर्ल्ड रेकॉर्ड केले तेव्हा मला बोलावले, मी आलो त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. आता दुसरे रेकॉर्ड करत आहे, त्यावेळी मला बोलावले, त्यावेळी मी उपमुख्यमंत्री आहे. आता तिसरे रेकॉर्ड केले आणि मला बोलविले तरी मी पुन्हा येणार नाही,’ असे बोलत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मिस्कि भावना येथे व्यक्त केल्या.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने स्वांतत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ आणि ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमातंर्गत युवा संकल्प अभियानांचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. यावेळी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील,  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘विद्यापीठ हे केवळ शिक्षणामुळे ओळखले जात नाही, तर शिक्षणाबरोबरच ज्ञानाधारित समाजनिर्मितीमध्ये विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची असते. शिक्षणातून ज्ञानाकडे वाटचाल होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, ‘भारत हा विश्व गुरू होईल’’, त्याची वाटचाल आता सुरु झाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिले वर्ल्ड रेकॉर्ड केले तेव्हा मला बोलावले, मी आलो त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. आता दुसरे रेकॉर्ड करत आहे, त्यावेळी मला बोलावले, त्यावेळी मी उपमुख्यमंत्री आहे. आता तिसरे रेकॉर्ड केले आणि मला बोलविले तरी मी पुन्हा येणार नाही,’ असं बोलताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, भाषण संपवताना फडणीसांनी आपल्याच विधानावरून यू टर्न घेतला. पुढच्या कार्यक्रमालाही मला बोलवा, मी कोणत्याही पदावर असलो तरी नक्की येईल, असे म्हणत फडणवीनी सारवासारव केली.
विद्यापीठ हे केवळ शिक्षणामुळे ओळखले जात नाही. तर शिक्षणासोबत ज्ञान वाटप झालं पाहिजे. आपल्याला शिक्षणाकडून ज्ञानाकडे वाटचाल करायची आहे. आम्ही ५० कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला होता. त्यामुळे हरित पट्टा वाढला. त्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा मोठा वाटा होता.
तरुण पिढीवर भाष्य करताना फडवणीस म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की, ‘भारत हा विश्व गुरू होईल, त्याची वाटचाल आता सुरू झाली आहे’. हे तरुण पिढीला समोर ठेवून पंतप्रधान मोदी बोलतात. आपण सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. आमची युवा पिढी तिरंगा घेऊन सेल्फी घेऊन फोटो अपलोड करेल. याची नोंद गिनीज बुकात घेतली जाईल. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे’.
‘तरुणाई ज्याच्या पाठिशी उभी राहते, ते सर्व यशस्वी होते. राष्ट्रभक्त समाज ज्या देशात असतो, तो देश पुढे जातो. त्यामुळे आपला देश पुढे जात आहे. देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत. १०० व्या वर्षी आम्ही काय करणार यावर मोदी काम करत आहेत. असेही ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...