मी दोषी आढळलो तर कुठेही फाशी द्या,कश्मीरी पंडित पलायनाचे कारण दिल्लीतील सरकार होते

Date:

हिदू -मुस्लीम जातीयवाद भडकेल याची चिंता न करणारा , काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर बनलेला ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काही काळ अवधी दिवस चर्चेत होता . या पार्श्वभूमीवर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पहिल्यांदाच या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, काश्मिरी पंडितांच्या पलायनाचे कारण दिल्लीत बसलेले सरकार होते.मी जर पलायनास ते जबाबदार असल्याचे सिद्ध झाले तर मला पाहिजे तेथे फाशी द्या, मात्र त्यापूर्वी चौकशी आयोग नेमा ,एएस दुल्लत (तत्कालीन रॉ प्रमुख), आरिफ मोहम्मद खान, मोहसर रझा (तेव्हाचे मुख्य सचिव) यांना विचारा.जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकन व्हायला हवे, राज्याचा दर्जा परत दिला पाहिजे. हा देशाचा मुकुट आहे, तो पुन्हा उजळला पाहिजे,, हिंदू-मुस्लिम संबंध सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यानंतर योग्य, प्रामाणिकपणे निवडणुका घ्याव्या लागतील. मशीनमध्ये छेडछाड केली जाते, सैन्याकडून मते टाकून घेतली जातात, ती थांबवावी लागतील, असा आरोप त्यांनी केला. जम्मू-काश्मीरमध्ये एखादा हिंदू मुख्यमंत्री प्रामाणिकपणे निवडून येतो, तो काश्मिरी असो वा नसो, त्याचा विचार केला जाईल. पण अप्रामाणिकपणे आला तर कधीच त्यास स्वीकारला जाणार नाही…आज तकला दिलेल्या मुलाखतीत फारुख अब्दुल्ला म्हणाले – काश्मिरी पंडितांनी परत यावे अशी प्रत्येक काश्मिरीची इच्छा आहे. 1990 मध्ये जे घडले ते षड्यंत्र होते. काश्मिरी पंडितांना कट रचून हाकलण्यात आले. त्यावेळी जे दिल्लीत बसले होते तेच याला जबाबदार आहेत. माझे मन अजूनही त्या बांधवांसाठी अश्रू ढाळत आहे.

फारुख यांनी पंतप्रधान मोदींची हिटलरशी केली तुलना

काश्मीर फाइल्सवर अब्दुल्ला म्हणाले – हा चित्रपट मने जोडत नाही, तर तोडत आहे. ही आग आम्ही विझविली नाही, तर संपूर्ण देशाला कवेत घेईल. मी पंतप्रधानांना सांगेन की कृपा करून अशा गोष्टी करू नका, ज्यामुळे देश हिटलरच्या काळातील जर्मनीसारखा दिसेल. काश्मिरींची मने जोडल्याशिवाय शांतता कठीण आहे.

‘जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करावा’

फारुख पुढे म्हणाले- 370 संपून किती वर्षे लोटली, दहशतवाद संपला का? बॉम्बस्फोट थांबले का? तुमची इथे इतकी फौज आहे, ते का थांबवू शकले नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही लोक मारले जात आहेत. आजही येथे 800 काश्मिरी पंडितांची कुटुंबे राहतात, त्यांना कोणी हात लावला का? पुलवामाच्या बंशीलाल यांनी मी इथे राहिलो, गेलो नाही, मी इथे खूप आनंदी आहे, असे वक्तव्य केले आहे. बोलता बोलता फारुख यांनी जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासही सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...