आनंद दिघे असते तर गद्दारांना काय न्याय दिला असता?, बंडखोरांवर आदित्य ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल

Date:

मुंबई-उठाव नव्हता तर ही गद्दारी होती. बाळासाहेब आणि दिघेसाहेब असते तर आज गद्दारांना काय न्याय दिला असता, असा सवाल करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदेगटावर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेनंतर आता तीन दिवसांची शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. भिवंडीत मेळावा घेत त्यांनी यात्रेला सुरुवात केली.शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसैनिक असते तर हिंमतीने उभे राहिले असते. आम्ही उठाव आणि बंड केला असे ते म्हणत आहेत. पण, तो बंड आणि उठाव नव्हता. ती गद्दारी होती. उठाव करण्यासाठी हिंमत लागते. बंड करण्यासाठी ताकद लागते. ते महाराष्ट्रात थांबले असते. सुरत आणि तेथून गुवाहाटीला पळून गेले नसते. पूर आलेल्या आसाममध्ये ही आपले लोक मजा मारून आले.पुढे ते म्हणाले की, मी लहानपणापासून बघत आलो आहे. जे लोक हक्कानं घरी यायचे. कामं घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे. कुटुंबातील माणसारखं यांना आजवर शिवसेनेनं सांभाळलं. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेनं दिलं त्याच पक्षाशी गद्दारी केली. या आमदारांनी केलेलं बंड तुम्हाला पटलंय का? खरंतर आपलं एक चुकलं की आपण राजकारण कमी केलं आणि समाजकारणावर जास्त भर दिला. आपल्याशी गद्दारी यासाठीच होते की आपण विरोधी पक्षाच्या आमदारांवर कधी लक्ष देत नाही. त्यांच्यावर दबाव आणत नाही किंवा त्यांना त्रास देत नाही.शिंदे गटाला आव्हान करत आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांनी मतदारसंघात जाऊन मतदारांच्या भावना समजून घ्या. निवडणुकीला सामोर या. जनता ठरवले ते आम्हाला मान्य असेल. ज्यांना शिवसैनिक म्हणून परत यायचे असेल तर मातोश्रीचे दरवाजे 24 तास उघडे असतात. आमचे मन मोठे आहे. आज जे निष्ठानंत शिवसेनेसोबत आहेत ते खरे शिवसैनिक आहेत आणि ते घाबरणारे नाहीत. घाबरणारे असते तर सूरतेला आले असते.राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास 20 दिवस झाले तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की सध्या सुरू असलेले राजकारण नाही. ही सर्कस आहे. राज्यात पूरपरिस्थिती असून चित्र बरे नाही. पण, आपल्याकडे दोन लोकांचे मंत्रीमंडळ आहे. दोघेच निर्णय घेतात. हे सरकार घटनाबाह्य आहे आणि हे सरकार कोसळणार हे तुम्ही लिहून घ्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...