पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यामध्ये कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता, अशी माहिती राज्य मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली .
राज्यात कोकण विभागाचा निकाल ९४.८५ टक्के एवढा सर्वाधिक लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८६.१३ टक्के लागला आहे. या निकालात देखील मुलींनी बाजी मारली असून उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण ९२.३६ टक्के आहे. तर, मुलांचे ८५.२३ एवढे टक्के आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल १ वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येणार आहे. कोकण विभागाचा एकूण निकाल राज्यात सर्वाधिक असला तरी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांच प्रमाण कोकण विभागात सर्वात कमी आहे.
राज्याचा बारावीचा निकाल एका टक्क्य़ाने कमी झाला असताना त्याचा परिणाम पुणे विभागावरही झाला. पुणे विभागाचा निकाल ८९.५८ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात जवळपास दोन टक्क्य़ांनी घसरण झाली आहे. राज्यात यंदाही पुणे विभागाला तिसरे स्थान मिळाले. यंदा निकालात घट झाली असली, तरी प्रथम वर्षांच्या प्रवेश प्रक्रियेची स्थिती मागील वर्षांप्रमाणेच राहण्याची शक्यता आहे.
श्रेणी/ गुणसुधार विद्यार्थ्यांना श्रेणी/ गुणसुधार योजनेंतर्गत परीक्षेला पुन्हा बसण्याची संधी देण्यात आली आहे. जुलै-आॅगस्टमध्ये पुरवणी परीक्षा व फेब्रुवारी-मार्च २०१९ ची परीक्षा अशा दोन संधी मिळतील. अनुत्तीर्ण व श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्यांसाठीही जुलै-आॅगस्टमध्ये पुरवणी परीक्षा होईल. निकालानंतर दुस-या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतींसाठी अर्ज करता येणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी ३१ मे ते ९ जून या काळात तर छायांकित प्रतीसाठी ३१ मे ते १९ जूनपर्यंत अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या प्रती मिळाल्यानंतर ५ दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावे लागतील.
सकाळी 11 वाजता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.
कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :
1. www.mahresult.nic.in
2. www.result.mkcl.org
3. www.maharashtraeducation.com
4. www.rediff.com/exams
5. http://maharashtra12.jagranjosh.com
कसा पाहाल निकाल?
बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.
९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत राज्यासह पुणे विभागातील निकाल घटला असला, तरी गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या अभ्याक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र आहे.
यंदा राज्यभरात ५ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवले. ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्यावर्षी ३ हजार ८१९ होती. केवळ पुणे विभागात यंदा ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७९० आहे. गेल्या वर्षी ही संख्या ४४४ होती. ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण हा गेल्या दोन वर्षांतील नवा पैलू असल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाच्या परीक्षेसह सीबीएसई आणि आयसीएसई परीक्षेतही ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले होते. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेतील गुणांवर अवलंबून नसतात. मात्र, ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी व्यवस्थापन, वित्त, संगणक विज्ञान अशा अभ्यासक्रमांना प्राधान्य देतात. या पाश्र्वभूमीवर, हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या आणि विद्यार्थ्यांची पसंती असलेल्या महाविद्यालयांतील ‘कट ऑफ’ वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

