Home Blog Page 732

‘गेट वे ऑफ इंडिया’लगत अरबी समुद्रात फेरीबोट उलटली:एलिफंटा लेणीकडे जाताना घडला अपघात (व्हिडीओ)

0

नेव्हीच्या स्पीडबोटने धडक दिल्यामुळे घडली दुर्घटना; 3 मृत, 66 जणांना वाचवले, 7-8 जण बेपत्ता

मुंबई-मुंबईत छोटी बोट उलटल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत काही प्रवासी बुडाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाच्या अरबी समुद्रात एलिफंटा लेण्यांकडे जाताना ही बोट उलटली. घटना घडताच आसपासच्या बोटी बचावासाठी छोट्या बोटीजवळ दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.

संबंधित घटनेच्या प्राप्त माहितीनुसार एलिफंटा लेणी येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर ठिकाणी नौदल, जेएनपीटी, कोस्ट गार्ड, यलोगेट पोलिस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू आहे.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी ही घटना घडली. त्यावेळी हवामान निरभ्र असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक गेट वे ऑफ इंडियावर पोहोचले होते. यातील अनेक लोक बोटिंगसाठी समुद्रातही गेले होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, काही पर्यटक बोटीने एलिफंटाच्या दिशेने जात होते. त्यांची बोट किनाऱ्यापासून सुमारे 50 मीटर समुद्रात गेल्यावर अचानक काहीतरी झाले आणि ती बुडू लागली. योगायोगाने एक मोठी बोट तिथे पोहोचली आणि बुडणाऱ्या बोटीतील काही प्रवाशांना मोठ्या बोटीवर नेण्यात आले.

बोट उलटण्याचे कारण समजू शकले नाही. काहींना तात्काळ वाचवण्यात आले आहे. रेस्क्यू केलेल्या प्रवाशांना गेट वे ऑफ इंडियाजवळ आणले जात आहे. या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही. जवळपास सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची शक्यता आहे.

अपघातग्रस्त बोट 80 प्रवाशांना घेऊन एलिफंटा लेणीकडे जात होती. पण रस्त्यात नेव्हीच्या स्पीडबोटने तिला धडक दिली. यामुळे बोट समुद्रात कलंडली. या घटनेत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून, 66 जणांना वाचवण्यात आले आहे. उर्वरित लोकांना नेव्ही व तटरक्षक दलाच्या मदतीने वाचवण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप 7-8 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

संघ घोषाचा समग्र इतिहास संग्रहालयामुळे नव्या पिढीसमोर येईल-डॉ. मोहन भागवत

पुणे-
योग्य गोष्टी समाजापुढे मांडल्या गेल्या नाहीत, तर अयोग्य गोष्टी समाजापुढे येतात. या पार्श्वभूमीवर संघाच्या घोषाचा समग्र इतिहास एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या घोष अभिलेखागाराचे महत्त्व खूप मोठे आहे. अभिलेखागारामुळे घोषाचा योग्य इतिहास नव्या पिढीसमोर येईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय घोष संग्रहालयाचे उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. संघाच्या पुण्यातील ‘मोतीबाग’ कार्यालयात घोष संग्रहालय आणि अभिलेखागार (अर्काइव) हा प्रकल्प साकारला असून संघाच्या घोषासंबंधीची विस्तृत माहिती आणि वाद्ये येथे संग्रहित करण्यात आली आहेत. घोषासंबंधीचे ग्रंथ, पुस्तके, लेख आणि विविध प्रकारची सामग्री येथे मांडण्यात आली आहे. घोष विषयाच्या अभ्यासकांना तसेच या विषयातील तज्ज्ञांना येथे संशोधन तसेच अध्ययनही करता येणार आहे.

संघाच्या घोष विभागाचा इतिहास नव्या पिढीला माहिती होणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळात घोष विभाग कसा होता आणि तो कसा विकसित होत गेला याची माहिती एकाच ठिकाणी संग्रहित असणे आवश्यक होते. हे काम येथील अभिलेखागारामुळे झाले आहे, असे डॉ. भागवत म्हणाले.

प्रांगणीय संगीताची परंपरा भारतातून लुप्त झाली होती. हे प्रांगणीय संगीत भारतीय संगीताच्या दालनात पुन्हा संघामुळेच आले. प्रांगणीय किंवा मैदानी संगीताचे पुनरुज्जीवन ही संघाच्या घोषाची विशेषता आहे, असेही डॉ. भागवत यांनी सांगितले.

अभिलेखागार प्रमुख मोरेश्वर गद्रे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. संघाच्या पश्चिम क्षेत्राचे शारीरिक शिक्षण प्रमुख सुनील देसाई यांची यावेळी प्रमुख उपस्थती होती. सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन केले.


आवश्यक सर्व गोष्टी या अभिलेखागारात संग्रहित झाल्या आहेत. सर्व प्रकारची अचूक, सार्वत्रिक आणि अधिकृत अशी माहिती इथे सर्वप्रकारे उपलब्ध होईल, असे हे अभिलेखागार व्हावे.
डॉ. मोहन भागवत
सरसंघचालक, रा. स्व. संघ

भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा सिंहगडावर संपन्न

पुणे, दि. १८ : किल्ल्याचे ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, किल्ल्याला वेढून असलेल्या जंगल क्षेत्राचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करणे, जबाबदार पर्यटनाचा विकास प्रोत्साहित करणे, किल्ल्याचे जतन आणि संरक्षण यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवणे उद्देशाने आयोजित भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा सिंहगडावर नुकतीच संपन्न झाली.

या स्पर्धेचे आयोजन सिंपल स्टेप्स फिटनेसने महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र वन विभागाच्या सहकार्याने केले होते. या स्पर्धेत पुण्यातून तसेच देशाच्या इतर भागातून आलेल्या उत्सुक खेळाडूंनी सहभाग घेतला. पतंजली आत्मबोध वेलनेस सेंटर येथे जेवण, स्वच्छतागृहे, आणि पायांची मालिश इत्यादी सुविधा स्पर्धकांना पुरवण्यात आल्या. एव्हरेस्टिंग हा शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारा एक सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपक्रम आहे. यामध्ये स्पर्धक एका डोंगरावर किंवा टेकडीवर लागोपाठ चढाई करून माउंट एव्हरेस्टच्या ८,८४८ मीटर उंचीइतकी चढाई पूर्ण करतात. एव्हरेस्टिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे संस्थापक अँडी व्हॅन बर्गन यांनी स्पर्धकांसाठी विशेष प्रोत्साहनपर व्हिडिओ संदेश पाठवला. तसेच, एकल (सोलो) पूर्ण आणि अर्ध (हाफ) एव्हरेस्टिंगच्या यशस्वी स्पर्धकांना एव्हरेस्टिंग हॉल ऑफ फेममध्ये आपले नाव सामील करण्याची संधीही दिली आहे.

या स्पर्धा चार गटात घेण्यात आल्या. एव्होस्टिंग सोलो (१६ फेल्या), एव्हरेस्टिंग टीम रिले (१६ फेऱ्या), हाफ एव्हरेस्टिंग सोलो (८ फेल्या), आणि हाफ एव्हरेस्टिंग टीम रिले (८ फेल्या), टीम रिले स्पर्धा भविष्यातील एकल आव्हानासाठी तयारी व सांघिक कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आली. याशिवाय, उत्साही लोकांना सिंहगड किल्ल्याची चढाई व चांदण्यातली सौंदर्य अनुभवता यावे म्हणून फन रन या उपक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले. शाळकरी विद्यार्थी ते ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटातील सुमारे ७५ स्पर्धकांनी या मध्ये सहभाग घेतला.

आत्मबोध वेलनेस सेंटर जवळील बलकवडे स्मारकापासून सर्व स्पर्धांचा आरंभ झाला. एव्हरेस्टिंग सोलो गटात, सात स्पर्धकांनी सुरुवात केली आणि त्यापैकी तीन जणांनी १६ फेऱ्या पूर्ण केल्या. अपूर्व मेहता यांनी ३९:०६:२० तासांत पुष्कराज कोरे यांनी ४३:११:५४ तासांत आणि मेधा जोग यांनी ४३:१२:२३ तासांत आव्हान पूर्ण केले.

हाफ एव्हरेस्टिंग गटात, सहा स्पर्धकांनी सुरुवात केली, त्यापैकी तीन जण यशस्वी ठरले. उमेश धोपेश्वरकर यांनी २१:००:३१ तासांत ८ फेल्या पूर्ण केल्या, उमेश कोंडे यांनी २१:०४:१६ तासांत आणि अपर्णा जोशी यांनी २४:३६:२४ तासांत हे आव्हान पूर्ण केले. किरण टीके, ज्यांनी अर्ध एव्होस्टिंग टीम रिले साठी नोंदणी केली होती, त्यांनी २१:११:३१ तासांत आव्हान एकल (सोलो) प्रकारे पूर्ण केले. तसेच, योगेश बडगुजर (१८:५६:४५) आणि सुधन्वा जातेगावकर (२०:४९:१४), हे पूर्ण एव्हड्रेस्टिंग गटातील स्पर्धक अनुक्रमे ९ आणि ८ फेल्या पूर्ण करून हाफ एव्हरेस्टिंगसाठी पात्र ठरले.
ही ऐतिहासिक स्पर्धा भारतातील खडतर, धाडसी प्रकारातल्या क्रीडांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. सिंपल स्टेप्स फिटनेसचे संस्थापक अशिष कासोदेकर यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. अधिकाधिक लोकांना प्रेरणा देण्यासाठी आणि शारीरिक व मानसिक क्षमतेची किमया आजमावण्यासाठी या स्पर्धाद्वारे अधिकाधिक भारतीयांना व विशेष करून तरूण पिढीला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न असल्याचे पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार यांनी कळविले आहे.

पुणे जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा राज्यालाही दिशादर्शक ठरेल असा निर्माण करा- प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील

पुणे, दि. १८ : पुणे जिल्ह्याचे भौगोलिक व औद्योगिक क्षेत्र, वाढते नागरीकीकरण तसेच आपत्तीच्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी त्यानुसार असणारा जलद प्रतिसाद याकरीता लागणारी साधने याबाबींचा सर्वांगिण विचार करता सर्व विभागाचा सहभाग घेत राज्याकरीता दिशादर्शक ठरेल, यास्वरुपाचा आदर्श आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्माण करावा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्मितीबाबत कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक संजय गिरी, सिड्स टेक्निकल सर्व्हिसेसचे अभिजित घोरपडे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतूदीनुसार जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्माण करणे आवश्यक आहे, याकरीता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्ह्यातील सर्वसंबंधित विभाग, विविध सामाजिक संस्था यांना सहभागी करुन घ्यावे. जिल्ह्यात औद्योगिक सुरक्षा, आरोग्य विभागाचे आराखडेही यामध्ये समावेश करण्यात यावे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यामदतीने सर्व संबंधित विभागानी आपल्या विभागाचे आराखडे तात्काळ तयार करावे, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी दिल्या.

श्री. घोरपडे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि युएनडीपी यांच्या संयुक्त विद्यमाने सिड्स टेक्निकल सर्व्हिसेस यासंस्थेच्या मदतीने जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्मितीचे काम सुरु आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने विभागाने सूचना कराव्यात, असे आवाहन श्री. घोरपडे यांनी केले.

या कार्यशाळेत सर्व विभागातील अधिकारी व विभाग प्रमुखांनी सहभाग नोंदवला तसेच संभाव्य आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने गटकार्याच्या माध्यमातून आरखडे तयार करून सादरीकरण करण्यात आले.

अलार्ड विद्यापीठात फ्रेशर्स पार्टी आगाज-२०२४ चे आयोजन

पुणे, १८ डिसेंबर: “नव्याने प्रवेश घेतलेले विदयार्थी हे विद्यापीठाचे रोपटे असतात आणि त्यांचे संगोपन केल्यानंतर ते संस्थेला आणि समाजाल एका विशाल वृक्षाप्रमाणे सावली देतात.” असे मत अलार्ड विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. पूनम कश्यप यांनी व्यक्त केले.
अलार्ड युनिव्हर्सिईच्या स्कूल ऑफ हेल्थ अँड अलाईड सायन्सेस, स्कूल ऑफ लॉ आणि स्कूल ऑफ डिझाईन यांनी त्यांच्या पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टी आगाज-२०२४ चे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना ते संबोधित करीत होते.
अलार्ड विद्यापीठाचे कुलपती डॉ. एल.आर.यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
डॉ. पूनम कश्यप म्हणाल्या, “फ्रेशर्स डे कार्यक्रमात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची एकमेकांशी ओळख करून दिली जाते. त्याचप्रमाणे त्यांच्यात त्यांच्या निवडलेल्या विद्यापीठातून करिअर सुरू करण्याचा आणि नवीन उंचीवर नेण्याचा उत्साह ही निर्माण होतो.”
अलार्ड चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेचे सचिव डॉ. राम यादव म्हणाले, “आता तुमच्याकडे विद्यापीठाच्या रूपात एक खुला कॅनव्हास आहे. जिथे तुम्ही तुमची स्वप्ने विविध रंगांनी भरून सुंदर बनवू शकता. तसेच, आपण भारत देश आणि जगाला अधिक सुंदर बनवू शकतो.”
स्कूल ऑफ हेल्थ अ‍ॅड बायोसायन्सचे डीन डॉ. प्रा. अजय कुमार जैन म्हणाले,” तुम्ही जे काही कराल त्यात चांगले करा. आता शिकत असताना कमवण्याची वेळ आली आहे. यासाठी विद्यापीठात विविध प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तुम्ही या विद्यापीठाची संपत्ती झाला आहात. आम्ही आमची सर्व शक्ती तुम्हाल अधिक मौल्यवान बनवण्यासाठी लावू. येथील प्रगत सुविधा आणि दर्जेदार शिक्षकांच्या मदतीने तुम्ही संपूर्ण राष्ट्रासाठी एक महत्वाचे मानव संसाधन असल्याचे सिद्ध व्हाल.”
या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रॅम्प वॉक, कविता, गाणी, खेळ, प्रात्यक्षिके आणि नृत्यातून आपली प्रतिभा आणि कौशल्य दाखवले. कार्यक्रमाच्या शेवटी आरोग्य आणि जीवशास्त्रातील कशिश आणि अमृत श्रीवास्तव, स्कूल ऑफ डिझाइनमधील प्रकृती आणि ओम यांना मिस्टर फ्रेशर आणि मिस फ्रेशर ही पदवी देण्यात आली.
यावेळी एपीएस संचालिका ज्योत्स्ना मिश्रा आणि मुख्याध्यापिका शुभ्रा श्रीवास्तव यांना ज्युरी म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात मॅनेजमेंट सायन्सचे डीन प्रा. डॉ.डी.के. त्रिपाठी, स्कूल ऑफ डिझाइनचे डीन डॉ. प्रा.अमित आणि प्रा. एस.के. श्रीवास्तव उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्यवस्थापन डॉ. सविता पांडे, डॉ. दिशा पटेल व इतर प्राध्यापकांनी केले.

अमित शाहांच्या विधानातून संविधान निर्मात्याबद्दल असलेला भाजपाचा राग बाहेर आला: नाना पटोले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याबद्दल अमित शाहांनी देशाची माफी मागावी.

नागपूर, दि. १८ डिसेंबर २०२४
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा ज्या पद्धतीने उल्लेख केला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर नाव घेण्याची फॅशनच आली आहे. एवढ्यावेळा देवाचे नाव घेतले तर देव पावला असता असे वक्तव्य केले. अमित शाह यांच्या या विधानातून भाजपाला देशाच्या संविधान निमार्त्याबद्दल किती राग आहे तेच बाहेर आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा भाजपाचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानाचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना जगण्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला, त्यामुळेच आपण सर्वजण स्वाभिमानाने आपल्या देशात नांदत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी खदखद आहे तीच त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली आहे. अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याने त्यांनी देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.

विरोधी पक्षनेते पदाबद्दल विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील.

विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापती यांची निवड बिनविरोध करण्याची परंपरा महाराष्ट्रात राहिली आहे. विधानसभेचा उपाध्यक्ष, परिषदेचा उपसभापती विरोधी पक्षांचा करण्याची परंपरा आहे ती खंडीत झालेली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भूमिका मांडली आहे व ते याबाबत सकारात्मक आहेत. सभागृह चालवण्यासाठी विरोधी पक्षनेता नाही अशी व्यवस्था योग्य नाही. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता असला पाहिजे, त्यावर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

परभणी व बीड प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक करा – रमेश बागवे

परभणी दलित युवक सोमनाथ सूर्यवंशी व बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा – रमेश बागवे
पुणे – परभणी येथील दलित तरुण सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण तसेच बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी करा तसेच यामागील मुख्य सूत्रधारास अटक करा अशी आग्रही मागणी मातंग एकता आंदोलनाचे नेते व माजी मंत्री रमेश बागवे यांनी केली आहे .
आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग एकता आंदोलनाच्या वतीने तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले .
येत्या आठ दिवसात शासनाने निर्णय घ्यावा अन्यथा मातंग समाज राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करेल असा इशारा बागवे यांनी दिला .
या दोन्ही घटनेचा राज्यशासनाच्या वतीने गांभीर्याने विचार करून यातील संबंधित आरोपीवर जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी असे यावेळी मातंग समाजाच्या विविध कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली .
१) मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत द्यावी व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये रुजू करून घेण्यात यावे.२) संबंधित परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक व पोलिस अधिकारी यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

३) संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पाठीमागे जे मुख्य सूत्रधार आहेत ते बीड जिल्ह्यातील एक गुंड व राजकीय पाठबळ असलेल्या व्यक्तीवर दबावापोटी गुन्हा दाखल होत नाही तरी त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा.
वरील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले .
या आंदोलनाचे आयोजन कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी केले होते .यावेळी अंकल सोनवणे,अरुण गायकवाड सरचिटणीस
रमेश सकट ,कार्याध्यक्ष ,पुणे शहर,विठ्ठल थोरात समन्वयक मा.ए.आ. म. राज्य ,मिलिंद अहिरे,दयानंद अडागळे उपाध्यक्ष पुणे शहर ,राजश्रीताई अडसूळ,महिला अध्यक्ष पुणे शहर,रवी पाटोळे,सुरेखा खंडाळे अध्यक्ष महिला आघाडी पुणे शहर व पुणे शहरातील व जिल्ह्यातील मातंग एकता आंदोलनाचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते .

विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

पुणे, दि. १८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२५ मध्ये नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या mpsc.gov.in व mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याची माहिती आयोगाचे अवर सचिव र.प्र. ओतारी यांनी कळविली आहे.

शासन सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठी आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन-२०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. हे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. आयोगाच्या व विविध संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी आयोगाच्या वेळापत्रकाची प्रत संबंधित संस्थांना पाठवून याबाबत दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.

सारथीमार्फत दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन

पुणे, दि. १८ : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा परीक्षेमार्फत दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकरी (MPSC CID & JMFC) यांची निवड केली जाते. त्यातील काही दंडाधिकाऱ्यांना कालांतराने उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळते. मराठा व कुणबी समाजातील होतकरु विद्यार्थ्यांना या परिक्षेच्या अभ्यासाकरिता प्रोत्साहन मिळावे यासाठी सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना ११ महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा रु.१० हजार मासिक हजेरीच्या आधारे विद्यावेतन व आकस्मिक खर्च म्हणून एकवेळ रु.१२ हजार अदा करण्यात येणार आहेत. तसेच प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क सारथी संस्थेमार्फत देण्यासंदर्भात संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. ११४ विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत. हे प्रशिक्षण मराठवाडा मित्र मंडळ शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे, स्पेक्ट्रम अकेडमी, नाशिक व संकल्प एज्युकेशन, छत्रपती संभाजीनगर या प्रशिक्षण वर्गामार्फत राबविले जाणार आहे.

महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज करत असतात योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण घेऊन ध्येय प्राप्त करण्यासाठी “सारथी” ने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्याच्यांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे असे आवाहन श्री. काकडे यांनी केले आहे. सदर प्रशिक्षण तुकडीस सारथी संस्थेचे अध्यक्ष श्री अजित निबाळकर, भा.प्र.से. (से.नि.) यांनी शुभेच्छा दिल्या असून सदर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्याबाबत सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा

0

ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना

मुंबई, दि. १८  डिसेंबर २०२४ : महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन  वा तीन पेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.

ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (LT Live) वीजग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. ग्राहकांना लकी ड्रॉव्दारे  स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे  दिली जाणार आहेत. ग्राहकांनी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.

ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पध्दतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात ७० टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे.

महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रॉ मध्ये पाच विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत. योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील. वीज बिलाची किमान रक्कम रु. १००/- असणे आवश्यक आहे. लकी ड्रॉ घोषित करण्यापूर्वीच्या महिन्याच्या अंतिम दिवशी ग्राहकाची थकबाकीची रक्कम रु.१०/- पेक्षा कमी असावी. एक ग्राहक क्रमांक केवळ एका बक्षिसासाठी पात्र असेल.

मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी..

छगन भुजबळ यांचा OBC एल्गार पुकारण्याचा निर्धार

‘कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर’

नाशिक – मला सध्या गावागावातून व जिल्ह्याजिल्ह्यातून फोन येत आहेत. भुजबळ साहेब या, ताकद वाढवा असे लोक म्हणत आहेत. हे खरे आहे. मी आता संपूर्ण राज्यात जाऊन ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे. मी ओबीसींचा लढा आमदार म्हणून सभागृहात लढेल. तिथे कितीही बंधने आली तरी रस्ते आमच्यासाठी मोकळे आहेत. यावेळी त्यांनी… मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी… अशी शायरी म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीचे संकेतही दिले.राज्यमंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याविरोधात राज्यभरात रान पेटवण्याचे संकेत दिलेत. माझ्या मनात अवहेलनेचे शल्य डाचत आहे. त्यामुळे मी आता राज्यव्यापी दौरा करून ओबीसींचा एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात आपल्यावर अनेक संकटे येतील, पण आपल्याला सावधपणे पुढे जावे लागेल, असे ते म्हणालेत. भविष्यातील राजकीय वाटचालीचा विचारपूर्वक निर्णय घेणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

छगन भुजबळ समर्थकांचा बुधवारी नाशिकच्या येवल्यात मेळावा झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना छगन भुजबळ म्हणाले, मी मंत्रिपदावर नसलो तरी तुमच्यासोबत आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी तुमच्यासाठी संघर्ष करेल. हा संघर्ष करतानाच मी शेवटचा श्वास घेईल. त्यात मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. जिथे आपले प्रश्न असतील, तिथे आपण एकजुटीने राहू. मी कायम तुमच्यासोबत असेल. हिंमत ठेवा. वाटा पाहा. तोपर्यंत आपले काम सुरू ठेवा. कदाचित पुढे आणखी एखादे मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्याला एल्गार करावाच लागेल.

मला मंत्रिमंडळात घेण्यासाठी प्रफुल पटेल यांनी पराकाष्ठा केली. सुनील तटकरेंनीही केली. एवढेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत भुजबळ मंत्रिमंडळात हवेत असा आग्रह धरला. ते सतत 4 दिवस त्यांच्या मागे होते. हे चुकीचे आहे असे करू नका असे ते म्हणाले. पण शेवटी मला घेतलेच नाही. आता हे झाले ते झाले, कुणी केले, याने केले, त्याने केले असे काही नाही. कोणत्याही बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही. प्रत्येक पक्षाचा नेता, विधिमंडळाचा नेता तोच त्या पक्षातील निर्णय घेत असतो, असे सांगत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला.

भुजबळ पुढे म्हणाले, हा माझ्या मंत्रि‍पदाचा प्रश्न नाही, समाजाचे जे प्रश्न उभे राहतील त्यावेळी संरक्षणाची ढाल कोण उभी करणार? हा खरा प्रश्न आहे. मंत्रि‍पदे किती वेळा आली आणि गेलीत. विरोधी पक्षातही बसावे लागले, पण त्याचे दु:ख नाही. ओबीसींनी महायुती सरकार आणले मग असे का? यामागचा हेतू काय? असा प्रश्न आहे. मंत्रिपद नसले तरी रस्त्यावर लढू, सभागृहात भांडू पण थेट अवहेलना करण्याचे शल्य मनात डाचत आहे.

घाईघाईत प्रश्न सुटत नाही. विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. त्यावेळी मला तुमची साथ हवी. लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी, शक्ती एकटवण्यासाठी निदर्शने सुरू राहतील. संयमाने सगळे करावे लागेल. जिथे जिथे मला आमंत्रण येणार तिथे मी जाणार आहे. मंत्रि‍पदावर नसलो तरी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत, शेवटचा श्वासापर्यंत मागासवर्गीयांसाठी लढणार आहे. कुठल्याही दबावाला मी बळी पडणार नाही. मी तुमच्यासोबत राहणार आहे. अनेक राज्यातील, देशातील लोक आपल्यासोबत आहेत. हिंमत ठेवा, वाट पाहा. पुढे आणखी काही संकटे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा एकदा ओबीसी एल्गार पेटवावा लागेल, असे नमूद करत भुजबळांनी यावेळी स्वपक्षालाच आव्हान देण्याचे संकेत दिले.

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींसोबत ओबीसी समाजाने भरभरून मतदान दिल्यामुळे हे सरकार आले. पण आता आपल्याबाबत वेगळा विचार केला जात आहे. परंतु अजून निवडणुका संपलेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, असे म्हणत छगन भुजबळांनी यावेळी राष्ट्रवादीसह महायुतीलाही सूचक इशारा दिला.

छगन भुजबळ म्हणाले, आमदार होणे किंवा मंत्री होणे हे माझे काम नाही. मला मंत्रिपदाची हाव असती तर मी 16 नोव्हेंबरला राजीनामा देऊन 17 नोव्हेंबरला इकडे आलो नसतो. मी राजीनामा दिला होता, पण त्याचा कुठेही उल्लेख केला नाही. कारण मला तसे सारखे फोन येत होते. त्यानंतर अडीच महिन्यांनी मी राजीनामा दिल्याचे उघड केले होते. माझ्याविरोधात अर्वाच्य बोलण्यात आले तेव्ही मी ती गोष्ट उघड केली.

आता प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसे आपल्याकडे आहेत. पण कुणीही दुःखात राहण्याचे कारण नाही. ‘कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर’, असे ते उपस्थितांचे मनोबल वाढवताना म्हणाले.

छगन भुजबळ यांनी यावेळी मनोज जरांगे व मराठा आरक्षणावरही भाष्य केले. ते म्हणाले, 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर देशभरातील इतर राज्यांतील आंदोलने शमली होती. पण मराठा समाज हा ईडब्ल्यूएसमध्ये साडेआठ टक्के आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे हे माझे नव्हे तर त्यांचेच म्हणणे आहे. मी मार्ग काढण्यास तयार आहे, पण तुमच्याशी चर्चा करण्यास नाही.

आपण कुणीही मराठा विरोधी नाही. पण आपल्यावर कुरघोडी करण्याचा जो कुणी प्रयत्न करत आहे, त्यांना विरोध करणे हे तुमचे व माझे काम असणार आहे. पुन्हा एकदा बीड होता कामा नये. आमदारांची घरे जाळा, शिक्षणसंस्था जाळा या घटना सहन केल्या जाणार नाहीत. त्यावेळी ते घडले आणि मी त्या संकटात उभा राहिलो होतो. तेव्हा जनताच नव्हे तर नेतेही घाबरले होते. पण त्यावेळी हा छगन भुजबळ एकटा उभा टाकला होता.

छगन भुजबळ म्हणाले, आपण सर्वजण एकजूट झालो. ओबीसी मंडळी एकजूट झाली. त्यामुळे एक है तो सेफ है हे आपल्याला अशाही पद्धतीने समजले. आपण एकजूट राहिलो तरच सुरक्षित राहू हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आम्ही कुणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही. ओबीसी आरक्षण मिळाले तेव्हा त्यात 250 जाती होत्या, आता हा आकडा 375 वर गेला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

आपली माणसे राजकारणात अजूनही कच्ची आहेत. जे निवडून येतात ते एकही शब्द बोलत नाहीत. त्यांचे काही चुकत आहे असे मी म्हणणार नाही. पण माझ्याही मतदारसंघात एक सलाईन लावलेला महाशय आला होता. माझे काय होणार हे मला माहिती नाही पण या माणसाला पाडा म्हणजे पाडा असे तो म्हणाला होता. त्यामुळे माझी 60 ते 70 हजार मते कमी झाली. हिंदू – मुस्लिम या सर्वांची मते कमी झाली. दलित, ओबीसी, गुजराती आदी सर्वच समाज एकत्र आले आणि मला निवडून दिले, असे ते म्हणाले.

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषद अधिवेशन व साहित्य संमेलन पुण्यात 

परिषदेचे २१ वे अधिवेशन आणि १० वे दैवज्ञ साहित्य संमेलन भव्य शोभायात्रेने होणार गुरुवारी (दि.१९) प्रारंभ
पुणे : अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेतर्फे २१ वे अधिवेशन आणि १० वे दैवज्ञ साहित्य संमेलनाचे आयोजन दि.१९ ते २२ डिसेंबर दरम्यान स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. श्री अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या यजमानपदाखाली हे आयोजन करण्यात आले असून चार दिवसीय कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर व साहित्य मंचचे श्याम भुर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष अजय कारेकर, उदयराव गडकरी,संजय चाचड, रवींद्र महिमकर, यजमान संस्थेच्या चिटणीस अरूणा गडकरी,रत्नाकर काकतीकर,कुमार अणवेकर आदी उपस्थित होते.

गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता भव्य शोभायात्रेने सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.   नारायण पेठेतील अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर, केसरी वाडा, रमणबाग शाळा, बालगंधर्व रंगमंदिर मार्गे अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप होणार आहे. यामध्ये वाचनसंस्कृती विषयी तसेच समाज प्रबोधनात्मक  जनजागृती करण्यात येणार आहे.

अधिवेशनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन देखील होईल. नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट,डॉ आनंद पेडणेकर आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित रतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता पहिल्या सत्रामध्ये समाजकार्यातील ज्ञातीचे योगदान या विषयावर चर्चा होणार आहे. तर, दुपारी ४.३० वाजता नोकरी की सुवर्णकारागिरी आणि सामाजिक कार्यात युवांची वानवा याविषयावर तज्ज्ञ आपले विचार व्यक्त करणार आहेत. तिसऱ्या सत्रात ज्ञाती पत्रके व समाजप्रबोधन यावर मार्गदर्शन करण्यात येईल.

शनिवार, दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता चौथ्या सत्रात कौटुंबिक जबाबदारी व महिलांचे सामाजिक योगदान, महिलांचा राजकारणातील सहभाग आणि वधूवर मेळाव्यातील आजची वास्तवता यावर विचारमंथन होणार आहे. तर शेवटच्या पाचव्या सत्रात  महिलांनो सावधान, महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा व मान्यवर विचार मांडतील.

दैवज्ञ साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी दुपारी ३ वाजता ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नाथमाधव साहित्य पुरस्कार वितरण व विविध पुस्तकांचे प्रकाशन होईल. सायंकाळी ६ वाजता कविसंमेलनाचे देखीलh आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी, दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मन शांतीसाठी संत साहित्य याविषयावर मार्गदर्शन करण्यात येईल. यावेळी समाज श्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी यांची ग्रंथतुला होणार आहे. सकाळी ११ वाजता ग्रंथहंडी अंतर्गत या बाळांनो वाचू या आदि साहित्य चळवळीला चालना देणाऱ्या कार्यक्रमाबरोबर मान्यवर आपले विचार मांडतील. तसेच कार्यकर्ता गौरव सोहळा होणार आहे. दुपारी ३ वाजता खुले अधिवेशन व समारोप होणार असून यावेळी नियामक समितीकडून आलेले लेखी ठराव व त्यावर चर्चा होणार आहे. अधिवेशन व संमेलनाला प्रवेश खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

पुण्यधाम आश्रमात १५ जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न

पुणे-पुण्यधाम आश्रमात ‘सामुहिक विवाह’ हा भव्य वार्षिक कार्यक्रम १५ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाला होता. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या या १५ जोडप्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळालेल्या सर्वांसाठी हा खरोखरच एक हृदयस्पर्शी अनुभव होता. पुण्यधाम आश्रमाने आपल्या समाजातील अत्यंत गरजू वर्गासाठी आयोजित केलेला एक विशेष सामूहिक विवाह सोहळा, तोही कोणताही खर्च किंवा हुंडा न घेता. या अनोख्या सोहळ्याचे हे 9 वे वर्ष असून आजपर्यंत दीडशेहून अधिक जोडप्यांनी नम्र कुटुंबातून विवाहसोहळा पार पाडला आहे.

2500 हून अधिक लोकांचा उत्साह, उत्साह आणि अपेक्षा हा संसर्गजन्य होता, त्यासोबतच पुण्यधाममध्ये सर्वत्र लग्नसंस्थेची धांदल, शहनाईचा नाद, फुलांची सजावट आणि उत्सवाचे वातावरण होते.

सोनेरी-लाल साड्या, सुंदर सजवलेले दागिने आणि ‘शेरवानी, फेटे आणि मोजरी’ घातलेल्या नववधू चमकदार दिसत होत्या . वरांची बारात मिरवणूक सर्व बाराती नाचत नाचत दाखल झाली, तर वधूचे कुटुंबीय त्यांच्या स्वागतासाठी आतुरतेने वाट पाहत होते. शेवटी, वरांनी सुंदर सजवलेल्या मंडपात आपापल्या नववधूंना सामील केल्यानंतर, विद्वान पंडितांनी लग्नाच्या विधींना सुरुवात केली. हा विवाह सोहळा पारंपारिक महाराष्ट्रीय अंतरपटात पार पडला, त्यानंतर आदरणीय पाहुण्यांच्या उपस्थितीत फेरा आणि कन्यादान समारंभ पार पडला.

“प्रत्येक वर्षी पुण्यधाम आश्रम अशा मुलींचे सामूहिक विवाह आयोजित करतो ज्यांचे कुटुंब एका विस्तृत लग्नाचा खर्च उचलू शकत नाही. मुलींना त्यांचे कुटुंब आणि मित्रांसह एक सुंदर विवाह सोहळा करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दिला जातो. ही अनोखी संस्था हुंडा प्रथेला परावृत्त करून लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे ”, असे अध्यक्ष मा कृष्ण कश्यप यांनी सांगितले, ज्यांनी ‘मानवतेच्या माध्यमातून देवाची सेवा’ हे आपले जीवनातील ध्येय बनवले आहे!

जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या मान्यवरांच्या कृपाळू उपस्थितीने हा दिवस आणखी खास बनला.

सर्व पारंपारिक विधींनंतर, अध्यक्ष मा कृष्ण कश्यप, अध्यक्ष सदानंद शेट्टी, विश्वस्त आणि विशेष पाहुण्यांनी तरुण जोडप्यांना भेटवस्तू आणि ट्राऊसो देऊन आशीर्वाद देण्याची वेळ आली, ज्यात घरगुती वस्तू, जेवणाचे सेट, कुकर, ब्लँकेट, नवीन वस्तू होत्या. साड्या आणि सलवार-कमीज सेट., नवविवाहित जोडप्याला त्यांचे वैवाहिक जीवन सुरू करण्यास मदत करण्यासाठी. “आमच्या शुभेच्छा नवविवाहित जोडप्याला आहेत आणि आशा आहे की त्यांना जीवनात खरा आनंद आणि एकत्रता मिळेल”, मा कश्यप म्हणाली.

काही वर्षांपूर्वी लग्न झालेल्या जोडप्यांना हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी एकत्र येताना पाहणे आनंददायक होते. त्यानंतर पाहुण्यांना एक भव्य महाराष्ट्रीय जेवण देण्यात आले, ज्याचा सर्वांनी मनापासून आनंद घेतला.

या अत्यंत उदात्त उपक्रमाचे संपूर्ण श्रेय माँ कृष्ण कश्यप यांना जाते, ज्यांनी या भव्य कार्यक्रमाचे अतिशय काटेकोरपणे नियोजन केले होते जे उत्तम प्रकारे पार पडले. तिच्या समर्पित पाठिंब्याशिवाय, दयाळू उपस्थिती आणि प्रेरणेशिवाय पुण्यधाम आश्रमाचा कोणताही उपक्रम शक्य नाही.

शरद पवारांनी PM मोदींची घेतली भेट:मराठी साहित्य संमेलनाचे दिले निमंत्रण

0

नवी दिल्ली-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यात शरद पवार यांनी मोदींना 98 व्या मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले. तसेच यावेळी त्यांच्याशी काही राजकीय मुद्यांवरही चर्चा केली. त्यामु्ळे या भेटीविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहे.विशेष म्हणजे काँग्रेसने संसदेत अदानी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कथित अवमाननेच्या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे

नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान 98 वे मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तत्पूर्वी, 1 दिवस अगोदर मंगळवारी त्यांनी फोनवरून मोदींशी संपर्क साधला होता. मोदींच्या भेटीनंतर शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, पंतप्रधानांशी केवळ 5 मिनिटे भेट झाली. त्यात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या. त्यावर पंतप्रधानांशी चर्चा झाली. राजकीय मुद्यांवर कोणतीही चर्चा झाली. साताऱ्यातील 2 डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक प्रयोग करून शेती केली. ते दोन्ही शेतकरीही माझ्यासोबत होते.

.

शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य मानले जातात. त्यांचे सर्वच राजकीय पक्षांसोबत चांगले संबंध आहेत. त्यांचे पंतप्रधान मोदींशीही सुमधूर संबंध आहेत. मोदी व पवार या दोघांनीही अनेकदा एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. मुंबईत अदानी यांच्या धारावी प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. याशिवाय मंत्र्यांचे खातेवाटपही रखडले आहे. त्यामुळे शरद पवारांनी मोदींशी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले असले तरी महाराष्ट्रातील बदलले समीकरण, शिवसेना नेत्यांची विधाने व राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर उभयंतांत झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

राहुल म्हणाले- मनुस्मृती मानणाऱ्यांना आंबेडकरांची अडचण:शहा म्हणाले होते- काँग्रेसने आंबेडकरांऐवजी देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान सांगितले-

(कॉंग्रेसने X वर प्रसारित केलेला हा व्हिडीओ आहे. )

आता फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर… देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्गात मिळाला असता.

काँग्रेसने अमित शहांचे हे वक्तव्य आंबेडकरांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे- मनुस्मृती मानणाऱ्यांना आंबेडकरांचा नक्कीच त्रास होईल.

त्याचवेळी जयराम रमेश बुधवारी म्हणाले – शहा यांनी संसदेत बाबासाहेब आणि आंबेडकरांचा अपमान केला. पीएम मोदीही आंबेडकरांचा अपमान करत आहेत. त्यांच्यासाठी खोटे बोलणे सर्वोच्च आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे भाजप आणि आरएसएसच्या तिरंग्याच्या विरोधात होते. त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्राला विरोध केला. पहिल्या दिवसापासून संघ परिवारातील लोकांना भारतीय संविधानाऐवजी मनुस्मृतीची अंमलबजावणी करायची होती.

आंबेडकरांनी हे होऊ दिले नाही, त्यामुळेच त्यांच्याबद्दल प्रचंड द्वेष आहे. ते दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि गरिबांचे मसिहा आहेत आणि राहतील.