Home Blog Page 544

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभाकरीता बँक तपशील भरण्याचे आवाहन

पुणे, दि.९: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभास पात्र ठरलेल्या परंतू ऑनलाईन अर्ज करतावेळी बँक तपशिल न भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे; अशा विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरीता आपल्या महाविद्यालयास संपर्क साधून स्वाधार संकेतस्थळावरील लॉगिनमध्ये बँकेचे तपशील भरावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याकरीता विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज केले आहेत. तथापि काही विद्यार्थ्यांनी अर्जात बँक तपशिलाबाबत माहिती भरलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरूनही त्यांना अनुज्ञेय रक्कम अदा करण्यास अडचण येत आहे. या विद्यार्थ्यांना बँक तपशील भरण्याबाबत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती श्री. खैरनार यांनी दिली आहे.
0000

बांबू लागवडीसाठी यंत्रणांनी टार्गेट घेऊन काम करावे: पाशा पटेल

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यात बांबू लागवड लोकप्रिय असली तरी मोठी संधी असूनही उर्वरित पुणे जिल्ह्यात बांबू लागवड झालेली नाही, या पुढील काळात क्षेत्रिय स्तरावर कर्मचाऱ्यांना व्यक्तीशा टार्गेट देऊन पुणे जिल्ह्यात मराग्रारोहयो अंतर्गत बांबू लागवडीचे ध्येय निश्चित करण्याचे पुणे जिल्ह्यातील यंत्रणांनी ठरवले असून त्या कामी मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांचे सहकार्य घेण्याचे निश्चित झाले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बांबू लागवड अभियान विषयक आढावा बैठक (ता.9) मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या महत्त्वाच्या बैठकीला उपजिल्हाधिकारी रोहयो डॉ. चारुशीला देशमुख-मोहीते, डॉ. कृपाण घोष, प्रमुख, अँग्रीमेट विभाग,के.सी.साई कृष्णन, प्रमुख, IMD पुणे,डॉ.ओ.पी श्रिजीत, शास्रज्ञ IMD, डॉ. एस.डी. सानप, D शास्रज्ञ IMD
आरती बंडकर, शास्रज्ञ IMD, नवनाथ अवताडे,उप‌प्रादेशिक अधिकारी म.प्र.निः मंडळ पुणे, आर. वाय. पाटील,कार्यकारी अभियंता, सा. ,बा.पुणे आणि सं. स. विश्वासराव, उपसंचालक,जि. अ.कृ.अ. पुणे या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. चारुशीला देशमुख-मोहीते म्हणाल्या, 2024-25 साठी 300 हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले होते. 2025-26 साठी 450 हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले. एकूण पाच वर्षातील 3000 हेक्टर उद्दिष्ट पैकी २०२४-२५ मध्ये १३३.६ हेक्टर इतकी लागवड झाल्याचे सांगितले. तसेच यावर्षी सर्व यंत्रणांना मागील वर्षीचे शिल्लक उद्दिष्ट व या वर्षीचे उद्दिष्ट नुसार सर्व यंत्रणांना जास्तीच उद्दिष्ट वाटप करून प्रति ग्रामसेवक, कृषी सहाय्यक,आर एफ ओ व मृद व संधारण आणि जलसंपदा विभागाला उद्दिष्ट देऊन यावर्षी 1000 हेक्टर चे उद्दिष्ट साध्य करु असे सांगितले.
यावेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले.पुणे जिल्ह्यामध्ये क्षमता असूनही बांबू लागवडी मध्ये दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.वातावरण बदलाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे.इस्रायलमधील तेल अविव आणि अमेरीकेत कैलिफोर्निया आग लागली.
2024 हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले असून दिल्ली तापमान ५२.९ डिग्री परंतु गेल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते.47 डिग्री तापमानामध्ये माणुस मरतोय. दुबई होरपळतेयं तिथे तापमान ६५ डिग्री पर्यंत पोहोचले आहे. एकंदरीतच वातावरण बदलाच्या संकटामुळे मानवजातीसमोरचे सगळे मार्ग खुंटले आहेत, असे ते म्हणाले.

कार्बन इमिशन ( उत्सर्जन) दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगत ते म्हणाले, 2050 पर्यंत समुद्र किनारी असणारे देश आणि शहरे बुडणार आहेत.कोळसा आधारित औष्णीक प्रकल्प बंद करावे लागणार आहेत.
सर्वांनाच आता पर्यावरण पुरक वस्तु वापराव्यात लागणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.वेगाने वाढणारा बांबु एकमेव गवत वर्गीय वृक्ष असून बांबू बहु उपयोगी ठरत आहे.

यावेळी बोलताना भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस.डी. सानप म्हणाले, ‘औद्योगिक विकासाने कार्बन उत्सर्जन वाढले आहे. पारंपारिक उर्जा स्रोत वापराने कार्बन इमिशन वाढले. त्यामुळे वातावरण बदल होऊन कृषी क्षेत्राला वातावरण बदलाचा मोठा फटका बसत आहे.

तापमानातील वाढ, कमी कालावधीत जास्त पाऊस, ढगफुटी, वादळे घटक शेती बरोबरच आरोग्य वनक्षेत्र आणि जलसंधारण या विभागांना प्रभावित करत असल्याचे कडे त्यांनी लक्ष वेधले.पुणे जिल्ह्याचा विचार करता फक्त भोर आणि बिल्ला तालुक्यांमध्ये पारंपारिक रित्या बांबूच्या गोड होत आहे परंतु क्षमता असू नये शिरूर सह आंबेगाव आणि जिल्ह्यातील अनेक भागात ज्या ठिकाणी सिंचनातून जमिनी नापीक झाल्या अशा भागात देखील बांबू लागवडीसाठी मोठी संधी असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.
प्रत्येक यंत्रणेमध्ये क्षेत्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांना टार्गेट देऊनच यापुढील काळात बांबू लागवडीचे ध्येय गाठले जाईल,असे यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी एकमताने आश्वासित केले.

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी -पणन मंत्री जयकुमार रावल

पुणे, दि. ९ : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री साठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त १०५ खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खाजगी व थेट बाजारा बाबत शेतमाल विक्री सुविधा संदर्भात तक्रारी आहेत. खाजगी बाजारात खरेदी विक्री शेड, बाजार ओटे, गोडावुन, रस्ते या सह पायाभूत सुविधांची तपासणी करण्यात यावी. तसेच त्यांचे खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्या संदर्भात सूचना देण्यात याव्या. परवाना देताना लावून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या खाजगी व थेट बाजार यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. व्यवहार पारदर्शक नसलेल्याचे परवाने रद्द करण्याची करण्यात यावी. तसेच सर्व खाजगी व थेट बाजाराचे लेखा परीक्षण करण्यात यावे असे निर्देश राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. ते पणन संचालनायाच्या बैठकीत बोलत होते.

पणन संचालनायाची आज पुण्यात बैठक झाली. या बैठकीत पणन संचालक विकास रसाळ, उपसंचालक मोहन निंबाळकर, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे या सह अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना मंत्री श्री रावल म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समिती सह खाजगी व थेट बाजारात शेतकऱ्यांनी विकलेला मालाचे पैसे शेतकऱ्यांना २४ तासाच्या आत ऑनलाइन पद्धतीने किंवा इतर मान्य पद्धतीने देण्यात यावे. प्रत्येक महिन्यात शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना दिले का? यासंदर्भात आढावा घेण्यात यावा. शेतमाल विक्रीचे पैसे अडवून ठेवलेल्या परवानाधारकांवर परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. नवीन परवाना देताना किंवा नूतनीकरण करताना जलद गतीने प्रक्रिया करण्यात यावी. तसेच परवाना देताना बँक गॅरंटी घेण्यात यावी. राज्यातील ग्राहक सहकारी संस्था, जिनिंग प्रेसिंग संस्था,फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करावे.

राज्यात मोठ्या क्षेत्रावर फळे आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. राज्यात ४६६ फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था नोंदणीकृत असून त्यापैकी ४५३ संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून उत्पादित फळे आणि भाजीपाला पिकांची साठवणूक करणे ग्रेडिंग पॅकिंग व निर्यात करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पणन संचालयाने नियोजन करावे. महामँगो, महाग्रेप्स, महाबनाना, महाऑरेंज, महाआनार, अशा संस्थांना त्यांच्या संबंधित कृषी मालाला निर्यात करण्याचे संदर्भात चालना देण्यात यावी. असे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची शेतमाल विक्री हक्काची सनद प्रत्येक बाजार समितीत लावा
शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्री हक्काची त्यांना माहिती व्हावी,यासाठी शेतकरी हक्काची सनद प्रत्येक बाजार समितीत लावा अशी सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी अधिकाऱ्यांना केली.

०००००

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला पुणे जिल्ह्याच्या कामाकाजाचा आढावा

नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा- मेघना बोर्डीकर

पुणे, दि. ९ : शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमानंतर राज्य शासनाने विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर देण्यासाठी १५० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला असून या कार्यक्रमात सर्व विभागांनी सक्रीय सहभाग घ्यावा. नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी कामकाजात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आायोजित सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा जिल्हास्तरीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या, प्रत्येक विभागाने त्यांच्या कार्यालयाची संकेतस्थळे अद्ययावत ठेवावीत. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या अडचणीचे निराकरण व्हावे.घनकचरा,प्लास्टिक व्यवस्थापनासाठी लोकचळवळ आवश्यक असून आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने सेवाभावी संस्था, सरपंच, आजी- माजी पदाधिकारी यांच्या सहभागाने गावस्तरापर्यंत विविध उपक्रम राबवून स्वच्छता, घनकचरा, प्लास्टिक व्यवस्थापनाविषयी जनजागृती करावी. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात याव्यात. लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती करा, सोनोग्राफी केंद्रांवर लिंग तपासणी होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

त्या म्हणाल्या, १०० टक्के अंगणवाड्यांमध्ये परसबाग होतील याकडे लक्ष द्यावे. सर्वच कामांमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी सर्व विभागांनी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे. आरोग्य विभागाने आंबेगाव,भोर व जुन्नर येथील पदभरती प्रक्रिया तातडीने करावी. शासनाच्या सर्वच योजना १०० टक्के राबविल्या जातील याकडेही लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत महावितरण, महापारेषण, विद्युत निरीक्षक, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ऊर्जा, महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व त्याची सद्यस्थिती याबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली.

0000

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्रम महर्षी’ पुरस्कार प्रदान

पिंपरी चिंचवड परिसरातील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील -पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

पुणे, दि. ९ : पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात लहान उद्योगांच्या माध्यमातून अनेक कामगारांना रोजगार प्राप्त होत आहेत. या उद्योगांमध्ये सातारा जिल्ह्यातील कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. या कामगारांच्या समस्या आणि लहान उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स तसेच पुण्यातील श्रमिक, कामगार आणि उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले, वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक पंडीत, ॲडमार्क मल्टीवेंचर कंपनीचे संचालक गणेश दरेकर, पुणे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय सोनावले, संस्थापक अरुण कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री देसाई म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स तसेच पुण्यातील श्रमिक, कामगार आणि उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रम महर्षी’ पुरस्कार देऊन आज सन्मानित करण्यात आले, ही खूप मोठी गौरवाची बाब आहे. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. सातारा जिल्ह्यात श्री. शिंदे यांचे कार्य खूप मोठे आहे. जिल्ह्यात आलेल्या आपत्ती काळात पुरात अडकलेल्या लोकांना त्यांनी वेळोवेळी मदत केली. पुरात बेघर झालेल्या ५३४ कुटुंबांना त्यांनी हक्काचे घर उपलब्ध करुन दिले आहे. यातील काही घरांचे बांधकाम झाले असून उर्वरित घरे आगामी सहा सात महिन्यात पूर्ण होतील. श्री. शिंदे यांनी त्यांच्या दरे या गावात अनेक लोकांचे प्रश्न सोडविले आहेत. श्री. शिंदे यांनी गोरगरीब लोकांसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे, असे श्री. देसाई म्हणाले.

कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना देण्यात आलेला ‘श्रम महर्षी’ पुरस्कार त्यांच्यावतीने पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वीकारला. तसेच यावेळी यशवंत भोसले यांना ‘श्रम योगी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात पवना समाचारच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविकात विजय सोनावले यांनी पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेच्या कार्याची माहिती विषद केली. कार्यक्रमाला या परिसरातील उद्योजक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कामगार उपस्थित होते.
०००००

भरत नाट्य मंदिर आयोजित ३३व्या वासंतिक संगीत नाट्य महोत्सवाला सुरुवात

पुणे : किर्लोस्कर, देवल, गडकरी, खाडिलकर यांच्या काळात वैभवाच्या शिखरावर असलेल्या रंगभूमीला बोलपटाच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. नाटक कंपन्या बंद पडल्या. अनेक नट बेकार झाले. रसिक बोलपटांकडे वळले. अशा काळात नवे नाटककार आणि अभिनेते यांनी संगीत रंगभूमीची परंपरा केवळ टिकवून ठेवली नाही तर अधिक समृद्ध केली. आधुनिक युगातल्या तरुण पिढीलाही परंपरेविषयी आस्था वाटते. ही प्रयोगशील असणारी तरुण पिढी संगीत रंगभूमीला ऊर्जितावस्था देईल, असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. वासंतिक संगीत नाट्य महोत्सव सलग ३३ वर्षे आयोजित करीत असल्याबद्दल प्रा. जोशी यांनी भरत नाट्य मंदिराच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे वासंतिक नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे ३३वे वर्ष आहे. महोत्सवाचे उद्‌घाटन भरत नाट्य मंदिर येथे प्रा. जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे मंचावर होते. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन झाले. ऋषी बंकिमचंद्र यांच्या कादंबरीवर आधारित संगीत आनंदमठ या नाटकाने महोत्सवाची सुरुवात झाली.

भरत नाट्य मंदिराच्या या वासंतिक नाट्य महोत्सवाची रसिक आतुरतेने वाट पाहत असतात, असे सांगून प्रा. जोशी म्हणाले, बंकिमचंद्र यांनी लिहिलेले वंदे मातरम् हे केवळ गीत नाही, तो स्फूर्ती मंत्र आहे. स्वातंत्र्य संग्रामाची प्रज्वलित झालेली ज्योत अधिक तेजस्वी करण्याचे काम या स्फूर्ती मंत्राने केले. वंदे मातरम् हे दोन शब्द उच्चारत अनेक क्रांतिकारकांनी मृत्युला कवटाळले. तरुण पिढीसाठी हा नाट्य महोत्सव त्यांच्या नव कल्पनांना प्रोत्साहन देणारा ठरला आहे.
भरत नाट्य मंदिराच्या माध्यमातून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश प्राप्त करणारे कीर्ती कस्तुरे, ऐश्वर्या भोळे, आशुतोष नेर्लेकर, मधुरा शेलार, उमा जोशी यांचा तसेच आनंदमठ या नाटकातील मिलिंद सबनीस, अनुष्का आपटे , वज्रांग आफळे, अनुजा जोशी, रवींद्र सातपुते, अजय पराड, जयंत टोले, विनिता तेलंग या कलाकार-तंत्रज्ञांचा सत्कार प्रा. जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
सुरुवातीस अभय जबडे यांनी महोत्सवाविषयी प्रास्ताविकात माहिती सांगितली तर प्रा. जोशी यांचे स्वागत पांडुरंग मुखडे यांनी केले. सूत्रसंचालन संजय डोळे यांनी केले.

हौशी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्यावैविध्यपूर्ण छायाचित्रांचे १४ पासून प्रदर्शन

पुणे: ज्येष्ठ हौशी, मनस्वी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्या वैविध्यपूर्ण आणि पारितोषिक प्राप्त छायाचित्रांचे प्रदर्शन पुणेकरांना पाहण्याची पर्वणी आहे. येत्या १४ ते २१ मे २०२५ या कालावधीत कोथरूड येथील हॅप्पी कॉलनीमध्ये असलेल्या पु. ना. गाडगीळ अँड सन्स कला दालनात हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (ता. १४) सकाळी ११.३० वाजता अभिनेत्री व निर्माती, कलाकार भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते होणार आहे.

गेल्या ५५ वर्षांपासून रमेश करमरकर यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासला आहे. बेलोज कॅमेऱ्यापासून ते मिररलेस कॅमेऱ्याच्या वापरातून त्यांनी विविध देशांतील जीवनशैली, तेथील निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक वैभव आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रथम पारितोषिकासह भारत सरकार व इतर अनेक नामांकित संस्थांची पारितोषिके त्यांच्या अनेक छायाचित्रांना मिळालेली आहेत. ही सर्व पारितोषिक प्राप्त छायाचित्रे, बैलगाड्यांची शर्यत, आयफेल टॉवरचा अद्वितीय अँगल, नायगारा धबधबा, ट्युलिप फ्लॉवर्सची मनमोहक छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

गोदामांची साठवणूक क्षमता वाढवावी-पणनमंत्री जयकुमार रावल

पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संचालक मंडळासोबत आढावा बैठक संपन्न

पुणे, दि. ९: राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी केलेला शेतमाल तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूकही वखार महामंडळाच्या गोदामात होते, त्यामुळे आवश्यकतेनुसार गोदाम साठवणूक क्षमतेत वाढ करण्याच्यादृष्टीने देशासह जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा व त्यामाध्यमातून तांत्रिकदृष्ट्या अद्यावत साठवणूक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

पुणे येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संचालक मंडळासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते, यावेळी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सहव्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

पणन मंत्री श्री. रावल म्हणाले, राज्यात सद्यस्थितीत महामंडळाची उपलब्ध साठवणूक क्षमता ही स्वमालकीची १७.२२ लाख मेट्रिक टन आणि भाडेतत्त्वावरील ७.३३ लाख मेट्रिक टन अशी २४.५५ मेट्रिक टन आहे, येत्या काळात नवीन सुमारे ५२ हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमतेचे गोदाम निर्मितीसंदर्भात व्यवहार्य नियोजन करावे. राज्यातील गोदामाचे रेटिंग करुन घ्यावे, जेणेकरून केंद्र सरकारच्या सवलतीचा लाभ घेता येईल.

राज्यातील गोदामामध्ये सनियंत्रण तसेच कामकाजात पारदर्शकता राहण्याच्यादृष्टीने सीसीटीव्ही बसवून त्यांचे नियंत्रण कक्ष पुणे येथील वखार महामंडळाच्या कार्यालयात करावे. यामुळे राज्यातील गोदामात उपलब्ध साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक साठवणूक क्षमता वाढण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यामध्ये ५० टक्के आणि शेतकरी उत्पादक संस्थांना २५ टक्के सवलत दिली जाते. साठवणूक केलेल्या मालास १०० टक्के विमा संरक्षण तसेच शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.

धान्य साठवणूकीमुळे बाजारभाव उच्च असतांना शेतकऱ्यांच्या शेतमालाचा चांगला परतावा मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी गोदामामध्ये अधिकाधिक धान्य साठवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांचे अन्न धान्याचे कापणीनंतरचे नुकसान कमी होऊन त्यांच्या शेतमालास चांगला बाजारभाव मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.

शेतकऱ्यांचा शेतीमाल शास्त्रशुध्द पध्दतीने साठविण्यासोबतच कृषी क्षेत्रात अन्नधान्याचा साठा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. वखार महामंडळाच्या गोदामामध्ये धान्य ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचा विश्वास आणि इच्छा वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे श्री रावल म्हणाले.

श्री. दिवेगावकर यांनी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची मागील तीन वर्षाची तुलनात्मक आर्थिकस्थिती, साठवून क्षमता व साठवून क्षमता वापर, संस्थानिहाय साठवणूक क्षमता वापर, शेतकऱ्यांसाठी सोई-सुविधा, शेतमाल तारण कर्ज योजना, हमीभाव खेरेदी, साठवणूक नियोजन, गोदाम बांधकाम, प्रस्तावित गोदाम तसेच राज्य शासन, स्मार्ट प्रकल्पाकडे प्रस्तावित प्रकल्पाबाबत माहिती दिली.


जांबरगाव अग्रो लॉजिस्टिक पार्कचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लवकरच उद्घाटन होणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगांव येथील ॲग्रो लॉजिस्टीक पार्क निर्माण कार्य जवळजवळ पूर्ण झाले आहे.त्यामध्ये १० हजार मे. टन क्षमतेचे सायलो दोन गोदामे ६ हजार मे.टन, क्लिनिंग व ग्रेडिंग २ युनीट (५ मे.टन /तास क्षमता), पेट्रोल पंप, सामायिक सुविधा केंद्र, उपहारगृह, ट्रक टर्मिनल, अंतर्गत रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे,असे ही मंत्री श्री रावल यांनी सांगितले. त्याच बरोबर लातूर येथील १० हजार मेट्रिक टन क्षमतेचे सायलो निर्माण कार्याचे भुमिपजन करण्यात येणार आहे. असेही मंत्री श्री. रावल म्हणाले.

भारतीय संस्कृतीचा पाया कुटुंब व्यवस्था-डॉ. विश्वनाथ दा. कराड

पुणे फॅमिली कोर्ट लॉर्स असोसिएशन द्वारे ग्रंथालयाचे उद्घाटन

डॉ. कराड यांना ‘विश्वशांती व मानवता समर्पित जीवन गौरव पुरस्कार’

पुणे, दि.९ मे: ” भारती कौटुंबिक व्यवस्था ही जगातील सर्वोत्तम आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, आदर आणि सहकार्य यावर भर दिला जातो. ही व्यवस्था मजबूत आणि प्रभावशाली व्यवस्था आहे. ती व्यक्तीला सामाजिक आणि भावनिक आधार देते.” असे विचार माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन द्वारे प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांना ‘ विश्वशांती व मानवता समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ ने गौरिवण्यात आले. यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केली. या प्रसंगी कोर्टात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ग्रंथालयाचे उद्धाटन डॉ. कराड व कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मनिषा काळे यांच्या हस्ते करण्यात आले. ु
यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सुधाकर आव्हाड यांची प्रमुख उपस्थित होती. तसेच पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गणेश कवडे, उपाध्यक्ष अ‍ॅड स्मिता देशपांडे, अ‍ॅड. कल्पना डिसले निकम, सचिव अ‍ॅड, प्रथम भोईटे, सहसचिव अ‍ॅड. कोमल देशमुख, खजिनदार अ‍ॅड. भूषण कुलकर्णी उपस्थित होते.
या प्रसंगी पुणे फॅमिली भूषण पुरस्काराने अ‍ॅड. अजीत कुलकर्णी, अ‍ॅड. विजया खळतकर, अ‍ॅड, प्रफुल्ल भावसार यांचा सत्कार करण्यात आला. तसेस अ‍ॅड. रेखा कोल्हटकर यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
त्याच प्रमाणे डॉ. महेश थोरवे, स्मिता देशपांडे, रोहिणी पवार, वैशाली चांदे, दिपा मॅडम, सुधीर रेड्डी, मर्चंट मॅडम, विद्या मॅडम, सचिन झांडे पाटील, श्वेता पांडे व अंबादास बनसोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” सद्गुणांची पूजा हीच ईश्वरपूजा आहे. परंतू आज या देशाला जाती धर्माचा शाप लागलेला आहे. अशावेळेस विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून मानवकल्याणासाठी कार्य करावे. स्वाभिमान, सत्व आणि कर्तव्याची जाण सर्वाना हवी आहे. यासाठी वकिलांनी राष्ट्रीय स्तरावरील राउंड टेबल कॉन्फरन्स घ्यावी. मानवाचे अंतिम सत्य काय आहे. हे ओळखावे परंतू व्यक्ती हा चुकीच्या दिशेने जाता कामा नये. अशा वेळेस लायब्ररीची दिशा काय असेल हे पहावे.”
न्यायाधीश मनिषा काळे म्हणाल्या,” कौटुबिक न्यायालयाने आज ज्ञानाचे दरवाजे उघडले आहे. ज्ञान ही अशी गोष्ट आहे जीची भूक कधीही थांबत नाही त्यामुळे सतत वाचन सुरू ठेवावे.”
अ‍ॅड. सुधाकर आव्हाड म्हणाले,” पुस्तक हे देशाच्या संस्कृतीचे मस्तक असते. या देशात वाचन संस्कृती ही ऋग्वेदापासून होती. कालानुरूप वाचन संस्कृती वाढत असतांना १८२९ साली लायब्ररीचा उपक्रम सुरू झाला. शब्द संग्रह वाढविण्यासाठी सतत वाचन करावे. शब्द विसरून जात असतील तर लिखाण करावे. प्रत्येक व्यक्ती ने सर्वात प्रथम श्रवण, मनन, चिंतन, लेखन आणि बोलणे करावे.”
अ‍ॅड. गणेश कवडे यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, पुण्यात १९८९ या वर्षी कौटुंबिक न्यायालयाची स्थापना झाली. येथे वाचनालय सुरू करण्यासाठी बर्‍याच अडचणी आल्यात पण उच्च न्यायालयाच्या परवानगीने चला जागा मिळाली आणि अत्याधुनिक ई लाइब्ररीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. हे कोर्ट देशातील एक सर्वोत्तम मॉडल आहे.”
सूत्रसंचालन अ‍ॅड. कोमल देशमुख यांनी केले. अ‍ॅड. भूषण कुलकर्णी यांनी आभार मानले.

कृत्रिम बुद्धिमत्ता टूल्सचा वापर करताना सावधगिरी बाळगा

मुंबई, दि. 9 : डिजिटल युगात संगणक हा आपला अविभाज्य भाग बनला आहे. शिक्षण, व्यवसाय, बँकिंग, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांमध्ये संगणकाचा वापर होतो. या डिजिटल युगात  संगणकाच्या मूलभूत गोष्टींची  माहिती असणे आवश्यक आहेच, त्याचबरोबर कामामध्ये सुलभता, सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा संगणक सजग असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मास्टेक नॉसकॉमच्या प्राजक्ता तळवलकर यांनी सांगितले.

टेक – वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात ‘डिजिटली सजग बना’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. नॅसकॉमचे अधिकारी प्राजक्ता तळवलकर, राहुल मुलाने यांनी मार्गदर्शन केले.माहिती तंत्रज्ञानाच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर करताना सावधगिरीने केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना डेटा चोरी होणार नाही यासाठी सतर्क असणे आवश्यक असून चॅट जीपीटी सारख्या एआय टूल्सवर काळजीपूर्वक डेटा दिला पाहिजे असा सल्ला राहुल मुलाने यांनी उपस्थितांना दिला.

यासोबतच संगणकाचे विविध भाग, ऑपरेटिंग सिस्टीम, संगणकाचा कीबोर्ड वापरताना उपयोगी पडणारे शॉर्टकट, जीमेल वापरताना स्मार्ट ईमेल आणि दिनदर्शिकेचा वापर कसा करावा, जीमेल मधील लेबल्सचा उपयोग, गूगल नोट्स, गूगल लेन्स, डॉक्युमेंट डिजिटायझेशन याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

मेट्रो तीनच्या अंतिम मार्गाचे ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 9 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यानच्या (9.77 किमी) सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मेट्रो तीनच्या आचार्य अत्रे चौक ते कुलाबा या मार्गावरील अंतिम टप्प्याचा शुभारंभ येत्या ऑगस्ट महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

मुंबई मेट्रो लाईन-3 (फेज 2अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी स्थानकातून हिरवी झेंडी दाखवून केला. त्यानंतर मान्यवरांनी बीकेसी ते सिद्धीविनायक मेट्रो स्थानकादरम्यान प्रवास करत मेट्रोचा आनंद लुटला. यावेळी जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी सान, प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

मेट्रोच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी  या 13 कि.मी. मार्गाचे लोकार्पण 7 ऑक्टोबर 2024 रोजी झाले. आता फेज 2अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्ग हा दुसरा टप्पा उद्यापासून नागरिकांसाठी खुला होणार आहे. आतापर्यंत 22 कि.मी. मेट्रो सुरू झाली आहे. मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत असून मेट्रो तीनचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. येत्या ऑगस्टमध्ये मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्याचा मार्गावरील मेट्रो सेवा सुरू होईल. मेट्रो 3 मुंबईतील विमानतळांशीदेखील जोडली जाणार आहे.

मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार

मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा मेट्रोचा मार्ग मिठी नदीच्या खालून जात आहे. त्याचप्रमाणे गिरगाव सारख्या गर्दीच्या ठिकाणीही मेट्रोचे काम सुरळीत झाले आहे. आता अंतिम टप्प्यातील दोन स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंतच्या मेट्रोला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मार्गावर प्रवाशांना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. या मार्गावरील सर्व मेट्रो स्थानकेही अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असून प्रत्येक स्थानकावर प्रवेशासाठी अनेक प्रवेश मार्ग असल्याने गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल. तसेच मेट्रो मार्ग हे प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोची कामे मोठ्या वेगाने सुरू आहेत. याद्वारे मुंबईकर तसेच महामुंबईतील नागरिकांसाठी सुलभ व अखंड परिवहन जोडणी (सिमलेस ट्रान्स्पोर्ट सिस्टीम) यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे. यावर्षी 50 कि.मी. तर पुढील वर्षी आणखी 50 कि.मी. मेट्रोचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सिंगल प्लॅटफॉर्मवर सर्व सार्वजनिक परिवहन सेवा मिळणार

मेट्रो, बेस्ट, लोकल या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी सिंगल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यातून प्रवाशांना एकाच तिकीटावर प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत हा प्रयोग सुरू करण्यात येणार असून त्यानंतर महामुंबईतही ही सेवा देण्यात येणार आहे. सध्या यावर प्रायोगिक तत्वावर काम सुरू असून लवकरच त्याचा व्यावसायिक वापर सुरू होईल. यामुळे नागरिकांना मुंबई तसेच महामुंबई परिसरात सुलभपणे प्रवास करता येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

बेस्टने कालच गुगल सेवेबरोबर सांमजस्य करार केला आहे. यापुढे बेस्टच्या बसेसचे रिअल टाईम लोकेशन गुगलवर मिळणार असून या ठिकाणी प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजनही करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांना दिलासा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबईकरांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. मेट्रोमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मेट्रोमुळे या मार्गावरील सुमारे चार ते पाच लाख वाहने कमी होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन व वेळेची बचत होणार आहे. देशातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे मुंबईत उभारण्यात येत आहे. नागरिकांची गरज ओळखून कामे होत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मेट्रोची कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील 50 टक्के वाहने कमी होतील. त्यामुळे महामुंबईकरांसाठी मेट्रो प्रकल्प वरदान ठरणार आहे.

टप्पा 2 अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाची माहिती :

– स्थानकांची संख्या – 6 (सर्व भूमिगत)

– अंतर – 9.77 किमी

– हेडवे – 6 मि 20 सेकंद

– तिकिटाचे दर – किमान भाडे रु. १०/-, कमाल भाडे रु. ४०/-

– गाड्यांची संख्या – ८

– प्रवास वेळ (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक)- १५ मिनिटे २० से

– फेऱ्यांची संख्या – २४४ फेऱ्या

– प्रवास वेळ आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक- ३६ मी

– तिकिट दर आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक किमान भाडे रु. १०/-, कमाल भाडे रु. ६०/-

– एकूण एस्केलेटरची (सरकते जीने) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) २०८

– एकूण उद्वाहक (लिफ्ट) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) – ६७

कनेक्टिविटी

बीकेसी, वरळी यांसारख्या बिझनेस हब्सना जोडले जाणार आहे. बीकेसी स्थानक मेट्रो मार्ग 2 बी आणि बुलेट ट्रेनशी भविष्यात जोडले जाणार असून त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होणार आहे. सिद्धिविनायक मंदिर, माहीम दर्गा आणि माहीम चर्च यासारखी धार्मिक स्थळे तसेच शिवाजी पार्क, रवींद्र नाट्य मंदिर, शिवाजी मंदिर, यशवंत नाट्य मंदिर, प्लाझा सिनेमा यासारखी मनोरंजनाची ठिकाणे देखील या मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

मुंबई– मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची आज भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्लीतील निर्वाचन सदन येथे भेट घेतली. ही भेट निवडणूक आयोगाकडून विविध राष्ट्रीय व राज्य पातळीवरील राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी सुरू असलेल्या संवादाचा एक भाग आहे.

या संवादांमुळे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाध्यक्षांना थेट आयोगासोबत आपले सूचनात्मक मुद्दे मांडता येतात, ही एक दीर्घकाळची गरज होती.

यापूर्वी आयोगाकडून एकूण ४,७१९ सर्वपक्षीय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये ४० मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ), ८०० जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ), आणि ३८७९ मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांच्याद्वारे झालेल्या बैठकांचा समावेश असून त्यामध्ये २८ हजारांहून अधिक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून टोळक्याकडून तरुणाला मारहाण, वाहनांची तोडफोड

लोणी काळभोरमध्ये एकाला अटक
पुणे-लोणी काळभोरमधील म्हातोबाची आळंदी येथे राहणाऱ्या एका तरुणाला पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयित आरोप करुन टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर संबंधित टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

याप्रकरणी आदित्य संतोष इंगोले (वय २४), करण शंकर गावडे (वय १९) यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राेहित सुभाष जावळकर (वय ३२, रा. म्हातोबाची आळंदी, लोणी काळभोर) याने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रोहित जावळकर हा त्याच्या घराजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपी गावडे, इंगोले आणि त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार त्याठिकाणी आले. ‘तु पोलिसांचा खबरी आहे’, असा आरोप करुन आरोपी गावडे, इंगोले आणि साथीदारांनी त्याला थेट लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जावळकर याच्या घराच्या परिसरातील रस्त्यावरील गाड्यांची तोडफोड करुन दहशत पसरवली गेली.या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी आरोपी संतोष इंगोलेला अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

माहेश्वरी सहेली ग्रुपच्या ‘समुद्र मंथन’ ने भारावले पुणेकर !

पुणे :

माहेश्वरी सहेली महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या,अध्यक्षा विजया बांगड़ व नीता बिहानी यांच्या संकल्पनेवर आधारित ‘समुद्र मंथन’ या भव्य पौराणिक नृत्यनाटिकेच्या सादरीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व उपस्थित पुणेकर भारावून गेले ! कार्यक्रमाचे नियोजन,प्रस्तुती’ऑयस्टर इव्हेंट ‘च्या संयोजिका दीपा बाफना व कविता खिंवसरा यांनी केले.१५० पेक्षा जास्त महिला कलाकारांना योग्य प्रशिक्षण देऊन,उत्तम संवादलेखन,कलात्मक कोरियोग्राफी,ध्वनि मुद्रण,वीडियो ग्राफिक्स,आकर्षक प्रॉप्स व टेक्नीकल इफेक्ट्सद्वारे भव्यदिव्य व अंगावर शहारे आणणारा पौराणिक नृत्य नाटिकेचा समुद्र मंथन हा कार्यक्रम सादर करण्यात आला.योगेश फूलफगर,प्रणव पद्मनाभ,अनिरुद्ध पद्मनाभ,शिल्पा पारेख व जागृती देसरडा-संघवी यांचे सहकार्य मिळाले. पौराणिक नृत्य नाटीकेला साजेशी अप्रतिम वेशभूषा हेमा बूब व रूपाली काबरा यांनी केली.सहेली ग्रुप च्या वतीने संगीता बिहाणी ,मीना बिहाणी व संयोजन समितीचे सहकार्य लाभले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर,उद्योजक मोनिका पोफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे दि.५ मे २०२५ रोजी हा कार्यक्रम झाला. माहेश्वरी सहेली ग्रुप च्या ३५ वर्षे वाटचालीचा आढावा यावेळी घेण्यात आला.सहेली ग्रुप तर्फे अनेक सामाजिक संस्था, प्रकल्पाना यावेळी मदत देण्यात आली.पुणे जिल्हा माहेश्वरी समुदाय चे अध्यक्ष रतन राठी , महेश सोमाणी ,संजय बियाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भव्य नृत्य नाट्याने भारावले पुणेकर !

माहेश्वरी सहेली ग्रुप आयोजित च्या ‘समुद्र मंथन’ या भव्य नृत्यनाटिकेच्या सादरीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला. उपस्थित पुणेकर भारावून गेले ! देव-दानवांच्या युद्धात अमृतप्राप्तीसाठी केलेले समुद्र मंथन या नाट्यात अतिशय परिणामकारकरीत्या दाखविण्यात आले.फक्त महिलांनी ते सादर केले आणि वाहवा मिळवली. दोन महिने माहेश्वरी ग्रुपने सादरीकरणासाठी मेहनत घेतली होती.१५० पेक्षा जास्त महिला कलाकारांना योग्य प्रशिक्षण देऊन,उत्तम संवादलेखन,कलात्मक कोरियोग्राफी,ध्वनि मुद्रण,वीडियो ग्राफिक्स,आकर्षक प्रॉप्स व टेनिकल इफेक्ट्सद्वारे भव्यदिव्य व अंगावर शहारे आणणारा पौराणिक नृत्य नाटिकेचा समुद्र मंथन हा कार्यक्रम सादर करण्यात आला.’ऑयस्टर इव्हेंट’च्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

पाकचे ३६ ठिकाणी घुसखोरीचे प्रयत्न भारताने हाणून पाडले

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ८-९ मे च्या रात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांची माहिती आज पत्रकार परिषदेतून दिली.भारत-चीन तणावाच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाची ही सलग तिसरी पत्रकार परिषद आहे

८-९ मे च्या मध्यंतरी रात्री, पाकिस्तानी सैन्याने भारतीय युद्धक्षेत्रात अनेक हल्ले केले, लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. आंतरराष्ट्रीय सीमेवर ३६ ठिकाणी घुसखोरीचे प्रयत्न झाले. गोळीबार झाला. भारताने घुसखोरांना ठार मारले.

८-९ मे च्या मध्यंतरी रात्री, पाकिस्तानी सैन्याने भारतीय युद्धक्षेत्रात अनेक हल्ले केले, लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. आंतरराष्ट्रीय सीमेवर ३६ ठिकाणी घुसखोरीचे प्रयत्न झाले. गोळीबार झाला. भारताने घुसखोरांना ठार मारले.
त्यांचा उद्देश हवाई संरक्षण प्रणालींबद्दल गुप्तचर माहिती आणि माहिती गोळा करणे आहे. हे तुर्कीचे ड्रोन होते. याची चौकशी केली जात आहे. एक UAV देखील सापडला, जो निष्क्रिय करण्यात आला.विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या की, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला, ज्यामध्ये काही सैनिक जखमी झाले. ७ मे २०२५ रोजी रात्री ८:३० वाजता भारताने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला आणि त्या काळात त्यांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले नाही. नागरिकांना ढाल म्हणून वापरले जात होते.

‘पंजाब सेक्टरमध्ये हाय एअर डिफेन्स अलर्ट दरम्यान, आमचे हवाई क्षेत्र नागरी उड्डाणांसाठी बंद होते परंतु एक नागरी उड्डाण पाकिस्तानच्या हद्दीवरून चालत होते.’ भारतीय हवाई दलाने संयम दाखवून प्रतिसाद दिला आणि आंतरराष्ट्रीय नागरी हवाई सेवांची सुरक्षा सुनिश्चित केली.
विक्रम मिस्री म्हणाले, काल रात्री पाकिस्तानने चिथावणीखोर कारवाई केली
विक्रम मिस्री म्हणाले की, काल रात्री पाकिस्तानी सैन्याच्याकारवायांबद्दल तुम्हाला माहिती मिळाली आहे. या चिथावणीखोर कारवाया होत्या, त्यांनी भारतीय शहरे, नागरी पायाभूत सुविधा आणि काही लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य केले. भारतीय लष्करी तुकड्यांनी याला प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानचा दावा आहे की त्यांनी कोणत्याही धार्मिक स्थळावर हल्ला केला नाही. त्यांनी पूंछमधील गुरुद्वारावर हल्ला केला. या हल्ल्यांची जबाबदारी घेण्याऐवजी, पाकिस्तान म्हणत आहे की भारतीय सैन्य हे करत आहे. पाकिस्तान आपल्या कृती आणि आक्रमकता मान्य करण्यास नकार देत आहे आणि जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.

विदेश सचिव विक्रम मिस्री ने कहा, “…अपनी हरकतों को स्वीकार करने के बजाय, पाकिस्तान ने यह बेतुका और अपमानजनक दावा किया कि भारतीय सशस्त्र बल अमृतसर जैसे अपने ही शहरों को निशाना बना रहे हैं और पाकिस्तान पर दोष मढ़ने की कोशिश कर रहे हैं… पाकिस्तान ने गलत सूचना फैलाई कि भारत ने ड्रोन हमले के जरिए ननकाना साहिब गुरुद्वारे को निशाना बनाया, जो एक और सरासर झूठ है… पाकिस्तान सांप्रदायिक विवाद पैदा करने के इरादे से स्थिति को सांप्रदायिक रंग देने की पूरी कोशिश कर रहा है…”

पाकिस्तान म्हणत आहे की आम्ही नानक साहिबवर ड्रोन हल्ला केला आहे. पाकिस्तान या मुद्द्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. पहलगाम हल्ल्यात हेच दिसून आले.

गुरुद्वारावरील हल्ल्यात काही शीख सदस्यांचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तान म्हणत आहे की आपण आपल्याच शहरांवर हल्ला करत आहोत, ही फक्त कल्पना आहे.
करतारपूर कॉरिडॉर खुला आहे की नाही? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले,’ तुम्हाला परिस्थितीची आणि नियंत्रण रेषेवरील परिस्थितीची जाणीव आहे. कर्तारपूर साहिब कॉरिडॉरवरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.सुरक्षेच्या कारणास्तव, कर्तारपूर साहिब कॉरिडॉर पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आला आहे.
धार्मिक स्थळांना लक्ष्य केल्याची चर्चा होती; एका चर्चचाही उल्लेख केला जात आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,’या निंदनीय कृत्याचे वृत्त आहे. पाकिस्तानने डागलेला एक शेल पूंछमधील क्राइस्ट स्कूलजवळ पडला. क्राइस्ट स्कूलच्या एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ख्रिश्चन कॉन्व्हेंटवरही बॉम्ब पडला आहे. काही लोकांनी भूमिगत हॉलमध्ये लपून आपले प्राण वाचवले. पाकिस्तान चर्च, गुरुद्वारा आणि मंदिरांना लक्ष्य करत आहे.