Home Blog Page 410

पीएमआरडीएच्या तीन टप्यातील कारवाईत तब्बल साडेतीन हजार अतिक्रमणांवर हातोडा

वाहतूक सुरळीत करण्यासाठी शासकीय यंत्रणेची संयुक्तपणे व‍िशेष मोहीम

पुणे : शहराभोवती असणाऱ्या राष्ट्रीय व राज्यमार्गावर अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांमुळे वाहनधारकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी याची दखल घेत इतर शासकीय यंत्रणांच्या मदतीने गत काही द‍िवसात तीन टप्यात राबवलेल्या व‍िशेष मोह‍िमेत साडेतीन हजार अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

वाहतूक कोंडीचा प्रश्न न‍िकाली काढण्यासाठी पीएमआरडीएसह राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमसी, पीसीएमसी यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी संयुक्तरित्या विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात पह‍िल्या टप्यात नगर वाघोली रोडवर २९ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान राबवलेल्या ८२२ कारवाई ८२ हजार २०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामांचे न‍िष्कासन करण्यात आले. दुसऱ्या टप्यात पुणे नाशिक रोड, पुणे सोलापूर रस्ता आण‍ि चांदणी चौक पौड रस्त्यादरम्यानची अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. ३ ते १३ मार्चदरम्यान राबवलेल्या या कारवाईत २ हजार ४७८ कारवाई करत २ लाख ४७ हजार ८०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडला.

पीएमआरडीएकडून त‍िसऱ्या टप्याच्या मोह‍िमेची आखणी करण्यात आली असून त्याची सुरुवात १७ मार्चपासून करत ती ३० मार्चपर्यंत चालणार आहे. यात १७ आण‍ि १८ मार्च रोजी हडपसर ते द‍िवे घाट आण‍ि पुणे – सातारा रोड २१० अनधिकृत बांधकामे काढण्यात आल्याने ३४ हजार ५०० चौरस फुटांपर्यंतचा रस्ता मोकळा झाला. साधारण गत दोन मह‍िण्यात तीन टप्यात राबवलेल्या अनधिकृत बांधकामांविरुद्धच्या मोह‍िमेत एकूण ३ हजार ५१० अनधिकृत बांधकामे पाडण्यात आल्याने ३ लाख ४७ हजार ३०० चौरस फुटावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे.

तीन टप्यात व‍िशेष मोहीम
१ ) पह‍िल्या टप्यात नगर वाघोली रोडवर केलेल्या ८२२ कारवाई ८२ हजार २०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामांचे न‍िष्कासन
२ ) दुसऱ्या टप्यात पुणे नाशिक रोड, पुणे सोलापूर रस्ता आण‍ि चांदणी चौक पौड रस्त्यावर २ हजार ४७८ कारवाईत २४७८०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा
३ ) त‍िसऱ्या टप्यात हडपसर ते द‍िवे घाट, पुणे – सातारा रोड एकूण २१० अनधिकृत बांधकामे काढल्याने ३४५०० चौरस फुटांपर्यंतचा रस्ता मोकळा झाला

संत मुक्ताईच्या भूमिकेसाठी नेहाने घेतले वाणी प्रशिक्षण

भूमिकांच्या जवळ जाताना या कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यातही ती भूमिका आव्हानात्मक असेल तर जबाबदारी अधिक वाढते. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून अभिनेत्री नेहा नाईक हा युवा चेहरा भेटीला येणार आहे. या चित्रपटातील संत मुक्ताईची भूमिका ती साकारणार आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. 

नेहा नाईक ही अभिनेत्री पुण्यामध्ये रंगभूमीवर अतिशय उत्तमरीत्या कार्यरत आहे. आता ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या एका वेगळ्या विषयावर तितक्याच ताकदीची भूमिका साकारताना नेहाने आपल्या देहबोली सोबत वाणी संस्काराचे खास प्रशिक्षण पुण्यातील ज्येष्ठ नाट्यगुरू प्रा. श्यामराव जोशी यांच्याकडे तब्बल तीन महिने घेतले. मुक्ताई यांनी आपल्या अल्पकालीन आयुष्यात जे अनुभवले आणि त्यायोगे जे भोगले त्या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या अभंगातून आणि काव्यातून उमटले आहे. या चित्रपटाची भाषा ही १३व्या शतकातील मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे उच्चारांमध्ये सहजता यावी यासाठी अनेक अवघड आणि कष्टप्रद अभ्यासाचे प्रकार नेहाला अभ्यासावे लागले. संत मुक्ताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून उलगडणार आहे. त्यामुळे भाषेचा हा अभ्यास अत्यंत अनिवार्य होता.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना नेहा सांगते, “या चित्रपटात काम करायचं म्हणजे आधी या चित्रपटाच्या संहितेवर प्रभुत्व मिळवायला हवं. म्हणून मी त्यातल्या भाषेच्या अभ्यासावर भर दिला. प्रा. श्यामराव जोशींची शिकवण्याची पद्धत अत्यंत शिस्तशीर आणि प्रभावी असल्याने हळूहळू ती भाषा मला आत्मसात व्हायला लागली. यातील संवादांच्या अनेक दिवस तालमी चालू होत्या. भाषेबरोबरच ते शब्द उच्चारताना स्वाभाविकपणे होणारी देहबोली कशी असेल याचे दिग्पाल दादाने धडे दिले. त्याकरता माझ्या गावी जाऊन तिथल्या महिलांच्या देहबोलीचे निरीक्षण मी केले. वयाच्या आणि कारकिर्दीच्या सुरुवातीलाच इतकी कस लावणारी तरीही सुंदर प्रक्रिया मला अनुभवायला मिळाली हा मी मुक्ताईचा आशीर्वादच समजते. चित्रपटात मृणाल कुलकर्णींसारख्या अनुभवी कलाकारांना काम करताना पाहताना माझे एक वेगळेच प्रशिक्षण झाले. अभिनय या बाबतीत या सिनेमाने मला नवा दृष्टिकोन दिला. म्हणून ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’हा चित्रपट माझ्यासाठी कायम हृदयाच्या जवळ असणार आहे.”

कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह किंवा प्रतिमा या भावंडांच्या भूमिका करणाऱ्या कलाकारांसोबत येऊ नयेत यासाठी ऑडिशन घेऊन सुमारे दिडशे तरुणींमधून नेहाची निवड केल्याचं दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, “नेहा जरी नवखी असली तरी तिने खूप मेहनत घेऊन आपली व्यक्तिरेखा चित्रपटात आत्मविश्वासाने साकारली आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटामध्ये नेहाने साकारलेल्या ‘संत मुक्ताई’ द्वारे आजच्या पिढीला भाऊ-बहिणीच्या नात्याची नव्याने ओळख व्हायला मदत होईल अशी मला खात्री आहे.”

सायबर सेलने फसविल्या गेलेल्या कंपनीला सुमारे ४१ लाख रुपये परत मिळवून दिले


पुणे- येथील नामांकित कंपनीला गंडा घालण्याच्या उद्देशाने फसवणुक केलेली रक्कम ४०,९०,६०५/-रूपये सायबर पोलीसांच्या सतर्कतेने कंपनीस परत मिळवुन देण्यात यश आले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर कडील तक्रार अर्ज क्रमांक १७९/२०२५ यामध्ये “नामांकीत कंपनीच्या अकाऊंट यांना सायबर गुन्हेगाराने अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉटसअॅप मेसेज करून सदर कंपनीचे एम.डी. असल्याचे भासवुन ते एका मीटींग मध्ये असल्याचे व हा माझा पर्सनल मोबाईल क्रमांक असल्याचे सांगुन दुस-या कंपनीचे पेमेंट तात्काळ करावयाचे आहे असे बतावणी करून कंपनीचे बैंक खात्यामधुन त्यांनी व्हॉटसअॅप मेसेज द्वारे पाठविलेल्या बैंक खात्यामध्ये रक्कम ४०,९०,६०५/-रूपये पाठविण्यास सांगुन आर्थिक फसवणुक केली आहे.” म्हणुन तक्रार नोंद आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून सदर तक्रारीची गंभीर दखल घेऊन परराज्यातील बँक खात्याबाबत पत्रव्यवहार करून तसेच सदरचे बँक खाते हे परराज्यातील असल्याने तेथील नोडल अधिकारी यांचे संपर्क साधुन वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांचे मदतीने फसवणुक झालेली रक्कम गोठविण्यात येवुन ती तक्रारदार यांना परत मिळवुन देण्यात सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांना यश आले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ , सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे,वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तथा तपासी अधिकारी तुषार भोसले व पोलीस अंमलदार नवनाथ कोडे, किरण जमदाडे, अश्विनी भोसले, ज्योती दिवाणे, माधुरी कराळे व सोनाली चव्हाण यांचे पथकाने केलेली आहे.
अशा प्रकारची सायबर फसवणुक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी –
१. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेसेज करून तुमचा बॉस किंवा जवळची व्यक्ती असल्याचे भासवुन पैशाची मागणी केल्यास, त्या व्यक्तीशी संपर्क साधल्याशिवाय पैसे पाठवु नये.
२. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल करून तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज काढुन पैशाची मागणी केल्यास, त्या व्यक्तीशी संपर्क साधल्याशिवाय पैसे पाठवु नये.
(स्वप्नाली शिंदे) वरीष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर

IIHL चा 2030 पर्यंत 50 अब्ज अमेरिकन डॉलर मूल्यांकनाचे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार: अध्यक्ष अशोक हिंदुजा

पुणे- इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्जचे अध्यक्ष अशोक हिंदुजा यांनी मंगळवारी घोषणा केली की रिलायन्स कॅपिटल चे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड (IIHL) ने 2030 पर्यंत 50 अब्ज अमेरिकन डॉलर मूल्यांकन साध्य करण्याचे लक्ष्य ठरवले आहे. हे अधिग्रहण पूर्ण करून कर्जबाजारी कंपनीच्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रिझोल्यूशन प्रक्रियेला पूर्णविराम दिला असल्याचे त्यांनी सांगितले.इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड (IIHL) ने बोली रक्कम वित्तपुरवठादारांच्या एस्क्रो खात्यात हस्तांतरित केली आहे आणि प्रशासकांकडून व्यवस्थापनाचा ताबा बुधवारी स्वीकारला जाणार आहे.मॉरिशसस्थित IIHL ने रिलायन्स कॅपिटल (RCAP) साठी 9,650 कोटी रु. च्या बोलीसह यशस्वी इच्छुक म्हणून स्थान मिळवले. त्यानंतर, कंपनीने रिलायन्स जनरल इनश्युरन्स (RGIC) ची सॉल्व्हन्सी बळकटीसाठी अतिरिक्त 200 कोटी रु. चे योगदान दिले. हे बोली रकमेपेक्षा जास्त होते.“आमच्या बाजूने व्यवहार पूर्ण झाला आहे. आपण बोलत असताना एका एस्क्रो खात्यातून दुसऱ्या एस्क्रो खात्यात पैसे हस्तांतरित होत आहेत,” असे हिंदुजा म्हणाले.आता मूल्य निर्मितीचा प्रवास सुरू होत असून रिलायन्स कॅपिटल व्यवसायाचे मूल्य अंदाजे 20,000 कोटी रू. असेल असे ते म्हणाले. IIHL संपूर्ण RCAP व्यवसायाचे पुनरावलोकन पूर्ण करून आवश्यक निधी गुंतवणुकीबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.जोपर्यंत व्यवसाय मूल्यनिर्मितीच्या आवश्यकतांची पूर्तता करत आहे तोपर्यंत भांडवल गुंतवणूक समस्या ठरणार नाही असे ते म्हणाले. उपकंपन्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, रिलायन्स कॅपिटलच्या सुमारे 39-40 उपकंपन्या आहेत आणि नव्या व्यवस्थापनाकडून त्यापैकी अनेक कंपन्यांची विक्री होईल. याचे कारण त्यातील बहुतांश उपकंपन्या प्रामुख्याने लहान शेल कंपन्या असून त्यांचे व्यवसाय देखील लहान आहेत. ब्रोकिंग आणि मालमत्ता पुनर्रचना व्यवसाय नव्या व्यवस्थापनाकडे कायम ठेवला जाईल. आरबीआयकडे मुख्य गुंतवणूकदार कंपनी म्हणून नोंदणीकृत असलेल्या RCAP मध्ये रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स मनी, रिलायन्स सिक्युरिटीज,रिलायन्स अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स यांसारख्या अनेक उपकंपन्या आहेत.

विमा कंपन्यांच्या लिस्टिंगबाबत विचारले असता, हिंदुजा म्हणाले की, ते मूल्यनिर्मितीच्या दोन वर्षांनंतर होऊ शकते. या आर्थिक सेवा कंपनीत 1.28 लाख कर्मचारी आहेत आणि नव्या व्यवस्थापनाकडून शक्य तेवढ्या कर्मचाऱ्यांच्या हितांचे रक्षण केले जाईल असे त्यांनी आश्वासन दिले.ब्रँडिंग संदर्भात ते म्हणाले, “NCLTच्या मंजुरीनुसार आम्ही तीन वर्षे त्याच नावाने काम करू शकतो, पण आम्हाला इंडसइंड ब्रँडचा प्रसार करायचा आहे आणि अधिग्रहणानंतरच्या मोहिमेसाठी ब्रँड एकत्रीकरणावर व्यावसायिक एजन्सीज काम करत आहेत.”नवीन NCLT निर्देशांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, सर्व पक्षांनी मार्च 20 पर्यंत IIHL कडे मालकी हस्तांतरणासाठीची प्रक्रियात्मक कामे पूर्ण करावीत असा सल्ला देण्यात आला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने आपल्या शेवटच्या सुनावणीत सर्व पक्षांनी मार्च 20 पर्यंत अंमलबजावणी प्रक्रिया पूर्ण करावी याची खात्री करावी, असे सांगत पुढील सुनावणीसाठी 25 मार्च 2025 ही तारीख निश्चित केली होती.एप्रिल 2023 मध्ये, IIHL ने रिलायन्स कॅपिटलसाठी कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रोसेस (CIRP) अंतर्गत झालेल्या निविदा प्रक्रियेत यशस्वी ठरून 9,650 कोटी रु. च्या प्रस्तावासह यशस्वी रिझोल्यूशन अर्जदार म्हणून स्थान मिळवले होते. गेल्या वर्षी IIHL ला भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Irdai) तसेच संबंधित शेअर बाजार आणि कमोडिटी एक्स्चेंजमधून सर्व आवश्यक नियामक मंजुरी प्राप्त झाली होती.सेंट्रल बँकेने नागेस्वरा राव वाय यांना प्रशासक म्हणून नेमले होते. त्यानी नंतर डिसेंबर 2021  मध्ये कंपनीच्या अधिग्रहणासाठी निविदा मागवल्या होत्या.

…त्यांना कबरीतूनही खोदून काढू, सोडणार नाही”, देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा विधानसभेत दिला इशारा!

मुंबई-आता नागपूरमधील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असून पोलिसांकडून दोषींना शोधून काढण्याचं काम चालू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा विधानसभेत निवेदन दिलं आहे.“नागपूरच्या सीपींनी सांगितलं की हे पूर्वनियोजित होतं की नाही याची आम्ही चौकशी करत आहोत. अजून अंतिम निष्कर्षापर्यंत आलेलो नाही. त्यामुळे ते वेगळं बोलले आणि मी वेगळं बोललो असं काहीही नाही,पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अद्दल घडवणारच, या भूमिकेचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला. मी पुन्हा सांगतो, नागपूर प्रकरणात ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले असतील, त्यांना कबरीतूनही खोदून काढू. सोडणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. पण पोलिसांवर हल्ला क्षम्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई नियोजित वेळेत केली जाईल”, असं फडणवीस म्हणाले.१९९२ नंतर नागपुरात कधीही दंगल झालेली नाही. परवाची झालेली घटना काही लोकांनी जाणीवपूर्वक घडवून आणला हे लक्षात येतं. तिथे औरंगजेबाची कबर जाळली गेली. त्यावर कुठलीही आयात लिहिलेली नव्हती. आम्ही या गोष्टीचा सखोल तपास केला आहे. पण जाणीवपूर्वक आयाती जाळल्या अशा प्रकारचे संदेश पसरवण्यात आले आणि त्यातून ही पुढची घटना घडली”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी मांडली. गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आठव्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही प्रमुख राज्ये महाराष्ट्राच्या पुढे असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच दोन दिवसांपासून चर्चेत आलेल्या नागपूर शहराचा सातवा क्रमांक लागत असल्याचे ते म्हणाले. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत 2 हजार 586 ने घट झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही गोष्ट खरी आहे की देशामध्ये महाराष्ट्र एक अतिशय महत्त्वाचे राज्य आहे. देशामध्ये जर आपण तुलना केली तर आपला क्रमांक गुन्हेगारीमध्ये आठवा आहे. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही जी काही महत्त्वाची राज्य आहेत, ती क्राइम रेटमध्ये आपल्या पुढे आहेत. आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही. पहिल्या दहामध्ये सातव्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसते. पण ते यासाठी दिसते की नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचा जवळपास 25 टक्के भाग हा सामील केला.
एनसीआरबीच्या डेटामध्ये ते सध्याची लोकसंख्या पकडत नाही. त्यांचे म्हणणे असते की, आम्ही फक्त जनगनणेचीच लोकसंख्या पकडून, त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढलेले दिसते. मात्र लोकसंख्या 2011 चीच आहे. जर आपण आताची लोकसंख्या पकडली तर नागपूर हे 22 व्या 23 व्या क्रमांकावर जाते. त्यामुळे विचार केला तर पहिल्या दहामध्ये आपले कोणतेही शहर नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मुंबई सारखे शहर हे पंधराव्या क्रमांकावर आहे. पुणे 18 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे, दुसऱ्या क्रमांकावर जयपूर आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंदूर आहे. चौथ्या क्रमांकावर कोची आहे. पाचव्या क्रमांकावर पाटणा आहे. गाझियाबाद, कोझीकोड आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्यामुळे तुलनेने महाराष्ट्रात जी शहरे आहेत, शहरीकरण आणि विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर देखील इथे कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. हे होत असताना आपण जर पाहिले तर एकूण गुन्ह्याची संख्या आपण पाहिली तर आकडेवारी ही महत्त्वाची नसतेच, आकडेवारी ही मिसलिडींग असते. वस्तुस्थिती काय आहे हे महत्त्वाचे असते. तरी देखील काही गोष्टी या आकडेवारीतूनच सांगाव्या लागतात. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत 2 हजार 586 ने घट झाली, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

पुण्यात महिला पोलीस भरती दरम्यान गर्दीमुळे गोंधळ,चेंगरा चेंगरीचे वृत्त पोलिसांनी फेटाळले

पुणे- महिला कारागृह पोलीस भरतीदरम्यान गोंधळ उडाला आहे. यावेळी लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुली आत घुसल्या. या गोंधळात अनेक मुली जखमी झाल्याची माहिती आहे.त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेची तयारी व्यवस्थित नसल्याने हा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं आहे.दरम्यान दीड महिन्यांपासून म्हणजेच 29 जानेवारीपासून पोलिस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सुरुवातीला 500-1000 उमेदवारांना बोलावले होते. त्यानंतर 1500 उमेदवारांना बोलावण्यात आले. आता 1500 विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी सुरू आहे. अत्यंत शांतपणे येथे प्रक्रिया सुरू आहे. आजपासून महिला उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे पालक आले होते. त्यामुळे साडेचार वाजता गर्दी जमली होती. पण चेंगराचेंगरी झालेली नाही. साडेचार वाजता उमेदवारांना आत घेण्यात आले आणि शिस्तीत भरती प्रक्रिया सुरू झाली, अशी माहिती पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

आजपासून पुण्यात महिला कारागृह पोलीस भरती सुरू झाली आहे. त्यासाठी अनेक तरूणी पुण्यात दाखल झाल्या आहेत. ५३१ कारागृह महिला पोलीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडते आहे. मात्र यासाठी तीन हजारांपेक्षा जास्त मुलींनी गर्दी केली. मात्र, यावेळी अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे गोंधळ उडाला.पोलीस प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या मुलींच्या रांगेतील नियोजनात गोंधळ उडाला. गेटवर झालेल्या गर्दीमुळे लोखंडी गेट तुटून पडले आणि त्यावरून मुली आतमध्ये पळत सुटल्या. यावेळी चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापती झाली.

या घटनेनंतर मुलींच्या पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. शिवाजी नगर पोलीस मुख्यालयात जो प्रकार घडला यावर पालकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी या पालकांची काही स्थानिक पोलिसांशी बाचाबाचीदेखील झाली.दरम्यान, ही भरती प्रक्रिया २०२२-२३ पासून रखडलेली आहे. ५१३ जागेसाठी ही रखडलेली भरती प्रक्रिया आता कुठे पार पडते आहे. असं असताना नियोजन नसल्याने या भरती प्रक्रियेला गालबोट लागल्याचं दिसून आलं आहे. या पोलिसांच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे मैदानी चाचणीमध्ये आपली मेहनत तर व्यर्थ जाणार नाही ना अशी भावना विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसत आहे.

औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही म्हणत RSS कबर हटविण्याच्या मागणीपासून दूर

मुंबई-नागपूर दंगलीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया आली आहे. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, अशा स्पष्ट शब्दात आरएसएसने आपली भूमिका जाहीर केली. सोबतच औरंगजेबाची कबर पाडण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या वादापासून स्वतःला दूर केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागपूरमधील हिंसाचाराचा निषेध केला. तसेच कोणत्याही प्रकारचा हिंसाचार समाजाच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे म्हटले.संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची विहिंप आणि इतर संघटनांची मागणी आहे. यावर सुनील आंबेकर म्हणाले की, मुघल सम्राट आजच्या काळात संयुक्तिक विषय नाही. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून आणि त्याच्याशी संबंधित विविध अफवांवरून नागपुरात हिंसाचार उफाळल्यानंतर तणाव वाढला असताना आरएसएसची ही भूमिका समोर आली आहे. 17 मार्च रोजी झालेल्या हिंसक संघर्षानंतर पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात नागपूरमधील दहा पोलिस क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही संचारबंदी लागू आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 21, 22 आणि 23 मार्च रोजी जनसेवा विद्या केंद्र परिसरात वार्षिक एबीपीएस, जी वर्षातील सर्वात महत्त्वाची बैठक आहे. सुनील आंबेकर यांनी माहिती दिली की, एबीपीएसच्या सुरुवातीला सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे संघाच्या कार्याच्या स्थितीचा अहवाल सादर करतील आणि त्यानंतर विविध प्रांतांच्या कार्यकर्त्यांकडून देशभरातील उपक्रम आणि कार्यक्रमांचा अहवाल सादर केला जाईल.

अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा उद्घाटन समारंभ 21 मार्च 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता जनसेवा विद्या केंद्र, चन्नेनहल्ली येथे होणार आहे. आरएसएस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाहक दत्तात्रेय होसाबळे संयुक्तपणे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे उद्घाटन करतील.आंबेकर म्हणाले की, या वर्षी आरएसएस 100 वर्षांचे होत असल्याने, अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान संघाच्या कार्याचा विस्तार करण्यावर विचारविनिमय केला जाईल. विजयादशमी 2025 ते विजयादशमी 2026 हे शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाईल.व्यापक प्रचाराचे नियोजन केले जाईल आणि या प्रचारात सर्व स्तरातील लोकांना सहभागी करून घेतले जाईल. पंच परिवर्तन (सामाजिक सौहार्द, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण जागरूकता, ‘स्व’ (स्वार्थ) आणि नागरिकांची कर्तव्ये यांचा आग्रह) यावर देखील चर्चा केली जाईल आणि शताब्दी वर्षात सर्व स्तरातील लोकांना सहभागी करून घेण्याची योजना आखली जाईल.

भालचंद्र पाठक यांच्या स्मृतीदिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

भालचंद्र पाठक कुटुंबियांकडून मदतीच्या वारशाची जपणूक : आर. एच. मोहम्मद
कार्यक्रमातून साधली राष्ट्रीय एकात्मता : आर. एच. मोहम्मद

पुणे : देशातील नामवंत संशोधकांपैकी भालचंद्र मोहनीराज पाठक हे एक होते. त्यांनी तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. त्यांचे बोलणे रोखठोक असायचे. ते कष्टकऱ्यांसाठी धावून जात असत. सामाजिक शिकवणुकीचा वारसा जपत पाठक कुटुंबियांनी मदतीचे कार्य सुरू ठेवले आहे.बाबां चे संपूर्ण आयुष्यच समाजा करीता आदर्श आहे.असे गौरवोद्गार माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, आणी आत्ताचे महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधीकरणाचे न्यायिक सदस्य आर. एच. मोहम्मद यांनी काढले. समाजा-समाजात जातीच्या भिंती उभ्या राहात असताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता साधली असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
भारतीय कला प्रसारिणी सभेचे दिवंगत सचिव तथा देशातील नामवंत संशोधक भालचंद्र मोहिनीराज पाठक यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त आज (दि.19) गरजू व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व धान्य तसेच आवश्यक वस्तूंचे वाटप मोहम्मद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जांभूळवाडीतील मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना ही मदत देण्यात आली. भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक, प्राचार्य डॉ. अभिजित नातू, प्राचार्य संजय भारती मंचावर होते.
प्रास्ताविकात सचिव पुष्कराज पाठक म्हणाले, संशोधक वृत्तीचे असलेले भालचंद्र पाठक अन्यायाविरुद्ध पेटून उठत असत. निष्काम कर्मयोग या भावनेतून ते कष्टकऱ्यांमध्ये रमले. सढळ हाताने आणि निरपेक्ष भावनेने ते मदतीचा हात पुढे करीत. त्यांचा जीवनप्रवास हाच आमच्यासाठी उपदेशाप्रत आहे. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर आमची वाटचाल सुरू आहे. कलेच्या माध्यमातून भालचंद्र पाठक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नेहाचाही उलगडा त्यांनी केला.
भालचंद्र पाठक आणि त्यांच्या परिवाराशी असलेला स्नेहभाव उलगडून आर. एच. माहेम्मद म्हणाले, भालचंद्र पाठक यांनी अनेक संकटांचा सामना करत वाटचाल केली. पाठक कुटुंबियांनीही अनेक समस्या पार करत वाटचाल सुरू ठेवली आहे. ज्यांच्यात धैर्य असते अशांचीच परिक्षा परमेश्वर पाहात असतो. पाठक कुटुंबिय तत्त्वांशी तडजोड न करता वाटचाल करीत आहेत, ही गौरवाची गोष्ट आहे.
मान्यवरांचे स्वागत पुष्कराज पाठक यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले तर आभार प्राचार्य अभिजित नातू यांनी मानले.
.

गप्पा, गोष्टी आणि गाण्यांची ‌‘कौशल इनामदारी‌’

कलासक्त कल्चरल फाऊंडेशन आयोजित कार्यक्रमास रसिकांची मनमुराद दाद

पुणे : ‌‘संगीतकाराच्या वेशातला गोष्टाड्या‌’ असे अभिरूप धारण करून कौशल इनामदार यांनी आपल्या सांगितीक जीवनाचा पट उलगडला. काही अनुभव, काही मिश्किल टिप्पणी तर विविध गीते सादर करून त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. मी संगीतकार कसा झालो येथपासून, बालगंधर्व चित्रपटातील गीते तसेच मराठी अभिमान गीताच्या निर्मितीमागील कथाही त्यांनी रसिकांसमोर मांडली.
निमित्त होते कलासक्त कल्चरल फाऊंडेशनतर्फे आयोजित गप्पा, गोष्टी आणि गाण्यांवर आधारित ‌‘इनामदारी‌’ या कार्यक्रमाचे. एस. एम. जोशी सभागृहात रंगलेला हा कार्यक्रम रसिकांची मनमुराद दाद मिळवत गेला. सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्यासह चैतन्य गाडगीळ, अमेय ठाकुरदेसाई, सोमेश नार्वेकर यांचा या कार्यक्रमात सहभाग होता.
गोष्टीवेल्हाळता ही आपल्या देशाची ओळख असून या अद्भूत कथारम्य आवडीसह भारतीयांचा दुसरा छंद म्हणजे गाणे गुणगुणणे असे सांगून कौशल इनामदार म्हणाले, माझे आजोबा उत्तम व्हायोलिन वादक होते. ते या परदेशी वाद्यावर अभिजात शास्त्रीय संगीताचे सूर आळवित असत. आजोळी गेलेलो असताना रात्री त्यांच्या स्वरांच्या हिंदोळ्यावरच झोपेच्या आधीन होत असे आणि जागे होत असतानाही त्यांच्याच सूरांची साथ लाभत असे. यातूनच माझ्यामध्ये संगीताची विषेश रूची निर्माण झाली.
युवावस्थेत मी गझलांच्या माहोलात वावरत असे. यातूनच छंदबद्ध लिखाणाचा प्रयत्नही केला आणि गीतकार होण्याची उर्मीही बाळगली.
स्वाभाविक चाल बनविणे म्हणजेच शब्दांचा आणि चालीचा जन्म एकाचवेळी झाला असावा अशी संगीत रचना करण्याकडे माझा कल होता. अशा गप्पांच्या मुशाफिरीत रसिकांना गुंगवून टाकतानाच कौशल यांनी ‌‘दया घना रे दया घना रे‌’, ‌‘घन आभाळीचा तडकावा‌’ तसेच गझलकार सुरेश भट, अरुण म्हेत्रे, अशोक बागवे आणि नलेश पाटील यांच्या गझला सादर करून मैफलीत रंग भरले.
संगीत सुचताना बारा स्वरांच्या मुशाफिरीतूचन निर्मिती होते असे सांगून इनामदार पुढे म्हणाले, संगीत रचना करताना साधर्म्य आणि सांगीतिक चोरी यामधील पुसटश्या रेषेचे भान असणे आवश्यक आहे. गायक, कवीला जसा रियाजाला किंवा विचारांला वेळ मिळू शकतो तसा संगीतकाराच्या रियाजाला वेळ उपलब्ध नसतो, असे सांगून एकाच गझलेला दोन वेगळ्या संदर्भांनी वेगवेगळी चाल कशी लावली याचेही सादरीकरण कौशल इनामदार आणि सोमेश नार्वेकर यांनी केले.
बालगंधर्व चित्रपटाच्या संगीत निर्मितीप्रसंगी ‌‘परवर दिगार‌’ या कव्वालीची निर्मिती का कराविशी वाटली आणि कशी केली हेही त्यांनी मनमोकळेपणाने रसिकांना सांगितले.
मराठी अभिमान गीताच्या निर्मितीमागील कथा उलगडताना मराठी भाषिकांना मातृभाषेचा जाज्वल्य अभिमान पाहिजे, असे सांगून विविध प्रसंगांच्या रसभरीत वर्णनांनी प्रेक्षकांना भावविभोर केले.
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती सांगितली. कलाकारांचा सत्कार श्रीरंग कुलकर्णी, विनिता आपटे, माधुरी वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला.

अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत सरकार गंभीर – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई : राज्यात आणि मुंबई शहरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न वाढत आहे. अधिकृत बांधकाम प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याचा कायदा आहे. मात्र त्यांची अंमलबजावणी झालेली कठोरपणे  झालेली दिसत  नाही.  त्या कायद्यान्वे आजपर्यंत एकाही संबंधित अधिकारी , कर्मचारी यांच्यावर कारवाई झालेली नाही. परंतु सरकार अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम यावर कारवाई करण्या संबंधी गंभीर असून कायद्यातील पळवाट थांबण्यासाठी उपाययोजना करत असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली.  

अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी कायदा झाला मात्र त्याची कठोर अंमलबजावणी होत नाही तसेच मुंबईतील वाढत्या अनधिकृत बांधकामावर सरकारने कारवाई करावी यासाठी विधानपरिषदेत आज  आमदार सचिन अहिर, आमदार अनिल परब, आमदार भाई जगताप, आमदार प्रवीण दरेकर, आमदार सुनील शिंदे   यांनी लक्षवेधी मांडली त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ सभागृहात बोलत होतया. 

विधानपरिषद सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, मुंबई शहरात  7 हजार 951  अनधिकृत बांधकामे आहेत पैकी 1 हजार 211  अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली आहेत. तर 2 हजार 115 प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत आहेत, तसेच  169 प्रप्रकरणे न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार रिवाईज साठी टाकण्यात आलेली आहेत. 

राज्य सरकार कोणत्याही अनधिकृत बांधकामाला किंवा अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नाही असे सांगत राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की,  अनधिकृत बांधकाम करण्यासाठी भराव टाकल्या प्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल झालेले आहेत,  काही प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने आपण कारवाई करू शकत नाही,  मात्र त्यावर काय उपाययोजना करता येतील का? यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. 

दरम्यान, रघुवंशी मिल मधील अनधिकृत बांधकामाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील कमिटी नेमण्यात आल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी सुनील शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

नागपूर येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग; तातडीने चौकशी करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई, दि. १९ : नागपूर शहरातील महाल परिसरात १७ मार्च २०२५ रोजी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान, कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जमावातील काही लोकांकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

जमावातील काही व्यक्तींनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजी केली, ही अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी घटना असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, संबंधित आरोपींची तातडीने ओळख पटवून चौकशी करावी. यावेळी अन्य महिला नागरिकांना त्रास झाला का हे देखील तपासले जावे. अशा घटना रोखण्यासाठी भविष्यात विशेष नियोजन करण्याची गरज असून, महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना आखाव्यात आणि त्यांना आवश्यक प्रशिक्षण व साधनसामग्री पुरवावी, अशीही मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी व्यापक जनजागृती कार्यक्रम राबवणे अत्यावश्यक आहे. समाजात पोलीस दलाबद्दल आदर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मतही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. महिलांचे सक्षमीकरण होण्यासाठी पोलिसांनी त्यांना कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यासाठी प्रभावी प्रशिक्षण द्यावे आणि त्यासंबंधी ठोस धोरण तयार करून शासनास प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सूचित केले.

महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ले गंभीर आणि असह्य असून, अशा घटना रोखण्यासाठी तातडीने कडक पावले उचलण्यात येतील, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.

महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयाच्या प्रशासकीय मालकीच्या छतावरील सौर ऊर्जा प्रणालीचे उद्घाटन

0

मुंबई, दि. १९.०३.२०२५-

महावितरण मुख्यालय प्रशारणीय प्रणालीच्या छतावरील सौर उर्जेचे उद्घाटन महावितरणचे अध्यक्ष व प्रशासकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या लाभार्थ नुकतेच आले. महावितरणचे प्रकाशगड मुख्यालय हे आता सौरऊर्जेव्दारे प्रकाशमान आहे. प्रकाशगड मुख्याची दिनदिनी विजेचीालय गरज भाग करण्यासाठी २८० किलो व नेटवर्कची ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यात आली आहे.

महा पर्यावरणपूरक सौर ऊर्जेचा वापर करून प्रोत्साहन दिले जात आहे. शेतीसाठी शेतकरी वीज उपलब्ध व्हावी मा.मुख्यमंत्री या सदस्यांच्या मार्गदर्शनासाठी मंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राब सत्ता येत आहे. मागेल त्याला सौर कृषी पंपामधून विजेसाठी कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पीएम घर मोफत वीज ग्राहकांना छतावर सौरऊर्जा घरातून विजेच्या स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. फक्त १०० गावे सौरग्राम म्हणजे १०० टक्के सौरउर्जेवर आणण्यासाठी सौरग्राम योजना राबत येत आहे. एकंदरीत हरित ऊर्जेचा वापर विकसित करण्यासाठी विविध योजना चालवल्या जात आहेत.

महावितरणच्या मुख्यालय छतावरील सौर ऊर्जा प्रणालीचे अध्यक्ष संचालक भादिकर (संचालन तथा मानव संसाधन), रप्रसादमे (प्रदीप दिघे (वित्त), योगेश गडकरी (वाणिज्य), कार्यकारी अधिकारी (कल्प) धनंजय औंढेकर, प्रादेशिक संचालक परेश भागवत, प्रमुख विभाग स्वच्छता होती. राजधानीदार मध्ये टेक फोर्स सेलिसेस नागाल यांनी या उभारणी केली आहे.

5.76 एकरावर 1.6 दशलक्ष चौरस फूट,1000 विशेष फ्लॅट्स: बिर्ला इस्टेटचा संगमवाडीत अलिशान टॉवर्सचा ‘बिर्ला पुण्य’ प्रकल्प

पुणे , 17 2025 : आदित्य बिर्ला मार्चअल इस्टेट लिमिटेड 100% पूर्ण बिर्ची उपकंपनी इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड बिर्ला पुण्य हाटेल त्यांची कंपनी सुरू केली असून अंदाजे गुणवत्ता क्षमता 2700 कोटी रु. आहे. संगमवाडीयेथे कंपनीचा निवासी प्रकल्प आहे. 5.76 एकर क्षेत्रावरील या प्रकल्पात 1.6 दशलक्ष चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र असून त्यामध्ये 1000 विशेष फ्लॅट्स तयार करण्यात आले आहेत. हे फ्लॅट्स प्रशस्त आणि आधुनिकासाठी तयार करण्यात आले आहेत. तुमचा समृद्ध सांस्कृतिक वारसा , स्थानिक जैवविविधता आणि स्थापत्यशैलीची प्रेरणा सुरक्षा या शांततापूर्वक विचारपूर्वक डझनवर्समध्ये 1 बीएचके ते 4 बीएचके पर्यंतच्या आलिशान निवासी बस्स असतील . हा घटक गुणटप्प्याने विकसित केला जाणार आहे आणि पहिल्या महत्त्वाच्या दोन टॉवर्स आणि 50 भागांचा समावेश असेल.

अतुलनीय रमणीय जीवन अनुभवण्यासाठी निसर्ग , संस्कृती आणि वास्तु उत्कृष्ट मिलाफ साधत मध्यवर्ती संगमवाडी येथे वसलेले पुण्य निर्माता कंपनीच्या LifeDesigned® तत्वज्ञानाचे उदाहरण आहे. शिवाजीनगर , कोरेगाव पार्क आणि पुणे ऑलिटरमेंटल या शहराच्या चैतन केंद्रासाठी उत्कृष्ट कनेक्टी जोडून ठेवेलअसा हा प्रकल्प . मुळा-मुठा रिव्हरफ्रंटला आहे  , स्थानिक स्थानी सुविधा प्रवेश आणि हिरवाई निसर्गाच्या निसर्ग वातावरण बिर्ला पुण्य शहरात आणि निसर्ग समतोल साधला आहे. शहराचा वारसा आणि आकांक्षांचा सुंदर मिलाफ साधणारा हा सुयोग्य आधुनिक आणि कालीत सौंदर्याचे उत्तम उदाहरण आहे . त्यायोगे तो सर्वात जास्त जागा असलेल्या निवासी ठिकाणी एक म्हणून स्वतःला प्रस्थापित करत आहे.

याच्या खुलासेच्या बिर्ला इचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. के. टी. भेदेंद्र म्हणाले , ” माहिती तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि क्षेत्रभूत सुविधांच्या विकासासाठी मजबूत रिअल इलाकेची पायाभरणी आहे .  बिर्ला पुण्यच्या आमच्या समकालीन आधुनिक आलिशान घरे आणि कालातीत मोहकतेचा समतोल साधत उच्च दर्जाणीमानाचा मापदंड स्थापित उद्दिष्ट ठेवले आहे.

आरामदायी आणि सर्वसमावेशक अनुभव निर्माण करून बिर्ला पुण्य मध्ये 50 पेक्षा अधिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतील . ॲडला जोडलेल्या रिटेल रिटेलमध्ये अल्फ्रेस्को (खुल्या जागेतील) F&B आणि रिटेल स्पेसेस तसेच एक रिव्हरसाइड प्रोमनेड देखील असेल . सार्वजनिक कार्यक्रम तसेच लोकांना एकत्र येण्यासाठी ते उत्तम ठिकाण असेल. बिर्ला पुण्य हे शाश्वत लोकांसाठी वचनबद्ध आणि पावसाचे पाणी साठवणे  , सौरऊर्जेचा वापर करणे अशा पर्यावरणपूरक उपायांचा समावेश यात आहे.

कंपनीने गेल्या वर्षी मांजरी , पुणे येथे १६.५ एकर ( ३.१ दशलक्ष चौरस फूट) आकाराचा भूखंड घेतला . त्याचप्रमाणे , अलीकडेच बिर्ला अमेरिका आणि बिर्ला ईव्हरचा शुभारंभ करणारी कंपनी अनुक्रमे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र ( एनसीआर) आणि बंगळुरूवर लक्ष केंद्रित केले आहे.

बिर्ला इस्टेट्स बद्दल:

बिर्ला इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड ही आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेड (पूर्वी सेंच्युरी टेक्सटाईल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. अल्पावधीतच बिर्ला इस्टेट्सने रिअल इस्टेट उद्योगात पसंतीचा ब्रँड म्हणून स्वतःची स्थापना केली आहे. बिर्ला इस्टेट्स प्रमुख बाजारपेठांमध्ये प्रीमियम निवासी घरे विकसित करते. कंपनी स्वतःच्या जमिनी विकसित करण्याव्यतिरिक्त थेट खरेदी तसेच मालमत्ता हलक्या संयुक्त उपक्रमांद्वारे जमिनीचे पार्सल विकसित करत आहे. दीर्घकाळात, कंपनी जागतिक दर्जाच्या निवासी, व्यावसायिक आणि मिश्र वापराच्या मालमत्ता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि भारतातील शीर्ष रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवते. कंपनीचे लक्ष शाश्वतता, अंमलबजावणी उत्कृष्टता, ग्राहक केंद्रितता आणि विचारशील डिझाइनद्वारे वेगळे करण्यावर आहे.

कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि सध्या तिची एनसीआर, बेंगळुरू आणि पुणे येथे प्रादेशिक कार्यालये आहेत आणि वरळी, मुंबई येथे सुमारे ६ लाख चौरस फूट भाडेपट्ट्यावरील क्षेत्रासह २ ग्रेड-ए व्यावसायिक इमारतींसह एक सुस्थापित व्यावसायिक पोर्टफोलिओ देखील आहे.

हिंजवडी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी – हेमंत रासने

दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभा सभागृहात मागणी

पुणे/मुंबई- (दि १९): आज सकाळी हिंजवडी फेज १ येथे मिनी बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली, यामध्ये प्रवास करणाऱ्या व्योमा ग्राफिक्स कंपनीतील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित कंपनीमार्फत मृतांच्या कुटुंबीयांना योग्य ती आर्थिक करण्यासाठी शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी विधानसभा सभागृहात केली. शासनाने संबंधित कंपनीवर जबाबदारी निश्चित करावी आणि कुटुंबीयांना न्याय द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून प्रशासनाने सार्वजनिक आणि खासगी वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत तसेच आग लागलेल्या संबंधित वाहनाची देखभाल आणि सुरक्षा तपासणी झाली होती का, याचाही सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी देखील यावेळी हेमंत रासने यांनी केली आहे.

हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील दोन दिवसीय सुनावण्या संपन्न

अध्यक्षा ॲड. सुशिबेन शाह यांनी घेतली गंभीर प्रकरणांची दखल

पुणे -महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध बालहक्क प्रकरणांवर दिनांक १७ व १८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे दोन दिवसीय सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान बालकांच्या शिक्षण हक्कांशी संबंधित प्रकरणे, मूलभूत हक्कांचे उल्लंघन, तसेच विविध कायद्यांतर्गत प्राप्त तक्रारींवर सखोल चर्चा करण्यात आली.

या सुनावणीत एकूण ६० प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिनियम, २००९ अंतर्गत प्राप्त तक्रारी, POCSO अधिनियम अंतर्गत लैंगिक शोषणासंदर्भातील प्रकरणे, JJ Act (जुवेनाईल जस्टिस कायदा) अंतर्गत प्रकरणे आणि बाल हक्क उल्लंघनासंदर्भातील विविध तक्रारींचा समावेश होता.

सुनावणीदरम्यान विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बालकल्याण समिती, पुणेचे अध्यक्ष आणि सदस्य, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी (पुणे महानगरपालिका), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच शिक्षण संचलनालयातील अधिकारी व कर्मचारी या सुनावणीत सहभागी झाले.

या सुनावणीत शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने काही शाळांनी शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने काही शाळांनी सुनावणी दरम्यान आयोगाने दखल दिल्यामुळे पालक व शाळा यांच्यामध्ये सामंजस्याने पालकांना त्यांच्या पाल्याची शाळा सोडल्याचे दाखले दिल्या बाबतचा अहवाल सादर केला. तसेच पोलीस विभागाशी संबंधित प्रकरणांमध्ये झालेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोगासमोर सादर करण्यात आला.

मुलांच्या शिक्षणाच्या हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. तसेच, POCSO आणि JJ Act अंतर्गत प्रकरणांमध्ये कठोर कायदेशीर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले. बालकांचे हक्क संरक्षित राहावे आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग कटिबद्ध आहे, असे यावेळी आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशिबेन शाह यांनी सांगितले.

सदर सुनावणीस आयोगाचे सदस्य संजय सेंगर, जयश्री पालवे, चैतन्य पुरंदरे, सायली पालखेडकर, प्रज्ञा खोसरे देखील उपस्थित होते.