Home Blog Page 401

६० वर्षीय विधवा महिलेच्या संघर्षाला यश – अखेर न्यायालयाच्या आदेशाने बिल्डरविरोधात गुन्हा दाखल!

पुणे : २४ मार्च २०२५

एका वयोवृद्ध विधवा महिलेने आपल्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाला अखेर यश आलेय , करारानुसार घराचा ताबा वेळेत न दिल्याने तसेच करारात नमूद केलेल्या सुविधा न पुरवल्याने, न्यायालयाने बिल्डर अलीअसगर याच्याविरोधात FIR नोंदवण्याचा आदेश दिला आहे वयोवृद्ध महिलेच्या वतीने न्यायालयात अ‍ॅड.क्रांती सहाणे, अ‍ॅड सुरज जाधव, अ‍ॅड स्वप्नील गिरमे, अ‍ॅड आदिल दातरांगे, अ‍ॅड नेहा पिसे, अ‍ॅड नुपूर अरगडे, अ‍ॅड सागर मांढरे, यांनी बाजू मांडली.

ही वयोवृद्ध महिला एका मोठ्या आशेने घर घेण्यासाठी पुढे आली होती. वृद्धापकाळी आधार मिळावा, सुरक्षित घर मिळावे, आयुष्यभराच्या कष्टाची काहीतरी शाश्वती असावी या आशेने घर घ्यायला निघालेल्या या महिलेच्या स्वप्नांवर बिल्डरच्या फसवणुकीमुळे पाणी फिरले. वेळीच घराचा ताबा न मिळाल्याने, तसेच करारातील सुविधा न दिल्याने तिच्यासारख्या अनेक सदनिके धारकांना अन्याय सहन करावा लागत आहे.

६० वर्षीय विधवा महिलेने बिल्डरविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून लढण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली, पण न्यायालयाच्या आदेशाने अखेर २२ मार्च २०२५ रोजी अलीअसगर आयसक्रीमवाला बिल्डरविरोधात FIR नोंदवण्यात आली.

फसवणूक करणाऱ्या बिल्डर्ससाठी धडाया महिलेच्या न्यायासाठी केलेल्या लढ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळू शकतो. फक्त योग्य मार्गाने संघर्ष करण्याची तयारी हवी!”ही कारवाई म्हणजे फसवणूक करणाऱ्या बिल्डर्ससाठी धडा आहे! सामान्य लोकांचे हक्क हिरावणाऱ्या बिल्डर्सला आता जबाबदारी स्वीकारावीच लागेल. या महिलेसारख्या असंख्य ग्राहकांची स्वप्ने चिरडली जात आहेत, आणि आम्ही ते होऊ देणार नाही!”
— अ‍ॅड. तोसिफ शेख

‘एसटी’ महामंडळात मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. २४ : एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, अनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात. त्यातून ते इतर  कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याचा विपरीत परिणाम एस टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर  होत आहे. त्यामुळे भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी.

यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) बसस्थानक परिसरातील समस्यांसंदर्भात आमदार सत्यजित तांबे व अमोल खताळ यांच्या शिष्टमंडळासमवेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी विस्तारित जागा देणे, नाशिक- पुणे महामार्गावरुन जाणाऱ्या बसेसना संगमनेर बसस्थानकामध्ये थांबा देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील राखीव निकालप्रकरणी उमेदवारांची सुनावणी

पुणे, दि. २४: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या ७८६ उमेदवारांचे म्हणणे २५ मार्च ते दिनांक ४ एप्रिल २०२५ या कालावधीत ऐकून घेण्यात येणार असून उमेदवारांनी सुनावणीसाठी आपल्याला दिलेल्या तारखेला सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.

१० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील ७८६ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्या अनुषंगाने सुनावणीसाठी उपस्थित रहाण्याबाबतचे नियोजन उमेदवारांच्या ई-मेल, एस.एम.एस. व परीक्षार्थींच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी या सुनावणीस स्वखर्चाने उपस्थित रहावे. दिलेल्या दिवशी समक्ष हजर न राहिल्यास सदर प्रकरणी उमेदवाराला काही सांगावयाचे नाही असे गृहीत धरून त्याबाबत उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल व तो निर्णय बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी.

सुनावणीच्या वेळी आधारकार्ड, शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ मधील उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत, परीक्षेचे प्रवेशपत्र, पुराव्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील आवश्यक असलेले अनुषंगिक सर्व कागदपत्रे, गुणपत्रक प्रमाणपत्र तसेच चालक परवाना, बैंक पासबुक, निवडणूक ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणतेही एक छायाचित्र ओळखपत्र यासह स्वतः उपस्थित राहावे. सुनावणीच्या वेळी उमेदवाराच्यावतीने अन्य कोणालाही उपस्थित राहता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

चाकण एमआयडीसी व पसिरात ४० मिनिट वीज खंडित

पुणे, दि . २४ मार्च २०२५ : महापारेच्या उर्से-चवड २२० केव्हीव्हीव्हीवाहिनीमध्ये (दि २४) ब्रेक १.३९ लोकल ट्रिपिंग आती पीजीसीआयएल तळेगाव ते चाकण ४०० केव्हीव्हीवाहिनीमध्ये वीजभार विकासला. सार्वजनिक भार व्यवस्थापन एलएस ( लोड ट्रायिंग स्कीम ) यंत्रणा कार्यान्वित शेअर्सचा समूह चाकण एमआयडीसी व मालकी ८००दाब उच्च लघुदाब ४ हजार लघुदाब तसेच ३५ हजार व्यावसायिक आणि इतर ग्राहक वीज ग्राहक २६ ते ३९ मिनिटे बंद होते.

खाली माहिती अशी की महापारेषणाच्या-चिंचवड २२० केव्ही वीजवाहिनीमध्ये आज उर १.३९ लोक ट्रिपिंग आले. ते १६३ मेगावॅट विजेची तू निर्माण व पीजीसीआयएल तळेगाव ते चाकण ४०० केव्ही वीजवाहिनीचा वीजभार वाढवला. पारेषणातील संभाव्य धोके राज्यातील विद्युतभार व्यवस्थापन एलटीएस ( लोड ट्रिमिंग योजना ) यासाठी यंत्रणा कार्यान्वित आणि चाकण आयोजक महापारेषण चाकण ४०० केव्ही, चाकण फेज २२० केव्ही व ब्रीजस्टोन २२० केव्हीसी अतिउच्चदाब उपकेंद्रांना वीजपुरवठा बंद. महावितरणच्या आयडीसीमधील ३४ उपकेंद्राचाही व्हिडिओ एम बंद आणि चाक आयडीसी व ट्रेडमार्कगाव, सावरदरी वराळे, वासुली, येलवाडी, खालंब्रे, संगी, एमआयडीसी फेज, भांबोरी, सारा, सिटी दोन, नाणेकरवाडी, आळंदी फांदी, भोजे, मोई आदि गाव ८०० उच्चदाब ४ हजार लघुदाब औद्योगिक ग्राहक तसेच सुमारे ३५ हजार कार्यकर्ते निघाले आणि व्यावसायिक ग्राहकांना आज पावणे पावणे दोनच्या सुमारास २६ ते ३९ मिनिटे टिकट.

खासदारांच्या पगारात 24% वाढ:प्रत्येक खासदाराला आता 1.24 लाख रुपये मिळतील; माजी खासदारांचे पेन्शन 31 हजार रुपये केले

नवी दिल्ली- सरकारने खासदारांच्या पगारात २४% वाढ केली आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने सोमवारी याबाबतची अधिसूचना जारी केली. यानुसार, सध्याच्या खासदारांना आता दरमहा १.२४ लाख रुपये वेतन मिळेल. पूर्वी त्यांना दरमहा १ लाख रुपये मिळत होते.

ही वाढ खर्च महागाई निर्देशांकाच्या आधारे करण्यात आली आहे. वाढीव पगार १ एप्रिल २०२३ पासून लागू होईल. याआधी २०१८ मध्ये मोदी सरकारने दर पाच वर्षांनी खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांचा आढावा घेण्याचा नियम बनवला होता. हा आढावा महागाई दरावर आधारित आहे.

दैनिक भत्ता आणि पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली.

दैनिक भत्ता आणि पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली आहे. दैनिक भत्ता २००० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आला आहे. माजी खासदारांचे पेन्शन दरमहा २५,००० रुपयांवरून ३१,००० रुपये करण्यात आले आहे.

पाच वर्षांहून अधिक काळ खासदार राहिलेल्या सदस्यांना मिळणारे अतिरिक्त पेन्शनही दरमहा २००० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आले आहे.

लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची संख्या

लोकसभा – एकूण सदस्य: ५४५ (सध्या ५४३)

निवडून आलेले सदस्य: ५४३ (लोकांनी थेट निवडून दिलेले)
नामनिर्देशित सदस्य: २ (राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले)
कार्यकाळ: ५ वर्षे
राज्यसभा – एकूण सदस्य: २५० (सध्या २४५)

निवडून आलेले सदस्य: २३३ (विधानसभा निवडून आलेले)
नामांकित सदस्य: १२ (कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधून राष्ट्रपती निवडतात)
कार्यकाळ: ६ वर्षे (दर दोन वर्षांनी १/३ सदस्य निवृत्त होतात)
खासदारांना या सुविधाही मिळतात

पगार आणि पेन्शन व्यतिरिक्त, खासदारांना मोफत हवाई, रेल्वे आणि रस्ते प्रवासाची सुविधा मिळते. खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांनाही मर्यादित प्रवास सुविधा मिळतात.
याशिवाय, दिल्लीमध्ये मोफत सरकारी निवास व्यवस्था, टेलिफोन, वीज आणि पाण्यावर सूट आहे. सीजीएचएस रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत, मोफत उपचार उपलब्ध आहेत.
याशिवाय, खासदारांना संसदेच्या कॅन्टीनमध्ये सरकारी वाहन, संशोधन आणि कर्मचारी सहाय्यक आणि सवलतीच्या दरात जेवणाची सुविधा देखील मिळते.

नागपूर दंगल पेटवण्यास राज्य सरकारच जबाबदार :- नाना पटोले

संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा.

मुंबई, दि. २४ मार्च २५
नागपुरच्या दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे मुद्दे मांडले त्यातून एक मुद्दा सुटला आहे. दंगलीचे समर्थन कोणीच करत नाही पण दंगल कोणी निर्माण केली? त्याची सुरुवात कुठून झाली? या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलले नाहीत. या दंगलीवेळी एक हिरवी चादर पेटवण्यात आली, त्यावेळी पोलीस तेथे होते. आंदोलन करताना पोलीस अशा वस्तू ताब्यात घेते पण नागपूर पोलिसांनी ती हिरवी चादर ताब्यात का घेतली नाही. ती चादर ताब्यात घेतली असती तर ही घटना झालीच नसती. नागपूरला पेटवण्यात राज्य सरकारच जबाबदार होते हे ठामपणे सांगतो, असे ज्येष्ठ नेते नाना पटोले म्हणाले.

अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, नागपूरची दंगल ज्या भागात झाली त्या भागात मुख्यमंत्री फडणवीस यांचे बालपण गेले आहे. नागपूर शहर हे सर्वधर्म समभाव मानणारे आहे. आजपर्यंत असा प्रकार नागपूरमध्ये झाला नाही. या दंगलीवेळी पोलिसांची बघ्याची भूमिका राहिली. हिरवी चादर पेटवली गेली नसती तर दंगल झाली नसती ही वस्तुस्थिती आहे, यावर गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे असे नाना पटोले म्हणाले.

कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कविता केल्याने उद्रेक झाला पण प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्याचे काय? त्यांना अटक का केली नाही. छत्रपतींच्या नावाने या दोघांनी अपशब्द वापरले, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, त्याचे उत्तर द्यावे लागले. प्रशांत कोरटकर कोणाचा हस्तक आहे, त्याचे आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. जेलमध्ये असलेल्या महेश मोतेवारची जप्त केलेली आलिशान कार त्याच्याकडे कशी? राहुल सोलापूरकर कोणाचा माणूस आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? असे संतप्त प्रश्न विचारत पाशवी बहुमताच्या आधारावर जो कारभार चालला आहे तो महाराष्ट्र पहात आहे असे नाना पटोले म्हणाले.

परभणीतील सोमनाथ सुर्यंवंशी यांच्या मृत्यूचा प्रश्न उपस्थित करत नाना पटोले म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या त्रासाने झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात सांगितले. आता जो अहवाल आला आहे त्यात सुर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे त्यात म्हटले आहे. परभणीत पोलीस लाठीहल्ल्याचे आदेश मंत्रालयातून की पोलीस महासंचालक कार्यालयातून दिले त्याचे उत्तर सरकारने द्यावे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणी मुख्यमंत्री यांनी खुलासा करावा.

राज्यात दर एक लाख लोकसंख्येमागे पोलिसांची संख्या १५५ इतकी आहे. राज्यात आज २१ हजार ८३१ पदे रिक्त आहेत ती किती दिवसात भरली जाणार आहेत. तसेच महिला पोलिसांची संख्याही कमी असून ती ३६ हजार ९०० असून हे प्रमाण केवळ १८.१० टक्के आहे. विलासराव देशमुख सरकार असताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महिला पोलीस भरती योजना सुरु केली होती असेही नाना पटोले म्हणाले.

नागपूरच्या दंगेखोराच्या घरावर बुलडोझर चालवला, मग दंगलीला चिथावणी देणाऱ्या नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार?

मुंबई, दि. २४ मार्च २५
हास्यकलाकार कुणाल कामराने त्यांच्या कार्यक्रमात कोणाचेही नाव घेतले नाही तरीही ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ती टीका स्वतःवर ओढवून घेऊन तोडफोड केली. हल्ला करणारे सरकारमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा सरकार, संविधान, कायदा व गृहविभागावर विश्वास नाही का, त्यांना कायदा हातात का घेतला. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मांडलेला हा उच्छाद पाहून सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? असा प्रश्न संतप्त प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कुणाल कामरा प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचा निषेध केला व पुढे म्हणाले की, कुणाल कामरांचा कार्यक्रम ज्या स्टुडिओत झाला तो त्यांचा नाही, या ठिकाणी विविध सांस्कृतीक कार्यक्रम होत असतात, सर्व प्रकारच्या विचारांचे लोक येथे कार्यक्रम करतात. भाजपा नेते व मंत्री आशिष शेलार यांच्या सत्काराचा कार्यक्रमही येथेच झाला. हा स्टुडिओ एका स्वातंत्र्य सैनिकाचा आहे, देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी लग्न केले नाही, स्वातंत्र्यानंतर त्यांनी लग्न केले. हा स्टुडिओ नफेखोरी न करता उपलब्ध करुन दिला जातो. अनेक कलाकारांनी या व्यासपीठावर आपली कला सादर केली आहे, त्या सांस्कृतीक केंद्रावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला तसेच एका स्वातंत्र्य सैनिकाच्या संपत्तीवरचा हा हल्ला आहे. हा प्रश्न केवळ अभिव्यक्तीचा नाही तर लोकांनी कसे जगावे याचाही आहे. या तोडफोडीत स्टुडिओचे २५ लाखांचे नुकसान झाले आहे ते सरकारने भरून द्यावे. हा सर्व प्रकार होत असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली हे अतिशय गंभीर आहे.

नागपूरच्या दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तशीच वसुली एकानाथ शिंदे व त्यांच्या दंगेखोरांकडून सरकार वसूल करणार का, याचे उत्तर द्यावे. नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खानच्या घरावर सरकारने बुलडोझर चालवला आहे. फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील मंत्री नितेश राणे यांनी चिथावणीखोर, भडकाऊ विधाने केली आहेत मग फडणवीस नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर चालवणार का, असा प्रश्नही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीला उरले आता ७ दिवस;अभय योजनेतून १० हजारांवर ग्राहक थकबाकीमुक्त

पुणे, दि. २४ मार्च २०२५: कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी देणाऱ्या महावितरण अभय योजनेला आता केवळ सात दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला या योजनेची मुदत संपत आहे. पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत उच्च व लघुदाबाच्या १० हजार ३०६ ग्राहकांनी २७ कोटी ६४ लाख रुपयांचा भरणा करून थकबाकीमुक्ती मिळवली आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरासह नवीन वीजजोडणीची गरज असो किंवा नसो, जागेवरील वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक ग्राहकांना येत्या दि. ३१ मार्चपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेचा त्वरित लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी केले आहे.

       पुणे परिमंडलामध्ये अभय योजनेसाठी ११ हजार ९९७ वीजग्राहकांनी अर्ज दाखल केले आहे. त्यातील ९ हजार ४६४ ग्राहकांनी २३ कोटी ३८ लाखांचा एकरकमी भरणा केला आहे तर ८४१ ग्राहकांनी हप्त्यांमधील ४ कोटी २६ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यातील ४ हजार २२७ ग्राहकांकडे वीजपुरवठा सुरु करण्यात आला असून २ हजार ५१३ ग्राहकांनी नवीन वीजजोडणीची मागणी केली आहे तर ५ हजार २५७ ग्राहकांनी विजेची गरज नसतानाही या योजनेतून थकबाकीमुक्तीला प्राधान्य दिले आहे. 

या योजनेत दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सहभागी होता येईल व योजनेची मुदत दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही योजना आहे. यामध्ये व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ होत असून ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीचा भरणा करावा लागत आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळत आहे. किंवा मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे योजनेत सहभागी होण्याची व थकबाकी भरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे परिमंडलामध्ये २५ हजारांवर थकबाकीदारांची वीज खंडित

पुणे, दि. २४ मार्च २०२५: वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे पुणे परिमंडलामध्ये गेल्या २४ दिवसांत २५ हजार ४३४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सद्यस्थितीत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही ८८ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणची संपूर्ण आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसूलीवरच आहे. वीजबिलांच्या वसूलीमधूनच वीजखरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसूलीला मोठा वेग देण्यात आला आहे. स्वतः मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार परिमंडलात विविध ठिकाणी दौरे करून शाखा कार्यालयांपर्यंत थकबाकी वसूलीचा आढावा घेत आहेत. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी अधीक्षक अभियंते युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, रवींद्र बुंदेले (प्र.) यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते व इतर अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत.

पुणे शहरात एकूण घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे ४० कोटी ९ लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २४ दिवसांमध्ये १० हजार १७७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर पिंपरी चिंचवड शहरात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे १८ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ७ हजार ७९६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड, हवेली तालुक्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे २९ कोटी ९६ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ७ हजार ४६१ ग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या २४ दिवसांत खंडित करण्यात आला.

वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in  वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.

लावणीच्या समृद्ध परंपरेला जागतिक पातळीवर नेण्यासाठी पुण्यात बुधवारी होणार विश्वविक्रम 

अभिनेत्री, गायिका पुष्पा चौधरी करणार विश्वविक्रम : सलग चार तासाहून अधिक वेळ सादर करणार लावणी गीते ; स्वामिनी म्युझिक डान्स अँड अ‍ॅक्टींग अकॅडमी यांच्यातर्फे आयोजन

पुणे : लावणीच्या समृद्ध परंपरेला जागतिक पातळीवर नेण्यासाठी अभिनेत्री गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा प्रदीप चौधरी अनोखा विश्वविक्रम करणार आहेत. सलग ५१ लावणी गीतांचे सादरीकरण करून ‘वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया’ आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल’ मध्ये विक्रम नोंदविण्यासाठी त्या सज्ज आहेत. विश्वविक्रमाचा हा सोहळा बुधवार, दिनांक २६ मार्च रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती पुष्पा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला रत्ना दहीवेलकर, अनिरुद्ध हळंदे उपस्थित होते. स्वामिनी म्युझिक, डान्स अँड अ‍ॅक्टींग अकॅडमी वारजे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

मराठी लावणी ला जागतिक पातळीवर नेण्यासाठी पुष्पा चौधरी यांनी या विश्वविक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ कलाकार लीला गांधी, सुरेखा पुणेकर, माया खुटेगावकर, श्वेता शिंदे, माधुरी पवार, प्राजक्ता गायकवाड, प्रतीक्षा जाधव, आरती शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, सिद्धेश्वर झाडबुके, सुरेश विश्वकर्मा, प्रदीप कोथमीरे तसेच कला व सामाजिक क्षेत्रातील मंडळी याशिवाय वॅलेंटिना ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे विश्वस्त देखील उपस्थित राहणार आहेत.  

पुष्पा चौधरी म्हणाल्या, मराठी लावणी कला व संगीत जगभर पोहोचावे यासाठी मी माझ्या आवाजाच्या माध्यमातून विविध ५१ लावण्यांचे बोल व गाणी न थांबता सलग सादर करणार आहे. जागतिक विक्रमामध्ये नोंद होण्यासाठी मराठी लावण्या गाण्याचा मानस आहे. यासाठी आवश्यक वेळ चार तासांपेक्षा जास्त असणार आहे. तरी पुणेकरांनी या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्यास उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जया बच्चन म्हणाल्या, माध्यमांपासून कलाकारांपर्यंत सर्वांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथे धोक्यात

म्हणाल्या, एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली हा बाळासाहेब ठाकरेंचा अवमान नाही काय ?

मुंबई- स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या बद्दल आता प्रख्यात अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनीही या विषयावर उघडपणे आपले मत व्यक्त केले आहे आणि त्यांनी कुणालला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलही त्यांचे मत व्यक्त केले आहे.
कुणाल कामराने त्यांच्या एका शो दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही वेगळ्या ढंगात कविता सादर केली होती,
त्यानंतर हॅबिटॅट कॉमेडी क्लबवर त्यांच्या लाईव्ह शो दरम्यान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या समर्थकांनी हल्ला केला. आणि तोडफोड करण्यात आली. आता या प्रकरणात केलेल्या कारवाईत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जया बच्चन यांनी या मुद्द्यावर संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ‘जर बोलण्यावर बंदी असेल तर तुमचे काय होईल?’ तुमची तशीही परिस्थिती वाईट आहे. तुमच्यावर बंधने आहेत. तुम्हाला फक्त काही विशिष्ट विषयांवर बोलण्यास सांगितले जाईल आणि काही प्रश्न विचारू नयेत असे सांगितले जाईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे आहे?जया बच्चन पुढे म्हणाल्या, ‘ कारवाईची स्वतंत्रता केवळ तेव्हाच असते जेव्हा मोठा गोंधळ निर्माण होतो. – विरोधकांना मारहाण करणे, महिलांविरुद्ध गुन्हे करणे, लोकांना मारणे – अशाच कृती करण्याचे जणू इथे स्वातंत्र्य असते.’ एकनाथ शिंदेंचा अवमान केला म्हणून कमरा वर कारवाई झाली असे विचारता त्या म्हणाल्या , एकनाथ शिंदेंनी फक्त सत्तेसाठी शिवसेना फोडली, चोरली हा बाळासाहेबांचा अपमान नाही का?

प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणात पकडला

मुंबई- मोतेवारची गाडी घेऊन फिरणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या, तथा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रशांत कोरटकर हा दुबईत पळून गेल्याची चर्चा होती. पण पोलिसांनी तेलंगणातून त्याच्या मुसक्या आवळल्याची मोठी बातमी सूत्रांनी दिली आहे. प्रशांत कोरटकर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो फरार होता. त्याने इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॉल रेकॉर्डिंगमधील आवाज आपल्या नसल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे तो माध्यमांसमोर येऊन आपण निर्दोष असल्याचं सांगत होता. यानंतर त्याने कोर्टातही धाव घेतली होती.

प्रशांत कोरटकरला सुरुवातीला कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. त्याला दोनवेळा अटकेपासून संरक्षण मिळालं. कोल्हापूर पोलिसांनी कोर्टात सातत्याने कोरटकरच्या अटकेची मागणी केली होती. कोरटकरने आपला मोबाईल पोलिसांकडे सुपूर्द केला होता. पण मोबाईलमध्ये संपूर्ण डेटा डिलीट करुन त्याने पोलिसांकडे मोबाईल सुपूर्द केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर कोर्टाने प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज फेटाळला होता. पण तोपर्यंत उशिर झाला होता. प्रशांत कोरटकर हा फरार झाला होता. कोल्हापूर पोलिसांकडून त्याचा युद्ध पातळीवर शोध सुरु होता. पण तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

इंद्रजित सावंत यांची कोर्टात बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “प्रशांत कोरटकरला खूप आधीच अटक होण्याची आवश्यकता होती. त्याला अटक न केल्यामुळे सरकारबद्दल आणि पोलिसांबद्दल व्यापक गैरसमज पसरला होता. सरकार त्याला लपवून ठेवत आहे का? अशी शंका उपस्थित केली जात होती. त्याच्या जामीन अर्जाला सातत्याने विरोध केल्यानंतर आज त्याला अटक झाली आहे. आनंदाची गोष्ट आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिली.”प्रशांत कोरटकरला महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतलं असेल तर त्याला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागेल. कोल्हापूर पोलीस त्याला न्यायालयात हजर करतील. त्यानंतर कोल्हापूरच्या न्यायालयात सर्व कार्यवाही होईल. प्रशांत कोरटकरला जामीनासाठी फ्रेश अर्ज करावा लागेल. त्याचा परत जामीन अर्ज रिजेक्ट झाला तर त्याचा मुक्काम काही दिवस कारागृहात राहील”, अशी माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली.

चोरी करणारे गद्दारच असतात:स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा सत्यच बोलला, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

राज्य गद्दारांच्या आदर्शावर चाललंय का? तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करा
मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची जोरदार पाठराखण करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खरमरीत टीका केली. कुणाल कामरा हा सत्यच बोलला. त्याने जनभावना मांडली. जे चोरी करतात ते गद्दारच असतात, असे ते म्हणालेत.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले होते. विशेषतः एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी त्यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे. यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे पित्त खवळले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी या प्रकरणी कुणाल कामराच्या मुंबईतील खार येथील एका हॉटेलातील स्टुडिओची तोडफोड केली. तसेच त्याच्यावर गुन्हाही दाखल केला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्याची पाठराखण करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी स्पष्ट करू इच्छितो की, काल कॉमेडी शोच्या सेटची जी तोडफोड करण्यात आली, ती शिवसैनिकांकडून करण्यात आली नाही. त्याचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. ती तोडफोड गद्दारांनी (शिंदे गट) केली आहे. आपले राज्य सध्या शिवरायांच्या आदर्शावर चाललंय की, गद्दारांच्या आदर्शावर चालले आहे?

जे भेकड लोक आहेत, ते त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला म्हणून तोडफोड करत आहेत. पण या गद्दारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही. भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांचा अपमान केला तेव्हाही या लोकांनी त्याचा निषेध केला नाही.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यावरील व्यंगात्मक टीकेनंतर ज्या लोकांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटचे नुकसान केले, त्या लोकांकडून त्याची नुकसान भरपाई वसूल केली जावी. मी मुख्यमंत्री महोदयांना सांगतो की, न्याय हा सर्वांना सारखाच असला पाहिजे. नागपूरच्या दंगलीत ज्यांचे नुकसान झाले, त्यांना तुम्ही नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. तशीच नुकसान भरपाई काल कॉमेडी शोच्या सेटच्या तोडफोड प्रकरणात मि्ळाली पाहिजे.

ज्या गद्दार भेकड लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान चालतो, पण आपल्या गद्दार नेत्याचा अपमान चालत नाही, अशा तोडफोड करणाऱ्या लोकांकडून दामदुपटीने नुकसान भरपाई वसूल केली पाहिजे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काही चालत नाही हे दाखवण्यासाठीच एकनाथ शिंदे यांच्याकडून हा सर्व प्रकार केला जात आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

दुसरीकडे, ठाकरे गटाच्या सोशल मीडिया पेजवरूनही या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंवर टीका केली म्हणून स्टुडिओ फोडणारे कावळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह बोलले गेले, तेव्हा साधा चहाचा ग्लास फोडताना तरी दिसले का? यांचे हिंदुत्व केवळ कॉन्ट्रॅक्टर आणि खोक्यांपुरते मर्यादित आहे का?” असा सवाल ठाकरे गटाने यासंबंधी उपस्थित केला आहे.

सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगच्या जानेवारी २०२५ बॅचसाठी प्रवेश लवकरच बंद होत आहेत… त्वरा करा !!!

पुणे, २४ मार्च २०२५ – सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (एस सी डी एल), जानेवारी २०२५ बॅचसाठी प्रवेश जवळपास बंद होणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मार्च २०२५ आहे. २५ वर्षांहून अधिक काळ, एस सी डी एल हे व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि लवचिक शिक्षण प्रदान करण्यात अग्रणी राहिले आहे. ४०+ उद्योग-समर्पित अभ्यासक्रमांसह विविध अभ्यासक्रमांची विस्तृत श्रेणी असलेली ही संस्था, विविध क्षेत्रांतील करिअरच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे. भारताच्या प्रमुख डिस्टन्स लर्निंग संस्थांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस सी डी एल चे ८००,००० पेक्षा अधिक माजी विद्यार्थी आहेत तसेच व्यावसायिकांचे प्रबळ नेटवर्क आहे. एस सी डी एल येथील शिक्षण उदयॊग मानकांशी सुसंगत राहण्यासाठी बनवले गेले आहे, त्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये या शिक्षणासाठी विस्तृत मान्यता आहे.

व्यवसायाभिमुख शिक्षण, तुमच्या व्यावसायिक जीवनात यश प्राप्त करण्यासाठी –

एस सी डी एल उद्योगाच्या मागण्या लक्षात ठेवून विस्तृत श्रेणी सह ४०+ व्यापक शिक्षण प्रदान करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनासारख्या विविध क्षेत्रांमध्ये आवश्यक कौशल्य मिळते.

काही प्रमुख कार्यक्रम :

पी जी डिप्लोमा
बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (एक्सिक्युटिव्ह पीजीडीएम स्पेशलायझेशन्स)
ह्युमन रिसोअर्स मॅनेजमेंट
डेटा सायन्स आणि ऑनालिटिक्स
बँकिंग आणि फायनन्स
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट

पी जी सर्टिफिकेट (विशेष कौशल्यासाठी शॉर्ट-टर्म कोर्सेस)

  • डिजिटल मार्केटिंग
  • प्रोजेक्ट मॅनेजमेंट

•बिझनेस ऑनालिटिक्स

कॉर्पोरेट आणि उद्योग-आधारित शिक्षण –

  • एस सी डी एल हे आयबीएम, विप्रो, आणि इन्फोसिस सारख्या प्रमुख संस्थांसोबत सहकार्य करते आणि व्यावसायिकांसाठी अनुकूलित शिक्षण विकसित करते. हे कार्यक्रम आयटी, बँकिंग, हेल्थकेअर, आणि मॅन्युफॅक्चरिंगसारख्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कौशल्यांमध्ये वाढ करण्यासाठी मदत करतात, जेणेकरून ते झपाट्याने बदलणाऱ्या वातावरणात स्पर्धात्मक राहू शकतात.

कधीही, कुठेही शिका – अत्याधुनिक डिजिटल शिक्षण

  • एस सी डी एल विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षण प्रदान करते, जे मोबाइल-अनुकूल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
  • विद्यार्थ्यांना संवादात्मक कोर्स सामग्री, सुसज्ज लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (LMS) द्वारे प्रवेश मिळवता येतो
  • लाइव्ह आणि रेकॉर्ड केलेले लेक्चर्स मोबाइलवर
  • AI-आधारित प्रॉक्टर्ड परीक्षा आणि व्हर्च्युअल क्लासरूम्स
  • फॅकल्टी, सहली व उद्योग तज्ञांशी नेटवर्किंग

एस सी डी एल का निवडावे ?

  • आउटलुक – प्रथम क्रमांक असणारी डिस्टन्स लर्निंग संस्था
  • 800,000+ जागतिक विद्यार्थ्यांचे नेटवर्क
  • परवडणाऱ्या फीमध्ये विस्तृत तज्ञ कोर्सेस
  • पदवीधारक किंवा कामकाजी व्यावसायिकांसाठी 25% सरासरी पगार वाढ
  • एस सी डी एलला चा सर्व उद्योगांमध्ये उच्च मान्यता

•शिक्षणा करीत भारतासह यूएई, संयुक्त राष्ट्र, केनिया इत्यादी विविध देशांतील विद्यार्थी

सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी तर्फे जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, २४ मार्च २५ – सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे (SSPU) ने ॲलेन युनिव्हर्सिटी, जर्मनी सोबत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शना करीता चर्चा सत्राचे आयोजन केले होते. आज ॲलेन युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांनी सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला भेट दिली.

ॲलेन युनिव्हर्सिटीतील, मिरियम कोल्मर-ट्रायनी (एमए), आंतरराष्ट्रीय संबंध आणि संशोधन विपणन तज्ञ, आणि प्रा. डॉ. अंजा डायकमन यांनी शिष्यवृत्तींबद्दल मौल्यवान माहिती दिली. या वेळी मेजर सोनाली कदम (निवृत्त) आणि राघवन संथानम, संचालक – स्कूल ऑफ पोर्ट्स, टर्मिनल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट हे देखील उपस्थित होते.

या चर्चा सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे फायदे जाणून घेतले. सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि ॲलेन युनिव्हर्सिटी यांच्या सहयोगामुळे जागतिक संधी आणि शैक्षणिक प्राविण्य मिळवण्यासाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे.