Home Blog Page 394

हेक एमआयटी-डब्ल्यूपीयू 2025 मध्ये पेट्रोलच्या नवकल्पनांचे प्रदर्शन

पुणे , 27 मार्च 2025: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी-डब्ल्यूपीयू) , पुणे हॅक एमआय-डब्ल्यूपीयू 2025 दरम्यान मेक इन एमआयटी-डब्ल्यूपीयू पॅव्हेलियनमध्ये एरोस्पेस , रोबोटिक्स , ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंग आणि शाश्वत तंत्रज्ञान यामधील उत्कृष्ट मॉडेलच्या नवकल्पनांचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमाची विविध योजना भव्य क्लबद्वारे करण्यात आली.

उघड उघड प्रसार भारती , महासंचालक सनीजी यांनी केले. पाच फाउंड्री आणि ऊर्जा संवर्धन सल्लागार शाम अर्जुनवाडकर , आणि विप्रो टेक्नॉलॉजीचे , ग्लोबल एमडीएम प्रॅक्टिस हेड , योगेश जोशी यांनी स्टॉल्सना भेट दिली . तसेच, पेटीशी संवाद साधला आणि त्यांच्या नावांची पूर्ण माहिती.

या प्रदर्शनात नाविन्यपूर्ण पूर्ण भर दिला. ज्यामध्ये केम-ई-कार , इलेक्ट्रॉनिक निमंत्रणाशिवाय तंतोतंत हालचाल शोधणारे रासायनिक उर्जा असलेल्या वाहनांचा समावेश आहे. स्पेस टेक्नॉलॉजी रिसर्च ग्रुप ( STeRG) ने एरोस्पेस घटकांमध्ये कौशल्य शोधून प्रगत अवकाशयान प्रणाली प्रदर्शित केली. अतिरिक्त , टीम फिनिक्सने सानुकूल- नियंत्रण नियंत्रक थेट स्वायत्त अनुप्रयोग , रेकॉर्ड आणि कृषीचे वैशिष्ट्य असलेले ड्रोन तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले. शिवाय , स्कायट्रूपर्स ( स्कायट्रूपर्स ) ने कॉमेण्टिक एरोमॉडेलिंगसाठी डिझाइन केलेले उच्च-कार्यक्षमतेचे विमान प्रदर्शित केले. टीम ड्रिर्सने फॉर्म्युला 1- मार्गदर्शक ज्वलन “प्राइमस” चेवरण केले , तर एक्सेलेसर्स इलेक्ट्रिकने इलेक्ट्रॉनिक वाहन तंत्रज्ञान त्यांची पार्श्वभूमी प्रदर्शित केली.

योजना सनीजी यांनी किंमतची सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णतेची प्रशंसा केली. मेक इन एमआयटी-डब्ल्यूपीयू पॅव्हेलियन हेच्या भारताचे नाविन्यपूर्ण परिसंस्थेचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यांनी भाषण केले की अभित्रिकी उत्कृष्टतेसाठी तरुण मनाचे समर्पण , वास्तविक-जागतिक तंत्रज्ञान तंत्रज्ञान तंत्रज्ञानावर विद्यापीठाचे लक्ष केंद्रित करणे , अभियांत्रिकी आणि संशोधक भविष्याच्या आकारात हे नवोन्मेषक निवडक भूमिका असा विश्वास आहे.

शाम अर्जुनवाडकर यांनी पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित केलेले प्रकाशित एरोस्पेस , लोकशाही आणि ऑटोमोटिव्ह अभित्रिकी यासह विविध तंत्रज्ञानाचे तंत्रज्ञान भविष्यातील प्रतिबिंबित असल्याचे सांगितले. भविष्यातील ગાંધીનગર तंत्रज्ञानाच्या सीमा ढकलण्यासाठी आणि नवीन स्वायत्त स्थापत्य पार्किंगच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र-कुलगुरु व हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयूचे मुख्य संयोजक डॉ. मिलिंद पांडे म्हणाले , “ या कार्यक्रमाचा उद्देश अभ्यासामध्ये ‘माइंड टू मार्केट’ आणि ‘पर टू प्रोडक्ट’ हे तत्व रुजवणे आहे. शोध सर्वांसाठी सक्षम बनवू शकतो. आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडिया मिशनला समर्थन देते. शैक्षणिक आणि व्यावसायिक यांच्यातील योगदानाला चालना दिली , या प्रदर्शनासाठी तज्ञांनी तज्ञांशी संवाद साधला.

वकील संरक्षण कायदा देशभर लागू करा- पुणे बार असोसिएशन चे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह कायदा मंत्र्यांना साकडे

पुणे-नुकतीच पुण्यनगरी चे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे बार असोसिएशनच्या शिष्टमंडळ आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. हेमंत झंझाड यांच्यासह केंद्रीय कायदे आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची भेट घेतली. यावेळी बार असोसिएशनच्या वतीनं मेघवाल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.वकील संरक्षण कायदा देशभर लागू करा असे साकडे यावेळी पुणे बार असोसिएशन घातले शिवाय पुण्यातील नोटरीसंदर्भातील प्रलंबित विषयावरही यावेळी सकारात्मक चर्चा केली .
पुण्यात वाढलेली खटल्यांची संख्या वकिलांची संख्या त्या दृष्टीने करायच्या उपाययोजना या संदर्भात सविस्तर चर्चा या भेटीदरम्यान झाली. पुण्यनगरीचा खासदार या नात्याने शहरातील वकील व्यवसाय करणाऱ्या वकील बांधवांच्या दृष्टीने देखील दैनंदिन कामकाजाच्या दृष्टीने व्यवस्था इमारती बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर याबाबतीत सर्वतोपरी मदत करण्याचे यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मुरलीधर मोहोळ यांनी आश्वस्त केले.
देशभर वकिलांवर ती होत असलेल्या अत्याचार, मारहाण आणि अन्याय याला वाचा फोडण्यासाठी व केंद्राने वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करावा, पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे,तसेच भविष्यामध्ये पण एडवोकेट अमेंडमेंट अॅक्ट हे बिल वकिलांच्या हितासाठी विचार करून तयार करण्यात यावे व राज्यातील व पुणे शहरातील विविध नोटरींच्या समस्या संदर्भात व ज्युनियर वकिलांना राहण्यासाठी विविध योजना अंतर्गत घरे व स्टायपेंड पण मिळावे या सह इतर मागण्यांसाठी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंजाड, रवींद्र शिंदे, पंकज महाजन यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत देशाचे कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांची दिल्लीमध्ये संसदेत प्रत्यक्ष भेट घेतली व त्याबाबतचे निवेदन कायदा मंत्र्यांना देण्यात आले.
कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी लवकरात लवकर देशभर एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा कायदा लागू करण्यात येईल असे आश्वासन पुणे बार असोसिएशनला दिले तसेच विविध शासकीय योजनेअंतर्गत वकिलांना जास्तीत जास्त सवलती देण्याचे आश्वासन यावेळेस त्यांनी दिले तसेच एडवोकेट अमेंडमेंट बिल हे यापुढे देशभरातील सर्व बार असोसिएशन कडून सूचना मागवल्या नंतर लागू करण्यात येईल असेही आश्वासन दिले

इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा

  • प्रभाग क्रमांक दोन मध्ये आयोजन ; माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

पुणे

मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त पुणे महापालिकेच्‍या प्रभाग क्रमांक दोन मध्ये रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली. सामाजिक एकोपा व सलोखा जपण्यासाठी गेल्या १८ वर्षांपासून माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांच्‍या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित केला जात आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्याच्‍या उद्देशाने होणारा हा कार्यक्रम समतेची बीजे रोवतो, असे प्रतिपादन उपस्थिती मान्यवरांनी व्यक्त केल्या.

माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मधील डॉ. सिद्धार्थ धेंडे क्लिनिक, स्वराज मित्र मंडळ शनी मंदिर समोर या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी शास्त्रीनगर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक मेहेर मॅडम, क्राईम पोलिस निरिक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक सुर्वे, माजी नगरसेवक हनिफ शेख, माजी नगरसेवक अय्युब शेख , माजी नगरसेवक अशोक कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे , भाजपचे प्रवक्ते मंगेश गोळे, नाना नलावडे, नामदेव घाडगे, सरबजीत सिंग सिद्ु, बादशाह सय्यद, डॅनियल मगर , रिझवाना शेख, अक्रमभाई, यासिन भाई, अकबर शेख ईफ्तेकार अंसारी, मुनिर शेख, नासिर शेख, फहिम शेख, फैयाझ शेख, अशोक विटकर , अशिष शिंदे , राकेश चौरे , गुलाब गायकवाड, महापुरे , महेश वाघ , मोहम्मद भाई , अमजद मकदुम आदीसह विविध जाती-धर्मातील समाजबांधव उपस्थित होते.

भारत देश हा संविधानाची मूल्य जपतो. येथे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. प्रभागातील मैत्री भावना व सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी डाॅ. सिद्धार्थ धेंडे सर्व समाजाला सोबत घेउन गेली १८ वर्ष हा उपक्रम करत आहेत. त्यांचे कार्य हे सर्व समाजाला प्रेरणा देणारे आहे, असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी यावेळी बोलताना सांगितले.या कार्यक्रमात माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांच्‍या पुढाकाराने शिरखुर्मा आणि सुका मेवाचे वाटप करण्यात येते. यंदाच्‍या वर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. स्वराज मित्र मंडळ यांनी सर्वांचे स्वागत केले .


सर्व जाती-धर्मातील लोकांमध्ये भाईचारा कायम टिकावा, यासाठी आम्‍ही १८ वर्षांपासून हा उपक्रम घेत आहोत. संविधानाने ज्‍या मानवी मुल्‍यांची रुजवणूक केली आहे. त्‍याच्‍या अंमलबजावणीचा प्रयत्‍न प्रभाग दोन मधील सर्वच नागरिकांकडून केला जात आहे. सर्वधर्म समभाव ही भावना प्रभाग क्रमांक दोन मध्ये जपली जात असल्‍याचे दिसते.

  • डाॅ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.

जबरीने मोबाईल लुटणा-या सराईतास पकडून ३ दुचाकी वाहने आणि ३८ मोबाईल हस्तगत

पुणे-जबरीने मोबाईल हिसकावून लुटणा-या सराईतास पकडून पोलिसांनी त्याचाकडून ३ दुचाकी वाहने आणि ३८ मोबाईल हस्तगत केले आहेत . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
फिर्यादी हे दि.२४/०३/२०२५ रोजी पहाटे ०३/२० वाजताचे सुमारास भाजी मंडई हडपसर पुणे येथे रिक्षाची वाट पाहत असताना दोन अनोळखी तरुणांनी मोटर सायकलवरुन येवुन फिर्यादी यांचे हातातील मोबाईल जबदरस्तीने हिसकावून नेल्याने हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं.३२७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४),३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ५, डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व तपास पथक अंमलदार अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, अमोल दणके, महाविर लोंढे यांचे पथक काम करीत असताना, तपास पथकास मिळालेल्या गोपनीय माहीती चे आधारे आरोपी विकास ऊर्फ आकाश सुरेश वाघीरे वय २१ वर्षे रा. मेट्रो स्टेशन, दळवी हॉस्पीटलजवळ, शिवाजीनगर पुणेएक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून त्यांनी गुन्ह्यातील जबरदस्तीने चोरून नेलेला मोबाईल व गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी ही काढून दिल्याने ती जप्त करण्यात आली आहे. तसेच आरोपी कडे अधिक तपास करता त्यांनी चंदननगर पोलीस ठाणे हद्दीत अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हे गुन्हा करण्यासाठी चोरीच्या दुचाकीचा वापर करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीकडे केले तपासात त्यांचेकडून
१) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ३२७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४),३(५) २) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं.१३५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) ३) खडकी पोलीस स्टेशन गु.र.नं ३२६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३(५) असे गुन्हे उघडकीस आले आहेत.
तसेच आरोपींकडून ३८ मोबाईल हस्तगत केले असून त्याचा तपास चालु आहे. आरोपींताकडून एकूण ३८ मोबाईल, ३ दुचाकी असा किं. रू ५,२०,०००/-चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे हे करीत आहेत.सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त,मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन संजय मोगले, पोनि (गुन्हे) निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेड, पो. अंमलदार अविनाश गोसावी, दिपक कांबळे, निलेश किरवे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, अमोल दणके, कुंडलीक केसकर, अमित साखरे, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महाविर लोढे, महेश चव्हाण, बापु लोणकर, यांचे पथकाने केली आहे.

खाजगीकरणामुळे कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न, भविष्यातील संकटे ओळखून लढा द्या.

मुंबई, दि. २७ मार्च २५
कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती, आपल्या हक्कांसाठी चक्का जामचा नारा दिला तर बंद होत होता पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक उद्योग बंद पडत आहे आणि जे आहेत त्यात आऊटसोर्सिंग व कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाते, यातून शोषणाचे प्रमाण वाढत आहे. हे शोषण फक्त शहरात होत नाही तर ते गावखेड्यापर्यंत पोहचले आहे. ही शोषणावर आधारीत व्यवस्था संपवण्याची गरज आहे त्यासाठी भविष्यातील संकटे ओळखून संघटीत लढ्या द्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या राज्यस्तरीय संमेलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बोलत होते, ते पुढे म्हणाले की, आधी उद्योगपती होते आता व्यापारी झाले आहेत आणि ते फक्त नफ्यासाठी काम करत आहेत त्यांना कामगारांच्या कल्याणाचे काहीही देणेघणे नाही. मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणांमुळे देशात श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे तर गरिब अधिक गरिब होत चालला पण देशाच्या पंतप्रधानांना गरिबांची चिंता नाही, “श्रीमंतांनी श्रीमंत होणे पाप आहे का?” असे पंतप्रधान म्हणतात ही अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. पंतप्रधानांना गरिबांच्या हिताचे काहीही पडलेले नाही. गरिब, कष्टकरी, कामगार यांच्या विरोधातील हे सरकार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मोदी सरकारचे कारभार म्हणजे ‘दाल में कुछ काला’ नाही तर अख्खी डाळच काळी आहे, त्यांची नियत खोटी आहे आणि निती तर नाहीच, अशा शक्तीविरोधात लढायचे आहे. नाही रे वर्गासाठी लढले पाहिजे, कामगारांचे शोषण होत असताना आपण शांत बसून चालणार नाही, कृती कार्यक्रम घेऊन काम करा, मोठी चळवळ उभी करा आणि एकत्र येऊन लढा द्या, असे काँग्रेस प्रांताध्यक्ष म्हणाले.

सामाजिक कामासाठी यावर्षी ७९ सामाजिक संस्थांना एकतीस लाख रकमेची मदत.

……गेल्या पंचवीस वर्षात रुपये तीन कोटी रकमेचा समाजसेवेसाठी निधी समर्पण
पुणे-“समाजकार्यात सेवानिवृत्त बँक कर्मचारी,अधिकारी किती सक्षम असू शकतात ज्यांच्या आर्थिक मदतीमुळे व सामाजिक कार्यातून समाजाला दिशा व प्रेरणा मिळते हे बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचारी संघटनेने गेल्या पंचवीस वर्षात भरीव कामगिरी करून दाखविले आहे” असे प्रतिपादन गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते व “आम्ही आमच्या आरोग्यासाठी” संस्थेचे संस्थापक डॉ सतीश गोगुलवार यांनी केले.
भारतीय मजदुर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज वेलफेअर ऑर्गनायझेशनद्वारा आयोजित नवी पेठ येथील निवारा सभागृहात “सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण” समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ गोगुलवार बोलत होते.डॉ गोगुलवार यांनी पुढे सांगितले “आदिवासी बांधवांशी संवाद सुरू केल्यानंतर तेथील लोकांच्या प्रश्नाचा अभ्यास केला.आरोग्य,रोजगार याचबरोबर सेंद्रिय शेती कडे देखील लक्ष देण्याची गरज आहे तेथील हवामानातील बदल ही लक्षात घेतला पाहिजे.त्याप्रमाणे तेथे कार्य केले पाहिजे”.
या वेळी शुभदा देशमुख यांनी गडचिरोली येथील महिलांसाठी बचतगट द्वारे चालणाऱ्या विविध उपक्रमाची तसेच महिला सक्षमीकरणासाठी करत असलेल्या कार्याची माहिती दिली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब फडणवीस होते.नारायण अचलेर कर,मोहन घोळवे,भास्कर माणकेश्वर,संतोष गदादे, डॉ सुनील देशपांडे,शुभदा देशमुख,अर्चना सोहनी, डॉ संजय बारगजे यांची यावेळी मुख्य उपस्थिती होती.
“दरवर्षी समाजात काम करणाऱ्या विविध संस्थांच्या प्रकल्पाची व कार्याची पाहणी केली जाते.समाजातील उपेक्षित,दिव्यांग,गतिमंद, एड्सग्रस्त,तसेच अनेक वैद्यकीय सेवा,पर्यावरण,कृषी,शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांना संघटनेच्या सदस्यांनी स्वतःचे पैसे टाकून आत्तापर्यंत तीन कोटी रुपयांपर्यंत मदत केली असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचारी संघटनेचे महासचिव नारायण अचलेरकर यांनी यावेळी सांगितले.भविष्यातहीअसे समाजकार्य चालूच राहील अशी ग्वाही या वेळी दिली.यावेळी स्मरणिकेचे प्रकाशनही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
आदर्श गो सेवा,महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय संस्था,स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्था,नर्मदालय,अल्पपरिवार,आरोग्य भारती,भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान,चैतन्य ज्ञानपीठ,आस्था फाउंडेशन,प्रीतम फाऊंडेशन,शिवसमर्थ संस्था,सिद्धार्थ सामाजिक विकास संस्था यासह एकूण ७९ संस्थांना यावर्षी निधी वितरित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नारायण अचलेरकर यांनी केले.बाळासाहेब फडणवीस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.मोहन घोळवे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.पाहुण्याचा परिचय मनीषा साने ह्यांनी करून दिला. मुकुंद भस्मे यांनी आभार मानले.
पसायदान ऋजुता सरोदे यांनी गायिले
कार्यक्रमास सेवा संस्थांचे प्रमुख,सामाजिक कार्यकर्ते,महाराष्ट्र बँकेतील देशभरातून आलेले प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हडपसरमधील आरक्षित जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
हडपसरमधील सर्व्हे नं. १५ मधील मॅटर्निटी होमसाठी असणारे आरक्षण, हेमंत करकरे उद्यान, सर्व्हे नं.१६ मधील धोबी घाट आणि शहिद सौरभ फराटे स्मारकासाठी आरक्षित केलेली जागा खासगी बिल्डरच्या घशात घातली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केला असून ही जागा विकसित करुन वाचवा अशी विनंती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार हडपसर येथील सर्व्हे नं. १५ व सर्व्हे नं. १६ मध्ये मॅटर्निटी होम (एमएच ३१) साठी १५०२.०० चौरस मीटर जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. तसेच सर्व्हे नं. १६ मध्ये धोबी घाटसाठी ५०० चौरस मीटर जागा आरक्षित केली आहे. याप्रमाणे, सर्व्हे नं. १६ मध्ये शहिद सौरभ फराटे स्मारकाच्या विकासासाठी ठराव मंजूर करण्यात आलेला आहे, जो १९ जुलै २०१८ रोजी सर्वसाधारण सभेत सभा क्रमांक ३२, विषय क्रमांक ७३९, व ठराव क्रमांक २०९ नुसार एकमताने मंजूर करण्यात आला होता. तसेच सर्व्हे नं. १५ व १६ मधील जागांवर जलसंपदा विभाग व महापालिकेने वृक्षारोपणासाठी केलेल्या करारानुसार शहीद हेमंत करकरे उद्यान विकसित केले आहे. तसेच, या जागेवर मोठा उजवा कालव्याच्या उत्तरेकडील जागेवर उद्यान आरक्षित असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

या सर्व जागांचा संबंध पाटबंधारे विभागाशी असून, आरक्षण निहाय विकास व विनियोगासाठी महापालिकेने अनेक वेळा जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आणि माजी आमदार मोहन जोशी, स्वाभिमानी महिला संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी सुरसे, प्रशांत सुरसे यांनी निवेदनाव्दारे दिली.

विकास आराखड्यानुसार, मॅटर्निटी होम (एमएस ३१) साठी सर्व्हे नं. १५ व १६ मध्ये अनुक्रमे ७५१.०० चौरस मीटर जागा असे एकूण १५०२.०० चौरस मीटर आरक्षित करण्यात आलेली आहे. महापालिकेने जलसंपदा विभागाकडे पत्रव्यवहार करून कार्यकारी अभियंता खडकवासला जलसंपदा विभागांकडून २१ ऑगस्ट २०१९ रोजी पत्र प्राप्त केले होते, त्यानुसार या जागेचे मूल्य ३ कोटी २५ लाख १८ हजार ३०० रुपये २८ऑगस्ट २०१९ रोजी डिमांड ड्राफ्ट काढून रक्कम संबंधित विभागाला अदा केलेली आहे.

परंतु महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या बैठकीत ३१ जानेवारी १८ रोजी झालेल्या ठरावानुसार सर्व्हे नं. १६ चा उल्लेख आहे, परंतु सर्व्हे नं. १५ चा उल्लेख कॅनॉलसाठी संपादित जागेवर ७/१२ अंमल नसल्यामुळे दिसून येत नाही. यामुळे महापालिका संबंधित जागा ताब्यात घेण्यास अडचणींचा सामना करत आहे. जललसंपदा विभागाकडून सर्व्हे नं. १५ चा उल्लेख करण्याची प्रक्रिया सुरू असून, तसेच महापालिकेकडे अनेक वेळा पत्र व्यवहार झाल्याचे सुद्धा माहिती अधिकारात दिसून येते.

आत्ताच्या ग्लोबल वार्मिंगच्या काळामध्ये उद्यानामध्ये अशा प्रकारचा निर्णय घेणे हे चिंताजनक आहे, वाढती उष्णता व वाढते तापमान पाहता उद्याने टिकली व वाढली पाहिजेत झाडे टिकली पाहिजे असे धोरण महापालिकेच्या असताना उद्यानामध्येच आरक्षण स्थलांतरित करण्याचा प्रयत्न का केला जातो ? हा नागरिकांसमोर फार मोठा प्रश्न आहे. महापालिकेने तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा नागरी आंदोलन केले जाईल. असा इशाराही देण्यात आला आहे.

मोकळा श्वास घेण्याचे एकमेव ठिकाण

खाजगी बांधकाम व्यवसायिकाच्या व स्वतःच्या फायद्यासाठी माजी नगरसेवकाच्या हट्टापोटी, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे वरिष्ठ नेते व वरिष्ठ अधिकारी यांना धोबी घाट आणि शहीद सौरभ फराटे स्मारकाच्या बाबत अंधारात ठेवून सर्व्हे नं. १५ मधील आरक्षण स्थलांतरित करण्याचा उद्योग सुरू केला. यामुळे शहीद हेमंत करकरे उद्यान अडचणीत आणले गेले. खरंतर सातववाडी, गोंधळे नगर, १५ नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, गंगानगर या परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला, युवक व लहान मुलांना व्यायामासाठी व खेळण्यासाठी तसेच मोकळा श्वास घेण्याचे एकमेव ठिकाण आहे. आरक्षण स्थलांतरित झाल्यास या उद्यानाचा श्वास कोंडला जाईल यामुळे या परिसरातील नागरिकांची विशेषता जेष्ठ नागरिकांची फार मोठी गैरसोय होईल.

अचानक जागा बांधकाम व्यावसायिकाकडे गेल्याने संशय

महापालिकेने केलेल्या कार्यवाही कागदपत्रानुसार ही जागा जलसंपदा विभागाची होती. तसेच या मॅटर्निटी होमच्या जागेसाठी महापालिकेने ३ कोटी २५ लाख १८ हजार ३०० रुपये एवढी मोठी रक्कम सर्व्हे नं. १५ व १६ मधील आरक्षणासाठी जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळास डिमांड ड्राफ्ट द्वारे अदा करूनही अचानक या सर्वे नंबरमधील ही जागा बांधकाम व्यवसायिकाच्या ताब्यात गेल्याने संशयास्पद व्यवहार दिसून येतो. ही बाब अत्यंत गंभीर आहे. यात आर्थिक गैरव्यवहाराचे संकेत मिळत असून, पुणे महापालिका प्रशासनाने दाखवलेल्या हलगर्जीपणाबाबत साशंकता निर्माण होते. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

थायलंडमध्ये अपघात झालेल्या दाम्पत्याला शस्त्रक्रियेसाठी मुरलीधर मोहोळांनी आणले मायदेशी- एका केंद्रीय मंत्र्याची संवेदनशीलता

पुणे (प्रतिनिधी) भोसरी येथे राहणारी दोन दाम्पत्य पुण्याहून नुकतीच फुकेत येथे सहलीसाठी गेले. चौघेही फुकेतमधील कलीम बीचवरील अमरीतसर रेस्टॉरंटमध्ये राहत होते. मात्र सहलीच्या दुसऱ्याच दिवशी एका दाम्पत्याचा झोका खेळताना अपघात झाला आणि दोघेही गंभीररित्या जखमी झाले होते. ही माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना समजताच त्यांनी या दाम्पत्याच्या पुढील उपचारांसाठी भारतात आणण्याची सोय केली. मोहोळ यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे या दाम्पत्यावर पुण्यात यशस्वीपणे उपचार सुरू झाले आहेत.

घडलेल्या प्रकाराबाबत माहिती अशी की, फुकेत सहलीत संध्याकाळी दोनपैकी एक दांपत्य शुभम फुगे (वय २७ वर्षे) आणि त्यांची पत्नी सिद्धी (वय २१ वर्षे) हे दोघेही एकत्र झोका खेळत होते. खेळता खेळता झोका इतका उंच गेला, की त्या झोक्यावरुन ते दोघे सटकले आणि जवळजवळ १० फूट उंचीवरुन जोरात खाली आदळले. या अपघातानंतर त्यांना प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यांना ताबडतोब ‘पटाँग हॉस्पिटल’मध्ये दाखल केले गेले. शुभम यांचे मांडीचे हाड आणि सिद्धी यांचे मणक्याचे हाड मोडले. तेथे त्यांना फक्त पेन किलर गोळ्यांवर ठेवण्यात आले. ऑपरेशनसाठी त्यांना तत्काल भारतात आणणे गरजेचे होते.

या संदर्भात केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, घडलेल्या प्रकाराची माहिती मला माझ्या एका कार्यकर्त्याकडून मिळाली आणि प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आमची सर्व यंत्रणा कामाला लावली. विमानाच्या खुर्चीत बसून येणे दोघांनाही अशक्यप्राय होते, त्यामुळे दोन्ही जखमींना विमानात स्ट्रेचर अरेंजमेंटची गरज होती आणि त्यासाठी डॉक्टर्सपासून तर हवाई वाहतूक कंपन्यांपर्यंत खूपसाऱ्या परवानग्या लागत होत्या. या सगळ्या परवानग्या आणि विमानातल्या जागेची उपलब्धता यावर युद्धपातळीवर काम सुरू होते. कारण स्ट्रेचर ठेवण्यासाठी काही खुर्च्या काढाव्या लागणार होत्या, त्याचीही पूर्तता या सगळ्या करावी लागली’

ते पुढे म्हणाले, ‘परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासह माझ्या कार्यालयातील यंत्रणाही दाम्पत्याला परत आणण्यासाठी कार्यरत होती. शुभम आणि सिद्धी यांच्यासोबत असलेले दुसरे जोडपे अभिजीत पठारे आणि काजल मोरे यांनाही सोबतच लवकरात लवकर भारतात आणायचे होते. अखेर सर्व प्रयत्नांना यश येत त्यांना इंडिगो एयरलाइनच्या दोन वेगळ्या विमानाने त्यांना आणले. पुण्यात पोहोचल्यावर त्यांच्यावर पुण्यात संचेती रुग्णालयात त्यांना शस्त्रक्रियेसाठी दाखल केले.

गरजूंना मदतीचा हात देणे माझे कर्तव्यच : मोहोळ
परदेशात गेल्यावर अनेकांना विविध अडचणी येतात. असे प्रकार माझ्याकडे आल्यावर त्यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असते. म्हणूनच गरजूंना मदतीचा हात देणे, हे मी माझे कर्तव्य समजून सर्व यंत्रणा कामाला लावत असतो. अशा प्रकारांमध्ये आमच्या सरकारचे सर्व विभाग संवेदनशीलपणातून मदत करत असतात. त्याचा फायदा निश्चितच गरजूंना होत असतो.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया प्रकरणी गठीत समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला. त्या अनुषंगाने मंत्रालयीन विभागाने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, ऊसतोड कामगार महामंडळ कार्यरत असल्याने सामाजिक न्याय विभागाने ऊसतोड कामगार महामंडळ आणि अन्य संबंधित विभागांच्या सहकार्याने सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन करावा.

या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यास गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या व समिती अहवालाच्या अनुषंगाने कार्यवाही करावी असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले आहेत.पोलीस अंमलदार मंगेश पवार, महेश बारवकर, अभिनय चौधरी यांनी हा गुन्हा अल्पवयीन मुलाने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याने मित्राकडे दागिने ठेवायला दिले होते़ पोलिसांनी हे दागिने हस्तगत केले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, तुकाराम सुतार यांनी केली आहे.

नवीन मराठी शाळेचा पुन्हा एकदा विश्वविक्रम

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेने कराटे मधील तीन मिनिटात सर्वाधिक पंचेस करण्याचा विश्वविक्रम करत इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. शाळेतील एकूण १२९६ विद्यार्थ्यांनी यात सहभागी होत एका मिनिटात ७५ पंच प्रत्येक विद्यार्थ्याने मारलेले आहेत.तसेच तीन मिनिटात प्रत्येक विद्यार्थ्याचे २२४ पंच झालेले आहेत.एकूण सर्व विद्यार्थ्यांचे मिळून २,९०,३०४ पंच नोंदवून विश्वविक्रम केला आहे. आयडियल तायक्वांदो कराटे, किक बॉक्सिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नवीन मराठी शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयडियल तायक्वांदो, कराटे किक बॉक्सिंगचे अध्यक्ष संजय सोनवणे, इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे परीक्षक शाकीर शेख डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी राजेंद्र जोग ॲडवोकेट राजश्री ठकार,नवीन मराठी शाळेचे तायक्वांदो व कराटे प्रशिक्षक दिनेश भुजबळ, असोसिएशनचे प्रत्येक जिल्ह्याचे प्रमुख इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक,शैक्षणिक, बौद्धिक विकास होऊन संरक्षणाबद्दल जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करून प्रत्यक्ष पंच मारण्याचा एक एक मिनिटाचा सराव घेण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष विश्वविक्रमासाठीचे पंच मारणे सुरू झाले.१२९६ विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत न थकता अचूक आपले लक्ष्य पूर्ण केले.
उपस्थित पाहुणे व पालक वृंदांकडून नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचे या विश्वविक्रमाबद्दल अभिनंदन करण्यात आले.
भाग्यश्री हजारे यांनी सूत्रसंचलन केले.अर्चना देव यांनी अतिथी परिचय करून दिला.योगिता भावकर यांनी आभार मानले. ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने, धनंजय तळपे व सर्व शिक्षकांनी नियोजनास सहाय्य केले.

धक्कादायक! आयटी अभियंता तरुणीला मुंबईत नेऊन सामूहिक बलात्कार; नग्न फोटो काढून धमकावून ३० लाख रुपये आणि २ आयफोन उकळले – पुण्यात गुन्हा दाखल

पुणे, २७ मार्च २०२५: पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. इथं एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंता तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही कर्नाटक राज्यातील असून ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. २०२१ मध्ये फेसबुकवर तिची ओळख आरोपी तमीम हरसल्ला खानशी झाली. खान याने आपल्या वडिलांचा मोठा बांधकाम व्यवसाय असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यातून दोघांची ओळख वाढत गेली आणि त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला भेटायला बोलावले.

कांदिवली येथील फॅब हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. त्यानंतर, आरोपीनं लग्नाचे आमिष दाखवत पीडितेला जाळ्यात ओढले. हॉटेलमध्ये राहिलेल्या या कालावधीत, आरोपीनं तिच्या शीतपेयात गुंगीच्या गोळ्या टाकून लैंगिक अत्याचार केला.यानंतर आरोपी तिला कारने पुण्यात घेऊन आला आणि पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. इतक्यावरच न थांबता, तमीमने आपल्या तीन मित्रांना फोन करून बोलावले आणि त्या तिघांनीही पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. तसेच, आरोपींनी महागड्या गाड्या – रेंज रोव्हर (Range Rover), मर्सिडीज (Mercedes), पोर्शे (Porsche) – दाखवत स्वतःला श्रीमंत असल्याचे भासवले आणि तिची फसवणूक केली.

पीडितेची आर्थिक लूट करण्यासाठी आरोपींनी तिचे नग्न फोटो काढून धमकावले. सुरुवातीला तिने जवळपास १० लाख रुपये दिले. त्यानंतर, व्यवसाय सुरू करण्याच्या बहाण्याने आणि धमकावून तिला कर्ज काढण्यास भाग पाडले. अशा प्रकारे, एकूण ३० लाख रुपये आणि २ आयफोन आरोपींनी उकळले. पैसे मागितल्यावर तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात प्रियकर तमीम हरसल्ला खानसह त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

अॅड. तौसिफ शेख आणि त्यांच्या कायदेशीर टीममध्ये अॅड. सूरज जाधव, अॅड. क्रांती सहाने, अॅड. स्वप्नील गिर्मे, अॅड. नेहा पिसे आणि इतर सदस्यांनी संबंधित गुन्ह्याची तक्रार नोंदवण्यासाठी कलेपडळ पोलीस ठाण्यात पीडित महिलेची कायदेशीर तांत्रिक बाबींमध्ये मदत केली.

अॅड. तौसिफ शेख यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, आरोपींना मोकळे सोडून दिले जाऊ नये आणि त्यांना कायद्यानुसार योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे. त्यांनी यावर भर दिला की, संबंधित आरोपींनी केवळ महिलांचा शारीरिक वस्तू म्हणून गैरवापर केला नाही, तर आर्थिकदृष्ट्याही त्यांचे शोषण केले आहे. त्यामुळे अशा विकृत मानसिकतेला वेळेत कायद्याने धडा शिकवणे आवश्यक आहे. तसेच, आम्ही पीडित महिलेला न्याय मिळेपर्यंत पूर्ण पाठिंबा देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.अशा अमानुष घटनांसाठी कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी तातडीने योग्य कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.

मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती:एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

HCL च्या रोशनी नाडर पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये, हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 जाहीर

नवी दिल्ली-रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब कायम ठेवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी आहेत. ते भारतातील सर्वात मोठी संपत्ती मिळवणारे आहेत. त्यांची एकूण संपत्ती १३% (₹१ लाख कोटी) ने वाढली आहे.रोशनी नाडर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतातील टॉप १० श्रीमंत व्यक्तींमध्ये त्या एकमेव महिला आहेत. अलिकडेच, एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांनी कंपनीतील ४७% हिस्सा त्यांची मुलगी रोशनी यांना हस्तांतरित केला, ज्यामुळे पहिल्यांदाच श्रीमंतांच्या टॉप टेन यादीत स्थान मिळाले आहे.टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आल्यापासून मस्क यांच्या एकूण संपत्तीत ८२% (१८९ अब्ज डॉलर्स) वाढ झाली आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
भारतातील अब्जाधीश: त्यांची संख्या पूर्वीच्या २७१ वरून २८४ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ९८ लाख कोटी रुपये आहे.
एकूण अब्जाधीश: जगात ३,४५६ अब्जाधीश आहेत, जे २०२४ मध्ये नोंदवलेल्या ३,२७९ पेक्षा १७७ जास्त आहेत. ही ५% वाढ दर्शवते.
तरुण अब्जाधीश: सर्वात तरुण स्वयंनिर्मित अब्जाधीश बोल्टचे रायन ब्रेस्लो (२९) आहेत, ज्यांची संपत्ती १.४ अब्ज डॉलर्स आहे.

सव्वाचार हजार अतिक्रमणांवर कारवाई:पीएमआरडीएची संयुक्त कारवाई : तिसऱ्या टप्यातील मोह‍ीम सुरु

पुणे (दि.२६) : पुणे महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरणाच्या माध्‍यमातून पुणे शहरासह पर‍िसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने संयुक्तर‍ित्या अतिक्रमणे काढण्यात येत आहे. या कारवाईचे दोन टप्पे पुर्ण झाले असून तिसऱ्या टप्यातील कारवाईत २६ मार्चपर्यंत सव्वाचार हजार अतिक्रमणे न‍िष्कास‍ित करण्यात आली आहे. संयुक्तर‍ित्या सुरु असलेल्या या कारवाईत पीएमआरडीएसह पुणे, पिंपरी चिंचवड आण‍ि पुणे ग्रामीण पोलीस, पीएमसी, पीसीएमसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमआयडीसी, एसएसईबी आदी विभागांमार्फत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे यादरम्यान आतापर्यंत अनेक स्थानिकांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढून घेतली आहे.

सध्या तिसऱ्या टप्यात पुणे – सातारा रोड (नवले ब्रिज ते सारोळे), हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट, नवलाख उंब्रे ते चाकण, हिंजवडी परिसर – माण या रस्त्यासह महामार्गांवर कारवाई प्रगतीपथावर आहे. यात १७ ते २६ मार्चपर्यंत ७५० अतिक्रमण व अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. यात महामार्गासह राज्यमार्ग रस्त्यालगत असणाऱ्या दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी व अनधिकृत बांधकामे काढण्यात आली आहेत. चालू टप्प्यामध्ये पूर्वीचे पुणे नगर रस्त्यावरील शिक्रापूर ते शिरूर तसेच बावधन बु. ते एनडीए रोड येथील बकाजी कॉर्नर ते स्मशान भूमी या ठिकाणी संयुक्त कारवाई शुक्रवारपासून (दि. २८) करण्यात येणार आहे. संबंध‍ित रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांनी स्वत: अतिक्रमणे काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे. यासह कोणतेही बांधकाम पूर्वपरवानगी घेऊनच करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संबंध‍ित कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, वाहतुक विभागाचे उपआयुक्त बापू बांगर, कार्यकारी अभियंता शैलजा पाटील, कार्यकारी अभियंता सदानंद लिटके, तहसीलदार रविंद्र रांजणे, सचिन मस्के, पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे आदी यंत्रणेच्या संयुक्तर‍ित्या कारवाई करण्यात येत आहे.

कबर ते कामरा : अधिवेशनाने जनतेला काय दिले ?

मुंबई-मुंबई-अधिवेशन संपल्यावर शिवसेनेचे भास्कर जाधव .. माध्यमांशी बोलताना काय म्हणाले…

“ज्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. ज्यांना सत्तेची मस्ती, मुजोरी आहे त्यांच्याकडून लोकशाहीची इभ्रत राखणे, त्याची शान राखणे, लोकशाहीची सभ्यता राखणे, लोकशाहीचं संवर्धन करणे ही अपेक्षा नाही असं सांगत उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव कडाडले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची निवड न झाल्याने जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला.म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता. ते संसदीय कार्यप्रणालीवर काम करणारे, प्रेम करणारे आहेत. आमची संख्या कमी जास्त विचार करणार नाही असं ते सातत्याने बोलत होते. विरोधी पक्षनेतेपदाबाबत ते सूतोवाच असतील असं मला वाटत होते. परंतु या लोकांचा संसदीय कार्यप्रणाली, घटनेवर विश्वास नाही. केवळ सत्तेचा माज आणि मस्ती यांच्याकडे आहे असं त्यांनी सांगितले.तसेच विधानसभा अधिनियमाला जसे सदस्य बांधील आहेत तसे अध्यक्षही बांधील आहेत. अध्यक्षांनी वाट्टेल तो निर्णय घ्यायचा असं नाही. सभागृहातील प्रथा, परंपरा, नियमांप्रमाणे अध्यक्षांनी वागावे. घटनात्मक अधिकार प्रत्येकाला दिले आहेत. त्यामुळे मी कुठलीही गोष्ट चुकीची केली नाही. यांना घटनाच मान्य नाही, लोकशाही मान्य नाही. विधिमंडळ मान्य नाही असा आरोप भास्कर जाधव यांनी केला..दरम्यान, विरोधी पक्षनेते खुर्ची रिकामी ठेवली काय किंवा पलीकडचे सगळे सदस्य विकत घेऊन बाकीच्या खुर्च्या रिकाम्या केल्या काय..सध्या तेच सुरू आहे

पुणे महापालिकेत डांबर खरेदी घोटाळा-माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि माजी सभागृह नेते ॲड. नीलेश निकम यांचा आरोप

पुणे : महापालिकेला डांंबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर हे महापालिका आणि पीडब्ल्यूडीलाही विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे महापालिकेत डांबर खरेदी घोटाळा होत असल्याचा आरोप पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि माजी सभागृह नेते ॲड. नीलेश निकम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.ठेकेदाराकडून डांबर खरेदी करताना महापालिकेचे प्रतिटन साडे सहा हजार ते सात हजार रुपयांचे नुकसान होत आहे. यात ठेकेदारांचे भले होत आहे तर महापालिकेच्या तिजोरीला खड्डा पडत आहे या घोटाळ्याची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी माजी स्थायी समिती अध्यक्ष नीलेश निकम यांनी पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भातील निवेदन आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले आहे.

पुणे महापालिका पूर्वी थेट डांबर उत्पादकांकडून (पेट्रोलियम कंपन्या) डांबर खरेदी करत होती. तीन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेचे तत्कॉलीन आयुक्त विक्रम कुमार यांनी थेट खरेदी बंद करत निविदाप्रक्रियेद्वारे ठेकेदारामार्फत ही खरेदी सुरू केली. एका विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदा काढली जात असल्याने हाच ठेकेदार पात्र ठरतो. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून याच ठेकेदाराकडून डांबर खरेदी सुरू आहे. थेट कंपनीकडून डांबर घेतल्यास प्रतिटन सुमारे साडेसहा ते सात हजार रुपयांची सवलत मिळते. महापालिकेला वर्षाला सुमारे अडीच हजार टन डांबर लागते. त्यामुळे सवलतीची रक्कम मोठी आहे. मात्र, आता ही सवलत ठेकेदार घेत असून त्याला त्याचा फायदा होत आहे . डांबराचे दर हे दर पंधरा दिवसांनी बदलतात. मात्र, संबंधित ठेकेदार पालिकेला प्रचलित दरापेक्षा सहा टक्के कमी दराने डांबर पुरवतो. परंतु, पालिकेने प्रत्यक्ष बाजारातून डांबर घेतल्यास ते अधिक स्वस्त पडेल, असा दावा निलेश निकम यांनी केला.

संबंधित ठेकेदाराने पालिकेच्या प्रकल्पात डांबराचा ट्रक पाठवल्यानंतर तेथे डांबर पूर्णपणे उतरवले जात नाही. अशाप्रकारे दहा ट्रक डांबराची चाेरी झाली आहे, यात महापालिकेचे अधिकारी-कर्मचारीही सामील आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी ‘पीडब्ल्यूडी’ला एक मोबाइल ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये डांबर खरेदीचे चलन तयार होते. त्यातून एका चलनावरील डांबर दोन ठिकाणी विकले गेले आहे का, हे समोर येते. महापालिकेला डांंबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर हे महापािलका आणि पीडब्ल्यूडीलाही विकल्याचे काही चलनांवरून समोर आले आहे. त्यामुळे हा ठेकेदार महापालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग या दोघांपैकी एकाची फसवणूक करत आहे, असा आरोप निकम यांनी केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.