Home Blog Page 3839

उद्यापासून पंतप्रधान मोदींची तोफ धडाडणार महाराष्ट्रात

0

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी किमान 5 दिवस प्रचार करण्यासठी येत आहेत रोज तीन जाहीर सभा यानुसार ते राज्यात 15 सभा घेतील अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली आहे. येत्या 4 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या मोदी बीड, औरंगाबाद आणि मुंबईत जाहीर सभा घेणार आहेत. तर, 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर, गोंदिया, नाशिक येथे मोदी जाहीर सभा घेतील.

पंतप्रधान कार्यालयाने मोदी यांचे 10 दिवस प्रचारसभेसाठी दिले आहेत. त्यानुसार मोदी 5 दिवस महाराष्ट्रात व 5 दिवस हरयाणात प्रचारसभा घेतील. प्रत्येक दिवशी 3 सभा या न्यायाने मोदी महाराष्ट्र व हरयाणात प्रत्येकी 15-15 सभा घेणार आहेत. याचबरोबर गरज पडली तर आणखी सभा घेणे शक्य आहे का याबाबत चाचपणी करण्यात येणार आहे, असे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. मात्र प्रचारासाठी आजपासून केवळ 10 दिवसच उरल्याने मोदींच्या 15-15 सभाच होणार हे जवळपास निश्चित आहे. सभा वाढवायच्या झाल्यास रोज चार-चार सभा घेण्याचे नियोजन केले जाऊ शकते का ? याची हि चाचपणी होण्याची शक्यता आहे .

मोदी म्हणजे मार्केटिंग आणि प्रोजेक्शन -शरद पवार

0

मार्केटिंग आणि प्रोजेक्शन चे आधुनिक तंत्र नरेंद्र मोदी अवलंबत आहेत हेच तंत्र त्यांनी केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी वापरले होते आणि सत्ता मिळविल्यानंतरही वापरत आहेत बाकी नवीन काही नाही ,परदेश दौऱ्यांमध्ये मनमोहनसिंग यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळत होता ते हि चांगली कामगिरी करीत परंतु त्यांनी कधी त्याचे मार्केटिंग आणि प्रोजेक्शन केले नाही . मनमोहन सिंग आणि मी असे आम्ही दोघे हि एकाच जमान्यातील राजकारणी आहोत फक्त सभा करायच्या आणि व्यासपीठावरून निघून जायचे एवढेच करीत असत . इंटरनेट सोशल मिडिया , वेब मिडिया व्हाटस अप कडे आम्ही लक्ष दिले नाही आता अन्य सर्वच पक्षातील तरुणाई हे पाहू लागली आहे असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले , आताच्या सरकारला बहुमत आहे पण . पूर्वीच्या सरकारनेच घेतलेल्या निर्णयांचा अंमल सध्या दिसतो आहे भारत सरकार कडे २ वर्षे पुरेल एवढा धान्यसाठा असल्याचे वक्तव्य केले जाते पण यांचे सरकार आले मे महिन्यात मग धान्य पेरले कधी/ आणि उगवले कधी ? असा सवाल त्यांनी केला . आजकाल मार्केटिंग आणि प्रोजेक्शन आणि संवाद याकडे लक्ष दिले पाहिजे अशाच आशयाची गरज श्री पवार यांनी प्रतिपादित केली मोदी यांनी पंतप्रधान पदी असताना महाराष्ट्रात एवढ्या जास्त संख्येने सभा घेणे यावरूनच त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीला दिलेले महत्व लक्षात येते असे हि ते म्हणाले.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते , यावेळी अजित पवार यांनी चालविलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील टिके संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले , मी कधी कोणाचे नाव घेत नाही , आणि व्यक्तिगत टीका हि करीत नाही आमच्या पक्षातील सहकाऱ्यांना असाच सल्ला देईल त्यांनी व्यक्तिगत टीका टाळून विकास कार्यक्रम मांडावेत आघाडी का कशी तुटली यावरील प्रश्नावर बोलताना ते म्हणाले , ‘ सोनिया गांधी ची आघाडी व्हावी अशीच पूर्णतः सकारात्मक भूमिका होती मात्र राज्यातील त्यांच्या पक्षाच्या फळी तून प्रतिसाद मिळाला नाही आणि आयत्यावेळी जिथे १३०/ १४० जागा लढायची तयारी करीत होतो तिथे राज्याची निवडणूक स्वबळावर लढायचा निर्णय घेण्याची वेळ आली एकाच दिवस उरला होता आणि राज्यातील काँग्रेस ने ११० उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि त्यात काही मतदारसंघ आमच्या वाटेचे होते अशा परिस्थितीत आमच्यापुढे पर्याय नव्हता आम्हाला २८५ जागा लढविण्याचे आव्हान स्वीकारावे लागले सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर जनतेपुढे जात आहेत हि चांगली संधी असली तरी परिस्थिती अवघड आहे आणि आव्हानात्मक आहे असे हि ते म्हणाले आमची जी तयारी होती त्याहून दुप्पट जबाबदारी आता येवून पडली आहे पण दिवसेंदिवस
आत्मविश्वास हि वाढतो आहे आम्हाला नक्कीच बहुमत मिळेल असा विश्वास आहे
सिंचन घोटाळा हा राष्ट्रवादी विरोधात प्रचारासाठीच तयार केलेला विषय आहे ते म्हणाले १० वर्षात जिथे ३० हजार कोटी खर्च झाला त्यात ७० हजार कोटीचा घोटाळा होईलच कसा ?यासंदर्भात राज्याच्या प्रमुखांनी ‘ केवळ १ ते २ टक्के पाणी वाढले असे केलेले वक्तव्यही वस्तुस्थितीला धरून केलेले नव्हते असे ते म्हणाले .
वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले ,महाराष्ट्राच्या निर्मिती साठी शेकडोंनी प्राण दिले हे राज्य एकसंघ राहावे अशीच इच्छा राहील , पण तरीही मला वाटते हा निर्णय राजकारण्यांनी घेवू नये तो जनतेवर सोपवावा जनमत घेवून त्यावर निर्णय व्हावा , स्वतंत्र विदर्भाच्या नावाने ज्यांनी निवडणुका लढविल्या त्यांना नाही हे हि त्यांनी नमूद केले , मुंबई हे सर्वधर्मियांचे शहर आहे सर्वांचे मुंबईच्या विकासात योगदान आहे मराठी – गुजराती हा वाद वाढवून असे अंतर वाढविणे आपल्याला मान्य नाही . आमचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत एखाद्या नेत्याचा चेहरा घेवून आम्ही निवडणूक लढवू शकत नाही असे सांगून ते म्हणाले निवडून आलेल्या विधिमंडळ सदस्यांचा कल पाहून निवड करण्याची पद्धत आमच्या पक्षात आहे भुजबळ – आर आर -क्षीरसागर अनिल देशमुख – अजित पवार अशी ८ ते १० मंडळी राज्याचे नेतृत्व उत्तम प्रकारे करू शकतील अशा ताकदीचे आहेत , सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले नाही कारण त्यांना केंद्रात रस आहे राज्यात नाही असेही ते म्हणाले

नारायण राणे शनिवारी पुण्यात तोफ डागणार

0

माजी उद्योगमंत्री आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे हे शनिवारी पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. सिंहगड रोडवर सायंकाळी सहा वाजता, तर कॅन्टोन्मेंटमध्ये सायंकाळी सात वाजता या सभा होणार आहेत.केंद्रात भाजपची सत्ता असली तरी सध्या वातावरण बदललेले आहे. मोदी लाट ओसरली असल्याने त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होणार आहे. शहरातील मतदारांची मानसिकता बदलल्याने काँग्रेसला निश्‍चित फायदा होणार असल्याचा दावा पुणे शहर काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील काँग्रेस आय पक्षाच्या उमेदवारांनी आज काँग्रेसभवनात संयुक्तरीत्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी उमेदवारांनी सर्वच विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती वेगळी असल्याने आणि मानसिकता बदलत असल्याने आमचा विजय निश्‍चित असल्याचे यावेळी नमूद केले. या पत्रकार परिषदेत शहर काँग्रेस निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय झाली असून, शहरात सगळ्या मतदारसंघांत परिस्थिती वेगळी असल्याने काँग्रेसचे उमेदवार हे सर्व ठिकाणी विजयी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी नगरसेवक संजय बालगुडे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शहरातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यात आला असून, प्रचारसाहित्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आले असल्याचे नमूद केले. तसेच, आगामी काळात प्रचाराची मदार आता पक्षाचे राज्य आणि देशपातळीवरील नेतेमंडळी सांभाळणार असून, प्रचारसभांचे आयोजन करण्यात येऊन काँग्रेस प्रचाराची राळ उडवून देणार असल्याचे बालगुडे यांनी नमूद केले.

महाराष्ट्राचे लचके तोडू पाहणार्‍या दिल्लीतील मोगलशाही सरकारला धडा शिकवा — आदित्य ठाकरे

0

राजगुरूनगर : स्वतंत्र विदर्भाच्या नावाखाली आणि मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे अखंड महाराष्ट्राचे लचके तोडण्याची स्वप्ने पाहणार्‍या दिल्लीतील मोगलशाही सरकारचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असा इशारा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राजगुरुनगर येथे दिला.खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील सेनेचे अधिकृत उमेदवार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, शिवसेनेने मित्र म्हणून ज्यांना २५ वर्षे सांभाळले, प्रसंगी सर्व सुख दु:खात साथ दिली, त्याच मित्राने केवळ स्वार्थासाठी सहकारी मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला असून महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही. ही निवडणूक म्हणजे राज्याच्या स्वाभिमानाची लढाई असून भगव्याची ताकद काय आहे, ती या निवडणुकीत राज्यातील जनता दिल्लीत बसलेल्यांना दाखवून देईल. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आदित्य ठाकरे म्हणाले, युतीची बोलणी करण्यासाठी मी सेनेच्या इतर नेत्यांसमवेत भाजपच्या नेत्यांकडे गेलो होतो. परंतु चोवीस वर्षांचा हा मुलगा आमच्याशी काय बोलणी करणार? अशी भाजपच्या लोकांनी माझी संभावना केली. परंतु या निवडणुकीत युवा सेनेची ताकद काय आहे. ती तुम्हाला तरुणांच्या मतदानाच्या माध्यमातून दाखवून देतो, असे आव्हानही ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, या आघाडी सरकारने तीन वेळा महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केलेली आहे. परंतु या विधानसभेच्या निवडणुकीत जनता काँग्रेस व राष्ट्रवादीला गाडल्याशिवाय राहणार नाही. खासदार आढळराव म्हणाले, गेल्या दहा वर्षाच्या काळात आ. दिलीप मोहितेंच्या गुंडगिरी व दहशतीला तालुक्यातील जनता कंटाळलेली आहे. यावेळी विजया शिंदे, दत्ता कंद यांची भाषणे झाले.
याप्रसंगी संपर्कनेते मनोहर गायखे, पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे, शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे, राजू जवळेकर, खेड बाजार समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर, अतुल देशमुख, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुका अध्यक्ष गणेश सांडभोर, महिला आघाडीच्या विजया शिंदे, प्रकाश वाडेकर, युवा सेना जिल्हाध्यक्ष अमृता गुरव, तालुका अधिकारी दत्ता कंद, नाना टाकळकर सह शिवसैनिक उपस्थित होते.

महात्मा फुले स्मारकाला ऐतिहासिक पर्यटन केंद्र बनविणार

0

1

गंज पेठेतील महत्मा फुले स्मारकाला ऐतिहासिक पर्यटन केंद्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी फुले स्मारकाचे अत्याधुनुकीकरण येथी २०० रहिवाश्याच्या सहभागाने करू अशी ग्वाही आज येथे कसबा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार दीपक मानकर यांनी दिली तसेच येथून जवळच असलेल्या मासे आळीतील व्यापाऱ्यांसाठी आधुनिक शीतगृह उभारण्याचा मनोदय हि आज येथे त्यांनी बोलून दाखविला या परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि हा परिसर स्वच्छ -सुंदर -आणि संपन्न अशी पुण्याची वसाहत बनविण्यासाठी आपण कसोशीने राज्यसरकार आणि महापालिका यांच्याकडून या योजना राबवून घेवू असे ते म्हणाले , या परिसराच्या पूर्वेस असलेल्या टिंबर मार्केट परिसरातील नाला बंदिस्त करून – सुशोभीकरण करून त्यावर वाहनतळ उभारण्याची योजनाही अमलात आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असे यावेळी त्यांनी सांगितले . जागतिक स्वच्छता दिनाचे ओचित्य साधून पंचहौद येथून अभियानाची सुरुवात त्यांनी येथून सफाई मोहीम राबवून केली आणि या परिसरातील नागरिकांशी संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेस चे अजय दराडे , मुनाफ शेख , जे व्ही पटेल , आयुब भाई , हनीफ कुरेशी , बाबा कुरेशी आदी मान्यवर कार्यकर्ते यावेळी त्यांच्या समवेत या अभियानात सहभागी झाले होते

अजित पवार – पृथ्वीराज चव्हाण यांच्यात जुंपली

0

अजित पवार – पृथ्वीराज चव्हाण यांच्यात निवडणूक रिंगणात चांगलीच जुंपली आहे , पहा अजित पवार काय म्हणतात आणि पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात …
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या रडारवर सध्या पृथ्वीराज चव्हाण असल्याचे स्पष्ट झाले आहे . काँग्रेसच्या जाहीरातींबाबत प्रश्न उपस्थित करून अजित पवार म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जेवढी जाहीरातबाजी केली नाही, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने विधानसभा निवडणुकीत केली जात आहे. मराठीतील कोणतेही टीव्ही चॅनल सुरु केले तर, फक्त पृथ्वीराज चव्हाण सही करताना दिसतात. तीन वर्षात त्यांनी कधी फायलींवर सह्या केल्या नाही आणि जाहीरातीत मात्र त्यांनी स्वतःला कामाचा निपटारा करताना दाखवले आहे. गेल्या सहा महिन्यात त्यांनी मंजूरी दिलेल्या फायलींची चौकशी केली पाहिजे, त्यातून ते किती क्लिन आहेत हे उघड होईल.’ असा आरोप अजित पवारांनी केला.
‘काँग्रेसकडे एवढी जाहीरातबाजी करण्यासाठी फंड कुठून आला,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाताजाता त्यांचे दहा दिवसांपूर्वीचे सहकारी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित संचिन घोटाळ्याच्या चौकशीला मंजूरी दिली. त्यानंतर आता विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस चव्हाणांना टार्गेट करत आहे. आघाडी सरकारच्या शेवटच्या सहा महिन्यात झालेल्या फायलींची चौकशी झाली पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. तर, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुकीनंतर भाजप सोबतच्या युतीच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे.
निव्वळ भाषणबाजी नको – थेट माझी चौकशीच करा – पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन
आघाडीचे सरकार चालवत असताना माझ्याकडून नियमबाह्य अथवा चुकीचे निर्णय झालेले नाहीत. ते झाले असतील तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे दाखवून द्यावे, माहितीच्या अधिकारात माहिती घ्यावी अन् त्याची बिनधास्तपणे चौकशी करावी, असे जाहीर आव्हान देताना चुकीच्या विरोध करीत आक्षेप घेत सत्यतेचे धोरण घेतल्याने हितसंबंध दुखावलेले लोक राजकीय स्वार्थापोटी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत असा आरोप हि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
गुरूवारी कराडहून मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. चव्हाण म्हणाले, चुकीचे निर्णय आणि धोरण बदलल्यामुळे हितसंबंध दुखावलेले लोक माझ्यावर रोष व्यक्त करत आहेत. म्हणूनच अशा लोकांकडून माझ्यावर खोटे-नाटे आरोप केले जात आहेत. आपणाकडून निर्णय घेताना, घाई गडबड अथवा चुकीचे काम झालेले नाही. , असे ठणकावून सांगताना यापूर्वी निर्णय घेताना विलंब लागला म्हणून ओरड करत होते. आता लवकर कामे झाली म्हणूनही ओरड करायची, ही अजित पवारांची खेळी लोक चांगले जाणून आहेत त्यास जनता भुलणार नाही असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये छुपी युती झाल्यामुळे दोन्ही पक्ष आपल्यावर खोटे आरोप करून आपल्या खात्याच्या कामकाजासंदर्भात संभ्रमावस्था निर्माण करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,. नगरविकास खाते हे माझ्या अख्त्यारित असणारे खाते असल्याने त्याबाबतचे निर्णय मीच घेतले आहेत. ते घेताना कोणताही निर्णय आपण घाई गडबडीत घेतला नाही.नगरविकास खात्याच्या ४0 हजार फाईल्स आपण क्लिअर केल्या असून न्याय व सार्वजनिक हिताचे निर्णय आपण कधीच थांबवले नसल्याचे सांगितले. केंद्रिय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना त्यांची पात्रता काय? त्यांच्या सर्टिफिकेटची आपणास गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी झाल्यानेच
राष्ट्रपदी राजवट — पृथ्वीराज चव्हाण
राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी झाल्यानेच राष्ट्रपदी राजवट महाराष्ट्रात आणली गेली हे सांगताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले , राज्यपालांनी मला काळजीवाहू सरकार म्हणून काम करण्याचे पत्र दिले आणि काही तासातच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून मला काही अधिकार मिळू नये म्हणूनच भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीने राज्याला राष्ट्रपती राजवटीखाली ढकलले. याचा फायदा होईल, असे पवार यांना वाटले असावे. एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केला आहे सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या चितळे समितीने पवार व तटकरे यांना क्लीन चिट दिली. पण सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांच्या जनहित याचिकेवर न्यायालयाने दोघांच्या चौकशीचे आदेश दिले. ही फाइल अनेक दिवसांपासून पडली आहे. गृह विभागाने ती पाठवलीच नव्हती. आता निवडणूक काळात ती माझ्याकडे येईल व मंजूर होईल, अशी भीती दोघांना होती, असे चव्हाण म्हणाले. टोल धोरणावरही त्यांनी आक्षेप घेतला ते म्हणाले खारघरचा टोल मी दिला का? १५ किमीमध्ये दोन टोल करणे हे कुठले शहाणपण? इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी झाली तेव्हा मी नव्हतो. एकदा कंत्राट दिले की ते थांबवता येत नाही. प्रस्ताव आला तेव्हा त्यांना ठाऊक नव्हते का १५ किमीमध्ये दोन टोल लावता येत नाहीत. चुका करतात आणि मला दुरुस्त करायला सांगतात.

पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांनी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

0

पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांनी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला . कॉंग्रेस भवनमध्ये अखिल भारतीय कार्यकारीणीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी शोराज वाल्मिकी यांनी त्याचे स्वागत केले . यावेळी पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष संजय बालगुडे , पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे,अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते व आमदार अनंत गाडगीळ , उपमहापौर आबा बागुल गोपाळ तिवारी , विरेंद्र किराड , संगीता तिवारी , नगरसेवक अविनाश बागवे , नगरसेवक सुधीर जानजोत , स्थायी समिती माजी अध्यक्ष रशीद शेख , नीता रजपूत , सर्व उमेदवार आणि कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

निम्हण यांनी राबविली स्वच्छता मोहीम

0

महात्मा गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांच्या यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवाजीनगर

मतदारसंघातील काँग्रेस-आरपीआय (कवाडेगट) चेउमेदवार विनायक निम्हण यांनी आज दिवसभराच्या

प्रचाराची सुरुवात केली. बोपोडी गावठाण येथेस्वत: हातात झाडूघेऊन कार्यकर्त्यांसमवेत स्वच्छता मोहीम

राबवून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.

गुरुवारी सकाळी येरवडा येथील लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवान नगर येथेकाढलेल्या पदयात्रेत हजारो

पुरुष व महिला कार्यकर्तेसहभागी झालेहोते. ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’, ‘येऊन येऊन येणार कोण, विनायक

निम्हण शिवाय आहेच कोण’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात निघालेली ही

पदयात्रेत जागोजागी महिला औंक्षण करीत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथून सुरुझालेली ही

पदयात्रा लक्ष्मीनगर, जयजवान नगर, अमृतेश्वर गणपती, निळा झेंडा चौक, जयशक्ती चौक मित्रमंडळ,

आदर्श सोसायटी, रामनगर, घलोत चौक मार्गेपुन्हा शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथेविसावली. नागरीकांचा

प्रतिसाद, हेच या पदयात्रेचेवैशिष्ट्य म्हणता येईल. नागरीक घराबाहेर येऊन निम्हण यांच्याशी हात मिळवत

होते. या पदयात्रेत ज्ञानेश्वर मोझे, हबीब मुल्ला, शंकर राठोड, रुपेश सोरटे, कैलास पवार, नंदा सरोदे, कांता

चव्हाण, सूर्यकांत घाडगे, आदिनाथ कळसाईत, बळीराम भोसले, राजपाल घलोत आदी सहभागी झालेहोते.

तत्पूर्वी, बुधवारी सायंकाळी भरपावसात पदयात्रा काढून खडकी बाजार येथील मतदारांशी संपर्क

साधला. खडकी नवा बाजार येथील काँग्रेस कार्यालयाचेउद्घाटन करून निम्हण यांनी आपल्या पदयात्रेला

प्रारंभ केला. पावसाच्या सरी कोसळत होत्याच. पावसामुळेसर्वत्र चिखलामुळेदलदल निर्माण झालेली होती.

अशाही वातावरणात निम्हण यांची हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदयात्रा सुरुच होती. नवा खडकी बाजार

येथून सुरुझालेली ही पदयात्रा विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज मार्गेइदशाह चौक, धोबी गल्ली,

गवळीवाडा, दर्गा वसाहत, गाडी अड्डा, कर्मचारी वसाहत, कमेला चाळ, महादेववाडी इथेआली. इथे डॉ. बाबासाहेब

आंबे़डकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा गंधकुटी बुद्ध विहार मार्गेराजीव गांधीनगर येथे

आली. त्यानंतर ती काँग्रेस कार्यालयाजवळ विसावली. या पदयात्रेत विनायक निम्हण यांनाच विजयी करा,

काँग्रेसला मत म्हणजेविकासाला मत, अशा घोषणा देत शेकडो पुरुष व महिला कार्यकर्तेसहभागी झालेहोते.

अभय छाजेड यांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी

0

पुणे-पर्वती विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (कवाडेगट) उमेदवार अॅड.

अभय छाजेड यांनी आज सकाळी महात्मा गांधी व भारताचेदिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या

पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले.या महापुरुषांच्या कार्याचेस्मरण करून छाजेड यांनी दिवसभर घेतल्या.

आज महात्मा गांधी यांची जयंती तर भारताचेदिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी.

त्यानिमित्तानेअॅड. अभय छाजेड यांनी सकाळी दांडेकर पुलावरील लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळयाला

पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी त्यांच्यासमवेत सचिन आडेकर,रोहित खंडागळे,हनुमंत दहिभातेव इतर

कार्यकर्तेउपस्थित होते. त्यानंतर कॉंग्रेस भवन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अॅड. अभय

छाजेड यांनी अर्पण केला.त्यावेळी त्यांच्या समवेत पुण्याचेउपमहापौर आबा बागुल, पुणेशहर कॉंग्रेसचे

अध्यक्ष संजय बालगुडे, पुणेमनपातील गटनेतेव विरोधीपक्षनेतेअरविंद शिंदे, कॉंग्रेसचेसरचिटणीस वीरेंद्र

किराड, लता राजगुरू, जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक लीलाताई मर्चंट, प्रभाकर गुप्ते,श्यौराज वाल्मिकी, काका

धर्मावत, मुकेश धीवार, हाजीभाई लदाफ, राजेंद्र भुतडा आदी पदाधिकारी व कार्यकर्तेउपस्थित होते.

महापुरुषांचेस्मरण केल्यानंतर छाजेड यांनी बिबवेवाडीतील श्री सप्तशृंगी व श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिरात

जावून देवीचेआशीर्वाद घेतले. तेथील भक्तांना मतदानाचेआवाहन करीत व जेष्ठांचा आशीर्वाद घेवून बिबवेवाडी

भागात पद्यात्रेद्वारेदिवसभर मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. इ. एस.हॉस्पिटलपासून प्रारंभ झालेली ही

पदयात्रा पंचदीप कॉलनी,,पद्मजा सोसायटी, अनिकेत सोसायटी, लक्ष्मी अपार्टमेंट,वसंतबाग सोसायटी,

पारिजात-अनिकेत सोसायटी२, चंद्रिका सोसायटी, चंद्रलोक हॉस्पिटल, नाटेकर परतानी, गंगा, जमुना,सरस्वती

सोसायटी, कोठारी कॉलनी, शाहूसोसायटी, जे.यु. पार्क, असा मार्गक्रमण करीत महावीर पार्क येथेसमाप्त

झाली. हलगी आणि ढोलच्या निनाद व ‘येवून येवून येणार कोण, अभय छाजेड यांच्याशिवाय आहेच कोण’ चा गजर,

हातात पंजाचेचित्र असणारेझेंडेघेवून ‘आला रेआला पंजा आला’, इकडून आला, पंजा आला’, ‘सगळ्यांना सांगा,

पंजा आला’ अशा घोषणांच्या चैतन्यपूर्ण वातावरणात निघालेल्या या पदयात्रेला मतदारांचा चांगला प्रतिसाद

लाभला. छोटेफेरीवाले, व्यापारी, रहिवासी, महिला, आबालवृद्ध यासर्वांना मतदान करण्याचेआवाहन अॅड. अभय

छाजेड यांनी केले. त्यांच्या समवेत माजी नगरसेवक विजयराव मोहिते, पुणेशहर मागासवर्गीय सेल अध्यक्ष

मुकेश धीवार,मार्केट यार्ड कमिटी अध्यक्ष रवी ननावरे, ब्लॉक अध्यक्ष संतोष गरुड, सुरेश उकरंडे, विजूउत्तरे,

विनायक मुले, स्नेहलता पवार,तुकाराम वाघ, मिसाळ गुरुजी यांच्यासह शेकडो कार्यकर्तेव महिला पदयात्रेत

सहभागी झाल्या होत्या.

पुणे जिल्ह्यातील लढती

0

अर्ज माघारी नंतर अशा असतील
पुणे जिल्ह्यातील लढती

मळगंगा क्षेत्राचा विकास करणार

0

टाकळीहाजी परिसरातील व महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे आराध्यदैवत असणार्‍या मळगंगादेवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी आपण केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विकासनिधी आणण्यासाठी व परिसर विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उमेदवार अरुण गिरे यांनी केले. टाकळीहाजी, माळवाडी, वडनेर, फाकटे, निमगाव दुडे आदी बेट भागातील गावांचा दौरा करत असताना ते बोलत होते.

टाकळीहाजी येथील आराध्यदैवत मळगंगादेवीच्या दर्शनानंतर त्यांनी आपल्या या भागातील दौर्‍याला सुरुवात केली. या वेळी बोलताना ते म्हणाले की, मळगंगादेवीचे तीर्थक्षेत्र एक आध्यात्मिक शांती देणारे तीर्थक्षेत्र आहे, तसेच येथील रांजणखळगे जगातील भू-शास्त्रज्ञांचे अभ्यासाचे मोठे ठिकाण आहे. हे ठिकाण जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. हा आपला जागतिक वारसा आहे. येथे भाविकांना व पर्यटकांना उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. या कामासाठी खा. शिवाजीराव आढळराव-पाटील केंद्रात व राज्यात निधी मिळावा यासाठी प्रय▪करत आहेत. आपण सर्वांनी त्यांना ताकद मिळावी यासाठी माझ्यासारख्या शिवसेनेच्या धडपडणार्‍या कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहा, आपण सर्व मिळून या परिसराचा कायापालट करू, असे अरुण गिरे यांनी या वेळी सांगितले.02102014-md-pu-15-5197-1-large

दीपक मानकर यांनी मांडली … अलिशान -अत्याधुनिक मंडई आणि आरोग्यकेंद्राची संकल्पना

0

ऐतिहासिक वारसा असलेल्या महात्मा फुले मंडईस वैभव प्राप्त करुन देण्याचा आणि गाडीखाना आरोग्य केंद्रही अलिशान बनविण्याची संकल्पना कास्ब्याचे राष्ट्रवादी पक्षाकडून ल;अध्णारे उमेदवार दीपक मानकर यांनी येथे मांडली . १ ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिकदिनाचे औचित्य साधून दीपक मानकर यांनी मंडई येथील ज्येष्ठ गाळेधारकांशी सुसंवाद साधला. आणि आरोग्य केंद्रातील रुग्ण तसेच कर्मचारी यांची भेट घेवून चर्चा केली मंडई मधील श्रीमती सरस्वती भोक्से व शिवाजी काची या ज्येष्ठ गाळेधारकांनी मंडई येथील गाळेधारकांच्या समस्यांबाबतचे निवेदन मानकर यांना दिले.
जवळपास पाच दशकांचा इतिहास असलेली ही मंडई एकेकाळी पुण्याच्या आर्थिक व्यवस्थेचे प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होती. बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या मंडईची आजमितीस अत्यंत दुरवस्था झालेली आपणास पाहावयास मिळेल. त्यामुळे येथील किमान ८0 टक्के गाळेधारक हे आपले मंडईमधील हक्काचे गाळे सोडून रस्त्यावर ठाण मांडून बसलेले दिसून येत आहेत.
हे चित्र बदलण्यासाठी महात्मा फुले मंडईचे मार्केटयार्ड येथील शिवाजी मार्केटयार्डच्या धर्तीवर नूतनीकरण करणे गरजेचे आहे. मुख्य मंडई, तसेच आजुबाजूच्या परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न आजमितीस ऐरणीवर आहे. नियमितपणे या संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. या परिसरात महिलांसाठी अधिक प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती करणे, येथे व्यवसाय करणार्‍या सर्व गाळेधारकांना आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास रस्त्यावर बसणार्‍या व्यावसायिकांचे प्रमाण आपोआप कमी होईल. त्यामुळे आज या संपूर्ण परिसरात होत असलेल्या दैनंदिन वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. सामान्य नागरिकांचा विशेषत: ज्येष्ठ नागरिकांचा या रस्त्यावरील व्यवहार सुसह्य होईल. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटेल.
महानगरपालिकेच्या गाडीखाना या सार्वजनिक आरोग्यकेंद्रातील रुग्णांनी मानकर यांची भेट घेऊन त्यांना निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी होण्याकरिता शुभेच्छा दिल्या. शहरातील मध्यवर्ती भागातील हे सार्वजनिक आरोग्यकेंद्र आहे. आजमितीस येथे अत्यंत अपुर्‍या स्वरूपात वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्यामुळे येथे येणार्‍या गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून येथील आरोग्यकेंद्र हे महानगरपालिका प्रशासन व राज्य प्रशासनातर्फे दुर्लक्षित राहिल्यामुळे गरीब रुग्णांना आवश्यक असलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय सामग्री, कुशल कामगार व निष्णात डॉक्टर्स यांचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येत आहे, त्यामुळे येथील गरीब रुग्णांना नाइलाजाने ससून रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे, त्यामुळे आजमितीस ससून रुग्णालयावर फार मोठ्या प्रमाणात ताण पडत असल्याचे दिसून येते.

स्वछ भारत अभियानमध्ये व्यापारी सहभागी

0

q

स्वछ भारत अभियान अंतर्गत पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी रस्त्यावर पुणे कॅम्प मर्चंटस असोसिएशनतर्फे सर्व व्यापारी बांधव स्वछता मोहीममध्ये सहभागी झाले होते .
यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या शाळामधील विद्यार्थ्यांनी काढलेल्या जनजागृत फेरीचे खाऊ देऊन स्वागत केले . यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार , पुणे कॅम्प मर्चंटस असोसिएशनचे सदस्य पराग शहा , सुशील खंडेलवाल , राहुल काळे , कावस पंडोल , उगम गुंदेचा , हितेश शहा , केतन शहा , मनीष मेहता , हेतल शहा , अमर शहा , सुनील मुथ्था , नीरव शहा ,भावेश दवे , पुनीत ग्रोवर , राहुल रांका , कुशल ओसवाल , रोहन खंबाटा , बोमन बरूचा आदी व्यापारी बांधव सहभागी झाले होते .

निम्हण यांची गावठाण परिसरात प्रचार फेरी

0

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील काँग्रस व रिप. पक्षाचेउमेदवार विनायक निम्हण यांनी शिवाजीनगर
गावठाण परिसरात प्रचार फेरी काढली.
निम्हण यांनी आज सकाळी चतु:शृंगी देवी, रोकडोबा आणि श्रीरामाचेदर्शन घेऊन प्रचारफेरीला सुरुवात
केली. ढोल-ताशांच्या गजर आणि विनायक निम्हण यांनाच विजयी करा, अशा निनादात संपूर्ण वातावरण
निम्हणमय झालेहोते. जागोजाग तेनागरीकांशी संवाद साधून मत देण्याचेआवाहन करीत होते. नागरीकही
त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचेचित्र होते. ‘सिंघम’च्या धर्तीवर ‘निम्हण’ ची
गाणी लक्षवेधक ठरली. या प्रचारफेरीत तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरीक, महिलाही मोठ्या संख्येनेसहभागी
झाल्या होत्या. शिवाजीनगर गावठाणातील रोकडोबा देवस्थानपासून सुरुझालेली ही प्रचारफेरी नाथ गल्ली, मोरे
पथ, भागुबाई पांडुरंग खेडेकर पथ, कै. पांडुरंग खेडेकर चौकातून तात्याबा साधुजी पथ मार्गेमार्गस्थ झाली. पुढेती
कै. बाबुराव पिसेपथमार्गेकै. महादेव तुकाराम खेडेकर चौकात आली. या चौकात महिलांनी निम्हण यांचेऔंक्षण
केले. त्यानंतर प्रचारफेरी शिवाजी व्यायाम मंडळमार्गेवरची आळी तालीम, रामगढिया बोर्ड, सिताई मार्ग,
मुंजोबा तरुण मंडळासमोरून विठ्ठल मंदिराजवळ आली. इथेनिम्हण यांनी श्री विठ्ठलाचेदर्शन घेतले. पुढेही
फेरी युसुफ खुदाबक्ष शेख मार्गानेमहापालिका भवनजवळ निघाली. तिथून सिद्धार्थ चौक, जैन मंदिर
परिसरातील नागरीकांना मत देण्याचेआवाहन करीत छत्रपती शिवाजी पुतळा चौकामार्गेजुना तोफखाना, साई
बाबा मंदिरामार्गेराजीव गांधीनगरमध्येआली. या ठिकाणीही त्यांचेजंगी स्वागत करण्यात आले. संपूर्ण राजीव
गांधी वसाहत पिंजून काढत प्रचारफेरी कामगार पुतळा वसाहतीजवळ थांबली. यावेळी नागरीकांनी निम्हण यांनी
केलेल्या कामाचेकौतुक केले. निवडणूकीत काँग्रेसच विजयी होईल आणि निम्हण इतिहास घडवतील, असा
विश्‍वास व्यक्त केला.
माझी निष्ठा मतदारांप्रती असल्यामुळेमी मतदारसंघात विकासाची गंगा आणली. यापुढेआता
आपल्याला ज्येष्ठ नागरिक, तरुण, विद्यार्थी, बेरोजगार युवक, निराधार, विधवा परितक्त्या महिलांसाठी भरीव
कार्य करायचेआहे. हेकार्य तडीस न्यायचेअसून त्यासाठी आपलेपाठबळ आवश्यक आहे, अशी अपेक्षा
निम्हण यांनी व्यक्त केली.

जुन्या वाड्यांचे सर्व प्रश्न सोडवणार – डॉ. रोहित टिळक

0

कसबा पेठ हा पुणे शहराचे भूषण असलेली एक ऐतिहासिक पेठ आहे. बारा बलुतेदारांसह सर्व समाज इथं गुण्यागोविंदाने आजही नांदत असून पुण्याची वाडा संस्कृतीचे जतन येथेच होत आहे. येथील वाडे जुने आहे याची मला जाणिव आहे. पण सर्वच वाड्यांचे प्रश्न सारखे नसल्याने ते एकत्रित सोडवण्याऐवजी प्रत्येक वाड्याचे प्रश्न स्वतंत्रपणे सहजसुटू शकतात आणि ते मी सोडविन असे कसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस – रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट आघाडीचे उमेदवार डॉ. रोहित टिळक यांनी आज येथे सांगितले.

पुण्याचे ग्राम दैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेऊन टिळक यांनी पदयात्रेव्दारे मतदारांशी संवाद साधण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांच्या समावेत काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांबरोबरच तरूण नव्या पिढीतील कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. नगरसेवक मिलिंद काची, माजी नगरसेवक बुवा नलावडे, अरूण को-हाळकर, जयसिंग भोसले, विद्या भोकरे, रोहन भांड, नरेश नलावडे यांच्यासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येक चौकाचौकात मंडळांचे कार्यकर्ते टिळक यांचे उत्साहाने स्वागत करत होते.

कसबा गणपती मंदिरापासून पदयात्रा सुरू झाली. प्रत्येक गल्लीबोळात जाऊन टिळक यांनी मतदारांशी संवाद साधला. मोटे मंगल कार्यालय, सूर्या हॉस्पिटल, पवळे चौक, तांबट हौद, तांबट आळी, शिंपी आळी, गुंडाचा गणपती, व्यवहारे आळी, साततोटी चौक, योजना हॉटेल, गावकोस मारूती, झांबरे चावडी, नवदीप मंडळ, फडके हौद, लोणार आळी, लोणार आळी, दूधभट्टी परिसर, सोन्यामारूती चौक, सिटी पोस्ट, श्रीकृष्ण टॉकीज, सायकल दवाखाना, म्हसोबा मंदीर येथे पदयात्रेचा समारोप झाला.