Home Blog Page 367

नारायण राणेंना अटक केल्याचा व्हिडिओ अजून सेव्ह:परतफेड झाली की तो डिलीट करेन, नीतेश राणे यांचा ठाकरे गटाला निर्वाणीचा इशारा

सिंधुदुर्ग-नारायण राणे यांना अटक करतानाचा व्हिडिओ अजूनही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. ज्या दिवशी मी याची परतफेड करेन, त्याच दिवशी मी तो व्हिडिओ डिलीट करेन. मी कुणालाही सोडणार नाही, असा इशारा राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी आदित्य ठाकरे यांना दिला.खासदार नारायण राणे यांचा गुरुवारी सिंधुदुर्गमध्ये काल वाढदिवस झाला. या कार्यक्रमाला महायुतीचे नेते उपस्थित होते. मंत्री नीतेश राणे यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या काळात नारायण राणे यांना झालेल्या अटकेवर भाष्य करताना ठाकरे गटाला निर्वाणीचा इशारा दिला. ते म्हणाले, साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवले आणि अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला हा क्षण मी अजूनही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. ज्या दिवशी मी त्याची परतफेड करेन त्या दिवशीच हा व्हिडिओ डिलीट करेन. सर्वांचा हिशोब होणार आहे. कारण, राणे साहेबांना ज्यांनी त्रास दिला, ते कुठेही सुटणार नाहीत हे मी विश्वासाने सांगतो.

आम्ही 10 वर्षांच्या प्रवासात खूप काही पाहिले. अनुभवले. दीपक केसरकर सिंधुदुर्गाचे पालकमंत्री होते. त्यांच्या आशीर्वादाने दोडामार्ग जेलही पाहिले. पण त्यांनी आम्हाला लोकसभेला साथ दिली. त्यामुळे जुन्या आठवणी पुसल्या गेल्या. तिसऱ्या कुणालातरी खुश करण्यासाठी केसकरांनी ते केले होते. आमचे त्यांच्याशी केव्हाच वैर नव्हते, असेही नीतेश राणे यावेळी बोलताना म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे हे दिशा सालियन प्रकरणात अडचणीत सापडलेत. सत्ताधारी महायुतीच्या अनेक नेत्यांना त्यांना या प्रकरणात अटक होण्याची भिती व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी ठाकरे गटाला हा इशारा दिला आहे.

नारायण राणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते. स्वातंत्र्य दिनाविषयी ज्यांना काही माहिती नाही, त्यांनी फार काही बोलू नये. त्यांना स्वातंत्र्य दिन कोणता याची काहीही माहिती नाही. मी असतो, तर त्या दिवशी कानशिलात हाणली असती, असे ते महाड येथील एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले असते.

नारायण राणे यांच्या या विधानाने राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. या विधानानंतर काही दिवसांतच 23 ऑगस्ट 2021 रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांना अक्षरशः जेवणाच्या ताटावरून उठवून अटक केली होती.

 सुदर्शन केमिकल्सतर्फे २३५ विद्यार्थ्यांना ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती प्रदान

पुणे : “आर्थिक दुर्बल घटकातील गरजू व हुशार मुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज व सुधा सीएसआर फाऊंडेशनचा उपक्रम स्तुत्य आहे. सुदर्शन कंपनीसह येथील कर्मचाऱ्यांनी जपलेले सामाजिक भान कौतुकास्पद आहे. हा उपक्रम आता केवळ ‘सुधा सितारा’ राहिला नाही, तर खऱ्या अर्थाने ‘सुधा सितारे’ झाला आहे,” असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. हुशार व गरजू विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी सुधा सितारा शिष्यवृत्ती संजीवनी ठरत असल्याचेही अदिती तटकरे म्हणाल्या.

सुदर्शन केमिकलच्या वतीने सुधा सीएसआर अंतर्गत मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रोहा व महाड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील २३५ विद्यार्थ्यांना ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामध्ये १८५ मुली, ४९ मुले व १२ दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राठी स्कुलमध्ये आयोजित शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यावेळी सुदर्शन केमिकल्सच्या पीपल्स प्रॅक्टिस हेड शिवालिका पाटील, सुदर्शन रोहा साईट हेड विवेक गर्ग, सीएसआर हेड माधुरी सणस आदी उपस्थित होते.

अदिती तटकरे म्हणाल्या, “गुणवत्तेवर आधारित हा उपक्रम आहे. मुलींमधील गुणवत्ता हेरून त्यांना अर्थसहाय्य व प्रोत्साहनपर मार्गदर्शन देण्याची ही कल्पना विलक्षण आहे. गेल्या पाच वर्षांत जवळपास सहाशे विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. हा उपक्रम सातत्याने सुरू राहावा. संपूर्ण रायगड जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्याला जातोय, याचा आनंद आहे. यामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढेल.”

राजेश राठी म्हणाले, “संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टयांना अनुसरून सुधा सीएसआर महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक विकास या क्षेत्रात कार्यरत आहे. या सीएसआर कार्यक्रमातून आजवर लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे काम झाले आहे. ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन, आत्मविश्वास वृद्धी आणि भविष्यातील येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्याची क्षमता विकसित केली जात आहे.”

शिवालिका राजे यांनी सांगितले की, सुदर्शन कंपनीत ‘डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन’ अंतर्गत उपक्रम राबवले जात आहेत. आपण समाजातही हेच मूल्य रुजवत आहोत. यावेळी सुधा सीएसआर उपक्रमांतर्गत, मुलींप्रमाणेच मुलांना आणि दिव्यांगांना दत्तक घेऊन मदत केली जात आहे. या वर्षीच्या सुधा सितारा उपक्रमाची व्याप्ती संपूर्ण रायगड जिल्ह्यात झाली, याचा आनंद आहे.

प्रास्ताविकात माधुरी सणस म्हणाल्या, “सामाजिक जाणिवेतून २०१९ मध्ये या उपक्रमाला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षात शेकडो मुलींना सुधा सितारा शिष्यवृत्ती दिली आहे. गरजू मुलामुलींना शिक्षण आणि मेंटॉरशिप देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी सुदर्शन केमिकल्समधील कर्मचार्‍यांनी या मुलामुलींचे पालकत्व स्वीकारले आहे.”
विवेक गर्ग यांनीही उपस्थितांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात याआधी शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थिनींच्या यशोगाथा ऐकून उपस्थित भारावून गेले. विद्यार्थी, त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुदर्शन कंपनी आणि त्यांचे कर्मचारी समाजातील विषमतेची दरी कमी करण्यासाठी खूप चांगले काम करत आहेत, अशी भावना पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

स्वाती मोहिता आणि संजय कचरे यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. विशाल घोरपडे यांनी आभार मानले.

बजाज अलियान्झ लाईफ इन्शुरन्स खास महिलांसाठी सर्वसमावेशक सुरक्षा योजना सादर करा

·         मुलाच्या भविष्यासाठी उत्पन्न

·         संघर्ष ६० गंभीर आंतरराष्ट्रीय संरक्षणासाठी

·         प्रति वर्ष 36,500 रु. महिलांसाठी आरोग्य व्यवस्थापन सेवा

पुणे : भारतातील एका उदाहरणाच्या एका स्वतंत्र जीवन विमा 5 बजाज अलियान्झ लाईफ इन्शुरन्सने बजाज अलियान्झ लाइफ सुपरवुमन टर्म ( SWT) ही महिलांसाठी स्वतः तयार सर्वसमावेशक सुरक्षा योजना सादर केली आहे. ही क्रांतिकारी योजना परंपरागत जीवन विम्याचे पलीकडे गाव टर्मशुरन्स लाभ , महिलांसाठी खास संस्था संरक्षण लाभ , पर्यायी चाइल्ड केअर बेनिफिट आणि आरोग्य व्यवस्थापन सेवा सुविधा समाविष्ट करणारी महिला आणि त्यांच्या कुटुंबांना सर्वांगीण आर्थिक संरक्षण पुरवते.

महिला त्यांच्या कुटुंबाची काळजीपूर्वक उत्कृष्टपणे घेतात आणि त्यांच्या स्वतःच्या आर्थिक सुरक्षेचा विचार तितकाच विचार करायला हवा. बजाज अलियान्झलाईफ सुपरवुमन टर्म महिलांना आर्थिक मदत स्वावलंबी ठेवते , त्यांच्या जीवनातील प्रत्येक शक्तीवर आर्थिक आणि स्थिरता प्रदान करण्यासाठी त्यांचे जीवन ध्येय आधार देते. या सर्वाची मुख्य खालीलप्रमाणे आहेत:

टर्म इन्शुरन्सद्वारे सर्वसमावेशक आर्थिक सुरक्षा: महिला बदलती भूमिका आणि त्यांच्या विशिष्ट आर्थिक गरजा लक्षात ठेवा जीवनाची SWT ही योजना विमाधारकाच्या चौकशीनंतर नामनिर्देशित व्यक्तीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या कुटुंबाचा आर्थिक भविष्यकाळ सुरक्षित करते.

• गंभीर संरक्षण संरक्षण ( CI संरक्षण): CI रायडर साहाय्याने SWT 60 प्रमुख संरक्षण संरक्षण देते . श स्तन , गर्भाशय ग्रीवा व अंडाशयाचा कर्करोग यांसारख्या महिला संघटनांचाही समावेश आहे . आपण उपचार दरम्यान आर्थिक न महिला आरोग्यावर लक्ष केंद्रित करू शकता. स्वतंत्रपणे राहणे हे सर्वात सुरक्षित असते.

• चाइल्ड केअर बेनिफिट: मुलाच्या भविष्याची काळजी लक्षात घेऊन समोर आलेले पर्यायी चाइल्ड केअर बेनिफिट देण्यात आले— SWT प्रथमच सादर करण्यात आलेली ही सुविधा धोकादायक आहे.

• व्यवस्थापन सेवा ( एचएमएस): आर्थिक सुरलीकडे ही योजना संपूर्ण आरोग्य तपासणी , ओपीडी सल्लामसलत , गर्भधारणेशी संबंधित सेवा , भावनिक आरोग्य प्रोग्रॅम्स व आहारतज्ञ आरोग्यतज्ज्ञ मार्गदर्शन करणारी एचएमएस सेवा देते—या सुविधे महिलांच्या सर्वांगीण सेवा. कल्याणासाठी कंपनीची बांधिलकी अधोरेखित होते.

बजाज अलियान्झ लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तरुण चुग म्हणाले , “ आजच्या महिला त्यांचे आरोग्य , कल्याण व आर्थिक लाभान्वित बझार पक्षातर्फे त्यांच्या समर्थनार्थ. लाइफवुमन या एकाच उपायसुविधेद्वारे सर्व गरजा पूर्ण करणे ही त्यांची योजना आहे. आत्मनिर्भर आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी आर्थिक शक्ती देते. स्वत:च्या आरोग्याची देखरेख असो किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचे भविष्य सुरक्षित करणे असो ही सर्वसमावेशक योजना आमच्या महिला ग्राहकांच्या विविध गरजांनुसार सानुकूल बनवते.

अतिरिक्त , बजाज अलियान्झ लाईफने गेल्या काही वेळा आपल्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये विविध टर्म योजना समाविष्ट करून तो अधिक मजबूत केला आहे . जसे की:

बजाज अलियान्झलाईफ ई-टच II ( नॉन लिंक्ड , नॉन पार्टीसिपेट इंडिव्हिज्युअल लाइफ इनश्युरन्स टर्म प्लॅन) सर्व पगारदार व्यक्तींसाठी डिझाइनिंग योजना.

बजाज अलियान्झ लाईफ आयसिक्युअर II ( नॉन लिंक्ड , नॉन पार्टीसिपेटिंग इंडिव्हिज्युअल लाईफ इनश्युरन्स टर्म प्लान) – स्वयंरोजगार असलेल्या व्यावसायिकांसाठी योजना.

बजाज अलियान्झ लाईफ डायबेटिक टर्म प्लॅन II सब 8 HbA1c ( नॉन लिंक्ड , नॉन पार्टीसिपेटिंग इंडिव्हिज्युअल , प्युअर रिस्क प्रीमियम लाइफ इनशुरन्स प्लॅन) – मधुमेहासाठी खास तयार भारताची पहिली टर्म योजना.

बजाज अलियान्झ लाईफ इन्वेस्ट प्रोटेक्ट गोल III (युनिट लिंक्ड , नॉन पार्टीसिपेटिंग इंडिव्हिज्युअल लाईफ सेव्हीग्ज इनशुरन्स प्लॅन्स ) उच्च जीवन संरक्षण आणि मार्केट-लिंक्ड परतव्याच्या सर्वांचे अद्वितीय संयोजन. या पोर्टफोलिओमध्ये विविध ग्राहक विभागासाठी अनेक उत्पादने आहेत. कंपनीने 9.23% दावा निवारण प्रमाण (वैयक्तिक वर्ष दाव्यांचे निवारण प्रमाण वित्त 2023-2024 साठी) आणि 432% सॉल्व्हन्सी रेशो ( 31 मार्च 2024 पर्यंत) त्यांच्या विश्वसनीयतेच्या निकषाने आपली बांधिलकी राखली आहे. नाविनपूर्ण ग्राहक आणि केंद्रीत अग्रेसर अग्रेसर आहे

भारतीय विद्यार्थी रोबोटिक्स टीम ह्यूस्टनच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी रवाना

पुणे: मुंबईतील “टीम आर फॅक्टर 6024” ने USA मध्ये दोन प्रमुख पुरस्कार जिंकून ह्यूस्टनमधील FRC वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता प्राप्त केली आहे. ही वर्ल्ड चॅम्पियनशिप 16 ते 19 एप्रिल दरम्यान ह्यूस्टन, USA मध्ये होणार आहे.

मुंबई स्थित “टीम आर फॅक्टर 6024” ने मार्च महिन्यात USA मध्ये झालेल्या “फर्स्ट रोबोटिक्स चॅलेंज” (FRC) मध्ये अत्यंत मान्यताप्राप्त ठरले आणि दोन प्रमुख पुरस्कार मिळवले. या टीममध्ये मुंबई, बंगलोर आणि पुणे येथील आठ शाळांतील 19 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे रोबोट प्रोग्राम, डिझाइन आणि अ‍ॅस्सेम्बल केले आहेत, ज्यासाठी त्यांना कोणतीही बाह्य मदत घेतली नाही.

या विद्यार्थ्यांचा समूह 8वी ते 12वीच्या दरम्यान आहे. त्यांनी “माइंड फॅक्टरी” मुंबई येथे मार्गदर्शक निलेश शाह आणि पारुल शाह यांच्या नेतृत्वाखाली काम केले. त्यांच्या तयार केलेल्या रोबोटचे नाव “गोल्डफिश” आहे. टीममधील काही सदस्य हे मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी आहेत, ज्यात समृद्धी स्वरुप, रिनेसा देधिया, प्रपटी दोशी, रिधान देधिया, सक्षम गुप्ता, रचित जैन आणि अर्जुन वशिष्ठ यांचा समावेश आहे.

तर, अन्य सदस्य हे मुंबईतील “डीएसबी इंटरनॅशनल स्कूल”, “पेस जूनियर कॉलेज”, “जामनाबाई नारसी स्कूल”, “विटी इंटरनॅशनल स्कूल”, “राजहन्स विद्यालय” आणि “सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल” येथील विद्यार्थी आहेत. पुण्यातील “विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी” आणि गोव्यातील “शारदा मंदिर स्कूल” येथील विद्यार्थ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

टीम आर फॅक्टर 6024 ने ‘2025 इमेजरी अवॉर्ड’ आणि ‘2025 इंजिनीअरिंग इन्स्पिरेशन अवॉर्ड’ मिळवले आहेत. इमेजरी अवॉर्ड इंजिनीअरिंग आणि व्हिज्युअल डिझाइनला मान्यता देतो, तर इंजिनीअरिंग इन्स्पिरेशन अवॉर्ड समुदायात इंजिनीअरिंगच्या क्षेत्रातील उत्साही भावना वाढविण्यासाठी दिला जातो. या पुरस्कारासाठी टीमने USA, मेक्सिको आणि टर्की येथील इतर टीम्सशी स्पर्धा केली.

टीम 6024 ही FRC च्या इतिहासातील पहिली भारतीय टीम आहे, आणि त्यांचा उद्देश FIRST (For Inspiration & Recognition of Science & Technology) या नॉन-प्रॉफिट संस्थेचा भारतात आधार मजबूत करणे आहे. या टीमने आपल्या 10 वर्षांच्या कार्यकालात गरीब विद्यार्थ्यांना रोबोटिक्स शिकवले, पुण्यात FIRST टेक चॅलेंज (FTC) आयोजित केले आणि विविध सत्रांमध्ये आपल्या नवकल्पनांचे प्रदर्शन केले.

टीम आर फॅक्टर 6024 च्या या यशाने भारतीय रोबोटिक्स क्षेत्रात एक नवीन आयाम निर्माण केला आहे आणि तेथील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरले आहे.

बारामती येथे अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, समाजात अशा अमानुष वागणुकीला थारा नाही- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि. ११ एप्रिल २०२५ : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथून समोर आलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील एका तरुणाकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे. आरोपी तरुणाने मुलीवर लग्नासाठी दबाव टाकून तिच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या घटनेवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “शाळकरी मुलीला त्रास सहन न झाल्यामुळे तिने आत्महत्या केली. हे वृत्त समोर आल्यानंतर अत्यंत खेद वाटतो. आजही आपल्या समाजात अशा घटनांमुळे अल्पवयीन मुलींना सुरक्षित वातावरणात जगता येत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे.”

डॉ. गोऱ्हे यांनी समाजातील नागरिकांना जागरूकतेचे आवाहन करत सांगितले की, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीची भूमिका बजावली पाहिजे. मुलींना कोणताही त्रास, छेडछाड अथवा धमकी दिली जात असेल, तर त्यांनी कोणतीही भीती न बाळगता ११२ या पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा. तसेच महिला सहायता संस्था जसे की स्त्री आधार केंद्र यांच्याकडे संपर्क साधून मदत घेता येईल.

त्यांनी पालकांनाही आवाहन केलं की, मुलींच्या वागण्यात कोणतेही भावनिक वा मानसिक बदल जाणवले, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी संवाद साधावा. सुरक्षितता, भावनिक आधार आणि समजूतदारपणाची गरज असलेल्या अशा प्रसंगांमध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.

डॉ. गोऱ्हे यांनी शैक्षणिक संस्थांनाही या विषयात पुढाकार घेण्याचे सुचवले. शाळा व महाविद्यालयांमध्ये लैंगिक शिक्षण, स्वसंरक्षण, कायदेशीर हक्क आणि मदत केंद्रांची माहिती देणारे कार्यक्रम नियमितपणे राबवले जावेत. समाजानेही अशा घटना रोखण्यासाठी एकत्र येऊन सतर्कता बाळगली पाहिजे. आपल्या परिसरात कोणत्याही संशयास्पद हालचाली जाणवल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.

“या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. समाजात अशा अमानुष वागणुकीला थारा नाही. आपली जबाबदारी आहे की अल्पवयीन मुलींना सुरक्षित, सन्मानजनक आणि निर्भय आयुष्य मिळावं,” असे ठाम मत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

महाकुंभ हे सनातन धर्माचे सर्वोच्च प्रतीक- ज्ञानेश्वर महाराज आळंदी देवस्थानचे प्रमुख निरंजननाथ महाराज

सद्गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी महोत्सवात ‘महा कुंभ प्रयागराज’ या विषयावर व्याख्यान

पुणे : समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या अमृतकुंभाचे चार थेंब पृथ्वीवरील चार ठिकाणी पडले. या ठिकाणी म्हणजेच प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे कुंभमेळा आयोजित केला जातो. कुंभमेळा हे सनातन धर्माचे सर्वोच्च प्रतीक आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार, ज्ञानेश्वर महाराज आळंदी देवस्थानचे प्रमुख निरंजननाथ महाराज यांनी व्यक्त केले.

सद्गुरु श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३५ व्या पुण्यतिथी महोत्सवात “प्रयागराज कुंभमेळा” या विषयावर निरंजननाथ महाराज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  अध्यक्ष राजेंद्र तांबेकर यांनी निरंजननाथ महाराज यांचे स्वागत केले.

निरंजननाथ महाराज म्हणाले, वर्षभर देवासमोर कधीही अगरबत्ती न लावणारे सुद्धा यंदा प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्याला जाऊन आले. त्यांच्या मनात भक्तीभाव नव्हता, परंतु मोबाईलमध्ये अडकलेल्या आजच्या पिढीला त्या ठिकाणी जाऊन स्वतःचे फोटो सोशल मीडियावर टाकायचे होते. मात्र, ही खरी भक्ती नाही.

प्रत्यक्ष जगाचे भान हरवलेल्या आजच्या पिढीला सोशल मीडियाच्या भासमान दुनियेत २४ तास गुंतून राहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे त्यांना वास्तव जीवनात काय चालले आहे, याचे भान देणे आणि महाकुंभमेळ्याचे महत्त्व समजावून सांगणे गरजेचे आहे.

पॉडकास्ट आणि ‘व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी’मधून मिळणारे शिक्षण फारच धोकादायक आहे. पूर्वी लोक निरक्षर होते, पण सध्याचे लोक साक्षर असूनही या ठिकाणांहून ज्ञान घेऊन एकप्रकारे निरक्षरच राहिले आहेत. या चुकीच्या माध्यमांमधून ज्ञान घेतल्यामुळे धर्माचे अपरिमित नुकसान होत आहे.

आजच्या काळात ऑनलाईन राहणे गरजेचे आहे, परंतु ‘रेंज’मध्ये राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही रेंजमध्ये राहिला नाही, तर तुम्ही आणि तुमची संस्कृती ‘हँग’ व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आजच्या पिढीला सनातन धर्माचे सर्वोच्च प्रतीक असलेल्या महाकुंभमेळ्याचे महत्त्व पटवून देणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने संस्कृतीतील मूल्ये आणि शिक्षण यांचे संक्रमण होऊ शकेल, असे निरंजननाथ महाराज यांनी स्पष्ट केले.

MIM चे इम्तियाज जलील ‘मातोश्री’वर:उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

मुंबई-एमआयएमचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज अचानक मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजला नाही. पण यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जलील आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी ठाकरेंकडे गेले असतील, असा अंदाज वर्तवला आहे.

अंबादास दानवे यांनी काही दिवसांपूर्वी ईदच्या निमित्ताने इम्तियाज जलाली यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी ईदच्या शुभेच्छा देण्याशिवाय या भेटीत काहीही नवीन नसल्याचा दावा केला होता. जलील यांनी यावेळी आपली बाजू स्पष्ट केली होती. मी दरवर्षी अंबादास दानवे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी जातो. ते ही ईदच्या निमित्ताने माझ्या घरी येतात. आमच्यात राजकीय मतभेद आहेत म्हणून आम्ही एकमेकांचे शत्रू आहोत असे नाही. त्यामुळे या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

इम्तियाज जलील आज दुपारी मातोश्री या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेचा तपशील बाहेर आला नाही. त्यामुळे या भेटीचे कारण काय? उभय नेत्यांत काही राजकीय चर्चा झाली का? इम्तियात जलील ठाकरे गटाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशा वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

दुसरीकडे, अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्या मातोश्री भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचा दावा केला आहे. इम्तियाज जलील यांच्या मुलाचे लग्न आहे. या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते मातोश्रीवर गेले असण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे व इम्तियाज जलील यांच्या मुलाचीही थोडीफार ओळख आहे. त्यामुळे जलील लग्नपत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर गेले असतील, असे दानवे म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे इम्तियाज जलील यांनी नुकतीच खुलताबादचे नामांतर रत्नपूर असे करण्याच्या मुद्यावरून शिंदे गटाचे नेते तथा कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्यावर टीका केली होती. तुम्ही शहरांची, इमारतींची व रस्त्यांची नावे बदलत आहात. आता नावे बदलण्याची मालिका सुरूच झाली असेल, तर तुम्ही तुमच्या बापाचेही नाव बदलून घ्या. आता अजून राहिले तरी काय? सांगून टाका की, आम्हाला हे नाव आवडले नव्हते, त्यामुळे आम्ही ते बदलले, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेचा संजय शिरसाट यांनी खरपूस समाचार घेतला होता.

फुले दांपत्यांनीच महिलांसाठीची देशातील पहिली शाळा सुरु केली- अजितदादा म्हणाले…

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन!

पुणे- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज येथील फुले वाड्यात येऊन महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुलेंना आदरांजली वाहत कृतज्ञापूर्वक अभिवादन केले , यावेळी ते म्हणाले,क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या साथीनं त्यांनी महिलांसाठीची देशातील पहिली शाळा सुरु केली. त्यातून महिलांना शिक्षणाची दारं खुली झाली. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आत्मविश्वासानं वावरत आहेत. महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. महिला त्यांच्या हक्कांबद्दल जागरुक झाल्या आहेत, याचं सर्व श्रेय महात्मा फुले-सावित्रीबाईंनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी आणि हालअपेष्टांना आहे, याचा विसर पडता कामा नये. महात्मा जोतिबा फुले यांनी समाजातील अज्ञान, अंश्रश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, लिंगभेदाविरोधात दिलेला लढा आणि सत्यशोधक विचारांची चळवळ पुढे घेऊन जाणं, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

महात्मा फुले यांनी भारतीय समाजव्यवस्थेतून अज्ञान, अन्याय, अनीती, अंधश्रद्धा, अत्याचार, अस्पृश्यता, विषमतेसारख्या कुप्रथा नष्ट करण्यासाठी यशस्वी लढा दिला. शिक्षणाची गंगा बहुजनांच्या दारात नेऊन विकासाची संधी उपलब्ध करुन दिली. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. अनिष्ट रुढी-परंपरांविरोधात सत्यशोधक चळवळ उभारली.

सामाजिक न्यायावर आधारित प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञाननिष्ठ भारताचा पाया भक्कम करण्याचं फार मोठं काम फुलेंनी केलं. बहुजन समाजाला शिक्षणाचं महत्वं पटवून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले” या संदेशानं देशात क्रांती घडवली.

जिल्ह्यात राबविण्यात येणारा ‘सेवादूत’ स्तुत्य उपक्रम-माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

पुणे: जिल्ह्यात राबविण्यात येणारा ‘सेवादूत’ उपक्रम स्तुत्य असून जिल्ह्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, याकरीता राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असे माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सेवादूत संकल्पना राबविण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी आदी उपस्थित होते.

श्री. डुडी यांनी सेवादूत उपक्रमाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यामध्ये
माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांशी थेट संपर्क साधून जलद व सुलभ रीतीने महसूल विभागाच्या सेवा घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत महसूल विभागाच्या सेवा मिळण्यासाठी नागरिकांना आपले सरकार सेवा केंद्र किंवा तालुकास्तरावरील सेतू केंद्रामध्ये जावे लागते. वयोवृद्ध नागरिक, गर्भवती माता, दिव्यांग व नोकरदार वर्ग यांना आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन महसूल विभागाच्या सेवा प्राप्त करून घेणे आदी त्यांच्या शारीरिक स्थितीमुळे किंवा कामकाजाच्या वेळांमुळे जिकीरीचे व अडचणीचे ठरते. अशा वर्गाला महसूल विभागाच्या सेवा मिळण्यासाठीची अर्ज प्रक्रिया घरून करता आली किंवा त्यांच्या सोयीच्या वेळी करता आली तर त्यांचे दैनंदिन जीवन सुकर होऊ शकते. या कारणास्तव “सेवादूत” ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

सेवादूत कार्यप्रणाली
नागरिकांनी sevadoot.pune.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ आपले सरकार सेवा केंद्र चालकाच्या माध्यमातून नागरिकांच्या घरूनच घेता येणार आहे. आपले सरकार सेवा केंद्राचे चालक संगणकीय प्रणालीच्याद्वारे महसुली सेवेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नागरिकांच्या घरीच स्कॅन करून घेणार आहे. नागरिकांच्या समक्ष अर्ज संबंधित प्रणालीमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

नागरिकांच्या घरीच अर्ज mahaonline प्रणालीमध्ये दाखल झाल्यानंतर बँक एण्ड घटक म्हणजेच शासकीय यंत्रणेमार्फत सक्षम अधिकारी प्राप्त झालेला अर्ज व इतर कागदपत्रांची संपूर्ण छाननी करून वैधता,अर्हता पडताळून नियमानुसार सेवा किंवा दाखला निर्गमित करेल.

निर्गमित्त झालेला दाखला नागरिकाला घरपोच हवा असेल किंवा नोंदणीकृत टपालाने हवा असल्यास टपालाचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. नागरिकांनी दिलेल्या पसंतीनुसार सदरचा दाखला नागरिकाला टपालाद्वारे वितरित करण्यात येणार आहे. या निर्गमित झालेल्या दाखल्याची लिंक देखील नागरिकाला लघु संदेश सेवा, ई-मेल, व्हाट्सअपद्वारे उपलब्ध करून देण्याची सुविधा सेवादूत प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठीच्या प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.

समता भूमी विस्तारीकरण आणि राष्ट्रीय स्मारकाचे काम जलदगतीने व्हावे – शहराध्यक्ष दीपक मानकर

पुणे-क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुणे शहरातील महात्मा फुले पेठ येथे असलेल्या निवासस्थान समता भूमी विस्तारीकरण आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारकाचे काम जलदगतीने व्हावी यासाठी बैठकीचे आयोजन करणे, तसेच पुणे शहरातील सर्व नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई करणे आणि आपत्कालीन व्यवस्था सज्जतेबाबत, सध्यस्थितीत सुरु असलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करणे, प्रभागातील मुलभूत सुविधा जसे पाणी पुरवठा, सार्वजनिक शौचालय,ड्रेनेज, पावसाळी लाईन दुरुस्ती करणे, नागरिकांच्या विविध प्रश्न या संदर्भात महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेत विस्तृत चर्चा करत निवेदन दिले.
यावेळी दीपक मानकर यांनी सांगितले, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी महात्मा फुले पेठ येथील समता भूमीला भेट देत अभिवादन केले. यावेळी समता भूमी विस्तारीकरण व राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला फारसी गती मिळालेली नाही हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तिथे उपस्थित असलेले महापालिका आयुक्त राजेन्द्र भोसले यांना सूचना केल्या. पुढे बोलताना ते म्हणाले, आपल्या देशाची अस्मिता असलेले क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली. पुण्यातील बुधवार पेठेतील तात्याराव भिडे वाड्यामध्ये ही शाळा सुरू झाली. पुणे शहरातील गंज पेठ येथे असलेल्या क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या निवासस्थान फुले वाडा हा परिसर समता भूमी म्हणून ओळखला जातो. फुले दाम्पत्याच्या जयंती आणि स्मृतीदिनी राज्य आणि देशातून माळी समाजासह विविध जाती धर्माचे लोक त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी समता भूमीत मोठ्या संख्येने येत असतात. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी असून येणाऱ्या नव्या पिढी समोर त्या कार्याची माहिती दिली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘समता भूमी’चे विस्तारीकरण करण्याची आणि फुले वाडा-सावित्रीबाई फुले स्मारक जोडण्याची वारंवार मागणी केली गेल्याने समता भूमीच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या कामाला चालना देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे स्मारकाच्या व दोन्ही वास्तू जोडण्याच्या कामास गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक याच्यामध्ये अंदाजे शंभर मीटरचे अंतर आहे. या विस्तारीकरणामध्ये करावे लागणारे भूसंपादन व इतर अत्यावश्यक गोष्टींची पूर्तता होण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, जागामालक, स्थानिक नागरिक यांची एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात यावे आणि या वास्तूचे जतन व्हावे आणि त्याची डागडुजी करून ऐतिहासिक वारसा जपला जावा, यासाठी आपले प्रशासन निश्चितपणे या वारशाकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहील याची खात्री आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाईंची शिकवण तळागाळापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. तसेच जुन महिन्याच्या अखेरीस पुण्यामध्ये मान्सून दाखल होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुणे शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचणे, रस्त्यांवर खड्डे पडणे यासारख्या समस्या निर्माण होतात. पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुणे शहरातील सर्व नाले, पावसाळी गटारांची सफाई, गाळ काढणे ही कामे होणे अत्यावश्यक आहे. तसेच रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यामुळे छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी खड्ड्याची पाहणी करून या खड्ड्याची तातडीने डागडुजी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून टास्क फ़ोर्स तयार करून पुणे शहरातील सर्व नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई आणि आपत्कालीन व्यवस्था सज्जतेबाबत उचित कार्यवाही व्हावी. मा.आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबधित विभाग प्रमुखांना पुढील कार्यवाही करणेबाबत सूचना केल्या.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा छत्रपतींच्या वंशजांना सवाल ..कोण होतास तू ..काय झालास तू …

महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या फुले वाड्यात जाऊन मुलीची पहिली शाळा प्रतापसिंह राजे यांनी सुरु केल्याचे वादग्रस्त वक्तव्य केलेल्या उदयनराजे भोसले यांचा समाचार कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे. कॉंग्रेस चे प्रदेश अध्यक्ष मधुकर सकपाळ यांनी म्हटले कि, खुद्द छत्रपतींची समाधी ज्यांनी लपवून ठेवली त्यांची पाठराखण आणि ज्या फुलेंनी छत्रपतींची समाधी शोधून काढली त्यांच्या क्रांतिकारक कामाबाबत असे वक्तव्य .. यामुळे छत्रपतींच्या या वंशजांना .. कोण होतास तू … काय झालास तू … असे विचारावे लागेल.

फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले त्या प्रवृत्तीने पुन्हा डोके वर काढले

समता, बंधुता व सामाजिक न्यायाला बाजूला सारण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न.

तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर तात्काळ गुन्हे दाखल करायला हवे होते पण सरकारकडून वेळकाढूपणा, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी फुले वाड्याला भेट देऊन महात्मा फुले यांना अभिवादन केले तसेच भिसे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.

पुणे दि. ११ एप्रिल २०२५
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी तनिषा भिसे या भगिनीला उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाला. हा रुग्णालयाने घेतलेला बळी आहे. या धर्मादाय रुग्णालयाने अटी व शर्थींचा भंग केलेला आहे पण कारवाई करताना सरकार वेळकाढूपणा करत आहे. मंगेशकर रुग्णालयातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रुग्णालयाचे संचालक मंडळ बरखास्त करून सरकारने दवाखाना ताब्यात घ्यावा. डॉ. केळकर व रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांमार्फत एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पुण्यात महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त फुलेवाड्यात जाऊन अभिवादन केले व त्यानंतर भिसे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली,यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दिप्ती चौधरी,प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय ठाकरे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, लता मंगेशकर यांच्या जादुई आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले पण आता, कोण होतास तू काय झालस तू, अशी अवस्था झाली आहे. जी घटना झाली ती अत्यंत वाईट आहे. एका गर्भवती महिलेला पैशासाठी साडेपाच तास ताटकळत ठेवून उपचार नाकारले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मंगेशकर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे. मयत भिसे यांच्या पतीचा व डॉ. केळकर यांचा सीडीआर ताब्यात घ्यावा. या घटनेनंतर तात्काळ गुन्हे दाखल करायला हवे होते पण सरकार वेळकाढूपणा करत आहे, असे सपकाळ म्हणाले.

दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात जो प्रकार झाला तो अमानुष असून माणुसकीला काळीमा फासणारा आहे. एवढी मोठी घटना होऊन रुग्णालय प्रशासन व डॉक्टरांना जराही शरम वाटत नाही. प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे का असा संशय येत आहे. सर्व घटनाक्रम विषण्ण करणारा आहे. स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जर असा प्रकार घडत असेल तर अत्यंत दुखःद आहे. या प्रकरणात डॉ. केळकर असल्याचे दिसते, प्रशासनाने त्यांना बडतर्फ करावे त्यांच्यावर कटात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करावा, डॉ. केळकर यांनी पहिला फोन उचलला पण नंतर एकही फोन उचलला नाही. जबाबदार माणूस असे कसे वागू शकतो. डॉ. केळकर यांचा सीडीआर तपासला पाहिजे. सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे असे वाटते. झालेली घटना दुर्दैवी आहे, आज भिसे परिवाराला आधार देण्यासाठी त्यांची सांत्वनपर भेट घेतली असे सपकाळ म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा व वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. परंतु फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा लागू करण्याचा डाव आहे. संविधानातील समता, बंधुता व सामाजिक न्याय या मुल्ल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. फुले दाम्पत्याने मुलींची पहिला शाळा काढली त्यावेळी सावित्रीबाई फुलेंवर दगड फेकणारे, शेण फेकणारे विदेशातून आले नव्हते, महिला शिकली तर धर्म बुडेल या विचाराच्या लोकांनीच त्यांना छळले. आता फुले चित्रपटातून तो भाग वगळावा असे सेन्सॉर बोर्ड सांगत आहे, ही लपवाछपवी कशासाठी? मंत्री चंद्रकांत पाटील आज फुले वाड्यावर बोलताना म्हणाले की पूर्वी तसे होत होते पण आता होत नाही. संविधानामुळे ते होत नाही. पण चंद्रकांत पाटील यांच्या पक्षाला हे मान्य आहे का? भाजपासाठी गोळवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट’ हे बायबल आहे, त्यात महिला शिक्षणाला थारा नाही. चातुर्वर्ण्याबरोबर पाचवा वर्ण महिला सांगितलेला असून महिलांना अति शुद्र म्हटले आहे ते चंद्रकांत पाटील यांना मान्य आहे का? असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.

फुले दांपत्यांनी सुरु केलेली क्रांती बाबत .. अजूनही काही वर्गात जळजळतंय

‘फुले’ चित्रपटातील दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप:प्रकाश आंबेडकरांचा इशारा; चित्रपट जसाच्या तसा प्रदर्शित करण्याची मागणी

पुणे-महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व कार्यावर आधारित ‘फुले’या सिनेमातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याने या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, या चित्रपटात ज्याप्रकारे खरा इतिहास मांडला गेला आहे तो जसाच्या तसा प्रदर्शित केला जावा. सेन्सार बोर्डाकडून समाजावर परिणाम कोणत्या गोष्टीने होईल याची तपासणी केली जाते, पण संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. या चित्रपटातून कुठे तेढ निर्माण होणार नाही हे पाहणे महत्वाचे आहे. सेन्सॉर बोर्डाला विरोध करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार असून जर सेन्सार बोर्ड आपला विरोध कायम ठेवणार असेल तर, सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचे घरासमोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त फुले वाडयात फुले दाम्पत्याच्या पुतळयास अभिवादन केल्यानंतर बाेलताना ते म्हणाले, सरकारने महात्मा फुले यांचे वाडमय प्रसिध्द करणे गरजेचे आहे. चित्रपटातील दृश्य ही समग्र वाडमयावर आधारित असून जर सेन्सॉर बोर्डाने लावलेली कात्री काढली नाही तर आम्ही त्यांच्या कार्यालयावर आंदोलन करु. चित्रपटातील दृश्य काढायला सांगणे म्हणजे विचारस्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. सरकार एका बाजूला फुले यांना अभिवादन करते परंतु दुसऱ्या बाजूला त्यांच्या कार्यावर आधारित चित्रपटाला विरोध करते हा विरोधाभास थांबवला पाहिजे. त्यामुळे सदर चित्रपट आहे तशा तथ्यासह प्रदर्शित होणे महत्वाचे आहे.

मुलींची पहिली शाळा प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली:महात्मा फुलेंनी अनुकरण केलं- उदयनराजेंचे वादग्रस्त वक्तव्य

पुणे- स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली. महात्मा जोतिबा फुले यांनी एका दृष्टिकोनातून थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सर्वप्रथम काेणी पाऊल उचलले असेल, तर ते थाेरले प्रतापसिंह महाराज हाेते, असा दावा शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. महात्मा फुले वाड्यामध्ये जाऊन उदयन राजे यांनी हे वक्तव्य केले .

खासदार उदयनराजे भोसले महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात फुलेवाडा येथे जात अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी साधलेल्या संवादामध्ये ते म्हणाले की, स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली. महात्मा जोतिबा फुले यांनी एका दृष्टीकोनातून थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सर्वप्रथम काेणी पाऊल उचलले असेल, तर ते थाेरले प्रतापसिंह महाराज हाेते​​​​​​. त्यांनी स्वत:च्या सातारा येथील राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली हाेती. विशेष म्हणजे याच राजवाड्यात देशाचे संविधान निर्माण करणारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील प्राथमिक शिक्षण झाले, असे दावाही त्यांनी केला.

उदयनराजे पुढे म्हणाले की, महात्मा फुले हे दूरदर्शी नेतृत्व हाेते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून सर्व समाज सुधारण्याचे कामाकरिता आयुष्य खर्ची केले. जे युगपुरुष हाेऊन गेले त्यांचे स्मारक जतन करणे आपले र्कतव्य आहे. त्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळून सदर विचारांचे त्यांनी पालन करून ते आचरणात आणावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चे आयुष्यभर लाेकांकरिता व राज्यकारभारात लाेकांचा सक्रिय सहभाग असावा यादृष्टीने काम केले.

महापुरुष यांच्याबाबत सातत्याने अनुदगार काढले जातात हे दुर्देव आहे. महापुरुषांचा अपमान होऊ नये. याबाबत कठाेर कारवाई कायद्याने झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर दर्जेदार शासनमान्य ग्रंथ अद्याप प्रकाशित झालेला नाही. अनेकजण कल्पनेतून कादंबरी लिहितात. त्यावर एखादा चित्रपट निघताे आणि वाद निर्माण हाेतात. ऐतिहासिक गाेष्टी संर्दभ तपासणीसाठी एक तज्ञांचे सेन्साॅर बाेर्ड असावे, अशी मागणीही त्यांनी केली.

उदयनराजे म्हणाले की, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचा विषय कदाचित तांत्रिक किंवा पर्यावरण विषयक अडचणीमुळे रखडले असावे, पण जर त्याठिकाणी समुद्रात स्मारक करण्यासाठी अडचण येत असेल तर अरबी समुद्रालगत 48 एकर जागा उपलब्ध असून त्याठिकाणी महाराजांचे भव्य स्मारक करण्यात यावे. याबाबत मी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी व इतरांशी देखील चर्चा केली आहे. त्यांनी यासंर्दभात स्पष्ट घाेषणा करावा अशी माझी अपेक्षा आहे.

वारजे माळवाडीतील गॅससिलिंडर स्फोटात बाप-लेकाचा मृत्यू, व्हेंटीलेशन नसल्याने घरमालकावर गुन्हा दाखल

संबधित खोलीला व्हेंटीलेशन नसल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तसेच एकच दरवाजा असल्यामुळे शॉर्टसर्किट संपुर्ण पत्र्याच्या खोलीला झाले. पत्र्यालाच करंट असल्याुमळे मुडावत बाप-लेकाला दरवाजा उघडता आला नाही. त्यानंतर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होउन दोघांचा मृत्यू झाला. बाप-लेकाच्या मृत्यूला खोली मालक जबाबदार असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

पुणे–पत्र्याच्या खोलीला शॉर्टसर्किट झाल्यानंतर गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना ९ एप्रिलला रात्री साडेबाराच्या सुमारास वारजे भागातील गोकुळनगर परिसरात घडली होती. याप्रकरणी कोणत्याही प्रकारणाची सुरक्षितता खोली मालकाने घेतली नाही. संपुर्ण पत्र्याच्या खोलीत करंट उतरल्यामुळे बाप-लेकाला घराबाहेर येता आले नाही. त्यानंतर गॅसचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित खोली मालकाविरूद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नितीन नारायण बराटे वय ४२, रा. हर्षवर्धन इमारत, वारजे गावठाण असे गुन्हा दाखल झालेल्या खोली मालकाचे नाव आहे. मोहन माणिक मुडावत (वय ४३), पप्पु मोहन मुडावत (वय २३ दोघे सध्या रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडीतील गोकुळनगर भागात पत्र्याच्या खोलीत मोहन आणि पप्पू राहायला होते. ९ एप्रिलला मध्यरात्री सिलिंडरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाला. स्फोटात गंभीररित्या जखमी झाल्यामुळे मुडावत बाप-लेकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, शॉर्टसर्किट झाल्यानंतर घरात आग लागली. त्यावेळी मोहन आणि पप्पू गाढ झोपेत होते. आग लागल्यानंतर दोघेही झोपेतून जागे झाले. त्यानंतर ते घरातील मोरीत लपले होते. मात्र, त्याचवेळी खोलीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरला आग लागून स्फोट झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

आता चीनने अमेरिकेवर 125% टॅरिफ लादला:जिनपिंग म्हणाले- आम्ही दबावापुढे झुकत नाही

कच्च्या तेलाचा दर आता प्रति बॅरल $६३ च्या खाली आला

वॉशिंग्टन-अमेरिका आणि चीनमधील टेरिफ वॉर वाढत आहे. अमेरिकेने १४५% कर लादल्यानंतर, चीनने आता १२५% कर लादला आहे. उद्यापासून याची अंमलबजावणी होईल. अमेरिकेने लादलेल्या कोणत्याही अतिरिक्त शुल्काला आता ते प्रतिसाद देणार नाही, असे चीनने म्हटले आहे.

अमेरिकेने लादलेले असामान्य शुल्क आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक व्यापार नियमांचे गंभीर उल्लंघन करते, असे चीनने म्हटले आहे. हे दबाव आणि धमकीचे पूर्णपणे एकतर्फी धोरण आहे.

शी जिनपिंग म्हणाले- चीन कोणालाही घाबरत नाही

अमेरिकेसोबतच्या वाढत्या टेरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पहिल्यांदाच विधान केले आहे. ते म्हणाले की, चीन कोणालाही घाबरत नाही. गेल्या ७० वर्षात चीनचा विकास हा कठोर परिश्रम आणि स्वावलंबनाचा परिणाम आहे.

जिनपिंग म्हणाले-चीन कधीही इतरांच्या दानधर्मावर अवलंबून राहिलेले नाही. किंवा मी कधीही कोणाच्या बळाला घाबरलो नाही. जग कितीही बदलले तरी चीनला काळजी नाही.जिनपिंग म्हणाले की, व्यापार युद्धात कोणीही विजेता नसतो. जगाविरुद्ध जाणे म्हणजे स्वतःविरुद्ध जाणे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान जिनपिंग यांनी हे सांगितले. सांचेझ शुक्रवारी चीनच्या दौऱ्यावर आले.

ट्रम्प यांनी कर जाहीर केल्यानंतर चीनला भेट देणारे सांचेझ हे पहिले युरोपीय नेते आहेत. सांचेझ यांनीही ट्रम्प यांच्यावर शुल्कांवर टीका केली. त्यांनी ८ एप्रिल रोजी सांगितले की ट्रम्प यांचे टेरिफ युरोपला नवीन बाजारपेठ शोधण्यास भाग पाडतील. याशिवाय, युरोपीय देश आणि चीन दोन्ही त्यांचे संबंध सुधारण्याचा विचार करतील.

अमेरिकेने चीनवर १२५% नाही तर १४५% कर लादला आहे. व्हाईट हाऊसने हे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी बुधवारी चीनवर १२५% कर लादण्याची घोषणा केली. त्यानंतर गुरुवारी, व्हाईट हाऊसने सांगितले की ते फेंटानिलवर २०% कर जोडत आहे, जो मार्च २०२५ मध्ये लागू होईल.

फेंटानिल ड्रग तस्करीमध्ये चीनच्या कथित भूमिकेबद्दल ट्रम्प यांने ४ मार्च रोजी चीनवर २०% कर लादला. आतापर्यंत ते वेगळे मोजले जात होते. व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, चीनवर १२५% कर, फेंटानिलवर २०% कर. यामध्ये १% विविध समायोजन देखील समाविष्ट आहे. विविध समायोजन लादण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चीनवर १४५% कर लादण्याचा अर्थ असा आहे की चीनमध्ये बनवलेले १०० डॉलर्सचे उत्पादन आता अमेरिकेत पोहोचल्यावर २४५ डॉलर्सचे होईल. अमेरिकेत चिनी वस्तू महाग झाल्यामुळे त्यांची विक्री कमी होईल. चीननेही अमेरिकेवर ८४% प्रत्युत्तरात्मक शुल्क लादले आहे.

फेंटानिल हे ड्रग हेरॉइनपेक्षा ५० पट जास्त आणि मॉर्फिनपेक्षा १०० पट जास्त शक्तिशाली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात की हे ड्रग चीनमध्ये तयार केले जाते आणि तेथून ते मेक्सिको आणि कॅनडामार्गे अमेरिकेत पाठवले जाते. हे थांबवण्यात चीन सरकारला अपयश आले आहे.

सीडीसीच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये, फेंटानिलच्या अतिसेवनामुळे ७०,००० हून अधिक अमेरिकन लोकांचा मृत्यू . ट्रम्प यांचा असा दावा आहे की हे ड्रग अमेरिकेला आतून ‘पोकळ’ करत आहे. त्यांनी याला चीनचे षड्यंत्रही म्हटले आहे.

अहवालांनुसार, चीन पूर्वी फेंटानिलचा सर्वात मोठा स्रोत होता. पण २०१९ मध्ये चीन सरकारने त्यावर बंदी घातली. तेव्हापासून, ड्रग्ज तस्कर फेंटानिलऐवजी चीनमधून रसायने पाठवतात. यानंतर, मेक्सिकन ड्रग कार्टेल ते प्रयोगशाळेत तयार करतात. डीईएच्या अहवालानुसार ९७% फेंटॅनिल मेक्सिकन सीमेवरून अमेरिकेत प्रवेश करते.

अमेरिकन शेअर बाजार कोसळलाअमेरिकन सरकारी बाँड बाजारात पुन्हा विक्री सुरू झाली. त्याच वेळी, शेअर बाजाराचा नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक सुमारे ७% ने घसरला. यासोबतच अॅपल, एनव्हीडिया आणि इतर कंपन्यांचे शेअर्सही घसरले. तेलाच्या किमती जवळपास ४% घसरल्या, कच्च्या तेलाचा दर आता प्रति बॅरल $६३ च्या खाली आला आहे.

ट्रम्प यांनी ९ एप्रिल रोजी सांगितले होते की ७५ हून अधिक देशांनी अमेरिकेच्या प्रतिनिधींना बोलावले आहे आणि माझ्या सूचनेनुसार या देशांनी अमेरिकेविरुद्ध कोणत्याही प्रकारे प्रत्युत्तर दिलेले नाही. म्हणून मी ९० दिवसांचा विराम स्वीकारला आहे. या टेरिफवरील विरामामुळे नवीन व्यापार करारांवर वाटाघाटी करण्यासाठी वेळ मिळेल.

यापूर्वी २ एप्रिल रोजी त्यांनी वेगवेगळ्या देशांसाठी परस्पर शुल्क जाहीर केले होते. याअंतर्गत भारतावर २६% दरही लादण्यात आला. पण आता चीन वगळता सर्व देशांवर ९० दिवसांसाठी १०% बेसलाइन टेरिफ लादण्यात आला आहे.
इतर देशांवरील शुल्क काढून टाकण्याची कारणे… मंदी, महागाईचा धोका होता, जवळचे देशही शुल्काविरुद्ध होते

१. ट्रम्प टेरिफमुळे अमेरिकेसह जागतिक बाजारपेठेत १० ट्रिलियन डॉलर्सची घसरण झाली. तथापि, टॅरिफ थांबवण्याच्या निर्णयाच्या काही तासांतच, अमेरिकन शेअर बाजाराचे मूल्य $3.1 ट्रिलियनने वाढले.

२. ट्रम्प यांच्या अनेक जवळच्या सल्लागारांनी आणि स्वतः एलन मस्क यांनी टेरिफ वॉर थांबवण्याचा सल्ला दिला होता. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे अनेक नेतेही या शुल्काच्या विरोधात होते. मिच मॅककोनेल, रँड पॉल, सुसान कॉलिन्स आणि लिसा मुर्कोव्स्की यांनी या शुल्कांना “असंवैधानिक, अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवणारे आणि राजनैतिकदृष्ट्या धोकादायक” म्हटले.

३. या टेरिफमुळे अमेरिकन बाँड्सची अनपेक्षित विक्री झाली. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली होती, परिस्थिती कोरोना काळातील परिस्थितीसारखी होत चालली होती.

४. वॉल स्ट्रीट बँकांनी इशारा दिला होता की टॅरिफमुळे अमेरिकेत महागाई, वाढती बेरोजगारी आणि मंदी येईल.

५. अमेरिका चीनकडून ४४० अब्ज डॉलर्सची आयात करते. यावर १४५% कर लादला आहे. चीनमधून उत्पादने आयात करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांसाठी पर्याय शोधणे आता एक मोठे आव्हान बनत चालले होते. अशा परिस्थितीत, या कंपन्यांच्या पुरवठा साखळीसाठी इतर देशांवरील शुल्क थांबवणे आवश्यक होते.

चीनकडे सुमारे ६०० अब्ज पौंड (सुमारे $७६० अब्ज) अमेरिकन सरकारी रोखे आहेत. याचा अर्थ असा की चीनकडे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर प्रभाव पाडण्याची मोठी शक्ती आहे. त्याच वेळी, चीननेही तयारी सुरू केली आहे.

चीनने औद्योगिक क्षेत्राला १.९ ट्रिलियन डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज दिले आहे. यामुळे येथील कारखान्यांचे बांधकाम आणि अपग्रेडेशन वेगाने झाले. हुआवेईने शांघायमध्ये ३५,००० अभियंत्यांसाठी एक संशोधन केंद्र उघडले आहे, जे गुगलच्या कॅलिफोर्नियातील मुख्यालयापेक्षा १० पट मोठे आहे. यामुळे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षमता वाढेल.