Home Blog Page 3668

मनसेचा वसंत मोरेंना धक्का ? लांडगे , धंगेकर ,लायगुडे , भानगिरे , तायडे ,शिंदे यांना उमेदवारी

0

पुणे- खडकवासला किंवा हडपसर या दोन्ही हि मतदारसंघातून म न से ने वसंत मोरेंना उमेदवारी दिली नाही तर खडकवासल्यातून राजाभावू लायगुडे ,हडपसर मधून नाना भानगिरे , पर्वतीतून जयराज लांडगे पुणे लष्कर मधून अजय तायडे , कसब्यातून रवी धंगेकर ,कोथरूड मधून किशोर शिंदे , चिंचवड मधून अनंत करोळे ,पुरंदर मधून बाबा जाधवराव , भोर मधून संतोष दसवडकर , दौंड मधून राजाभाऊ तांबे , आळंदी -खेद मधून समीर ठिगळे , शिरूरमधून संदीप भोंडवे यांना उमेदवारी दिली आहे विधानसभा निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाणाऱ्या मनसेने आपल्या १५३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले आहे. मनसेच्या यादीत अखिलेश चौबे हा एकमेव उत्तर भारतीय चेहरा असून त्यांना कांदिवली पूर्वमधून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आजच मनसेची बहुचर्चित ब्ल्यू प्रिंट समोर येत असून त्याआधी ही यादी जाहीर करून मनसेने आपले ‘मिशन इलेक्शन’ सुरू केले आहे.मनसेचे सरचिटणीस आणि विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांनी ही यादी प्रसिद्धीला दिली आहे.त्यांचे स्वतःच्या नावाचा -मतदारसंघाचा मात्र यात समावेश दिसत नाही मनसेने विद्यमान आमदार नितीन सरदेसाई यांना माहिममधून, प्रविण दरेकर यांना मागठाणेमधून, मंगेश सांगळे यांना विक्रोळीतून, शिशिर शिंदे यांना भांडुप पश्चिममधून, प्रकाश भोईर यांना कल्याण पश्चिममधून पुन्हा तिकीट दिले आहे. नसेचे घाटकोपरमधील आमदार राम कदम यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या मतदारसंघातून मनसेने दिलीप लांडे यांना संधी दिली आहे. त्याचबरोबर मलबार हिलमधून अॅड. राजेंद्र शिरोडकर, दिंडोशीतून शालिनी ठाकरे, अंधेरी पश्चिममधून रईस लष्करिया, वांद्रे पूर्वमधून शिल्पा सरपोतदार, ओवळा-माजिवडातून सुधाकर चव्हाण यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी मिळाली आहे. शिवसेना सोडून मनसेवासी झालेले सिंधुदुर्गातील माजी आमदार परशुराम उपरकर यांना सावंतवाडी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्र
नंदुरबार
नंदुरबार -गुलाबसिंग वसावे
नवापूर – महादेव वसावे

धुळे
धुळे ग्रामिण- अजय माळी

जळगाव
रावेर – जुगल पाटील
भुसावळ – रामदास सावकारे
जळगाव शहर – ललित कोल्हे
एरंडोल – नरेंद्र पाटील
चाळीसगाव – राकेश जाधव
पाचोरा – दिलीप पाटील

विदर्भ
बुलडाणा- संजय गायकवाड
चिखली – विनोद खरपास
सिंदखेड राजा – विनोद वाघ
जळगाव जामोद – गजानन वाघ

अकोला
रिसोड – राजू राजेपाटील
धामणगाव-मोर्शी – ज्ञानेश्वर धानेपाटील
अकोट – प्रदीप गावंडे
अकोला पश्चिम – पंकज साबळे
मुर्तिजापूर – रामा उंबरकर

तिवसा – आकाश वराडे
दर्यापूर – गोपाल चंदन
अचलपूर – प्रवीण तायडे
हिंगणघाट- अतुल वंदिले
वर्धा – अजय हेडाऊ
काटोल- दिलिप गायकवाड
हिंगणा -किशोर सराईकर
नागपूर मध्य – श्रावण खापेकर
नागपूर पश्चिम -प्रशांत पवार
तुमसर – विजय शहारे
भंडारा- मनोहर खरोले
तिरोरा – दिलिप जयस्वाल
गडचिरोली -मिनाताई कोडाप
राजुरा – सुधाकर राठोड

ठाणे
विक्रमगड – भरत हजारे
नालासोपारा – विजय मांडवकर
भिवंडी ग्रामीण – दशरथ पाटील
शहापूर – ज्ञानेश्वर तळपदे
कल्याण प. – प्रकाश भोईर
अंबरनाथ – विकास कांबळी
कल्याण पूर्व – नितीन निकम
ओवळा माजीवडा – सुधाकर चव्हाण
बेलापूर – गजानन काळे

मुंबई
बोरिवली – नयन कदम
मागाठणे – प्रविण दरेकर
मुलुंड – सत्यवान दळवी
विक्रोळी – मंगेश सांगळे
भांडूप पश्चिम – शिशिर शिंदे
जोगेश्वरी पू- भालंचद्र अंबुरे
दिंडोशी – शालिनी ठाकरे

कांदिवली पू- अखिलेश चौबे
चारकोप – दीपक देसाई
अंधेरी पश्चिम – रईस लष्करीया
अंधेरी पू- संदीप दळवी
विलेपार्ले – सुहास शिंदे
चांदिवली – ईश्वर तायडे
घाटकोपर प.- दिलिप लांडे
घाटकोपर पूर्व-सतिश नारकर
कुर्ला – स्नेहल जाधव
कलिना- चंद्रकांत मोरे
वांद्रे पू- शिल्पा सरपोतदार
शीव- कोळीवाडा – बाबा कदम
वडाळा – आनंद प्रभू
माहिम – नितीन सरदेसाई
वरळी – विजय कुरतडकर
भायखळा – संजय नाईक
मलबार हिल – अॅड. राजेंद्र शिरोडकर
मुंबादेवी – इम्तियाज अमीन

कोकण
रत्नागिरी
दापोली – वैभव खेडेकर

सिंधुदुर्ग
सावंतवाडी – परशुराम उपरकर

रायगड
पनवेल – केसरी पाटील
कर्जत – जे पी पाटील
उरण – अतुल भगत
पेण – गोवर्धन पोलसानी
महाड – सुरेंद्र चव्हाण

पुणे
जुन्नर – शरद सोनावणे
खेड-आळंदी – समीर ठिगळे
शिरुर – संदीप भोंडवे
दौंड – राजाभाऊ तांबे
पुरंदर – बाबा जाधवराव
भोर – संतोष दसवडकर
चिंचवड – अनंत कोराळे
कोथरुड – किशोर शिंदे
खडकवासला – राजाभाऊ लायगुडे

कोल्हापूर
चंदगड – दिवाकर पाटील
करवीर – अमित पाटील
शिरोळ – विजय भोजे

सांगली
सांगली – स्वाती शिंदे
खानापूर – भक्तराज ठिगळे
तासगाव – सुधाकर खाडे
जत – भाऊसाहेब कोळेकर

सोलापूर
सोलापूर शहर (उ) – अनिल व्यास
अक्कलकोट – फारुख शाब्दी
माळशिरस – किरण साठे

सातारा
कोरेगाव – युवराज पवार
माण – धैर्यशील पाटील
कराड (उ) – राजेंद्र केंजळ
कराड (द) – अॅड. विकास पवार
पाटण (द) – रवींद्र शेलार

मराठवाडा
निलंगा – अभय साळुंखे
औसा – बालाजी गिरे
उमरगा – विजय क्षीरसागर
तुळजापूर – अमर कदम
उस्मानाबाद – संजय यादव
परांडा – गणेश शेंडगे
करमाळा – जालिंदर जाधव
मोहोळ – दिपक गवळी

पीएनजीतर्फे ३५ हजारापासून ६ लाखांपर्यंतचे मंगळसूत्र कलेक्शन

0

पी.एन.जी. डायमंडच्या वतीने तीनपदरी सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणे हिर्‍यांचा वापर केलेले विविध कलाकुसरीच्या मंगळसूत्रांचे कलेक्शन बाजारात सादर केले आहे. हे मंगळसूत्र वजनाला हलके, आकर्षक असून त्याची किंमत ३५ हजार ते सहा लाख रुपयांदरम्यान आहे.
हे कलेक्शन प्रसिद्ध मराठी मालिका ‘होणार सून मी ह्या घरची फेम’ सेलिब्रेटी शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी सादर केले. यावेळी पी.एन.जी. डायमंडचे अक्षय गाडगीळ व रोहन गाडगीळ, पद्मिनी गाडगीळ, नुपूर आडकर व कल्याणी गाडगीळ उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना रोहन गाडगीळ म्हणाले, पीएनजीच्या वतीने मंगळसूत्राची चेंजओव्हर पेंडंट डिझाइन केली असून, त्यात मध्यभागी बसवलेला खडा बदलता येतो. ज्या स्त्रियांना मोठय़ा लांबीचे मंगळसूत्र घालायला आवडते, त्यांच्यासाठी पी.एन.जी. डायमंडने ‘डायमंड अटॅचमेंट’च्या स्वरूपात नवी संकल्पना सादर केली आहे. यामध्ये हिर्‍याच्या मंगळसूत्रात काळ्या मण्यांवर भर देण्यात आला असून त्यामुळे ते जास्त आकर्षक दिसते.
ही मंगळसूत्रे पारंपरिक असूनही वापरण्यास सोयीची आहेत. त्यामुळे नोकरदार स्त्रियांना त्याचा चांगल्या प्रकारे वापर करता येईल. हे कलेक्शन पी.एन.जी. डायमंड्सच्या लक्ष्मी रोड, पौड रोड आणि बंड गार्डन येथील दालनांमध्ये उपलब्ध आहे.

रमेश बागवे,विनायक निम्हण,रोहित टिळक,संग्राम थोपटे,हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारीजाहीर

0

उमेदवारी वाटपात काँग्रेस ची बाजी
मुंबई – महायुती आणि आघाडीमधील जागावाटपाचा घोळ सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर तोडग्याची वाट न पाहता ११८ उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने आघाडी घेतली.पुण्यातील ;पुणे कॅन्टोन्मेंट : रमेश बागवे,शिवाजीनगर : विनायक निम्हण,कसबा पेठ : रोहित टिळक,भोर : संग्राम थोपटे आणि इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली आहे . सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी होणार की नाही, याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने बुधवारी रात्री उशिरा आपल्या ११८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने पहिली यादी जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव वाढवला असून अद्यापही १७0 जागांवर उमेदवार जाहीर केलेले नसल्याने राष्ट्रवादीसाठी तडजोडीचे दरवाजे खुले ठेवले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसने या पहिल्या यादीमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (कराड), उद्योगमंत्री नारायण राणे (कुडाळ), पतंगराव कदम (पळूस-कडेगाव), सतेज पाटील (कोल्हापूर दक्षिण), अमित देशमुख (लातूर शहर), सदाशिवराव पाटील (खानापूर), मदन पाटील (सांगली), अशोक निलंगेकर (निलंगा), महेश गणगणे (अकोट), जयवंत आवळे (हातकणंगले), सा.रे. पाटील (शिरोळ) यांच्यासह काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.
बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या अशक्य अटींमुळे आघाडी अशक्य असल्याचे म्हटले होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडीची शक्यता धूसर वाटत होती. काँग्रेस आघाडीमध्ये बुधवारपर्यंत जागावाटपाचा तिढा चालूच होता. राष्ट्रवादी काँग्रेसला १४४ जागा हव्या होत्या. मात्र काँग्रेसला राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव मान्य नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली होती. राष्ट्रवादीनेही सुरुवातीला स्वतंत्रपणे लढण्याची तयारी असल्याचे म्हटले होते. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद देऊन काँग्रेसला एक दिवसाची मुदत दिली होती. मात्र काँग्रेसने राष्ट्रवादीच्या १४४ जागांच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नव्हता.
उमेदवार पुढील प्रमाणे –
कृष्णा हेगडे (विलेपार्ले), नसीम खान (चांदीवली), प्रवीण छेडा (घाटकोपर पूर्व), चंद्रकांत हांडोरे (चेंबुर), कृपाशंकर सिंग (कालिना), बाबा सिद्दीकी (वाद्रे पूर्व), श्रीमती वर्षा गायकवाड (धारावी), जगन्नाथ शेट्टी (सायन कोळीवाडा), कालीदास कोळमकर (वडाळा), मधुकर चव्हाण(भायखळा), अँड़ सुशीबेन शहा (मलबार हिल), अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती अँनी शेखर (कुलाबा), महेंद्र घरट (उरण), रविंद्र पाटील (पेण), मधुकर ठाकुर (अलिबाग), हर्षवर्धन पाटील (इंदापुर), संग्राम थोपटे (भोर), विनायक निम्हण (पुणे – शिवाजीनगर), रमेश बागवे (पुणे कॅन्टोनमेंट), रोहित टिळक (कसबापेठ), बाळासाहेब थोरात (संगमनेर), राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपुर), सत्यजीत तांबे पाटील (अहमदनगर शहर), त्रिंबक भिसे (लातूर ग्रामीण), अमित देशमुख (लातूर शहर), अशोक पाटील निलंगेकर (निलंगा), बसवराज पाटील (औसा), किसन कांबळे (उमरगा), मधुकरराव चव्हाण (तुळजापुर), विश्‍वनाथ चाकोते (सोलापूर शहर उत्तर), कु. प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य), सिद्धराम म्हेत्रे (अक्कलकोट), दिलीप माने (सोलापूर दक्षिण), मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), राजेंद्र देसाई (राजापुर), नारायण राणे (कुडाळ), सतेज पाटील (कोल्हापूर दक्षिण), पी. एन. पाटील (करवीर), सत्यजीत कदम (कोल्हापूर उत्तर), जयंत आवळे (हातकणंगले), प्रकाश आवाडे (इचलकरंजी), अप्पासाहेब एस. आर. पाटील (शिरोळ), मदन पाटील (सांगली), डॉ. पतंगराव कदम (पलुस-केडगाव), सदाशीवराव पाटील (खानापुर). के. सी. पडवी (अक्कलकुवा), पद्माकर वळवी (शहादा), स्वरूपसिंग नाईक (नवाबपुर), धनाजी अहिरे (साक्री), शामकांत सनेर (सिंदखेडा), काशीराम पावरा (शिरपूर), शिरीष चौधरी (रावेर), जोत्स्ना विसपुते (जामनेर), हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), राहुल बोंद्रे (चिखली), दिलीपकुमार सानंदा (खामगाव), महेश गंगणे (अकोट), सय्यद नतीकोद्दीन खतीब (बाळापुर), अमित झनक(रिसोड) विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), यशोमती ठाकुर (तिवसा), केवलराम काळे (मेळघाट), अनिरुद्ध देशमुख (अचलपुर), अमर काळे (आर्वी), रणजित कांबळे (देवळी), सुनील केदार (सावनेर), प्रफुल्ल गुडदे (नागपुर दक्षिण-पश्‍चिम), सतिष चतरुवेदी (नागपुर दक्षीण), अभिजीत वंजारी (नागपुर पुर्व), डॉ. अनेश माजीद अहेमद (नागपुर मध्य), विकास ठाकरे (नागपूर पश्‍चिम), डॉ. नितीन राऊत (नागपुर उत्तर), सुबोध मोहिते (रामटेक), प्रमोद तितीरमारे (तुमसर), सेवक वाघे (साकोळी), गोपालदास अग्रवाल (गोंदिया), रामरतनबापु राऊत (आमगाव), आनंदराव गेडाम (आरमोरी), सगुणा ताळंदी (गडचिरोली), सुभाष धोटे (राजुरा), विजय वडेट्टीवार (ब्रम्हपुरी), अविनाश वारजुरकर (चिमुर), वामनराव कासावार (वणी), प्रो. वसंत पुरके (राळेगाव), विजयराव खडसे (उमरखेड), महादेवराव पवार (हादगाव), डी. पी. सावंत (नांदेड उत्त्तर), ओमप्रकाश पोकर्णा (नांदेड दक्षीण), रावसाहेब अंतापुरकर (देगलुर), हनुमंतराव पाटील (मुखेड), संतोष तर्फे (कळमनुरी), भाऊराव पाटील (हिंगोली), रामप्रसाद बोर्डीकर (जिंतुर), कैलास गोरंट्याल (जालना), अब्दुल सत्तार (सिल्लोड), कल्याण काळे (फुलंब्री), जितेंद्र देहाडे (औरंगाबाद पश्‍चिम), डॉ. राजेंद्र दर्डा (औरंगाबाद पुर्व), डॉ. दिनेश परदेशी (वैजापूर), शेख असीफ शेख रशीद (मालेगाव मध्य), शाहु खैरे (नाशीक मध्य), निर्मला गावीत (इगतपुरी), राजेंद्र गावीत (पालघर), मायकेल फुर्ताडो (वसई), शोएब खान (भिवंडी पश्‍चिम), श्रीमती प्रभात पाटील (ओवळा-माजीवाडा), नारायण पवार (ठाणे), शीतल म्हात्रे (दहीसर), सप्रा चरणसिंग (मुलुंड), राजेश शर्मा (जोगेश्‍वरी पूर्व), राजसंह धनंजय सिंग (दिंडोशी), भारत पारेख (चारकोप), अस्लम शेख (मालाड पूर्व), बलदेव खोसा (वर्सोवा), अशोक जाधव (अंधेरी पूर्व), सुरेश शेट्टी (अंधेरी पश्‍चिम),

भाजप ची ऑफर मी धुडकावली /पक्षातील विरोधकांची मला पर्वा नाही – निम्हण यांचा दावा

0

पुणे -भाजप ची ऑफर मी धुडकावली ,त्यांच्याकडे माझा सामना करु शकेल असा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारच नाही असा दावा करून विद्यमान आमदार विनायक निम्हण हे सायकल फेरी काढून गुरुवारीदि २५ रोजी कॉंग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी किमान 200 सायकलस्वार कार्यकर्ते उपस्थित असतील, अशी माहिती निम्हण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
निम्हण म्हणाले, “”शहरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करून सायकलवरून जाऊन उमेदवारी अर्ज भरणार आहे. सोमेश्‍वर मंदिरातून सकाळी साडेआठ वाजता फेरीस प्रारंभ होईल. मतदारसंघात सर्वत्र फिरून दुपारी दोनच्या सुमारास अर्ज दाखल करणार आहे.‘‘ या निवडणुकीदरम्यान कोठेही शोभेच्या दारूची आतषबाजी करणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.””कॉंग्रेस पक्षाकडून माझी उमेदवारी दोन दिवसांत निश्‍चित होईल, त्या वेळी शहर कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित असतील. उमेदवारी अर्ज भरतानाही कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते येणार आहेत.‘‘
शिवाजीनगरमधून कॉंग्रेसची उमेदवारी मला मिळणार, हे नक्की आहेच; परंतु पक्षाने अन्य कोणालाही उमेदवारी दिली तरी मी कॉंग्रेसचाच प्रचार करणार आहे, असे निम्हण यांनी स्पष्ट केले. उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी करायची, असा माझा विचारही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी भाजप प्रवेशाची चर्चा होती, त्याबाबत ते म्हणाले, “”भाजपमध्ये येण्यासाठी मला “ऑफर‘ होती; परंतु मी गेलो नाही. पक्षात विरोधक आहेत; पण त्यांची पर्वा न करता मी काम करणार आहे. केलेल्या विकासकामांच्या बळावर मतदार मला पुन्हा निवडून देतील यात शंका नाही. भाजपकडे मतदारसंघासाठी उमेदवारही नाही, हेच माझ्या यशाचे गमक आहे.‘‘
कॉंग्रेस भवनमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेस शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मुकारी अलगुडे, बळीराम सावंत, सुरेश कांबळे, शशिकला गायकवाड, कैलास पवार, दुर्योधन भापकर, कमलेश चासकर, रणजित गायकवाड, संगीता कचरे, शहानवाज कर्नळकर, सनी निम्हण आदी उपस्थित होते. मात्र, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि पदाधिकारी अनुपस्थित होते.
याबाबत विचारणा केली असता निम्हण म्हणाले, “”कॉंग्रेस पक्षाकडून माझी उमेदवारी दोन दिवसांत निश्‍चित होईल, त्या वेळी शहर कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित असतील. उमेदवारी अर्ज भरतानाही कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते येणार आहेत.‘‘असेही निम्हण यांनी सांगितले.

दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्सतर्फे ‘अनंतसृष्टी’ गृहप्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे शनिवारी उद्घाटन

0

कान्हे फाटा येथे निसर्गरम्य परिसरात साकारलेला भव्य प्रकल्प
पुणे, दि. २४ सप्टे : ‘अनंतसृष्टीच्या पहिल्या (फेज १) आणि दुसऱ्या टप्प्याच्या (फेज २) यशस्वीतेनंतर ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’तर्फे ‘अनंतसृष्टी’च्या तिसऱ्या (फेज ३) टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. कान्हे फाटा परिसरातील निसर्गरम्य वातावरणामध्ये, ३५ एकरच्या परिसरामध्ये वसलेल्या फेज ३ प्रकल्पाचा शुभारंभ येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. यावेळी फ़्लॅट बूक करणाऱ्यांना स्व. दाजीकाका गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’तर्फे १ लाख रुपयांपर्यंतचे ‘पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स’चे वाऊचर भेट म्हणून देण्यात येणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास ‘पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स’ तसेच ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ हे उपस्थित राहणार आहेत, ‘पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स’च्या संचालिका वैशाली गाडगीळ, ‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’च्या संचालिका राधिका गाडगीळ, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल ताविलदार व प्रसिद्ध बांधकाम विषयक लेखक आणि ब्लॉगर रवी करंदीकर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने कान्हे फाटा येथे २७ आणि २८ सप्टेंबरला विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. अनंतसृष्टीच्या या प्रकल्पास भेट देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’च्या मॉडेल कॉलनी येथील कार्यालयातून, खास वाहन व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याठिकाणी निसर्गरम्य परिसराच्या अनुभवाबरोबरच सँपल फ़्लॅट, शो फ़्लॅट व प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, अल्पोपहाराचीही सोय करण्यात आली आहे.
प्रमुख माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्या, अनेक महत्त्वपूर्ण उत्पादन उद्योग व नामवंत शैक्षणिक संस्था असणाऱ्या तळेगाव-कान्हे फाटा भागामध्ये निसर्गाच्या सहवासात ‘अनंतसृष्टी’ हा प्रकल्प वसलेला आहे. क्लब हाउस, प्रशस्त मोकळी जागा आणि पुणे-मुंबई महामार्गाशी कनेक्टीव्हिटी हे अनंतसृष्टीचे वेगळेपण आहे. आजूबाजूला रुंद व मोकळे रस्ते आणि सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असा ‘अनंतसृष्टी’ प्रकल्प गुंतवणूकदारांसाठीसुद्धा एक सुवर्णसंधी आहे. थोडक्यात, ‘अनंतसृष्टी म्हणजे निसर्ग व अत्याधुनिक सुखसोयी यांचा सुंदर मिलाफ आहे.

मुंडेंच्या मृत्यूचा मुद्दा बनणार निवडणुकीचा मुद्दा?

0

मुंबई- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूबाबत केंद्र सरकारने मुंडेंच्या मृत्यूची चौकशी सीबीआयद्वारे केली पाहिजे अशी भूमिका राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी मांडली. ते म्हणाले , राज्याच्या लोकांत आजही अनेक शंका आहेत. ती शंका दूर करण्यासाठी व लोकांच्या भावनांची दखल घेत केंद्र सरकारने मुंडेंच्या मृत्यूची चौकशी सीबीआयद्वारे केली पाहिजे यामुळे मुंडेंच्या मृत्यूचा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा बनणार काय याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
काँग्रेसने राष्ट्रवादीला देऊ केलेल्या 128 जागांबाबत पक्ष असमाधानी आहे. तसेच राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळालेच पाहिजे अशी जोरदार फटकेबाजीही पाटील यांनी केली. जयंत पाटील एका वृत्तवाहिनीवर बोलत होते.जयंत पाटील पुढे म्हणाले, काँग्रेसने राष्ट्रवादीला 128 जागा देऊ केल्या आहेत. त्यापेक्षा अधिक जागा दिल्या पाहिजेत. राष्ट्रवादीची राज्यात मोठी ताकद आहे. 2004 साली राज्यातील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी बनला. तरीही काँग्रेसला आम्ही आग्रहास्तव मुख्यमंत्री दिले. समविचार पक्षांनी एकत्र राहावे व धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आम्ही काँग्रेससोबत 15 वर्षापासून राहिलो. गेली 15 वर्ष काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा जो प्रस्ताव ठेवला आहे तो योग्य आहे. आताही काँग्रेससोबत आघाडी व्हावी अशी राष्टवादीची इच्छा आहे. मात्र काँग्रेस चर्चेलाच तयार नाही. चर्चा केली नाही तर प्रश्न कसा सुटणार आणि आमचे म्हणणे कसे पटवून सांगणार असे जयंत पाटील यांनी सवाल उपस्थित केला.

बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विसर्जन

0

q1

पुणे: राष्ट्रीय कला अकादमी आणि सुयोग मित्र मंडळाच्या वतीने सर्वपित्री अमावस्येनिमित्त बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विधिवत पूजन करुन आज संगम घाटावर विसर्जन करण्यात आले.
बेवारस मृतदेह तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस ससूनच्या शवागारात ठेवता येत नाहीत, त्यानंतर कैलास स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत त्यांचे दहन केले जाते. अस्थींचे एक महिना जतन केले जाते. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांना मृतदेह ताब्यात मिळाला नाही, तरी किमान अस्थी मिळण्याची सोय होते. ओळख न पटलेल्या मृतदेहांच्या अस्थींचे दर महिन्याच्या अमावस्येला विसर्जन केले जाते. गेली तीन वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरु आहे.
मंदार रांजेकर, विजय बढे, मुकेश खामकर, नीलेश राखुंडे, पराग कानिटकर, सदाशिव कुंदेल, अक्षय माने यांनी संयोजन केले. महापालिकेचे आरोग्य अधिकारी दत्तात्रय महाडीक, धर्मेंद्र लांडगे यांचे विशेष सहकार्य लाभले.

दिलीप वळसे पाटील उद्या भरणार उमेदवारी अर्ज

0

घटस्थापनेच्या मुहूर्तावर आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील गुरुवारी (दि. २५) घोडेगाव येथे दुपारी १ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी मंचर येथील बाजार समितीच्या आवारात सकाळी ११ वाजता जाहीर सभा होणार आहे. नेत्याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गावोगाव मोढा (काम बंद) पाळून ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे जाहीर सभेसाठी आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत.
उद्या गुरुवारी सकाळी ९ वाजता अवसरी खुर्द येथे भैरवनाथ मंदिरात श्री काळभैरवनाथ देवाचे दर्शन घेऊन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यानंतर मंचर बाजार समितीच्या आवारात त्यांची जाहीर सभा होणार आहे. जाहीर सभेला जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांनी सभेसाठी जय्यत तयारी केली आहे. त्यादृष्टीने मोठय़ा संख्येने ग्रामस्थ सभेत आपल्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात मात्र पाण्याचा सुकाळ अनुभवलेले शेतकरी नेत्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहणार आहेतअसे कार्यकर्ते सांगत आहेत सभा संपल्यानंतर घोडेगाव येथे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ढोल, लेजीम, ताशे इत्यादी पारंपरिक वाद्यांच्या साक्षीने वाजत गाजत ते जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय आंबेगाव-शिरूर मतदारसंघात असणे शक्यच नाही, असा कार्यकर्त्यांचा दावा आहे

भयंकर पुरातही जन्माला आली ३५०० बालके

0

श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील भयंकर पुरामुळे २५0 लोकांचा बळी गेला असला तरी येथील सरकारी रुग्णालयांत अशा कठीण प्रसंगातही ३ हजार ५00 बालकांनी सुखरूप जन्म घेतल्याची सुखद माहिती पुढे आली आहे. ४ ते २0 सप्टेंबरदरम्यान काश्मीरच्या विविध रुग्णालयांत जवळपास २ हजार ३00 बालकांनी नैसर्गिकपणे, तर १ हजार २६0 बालकांनी शस्त्रक्रियेद्वारे जन्म घेतला, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. २0 सप्टेंबर रोजी संपलेल्या पंधरवड्यात संपूर्ण काश्मीर खोर्‍यातील जिल्हा रुग्णालयांत सुमारे ५ लाख ७७ हजार ५९५ रुग्ण आले होते. त्यातील ३४ हजार ६00 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी १ हजार ४३५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली, तर १ लाख ३ हजार १६0 रुग्णांची प्रयोगशाळा चाचणी करण्यात आली, असेही या अधिकार्‍याने स्पष्ट केले. पूरस्थितीदरम्यान स्थापन करण्यात आलेल्या १४५ वैद्यकीय शिबिरे स्थापन करण्यात आली. यापैकी ६२ शिबिरे श्रीनगरमध्ये लावण्यात आली होती.

रस्ते धोरणामुळे सिमेंट कंपन्यांची होणार भरभराट

0

q
नवी दिल्ली : देशातील सर्व प्रमुख रस्ते डांबराऐवजी सिमेंटचे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे देशात सिमेंटच्या मागणीत प्रचंड वाढ होवून सिमेंट कंपन्यांची भरभराट होणार आहे रेल्वे प्रकल्पाविषयी केंद्र सरकारने आपले धोरण बदलले आहे. सरकारच्या धोरणातील बदलामुळे देशातील सिमेंट कंपन्यांचे मात्र फावणार आहे. नव्या धोरणानुसार आता देशातील सर्व प्रमुख रस्ते डांबराऐवजी सिमेंटचे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे देशात सिमेंटच्या मागणीत प्रचंड वाढ होईल. या पार्श्‍वभूमीवर सिमेंट उत्पादन व्यवसायातील कंपन्यांची भरभराट होणार आहे. तसेच आता मान्सून देखील संपला असल्यामुळे सिमेंटच्या मागणीत वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. परिणामी, सिमेंट कंपन्यांचा नफा वाढण्याच्या अपेक्षेने त्यांचे शेअर्स वधारण्याची शक्यता आहे.
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ऐतिहासिक घोषणा करताना देशातील राष्ट्रीय राजमार्ग सिमेंटचे करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मजबूत, स्वस्त आणि टिकाऊ राजमार्ग मिळू शकतील. डांबराच्या तुलनेत सिमेंटचे हायवे २0-२५ टक्के स्वस्त असतील. गडकरी यांनी पर्यायी इंधनावर धावणार्‍या वाहनांच्या माध्यमातून पर्यावरण वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. अशा वेळी पाऊस लवकर समाप्त होण्याचे संकेत मिळाले असून देशात बांधकाम हंगाम लवकरच सुरू होऊन सिमेंटच्या मागणीत वाढ होणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासही वाव मिळणार आहे.

पुणे नवरात्रौ महोत्सव गुरुवार दि. २५ पासून

0

laxmi mata - 2
पुणे:
कला, संस्कृती, गायन, वादन आणि नृत्य यांचा मिलाफ असणार्‍या व पुणेकरांच्या नवरात्र महोत्सवाचे खास आकर्षण असणार्‍या ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’ला २५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती उपमहापौर व महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागूल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवानिमित्त यंदाचा श्री लक्ष्मीमाता कला संस्कृती पुरस्कार दै. पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे (पत्रकारिता), अभिनेते अनंत जोग (चित्रपट), प्रकाश मोहन मुलाबागल (उच्च शिक्षण), दीपाली सय्यद (लावणी), डॉ. नितीन बोरा (सामाजिक क्षेत्र), मोतीलाल निनारिया (सामाजिक) यांना प्रदान करण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
महोत्सवाचे यंदा २0 वे वर्ष असून, येत्या गुरुवारी या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. महोत्सवाचे उद््घाटन गणेश कला क्रीडा मंच येथे दि. २५ रोजी सायं, पाच वाजता अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आ. उल्हास पवार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी खासदार सुरेश कलमाडी, आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे, अभय छाजेड, कमल व्यवहारे, मनपा आयुक्त कुणाल कुमार आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
दहा दिवस चालणार्‍या या महोत्सवातील कार्यक्रमांची माहिती देताना बागूल म्हणाले की, घटस्थापनेच्या दिवशी सकाळी ७.३१ वाजता श्री लक्ष्मीमाता मंदिरात घटस्थापना होणार आहे. यावेळी मंदिराचे सुशोभिकरण फुलांच्या माळांनी व आक र्षक विद्युत रोषणाईने करण्यात येणार आहे. याच दिवशी विविध क्षेत्रांतील व्यक्तींना कला संस्कृती पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
महोत्सवाच्या आयोजनात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागूल, सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख राजेंद्र बागूल व राजेंद्र बडगे यांचा पुढाकार आहे. महोत्सवाच्या उद््घाटन समारंभाचे निवेदन सुधीर गाडगीळ करणार असल्याचे महोत्सवाचे सदस्य अमित बागूल नंदकुमार बानगुडे यांनी सांगितले.

कौशल्या रामचंद्र बिडकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0

r

पुणे कॅम्प भागातील गवळी वाडा भागातील कौशल्या रामचंद्र बिडकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्या ९० वर्षांच्या होत्या . त्यांच्यामागे चार मुले , चार मुली , सुना , जावई , नातवंडे , पणतू असा परिवार आहे . त्यांच्यावर गंज पेठमधील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . भोपळे चौकातील रामकिसन डेअरीचे मालक हिरामण रामचंद्र बिडकर यांच्या मातोश्री होत्या व तसेच वृत्तपत्र छायाचित्रकार मनोज बिडकर यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या अंत्यसंस्कार समयी वीरशैव लिंगायत गवळी समाजबांधव आणि समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होते . (महेश जांभूळकर न्यूज )

पुणे जिल्हास्तरीय हज कमिटीच्या सदस्यपदी नदीम मुजावर यांची नियुक्ती

0

q

पुणे – पुणे जिल्हास्तरीय हज कमिटीच्या सदस्यपदी नदीम मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रालयाचे मंत्री आरिफ (नसीम ) खान दिली .

नदीम मुजावर हे पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तसेच , महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष आहेत . या दोन्ही पदाच्या माध्यमातून त्यांनी अल्पसंख्याक समाजबांधवांचे प्रश्न सोडविले आहेत

हज यात्रेकरुंसाठी सर्वोपतरी मदत करणार , हज यात्रेकरूच्या समस्या सोडविणार असल्याचे त्यांनी आपल्या नियुक्तीनंतर सांगितले .

मुख्यमंत्रीपदापेक्षा जनतेचं प्रेम मला महत्त्वाचं……

0

q
“मला मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा नाही, “निवडणुकांच्या तोंडावर मला आशिर्वाद देण्यासाठी आणि शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी वारकरी ‘मातोश्री’वर आले.यांच्यासारख्यांचं प्रेम आणि आशिर्वाद हे माझ्यासाठी पुरेसे आहेत. मला मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा नाही”,मुख्यमंत्रीपदापेक्षा जनतेचं प्रेम मला महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले
महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी वारकऱ्यांच्या या शिष्टमंडळाने ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.यावेळी ते बोलत होते , ते म्हणाले ,सध्या प्रत्येकजण मुख्यमंत्रीपदासाठी लढताना दिसत आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा मुकुट माझ्या डोक्यावर नको,
अशी माझी इच्छा आहे. पण मी मुख्यमंत्री व्हावं, ही लोकांची इच्छा आहे. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान मानतो. त्यांचं हेच प्रेम माझ्यासाठी सर्वस्व आहे,
असंही उद्धव यांनी यावेळी नमूद केलं.“शिवसेना आणि वारकऱ्यांचा विचार एक आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेला पाठिंबा देत आहोत”, असं यावेळी वारकऱ्यांनी सांगितलं.

सत्य आणि चांगुलपणाचा ‘राखणदार’ २६ सप्टेंबर ला

0

q

देवाच्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही, इथपासून जगात खरंच देव आहे का, इथपर्यंत वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं आपल्या अवतीभवती बघायला मिळतात. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या न्यायाने देवाच्या अस्तित्वाचे पुरावे मागणारे नास्तिक असोत वा हवा जशी दिसत नाही, पण ती असते, तसाच देवही दिसत नाही, पण तो असतो, असं मानणारे आस्तिक असोत, दोघेही आपापल्या जागी योग्यच असतात. पण या प्रश्नांच्या गुंत्यापलिकडे जात एका प्रेमकथेच्या माध्यमातून देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा अनोखा प्रयत्न निर्माता दिग्दर्शक डॅा. मृणालिनी पाटील यांनी ‘राखणदार’ या चित्रपटातून केला आहे.

‘कगार’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती आणि ‘मंथन एक अमृत प्याला’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केल्यानंतर डॅा. मृणालिनी पाटील यांनी ‘राखणदार’ची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते चित्रपटाच्या संगीताचं अतिशय थाटात अनावरण मुंबईत करण्यात आलं. त्याप्रसंगी चित्रपटातले प्रमुख कलावंत तसेच तंत्रज्ञ उपस्थित होते. यावेळी चित्रपटाच्या ट्रेलरचंही अनावरण करण्यात आलं.

सदानंद हा एक अतिशय साधा आणि प्रामाणिक मुलगा त्याच्या साधेपणामुळेच वारंवार अडचणीत सापडतो. अडचणीतून बाहेर पडण्याचे मार्गही त्याला गवसतात. पण प्रत्येक टप्प्यावर त्याच्याही नकळत एक दैवी शक्ती त्याला मदत करत असते. अर्थात तो तिला ओळखण्यात कमी पडतो. ती दैवी शक्ती वेळोवेळी त्याची सत्वपरीक्षाही घेते. अखेरीस सदानंदला या दैवी शक्तीची प्रचीती येते का, देवाला ओळखण्यात तो यशस्वी ठरतो का, हे ‘राखणदार’मध्ये बघायला मिळणार आहे.

आपण आयुष्यभर देव, देव करत राहातो, मंदिरांमध्ये देवाचा शोध घेत राहातो, पण अवचितपणे समोर येऊन उभ्या ठाकलेल्या देवाला ओळखण्यात मात्र कमी पडतो, हे ‘राखणदार’चं सूत्र आहे. अजिंक्य देव, जीतेंद्र जोशी, अनुजा साठे यांच्या प्रमुख भूमिका असून यतीन कार्येकर, सतीश पुळेकर, रवींद्र महाजनी, हंसराज जगताप आणि अनुप चौधरी यांनी त्यांना भक्कम साथ दिली आहे. आनंद मोरे लिखित या चित्रपटाचं छायालेखन जहांगीर चौधरी यांनी केलं असून फ. मु. शिंदे आणि प्रकाश राणे लिखित गीतांना कनकराज आणि समीर फातर्पेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे.

‘राखणदार’ २६ सप्टेंबर रोजी राज्यभरात प्रदर्शित होत आहे.