Home Blog Page 3618

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी ‘कोर्ट ‘ ने मारली बाजी

0

पहा या चित्रपटाचा  ट्रेलर

नवी दिल्ली-६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारत अनेक पुरस्कार पटकवलेत. ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट, ‘किला’ या मराठी चित्रपटाला विशेष उल्लेखनीय चित्रपटाचा पुरस्कार आणि रवी जाधव यांच्या ‘मित्रा’ ला बेस्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

नारायण राणेंना पाठींबा नाही -आणि वांद्रे पोटनिवडणूक लढविणारही नाही -मनसे

0

मुंबई-वांद्रे पोटनिवडणुकीसाठी नारायण राणेंना पाठींबा देण्या ऐवजी तटस्थ रहाण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे . त्यामुळे स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही पाठिंबा मिळवण्याचा काँग्रेस नेते नारायण राणेंचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तत्वाचा मुद्दा पुढे करून राणेंना पाठिंबा देण्यास नकार दिलाय.भाजपा नाही आणि मनसे नाही त्यामुळे आता थेट राणे विरुध्द शिवसेना अशी लढत होणार आहे ज्यामध्ये एमआयएम ने दिलेला उमेदवार आणि एमआयएम ची भूमिका निर्णयांक ठरण्याची चिन्हे आहेत . वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाचीच लढाई आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आमदार बाळा सावंत यांनी तिथे दोनदा भगवा फडकवला. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे आणि त्याच्या पत्नी तृप्ती सावंत यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. असं असतानाही, शिवसेनेला ‘जोर का झटका’ देऊन आपली ताकद दाखवण्याचा निर्धार कट्टर प्रतिस्पर्धी नारायण राणेंनी केला आहे. त्यामुळे हा सामना भलताच लक्ष्यवेधी आणि रंगतदारठरतो आहे. राणेंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणेंनी राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवला आहे. त्यासाठी परवाच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती आणि उमेदवार न देण्याची विनंती केली होती. त्यानंतर, भाजपनंही वांद्र्यात उमेदवार न देण्याचं जाहीर केलं होतं. शिवसेना विरुद्ध राणे यांच्यात काँटे की टक्कर होण्याची चिन्हं दिसत होती. परंतु, मुस्लिम मतदारांची मोठी संख्या असलेल्या या मतदारसंघात एमआयएमनं सिराज खान यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना, भाजपच्या खालोखाल त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यामुळे राणेंच्या अडचणी वाढल्यात. मुस्लिम मतं एमआयएमकडे जाण्याची दाट शक्यता असल्यानं राणेंसाठी एकेक मत मोलाचंहोईल असे बोलले जाते आहे. दरम्यान नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नीतेश राणे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. आमचे कौटुंबिक संबंध असल्याने मी राज ठाकरे यांची भेट घेतली. जातीयवादी शक्तींच्या विरोधात लढणाऱ्या धर्मनिरपेक्ष शक्तींचा विजय व्हावा, यासाठी आम्ही राज ठाकरे यांचा पाठिंबा मागितला आहे. परंतु, राज यांनी राणेंना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. आजारपण वा अपघातात विरोधी पक्षाच्या सदस्याचे निधन झाल्यास संबंधित ठिकाणी निवडणूक न लढविण्याचे आमचे धोरण आधीपासूनच ठरलेले आहे. त्यामुळे अशा वेळी कोणाला पाठिंबा देणे हे आमच्या धोरणांशी प्रतारणा केल्यासारखे होईल, असं राज यांनी स्पष्ट केलंय. मनसेचा हा पवित्रा राणेंसाठी किंवा शिवसेनेसाठी फायद्याचा ठरणार हे मतदानानंतर-निकालानंतरच स्पष्ट होणार आहे

अल्पसंख्यकांबाबतचा केंद्राचा दृष्टीकोन चुकीचा : खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण

0

पुणे :

‘मोदी सरकारने निवडून आल्यावर अल्पसंख्यकांबाबत बाळगलेला दृष्टीकोन चुकीचा असून, चर्च वरील हल्ले, ननवरील हल्ले, मदर तेरेसांविषयी उद्गार यातून हा दृष्टीकोन व्यक्त होत आहे, अशी टीका ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी आज केली.

आज त्या ख्रिश्‍चन समुदायाच्या पुण्यात निघालेल्या मोर्चात सहभागी झाल्या. त्यानंतर पत्रकाद्वारे त्यांनी आपल्या या विषयावरच्या भावना व्यक्त केल्या.

मोदी सरकार सत्तेत आल्यावर जातीयवादी शक्तींना बळ मिळाले आहे. पंतप्रधान मोदींचा मूक पाठिंबा या शक्तींना असल्याचे चित्र दिसत आहे हे दुर्देवी आहे. अल्पसंख्यकांच्या विकासाबात सरकारकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. सर्वधर्म समभाव हे लोकशाहीतील महत्त्वपूर्ण मूल्य असून, त्याकडे हे सरकार दुर्लक्ष करीत आहे, हे चुकीचे आहे, असे खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे.

सोमनाथ महाराज चौधरी (आळंदी) यांना ‘वारकरीभूषण’ पुरस्कार

0

पुणे :

हिंजवडी – माण या माहिती-तंत्रज्ञान नगरीत असलेल्या भव्य विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा पाचवा वर्धापन दिन गुरुवार, दि. 26 मार्च 2015 रोजी साजरा होत असून, यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सोमनाथ महाराज चौधरी (आळंदी) यांना ‘वारकरी भूषण’ पुरस्कार जाहीर केला आहे.

26 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता होणार्‍या कार्यक्रमात ‘राष्ट्रीय समाज पक्षा’चे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती समितीच्या वतीने बाळूमावशी धुमाळ यांनी दिली.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये (माण (गवारेवाडी), बापूजीबुवा मंदिराजवळ, विठ्ठल रुखुमाई मंदिर, ता.मुळशी, जि.पुणे) वर्धापनदिनानिमित्त काकड आरती, होमहवन, हरिपाठ, महाप्रसाद, संगीत भजन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

0
पुणे – पुण्यभूषण फाउंडेशनचा यंदाचा “पुण्यभूषण पुरस्कार‘ “सकाळ‘चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना जाहीर झाला आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी या पुरस्काराची घोषणा केली. नांगराच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजीची प्रतिकृती व एक लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. 
सामाजिक, पत्रकारिता; तसेच उद्योग क्षेत्रात गेल्या सुमारे चाळीस वर्षांपासून पवार कार्यरत आहेत. त्यांना गेल्या वर्षी “पद्मश्री‘ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. इंडियन न्यूज पेपर सोसायटीचे अध्यक्षपद; तसेच वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्सचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. भारत फोर्ज, फोर्स मोटार्स, किर्लोस्कर ऑइल इंजिन, फिनोलेक्‍स केबल या कंपन्यांच्या संचालक मंडळावर पवार काम करीत आहेत. 
विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या विद्यार्थी सहायक समितीवर ते 1981पासून विश्‍वस्त म्हणून काम करीत आहेत. पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड, बालग्राम, किर्लोस्कर फाउंडेशन, पुणे बालकल्याण संस्था, डॉ. नानासाहेब परुळेकर चॅरिटी ट्रस्ट, सकाळ इंडिया फाउंडेशन यांसह सुमारे बारा संस्थांवर पवार पदाधिकारी आहेत. पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार, पारखे उद्योजकता पुरस्कार यांसारखे विविध पुरस्कार पवार यांनी मिळाले आहेत

शिवसेनेत मानसन्मान नाही -वाडेकर स्वगृही …

0

पुणे -विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे नाराज होऊन शिवसेनेत गेलेले रिपब्लिकन पक्षाचे माजी शहराध्यक्ष परशुराम वाडेकर पुन्हा स्वगृही परतणार आहेत.शिवसेनेत मानसन्मान मिळत नसल्याने ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेऊन वाडेकर यांनी पुन्हा पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी मी पहिल्यापासून मनाने ‘आरपीआय’मध्येच होतो. आंबेडकरी विचारांचा पगडा मनावर असल्याने शिवसेनेत मन लागत नव्हते. त्यामुळे पुन्हा ‘आरपीआय’मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते रामदास आठवले यांच‌ी भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे. असे परशुराम वाडेकरयांनी स्पष्ट केले आहे
विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पडल्याने ‘आरपीआय’च्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या निवडणुकीच्या काळात वाडेकर यांनी विधानसभेचे तिकीट मिळण्यासाठी ‘आरपीआय’ला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश करून सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होत‌ी. त्यामध्ये त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. निवडणुकीनंतर शिवसेनेच्या शहर कार्यकारिणीमध्ये त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात न आल्याने ते नाराज होते. त्यांनी पुन्हा आपल्या जुन्या घरी, ‘आरपीआय’मध्ये येण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी पक्षाचे अध्यक्ष आठवले यांची भेट घेतली.
आठवले यांनी त्यांना ‘कामाला लागा,’ अशा सूचनाही दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मुंबई येथे जाऊन वाडेकर यांनी आठवले यांची भेट घेतली. त्या वेळी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, अशोक शिरोळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अबब तब्बल ९ दिवस बॅंकाना सुट्ट्या … बोंबला …

0

या दिवशी राहतील बॅंक बंद
28 मार्च- रामनवमी
29 मार्च- रविवार
30 मार्च- बॅंक उघडेल
31 मार्च- आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस. यामुळे बॅंक ग्राहकांची कामे करु शकणार नाही.
1 एप्रिल- वार्षिक क्लोजिंग
2 एप्रिल- महावीर जयंती
3 एप्रिल- गुड फ्रायडे
4 एप्रिल- महिन्याचा पहिला शनिवार असल्याने अर्धा दिवस काम.
5 एप्रिल- रविवार

अभिनेता शशी कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर जाहीर

0
मुंबईः हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा अभिनेता शशी कपूर यांना जाहीर झाला आहे.  शशी कपूर यांनी 175 हून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनेत्यासोबतच ते दिग्दर्शक आणि निर्मातेसुद्धा आहेत. स्वर्णकमळ, शाल आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचे स्वरुप आहे.
शशी कपूर यांचे खरे नाव बलवीर राज कपूर असे आहे. प्रख्यात अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्या घरी त्यांचा जन्म झाला. आपल्या वडील आणि भावांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावले. 1940च्या दशकात त्यांनी आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. अनेक धार्मिक सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका वठवल्या.
शशी कपूर यांनी मुंबईतील डोन बोस्की स्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. उन्हाळ्याच्या सुटीत त्यांचे वडील त्यांना स्टेजवर अभिनय करण्यासाठी प्रोत्साहन देत असे. पुढे त्यांना त्यांचे थोरले भाऊ राजकपूर यांनी ‘आग’ (1948) आणि ‘आवारा’ (1951) या सिनेमांमध्ये अभिनय करण्याची संधी दिली. ‘आवारा’ या सिनेमात त्यांनी राजकपूर यांच्या बालपणीचे पात्र साकारले होते. 50च्या दशकात ते वडिलांच्या सल्ल्यावरुन शेक्स्पियाराना या थिएटर ग्रुपमध्ये सामील झाले. या ग्रुपसोबत त्यांनी जगभराची सफर केली. शशी कपूर यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही आपला हात आजमावला.
शशी कपूर यांना 2011मध्ये ‘पद्मभूषण’ या तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. शशी कपूर यांनी दिवार, कभी कभी, सत्यम शिवम सुंदरम, नमक हलाल या चित्रपटातील अभिनयातून त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना दमदार अभिनयासाठी तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले आहेत.
यापूर्वी प्रख्यात सिनेदिग्दर्शक सत्यजीत रे, अभिनेता देवआनंद, दिग्दर्शक-निर्माता यश चोप्रा, दिवंगत अभिनेते प्राण आणि गीतकार गुलजार यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

‘स्माईल’च्या ‘चेंजमेकर्स’उपक्रमात 125 गटांचा सहभाग

0
पुणे :
‘स्वत:मध्ये आणि आपल्या सभोवतालामध्ये बदल, परिवर्तन घडवून आणण्याची महिलांची, नागरिकांची शक्ती लक्षात घेवून त्यातून स्थानिक पातळीवर व्यापक बदल घडविण्यासाठी ‘चेंजमेकर्स’ या ‘लोकल एरिया मॅनेजमेंट’ उपक्रमाला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘स्माईल’च्या ‘चेंजमेकर्स’ उपक्रमात 125 गटांनी सहभाग घेतला. पुण्याच्या वेगवेगळ्या भागात महिला गटांच्या सामाजिक प्रकल्पांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला’ अशी माहिती ‘स्माईल’च्या संस्थापक आणि खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
या उपक्रमामुळे महिलांमध्ये, नागरिकांमध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्‍वास वाढला. स्थानिक पातळीवर व्यापक बदल घडविण्यासाठी महिलांना-नागरिकांना कार्यरत करणार्‍या ‘चेंजमेकर्स’ या ‘लोकल एरिया मॅनेजमेंट’ उपक्रमाचा जागतिक पर्यावरण दिन दि. 5 जून 2014 रोजी शुभारंभ करण्यात आला होता.
या उपक्रमातंर्गत पुण्यातील मोहल्ल्यांमध्ये किमान 5 व्यक्तिंची ‘लोकल एरिया मॅनेजमेंट’ समिती स्थापन करण्यात आली असून, या गटाची प्रमुख एक महिला होती . या पाच सदस्यांमध्ये 3 महिलांचाही सहभाग होता. परिसरातील छोट्या-मोठ्या गोष्टींमधील समस्या निवारण करण्यासाठी व एकात्मता वाढविण्यासाठी योगदान दिले. कचरा वर्गीकरण, शक्य असेल तिथे गांडूळ खत प्रकल्प सुरू करण्यास पुढाकार घेणे, वीज-पाणी-इंधन बचतीसाठी जनजागृती करणे, पर्यावरणपूरक पद्धतीने सण उत्सव साजरे करणे, यासाठी शालेय व महाविद्यालयीन वर्ग, ज्येष्ठ व स्थानिक मंडळे यांना प्रोत्साहीत करून या उपक्रमात त्यांचा सहभाग घेणे, आरोग्य शिबीरांचे आयोजन महिला सक्षमीकरण कार्यक्रमांचे आयोजन हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते. हा उपक्रम स्पर्धात्मक होता.
वृक्षारोपण, परिसर सुशोभिकरणापासून सामाजिक समस्यांवरील उपक्रमांत या महिला आणि नागरिक अन्य 100 घरांपर्यत जागृतीसाठी पोहोचले. नागरिकांच्या श्रमदानातून व महापालिकेच्या सहकार्यातून तो परिसर स्वच्छ व सुंदर करणे, यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची कार्यवाही करण्यात आली.
खा.वंदना चव्हाण म्हणाल्या,‘जगातील अनेक शहरांप्रमाणेच आपल्या पुणे शहराचे देखील वेगाने नागरिकरण होत असताना आपण पहात आहोत, तसेच त्यामुळे खालावत असलेला जीवनमानाचा स्तरदेखील अनुभवत आहोत. शहरातील गतिमान जीवनशैलीमुळे आपण अनेक समस्यांना नकळत आमंत्रण दिले आहे. वाहतुकीची कोंडी, वाढते प्रदूषण, कचरानिर्मिती त्यामुळे होणारे सार्वजनिक आरोग्याचे गंभीर प्रश्‍न, फोफावलेली गुन्हेगारी, बेलगाम बांधकामे, वनराईचा र्‍हास या व अशा अनेक समस्या इतर शहरांप्रमाणेच पुण्यालादेखील भेडसावत आहेत. नागरिकरणाचा जीवसृष्टिवरच अनिष्ट परिणाम होत आहे, तसेच आपल्या भावी पिढ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होणार आहे, होत आहे या परिस्थितीत बदल करायला हवा, ही जाणीव आहे आणि त्यासाठी काहीतरी करण्यासाठीच ‘चेंज मेकर्स’ हा कार्यक्रम आखला आहे.
या उपक्रमाला पुणे महानगरपालिकेचे सहकार्य लाभले आहे. बुधवार, दिनांक 25 मार्च रोजी दुपारी 12.00 वाजता बालगंधर्व रंगमंदीर येथे या उपक्रमातील स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील विविध भागांत नागरिकांचे गट तयार करून निवडलेल्या परिसरातून विकास घडविण्यासाठी पुढाकार घेऊन चांगले उपक्रम परिसरात राबविण्यासाठी ‘चेंज मेकर्स’ च्या या उपक्रमात सहभागी झालेल्या महिला पुण्यातील सिंहगड रस्ता, सहकारनगर, वारजे- कर्वेनगर, पर्वती, बिबवेवाडी, भवानी पेठ, कोंढवा -वानवडी परिसर या विभागातील होत्या.
  चेंजमेकर्सच्या उपक्रमा अंतर्गत महिलांसाठी अनेक कार्यशाळा घेण्यात आल्या. यामध्ये महिलांना गटप्रशिक्षण, गट प्रमुखांची निवड कशी करावी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावे लागते, स्वत:मध्ये नेतृत्व गुण विकसित करणे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले होते. विविध उपक्रमांची माहिती ‘स्लाईड शो’ द्वारे देण्यात आली होती. ‘चेंजमेकर्स’च्या प्रमुख समन्वयक नीला विद्वांस आणि त्यांच्या सहाय्यक संजिवनी जोगळेकर व प्रदीप्ता कुलकर्णी यांनी या उपक्रमासाठी समन्वयक म्हणून काम पाहिले.
‘छोटी छोटी पावले मोठे बदल घडवून आणतात, यावर विश्‍वास असणार्‍या नागरिकांसाठी ‘चेंजमेकर्स’ हे एक उत्तम व्यासपीठ आहे. आपण बदल घडवू शकतो, याचा अनुभव या उपक्रमात सहभागी झालेला प्रत्येक महिलेने आणि नागरिकांनी अनुभवले. सरकारच्या बरोबरीने प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्थानिक पातळीवर पाऊले उचलणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे हा उपक्रम पुण्यात सुरू केला, असेही खा.वंदना चव्हाण यांनी सांगितले.

फुल२टाइमपास…म्युझिक लाँच” सोहळा दिमाखात

0

2

झी टॉकजकडून आयोजत केलेला फुल२टाइमपास हा भव्य दिव्य सोहळा पुण्याच्या कला-क्रिडा संकुलात मोठ्या जल्लोषात पार पडला. याच सोहळ्याचे औचित्य साधत सध्याचा सगळ्यात चर्चेत असलेला चित्रपट  “टाईमपास २” चा म्युझिक  लाँच” सोहळासुध्दा दिमाखात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत हा म्युझिक  लॉंच चा सोहळा संपन्न झाला. नटरंग‘, ‘बालक-पालकयासारखे दर्जेदार आणि  वेगया धाटणीचे चित्रपट देणार्या प्रतिथयश दिग्दर्शक रवी जाधव यांच्या  ‘टाइमपासया चित्रपटाने चित्रपटसृष्टित एक नवा अध्याय सुरु केला आहे. वेगळ्या प्रकारचे कथानक, धमाल संवाद, उकृष्ट संगीत यांनी या चित्रपटाला चार चांद लावले. टाइमपासचित्रपटाच्या धमाकेदार यशानंतर लगेचच टाईमपास २ ची घोषणा केली गेली होती. या वेळेपासूनच समाजाच्या प्रत्येक स्थरातील प्रेक्षक टाइमपास २ची आतुरतेने वाट पाहत आहे. टाइमपास मधील देखणी जोडी केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांच्या नितांत सुंदरयानंतर टाइमपास २ मध्ये त्यांच्या तरुणपणीचा रोल कोण करणार याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण करण्यात आली होती. पण आता ही  उसुकता संपली आहे.  एस्सेल व्हिजन आणि अथांश कम्युनिकेशन निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शितटाइमपास २हा सिनेमा १ मे २०१५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

झी टॉकीजच्या या  ‘फुल्ल2टाइमपासया कार्यक्रमात नावाप्रमाणेच खुप धमाल आली. यावेळी मराठी-हिंदीतील अनेक कलाकारांनी आपले परफॉमंस सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी  ‘टाइमपासची जोडी केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब तसेच टाइमपास चा मोठ्या दगडुची व्यक्तिरेखा साकारणारा प्रियदर्शन जाधव यांचे परफॉमंस हे मुख्य आकर्षण ठरले. फुल्ल2टाइमपासया कार्यक्रमाची सुरुवात प्रसिध्द अभिनेत्री आणि नृत्यांगना उर्मिला कानेटकरच्या नृत्याने झाली. पंचतुंड नररुंडमालधर  आणि नटरंग या गायांवर तिने सादर केलेया नृत्याने सारे सभागृह मंत्रमुग्ध झाले. यानंतर स्वप्निल  बांदोडकरने मला वेड लागले प्रेमाचेगाऊन पुन्हा एकदा रसिकांच्या मनावर आपल्या सुरेल स्वरांची मोहनी घातली. टाईमपास मधील जोडी प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर अभिनयाबरोबरच सुंदर नृत्यही करतात. यांनी फुलपाखरु आणि  कल्लाया गीतांवर नृत्य सादर केले. प्रेक्षकांनीही  त्यांना भरभरून दाद दली. अभिनेत्री  अमृता खानविलकर शिट्टी वाजलीया गीतावर नृत्य सादर करत संपूण सभागृहाला थिरकायला लावले.

यानंतर टाईमपास२या सिनेमाच्य म्युझिक लॉंचचा सोहळा पार पडला. दिग्दर्शक रवी जाधव, केणी, यांच्या हस्ते टाईमपास२च्या म्युझिक सीडिचे अनावरण करयात आले. या कार्यक्रमात सगळ्यात आकर्षण ठरला तो टाईमपास२चा हिरो‘, सगळ्यांचा लाडका दगडू, म्हणजेच प्रियदर्शन जाधव याचा परफॉमंस. पेपरविक्या दगडूचा आता डॅशिंग रॉकीझाला आहे. नवा दगडू “रॉकम्हणजेच प्रियदर्शन जाधवच्या वॉव वॉवया नृयाने एकाच धमाल उडवून दली. टाईमपासप्रमाणेच टाईमपास२ मधील गाणीही अत्यंत श्रवणीय आहेत. मला वेड लागले आणि  हि पोळी साजूक तुपातलीया गाण्यांनी नवीन बाज स्वीकारत टाईमपास२ मध्येही आपली जादू कायम ठेवली आहे. बेला शेंडे, महालक्षमी अय्यर, शाल्मली खोलगडे, अपेक्षा दांडेकर, आदर्श  शिंदे यांनी गायलेल्या सुमधुर गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. सोनाली कुलकर्णी हिच्या मदन पचकारी आणि नवीन ही पोळी  साजूक तुपातली या तुफान नृत्याने संपूर्ण प्रेक्षकांना थिरकायला लावले.

झी टॉकिजच्या इतर सोहळ्यांप्रमाणेच हा सोहळाही अतिशय दिमाखदार झाला. या सोहळ्याचे प्रक्षेपण ५ एप्रिल रोजी  दुपारी १२ वाजता  आणि सायंकाळी ६ वाजताहोईल.

बच्चन कुटुंबियासह मराठी कलावंतांनी १०० फुटी उभारली म नसे गुढी

0

(पहा १५ फोटो )

8 11 112 13 14 15 2 3 4 5 6 7  9 10
मुं बई- मनसेच्या वतीने जुहू-चोपाटी येथे मराठी नववर्षाचे जोरदार स्वागत केले गेले. मनसेच्या वतीने 100 फुटांची गुढी उभारण्यात आली आहे. ही गुढी जुहूमध्ये आकर्षण ठरत आहे. हिंदू नववर्ष गुढी पाडवाच्या निमित्ताने आज सकाळी जुहु चौपाटीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी १०० फुट उंच गुढी उभारून ढोलताशांच्या गजरात हत्तीवरून साखर वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अमित राज ठाकरे ,पुष्कर श्रोत्री , अनिकेत विश्वासराव राजेश श्रुंगारपुरे, अनंत जोगउपस्थित होते.

दरम्यान, मनसेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ढोल-ताशा, लेझिम पथके व नाशिक पद्धतीच्या ढोलवर भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. या समारंभासाठी अभिनेता अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांनी हजेरी लावली व गुढीची पूजा केली. यावेळी तमाम मराठी कलाकार उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, सरचिटणीस शालिनी ठाकरे, शशांक नागवेकर यांनी केले होते. अमिताभ बच्चन यांनीही तमाम मराठी जनांना गुढी पाडव्यानिमित्त मराठमोळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईत मराठी वस्ती असलेल्या गिरगावात गुढी पाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येत आहे. डोंबिवलीतही भव्य शोभायात्रा काढण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीतील शोभायात्रेला हजेरी लावली. त्यांनी यावेळी मराठी जनांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची मुस्लिम आरक्षण रद्द निर्णय विरोधी निदर्शने

0
पुणे :
मुस्लिम आरक्षणाचा आघाडी सरकारचा निर्णय रद्द झाल्याच्या निषेधार्थ पुणे शहर  राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने आज (शुक्रवारी दुपारी ) पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय -विधान भवन (कौन्सिल हॉल ) येथे जोरदार निदर्शने केली . राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पुणे शहर अध्यक्ष अजित बाबर यांच्या नेतृत्वाखाली हि निदर्शने आयोजित करण्यात आली होती . युती सरकारचा जोरदार निषेध यावेळी करण्यात आला .
‘ मागास मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला होता . मात्र ,युती सरकारने जातीयवादी राजकारण करीत आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेवून आपले खरे रंग दाखवले आहेत . आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो ‘ असे अजित बाबर यांनी म्हटले आहे
‘मुस्लिम समाजाला न्याय मिळालाच पाहिजे ‘, ‘ युती सरकारचा धिक्कार असो ‘ असे  फलक  युवकांनी हाती घेतले होते .
निदर्शन प्रसंगी रिझवान शेख ,अलिक मोमीन ,शिल्पा भोसले ,इक्बाल शेख ,मंगेश गोळे आणि असंख्य कार्यकर्ते  उपस्थित होते . या निदर्शन प्रसंगी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता

अल्पवयीन मुलींचे लैगिंक शोषण-आयएएस अधिकाऱ्याला अटक -कोर्टात नगरसेविकांनी घातला चपलांचा हार

0

पुणे – अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला न्यायालयात हजर करत असतानाच म न से च्या नगरसेविकांनी त्याच्या गळ्यात चपलांचा हार घातला. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी शिवाजीनगर कोर्टासमोर घडली.मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मारूती सावंत याला आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार होते. दरम्यान न्यायालयात हजर करीत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका अस्मिता शिंदे, रुपाली पाटील, अर्चना कांबळे, संगीता तिकोने, युगंधरा चाकणकर, अनिता डाखवे, आशा साने यांनी निदर्शने केली. त्यावेळी अनिता डाखवे, आशा साने या नगरसेविकांनी त्याच्या गळ्यात चपलेचा हार घातला. याप्रकरणी त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे व्यवसाथपकीय संचालक, समाज कल्याण विभागाचे माजी संचालक भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) वरिष्ठ अधिकारी मारुती हरी सावंत (वय 58)  हे इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या दोन, तसेच तिसरी आणि सातवीमध्ये असलेल्या प्रत्येकी एक अशा चार मुलींसोबत अश्‍लील चाळे करीत होते. सावंत याचे कुटुंबीय शिवाजीनगर येथे वास्तव्यास असून, ते गेल्या दोन वर्षांपासून सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या हद्दीत फ्लॅटमध्ये एकटेच राहतात. ते आठवड्यातून दोन दिवस येथील फ्लॅटवर येत होते. इमारतीच्या आवारात खेळणाऱ्या मुलींना कधी चॉकलेट, तर कधी पैशाचे आमिष दाखवून घरात बोलावत असे. त्यांना मोबाईल आणि संगणकावर अश्‍लील चित्रफित दाखवित असे. पीडित मुलींनी शाळेतील समुपदेशक महिलेस त्यांच्यासोबत होत असलेला प्रकार सांगितला. ही बाब भाजपचे नगरसेवक श्रीकांत जगताप यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन घडलेली घटना गंभीर असल्याचे लक्षात आणून दिले.सावंत हे पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात राहतात. त्यांच्या सदानिकेशेजारी असलेल्या तिसरी पाचवीच्या वर्गातील मुली खेळण्यासाठी इमारतीच्या पार्किंगमध्ये येत असत. या मुलींना चॉकलेट, खाऊचे आमिष दाखवून सावंत त्यांच्या घरात घेऊन जात असे. त्यानंतर मुलींना अश्लील फोटो चित्रफित दाखवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पुण्याचे पोलिस आयुक्त सतिश माथूर यांनी सांगितले. न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. चपलेचा हार घातल्याप्रकरणी अनिता डाखवे आणि आशा साने या नगरसेविकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शाहीर कृष्णराव साबळे यांचे निधन

0

मुंबई-‘गर्जा महाराष्ट्र माझा‘, ‘जय जय महाराष्ट्र माझा।।‘ हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे – ‘महाराष्ट्राची लोकधारा‘ या कार्यक्रमामधून घराघरांत पोहोचलेले शाहीर कृष्णराव साबळे यांचे वृद्धापकाळाने आज (शुक्रवार) परळ येथे राहत्या घरी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.
शाहीर साबळे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर म्हणून त्यांचे मोठे योगदान होते. दिग्दर्शक केदार शिंदे हे साबळे यांचे नातू होत. ‘गर्जा महाराष्ट्र माझा‘, ‘जय जय महाराष्ट्र माझा।।‘ हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोहोचवले होते. ‘सह्याद्रीचा सिंह गर्जतोऽऽ‘ या ओळी ऐकताना त्यांच्या पहाडी आवाजाचा प्रत्यय येत होता.
शाहीर साबळे यांचे पसरणी (ता. वाई, जि. सातारा) हे मूळ गाव. जात्यावर ओव्या गाणारी आई आणि भजनं गाणारे वारकरी वडील यांच्याकडून त्यांना गायनाचे बाळकडू मिळाले होते. शालेय शिक्षणासाठी अंमळनेरला असताना साने गुरुजींशी त्यांचा संपर्क आला. तेथे त्यांच्यावर राष्ट्रीयत्वाचे संस्कार झाले. महाराष्ट्राच्या अनेक सामाजिक व राजकीय घडामोडींत एक कलावंत-कार्यकर्ता म्हणून शाहीर साबळेंची कामगिरी नेहमीच मोलाची राहिली. 1942ची चळवळ, गोवा व हैदराबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारूबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ, लोकगीतांचे पुनरुज्जीवन अशा अनेक विधायक कामांतही त्यांचा मोठा वाटा आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देताना त्यांच्या कलापथकाने दौरे केले. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांची स्वतःची अन्‌ त्यांच्या ‘आंधळं दळतंय‘ या प्रहसनाची भूमिका मध्यवर्ती होती.

सिद्धार्थ जाधव बनला ९२.७ बिग एफ एम चा आर. जे.

0

९२.७ बिग एफ एम चा नंबर वन शो “मसाला चहा” या शो चे सिद्धार्थ जाधव याने खास गुढी पाडवा साठी होस्टिंग केले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. हा गुढी पाडवा स्पेशल शो सिद्धार्थ जाधव बरोबर खास तुमच्यासाठी  ९२.७ बिग एफ एम  आणत आहे रविवारी सकाळी ८ ते १० या वेळात,  तेव्हा सिद्धर्थ जाधव  बरोबर गुढी पाडवा साजरा करा  फक्त ९२.७ बिग एफ एम वर.

2 3 4