Home Blog Page 3586

दिल्ली पोलिसांनी मला बसखाली मारण्याचा प्रयत्न केला ‘आप’ प्रवक्त्याचा आरोप

0

नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या अखत्यारीत असल्याने दिल्ली पोलीस हे दिल्ली त सत्तेवर असलेल्या आप च्या सरकारमधील नेत्यांना , कार्यकर्त्यांना छळत असल्याच्या तक्रारी आहेत . दिल्ली पोलिसांविरोधात आंदोलने झाली -पंतप्रधानांना पत्रे दिली गेली पण अद्याप काही होईना … दिल्ली ची कायदा सुव्यवस्था अर्थात पोलिसांच्याच हाती आहे ‘आप’चे प्रवक्ते दिलीप पांडे यांनी आता थेट दिल्ली पोलिसांवरच आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या बसने मला चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.यामुळे आता दिल्ली पोलीस आणि आप मधला संघर्ष तीव्र होत चालला आहे असे दिसते दिल्ली पोलिसांनी त्यांच्या बसखाली चिरडून माझे प्राण घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीतरी मला धक्का देऊन माझा जीव वाचवला, असं दिलीप पांडे यांनी म्हटलं आहे. मंगळवारी रात्री मीडियाला इंटरव्ह्यू देताना ही घटना घडल्याची तक्रार दिलीप पांडे यांनी दिल्ली पोलिसांत नोंदवली आहे. पोलिसांनी संबंधित बस चालकासह पोबारा केल्याचंही पांडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.’आप’ सत्तेत येऊन आता सहा महिने उलटले आहेत. गेल्या सहा महिन्यांत दिल्लीत केंद्र सरकार विरुद्ध दिल्ली सरकार असं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर दिलीप पांडे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी कशी होणार हा हि प्रश्नच आहे .

 

गजेंद्र चौहान विरोधात आता दिल्ली त ही आंदोलन सुरु करण्याचा निर्धार

0

पुणे :आर एस एस चा स्पष्ट पाठींबा मिळालेले एफटीआयआय चे अध्यक्ष  गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात सुरू केलेले आंदोलन आता पुण्याबरोबर  थेट दिल्ली दरबारीदेखील सुरु करण्याचे भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी ठरविले आहे. हे आंदोलन अधिक परिणामकारक करण्यासाठी आंदोलक विद्यार्थी आता संसदेसमोर ठाण मांडून बसणार आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असल्यामुळे त्यानिमित्त राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळविण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय, या आंदोलनामध्ये ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा‘ आणि ‘आयआयटी-दिल्ली‘च्या विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाईल,‘‘ असे विद्यार्थ्यांतर्फे सांगण्यात आले
‘‘एफटीआयआय सोसायटी‘ विसर्जित करण्याची प्रमुख मागणी मागे घेतल्याशिवाय सरकार कोणत्याही संवादासाठी पुढाकार घेणार नाही,‘ असे संचालक प्रशांत पाठराबे यांच्यामार्फत सरकारने विद्यार्थ्यांना कळविले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘एफटीआयआय‘च्या विद्यार्थ्यांची पत्रकार परिषद आज (बुधवार) झाली. “येत्या 3 ऑगस्ट रोजी दिल्लीत आंदोलन होणार असले, तरीही पुण्यातले आंदोलनही सुरूच राहणार आहे. केंद्र सरकारवर अधिक दडपण आणण्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा विचार आम्ही केला. दिल्लीत जाऊन आमचा आवाज अधिक ‘व्यापक‘ होईल. विविध पक्षांच्या खासदारांना आम्ही पाठिंब्यासाठी पत्र पाठविले आहे. त्यांच्याकडूनही मदतीची अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तान कडून ईद निमित्त आंब्याची पेटी भेट

0

नवी दिल्ली- एकीकडे भारतीय लष्कराने ईद निमित्त दिलेली मिठाई यंदा पाकिस्तानी लष्कराने नाकारण्याची घटना घडली असताना ईदनिमित्त पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंब्याची पेटी पाठविली आहे, अशी बातमी येथे आली आहे गेल्या वर्षी देखील शरीफ यांनी पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आंबे पाठवले होते.
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाचे वातावरण आहे.आणि दोन्ही देशांमधील मैत्री बाबत मोदी आणि शरीफ यांच्यामध्ये सकारात्मक हालचाली दिसत असल्या तरी प्रत्यक्षात पाकिस्तान कडून होणारी आगळीक वाढतेच आहे असे दिसत आले आहे ईद ला दोन्ही देशांदरम्यान मिठाई देण्याची परंपरा आहे. मात्र, गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने भेट म्हणून दिलेली मिठाई पाकिस्तानी लष्कराने नाकारली होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.

कारची दोन दुचाकींना धडक-तीन विद्यार्थी ठार तर दोघे जण गंभीररीत्या जखमी

0

पुणे

मुंबई-पुणे मार्गावरील निगडी नाक्याजवळ भरधाव कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात  देहूरोड येथील आयआयटी एमआर या शैक्षणिक संस्थेतील तीन विद्यार्थी ठार तर दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. काल रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. कारचालकाणे  दारूच्या नशेत कार चालवून हा अपघात केल्याची प्राथमिक माहिती आहे कारचा चालक मयूर घुमटकर याला अटक करण्यात आली असून त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.
किरण दिलीप दहाने (सातारा), संकेत कमलाकर समेळ (खोपोली), शुभम संभाजी भालेकर (पारनेर-अहमदनगर) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही देहूरोड येथील आयआयटी एमआर या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी होते. अपघातात जखमी झालेल्या अविनाश बबन माने आणि शिनो जॉन विद्यायती या दोघांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे पाचही जण दोन दुचाकींवरून चहा पिण्यासाठी निगडी नाक्याजवळ आले होते. चहा घेतल्यानंतर घरी परतत असतानाच मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या कारने दोन्ही दुचाकींना मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही दुचाकी बरेच अंतर फरफटत गेल्या. अपघातानंतर तातडीने स्थानिक लोकांनी मदतकार्य केले मात्र तिघांचा जागीच मृत्यू झाला.

1 (1) 1 (2) 1 (3) 1 (4) 1 (5)

अजित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना फळे व खाऊ वाटप

0

 

पुणे:
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पक्ष कार्यालयामध्ये सकाळी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष अश्‍विनी कदम, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर, नगरसेवक फारूक इनामदार, अप्पा रेणूसे, विशाल तांबे, कमल ढोले-पाटील, अशोक राठी, नितीन उर्फ बबलू जाधव, राजलक्ष्मी भोसले, रूपाली चाकणकर, गोविंद थरकूडे, शालिनी जगताप आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आनंद रिठे यांच्या वतीने गुरूवार पेठेतील सेंट मायकेल हॉस्टेल मधील अनाथ मुलांना खाऊ व फळांचे वाटप करण्यात आले.

‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ आणि ‘व्यंकटेश्‍वरा हाऊसिंग ग्रुप’च्या वतीने ‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल 2015’ चे आयोजन

0
पुणे:
     ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’ आणि ‘व्यंकटेश्‍वरा हाऊसिंग ग्रुप’ या संस्थांच्या वतीने पिरंगुट येथे ‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल-2015’ या दोन दिवसीय सांस्कृतिक, कला व चित्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 25 जुलै व रविवार 26 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पावसाळ्याच्या आल्हाददायक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर पिरंगुटच्या निसर्गरम्य परिसरात सांस्कृतिक, कला व चित्र तसेच रॅपलिंग, झिपलाईन सारख्या विविध साहसी खेळांचे या उत्सवात आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहेत, अशी माह्तिी ‘गंगोत्री-ग्रीनबिल्ड’चे संचालक गणेश जाधव, मकरंद केळकर आणि ‘व्यंकटेश्‍वरा हाऊसिंग ग्रुप’चे संचालक वसंत बसाळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल-2015’  यामध्ये शनिवार 25 जुलै रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत आषाढी वारीनिमित्त भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 4 ते 5 या वेळेत चारुहास पंडीत ‘चिंटू गँग’ ची स्केचेस रेखाटणार आहेत.
रविवार 26 जुलै रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळात सेलेब्रिटी गप्पा या कार्यक्रमात लेखक व अभिनेता गिरीश कुलकर्णी यांच्याशी बातचीत करण्यात येईल. दुपारी 4 ते 5 या वेळेत गायिका सायली पानसे आणि अपर्णा केळकर यांचा ‘अमृतघन’ हा वर्षाऋतु वरील संगीताचा कार्यक्रम होणार आहे. ‘शुभांगण फॅमिली फेस्टिव्हल-2015’ या उत्सवात लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत सर्वांना सहभागी होता येईल.
या कार्यक्रमांबरोबरच शनिवार 25 जुलै व रविवार 26 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रॅपलिंग, झिपलाईन, टॅटू, ‘चित्रांगण’- चित्रकला कट्टा, मेंदी, भुट्टा ऑन रुफ टॉप, तसेच व्हिंटेज कार सोबत फोटो काढण्याची संधी यावेळी  मिळणार आहे.
सकाळी 9.30 पासून ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’योगेश्‍वरी सोसायटी,मेहंदळे गॅरेज रोड, एरंडवणे, पुणे येथून शटल बससेवा उपलब्ध आहे.
संपर्क: 88888 70222 , 88888 36564

घरापासून लांबचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थी/विद्यार्थिनींसाठी एक शेवटच्या फेरीचे आयोजन करावे–भाजयुमो ची मागणी

0
रिक्त जागा ऑफ लाईन भरण्यास मान्यता देणार का याची पालकांमध्ये उत्सुकता.
शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश नाकारणाऱ्या  शाळांविषयी अहवाल आल्यास कारवाई करणार.–.रामचंद्र जाधव यांची ग्वाही.
पुणे-
अकरावी च्या ऑन लाईन प्रवेश प्रक्रियेत अनेक विद्यार्थी विद्यार्थीनीना घरापासून लांबचे महाविद्यालय मिळाल्यामुळे ते व त्यांचे पालक हवालदिल झाले आहेत,अनेकांना हा खर्च परवडणारा नाही,तर काहीना   एवढ्या लांब जाताना सुरक्षिततेची काळजी वाटते.यामुळे अनेकांचे शिक्षण खंडित होण्याची शक्यता आहे.याबाबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा चे शिष्टमंडळ भाजप चे पुणे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर,युवा मोर्चा चे शहर अध्यक्ष गणेश घोष,युवा  मोर्चा सरचिटणीस सुशील मेंगडे,विशाल पवार ,दीपक पोटे,प्रतुल  जागडे, यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या  कार्यालयात  धडकले .लांबचे महाविद्यालय मिळालेल्यांसाठी गुणवत्तेनुसार ऑन लाईन फेरीस शिक्षण उपसंचालक ही अनुकूल असल्याचे चर्चेतून निष्पन्न झाले.मात्र यासाठी शासनाने परवानगी  देणे गरजेचे असल्याने यासंदर्भात भाजयुमो ने विनोद् तावडे यांना निवेदन सादर केले आहे.
त्याच बरोबर अनेक महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त असून संबंधित महाविद्यालयांना या जागा ऑफ लाईन भरण्यास शासन मान्यता देणार का,याकडे ही पालकांचे लक्ष लागले आहे.
तसेच शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली किवा नर्सरी ला प्रवेश नाकारणार्या शाळांबद्दल तक्रारी आल्या व शिक्षण प्रमुख बी.के.दहिफळे यांनी अश्या शाळांबाबत चा  अहवाल सादर केल्यास त्या शाळांविरुद्ध कारवाई करू असे ही श्री.जाधव यांनी स्पष्ट केले.

 

बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देणे हा देशाचा अपमान -दिग्विजय सिंह

0

नवी दिल्ली- शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देणे हा देशाचा अपमान आहे, असे म्हणून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे.
त्यांनी हे विचार ट्विटरहून मांडले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला आहे असेही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या विरोधात सांगली येथे जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या हल्ल्याचाही दिग्विजय सिंह यांनी निषेध केला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या ‘संघटन शक्ती ‘वर्षाची घोषणा

0

पुणे मेळाव्यातील निर्धार 

रासप जिल्हा ध्यक्षांच्या  निर्धार मेळाव्यात बोलताना एक जिल्हाध्यक्ष -सोलापूर चे संतोष रूपनर )
रासप जिल्हा ध्यक्षांच्या निर्धार मेळाव्यात बोलताना एक जिल्हाध्यक्ष -सोलापूर चे संतोष रूपनर )
पुणे :
राष्ट्रीय समाज पक्षाने २०१५-१६ हे वर्ष ‘संघटन शक्ती ‘ वर्ष म्हणून जाहीर केले असून या काळात महाराष्ट्रात गाव -शहर पातळीपर्यंत संघटनात्मक बांधणी करण्यात येणार आहे
रविवारी पुण्यात पक्षाचा राज्यव्यापी  ‘निर्धार ‘ मेळावा झाला . त्यावेळी ही घोषणा करण्यात आली . या मेळाव्याला राष्ट्रीय समाज पक्षाचे  राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष , शहराध्यक्ष ,राज्य कार्यकारिणी सदस्य निमंत्रित करण्यात आले होते  .
पक्षाच्या घटनेत नमूद केलेल्या रचनेप्रमाणे राज्यभर गाव ,शहर,तालुका ,जिल्हा पातळीवर पदाधिकारी आणि कार्यकारिणी नियुक्त करण्यात येत आहे . या नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचा परिचय आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील संघटन शक्तीची सद्य स्थितीचा आढावा या निर्धार मेळाव्यात मांडण्यात आला
पक्षाने संघटनात्मक वाढ करण्यासाठी चार महिन्यापूर्वी विभागीय पातळीवर संघटन मंत्री नियुक्त केले असून ते जिल्हा -तालुका पातळीवर संघटन सक्षम करीत आहेत . याशिवाय प्रदेश पातळीवर महिला ,अनुसूचित जाती ,अल्पसंख्य ,युवक आघाड्यांच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे
संघटन शक्ती वर्षात पक्षाची रचना बळकट करून राज्यातील प्रमुख पक्ष म्हणून उदयास येणे ,हे उद्दिष्ठ ठेवण्यात आल्याचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ राउत आणि महासचिव बाळासाहेब दोड्तले यांनी या मेळाव्यात बोलताना सांगितले . राज्यभर सक्रिय सदस्य नोंदणी सुरु असून या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले
मेळाव्याला प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर ,महिला आघाडी अध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर ,अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष बाळासाहेब हंगारगे ,अल्पसंख्य आघाडी अध्यक्ष मणेर चाचा ,विष्णू चव्हाण ,पश्चिम महाराष्ट्र महिला  आघाडी अध्यक्ष डॉ उज्वला हाके ,प्रदेश सचिव कैलास कोळसे -पाटील ,दादासाहेब केसकर ,पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग खटके उपस्थित होते
९ ओगस्ट क्रांतीदिनी औरंगाबाद येथे पक्षाचा पुढील निर्धार मेळावा असून त्यात पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रशिक्षण याविषयावर प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर विशेष सादरीकरण करणार आहेत
असे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ राउत यांनी सांगितले

सद्गुरू शंकर महाराज उड्डाणपुल.. पहा फोटो

0

पुणे- धनकवडी येथील बालाजी नगर चा सातारा रस्त्यावरील भाग म्हणजे अपघातग्रस्त परिसर . कित्येक अपघातात कित्येक जणांचे बळी गेलेळे . या पार्शभूमीवर येथे रस्ता रुंदीकरण -अतिक्रमणे यावर सातत्याने चर्चा होत गेली आणि अखेर पर्याय निघाला तो उड्डाण पुलाचा … खडकवासल्याच्या खासदार सुप्रिया सुळे , माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आणि स्थानिक नेत्यांनी हा उड्डाण पुला लवकर व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न केले तो आता पूर्णत्वास येतो आहे

6

शहरातील सर्वात जास्त लांबीचा म्हणजे १२९६ मीटर आणि १५.८० मीटर रुंदी असलेला हा पूल आहे सातारा रस्त्यावरील चव्हाण नगर ची कमान ते भारती विद्यापीठ मार्ग या दरम्यानच्या या उड्डाण पुलाला सद्गुरू शंकर महाराज उड्डाणपुल असे नाव देण्यात आले आहे आज महापौर दत्ता धनकवडे , महापालिका आयुक्त कुणालकुमार तसेच विशाल तांबे ,अप्पा रेणुसे आणि महापालिका अधिकारी सुरेश जगताप , विजय दहिभाते , श्रीनिवास बोनाला , सुनील गायकवाड आदींनी भेट देवून पुलाची पाहणी केली .

1

समता सामाजिक संस्थेच्यावतीने विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न

0

पुणे-

समता सामाजिक संस्थेच्यावतीने “गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा  ” कार्यक्रम नुकताच संपन्न झाला .तसेच एकपात्री नाटक ” मी रमाई बोलतेय ” हे नाटक स्नेहा गायकवाड यांनी सादर केले .  पुणे कॅम्प मधील जान मोहम्मद स्ट्रीटवरील डॉ. बाबासाहेब  आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या या सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे  पुणे महानगरपालिका शिक्षण अधिकारी माध्यमिक आणि तांत्रिक विभाग शिक्षण अधिकारी सौ. मीनाक्षी राऊत ,  लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीषक बरकत मुजावर ,  एज्युकेशन सोसायटी माजी मुख्याध्यापिका   मीरा ससाणे , नगरसेवक दिलीप गिरमकर , मनजितसिंग विरदी , महेश जांभुळकर , वाहिद बियाबानी , देवीप्रसाद जोशी , संदीप भोसले , अतुल माने , संजय खोले , उषा माळी , दिलीप भिकुले , भगवान वायाळ , ज्ञानेश्वर कांबळे , वसंत मजदे , बबलू नाईकनवरे , शफिक शिकलकर , युसुफ शेख , विशाल ओव्हाळ , संदीप रेड्डी , महेद्र गायकवाड , अभिषेक भोसले , अनिकेत भोसले , मोना राठोड आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत समता सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जनार्दन भोसले , तर सूत्रसंचालन विकास भांबुरे आणि आभार दिनेश कांबळे यांनी मानले . यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

फडणवीस, धनगर समाजाला फसवू नका – अजित पवार

0

मुंबई – धनगराच्या वेशात आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि अन्य विरोधकांनी धनगर आरक्षण प्रकरणी विधानभवनात जोरदार निदर्शने केली

यासंदर्भात  अजित पवार म्हणाले ,’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पहिल्या कॅबिनेटमधे धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी आजवर ते पाळले नाही. या सरकारने धनगर समाजाला केवळ वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. धनगरांची मतं घेऊन मुख्यमंत्री झाले, सत्तेवर आले पण आता धनगर समाजालाच फसवण्याचे काम ते करत आहेत.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आज आम्ही विधान भवनात जोरदार निदर्शने केली. धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळायलाच हवे!

जितेंद्र आव्हाड हल्लाप्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र …

0

मुंबई -भाजप सरकारकडून राष्ट्रवादीचे नेते टार्गेट करण्यात येत आहेत काय ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात असताना  राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते शरद पवार यांनी आज जितेंद्र आव्हाड यांच्यावर सांगली येथे झालेला हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देवून इशारा दिला आहे या पत्रात महाराष्ट्रामध्ये प्रागतिक विचार मांडणाऱ्या डॉ. दाभोलकर व कॉ. गोविन्द पानसरे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली व या हत्येला बराच कालावधी होऊनसुद्धा गुन्हेगारांचा शोध घेण्यात शासकीय यंत्रणेला यश आले नाही. एवढेच नव्हे तर प्रागतिक विचारांवर आधारित भूमिका मांडणाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेल्या पुरस्काराबद्दल विरोधी भूमिका मांडणाऱ्या श्री. जितेंद्र आव्हाड यांना देण्यात येणाऱ्या धमक्या. श्री. आव्हाड यांच्या सांगली सभेमध्ये घुसून झालेला हल्ल्याचा प्रकार व त्या संदर्भात टेलिव्हिजनवर येऊन श्री. आव्हाड यांच्याबद्दल आमच्याकडून अशीच भूमिका घेतली जाईल, अशी जाहीरपणे दिलेली धमकी हे सर्व धक्कादायक आहे. असे सुरुवातीलाच म्हटल्याने यावर आता बरेच राजकीय वातावरण तापणार आहे असे समीक्षकांना वाटू लागले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेल्या पुरस्काराबद्दल विरोधी भूमिका सातात्याने  जितेंद्र आव्हाड यांनी मांडण्याची मोहीम राबविली हे मुळ कारण असल्याने पुढील वातावरण तापवायचे कि कसे ठेवायचे हे आता भाजपच्या अंमल करण्यावर ठरेल असा हि समीक्षकांचा व्होरा आहे

-पाहू यात श्री पवार यांनी नेमके काय म्हटले आहे पत्रात जसेच्या तसे ….

 

 

माननीय श्री. देवेन्द्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र
महोदय,

अलिकडे महाराष्ट्रामध्ये प्रागतिक विचार मांडणाऱ्या डॉ. दाभोलकर व कॉ. गोविन्द पानसरे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली व या हत्येला बराच कालावधी होऊनसुद्धा गुन्हेगारांचा शोध घेण्यात शासकीय यंत्रणेला यश आले नाही. एवढेच नव्हे तर प्रागतिक विचारांवर आधारित भूमिका मांडणाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेल्या पुरस्काराबद्दल विरोधी भूमिका मांडणाऱ्या श्री. जितेंद्र आव्हाड यांना देण्यात येणाऱ्या धमक्या. श्री. आव्हाड यांच्या सांगली सभेमध्ये घुसून झालेला हल्ल्याचा प्रकार व त्या संदर्भात टेलिव्हिजनवर येऊन श्री. आव्हाड यांच्याबद्दल आमच्याकडून अशीच भूमिका घेतली जाईल, अशी जाहीरपणे दिलेली धमकी हे सर्व धक्कादायक आहे.
म. फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा अभिमान बाळगणाऱ्या महाराष्ट्रात ही असहिष्णूता व झुंडशाही वाढत आहे ही बाब चिंताजनक आहे.
श्री. जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे ओ.बी.सी. समाजाचे लोकप्रिय व सुविद्य नेते आहेत. महाराष्ट्र शासनात मंत्री म्हणून त्यांनी कार्य तर केलेच, त्याचबरोबर महाराष्ट्र विधान सभेतील जागृत सदस्य म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांची नोंद राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून आपण व्यक्तिशः घ्याल असा मला विश्वास आहे.
सार्वजनिक जीवनात काम करताना विविध विचाराचे मान्यवर आपण पाहतो. मतभिन्नता असणाऱ्यांनाही लोकशाहीमध्ये अधिकार आहे हे आपण स्वीकारणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात श्री. जितेंद्र आव्हाड यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांची आपण राज्य प्रमुख म्हणून नोंद घेऊन उचित खबरदारी घ्याल अशी अपेक्षा आहे. आणि श्री. जितेंद्र आव्हाड यांचे संदर्भात काही अघटित घडू नये अशी आपली भूमिका असेल याबद्दल मला विश्वास आहे. त्याबरोबर या संदर्भातील राज्याचा गृह विभागाचा प्रमुख म्हणून आपणास जबाबदारी टाळता येणार नाही.
माझ्या या निवेदनाची आपणाकडून गंभीरपणे नोंद घेतली जाईल अशी अपेक्षा करतो. या पत्राची प्रत मी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या विरोधी पक्षनेत्यांना पाठवित आहे.

कळावे,
आपला,
शरद पवार
दि. २१ जुलै २०१५

राष्ट्रीय महामार्गावरील सहापदरीकरण प्राधान्याने पुर्ण करा- जिल्हाधिकारी सौरभ राव

0

पुणे – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील सातारा ते देहूरोड दरम्यानची सहापदरीकरणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) आधिकाऱ्यांना दिला.
पावसाळयात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी आणि या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम गतीने व्हावे यासाठी श्री. राव यांनी ही बैठक बोलावली होती. बैठकीस अपर जिल्हाधिकारी प्रदीप पाटील, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, दत्तात्रय कवितके, स्नेहल बर्गे, मौसमी बर्डे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक पी. बी. दिवाण, व्यवस्थापक एम. एस. वाबळे, रिलायन्स कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक राकेशकुमार कटारिया उपस्थित होते.
श्री. राव यांनी सांगितले, महामार्ग प्राधिकरणाने शासकीय जमिनीवरील महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. राष्ट्रीय महामर्गाच्या कामात दिरंगाई करणारा विभाग आणि संबंधितांना राष्ट्रीय महामार्ग कायद्यातील तरतुदीनुसार सूचना कराव्यात. महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी पोलीस संरक्षणाची आवश्यकता असल्यास संबंधित ठिकाणाचे नाव आणि कालावधी याबाबतचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाला सादर करावे.
राष्ट्रीय महामार्गावर पुणे शहरालगत नऱ्हे-आंबेगाव येथे मोठया प्रमाणावर नागरी वस्ती झाली आहे. येथे सेवा रस्ता करावा, अशी तेथील नागरिकांची मागणी आहे. मात्र तेथे स्माशनभूमी असल्यामुळे सेवा रस्ता करणे शक्य होत नाही. ग्रामस्थांच्या सोयीसाठी स्माशानभूमीसाठी पर्यायी जागा देता येईल. त्यासाठी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेवून मार्ग काढला जाईल, असे श्री. राव यांनी सांगितले.
महामार्गालगतच्या गावांतील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी संबंधित गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, असे जिल्हाधिकारी राव यांनी सूचित केले.
बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण इत्यादी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कन्नड तरुणी -मराठी तरुणाची प्रेमकहाणी २४ जुलै ला ” कॅरीऑन मराठा ‘

0

mail.google.com

‘हद्द बघितलीस – आता जिद्द बघ’ अशी जबरदस्त कॅच लाईन असलेला आणि पोस्टरपासूनच स्वतः च वेगळ अस्तित्व सांगणारा ‘ कॅरीऑन मराठा ‘हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रासोबतकर्नाटकातील काही भागात प्रदर्शित होत आहे.
या सिनेमातून प्रथमच नायक म्हणून गश्मीर महाजनी हा मराठीसिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. आकर्षक व पिळदार शरीरयष्टी, दमदार अभिनय, नृत्यामध्ये पारंगत असणारा हा अभिनेता, सिनेसृष्टीतील अतिशय नावाजलेला व देखणा अभिनेता रविंद्र महाजनीयांचा सुपुत्र आहे. एक जबरदस्तअक्शन ट्रीट प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळेल. . कुशल – मोझेस यांनी चित्रपटाच्या नावाला साजेशाजबरदस्त अक्शन दिलेल्या आहेत. व गश्मीरने त्या अतिशय समर्थपणेपेलल्या आहेत. मराठी हिंदी चित्रपटातील नव्या जुन्या व दमदार कलाकारांनी आपल्या कसदार अभिनयाने या चित्रपटाला एका वेगळ्याउंचीवर नेले आहे. या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणारी ‘कुसुम’ अर्थात कश्मीरा कुळकर्णी हिने कानडी मुलीची भूमिका साकारली आहे. यापूर्वी कश्मीराने दाक्षिणात्य चित्रपटामध्ये भूमिका केल्या आहे. पण या चित्रपटातून तिच्या रूपानेही मराठीला एक नवा अभिनय संपन्न चेहरा लाभतो आहे असे म्हटले जाते . या चित्रपटाच्या प्रोमोने गाश्मीर आणि कश्मीरा या नव्या जोडी बद्दल मोठी अपेक्षा निर्माण होऊ पाहते आहे

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असतानाच त्याच पार्श्वभूमीवरमहाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील नायक व नायिका यांच्या प्रेमकथेवरआधारित चित्रपटाची कथा आहे. दिग्दर्शक संजय लोंढे यांना सुचलेल्या कथेवर ऋषीकेश कोळी यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. याचित्रपटातील कानडी संवाद हे बेळगावातील सुप्रसिद्ध लेखक वनाटककार डॉ. डी. एस. चौघुले यांनी लिहिले आहेत.

या चित्रपटाला संगीतकार शैल- प्रीतेश या जोडीने संगीत दिले आहे. संगीतकार शैल-प्रीतेश यांनी अस्सल या मातीतले संगीत देऊन पुन्हाएकदा मराठी संगीताला चांगले दिवस येतील या आशा पल्लवीत केल्याआहेत. या चित्रपटात एकूण पाच गाणी असून गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, मंगेश कांगणे, हृदया शिवा यांनी सिनेमासाठी गीते लिहिली असूनशैल आणि प्रीतेश यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. श्रेया घोषाल, आदर्श शिंदे, वैशाली भैसने-माडे, शैल हाडा, उर्मिला धनगर यांच्या सुमधुर आवाजाचा स्वरसाज सिनेमाला चढला आहे. उर्मिला धनगर यांनीगायलेले एक गाणे तर संपूर्ण कानडी भाषेत आहे.
या चित्रपटाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे या चित्रपटाकरिताहिंदीतील प्रथितयश नृत्य दिग्दर्शक राजू खान, सुजीत कुमार,आदिलशेख, यांनी केलेलं नृत्यदिग्दर्शन. या चित्रपटातअरुण नलावडे, देविका दफ्तरदार, शंतनू मोघे, उषा नाईक, ओंकारकुळकर्णी, समीर खांडेकर, अमिन व करीम हाजी, अमेय कुंभार व कर्नाटकातील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी बल्लाळ यांच्या भूमिकाआहेत. चित्रपटाच्याविषयाला अनुसरून या चित्रपटात बऱ्याच अंशी कानडी भाषेचा वापर केलेला आहे.
नंदा आर्ट्सच्या चंद्रभान ठाकूर व वॉरीयर ब्रदर्स मोशन पिक्चर्सच्या शशिकला क्षीरसागर यानिर्मिती संस्थांनी एकत्रितरीत्या निर्मिती केलेला व संजय लोंढे यांनीदिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा असून एखाद्या नवख्या क्रिकेटरनेपहिल्याच चेंडूवर सिक्सर मारावा असे काहीसे या चित्रपटाचे झालेआहे. पहिल्याच प्रयत्नात एक अतिशय देखणा दर्जेदार व मनोरंजकअसा हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे.