Home Blog Page 3551

१७ वर्षाच्या मुलाला अज्ञातांनी पळवून नेल्याची तक्रार ..

0

पुणे – एका १७ वर्षीय मुलाला अज्ञातांनी पळवून नेल्याची तक्रार मुलाच्या पित्याने केली आहे

याबाबत पोलिसांनी पाठविलेले हे निवेदन पहा जसेच्या तसे ..

unnamed

सिंहगड रोड -सरीतानगरी मध्ये चोरट्यांनी फोडली ६ घरे …

0

पुणे- सिंहगड रस्त्यावरील गणेश मळा येथील सरिता नगरी फेज १ मधील ६ घरे फोडून चोरट्यांनी साडेसहा लाखाचा ऐवज लांबविला . ३० सप्टेंबर रोजी रात्री दीड ते पाहते साडेचार वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी हा हैदोस घातला .

स्नेहल पाटणकर , सुजित कुलकर्णी , मिलिंद आठवले स्मिता जेरे , मिलिंद गाडगीळ , ज्योतीबेन पटेल यांची घरे कुलुपबंद असताना या चोऱ्या झाल्या . दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत .

5133586790192350298_Org

 

युवकाने केली पोलीस चौकीत तोडफोड…

0

पुणे- काहीही कारण नसताना … पोलीस चौकीत घुसून तोडफोड केली ,पोलिसांना धक्काबुक्की केली आणि सरकारी कामात अडथला आणला या आरोपावरून कोथरूड पोलिसांनी ३० वर्षीय युवकाला अटक केली आहे .

सागर दत्तात्रय जावळकर(रा. शिवाजी पुतळा चौक , कोथरूड )असे या युवकाचे नाव आहे . तो काळ सायंकाळी साडेचार वाजता एरंडवणे पोलीस चौकीत गेला आणि पोलिसांना धक्काबुक्की करीत अपशब्द वापरीत खिडक्यांची तोडफोड  केली अशी तक्रार पोलीस शिपाई  सिद्धराम पाटील यांनी नोंदविली आहे . फौजदार वाघमारे अधिक तपास करीत आहेत

CRIME_jpg_475x310_q85

विनय फडणीस -अनुराधा फडणीस यांच्यावर अडीच कोटीला फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

पुणे-बांधकाम आणि उद्योग क्षेत्रात बऱ्यापैकी सुपरिचित असलेल्या विनय फडणीस आणि अनुराधा फडणीस यांनी ओम डेव्हलपर्स च्या राजन रायसोनी (वय ५० , प्रभात रोड , पुणे )यांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . रायसोनी यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप फडणीसांना  अटक करण्यात आलेली नाही .

विनय फडणीस आणि अनुराधा फडणीस (रा . कल्पवृक्ष , स. नं . ४६/१ सी /१ डी. पी रोड . कर्वेनगर )यांना रायसोनी यांनी आपल्या ओम डेव्हलपर्स या भागीदारी संस्थेत घेतले होते . त्यानंतर ओम च्या मालकीचे असलेले स. नं . ४०/१/१ अ आणि ४१/१/१ मधील प्लॉट नं १, २ ,३ .४ या मिळकतींवर बांधकाम क्कारण्यात आले . यातील व्यापारी बांधकाम हे माझ्या फडणीस प्रॉपर्तीज प्रा. ली . ला म्हणजे स्वतासाठी द्या अशी मागणी करीत फडणीस यांनी रायसोनी यांना ३ कोटी  ९१ लाख ४६ हजाराचे धनादेश दिले आणि रायसोनी यांचा संस्थेमधून राजीनामा हि घेतला . आणि ठरल्याप्रमाणे पैसे हि दिले नाहीत

या प्रकरणातील २ कोटी ४१ लाख रुपये आणि व्याज  न देता फसवणूक केली असा तक्रार अर्ज रायसोनी यांनी पोलिसांना दिला होता त्यावर तपास करून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे . गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कुलकर्णी या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत

 

 

पुणे महापालिकेत लोकशाही दिनाचे आयोजन

0

माहे  ऑक्टोबर २०१५ मधील लोकशाही दिन सोमवार दि. ५/१०/२०१५ रोजी सकाळी १० ते १२ या

वेळात महापालिकेच्या मुुख्य भवनात मा.महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे

नागरिकांनी आपल्या तक्रारी संदर्भात आवश्यक नमूना प्रपत्र १ (ब) नमून्यात अर्ज सादर करणे

आवश्यक आहे. प्रकरणाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स प्रती अर्जासह सादर कराव्यात. अर्ज सादर

केल्यानंतर सुनावणी प्रसंगी स्वत: उपस्थित रहाणे आवश्यक आहे.

न्यायप्रविष्ठ बाबी, माहिती अधिकाराअंतर्गत सादर केलेले अर्ज, मनपा सेवकांच्या व अधिकारी यांचे

संदर्भांतील अर्ज, वारंवार एकाच विषयाचे येणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. संबंधित खात्याने दिलेल्या

अंतिम उत्तरासंदर्भांत समाधान झाले नाही अथवा अपेक्षित कार्यवाही झाली नाही तर अशा अर्जदारांनी

दुसèया आठवड्यातील सोमवारी सकाळी १० वाजता मा. विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे १ (कौन्सिल

हॉल) येथे अर्जासह, आवश्यक कागदपत्रांसह विभागीय लोकशाही दिनात संपर्क साधावा.

महापालिका मुख्य भवनातील लोकशाही दिनात प्रथमत: अर्ज करणारांनी परस्पर न येता प्रथम

मनपाच्या क्षेत्रिय उपायुक्त कार्यालयात महिन्यातील तिसèया सोमवारी आयोजीत केल्या जाणाèया

लोकशाही दिनात सकाळी १० ते १२ या वेळात अर्ज सादर करावेत. क्षेत्रिय उपायुक्त कार्यालयामार्फत एक

महिन्यात कार्यवाही झाली नाही तर मनपा मुख्य भवनात महिन्यातील पहिल्या सोमवारी लोकशाही दिनात

अर्जासह उपस्थित रहावे. मनपा मुख्य भवनातील लोकशाही दिनात अर्ज सादर करावयाचा असल्यास १५

दिवस अर्ज अगोदर करणे आवश्यक आहे.

अर्जदारांकरिता सर्वसाधारण सूचना :

१. महापालिका आयुक्त यांना उद्देशून अर्ज.

२. वरीलप्रमाणे अर्जास क्षेत्रिय उप आयुक्त लोकशाही दिन टोकन क्र. प्रत.

३. क्षेत्रिय उप आयुक्तांच्या उत्तराची प्रत.

४. अर्जासोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी माहिती व जनसंपर्क

कार्यालय, पुणे महानगरपालिका येथे दिलेला अथवा पाठविलेला असणे आवश्यक आहे.

५. बांधकाम विषयक तक्रारी असल्यास अशा अर्जदारांनी आपले अर्ज मुख्य भवनातील पहिल्या

मजल्यावरील बांधकाम विभागामध्ये आपले अर्ज सादर करावेत.

६. वरील प्रमाणे बाबींची पूर्तता केली नाही .तर लोकशाही दिनात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार

७. कामाचे स्वरुप अथवा विभाग थेट महानगरपालिका आयुक्त कार्यालय अथवा मनपा मुख्य

भवनातील अन्य विभागांचे स्तरांवर संबंधित असेल तर क्षेत्रिय उप आयुक्त लोकशाही दिनातील टोकन

क्रमांक व त्याची प्रत आवश्यक राहणार नाही.

नवीन बदला संदर्भात माहिती व अर्ज नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत

स्थळावर उपलब्ध करण्यात आले असुन त्याचा संगणक संकेताक २०१२०९२७१४५१०७०१००

‘डेंग्यू’ वर होऊ शकतो त्वरित इलाज- डॉ. सोनवणे यांच्या औषधी मिश्रणामुळे रुग्णांना २ दिवसातच आराम

0
पुणे : डेंग्यूने सध्या सगळीकडेच थैमान मांडले आहे. सर्वसामान्यांपासून ते मोठमोठे सेलेब्रिटीसुद्धा डेंग्यूमुळे त्रस्त झाले आहेत. अनेक मोठ्या इस्पितळात यावर कमीतकमी ८ ते १० दिवस उपचार दिला जातो. तसेच काही इस्पितळामध्ये तर प्लेटलेट कमी झाल्यामुळे आयसीयु मध्ये भरती करून घेतात. परंतु डॉ. नयना सोनवणे यांनी  होमीओपेथीमधील औषधांचे  काही विशिष्ठ मिश्रण तयार केले आहे,  ज्यामुळे रुग्णांचे अवघ्या १२ ते १६  तासातच  ताप पूर्णपणे बरा होतो. पुढील एक दोन दिवसात अशक्तपण कमी होतो व प्लेटलेटची संख्या अवघ्या काही तासातच नॉर्मल होतात आणि कुठले साईड इफेक्टदेखील होत नाही.
 गेल्या २३ वर्षांपासून डॉ. नयना सोनवणे  ह्या होमीओपेथीमध्ये प्रॅक्टिस करीत आहेत.  त्यांच्याकडे विविध रोगांनी त्रस्त असलेले रुग्ण या काही वर्षांमध्ये उपचारासाठी आले आहेत. गेल्या वर्षभरात जवळजवळ २५ – ३० डेंग्यूमुळे त्रस्त असलेले रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी आले आहेत. आपल्या अनुभवाचा फायदा घेत, डॉ. सोनवणे यांनी डेंग्यूसाठी दोन वर्ष सतत अभ्यास करून उपलब्ध औषधी वापरूनच एक विशिष्ठ मिश्रण तयार केले आहे. या औषधामुळे  हे सर्व रुग्ण जास्तीत जास्त २ ते ३ दिवसातच पूर्णपणे बरे झाले आहेत.
“माझ्याकडे आतापर्यंत डेंग्यूचे व त्याप्रमाणे लक्षणे असलेले अनेक रुग्ण आले. हे सर्व रुग्ण ‘डेंग्यू’ या नावामुळेच घाबरलेले असतात परंतु मला एव्हडेच सांगायचे आहे की हा आजार गंभीर नाही. यावर योग्य तो इलाज चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तसेच वेळेत होऊ शकतो. यामुळे नुसते डेंग्यूचे नाव ऐकून घाबरून जाऊ नका.” असे आवाहन डॉ.सोनवणे यांनी यावेळी केले. तसेच, ” पुणे, मुंबई व दिल्लीमधील रुग्णही हे औषध घेतल्यावर अगदी २ दिवसातच बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे आयसीयु मध्ये भरती असलेले व डेंग्यूमुळे  प्लेटलेटची संख्या निम्म्याहून कमी झालेले रुग्णदेखील हे औषध घेऊन आवघ्या तीन दिवसात बरे झाले आहेत.” अशी माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.
“माझा मुलगा आर्यन याला गेल्या वर्षी शाळेतच त्रास होऊ लागला. घरी आल्यावर तो पूर्णपणे गळाला होता. त्याचा ताप वाढत होता. त्याचे हात पायदेखील खूप दुखत होते. त्याला भूकही लागत नव्हती.  हे सर्व लक्षणे डेंग्यूचे असल्यामुळे आम्ही डॉ. नयना सोनावणे यांना लगेच कळविले. त्यांनी त्याच दिवशी एक – एक तासाच्या अवधीने घेणारे औषध दिले. त्याचा १०४ असलेला ताप सकाळपर्यंत पूर्णपणे बारा झाला आणि भूकही लागली. तसेच तिसऱ्या दिवसपर्यंत प्लेटलेट्सदेखील वाढल्या. माझा मुलगा फुटबॉल खेळाडू आहे. त्यावेळी त्याचे ट्रेनिंग दिल्लीला होते. परंतु अगदी सहाव्या सातव्या दिवशी तो १० दिवसांच्या फूटबॉल ट्रेनिंगसाठी दिल्लीलाही गेला.” अशी भावना मंजुषा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
त्याचप्रमाणे, ” माझ्या मोठ्या भावाचे लग्न जवळ आले होते. मी लग्नाच्या तयारीत व्यस्त होतो. परंतु अचानक मला ताप चढला. खोकला, मळमळणे इत्यादी प्रकार वाढू लागले. मी फिसिशियनकडे गेल्यावर त्यांनी मला डेंग्यूची टेस्ट करण्यास सांगितले, नेमकी ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. मी, माझी आई, माझे नातेवाईक सगळेच घाबरून गेलो होतो. माझ्या प्लेटलेट्स देखील कमी झाल्या होत्या. डॉक्टरांनी तसेच काही नातेवाईकांनी मला इस्पितळात भरती करण्याचा सल्लादेखील दिला होता.” अशी काळजी श्रीपाद जाधव यांनी त्यावेळी व्यक्त केली. तसेच  “माझ्या आईला कोणीतरी डॉ. सोनावणे यांची माहिती दिली आणि तिने लगेच त्यांना माझ्याबद्दल कळविले. डॉ. सोनावणे यांनी माझ्यावर रात्रीतूनच माझ्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. एक एक तासाच्या अवधीने औषध दिल्यावर मला एका दिवसातच बरे वाटू लागले व मी दोन दिवसात माझ्या भावाच्या लग्नाची खरेदी करायला बाहेरही पडलो.” असा आनंद श्रीपाद जाधव यांनी व्यक्त केला.
: डेंग्यूची लक्षणे व त्याची घ्यावयाची काळजी 
थंडी, ताप, डोके दुखी, सांधे व अंगदुखी, त्वचेवर पुरळ आणि अशक्तपणा ही काही लक्षणे डेंग्यू झालेल्या रुग्णामध्ये दिसून येतात. पाथोलोजिकल तपासणीमध्ये एनएस पॉझिटिव्ह येते. प्लेटलेटची संख्या कमी होते. परंतु काही रुग्णामध्ये या सर्वच गोष्टी आढळून येतील असे नाही. डेंग्यू हा रोग झालेल्या रुग्णाला घरीच सातत्याने या औषधांसोबत साखरेचे पाणी, खजूर व पेज देत राहा ज्यामुळे रुग्णाचा अशक्तपण कमी होईल. तसेच आराम व पुष्कळशी झोप हेदेखील आजार झाल्यावर महत्वाचे आहे. डेंग्यू ताप आढळलयास रुग्णास कुठलेही घरगुती व इतर औषध देऊ नयेत त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.  त्यापेक्षा रुग्णाला कोमट पाण्याने स्पोंजिंग करीत राहिल्याने त्याचा ताप उतरतो.

: डेंग्यू व होमिओपेथीबद्दल असलेले गैरसमज-

“डेंग्यू हा गंभीर आजार आहे असे लोकांना वाटते परंतु हा काही गंभीर आजार नाही. तसेच याबद्दल अनेकांना असे वाटते की व्हायरल इन्फेक्शनमुळे हा आजार होतो. पण हा आजार ‘एडेस’ जातीच्या डासाची मादीमध्ये डेंग्यू व्हायरसचा संसर्ग आहे ती चावल्याने होतो. तसेच होमिओपेथीमध्ये काही रोगांवर इलाज नाही व होमिओपेथी वेळखाऊ असल्याचे अनेकांना वाटते परंतु ते साफ चुकीचे आहे. याउलट होमिओपेथीमध्ये त्वरित व दुष्परीणाम व्यतिरिक्त  इलाज होतो. तसेच या उपचारामध्ये खर्चही कमीत कमी होतो.” असे डॉ. सोनवणे यांचे म्हणणे आहे.

झी मराठी अवॉर्ड्स २०१५ साठी रंगणार एकदिवसीय मतदान ३ ऑक्टोबरला राज्यातील २० शहरांमधून घेण्यात येणार प्रेक्षकांचा कौल

0

unnamed1

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्डस्. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. या पुरस्कारांचं वैशिष्ट्य म्हणजे यातील विजेत्यांची निवड ही प्रेक्षकांच्या मतदानाद्वारे करण्यात येते. यावर्षी हे मतदान एकाच दिवशी म्हणजे शनिवार ३ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील २० मुख्य शहरांमध्ये होणार आहे. या शहरांमधील विविध ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात येणार असून त्याद्वारे प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकार आणि मालिकेला मत देता येणार आहे.

झी मराठीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहेत. ‘होणार सून मी ह्या घरची’ मधील श्री आणि जान्हवी, ‘का रे दुरावा’ मधील जय – अदिती, ‘नांदा सौख्य भरे’ मधील नील आणि स्वानंदी या सर्वांवर आणि त्यांच्या कुटुंबावर प्रेक्षक जीवावापड प्रेम करतात. ‘जय मल्हार’ ही खंडेरायाची मालिका भक्तीभावाने बघतात. ‘होम मिनिस्टर’ मधून घरोघरी जाणारे आदेश बांदेकर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भावोजी बनलेले आहेत तर ‘चला हवा येऊ द्या’ मधून घराघरांत मनोरंजनाची आणि हास्याची हवा पसरलेली आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारीतील’ मित्रांचं ‘माजघर’ आणि त्यातील किस्से सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनले आहे. याच आणि इतर लोकप्रिय कार्यक्रमांना आणि त्यातील कलाकारांना सर्वोत्कृष्ट ठरवण्याचा सन्मान प्रेक्षकांच्या मतदानातून होणार आहे. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट नायक – नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सासू-सासरे, सर्वोत्कृष्ट आई – वडील, सर्वोत्कृष्ट स्त्री आणि पुरूष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट खलभूमिका, सर्वोत्कृष्ट सहाय्यक स्त्री आणि पुरूष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट शिर्षकगीत, सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक, सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम, सर्वोत्कृष्ट मालिका आदि विभागांचा समावेश आहे. यासाठी राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी, धुळे, नगर, जळगाव, औरंगाबाद, लातूर, परभणी, नागपूर, अमरावती, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट, सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण आणि रत्नागिरी या शहरांमधून एकूण ७२ केंद्रांवर हे मतदान घेण्यात येणार आहे. शनिवारी ३ ऑक्टोबर या एकाच दिवशी हे प्रत्यक्ष मतदान रंगणार आहे. याशिवाय ज्यांना ३ तारखेला मतदान करता आलं नाही त्या प्रेक्षकांना आणि इतर शहरातील प्रेक्षकांना ऑनलाईन मतादानाचाही पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी झी मराठीच्या www.zeemarathi.com या संकेतस्थळावर नामांकनपत्रिकेद्वारे हे मतदान करता येणार आहे. याशिवाय पाच महत्त्वांच्या विभागांसाठी फ्री मिस्ड् कॉलद्वारेही मतदान करता येऊ शकेल. ज्यामध्ये मालिकेसाठी 9021103601, कथाबाह्य कार्यक्रमासाठी 9021103602, नायकासाठी 9021103603, नायिकेसाठी 9021103604 , जोडीसाठी 9021103605 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास मतदान करण्यासाठी या क्रमांकावरून कॉल येईल जिथे प्रेक्षक आपलं मत नोंदवू शकतील. याशिवाय एसएमएसचाही पर्याय उपलब्ध असणार आहे. येत्या १५ ऑक्टोबरला झी मराठी अवॉर्ड्सचा हा सोहळा रंगणार असून १ नोव्हेंबरला तो प्रसारित होणार आहे. 

अब्जोपती सोडून गरजू आम आदमी कडूनच घेणार दुष्काळ निधी । त्यासाठी पेट्रोल आणि डिझेलची करवाढ … अजब सरकारची गजब तऱ्हा…

0

पुणे – अंबानी आणि अन्य मोठ्ठे हजारो करोडोंचे मालक सोडून ; अब्जावधींची संपत्ती दाबून ठेवणारी देवस्थाने सोडून आता सरकार दुष्काळ निधी प्रत्येक माणसाच्या खिशातून वसूल करणार आहे . आता कुठे पेट्रोल डीझेल स्वस्त झाल्याचा दिलासा मिळत असतानाच१ ऑक्टोबर पासून होणारी पेट्रोल डीझेल च्या  किमतीतील स्वस्ताई ..  आम आदमीचे हे सुख पहावेनासे झालेल्या सरकारने दुष्काळ निधी च्या नावे पेट्रोल डीझेल च्या किमतीत आणखी कर समाविष्ट करून पेट्रोल डिझेलच्या करात  वाढ करण्याचा निर्णय घेतला  आहे . पाणी साठविण्याचे नियोजन करण्यात अपयशी झालेल्या सरकारच्या कृत्याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार आहे . पावूस येतो कि नाही ? असा प्रश्न असताना..  नाही आल्यावर वर्षभर दिवसाआड पाणी मिळणार कि काय ? अशी भीती असताना दुष्काळी झळामुळे रोजगार मिळणेही दुरापास्त होणार असताना वर महागाईचा चटका सोसावा लागला तर शेतकरीच काय अन्य क्षेत्रातील लोकही आत्महत्या करतील । अशी भीती हि सरकारला नसल्याने आश्चर्य वाटत आहे.
महाराष्ट्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर वाढविण्याचा निर्णय घेतला . याच बरोबर सोन्या-चांदीच्या भावातदेखील वाढ होणार आहे.
दुष्काळ निधीसाठी राज्य सरकारने सिगारेट, विडी, दारुवर पाच टक्के अतिरिक्त कर आकारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी पेट्रोल, डिझेलवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतीत प्रति लिटर दोन रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय वाढलेल्या किंमती गुरुवारी मध्यरात्री पासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.मागील महिन्यात नीती आयोगाची बैठक झाली होती, त्यात देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी अधिक निधी गरज असल्याचे सांगण्यात आले. व त्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि इतर काही गोष्टींवरील करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र सरकार हा निर्णय लागू करणारे पहिले राज्य आहे.
दुष्काळ पडतो तेव्हा सरकारने लोकांना तारायचे –आम आदमीला वाचवायचे ;मदत करायची … हे सोडून याच मदतीच्या नावाखाली सरकार आम आदमी कडून अशाप्रकारे वसुली करणार हे अजबच म्हणावे लागणार आहे

राज्य मंत्रिमंडळाचे आजचे महत्त्वाचे निर्णय
दारू, सिगरेट, शीतपेयावर अतिरिक्त 5 टक्के करवाढ
– एलबीटी रद्द केल्यामुळे पेट्रोल १.५० ते २.५० रुपये कमी होणार होते म्हणजे १ ऑक्टोबर पासून पेट्रोल डीझेल स्वस्त होणार होते , त्याऐवजी प्रतिलिटर २ रुपये करवाढ. म्हणजेच दरावर विशेष फरक पडणार नाही असा दावा – हिरे, सोने आणि दागिन्यांवरील वॅट 1 वरून 1.20 टक्क्यांवर- पुढील 5 महिन्यांसाठी वाढ. 1600 कोटींचा महसूल अपेक्षित एक ऑक्टोबरपासून कर लागू..  बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण अंतर्गत उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालिन निदेशकांचे पॅनल तयार करण्याचा निर्णय.100 हून अधिक पटसंख्या असलेल्या 1835 शाळांमध्ये कला, शारीरिक शिक्षण, आरोग्य, कार्यानुभव यासाठी अतिथी निदेशकांचे पॅनल तयार करणार.27 पारेषण योजना ग्रीन एनर्जी कॉरिडॉर कार्यक्रमांतर्गत राबविण्यास मान्यता, 367 कोटींचा अंदाजित खर्च.20% खर्च राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या निधीतून, 40% नॅशनल क्लीन एनर्जी अनुदान तर 40% कर्ज जर्मन डेव्हलपमेंट बँकेकडून घेण्यास मान्यता. ग्रीन एनर्जी कॉरिडॉर योजनांमधून 2570 मे.वॅ. अतिरिक्त वीज उपलब्ध होणार मुंबई महापालिका अधिनियम, महाराष्ट्र महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयजात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याचा पुरावा जोडून निवडणूक लढविणारा बोगस उमेदवार सहा वर्षांसाठी निवडणुकीस अपात्र ठरणार

केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान यांना पश्चिम विभाग केंद्रीय इलेक्ट्रीकल टेस्टिंग लॅबसाठी नाशिक जिल्ह्यातील मौजे शिलापूर येथील 100 एकर जमीन

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मास कम्युनिकेशन्स या स्वायत्त संस्थेला अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे 6हेक्टर जागा देण्याचा निर्णय

भर दिवसा टिळक रोड वरून वृद्धा कडील ६० हजार पळविले ..

0

पुणे- स.प . महाविद्यालय जवळच .. दुपारी साडेअकराची वेळ आणि ब्यांक ऑफ महाराष्ट्र मधून एक ६१ वर्षाचा वृध्द इसम बाहेर येतो पैशाची पिशवी सायकल ला लावतो आणि तेवढ्यात कोणीतरी आपले पैसे  खाली पडलेत सांगून हि तब्बल ६० हजाराची  रोकड असलेली पिशवी घेवून पसार होतो … आश्चर्य वाटेल अशी घटना काळ २९ तारखेला घडली आहे

पांडुरंग चौरे असे या वृद्ध इसमाचे नाव असून याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . पोलीस फौजदार राजपूत याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत .

CRIME_jpg_475x310_q85

 

रस्त्यावरच्या वाळूने घेतला युवकाचा बळी …

0

पुणे- चांदणी चौक ते वारजे चौकाकडे जाणार्या सेल पेट्रोल पंपा समोर वाळू वर दुचाकी स्लीप होवून झालेल्या अपघातात ३० वर्षे वयाचा युवक अखेर गतप्राण झाला

उमेश शिवाजी शिंदे (वय -३० रा. घुलेवाडी , संगमनेर ) असे या युवकाचे नाव असून त्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करून , बेदरकारपणे दुचाकी चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा वारजे पोलिसांनी दाखल केला आहे हा अपघात २४ तारखेला सकाळी झाला उमेश याच्यावर उपचार चालू असताना तो २६ तारखेला मरण पावला सहायक पोलीस निरीक्षक ए व्ही चव्हाण यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे

accident-sign

पत्रकारितेच्या नौकरीचे आमिष देवून ३८ हजाराची फसवणूक

0

पुणे- ‘तुमची डीडी किसान भारती या वाहिनीवर पत्रकारितेसाठी निवड झाली आहे असा फोने करून ब्यांक अकाऊंट वर पैसे भरायला सांगून अमृता गायकवाड (वय -२५ रा. वडगाव बुद्रुक ) या तरुणीची ३८ हजार ५० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी राजेशकुमार आणि अनिता वर्मा नामक अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे . याप्रकरणी ब्यांकेचे खाते मोबाईल नंबर्स आदी चा शोध घेत पोलीस फौजदार डी आर कोळपे अधिक  तपास करीत आहेत .

दरम्यान या प्रकारे लोकांना फसवण्यात येत असल्याचे यापूर्वीच जाहिरातींद्वारे डीडी किसान भारती ने लोकांना सावधान केले होते . मात्र हि घटना २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०१५ दरम्यान घडली .

CRIME_jpg_475x310_q85

राष्ट्रीय समाज पक्षाची मान्यता रद्द नाही : प्रदेश पवक्ते दीपक बिडकर यांची माहिती

0

पुणे :

खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, रामदास आठवले यांचा रिपाई (ए), कपिल पाटील यांचा लोकभारती, विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती यांच्यासह 16 पक्षांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे, परंतु यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष नसून त्याची मान्यता रद्द झालेली नाही, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविण्यासाठी आयोगाकडे नोंदणी करणे राजकीय पक्ष आणि आघाड्यांना बंधनकारक आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे मोठ्या-लहान असे राजकीय पक्ष आणि आघाड्या अशा 300 पक्षांची नोंदणी आहे. त्यापैकी सन 2005 मध्ये नोंदणी केलेल्या राजकीय पक्षांचा आयोगाने आढावा घेतला आणि 16 पक्षांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे, परंतु यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष नसून त्याची मान्यता रद्द झालेली नाही, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी दिली.

माध्यमांकडून विचारणा झाल्यामुळे हा खुलासा पक्षाच्या वतीने प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी केला आहे.

सन 2005 मध्ये नोंदणी केलेल्या राजकीय पक्षांचा आयोगाने आढावा घेतला असता, नोंदणीकृत राजकीय पक्षांनी दरवर्षी द्यावयाचे वार्षिक लेखापरीक्षित लेख्याची व आयकर विवरणाची (रिटर्न) प्रत राज्य निवडणूक आयोगास सादरच केली नसल्याचे आढळून आले होते. त्याप्रकरणात आयोगाने जुलैमध्ये 19 पक्ष- आघाड्यांंविरोधात कारवाईचा बडगा उगारत मान्यता का रद्द करू नये, अशा नोटीसा बजावल्या होत्या. त्यानुसार या पक्षांनी आयोगाच्या नोटीसाला उतर दिले. मात्र त्यातून आयोगाचे समाधान झाले नाही किंवा काही पक्षांनी माहितीच दिलेली नाही अशा 16 पक्षांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यामध्ये खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, रामदास आठवले यांचा रिपाई (ए), कपिल पाटील यांचा लोकभारती, विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती यांच्यासह ऑल इंडिया क्रांतीकारी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष, इंडियन मुस्लिम काँग्रेस पार्टी, मागासवर्गीय जनशक्ती पार्टी, राष्ट्रवादी जनता पार्टी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, सत्यशोधक समाज पक्ष, शिवराज्य पक्ष, रिपाई (डेमोक्रॅटिक), महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष (खोरीपा), जनशक्ती आघाडी पेण यांचा समावेश आहे.

rsz_1logo-for-portal

वाकड येथे 8.56 लाखांची वीजचोरी उघड; गुन्हा दाखल

0

पुणे, दि. 30 : वाकड येथे वीजमीटरमध्ये फेरफार करून 40 हजार 500 युनिटस्‌च्या 8 लाख 56 हजार 160

रुपयांची वीजचोरी झाल्याप्रकरणी रास्तापेठ येथील महावितरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत माहिती अशी, की सांगवी उपविभाग अंतर्गत वाकड येथील महावितरणचे वाणिज्यिक

वीजग्राहक अनिल सुदाम भूमकर यांचे नावे असलेल्या वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी होत असल्याचे

नियमित तपासणीत निदर्शनात आले. या ठिकाणी तब्बल 40 हजार 500 युनिटस्‌च्या 8 लाख 56 हजार 160

रुपयांची वीजचोरी झाल्याचे आढळून आले. या चोरीच्या विजेचा वापर हॉटेल सिल्व्हर स्पूनसाठी करण्यात येत

असल्याचे दिसून आले. वीजचोरीचा पंचनामा करून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल

सुदाम भूमकर याचेविरुद्ध शनिवारी (दि. 26) रास्तापेठ महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा

कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

qqq

इम्पा वर टी. पी . आगरवाल यांचे वर्चस्व कायम – सुषमा शिरोमणी ,विकास पाटील, बाळासाहेब गोरे विजयी

0

पुणे- इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन  अर्थात इम्पा या संघटनेवर टी. पी आगरवाल यांनी आपले वर्चस्व अबाधितपणे कायम राखले आहे . ख्यातनाम निर्माते के . सी बोकाडिया यांच्या गटाचा त्यांनी धुव्वा उडवीत १९ जागा जिंकल्या तर अवघ्या ४ जागांवर बोकाडिया गटाला आपले स्थान राखता आले . त्यांच्या गटातील महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर या २ मातब्बर मराठी निर्माते आणि अभिनेत्यांना आपली छोट्या आणि मोठ्या पडद्यावरची झप्पी येथे उपयोगी ठरली नाही या दोघांचा येथे पराभव झाला . तर आगरवाल गटातील विजय पाटकर या अभिनेता असलेल्या आणि मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षांना हि पराभव चाखावा लागला .

229881_381412468586954_1900526304_n Thumbnails.aspx 11921654_960585344005874_7123170949315098291_n

कॉंग्रेस(आय) पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष असलेले , पुण्यातील निर्माते विकास पाटील हे आगरवाल गटातून तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत , ‘भिंगरी ‘ अभिनेत्री -निर्माती सुषमा शिरोमणी आणि बाळासाहेब गोरे हे देखील विजयी झाले . पराभूताममध्ये केतन देसाई , कुकू कोहली , विजय कुमार सिंह यांचा समावेश आहे

निकाल पुढीलप्रमाणे –

मेन प्राईम विभाग –

विजयी उमेदवार

 विकास पाटील , टी. पी आगरवाल , अभय सिन्हा, मनोज चतुर्वेदी , बाळासाहेब गोरे , बॉबी बेदी , विनोद छाब्रा , जे नीलम , अशोक पंडित,निशांत उज्वल, जयप्रकाश शा, जितेन पुरोहित,हरेश पटेल, नितीन मावाणी, राजू भट्ट ,रमेश मीर

असोसिएट विभाग –

विजयी उमेदवार-

सुषमा शिरोमणी , के सी बोकाडिया, , मेहुल कुमार , रिकू राकेशनाथ , महेंद्र धारिवाल

टी.व्ही विभाग –

विजयी उमेदवार-

बाबुभाई थिबा , राहुल आगरवाल

महाराष्ट्रात चित्रपट, लघुचित्रपट निर्मितीसाठी एका दिवसात परवानगी- विनोद तावडे

0

मुंबई : महाराष्ट्रात चित्रपट किंवा लघुचित्रपट निर्मिती करु इच्छिणाऱ्यांना एका दिवसात परवानगी मिळणार आहे. त्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

बॉम्बे एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय टुरिझम मार्ट’ च्या वतीने ‘शूट इन महाराष्ट्रा’ चर्चासत्रात श्री. तावडे बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकेश भट, रमेश सिप्पी, यशराज फिल्मचे आशिष सिंग, श्रीमती कांचन अधिकारी आदी उपस्थित होते.

श्री. तावडे म्हणाले, चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या एकत्रितरीत्या मिळाव्या, यासाठी चित्रनगरी महामंडळाला नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात येणार आहे. चित्रपटनगरीला चित्रपट निर्मिती केंद्रासोबतच पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. चित्रपटनगरी आणि बॉलिवूड म्युझियम हे पी.पी.पी. तत्वावर एकत्रितरित्या विकसित करण्यात येणार आहेत. याबाबतचा विकास आराखडा ही तयार करण्यात आला आहे. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात जगाची राजधानी बनण्याचे सामर्थ्य मुंबईमध्ये असून निर्मात्यांनी चित्रपट निर्मितीसाठी महाराष्ट्रालाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी उत्कृष्ट ठिकाणाची यादी लवकरच तयार करण्यात येणार असून त्याबद्दलची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येईल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच महाराष्ट्र शासन व टोरांटो फिल्म कमिशन यांच्यादरम्यान स्वाक्षरी करार (एम.ओ.यु.) करण्यात येणार असल्याचे श्रीमती नायर- सिंह यांनी सांगितले.

मुकेश भट, रमेश सिप्पी, आशिष सिंग, श्रीमती कांचन अधिकारी यांनीही मनोगत व्यक्त केले.