Home Blog Page 3530

नगररोड, विश्रांतवाडी परिसरात 16 ठिकाणी वीजचोरी उघड

0

power_big_10

पुणे, दि. 02 : नगररोड विभाग अंतर्गत वीजमीटरच्या विशेष तपासणी मोहिमेत 16 ठिकाणी 2 लाख 32 हजार रुपयांची वीजचोरी तर 5 ठिकाणी 1 लाख 97 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर आढळून आला.

नगररोड विभाग अंतर्गत नुकतीच वीजमीटरची विशेष तपासणी मोहीम झाली. यात नगररोड उपविभागात 11 ठिकाणी 1 लाख 20 हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली. वडगाव शेरी उपविभागात 2 ठिकाणी 3 हजारांची वीजचोरी तर 3 ठिकाणी 1 लाख 74 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर दिसून आला. विश्रांतवाडी उपविभागात 3 ठिकाणी 82 हजारांची वीजचोरी तर 2 ठिकाणी 23 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर आढळून आला. वीजचोरी प्रकरणी कलम 135 अन्वये तर अनधिकृत वीजवापर प्रकरणी कलम 126 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

——————————————————————-

वीजग्राहक दिनात 25 तक्रारी दाखल

पुणे, दि. 02 : महावितरणच्या दरमहा वीजग्राहक तक्रार निवारण दिनाच्या उपक्रमात बुधवारी (दि. 2) पुणे परिमंडलातील विभागीय कार्यालयांत प्राप्त झालेल्या एकूण 25 पैकी 08 तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या. उर्वरित 17 तक्रारींच्या निवारणासाठी संबंधित उपविभाग कार्यालयांकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी सर्व विभाग कार्यालयांत ग्राहक तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येत आहे.

‘रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती’च्या वतीने मोफत हृदयशस्त्रक्रिया मदत प्रकल्पातील दीनानाथ रूग्णालयातील रूग्ण बालकांची डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे घेणार भेट

0
पुणे :
‘रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती’च्या वतीने बालकांसाठी घेण्यात आलेल्या मोफत हृदयशस्त्रक्रिया मदत प्रकल्पातील रूग्ण बालकांची डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता ‘दीनानाथ मंगेशकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या नवीन इमारतीमधील कार्डियाक विभाग येथे हेमलकसा मधील रूग्ण बालकांना डॉ. आमटे दांपत्याच्या हस्ते भेटवस्तू देण्यात येणार आहे, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष सुरेश अभ्यंकर यांनी दिली.
हृदयविकार झालेल्या बालकांसाठी मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्याचा प्रकल्प ‘रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती’ने हाती घेतला आहे. या प्रकल्पा अंतर्गत नवजात अर्भके, अल्पवयीन गरीब, गरजू बालके यांना या ‘हृदय शस्त्रक्रिया मदत प्रकल्पा’चा लाभ दिला जातो. हेमंत खिरे यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहिले.
‘रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती’च्या वतीने दानशूर, देणगीदार, रुग्णालये, पालिका, सरकार अशांशी देखील संपर्क साधून मदत मिळवून दिली जाते. आतापर्यंत 26 बालकांवर या प्रकल्पांतर्गत हदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यातील 15 दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, 11 शस्त्रक्रिया यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत एकूण 26 लाख रूपये खर्च रोटेरियन विनय कुलकर्णी आणि रश्मी कुलकर्णी यांनी दिलेल्या देणगीतून करण्यात आला आहे.
या शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉ. धनंजय केळकर, डॉ. रणजीत जगताप, डॉ. संतोष जोशी, डॉ. अमोल सहस्त्रबुद्धे यांनी सहकार्य केले. तर यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमधील डॉ. अपुर्वा शहा, डॉ. सिद्धार्थ गाडगे यांनी सहकार्य केले.
rsz_1logo-for-portal

54 व्या ‘राष्ट्रीय फार्मसी सप्ताहा’मध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ला सर्वसाधारण विजेतेपद

0
पुणे:
54 व्या राष्ट्रीय फार्मसी सप्ताहात झालेल्या स्पर्धांमध्ये सलग सहाव्या वर्षी ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा)’ ने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. हा सप्ताह ‘इंडियन फार्मास्युटीकल असोसिएशन’ (आयपीए, पुणे शाखा) आणि पुण्यातील विविध फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. बी. सुरेश यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. यावेळी डॉ. एम. डी. कार्वेकर, डॉ. के. बंगारूराजन, डॉ. आत्माराम पवार, सचिन इटकर आणि प्रशांत हंबर, एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, सचिव लतिफ मगदूम, इरफान शेख, महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
या सप्ताहातील 15 स्पर्धांमधील 7 स्पर्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने जिंकल्या. तर 9 स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. पी. ए. इनामदार, लतिफ मगदूम, इरफान शेख, प्रा. व्ही. एन. जगताप यांनी आभार मानले.

पुणे महानगरपालिका व आय ई ई ई पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार

0

 

पुणे महानगरपालिका व इन्स्टिट्यूट ऑफ इलेकिट्रकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर्स, पुणे यांच्यामध्ये आज

पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयात सामंजस्य करार संपन्न झाला.

सामंजस्य कारावर पुणे महानगरपालिकेच्या वतीने मा. महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी तसेच

आय ई ई ई, पुणे संस्थेच्या सचिव मा. डॉ. सुरेखा देशमुख व संस्थेचे माजी उपाध्यक्ष प्राध्यापक जी.एस. मनी यांनी

या संदर्भात मा. डॉ. सुरेखा देशमुख व प्राध्यापक जी.एस. मनी यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीच्या

अनुषंगाने पुणे शहरामध्ये वापरल्या जाणाèया विविध प्रकल्पातील नवनवीन तंत्रज्ञानाच्या बाबीमधील दर्जा व

मानांकनानुसार पडताळणी करणे व आवश्यकतेप्रमाणे सुचना करणे.

नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणाèया अभियंते व अधिकाèयांना नवतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व माहिती

देण्याबाबत सहकार्य केले जाईल.

स्मार्ट सिटी संदर्भातील विविध विषयाबाबत कार्यशाळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल असे

जागतिक स्तरावर अशा प्रकारची निवड होण्याकरिता भारतातील व जगातील इतर मोठ्या प्रमाणावर विविध

शहरांनी प्रयत्न केले होते. तथापि या निवड स्पर्धेत जागतिक स्तरावर सदर संस्थेनी पुणे शहराची निवड केली आहे.

अमेरिका स्थित असलेल्या जागतिक पातळीवरील आय ई ई ई या संस्थेनी पुणे शहराची निवड त्यांच्या

स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पामध्ये एक संलग्न शहर म्हणून पुणे शहराची निवड केलेली असून पुणेकर नागरिकांसाठी

ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या प्रसंगी सांगितले.

त्यामुळे स्थानिक स्तरावर कार्यरत असलेली आय ई ई ई पुणे या संस्थेनी पुणे महानगरपालिकेशी

भवितव्यात कार्यरत राहण्यासाठी आज सांमजस्य करारावर सह्या केल्या आहेत.

आय ई ई ई पुणे या संस्थेचे स्थानिक स्तरावरील सुमारे १५०० पेक्षा जास्त सदस्य कार्यरत आहेत व एकूण

२२ विद्यार्थी शाखा आणि ६ विशेष तंत्रशाखा कार्यरत आहेत.

मागील वर्षी या स्थानिक स्तरावरील संस्थेची जागतिक पातळीवर अत्यंत सकारात्मक दृष्ट्या कार्यरत

असलेल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

अनधिकृत बांधकामावर कारवाई

पुणे शहरातील जास्त रहदारी असलेले नो हॉकर्स म्हणून घोषित केलेल्या ४५ मुख्य रस्त्यांवरील तसेच

जास्त वर्दख व रहदारी असलेल्या १५३ चौकांमधील रस्ता पदपथावरील सर्व प्रकारची अतिक्रमणे व या र स्त्यांचे व

चौकाचे लगत असलेल्या खाजगी मिळकतीमधील व्यावसायिकांची अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम इ. व सर्व संबंधित

विभागामार्फत संयुक्त कारवाई बांधकाम विभागामार्फत चालू करण्यात आली असून या मोहिमे अंतर्गत कारवाई करुन

स्टॉल १, हातगाडी ७३, पथारी ६३, नादुरुस्त वाहने ८, इतर ३६ अशा एकूण १८१ अनधिकृत व्यवसायधारकांवर कारवाई

करुन रस्ता, पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यात आलेले आहेत.

Pune_anna295x200

अमृता बनली “शो अँकर”

0

index index2

मराठीतील सिनेसृष्टीत सौंदर्याची खाण असणा-या अनेक मराठमोळ्या हिरॉइन्स हिंदीतही आपलं नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे त्यांना यश देखील मिळत आहे. या  हिरॉइन्सच्या  मांदियाळीत अमृता खानविलकरचे नाव आवर्जून घेतले जाते. मराठी सिनेसृष्टीतल्या या नायिकेने आपल्या अदाकारीने हिंदी सिनेसृष्टीलाही नाचवले आहे. ‘नच बलिये -७’ पर्वाच्या यशाने अमृताने हिंदी सृष्टीत मराठीचा झेंडा रोवला. सध्या चर्चेत असलेल्या “बाजीराव मस्तानी” या सिनेमाचा एक कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाचा उल्लेख यासाठी करावासा वाटतोय, कारण या  कार्यक्रमाची शो अँकर अमृता खानविलकर होती. रणवीर, प्रियांका, दीपिका या त्रिकुटाला घेऊन संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी हा सिनेमा बनवला आहे. मराठ्यांचा पेशवेकाळ या सिनेमात साकारला आहे.मुळातच हा सिनेमा मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा असल्याने या कार्यक्रमाची थीमही मराठमोळी होती. त्यामुळे  या सिनेमाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याऱ्या अमृतानेही  मराठी संस्कृतीला शोभेल असा पेहराव केला होता. या कार्यक्रमात अमृताने रणवीर आणि प्रियांका  यांच्यासोबत खूप धमाल केली. या कार्यक्रमाची रंगत वाढविताना तिने रणवीरच्या मल्हारी तर प्रियांकाच्या पिंगा या गाण्यावर त्यांच्यासोबत काही स्टेप्सही केल्या.  ” या कार्यक्रमाची शो अँकर म्हणून माझी निवड  केल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. मी रणवीरची खूप मोठी फॅन असून या अगोदरही आम्ही एकमेकांना भेटलो आहोत. रणवीर एक चांगला व्यक्ती असून समोरच्या व्यक्तीसोबत कम्फर्ट झोन बनवतो आणि त्यामुळेच कदाचित मी त्याच्याशी चागलं  इंटऱॅक्ट करू शकले.” असा या कार्यक्रमाचा अनुभव अमृताने सांगितला .

‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’चे ‘नॅशनल फार्मसी विक-2015’ मध्ये यश

0
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’च्या विद्यार्थ्यांनी ‘नॅशनल फार्मसी विक’2015 मध्ये यश मिळविले. ‘इंडियन फार्मास्युटीकल असोसिएशन’, पुणे च्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा वीक  ‘अँटीबायोयिक्सचा जबाबदारपणे वापर जीवन वाचवतो’ (ठशीिेपीळलश्रश णीश ेष अपींळलळेींळली- डर्रींशी ङर्ळींशी) या थीमवर आधारित होता.
‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’चे विद्यार्थी या ‘नॅशनल फार्मसी विक’मध्ये आयोजित 17 कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी यशस्वी कामगिरी केली. विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पी.ए.इनामदार, प्रा.इरफान शेख, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी अभिनंदन केले.
‘नॅशनल फार्मसी विक’मध्ये पुण्यातील 21 फार्मसी महाविद्यालये देखिल सहभागी झाली होती.  प्रा. रूक्साना रब आणि डॉ. दीलनवाझ पठाण यांनी ‘नॅशनल फार्मसी विक’चे समन्वयक म्हणून काम पाहिले.
निकाल: 
प्रश्‍नमंजुषा :  मुक्तादीर सय्यद आणि अंजुम पटेल (विजेतेपद),
जनरल अभियोग्यता चाचणी :  नर्गिस हर्णेकर (विजेतेपद),
रूग्ण सल्ला : अंजुम पटेल, शादाब खान, सना बैग, दानिश आणि राहिल (उपविजेतेपद),
परिचर्चा-वक्तृत्व आणि गटचर्चा : तस्नीम मांजरा

‘दीनानाथ मंगेशकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मधील ‘रोटरी क्लब पुणे प्राईड’ च्या रक्तपेढीचे पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांच्या हस्ते 4 डिसेंबर रोजी उद्घाटन

0

 

 
पुणे : 
‘दीनानाथ मंगेशकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या नवीन इमारतीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘रोटरी क्लब पुणे प्राईड रक्तपेढी’चे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते होणार आहे. हा समारंभ शुक्रवार, दिनांक 4 डिसेंबर 2015 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सौद बाहवान कक्ष, 8 वा मजला, दीनानाथ मंगेशकर रूग्णालय, एरंडवणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, रोटरी 3131 चे प्रांतपाल सुबोध जोशी, मोहन पालेशा, डॉ.मंदा आमटे, पंडीत हृदयनाथ मंगेशकर, रूग्णालयाचे वैद्यकिय संचालक डॉ. धनंजय केळकर आदी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
‘रोटरी क्लब पुणे प्राईड रक्तपेढी’च्या उद्घटनानिमित्त सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. संजीव केतकर यांनी केले आहे.
रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडने पुढाकार घेऊन उभारलेल्या या प्रकल्पामधे ‘रोटरी फौन्डेशन’चा आणि दक्षिण कोरियाच्या ‘रोटरी क्लब ऑफ सनराईज’चा मोठा सहभाग आहे. दरवर्षी 25,000 हून अधिक रुग्णांना या नव्या सुविधेचा लाभ होणार आहे. याच ‘पुणे प्राईड क्लब’ने दीनानाथ रुग्णालयाला लांब अंतरावर रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी एक अत्याधुनिक फिरते वाहनही दिले आहे. ‘रोग प्रतिबंध आणि उपाय’ या रोटरीच्या उपक्रमाअंतर्गत हा प्रकल्प उभारला आहे.
पुण्यातील सर्वात मोठी रक्तपेढी 
ही रक्तपेढी विद्यमान पेढीपेक्षा अडीच पटीने मोठी आहे. यामधे रक्ताचे विविध घटक वेगवेगळे करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आहेत. रक्ताची योग्य तपासणी करण्यासाठी आणि त्याचा मागोवा राखण्यासाठी सुविधा आहेत. 5,500 हजार चौरस फुटांहून अधिक जागा व्यापलेली ही पुण्यातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक रक्तपेढी आहे. रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केवळ 6 महिन्यात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
या रक्तपेढीत जमा करून प्रक्रिया केलेल्या रक्तापैकी काही भाग हा समाजातील गरीब वर्गातील रुग्णांसाठी मोफत किंवाकमी खर्चात उपलब्ध करून दिला जाईल.
rsz_1logo-for-portal

‘एस ए ई इंडिया’ च्या वतीने ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2015’ चे आयोजन

0
 पुणे :
‘एसएई’ इंडिया (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स), एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), इटॉन टेक्नॉलॉजी, ‘जॉन डियर’, ‘कमिन्स इंडिया’ आणि डीसी डिझाईन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहनांची छोटी मॉडेल्स तयार करण्याची ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2015’ चे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. 5 डिसेंबर रोजी होणार्‍या या पुणे ऑलिंपिकचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती माहिती डॉ. के. सी. व्होरा (उपाध्यक्ष, एसएई इंडिया) यांनी दिली. स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. 21 शाळांमधून 240 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.
 ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2015’ ऑर्चिड स्कूल (बाणेर) येथे होणार असून याचे उद्घाटन सकाळी 8.30 वाजता होणार आहे. ‘जेट टॉय’ निर्मिती स्पर्धेत 34 संघ सहभागी होतील. ‘स्किमर निर्मिती’ स्पर्धेत 26 संघ सहभागी होतील.
 देशातील ऑटोमोबाईल अभियंत्यांची गरज वाढत असून, या क्षेत्रात कारकीर्द करण्याबद्दल जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विज्ञान, गणित, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील मूलतत्त्वे छोटी मॉडेल्स तयार करून शिकणे हा ‘अ वर्ल्ड इन मोशन’ या उपक्रमाचा उद्देश आहे. या स्पर्धांमधून देशाचे भावी ‘इंजिनीयर्स’ घडणार आहेत.
rsz_1logo-for-portal

हिट ट्रिटमेंट कारखान्यातही रिमोटद्वारे होणारी 16 लाखांची वीजचोरी उघड भोसरी एमआयडीसीमधील प्रकार : 6 जणांविरुद्ध गुन्हा

0

पुणे: रिमोटद्वारे वीजचोरी करण्याचा चौथा प्रकार महावितरणने भोसरी एमआयडीसीमधील ट्र्यू थर्म हिट ट्रिटमेंट कंपनीच्या कारखान्यात उघडकीस आणला आहे. या कारखान्याच्या जागेत वीज वापर करणार्‍या लक्ष्मी हिट ट्रीटर कंपनीत 1,19,853 युनिटची म्हणजे 15 लाख 68 हजार 600 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, की भोसरी विभाग अंतर्गत भोसरी एमआयडीसीमधील एफ टू ब्लॉक, प्लॉट क्र. 17/3 येथे ट्र्यू थर्म हिट ट्रिटमेंट कंपनीला औद्योगिक वीजजोडणी देण्यात आली आहे. या कारखान्याच्या जागेत लक्ष्मी हिट ट्रीटर कंपनीचा वीजवापर सुरु आहे. महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या कारखान्यातील वीजवापराबाबत केलेल्या विश्लेषणात संशय निर्माण झाला. त्यामुळे या कारखान्यातील वीजमीटर यंत्रणेची पाहणी केली असता रेझीन कास्ट मोल्डेड सीटी (करंट ट्रान्सफॉर्मर) ही यंत्रणा वीजचोरीच्या हेतूने हाताळल्याचे दिसून आले. अधिक तपासणीसाठी ही सीटी फोडण्यात आली व त्यात वीजचोरीसाठी हेतूपुरस्सर फेरफार करून रिमोट कंट्रोलचे सर्कीट समाविष्ट केल्याचे आढळून आले. या सर्कीटच्या सहाय्याने वीजप्रवाह सुरु असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे मीटरमधील वीज वापराची नोंद सोयीनुसार थांबविता येत होती. या कारखान्यात 1 लाख 19 हजार 853 युनिटची म्हणजे 15 लाख 68 हजार 600 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.

रिमोटद्वारे होणार्‍या वीजचोरीचा प्रकार उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. धर्मराज पेठकर, श्री. प्रवीण नाईक, प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. रवींद्ग कंदारकर, उपकार्यकारी अभियंता श्री. एस. एस. हातोळकर, सहाय्यक अभियंता रमेश सुळ, शितल बोथे, तंत्रज्ञ कृष्णा गायकवाड, विष्णू भूजबळ योगदान दिले.

या वीजचोरीप्रकरणी ट्र्यू थर्म हिट ट्रिटमेंट कंपनीचे अमरजीतसिंग अरोरा, वीजवापरकर्ता लक्ष्मी हिट ट्रीटर कंपनीचे भागीदार कमलाकर चिंतामण गोगटे, दत्तात्रय रघुनाथ इनामदार, पुजा प्रदीप नागवेकर, सोमनाथ रामदास यादव, अंगित सुरेंद्गन नायर या सहा जणांविरुद्ध शुक्रवारी (दि. 27) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135, 138 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

फोटो नेम व ओळ –  MSEDCL Bhosari Theft 30112015 / वीजचोरीसाठी मीटरच्या यंत्रणेत बसविलेल्या रिमोट कंट्रोल सर्कीटची पाहणी करताना अधीक्षक अभियंता (चाचणी व गुणवत्ता) श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. धर्मराज पेठकर व सहकारी.

—————————————

मुळशी, मंचर, राजगुरुनगरमध्ये

महावितरणचा त्रिसुत्री कार्यक्रम

दि. 3 डिसेंबरला 12 ग्रामपंचायतीमध्ये आयोजन

पुणे, दि. 30 : महावितरणच्या पुणे परिमंडलातील मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागात त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विभागातील 12 ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) या कार्यक्रमांतर्गत मागेल त्यांना नवीन वीजजोडणी, वीजदेयकांची व यंत्रणेची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहे.

याआधी मागील आठवड्यात गुरुवारी मंचर विभागातील पाच ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकाच दिवशी विविध प्रकारचे तब्बल 638 कामे पूर्णत्वास गेली होती. त्यानंतर आता मंचरसह मुळशी व राजगुरुनगर विभागातील प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री कार्यक्रम होणार आहे.

येत्या गुरुवारी, दि. 3 डिसेंबरला मंचर विभागातील (कंसात उपविभाग) खडकवाडी (मंचर), कुरवंडी (घोडेगाव), मांजरवाडी (नारायणगाव), खानगाव (जुन्नर) आणि बल्लाळवाडी (आळेफाटा), मुळशी विभागातील लोणीकंद (हडपसर ग्रामीण), थेऊर (उरळीकांचन), खानापूर (मुळशी), कापुर ओहोळ व केतकावळे (नसरापूर), राजगुरुनगर विभागातील वाडा (राजगुरुनगर) व सदुंबरे (तळेगाव) या 12 ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

विद्युत ग्रामस्वच्छ अभियान, वीज देयक दुरुस्ती व महावितरण आपल्या दारी हे तीन उपक्रम एकाच दिवशी या त्रिसुत्री कार्यक्रमात राबविण्यात येणार आहे. विद्युत ग्रामस्वच्छ अभियानात  झुकलेले वीजखांब सरळ करणे, लोंबकळणार्‍या तारांची, रोहित्र बॉक्सची दुरुस्ती आदी काम होतील. वीजबिल दुरुस्ती अभियानात वीजग्राहकांची वीजबिले जागेवरच दुरुस्त करणे, वीजमीटरचे रिंडींग होत नसल्यास ते घेणे व वीज देयक दुरुस्त करून देणे, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे आदी कामे तर महावितरण आपल्या दारी या उपक्रमात मागेल त्यांना नवीन वीजजोडणी देणे, ग्राहकांना वीज देयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे आदी कामे करण्यात येणार आहेत. संबंधीत ग्रामपंचायतीमधील वीजग्राहकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

————————————

बुधवारी वीजग्राहक तक्रार निवारण दिन

पुणे, दि. 30 : पुणे परिमंडलातील सर्व विभागीय कार्यालयांत बुधवारी (दि. 2 डिसेंबर) महावितरणच्या वतीने वीजग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

वीजग्राहकांच्या प्रामुख्याने वीजबील, नवीन कनेक्शन आदींसह वीजसेवेशी संबंधीत तक्रारी त्वरीत निकाली काढण्यासाठी सर्व विभाग कार्यालयांत या तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

रास्तापेठ, पद्मावती, नगररोड, पर्वती, बंडगार्डन, कोथरूड, पिंपरी, भोसरी, शिवाजीनगर तसेच मंचर, राजगुरुनगर आणि मुळशी या विभाग कार्यालयांत सकाळी 11 ते दुपारी एक वाजेदरम्यान कार्यकारी अभियंता हे वीजग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींवर सुनावणी घेतील आणि त्या निवारणासाठी तात्काळ कार्यवाही करणार आहेत. वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

शनी शिंगणापूर येथे नव्या क्रांतीची नांदी झाली आहे : खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण

0
पुणे :
शनी शिंगणापूर येथील शनीच्या मंदिरात महिलेने प्रवेश करून केलेल्या धाडसाबाबत खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांची प्रतिक्रिया, ‘शनी शिंगणापूर येथे नव्या क्रांतीची नांदी झाली आहे, त्याचे मनापासून स्वागतच करायला हवे. परंतु काही समुहाच्या लोकांकडून त्या युवतीच्या धाडसी कृत्याचा निषेध केला जात आहे, पावित्र्याचे सोहळे-ओवळे पाळले जात आहे. हे अतिशय निराशाजनक व अस्वस्थ करणारे आहे. 21 व्या शतकात आणि या पुरोगामी महाराष्ट्रात आज देखील स्त्रियांना याद्वारे दुय्यम स्थान समाजात आहे.
मुळातच प्रश्‍न धार्मिक भावनेचा नाही तर समस्त स्त्री वर्गाच्या अधिकाराचा आहे, तसेच हे वास्तव आहे. प्रत्येक वेळी अनिष्ठ, कालबाह्य होत असलेल्या रूढी, परंपरा यांचे ओझे वाहून तकलादू बनत चाललेल्या समाजाचे आजच्या या आधुनिक युगात देखील आपण मनुस्मृतीचे दाखले देत बसणार आहोत का? याचा विचार समाजातील प्रत्येक कुटुंबात व्हायला हवा.
सनातनांच्या भावना दुखावल्या जाणे हे स्वाभाविकच आहे कारण यांनी समस्त स्त्री वर्गाला व समाजातील दुर्बल घटकांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली आहे व देत आहे. एकेकाळी या सनातनवाद्यांनी ‘विधवा राज़ नहीं चलेगा’ म्हणून रस्त्यांवर निदर्शने केली. आताही परिस्थितीत फरक नाही. त्यामुळे पुरोगामी विचारांचा, कृत्याचा नेहमीच बळी पडणार आहे.  आपणच या विरुध्द विविध मार्गांनी लढा दिला पाहिजे यासाठी स्त्री शक्ती एकत्र आली पाहिजे.’

आयुष काटेचे दिल्ली आणि गोव्याच्या नृत्य स्पर्धेत यश

0
index1
पुणे :
कल्याणीनगर येथील ‘बिशप स्कूल’चा दहावीतील विद्यार्थी आयुष राजेश काटे याने दिल्लीतील ‘इंद्रधनुष्य नॅशनल चिल्ड्रन्स डान्स फेस्टिव्हल’मध्ये नृत्य स्पर्धेत विशेष प्राविण्य पारितोषिक तर ‘फ्री स्टाईल नृत्य प्रकारात उपविजेतेपद मिळाले. ‘सोसायटी फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ नॅशनल आर्ट्स ऑफ इंडिया’ (नवी दिल्ली) या संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली होती.
तसेच गोवा येथे झालेल्या ‘इंडियन आर्ट अ‍ॅण्ड कल्चर सोसायटी’, गोवाच्या वतीने आयोजित ‘कल्चरल कार्निव्हल 2015’ या कार्यक्रमात ‘बेस्ट ड्युएट परफॉर्मन्स’ पारितोषिक मिळाले. शिवाली शितोळे या साथीदारासोबत आयुष काटे याने नृत्याचे सादरीकरण केले होते.
बिशप स्कूलचे मुख्याध्यापक फर्दीनंद बुनियान यांनी आयुष राजेश काटे याचे या यशाबद्दल अभिनंदन केले.

स्वातंत्र्य लढ्याची कथा सांगणारा “क्रिस्टो सिंग” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

आपल्या सिनेसृष्टीला स्वातंत्र्य लढ्याचे कायम आकर्षण राहिले आहे. स्वातंत्र्य लढ्याचे संदर्भ देतानाच त्यावेळचा भारवलेला काळही रुपेरी पडद्यावर अत्यंत खुबीने उभारले जातात. अशा ऐतिहासिक चित्रपटांची अनेक उदाहरणं देत येतील. असाच एक हिंदी सिनेमा क्रिस्टो सिंग आपल्या भेटीला येतोय. या सिनेमाची कथा ही बिहारचे स्वातंत्र्य सेनानी क्रिस्टो सिंग यांच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित आहे. बिहारच्या या स्वातंत्र्य सेनानीच आपल्या स्वातंत्र्य संग्रामात खूप महत्वाचा वाटा आहे. क्रिस्टो सिंग यांच्या कार्याची महती लोकांपर्यंत पोहोचली नाही. त्यांच्या लढयाची गोष्ट आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त “वंदे मातरम” या गाण्याच्या रेकॉर्डिंगने एँंझी स्टुडिओत करण्यात आला. या वेळी क्रिस्टो सिंग यांचे नातू ही उपस्थित होते.  “चक दे इंडिया” या सिनेमातलं मौला मेरे हे गाणं गायलेल्या क्रिश्ना बेऊरा या गायकाच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. याप्रसंगी क्रिश्ना म्हणाले, “मौला मेरे या माझ्या गाण्याला लोकांनी खूप पसंती दिली. वन्दे मातरम हे गाणं जोशपूर्ण आहे. या गाण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. हे गाणं देखील प्रेक्षकांना तेवढंच आवडेल, अशी मला खात्री आहे.  रिकी मिश्रा यांच्यासोबत काम करताना मला खूप आनंद होतो आहे. “

मावेन अँङ दावेन फिल्म्स या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात येणार असून राजहंस कुंवर आणि अमित सिंग हे निर्माते आहेत. रिकी मिश्रा यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची तसेच संगीत दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळली आहे. वरदराज स्वामी यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे. स्वातंत्र्य लढ्यावर आधारित असलेला क्रिस्टो सिंग हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महावितरणच्या त्रिसुत्री कार्यक्रमात एकाच दिवशी 638 कामे पूर्णत्वास -पाच ग्रामपंचायतींमध्ये मोठा प्रतिसाद

0

index

पुणे : महावितरणच्या मंचर विभागातील 5 ग्रामपंचायतींमध्ये तब्बल 242 अभियंते व कर्मचार्‍यांनी एकाच दिवशी विविध प्रकारचे 638 कामे पूर्णत्वास नेली. यात 20 नवीन वीजजोडण्या तर 280 ठिकाणी वीजयंत्रणेच्या दुरुस्ती कामांचा समावेश आहे.

महावितरणच्या त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमातील उपक्रमांना गुरुवारी (दि. 26) मंचर विभागातील (कंसात उपविभाग) निरगुडसर (मंचर), लांडेवाडी (घोडेगाव), पिंपळवंडी (नारायणगाव), बुचकेवाडी (जुन्नर) आणि टिकेकरवाडी (आळेफाटा) या ग्रामपंचायतींमध्ये सुरवात झाली. त्यास ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला व या कार्यक्रमाचे स्वागत केले.

या पाच ग्रामपंचायतींमध्ये महावितरणच्या वतीने मागेल त्यांना वीजजोडणीमध्ये 12 घरगुती, 7 कृषीपंप व एक वाणिज्यिक असे एकूण 20 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय वीजदेयकांबाबत तक्रारी दूर करण्यासाठी 45 वीजदेयकांची दुरुस्ती करण्यात आली. 121 सदोष व नादुरुस्त मीटर बदलण्यात आले. ज्या मीटरचे रिंडींग घेतले जात नव्हते अशा 101 मीटरचे रिंडींग घेणे सुरु करण्यात आले. तसेच 71 वीजमीटरची तपासणी करण्यात आली. वीजयंत्रणेमधील वाकलेले वीजखांब सरळ करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व किटकॅट बदलणे, रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्‍या झाडाच्या फांद्या तोडणे आदी प्रकारचे एकूण 280 कामे पूर्ण करण्यात आली.

पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, मंचर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश खांडेकर यांनी ग्रामपंचायतींमध्ये जाऊन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये सहभाग घेतला. पाचही ग्रामपंचायतींमध्ये संबंधीत उपविभागातील सुमारे 40 ते 45 अभियंते व कर्मचारी त्रिसुत्री कार्यक्रमासाठी दिवसभर कार्यरत होते.  या पाचही ग्रामपंचायतींमधील वीजयंत्रणा, वीजदेयक आदींबाबतच्या तक्रारी एकाच दिवशी व गावातच निकाली निघाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा आनंद दिसून आला व या कार्यक्रमाला त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी सहकार्य करण्यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेत असल्याचे चित्र दिसून येत होते. या त्रिसुत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सोमनाथ मठपती, उपकार्यकारी अभियंता सर्वश्री रमेश कावळे (आळेफाटा), अविनाश चौगुले (घोडेगाव), संतोष तळपे (मंचर), विवेक सुर्यवंशी (नारायणगाव), जयंत गेटमे (जुन्नर) आदींसह 25 अभियंते, 206 जनमित्र व 9 लेखा लिपीकांनी सहभाग घेतला.

येत्या गुरुवारी 5 ग्रामपंचायतींमध्ये ‘त्रिसुत्री’ – येत्या गुरुवारी, दि. 3 डिसेंबरला मंचर विभागातील (कंसात उपविभाग) खडकवाडी (मंचर), कुरवंडी (घोडेगाव), मांजरवाडी (नारायणगाव), खानगाव (जुन्नर) आणि बल्लाळवाडी (आळेफाटा) या ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतीमधील वीजग्राहकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

सुरेल संध्याकाळी ‘आयुष्यावर बोलू काही…’ डीएसके समूहाच्या वतीने आयोजन , रसिकांचा भरभरून प्रतिसाद

0

पुणे,  ता. २८ : देते कोण देते…च्या ठेक्यावर आबालवृद्धांनी धरलेला ताल…दमलात

तुम्ही आई बाबा, जरा झोपा आता गाढ… या गाण्यावर झालेला भावनांचा कल्लाेळ अन

मी मोर्चा नेला नाही… या गद्यावर रसिकांचा पिकलेला हशा अशा आल्हाददायी

वातावरणात पुणेकरांची शनिवारची संध्याकाळ रंगली. निमित्त होते डीएसके समूहाच्या

वतीने आयोजित कवी संदीप खरे व संगीतकार डॉ. सलिल कुलकर्णी यांच्या ‘आयुष्यावर

बोलू काही’च्या कार्यक्रमाचे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सतर्फे ग्राहक आणि

हितचिंतकांसाठी न्यु इंंग्लिश स्कूल रमणबागेच्या प्रांगणावर स्नेहमेळाव्याचे आयोजन

केले होते. या वेळी डीएसके समूहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, शिरीष

कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय पाचपोर, अमित कुलकर्णी, भाग्यश्री

कुलकर्णी, तन्वी कुलकर्णी उपस्थित होते.

पाचशेहून अधिक प्रयोग केलेल्या या कार्यक्रमाचा आजचा प्रयोगही पहिल्या

प्रयोगाप्रमाणे तितकाच उत्साहवर्धक वाटतो, असे सलील कुलकर्णी म्हणाले. शुभंकर

याने आठ दिवस सहा पेपर नंतर सु्टटी, अप्रतिम गाणी सादर करत रसिकांची मने

जिंकली. तर आर्या आंबेकरचया अस्सल रागदारीतील आयटम साँग ‘देही वणवा

पिसाटला’, ‘अर्ध्या रात्री सोडून जायचं नाय’ या दोन गाण्यांना प्रेक्षकांना थिरकावयाला

लावले. संदीप खरे यांनी सादर केलेली ‘नसतेस घरी तू जेव्हा’, ‘दमलेल्या बाबाची

कहाणी’ या गाण्याने प्रेक्षकांची मन हेलावले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकांनी ‘अगं बाई

ढग्गो बाई’ या गाणावर धरला. अमर ओक यांचे मंत्रमुग्ध करणारे बासरी वादन,

ढोलकीच्या तालावर नाचविणारा नीलेश परब यांच्या सादरीकरणामुळे रसिक तृप्त

झाले.

या वेळी डी. एस कुलकर्णी यांनी डीएसके समूहाच्या नवीन प्रकल्पांविषयी आणि

भविष्यातील वाटचालीची माहिती दिली. समूहाच्या प्रगतीत ग्राहक आणि ठेवीदार यांचा

सिंहाचा वाटा असल्याची कृतार्थ भावनाही त्यांनी व्यक्त केली.

ड्रीमसिटी सारख्या प्रकल्पामधून केवळ घरे बांधण्याचा विचार नसून कुटुंबातील

प्रत्येकाला एकत्र आणण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी मेकिंग ऑफ

ड्रीमसिटी ही ध्वनिचित्रफितही दाखवण्यात आली.

यावेळी गायक आणि कलाकारांचा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आयुषच्या योजनांमधून समर्थ भारताचे स्वप्न साकार होईल—श्रीपाद नाईक

0

पुणे- आरोग्याच्या तक्रारीमुळे अनेक लोक व विशेषत: महिला पीडित आहेत. ‘आयुष’च्या

आरोग्याबाबत अनेक योजना आहे. ‘शारदा शक्ती’ सारख्या उर्जा असलेल्या संघटनांच्या

माध्यमातून ‘आयुष’च्या योजना गावागावात नेऊन जनजागृती झाली तर समर्थ भारताचे स्वप्न

पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी रविवारी

केले.

‘शारदा शक्ति’ महिलांचे राष्ट्रीय संघटन ही ‘शक्ति’ या राष्ट्रीय संघटनेची पश्चिम महाराष्ट्रातील शाखा

आहे. त्यांच्या वतीने टिळक आयुर्वेद महाविद्यालय व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिटयूट ऑफ

हेल्थ सायन्सेस या संस्थांच्या सहकार्याने ‘स्वस्थ नारी – समर्थ भारत’ हे उद्दिष्ट  डोळयासमोर ठेवून

आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला आरोग्यः आव्हाने आणि उपाययोजना’ या विषयावरील दोन दिवसीय

राष्ट्रीय परिषदेचा समारोप श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते.  स्वागत

समिती अध्यक्ष डॉ. जयश्री फिरोदिया, या परिषदेचे स्थानिक पालक डॉ. विजय भटकर, डॉ.के. आर. संचेती,

शारदा शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुधाजी तिवारी,  संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. माया तुळपुळे,

सचिव डॉ. लीना बावडेकर, डॉ. अंकिता बोहरे, श्रीमती बिंदू सुराज  हे यावेळी उपस्थित होते. पुणेरी पगडी,

शाल, स्मृतीचिन्ह देवून संयोजकांनी नाईक यांचा सत्कार केला.

नाईक म्हणाले, आर्थिक, सामाजिक, राजकीय, आध्यत्मिक स्वास्थ्य जसे महत्वाचे आहे तसेच महिलांचे

शारीरिक स्वास्थ्य हेही महत्वाचे आहे. पूर्वी महिला घरातील धुणे धुणे, विहिरीतून पाणी काढणे, मसाला

तयार करणे अशी अंग मेह्नितीची कामे करत. त्या कामांमधून शरीरातील घाम बाहेर टाकला जात असे.

मात्र, आधुनिक युगात शारीरिक श्रमाची कामे महिला करत नाहीत. त्यामुळे शरीरातील घाम बाहेर पडत

नाही. पूर्वी पुरुषांमध्ये आढळणारे रक्तदाब, मधुमेह, असे आजार आता महिलांमध्येही आढळू लागले

आहेत. त्यामुळे  आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी नियमित

व्यायाम, योगा करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील महिला अजूनही कुपोषित आहेत. या महिला

‘अॅनिमिया’ने पीडित असतात. पोषणासंबंधी ग्रामीण भागात अजूनही स्रियांच्या बाबतीत भेदभाव केला

जातो. यामध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. एकीकडे कलाक्षेत्र, राजकारण अशी पुरुषांचे वर्चस्व

असलेले क्षेत्र स्रीयांनी पादाक्रांत केली आहेत. वैमानिक होण्यापर्यंत तिची मजल गेली आहे. तर दुसऱ्या

बाजूला तिचे शोषण अजूनही होते आहे. केंद्र सरकारच्या ‘आयुष’ विभागाच्या महिलांसाठी अनेक योजना

आहेत. त्या गावागावातील महिलांपर्यंत शारदा शक्ती सारख्या महिला संघटनांनी पोहचविल्या तर समर्थ

भारताचे स्वप्न नक्की साकार होईल.

या दोन दिवसांच्या परिषदेतून अनेक निष्कर्ष निघाले असतील त्यावर विचार करून ‘आयुष्’च्या

माध्यमातून उपाय केले जाऊ शकतात असे सांगून नाईक म्हणाले, आयुषच्या उपचार पद्धतीमुळे

लठ्ठपणा, दमा, यांसारखे रोग पुन्हा होण्याची शक्यता कमी असते.

डॉ. संचेती म्हणाले, महिलांचे आरोग्य हा केंद्रबिंदू ठेऊन भरविण्यात आलेल्या अशा प्रकारच्या परिषदेची

अत्यंत आवश्यकता आहे. आपण गुढघ्याची शस्त्रक्रिया करत असलो तरी आयुर्वेदिक उपचार रुग्णांना देतो.

अॅलोपथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांच्या एकत्रित उपचाराचा चांगला उपयोग होतो असे त्यांनी

सांगितले.

डॉ. सुधा तिवारी म्हणाल्या, महिला या संस्कृती व संस्काराचे प्रतिक आहे तरी अजूनही भ्रूणहत्या,

कौटुंबिक हिंसाचार याला महिलांना सामोरे जावे लागते. ४२ टक्के महिलांची प्रसुती अजूनही दवाखान्यात

होत नाही. परंतु यासाठी सरकारने केवळ कायदे करून काही होणार नाही. त्यासाठी शारदा शक्ती सारख्या

संघटनांनी काम करण्याची आवश्यकता आहे. महिलांचा सर्वांगीण विकास त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व

त्यांना सक्षम करण्यासाठी शारदा शक्तीतर्फे अनेक कार्यक्रम राबविले जातात असे त्यांनी सांगितले.

डॉ. लीना बावडेकर यांनी या परिषदेमागचा हेतू स्पष्ट केला, डॉ. माया तुळपुळे यांनी परिषदेच्या

वाटचालीची माहिती दिली तर डॉ. अरुणा चाफेकर यांनी दोन दिवसांच्या परिषदेचा आढावा घेतला.

या परिषदेत वैद्यकीय शाखेतील १३५ प्राध्यापक व विद्यार्थी यांनी शोधनिबंध सादर केले. तसेच काही

संशोधकांनी आपले विषय पोस्टर्सच्या माध्यमातून प्रदर्शित केले होते. यातील उत्कृष्ट पाच शोधनिबंध व

चार पोस्टर्सना पारितोषिके यावेळी देण्यात आली.

डॉ. माधुरी पवार, ऐश्वर्या अग्रवाल, डॉ. अनुराधा कुलकर्णी, डॉ. शोभित दवे, व लिली बेरा यांनी उत्कृष्ट

शोधनिबंधासाठी तर डॉ. प्रतिभा फाटक, डॉ. पल्लवी गोरडे, डॉ. सरिता भुतडाव सेफिना वर्गीस यांना

उत्कृष्ट पोस्टर्ससाठी पारितोषिके देण्यात आली.

सुत्रसंचालन डॉ. रुपाली पानसे यांनी केले तर डॉ. राजश्री कशाळकर यांनी आभार मानले.

rsz_1logo-for-portal