Home Blog Page 3519

किशोरकुमार यांच्या अखेरच्या श्वासाची कहाणी… लीना चंदावरकर यांच्या शब्दात …ऐका….

0

किशोरकुमार यांच्या अखेरच्या श्वासाची कहाणी… लीना चंदावरकर यांच्या शब्दात …ऐका….
(पुणे पत्रकार परिषद -२२/१२/२०१५ )

महावितरणमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची परिमंडलनिहाय पडताळणी

0

power_big_10

 मुंबई :

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या विविध पदांच्या नोकर भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी महावितरणच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली असून या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडलात करण्यात येणार आहे. या पडताळणीनंतर उमेदवारांची नियुक्ती संबंधित परिमंडलांतर्गत करण्यात येईल.

 परिमंडलातील रिक्त व उपलब्ध पदांच्या अनुषंगाने आणि उमेदवारांनी नियुक्तीकरिता दिलेल्या पर्यायाचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन उमेदवारांचा परिमंडलनिहाय कागदपत्रांचा पडताळणी कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्याच परिमंडलात सविस्तर नेमणूक देण्यात येईल.

 या निवड झालेल्या उमेदवारांपैकी सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी दि. 04 जानेवारी 2016 ला तर कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदावर निवड झालेल्या उमेवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. 11 जानेवारी 2016 ला संबंधित परिमंडल कार्यालयामध्ये करण्यात येईल. 

 निवड झालेल्या उमेदवारांनी शैक्षणिक व आवश्यक त्या मूळ प्रमाणपत्रांसह निश्चित केलेल्या परिमंडलात व निर्धारित केलेल्या दिवशी आपल्या कागदपत्रांच्या पडताळणीकरिता हजर रहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. 

महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकपदी श्री. संजीव कुमार

0

index

मुंबई :-

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी श्री. संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. श्री. संजीव कुमार हे 1993 च्या भारतीय प्रशासन सेवेच्या (आयएएस)  तुकडीचे अधिकारी असून त्यांनी  यापूर्वी  केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील महत्त्वांच्या पदांवर काम केलेले आहे.

श्री.संजीव कुमार यांनी आयआयटी रुरकी येथून इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशनमध्ये बी.टेक केले असून आयआयटी कानपूर येथून कम्युनिकेशन इंजिनियरींगमध्ये एम.टेक केलेले आहे. तसेच मुंबई विद्यापीठातून एम.बी.ए. केलेलेे आहे. 

श्री. संजीव कुमार केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि दारिद्र्य निमूर्लन (शहर) या विभागात सहसचिव आणि सर्वांसाठी घरकुल या विभागाचे मिशन संचालक म्हणून कार्यरत होेते. तसेच त्यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारच्या ऊर्जामंत्रालयात संचालकम्हणून व राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना आणि आर-एपीडीआरपी  या योजनांच्या प्रमुख पदांची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळलेली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा व जलसंधारण, विक्रीकर, उद्योग या विभागांसह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी)सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री. संजीव कुमार यांनी कार्यभार सांभाळला आहे. तसेच त्यांनी गोंदिया आणि जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि नागपूर  विभागाचे विभागीय आयुक्त अशा विविध पदांवरही काम केलेले आहे.

पुणे ‘हिट आर्यंलंड’ होणार नाही यासाठी काम करा: खासदार वंदना चव्हाण

0
पुणे :
‘कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण जपण्याबाबत अद्याप नियम, मार्गदर्शक सूचना भारतात तयार झाल्या नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधी, शास्त्रज्ञ, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी एकत्र येऊन कृती कार्यक्रम ठरवण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी केले.
पॅरीस हवामान परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर ‘नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटीज’ आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. हे व्याख्यान पालिकेच्या वडके सभागृहात झाले.
क्योटो पर्यावरण परिषदेनंतर ‘पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी पर्यावरण वाचविण्यासाठी राष्ट्रीय कृती कार्यक्रम तयार केला होता. मात्र, तसाच कृती कार्यक्रम राज्य, जिल्हा आणि गावपातळीवर तयार झाला पाहिजे.’
पुणे हे पर्यावरण अहवाल तयार करणारे पहिले शहर होते. मात्र, आज पुण्याच्या पर्यावरणाची परिस्थिती चिंताजनक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे, कार पूल सारख्या गोष्टी पुढे आणणे, कचरा वर्गीकरण बंधनकारक करणे, सोसायटीतील ‘व्हर्मिकंपोस्ट पिट’ वापरात ठेवणे बंधनकारक करणे आवश्यक आहे. घनकचरा व्यवस्थापन सुधारले पाहिजे.
पुणे पालिका आणखी उत्तरदायी होणे आवश्यक आहे. पालिकेच्या पातळीवर अनेक गोष्टी होणे आवश्यक आहे. त्यात जैववैविध्य उद्यानासाठी राखीव टेकड्यांवर अतिक्रमणे होऊ न देणे, मल:निस्सारण प्रक्रिया कार्यक्रम करणे, पालिकेच्या इमारती पर्यावरणपूरक (कार्बन न्यूट्रल) करणे, आवश्यक आहे. यातून पुणे हे पर्यावरणाला जपणारे शहर आहे, अशी प्रतिमा पुढे येणे गरजेचे आहे.
पुणे पालिकेचा कचरा व्यवस्थापन आणि अन्य कारणांसाठी देशपातळीवर गौरव होत असला तरी आपण देशात खरेच उत्तम मॉडेल करून दाखविण्यात यशस्वी झालो आहोत का, याचे आत्मपरिक्षण केले पाहिजे.
पुण्याला असलेले झाडांचे आच्छादन विरळ होऊ नये यासाठी दक्ष राहिले पाहिजे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या (कार्बनसिंक) टेकड्या, वने, मोकळ्या जागा यांची संख्या, आकार कमी होता कामा नये.
‘पुणे हे ‘हिट आर्यंलंड’ होणार नाही यासाठी सर्वांनी दक्ष राहिले पाहिजे, कार्यरत राहिले पाहिजे’ असेही त्यांनी सांगितले.
नगररचना तज्ज्ञ अनिता बेनिंजर-गोखले यांनीही मनोगत व्यक्त केले. सतीश खोत यांनी सूत्रसंचालन केले. उपायुक्त ओमप्रकाश बकोरिया, मंगेश दिघे, शशिकांत दळवी, ‘सेव्ह पुणे हिल्स् इनिशिएटिव्ह’चे दीपक बिडकर, पर्यावरण प्रेमी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘गुरु’च्या तालावर थिरकायला सज्ज होणार महाराष्ट्र

0

index1 index2

मुंबई-

दिग्दर्शक संजय जाधव यांच्या दिग्दर्शनाची झलक आपल्याला ‘गुरु’ सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. त्याच्या अप्रतिम दिग्दर्शनाने सिनेमात एक वेगळीच लकाकी येते. दिग्दर्शनाची एक अनोखी स्टाईल संजय जाधव यांनी निर्माण केली आहे. त्याच्या दिग्दर्शनाची आणखी एक छटा गुरु सिनेमात पाहायला मिळणार आहे. २२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या गुरु सिनेमाची निर्मिती इरॉस इंटरनॅशनल, बॅगपायपर सोडा आणि ड्रीमिंग ट्वेंटी फोर सेव्हनने केली असून हा सिनेमा येत्या वर्षातील धमाकेदार फिल्म असेल. एंटरटेनमेंटचं कमप्लीट पॅकेज असलेला डॅशिंग गुरु प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल यात शंका नाही. एका मागोमाग एक सुपरहिट सिनेमे देणारा आणि महाराष्ट्राचा लाडका सुपर हिरो अभिनेता अंकुश चौधरी या सिनेमातून आपल्याला झकास लुकमध्ये दिसणार आहे. त्याचा हाच बेस्ट लूक आणि त्याची सिनेमातील भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचाविणाऱ्या धमाकेदार टायटल साँग लाँच करण्यात आलं. अंधेरी येथील इरॉस इंटरनॅशनलच्या प्रीविव्ह्यू थिएटरमध्ये या गाण्याचा पहिला वहिला लूक सिनेमातील कलाकारांनी एकत्र अनुभवला.  यावेळी उमेश जाधव यांच्या तालावर आणि अमितराज यांच्या संगीतावर अंकुश चौधरी, संजय जाधव तसेच अमितराज आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमने ताल धरला. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे गुरूच्या सगळ्या टीमने तसेच उपस्थित कलाकारांनीही  ‘गुरु’ स्टाईलचे रीफ्लेक्टर गॉगल्स लावले होते. आणि त्यामुळेच संपूर्ण वातावरण ‘गुरुमय’ झालं होतं. या धमाकेदार सॉंग लाँचनंतर गुरु सिनेमाच्या ऑफिशियल पोस्टरचे लाँच अंकुश आणि संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. हे धडाकेबाज आणि श्रोत्यांना आपसूक ताल धरायला लावणारं गाणं मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या गायक, संगीतकार आणि गीतकार या त्रिकुटाने केलं आहे. गीतकार सचिन पाठक (यो) यांनी लिहिलेल्या “हुं बडे जिगरवाला थोडासा हू चालू,  जेंटलमन में हू सबका गुरु!”… या गाण्याला गायक आदर्श शिंदे यांनी तुफान आवाज दिला आहे. मराठी चित्रपटातील आघाडीचे संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी दिलेलं  हे गाणं प्रेक्षकांच्या नक्की पसंतीस उतरेल. वर्षाच्या सुरुवातीला अमितराज यांचं हे गाणं सुपर डूपर ठरून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात तुफान कल्ला करेल यात शंका नाही. अंकुशवर चित्रित झालेल्या या गाण्या बद्दल त्याला यावेळी विचारले असता, तो म्हणाला की, “हिरोच्या एन्ट्रीचं सॉंग करायला मिळालं याचा आनंद मला वाटतो, कलरफुल गुरु तुम्हाला या गाण्यातून पाहायला मिळेल.हर्षदा खानविलकर आणि कश्मिरा यांनी मिळून गुरुच्या लूकवर मेहनत घेतली आहे. लोकांना अफोर्ड होणारी स्टाईल या सिनेमाच्या निमित्ताने मिळणार आहे. गुरूची खासियत म्हणजे एक नवी स्टाईल स्टेटमेंट या सिनेमातून लोकांना पाहायला मिळणार आहे. संजय जाधव यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव हा खूप छान होता, यानंतर अनेक सिनेमे त्यांच्यासोबत करायची इच्छा आहे.”   तर संजय जाधव यांनी सांगितले की, “माझं खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं कि, हिरोची एक तरी फिल्म आपण करावी, ज्यात फक्त आणि फक्त हिरोलाच जास्त महत्व मिळायला हवं. त्यानुसार स्क्रिप्टवरती काम सुरु केलं आणि त्यातूनच गुरुची निर्मिती झाली.  गुरूचा टायटल साँग बनवताना हिरोला फोकस ठेवण अपेक्षित होतं, त्यामुळे या उद्देशानेच मी अमितराजला गाण कंपोझ करायला सांगितलं. अमितराज याने अपेक्षेप्रमाणे खूपच छान गाणं तयार केलं आहे.”  गुरु सिनेमाच्या या टायटल साँगच्या टीझरला सोशल साईटवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सिनेमातील या गाण्याला प्रेक्षकांकडून नक्कीच पसंती मिळेल अशी आशा गुरु सिनेमाच्या टीमने व्यक्त केली आहे.

किशोरदा यांनी मला जगण्याचे मोठे बळ दिले: लीना चंदावरकर -लीनाजीनी लिहिलेल्या ‘सपने बनाता हूँ या अल्बमचे उद्या प्रकाशन

0

leena leena2 leena3

पुणे: एरव्ही मरण्याचे नाटक करणारे माझे पती जेव्हा १३ ऑक्टोबर १९८७ रोजी खरेच या जगातून निघून गेले. तेव्हा मला वाटले की हे एक दुस्वप्नच आहे. चिमटा काढला की आपण या स्वप्नातून बाहेर पडू. पण ते वास्तव होते. या प्रखर वास्तवात व किशोरदांच्या पश्‍चात जगण्याचे बळ त्यांनीच मला दिले. त्यांच्या प्रेरणेनेच मी गीतकारही झाले, अशी कृतज्ञ भावना १९७०च्या दशकातील हिंदी सिनेमांमधील लोकप्रिय नायिका लीना चंदावरकर यांनी व्यक्त केली.
गुलमोहोर कन्स्ट्रक्शन आयोजित हार्मोनी पुणे तर्फे ‘मैने कुछ खोया है, मैने कुछ पाया है’ या कार्यक‘मात लीनाजी यांनी त्यांच्या सुपरहिट सिनेमातील काही निवडक गाणी सादर करण्यात येत आहेत. त्यात ढल गया दिन, गम का फसाना, जाने क्यो लोग महोब्बत करते है, इत्यादी गाण्यांचा समावेश आहे. लीना चंदावरकर यांच्याबरोबर होत असणार्‍या या गप्पांच्या मैफिलीत त्यांचा स्वत:चा तसेच किशोरदांबरोबरचा जीवनप्रवास त्या सांगणार आहेत, असे आयोजक व गायक मकरंद पाटणकर यांनी सांगितले. पाटणकर यांच्यासह या कार्यक‘मात अली हुसेन, सुवर्णा माटेगावकर, मेधा चांदवडकर गाणी सादर करणार आहेत. संगीत संयोजन विवेक परांजपे यांचे असून या कार्यक‘माचे निवेदन आर. जे. स्मिता करणार आहेत.

धारवाड येथील आपले बालपण ते वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी ‘मन का मित’ या सिनेमातील काम करण्यापासून ते सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी विवाह, किशोर कुमार यांच्याशी दुसरा विवाह याबद्दल लीना चंदावरकर यांनी प्रथमच  प्रसारमाध्यमांशी कोणताही आडपडदा न ठेवता मनमोकळा संवाद साधला. किशोरकुमार यांचा चौथा आणि आपला दुसरा विवाह कसा झाला याचा जणू र्आँखो देखा हाल त्यांनी कथन केला.
किशोरदांचे निधन झाल्यानंतर १९९० पासून आपण गीतकार झालो. गीत लिहिताना ते जणू मला प्रॉमटिंग करताहेत असे वाटते, असे लीना चंदावरकर म्हणाल्या. कुमार ब‘दर्स मीडिया (केबीएम)तर्फे ‘बाबा मेरे’ आणि आता ‘सपने बनाता हूँ’ हा लीनाजींचा दुसरा म्युझिक अल्बम बुधवारी यशवंतराव चव्हाण रंगमंदिरात संपन्न होत आहे. या अल्बममध्ये एकंदर १० गाणी असून त्यातल्या अमीत कुमार यांनी गायलेल्या एका गाण्याचे दृकश्राव्य प्रदर्शन यावेळी करण्यात येईल, असे पाटणकरांनी सांगितले.

‘नटसम्राट’च्या कलाकारांसह ‘चला हवा येवू द्या ‘बुधवारी बालेवाडीत …

0

पुणे-येत्या १ जानेवारीला प्रदर्शित होणारा बहुचर्चीत ”नटसम्राट’ ‘ च्या कलावंतांचा संच आणि झी मराठीवरील ‘चला हवा येवू द्या ‘ चा जोरदार कार्यक्रम अशी पर्वणी परवा बुधवारी २३ तारखेला पुणेकरांना बालेवाडी क्रीडासंकुलात उपलब्ध झाली आहे .येथे विनोदाचे वादळ घेवून येणारे ” डॉ. निलेश साबळे , भाऊ कदम , भारत गणेशपुरे , कुशल बद्रिके ,सागर कारंडे,आणि विनीत बोंडे  आज पुण्यात दाखल झाले . चला हवा येवू द्या या कार्यक्रमाचा सध्या महारष्ट्र दौरा सुरु आहे . पनवेल पासून सुरु झालेला हा दौरा सुमारे २ महिने चालणार आहे . या पूर्वी कोल्हापूर सांगली येथे कार्यक्रम करून आल्यावर आता परवा पुण्यात हा जंगी कार्यक्रम होतो आहे .ज्याचे भाग २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी झी मराठीवर प्रदर्शित होणार आहेत . नटसम्राट मधील नाना पाटेकर , मेधा मांजरेकर , सुनील बर्वे , नेहा पेंडसे , मृण्मयी देशपांडे , तसेच महेश मांजरेकर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत . बालेवाडी ची थुरकटवाडी कशी होते ते आता बुधवारीच समजणार आहे .  दरम्यान या थुरकट वाडीतील कलाकार कुशल बद्रिके आज पुण्यात काय म्हणाला ते पहा ….

अजूनही आहे ते स्वप्न उराशी … मोठ्ठ्या पडद्यावरचा हिरो मनाशी … डॉ. निलेश साबळे

0

पुणे- आज अमिताभ बच्चन , शाहरुख खान , सलमान खान अशी बडी बडी स्टार मंडळी जरी छोट्या पडद्यावर येण्यासाठी  लक्षपूर्वक वाटचाल ठेवीत असली आणि झी टीव्ही  च्या माध्यमातून ‘चला हवा येवू द्या’च्या कार्यक्रमातून जरी मी घराघरात पोहोचलो असलो तरीही … मी इथे हिरो होण्यासाठीच आलो होतो ; स्ट्रगल केला तो हिरो होण्यासाठीच … आता दिग्दर्शक झालो आहे , भविष्यात निर्माता हि होईल पण … अजूनही आहे ते स्वप्न उराशी … मोठ्ठ्या पद्यावरचा हिरो होण्याचे  ….असे सांगत अभिनेता निलेश साबळे म्हणाला , आयुष्यात स्ट्रगल खूप केले पण म्हणावे तसे समाधानकारक यश मिळाले नाही अशा वातावरणात झी टीव्ही ची साथ मिळाली आणि आयुष्यात आता रंगबिरंगी हवा येवू लागली आहे हे खरे आहे . आता टीव्ही वरून खूप प्रसिद्धी मिळाली आहे पण तरी हि मोठ्ठ्या पडद्यावरचा हिरो होण्याचे स्वप्न अजूनही उराशी आहेचआज निलेश साबळे ‘चला हवा येवू द्या ‘ च्या टीम सह पुण्यात आला होता . यावेळी तो बोलत होतामुळचा पुणे जिल्ह्यातील सासवडचा असलेला निलेश  पुण्याबद्दल बोलताना पहा  काय म्हणाला ….

‘स्मार्ट सिटी’ होण्यासाठी रोजगार निर्मीती आणि प्रशासनाचा प्रतिसाद महत्वाचा : अरुण फिरोदिया

0
पुणे : 
      ‘शहराचा आर्थिक विकास होऊन त्यातून रोजगारनिर्मिती, नव्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना, उत्पादकता वाढवणे, असंघटित क्षेत्राचा विकास, फेरीवाल्यांचा विचार या गोष्टी महत्वाच्या आहेत. ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी तसेच त्यानंतर शहराचे नियोजन कायम ठेवण्यासाठी निधी कसा आणि कोठून मिळवावा? परवाने, परवानग्यांचे स्वरूप, भाडे, कर आदींची आकारणी, तसेच अनुदान आणि कर्जाचा वापर कसा करावा या बाबतीतही सल्लागाराची, नियोजन तज्ज्ञांची गरज आहे. पालिकेला आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा आराखडा तयार केला गेला पाहिजे, रोजगार निर्मिती बरोबरच प्रशासनाचा देखील प्रतिसाद मिळाला पाहिजे.’ असे मत ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स प्लॅनिंग’ तर्फे 17 व्या वार्षिक ‘अभ्युदय’ या  राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती अरुण फिरोदिया यांच्या हस्ते सोमवारी झाले यावेळी ते बोलत होते.
      ‘ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स प्लॅनिंग’ तर्फे 17 व्या वार्षिक ‘अभ्युदय’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’ येथे दि. 21 ते 24 डिसेंबर 2015 या दरम्यान करण्यात आले आहे. ‘स्मार्ट सिटीकडे जाताना’ ही या राष्ट्रीय परिषदेची मध्यवर्ती संकल्पना असून, नगर नियोजन, हवामान बदलाचा परिणाम, सार्वजनिक आरोग्य, इको-मोबिलिटी या संकल्पनांवर या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे.
यावेळी बोलताना फिरोदिया पुढे म्हणाले, ‘शहरे स्मार्ट होण्यासाठी आजूबाजूची खेडी स्मार्ट होणे आवश्यक आहे. खेड्यातून शहरात येणार्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे  खेड्यांमध्ये रोजगार व उद्योगधंदे उपलब्ध होऊ शकले नाहीत  तर तो लोंढा शहरांकडे येणारच त्यामुळे खेडी स्मार्ट होणे आवश्यक आहे. देशभरातील विविध 98 शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा आढावा घेण्याबरोबरच परदेशातील स्मार्ट शहरातील कल्पनांची देवाणघेवाण झाली पाहिजे. वाहतूक व्यवस्था, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, पर्यायवरण, सुरक्षितात आदी विषयांवर चर्चा होऊन तसे नियोजन केले गेले पाहिजे.’
राजन कोप यावेळी बोलताना म्हणाले, ‘स्मार्ट सिटी ही संकल्पना अधिक गुंतागुंतिची आहे. आज या परिषदेसाठी देशातील विविध राज्यातून विद्यार्थी उपस्थित आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून आणि विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून ,स्मार्ट सिटी ची नवनवीन मॉडेल्स या निमीत्ताने पाहायला मिळतील. स्मार्ट सिटी म्हणजे सस्टेनेबल, मोबिलिटी, एफॉरर्डेबल, रिस्पॉनसिव्ह अ‍ॅन्ड ट्रान्सपरन्सी असे आहे’.  
डॉ. डी.एस.मेश्राम (अध्यक्ष, आय.टी.पी.आय), अरुण पाथरकर, डॉ. बी.बी. अहुजा (संचालक, ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’)  बी.एन. चौधरी (उपसंचालक, ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’), एस. एल. पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी आपली मनोगते व्यक्त केली.
 शुभम अगरवाल (अध्यक्ष, ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स प्लॅनिंग) यांनी परिषदेची संकल्पना सांगून प्रास्ताविक केले.
या परिषदेसाठी इन्स्टिट्यूट ऑफ टाऊन प्लॅनर्स इंडिया, एरिअन्स, लायन्स क्लब ऑफ पुना इंटरनॅशनल, ‘अल्युमनी असोसिएशन ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’, ‘संजय पगारे अ‍ॅन्ड कंपनी’( नाशिक), ‘कोमत्सू एनटीसी लि.’, ‘पुणे महनगर परिवहन महामंडळ’, ‘पब्लिक वर्क डिपार्टमेंट’( महाराष्ट्र), ‘आदित्य किचन सिस्टीम’, ‘ग्रीव्हज पॉवर’, ‘मार्केश रेस्टॉरन्ट’, ‘डॉमिनोज पिझ्झा’, ‘कॅफे चॉकोलेड’, ‘स्मोक एन जोन्स’, ‘एरिझोना रेस्टॉरन्ट’ यांनी सहकार्य केले आहे. 
परिषदेमध्ये स्वप्नील पाटील, ख्रिस्तोफर बेनिंजर, व्हि.डब्ल्यू.देशपांडे, अनुपम सराफ, सुजीत पटवर्धन, रामचंद्र गोहाड या तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. नगर नियोजन मास्टर प्लान निर्मिती स्पर्धा, मॉडेल निर्मिती स्पर्धा, प्रश्‍नमंजुषा आदी स्पर्धांची रेलचेल या परिषदेत असणार आहे. 
या परिषदेत 700 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून देशभरातील 18 महाविद्यालये सहभागी झाली आहेत. डॉ. प्रताप रावळ, आकांशा नरोडे, संयुक्ता पगारे, राज मुछाल,अक्षय उकीर्डे, संकेत पगारे, ऐश्‍वर्या जयस्वाल, प्रियांका कदम यांनी या परिषदेचे संयोजन केले आहे.
परिषदेच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश झगडे (पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी) हे आहेत. तसेच अरुण पाथरकर (सीडको), डॉ. भोसले, डॉ.पी.एम.रावळ, एम.डी.लेले यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

पोलीस बिनतारी संदेश विभागात ७२८ जागांवर भरती…

0

पुणे-अभियांत्रिकी पदवीधारक , आय टी आय उतीर्ण, उमेदवारांसाठी राज्य पोलीस बिनतारी संदेश विभागात नौकरीच्या विविध संधी उपलब्ध असल्याचे पुणे पोलिसांनी कळविले आहे . एकुण ७२८ जागांवर हि भरती होणार आहे .

सहायक पोलीस उपनिरीक्षक -रेडीओ यांत्रिकी  १९१ पदे, पोलीस हवालदार , बिनतारी यंत्र चालक ४३२ पदे, पोलीस शिपाई कर्मशाळा मदतनीस ५३ पदे … यावर भारती होणार असून ६ जानेवारी २०१६ हि अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे . www.maharecruitment.mahaonline.gov.in या वेबसाईट वरून   अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्ज दाखल करावेत असे पोलिसांनी कळविले आहे

सोबत  पोलिसांचे पत्रक जोडले हे ते पहावे .

index

युवा पिढीच्या जोरावर हिंदुस्थान महासत्ता बनणार : डॉ.रघूनाथ माशेलकर

0
पुणे :
‘भारत हा युवकांचा देश आहे. युवा पिढीच्या जोरावर हिंदुस्थान महासत्ता बनणार आहे. फक्त आवश्यकता आहे ती योग्य मार्गदर्शनाची. त्यामुळे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सर्व क्षेत्रांत सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे’, असे मत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. कै.डॉ. वि. वि. (अप्पासाहेब) पेंडसे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समितीच्या वतीने आयोजित‘भारत 2050 विश्‍वसत्ता’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, महाराष्ट्र नॉलेज फाऊंडेशनचे संचालक प्रा. विवेक सावंत, गोखले इन्स्टिट्यूटचे संचालक राजस परचुरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण अभ्यास विभागाचे प्राध्यापक डॉ. श्रीकांत परांजपे, संयोजन समितीचे ज्येष्ठ उद्योजक रामकुमार राठी, रवि पंडित, मराठा चेबरचे अनंत सरदेशमुख, माजी खासदार प्रदीप रावत, डॉ. अशोक कुकडे, राम कोल्हटकर, डॉ.सतीश देसाई, सुधीर गाडगीळ, ग्राहक पंचायतिचे सुर्यकांत पाठक, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, प्रा.राम डिंबळे, राजीव बसर्गेकर आणि मोहनराव गुजराथी आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहनराव गुजराथी यांनी केले, डॉ.गिरीष बापट यांनी आभार मानले.
डॉ. माशेलकर म्हणाले, भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानात खूप प्रगती केली आहे. अजूनही भारत प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे. काळानुसार बदलणे ही आजची गरज आहे. आपण महासत्तेकडे वाटचाल करतानास सर्व क्षेत्रांत उच्च तंत्रज्ञानाचा विकास आवश्यक आहे. आधुनिकीकरणात कोणीही मागे पडणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. प्रगती जशी होईल तसे नागरिकांनी आपल्या मानसिकतेमध्ये बदल केले पाहिजेत.’
डॉ. देशमुख बदलती शिक्षण पद्धतीविषयी बोलताना म्हणाले, ‘आपल्या देशात विश्‍वविद्यालयांचे जाळे असूनही म्हणावी तशी आपली प्रगती नाही. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया  आहे. त्यामुळे महासत्तेकडे वाटचाल करताना शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 2050 साली शिक्षण हे पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित राहणार असून, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणे आवश्यक आहे. 2050 साली भारतात ऑनलाईनच शिक्षण पद्धती येणार असल्याचे त्यांनी सांगितले.’
प्रा. सावंत म्हणाले, ‘महासत्ता होताना धर्म आणि राज्याची गल्लत होता कामा नये. सर्व समान बुद्धीमत्तेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. हिंदुस्थानची मूल्ये युवकांना दिल्यास महासत्तेकडे जाण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल ठरेल. संस्कृतीचे सभ्यतेमध्ये प्रतिबिंब पाडावे लागेल, त्यासाठी सुशासनाची गरज आहे.
डॉ.राजस परचुरे म्हणाले, आपल्याकडे लष्कर आणि आर्थिक सत्ता आल्यास आपण महासत्ता होण्यास कोण रोखू शकत नाही. मात्र, त्यांचा उपयोग चांगल्या कामांसाठी होणे अपेक्षित आहे. आज अर्थसत्ता  होताना देशातील जनता कमी प्रमाणात समाधानी आहे.’
‘भारत सध्या संयुक्त राष्ट्रसंघात कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी प्रयत्न करत आहे. मात्र भारताने पंडित नेहरू यांच्याप्रमाणे स्वतंत्र विचार दिला, तर भारत 2050 साली विश्‍वसत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. लष्करी सत्ता जोपर्यंत आपल्याकडे नाही, तोपर्यंत आपण विश्‍वसत्ता होऊ शकणार नाही ’असे प्रतिपादन डॉ. श्रीकांत परांजपे यांनी केले.

कर्वेनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई

0

PMC-building

पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेनगर महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे वतीने कर्वेनगर

परिसरातील पाणंद रस्ता, कर्वेनगर स्मशानभूमी रस्ता येथील सुमारे ४६ मिळकतदारांनी अनधिकृत विनापरवाना

केलेल्या बांधकामावर कारवाई करण्यात येऊन २५३२५ चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

तसेच कारवाई अंतर्गत १ हातगाडी, ८ अन्य शेड्स, २० बोर्डस, ७ फ्लेक्स, ६२ बॅनर्स यावरही कारवाई करण्यात आली

सदरच्या मिळकतदारांनी मिळकतीच्या पुढील व मागील व लगतच्या मोकळ्या जागेत शेड, पार्टीशन, रेqलग,

ओqनग शेड या स्वरुपात अनधिकृत बांधकाम केलेले होते.

कारवाईत सहाय्यक अभियंता श्री. वायसे, श्री. देसले, अतिक्रमण निरीक्षक श्री. qशदे, श्री. मुरगुंड, श्री.

qपगळे तसेच वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयातील अन्य अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता.

‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’च्या ‘शहीद अश्फाकउल्ला खान मेमोरियल ट्रस्ट’ची पुण्यात स्थापना इंद्रेश कुमार, शहानवाज हुसेन यांची उपस्थिती

0
पुणे :
रामप्रसाद बिस्मिल यांच्याबरोबर स्वातंत्र्यलढ्यात जीवाची कुर्बाची देणार्‍या शहीद अश्फाकउल्ला खान यांच्या नावे ‘राष्ट्रीय मुस्लिम मंच’ने आज पुण्यात ‘शहीद अश्फाकउल्ला खान मेमोरियल ट्रस्ट’ची स्थापना केली. ‘राष्ट्रीय मुस्लिम मंच’चे संस्थापक इंद्रेश कुमार, माजी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन यांच्या उपस्थितीत ही स्थापना झाली.
मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक कार्यासाठी हा ट्रस्ट कार्यान्वित करण्यात आला आहे. आज महात्मा फुले सभागृह (फातिमानगर) येथे डॉ. एस. एन पठाण, डॉ. शं. ना. नवलगुंदकर, राष्ट्रीय सहसंयोजक लतिफ मगदूम हे व्यासपीठावर उपस्थित होते. अश्फाकउल्ला खान यांचे त्याच नावाचे नातू अश्फाकउल्ला खान यांचा तसेच दादर-नगर-हवेली मुक्ती स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्याआधी अश्फाकउल्ला खान यांच्या स्मरणार्थ अभिवादन मिरवणूक काढण्यात आली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना इंद्रेश कुमार म्हणाले, ‘मुस्लिम समाजात काम करताना शैक्षणिक काम या ट्रस्टमधून सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गरीबांना ‘धान्य बँक’, तलाक मुक्ती, दहशत दंग्यांपासून मुक्ती असे कार्य करीत ‘इन्सान से फरिश्ता’ हा प्रवास सर्वांनी करायचा आहे.’
शहानवाज हुसेन म्हणाले, ‘इंद्रेश कुमार यांच्या मागदर्शनाखाली समाजात सेवेचे काम चालू आहे. शैक्षणिक कामाला चळवळीचे स्वरूप आता येईल. धर्म-जातीवरून भेदभाव भारतात नाही.’
डॉ. एस. एन. पठाण यांनीही असहिष्णुतेचा अनुभव आपल्याला आला नसल्याचे सांगितले. यावेळी क्रांती कारकांच्या कार्याची माहिती देणारे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले.डॉ. मुकुंद हिरवे, मोहमद सलीम अशरफी, डॉ. ताहीर हुसेन, अब्बास अली बोहरा, डॉ. झाकीर हुसेन उपस्थित होते.

ब्राम्हण महासंघाचे कार्य योग्य दिशेने – मोहन जी भागवत

0

पुणे-

अखिल भारतीय ब्राम्हण  महासंघाचे शिष्टमंडळ दि. १६/१२/१५ रोजी नागपूर येथील संघ

मुख्यालय, महाल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहनजी  भागवत यांना भेटले व त्यांना

अ.भा.ब्रा.म. च्या कार्याची तपशीलवार माहिती देण्यात आली. अशी माहिती प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी येथे दिली

ते म्हणाले , महासंघाच्या कार्याचा आढावा घेतल्या नंतर मोहनजींनी ब्राह्मण महासंघाचे कार्य योग्य दिशेने

चालले आहे व ह्याच दिशेने काम चालत राहावे अशी आशा व्यक्त केली आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री

गोविंद कुलकर्णी व सरसंघचालक यांच्या मधे राष्ट्रीय पातळीवरील विविध विषयांवर चर्चा झाली.

ब्राह्मण महासंघाने ब्राह्मणांच्या हिताबरोबरच राष्ट्रातील प्रत्त्येक घटकाच्या हिताचे कार्य करावे,

देशातील सर्व घटकांना सोबत घेऊन समोर जाण्याचे कार्य करावे असे आवाहन यावेळी मोहनजींनी केले.

सरसंघचालकांनी आरक्षणाच्या संदर्भात केलेले वक्तव्य योग्यच होते, त्या वक्तव्याचा राजकीय

लाभाकरिता दुरुपयोग करण्यात आला असे मत ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी भागवतांकडे व्यक्त केले .

या वेळी शाल व श्रीफळ देऊन महासंघाच्या वतीने सरसंघचालकांचा सत्कार करण्यात आला. या

शिष्टमंडळामध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य केशवजी भास्करे महाराष्ट्राचे युवा प्रदेश अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत

धडफळे, उपाध्यक्ष श्री मिथिलेश पाध्ये, चिटणीस भूषण पांढरे, जिल्हा सरचिटणीस श्री आनंद घारे,

कोषाध्यक्ष श्री भूषण बाभरेकर, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ. संपदा गोडबोले उपस्थित होते.

‘दिलवाले’ने कमविले ४१ कोटी तर ‘बाजीराव’ २८ कोटीवर …२ दिवसांची कमाई

0

मुंबई – बाजीराव मस्तानी पेक्षा कमी प्रसिद्धी आणि कमी मार्केटिंग करूनही दिलवाले या चित्रपटाने ‘बाजीराव ‘ ला मागे टाकले आहे गेल्या दोन दिवसात म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी दिलवालेने बॉक्स ऑफिस वर ४१ कोटी ९लाख रुपये मिळविले तर बाजीराव ने २८ कोटी ३२ लाख रुपये मिळविले . बाजीराव ला झालेला विरोध हा बाजीरावची पीछेहाट होण्यास कारणीभूत असल्याचे मानले जाते . संजय लीला भन्साळी यांना हा मोठा धक्का असणार आहे . शाहरुख आणि काजोल हि जोडी आताच्या तरुणाईला मानवेल काय ? असे प्रश्न उपस्थित केले जात होते , रणवीर सिंह आणि दीपिका- प्रियांका या बॉलीवूड मधील  तरुणाईला देखील काजोल आणि शाहरुख ची आज हि एवढी लोकप्रियता असल्याचे दिसून आले आहे .