पुणे- प्रशासनाच्या धोरणांना वैतागलेल्या सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आज आयुक्तांना आज मुख्य सभेत बरेच काही सुनावले . प्रत्येक प्रभागातील आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांमुळे शहरात कचऱ्याची समस्या उग्र होते आहे हा अनेक नगरसेवकांच्या तक्रारीचा धागा पकडून भिमाले यांनी आज सभागृहात , आयुक्तांना म्हटले , भाटीया प्रकरणाची आठवण करून दिली , सहा महिन्यांपासून प्रशासन अशा पद्धतीने काम करते आहे कि ज्यामुळे कचऱ्याचा प्रश्न जैसे थे राहतो आहे , अनेक विकास कामे रखडली आहेत . असा मनमानी कारभार करणार असाल तर आम्ही सर्व पक्षीय एकत्र येवून तुम्हाला राज्य शासनाकडे परत पाठ्विण्याचा ठराव करू शकतो असा इशारा हि त्यांनी दिला .. अर्थात हि सारी भीमगर्जना ,भिमाले स्टाईल.. हि आयुक्तांना समोर ठेवून त्यांनी केली असली तरी एएसआय आणि डीएसाय यांच्या बदल्या करणारे अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार या मागे टार्गेट होत्या अशीही माहिती उजेडात आली आहे . कारण या सर्व भिमटोल्यांना उत्तरे नंतर आयुक्तांनी नाही तर त्यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी अत्यंत शांतपणे दिली …. पहा कशा पद्धतीने भिमाले यांनी लगावले प्रशासनाला भिम टोले … जसेच्या तसे ….
सभागृहनेते भिमालेंची आयुक्तांना दमबाजी … पहा जसेच्या तसे ..(व्हिडीओ)
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या पाककृती स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संगीता गांधी, शिला होनराव, अलका ओझरकर विजेत्या
रँन्को पोपोविच एफसी पुणे सिटीचे मुख्य प्रशिक्षक
दारूबंदीसाठी राज्यसरकारला महापालिकेचे साकडे (व्हिडीओ)
पुणे-गुजरात आणि बिहार प्रमाणे महाराष्ट्रातही संपूर्ण दारूबंदी करावी अशी राज्य सरकारकडे मागणी आणि विनंती करणारा ठराव आज महापालिकेच्या मुख्य सभेत एकमताने संमत करण्यात आला.
उपमहापौर सिद्धार्थ धेंडे आणि सुनिता वाडेकर यांनी हा ठराव 3 एप्रिल रोजी सादर केला होता . सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील ५०० मीटर लगतच्या परिसरात दारूबंदी ची अंमलबजावणी केल्याने याबाबत शासनाचे अभिनंदन याच ठरावात करण्यात आले आहे . जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवाला नुसार दारूसेवनाच्या दुष्परिणामांमुळे प्रत्येक दिवसाला १५ जणांचा मृत्यू होतो यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक त्यानंतर मध्य प्रदेश आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो .दारूच्या दुष्परिणामामुळे राज्याचे आणि देशाचे न भरून येणारे नकसान होत आहे .या बाबींचा विचार करून राज्यात दारूबंदी लागू करावी आणि आणि नागरिकांचे हीत जोपासावे अशी शिफारस या ठरावान्वये करण्यात आली आहे .
हिंजेवाडी येथील रॅडिसन ब्ल्युने जलसंवर्धन आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी उचलले पाऊल
अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते राऊंड टेबल इंडिया स्कूल ‘जनता विद्यालय’ चे भूमिपूजन
पुणे: राउंड टेबल इंडियाने अलीकडेच पिंपरी सांदेस, नावाच्या खेड्यात पेरने फाट्याजवळ जनता विद्यालयाची स्थापना केली आले, ह्यावेळी बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. आता ते राउंड टेबल इंडियाचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.
‘जनता विद्यालया’मध्ये सध्या 650 विद्यार्थी आहेत आणि राउंड टेबल इंडिया या गावातील मुलांसाठी शाळा बांधत आहे. या कार्यक्रमात राऊंड टेबल इंडियाचे वरिष्ठ सदस्य ललित पीट्टी, अविनाश अगरवाल, प्रकाश शाह, विकास गोयल, सचिन खंडेलवाल आणि राहुल वाधवा उपस्थित होते.
ह्या आनंदाच्या प्रसंगी जॅकी श्रॅाफ सर्व विद्यार्थी आणि गावकर्यांबरोबर रमले, ते म्हणाले की मला खूप आनंद झाला आहे की ललित पिट्टी ( अध्यक्ष, पीएसआरटी १७७) ने मला ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. माझे असे मत आहे कि प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे. या कार्यक्रमाला आसपासच्या खेड्यातील जवळपास 2000 लोक उपस्थित होते.
या कार्यक्रमात एका विशेष वृक्षारोपण मोहीम देखील राबविण्यात आली होती ज्यात जॅकी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी रोपे लावली.
अमृता फडणवीस व जीत गांगुली करतायेत पाठलाग
गायिका अमृता फडणवीस आणि ‘आशिकी २’ फेम संगीतकार जीत गांगुली नेमका कोणाचा व कशासाठी ‘पाठलाग’ करतायेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच ? त्यांचा हा ‘पाठलाग’ डाव या आगामी मराठी सिनेमासाठी आहे.
रोज रोज पाठलाग सावली असेल ही अनोळखी
दूर दूर आसमंती आर्तता घुमेल ती कोणाची
असे बोल असलेल्या या गीताचे रेकोर्डिंग नुकतेच संपन्न झाले. नितीन उपाध्याय यांनी ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली डाव ची निर्मिती केली असून, कनिष्क वर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
डाव या सिनेमातील ‘पाठलाग’ हे थ्रिलर सॉंग गायिका अमृता फडणवीस यांनी गायलं असून जीत गांगुली यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. संगीतकार जीत गांगुली यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. रोमांचकारी भयाने खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटाचे हे शीर्षक गीत मंदार चोळकर यांनी लिहिले आहे. या गीतासाठी ‘जॅझ’ पीसचा वापर केल्याने हे गीत आशयातील गूढता आणखीन वाढवते.
जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गाताना खूप मजा आली. प्रेक्षकांना हे गीत एक थरारक अनुभव देईल, असा विश्वास गायिका अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. अमृता यांनी ज्या खुबीने हे गीत गायलं आहे ते अंतर्मनाचा ठाव घेईल असा विश्वास संगीतकार जीत गांगुली व्यक्त करतात. सोबत मराठी चित्रपटासाठी संगीत देण्याचा आनंद ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दिग्दर्शक कनिष्क वर्मा यांच्या मते हे गीत तसेच हा सिनेमाही प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणारा असेल.
डाव या थरारपटाची कथा-पटकथा कनिष्क वर्मा यांनी लिहिली असून संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहिले आहेत. मंगेश धाकडे यांचे पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभले आहे.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
यांनी कामकाज पाहिले. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल
गजानन माने , श्रीकांत बागुल यांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
नादुरुस्त वीजवाहिनीमुळे पेठांमध्ये भारनियमन
पुणे : महापारेषणच्या 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी वेळ लागल्याने तसेच पर्यायी व्यवस्थेमधून विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने पुणे शहरातील कसबा पेठ, सोमवार पेठ व रविवार पेठाच्या परिसरात रविवारी (दि. 24) सायंकाळी उशिरानंतर प्रत्येकी एक तासांचे भारनियमन करण्यात आले.
दांडेकर पुलानजीक फरशी पूल येथे जेसीबीने तोडलेली महापारेषण कंपनीच्या 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी (दि. 23) सायंकाळीपर्यंत 75 टक्के पूर्ण झाले होते. वीजवाहिनीला चारपैकी तीन ठिकाणी जाईंट लावण्याचे काम पूर्ण झाले आहे तर एक जाईंट लावण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणार असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले.
नादुरुस्त वीजवाहिनीचे काम आज रात्री उशिरापर्यंत किंवा सोमवारी (दि. 25) दुपारपर्यंत पूर्ण झाल्यानंतर महापारेषणच्या रास्तापेठ 132 केव्ही जीआयएस उपकेंद्राचा व तेथून सद्यस्थितीत बंद असलेल्या महावितरणच्या सहा उपकेंद्रांचाही वीजपुरवठा सुरु होईल. त्यानंतर इतर उपकेंद्रांतून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु असलेल्या पुणे शहरातील सर्व पेठांसह लूल्लानगर, कोंढवा, मुकुंदनगर, गुलटेकडी, लक्ष्मीरोड, सिंहगड रोड, कॅम्प, मार्केटयार्ड, स्वारगेट या परिसराचा वीजपुरवठा सहा उपकेंद्रातून पूर्ववत करण्यात येईल.
अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी
पुणे-अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त लायन्स क्लब अग्रसेन यांच्यावतीने चंदन नगर येथे साईबाबा मंदिर हॉलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न यामध्ये दंत , नेत्र , चिकित्सा शिबीर घेण्यात आले मोफत चष्मे वाटप करण्यात आले . फिजिओथेरपी , होमिओपॅथी तपासणी आदींचे शिबीर घेण्यात आले .
या शिबिरात ३८० नागरिकांनी लाभ घेतला . या शिबीराचे आयोजन राजेश सुरेंद्रकुमार अग्रवाल , अग्रवाल समाज नगर रोड , अग्रसेन डायनोस्टिक सेंटर , अग्रसेन सेवा संस्था यांनी केली . शिबिराचे उदघाटन लायन परमानंद शर्मा यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे अमोद गोयल , विनोद अग्रवाल , सुरेश अग्रवाल , महेश अग्रवाल , उमेश अग्रवाल , विशाल अग्रवाल , त्रिलोकचंद अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते . या शिबिरासाठी डॉ अविनाश वाघमारे , डॉ. शीतल भुतडा , तनुजा रॉड्रिक्स , डॉ. विनायक चौधरी , डॉ. शिलभद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले
दिलेले जबाबदारी पूर्ण करणे हे प्रदीप रावत यांचे वैशिष्ट्य – खा.अनिल शिरोळे.
‘वाडा’ नाट्यत्रयीचे मोजकेच ११ प्रयोग !
‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’ ही महेश एलकुंचवार लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित गाजलेली नाट्यत्रयी! या नाट्यत्रयीतून भारतीय संस्कृतीची अनेक रूपं व्यक्त होतात. यातलं ‘युगान्त’ हे तिसरं नाटक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी रसिकांसाठी १ ऑक्टोबरला घेऊन येणार आहेत. जीवनानुभव देणाऱ्या या तीनही नाटकांचा सलग ९ तासांचा अविस्मरणीय नाट्यानुभव यानिमित्तानं प्रेक्षकांना लवकरच घेता येईल. यासंबधी अधिक माहिती देण्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले की, मराठी व्यावसायिक रंगभूमीवर ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ करत असताना माझ्यावर थोडसं दडपण होतं. हे नाटक जरी चांगलं असलं तरी आताच्या काळात चालेल का? असा प्रश्न माझ्या मनात होता, पण ‘वाडा चिरेबंदी’ व ‘मग्न तळ्याकाठी’ला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून लक्षात आलं की, पस्तीस वर्षापूर्वी एका नाटककारानं लिहिलेलं, महाराष्ट्रातल्या एका कुटुंबात घडणारं हे नाटक आजही प्रेक्षकांना भिडतं आहे. याचा अर्थ ते काळाच्या कसोटीवर उतरलेलं नाटक आहे. ‘युगान्त’ आणल्यानंतर हे नाट्यवर्तुळ पूर्ण होईल या उद्देशानं ही ‘नाट्यत्रयी’ प्रेक्षकांसाठी रंगमंचावर आणत आहोत. मराठी व्यावसायिक रंगभूमीवर अशी ‘नाट्यत्रयी’ प्रथमच सादर होत आहे हे विशेष. म्हणूनच महाराष्ट्राची सामाजिक व सांस्कृतिक इतिहास मांडणारी ही अभिजात नाट्यकृती सादर होणं ही ऐतिहासिक गोष्ट असून ती महाराष्ट्रभर पोहचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अभिजात कलाकृतीसाठी कलाकारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी यावेळी कलाकारांचे आभार मानले. तसेच याप्रसंगी उपस्थितीत सर्वच कलावंतांनी आपली मनोगतं, अनुभव यावेळी कथन केले. तसचं चांगल्या प्रकल्पाचा भाग होता आलं याचा आनंद ही व्यक्त केला.
या ‘नाट्यत्रयी’चा पहिलावहिला प्रयोग रविवार १ ऑक्टोबर २०१७ ला रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे या ‘नाट्यत्रयी’चे मोजकेच ११ प्रयोग होणार असून ते दर रविवारी सादर होतील. मुंबई- पुण्याशिवाय महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणीही प्रयोग करण्याचा निर्माते व दिग्दर्शकांचा मानस आहे. या ‘नाट्यत्रयी’चं ऑनलाईन बुकिंग बुधवार २० सप्टेंबरपासून सुरु झालं असून सलग नाट्य प्रयोगच्या तिकीटांसोबत नाटकाच्या तिनीही भागांची स्वतंत्र तिकीटंसुद्धा साईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच तिकीट विक्रीच्या दिवसापासून सीझनं तिकिटं बुकिंग काऊंटरवर उपलब्ध होतील.
बदलती एकत्र कुटुंब पद्धती, बदलता काळ, बदलते नातेसंबंध, भावभावनांचा भव्यपट एकाच दिवशी, एकाच थिएटरमध्ये एकापाठोपाठ बघणं म्हणजे नाट्यरसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या नाटकाची निर्मिती ‘जिगीषा’ व ‘अष्टविनायक’ यांची आहे. लेखन महेश एलकुंचवार यांचं असून दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांचं आहे.
निवेदिता सराफ, भारती पाटील, वैभव मांगले, प्रसाद ओक, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, नेहा जोशी, अजिंक्य ननावरे, दीपक कदम, विनिता शिंदे, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ चांदेकर, पूर्वा पवार, राम दौंड, आणि बालकलाकार स्वानंद शेळके या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत आनंद मोडक, राहुल रानडे यांचं आहे. प्रकाश योजना रवी रसिक यांची आहे. वेशभूषा प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांची आहे. दिलीप जाधव व श्रीपाद पद्माकर याचे निर्माते असून सहनिर्माते अर्जुन मुद्दा व संज्योत वैद्य आहेत. जीवनानुभव देत वास्तवाचा ठाव घेणारी ही ‘नाट्यत्रयी’ निश्चितच एक अविस्मरणीय नाट्यानुभव देऊन जाईल
विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवा : शरद पवार
जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना गती देणार: पालकमंत्री गिरीश बापट
विध्यार्थ्यांच्या मानसिक क्षमता वाढवण्याची गरज- महापौर
पुणे- शहरात विध्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदाने कमी पडत आहेत. त्यांच्या क्रीडा कौशल्यासाठीच्या विकासासाठी मैदानांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात मैदाने ब क्रीडांगणासाठी आरक्षण टाकण्यात आली आहेत. हि आरक्षणे बदलू नयेत यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याची गरज आहे. वेळ पडली तर त्यासाठी सर्वानी सर्वसमावेशक भूमिका घेण्याची गरज आहे. असे प्रतिपादन खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी सायंकाळी महेश बालभवनच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात व्यक्त केले.
कोथरूड येथील महेश बालभवन च्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभ कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या सभागृहात काल शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खासदार चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता टिळक यांच्या हस्ते रौप्य्महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ ,प्रसिद्ध उद्योगपती महेश नागरी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थचे अध्यक्ष श्री धनराजजी राठी, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचे अध्यक्ष अतुल लाहोटी, महेश बालभवनच्या अध्यक्षा सौ. संगीत लाहोटी,सचिव गणेश मुंदडा, कार्याध्यक्ष रमेश धूत, सचिव सुशीला राठी, सुरेखा करवा, सदस्य श्रीमती अंजली तापडिया, श्री मनोज कास्ट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बालभवनच्या विध्यार्थ्यानी विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच विजेत्या विध्यार्थ्यांना पारितोषिके यावेळी महापौर मुकता टिळक, खासदार वंदना चव्हाण, मुरलीधर मोहोळ, श्री धनराजजी राठी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना खासदार चव्हाण म्हणाल्या कि, पुणे शहरात पूर्वी मुलांना खेळण्यासाठी भरपूर मैदाने होती. आत्ता मैदानांची संख्या कमी होत चालली आहेत. हे लक्षात आल्यांनंतर आम्ही पुणे मनपाच्या विकास आराखड्यात मैदाने बी क्रीडांगणासाठी आरक्षणाची तरतूद केली. काळाच्या ओघात ती बदलण्याचा प्रयत्नही झाला. तो आम्ही वेळीच विरोध करून थांबवले. आत्ता मुलांच्या क्रीडा कौशल्याच्या विकासासाठी मैदाने वाचवण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे.
महापौर टिळक आपल्या भाषणात म्हणाल्या कि मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी सर्वचजण झटत आहेत. परंतु मुलांच्या मानसिक परिस्थितीकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे काही मुले मानसिदृष्ट्या कमकुवत होतात. हे चित्र बदलण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वानी मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांचे मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
बालभवनच्या अध्यक्षा संगीता लाहोटी यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या प्रगतीविषयी माहिती देताना सांगितले कि, बालभवन संस्थेने पालकांमध्ये चांगलाच विश्वास निर्माण केला. बालभवनच्या विध्यार्थ्यानी संपूर्ण भारतात संस्थेचे नाव रोशन केले. याप्रसंगी श्री राठी, मोहोळ आदींची भाषणे झाली. उपस्थितांचे आभार गणेश मुंदडा यांनी मानले.सूत्रसंचालन संगीत पिपंळीकर यांनी मानले


