Home Blog Page 2971

महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद, राधाकृष्ण विखे पाटील यांची दांडी

0

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वातील महाआघाडीची पत्रकार परिषद शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेला सुरुवात केली. यावेळी काँग्रेस नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल,हर्षवर्धन पाटील,छगन भुजबळ,जयंत पाटील  आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह,जोगेंद्र कवाडे  विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. परंतु, विधानसभेत विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेला दांडी मारली. त्यांचा मुलगा सुजय विखे यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी कांदा काढणीसाठी तयार केले आधुनिक ‘हार्वेस्टर ‘ यंत्र !

0
पुणे :सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (एसएई  इंडिया )  आयोजित ‘ एसएई तिफण २०१९’ स्पर्धेत अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय (संगमनेर) ला प्रथम क्रमांक मिळाला . महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी ) येथे झालेल्या ‘सेल्फ प्रॉपेल्ड ओनियन हार्वेस्टर ‘ निर्मिती  राष्ट्रीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २० मार्च रोजी राहुरी येथे झाला .
सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (एसएई  इंडिया )  ने जॉन डिअर , कमिन्स ,महिंद्रा अँड महिंद्रा ,किर्लोस्कर , बीकेटी ,अलटायर ,आन्सीस ,एआरएआय यांच्या सहकार्याने या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले होते .
पदमभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (सांगली ) यांना द्वितीय तर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (कोल्हापूर ) यांना तृतीय क्रमांक मिळाला . स्पर्धेत देशातील २६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला .या स्पर्धेमध्ये पहिले पारितोषिक २ लाख रुपये ,दुसरे एक लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ५० हजार पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले .
डॉ . के . पी विश्वनाथ (कुलगुरू ,महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी ),डॉ . इंद्र मणी (अध्यक्ष ,आयएसएई),डॉ . डी डी पवार (अधिष्ठाता ,  महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी ),ट्रॉयडेन क्रुझ (वरिष्ठ सरव्यवस्थापक ,जॉन डियर टीसीआय ),निलेश पाठक (प्रमुख ,मॉड्युल इंजिनियरिंग,जॉन डियर इंडिया  ),संदीप महाजन (सरव्यवस्थापक ,जॉन डियर आणि समन्वयक ,तिफण २०१९) यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले .
स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे .  शेतातील कांदा सहज काढण्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त  असे ‘सेल्फ प्रॉपेल्ड ओनियन हार्वेस्टर ‘ हे यंत्र निर्मितीचे आव्हान विद्यार्थ्यांना देऊन ही स्पर्धा झाली . अभिनवता ,उत्पादकता ,इंधनाची बचत ,निर्मिती खर्च ,यंत्रवापरातील सहजता या मुद्द्यांवर तज्ज्ञांनी परीक्षण केले .
१८ मार्च रोजी स्पर्धेचे उदघाटन राहुरी येथे झाले . संदीप महाजन यांनी स्वागत केले . अभिनव वराडे यांनी स्पर्धेची माहिती दिली . संजय निबंधे यांनी सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (एसएई  इंडिया ) चा स्पर्धा आयोजनामागचा हेतू सांगितला . निलेश पाठक यांनी ऑफ हायवे बोर्ड च्या कामाची माहिती दिली . कुलगुरू डॉ . के . पी विश्वनाथ यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांपुढील आव्हानांचा उल्लेख करून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कौशल्याना वाव देणाऱ्या या अभिनव स्पर्धेचे कौतुक केले .
बेस्ट डिझाईन पारितोषिक अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय,बेस्ट कॉस्ट पारितोषिक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (जबलपूर ),बेस्ट प्रॉडक्टिव्हिटी पारितोषिक छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (औरंगाबाद ),बेस्ट सेल्स -मार्केटिंग पारितोषिक दयानंद सागर विद्यापीठ (बंगळुरू ),बेस्ट फ्युएल इकॉनॉमी पारितोषिक डॉ शिंदे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (राहुरी ) याना मिळाले .

गिरीश बापट हेचं पुण्यातून भाजप चे अधिकृत उमेदवार..बारामतीतून कांचन राहुल कुल ..

0

नवी दिल्ली:  ‘माय मराठी ‘ च्या पूर्वीच्याच वृत्तानुसार भाजपने पुण्यातून गिरीश बापट यांचीच अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे .रात्री पावणेदोन वाजता  हि उमेदवारी जाहीर होताच विशेष म्हणजे बापट,उदय जोशी,दीपक पोटे आणि मीडियातील मंडळी अडीच वाजता गिरीजा कट्ट्यावर पोहोचली ….आणि उमेदवारीचे स्वागत केले.तर सकाळी त्यांच्या घरी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी स्वागत अभिनंदनासाठी गर्दी केली .

भाजप आणि काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील काही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने महाराष्ट्रातील सहा उमेदवारांची नावं जाहीर केली असून पुण्यातून गिरीश बापट आणि बारामतीतून कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने भिवंडीतून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने आज रात्री उशिरा ३६ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील सहा उमदेवारांचा समावेश आहे. भाजपने पुण्यातून गिरीश बापट, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, जळगावमधून स्मिता उदय वाघ, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी यांना तर बारामतीतून रासपच्या कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे.

बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल
बारामतीतून भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.भाजप ही जागा स्वत: लढवणार की महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला देणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र भाजपने राष्ट्रीय समाज पार्टीचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देवून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची थेट लढत कांचन कुल यांच्योसोबत होणार आहे. मागच्यावेळी राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामतीतून निवडणूक लढवली होती.

काँग्रेसच्या यादीत टावरे, सुभाष झांबड
काँग्रेसनेही ३५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने चंद्रपूरमधून विनायक बांगडे, जालन्यातून विलास औताडे, औरंगाबादमधून सुभाष झांबड, भिवंडीतून सुरेश टावरे आणि लातूरमधून मच्छिलिंद्र कामत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

राज बब्बर आणि संबित पात्रांना उमेदवारी

काँग्रेसने उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना फत्तेहपूर सिक्रीमधून तर रेणुका चौधरी यांना तेलंगणाच्या खम्मममधून उमेदवारी दिली आहे. तर भाजपने संबित पात्रा यांना ओडिशाच्या पुरीमधून उमेदवारी दिली आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ साठी शिवसेनेच्या उमेदवारांची नावे सेना नेते सुभाष देसाई यांनी २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये उस्मानाबाद येथून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देऊन रविंद्र गायकवाड यांचा पत्ता शिवसेनेने कट केला आहे.  पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्यातून राजन विचारे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक महत्त्वाची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ही यादी आज जाहीर करण्यात आली आहे.उस्मानाबाद मतदार संघामधून विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना डच्चू देण्यात आला असून या जागेवरून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान खासदार रवी गायकवाड यांच्याबाबत स्थानिकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते. याचा फटका गायकवाड यांना बसल्याचे बोलले जात आहे. त्याच प्रमाणे हिंगोली मतदार संघातून हेमंत पाटील यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेने प्रलंबित राहिलेली पालघरची जागा भारतीय जनता पक्षाकडून मागून घेतली आहे. या जागेवरील उमेदवार निश्चित झालेला नसला, तरी इथून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे साताऱ्याच्या जागेवरून भाजपतर्फे लढण्याच्या तयारीत होते. मात्र ही जागा शिवसेनेकडे आल्याने पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच जागेवरून इच्छूक असललेले पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. 

लोकसभा निवडणूक २०१९ साठी युती व आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी

संघ.क्र. मतदारसंघ भाजप-सेना युतीचे उमेदवार राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार
1 नंदुरबार (अ.ज.) हीना गावित (भाजप) के. सी. पडवी (काँग्रेस)
2 धुळे सुभाष भामरे (भाजप) कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस)
4 रावेर रक्षा खडसे (भाजप)
5 बुलढाणा प्रतापराव जाधव (शिवसेना) राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
6 अकोला संजय धोत्रे (भाजप)
7 अमरावती (अ.जा.) आनंदराव अडसूळ (शिवसेना)
8 वर्धा रामदास तडस (भाजप) चारुलता टोकस (काँग्रेस)
9 रामटेक (अ.जा.) कृपाल तुमाणे (शिवसेना)
10 नागपूर नितीन गडकरी (भाजप) नाना पटोले (काँग्रेस)
12 गडचिरोली-चिमूर (अ.ज.) अशोक नेते (भाजप) डॉ. नामदेव उसंडी (काँग्रेस)
13 चंद्रपूर हंसराज अहिर (भाजप) विनायक बांगडे
14 यवतमाळ-वाशिम भावना गवळी (शिवसेना) माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
15 हिंगोली हेमंत पाटील (शिवसेना)
17 परभणी संजय जाधव (शिवसेना) राजेश विटेकर (राष्ट्रवादी)
18 जालना रावसाहेब दानवे (भाजप) विलास औताडे
19 औरंगाबाद चंद्रकांत खैरे (शिवसेना)

सुभाष झांबड

21 नाशिक हेमंत गोडसे (शिवसेना) समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
23 भिवंडी कपिल पाटील (भाजप) सुरेश टावरे
24 कल्याण श्रीकांत शिंदे (शिवसेना) बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
25 ठाणे राजन विचारे (शिवसेना) आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
26 उत्तर मुंबई गोपाळ शेट्टी (भाजप)
27 उत्तर पश्चिम मुंबई गजानन किर्तीकर (शिवसेना)
29 उत्तर मध्य मुंबई पूनम महाजन (भाजप) प्रिया दत्त (काँग्रेस)
30 दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे (शिवसेना) एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
31 दक्षिण मुंबई अरविंद सावंत (शिवसेना) मिलिंद देवरा (काँग्रेस)
32 रायगड अनंत गीते (शिवसेना) सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
33 मावळ श्रीरंग बारणे (शिवसेना) पार्थ पवार (राष्ट्रवादी)
36 शिरुर शिवाजीराव आढळराव (शिवसेना) डॉ.अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
37 अहमदनगर सुजय विखे पाटील (भाजप)
38 शिर्डी (अ.जा.) सदाशिव लोखंडे (शिवसेना) भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
39 बीड डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)
40 उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर (शिवसेना)  राणा जगजितसिंह (राष्ट्रवादी)
41 लातूर (अ.जा.) सुधाकरराव शिंगारे (भाजप) मच्छिंद्र कामत
44 सांगली संजयकाका पाटील (भाजप)
46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग विनायक राऊत (शिवसेना) नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)
47 कोल्हापूर संजय मंडलिक (शिवसेना) धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
48 हातकणंगले धैर्यशील माने (शिवसेना) राजू शेट्टी स्वभिमानी संघटना (राष्ट्रवादी)
3 जळगाव स्मिता उदय वाघ गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
11 भंडारा-गोंदिया
16 नांदेड प्रताप चिखलीकर
20 दिंडोरी (अ.ज.) भारती पवार धनराज महाले (राष्ट्रवादी)
22 पालघर (अ.ज.)
28 उत्तर पूर्व मुंबई संजय दीना पाटील (राष्ट्रवादी)
34 पुणे गिरीश बापट
35 बारामती कांचन राहुल कुल सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
42 सोलापूर (अ.जा.) सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
43 माढा  संजय शिंदे (राष्ट्रवादी)
45 सातारा छत्रपती उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)

व्हायोलिन ,सरोद ,गायनाच्या माध्यमातून ‘वसंत ‘ ऋतूचे स्वागत !

0
भारतीय विद्या भवनमध्ये २८ मार्च  रोजी  ‘ स्वर वसंत ‘ संगीत कार्यक्रमाचे  आयोजन 
पुणे : ‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत    ‘ स्वर वसंत ‘ या संगीत कार्यक्रमाचे  आयोजन    गुरुवार,दिनांक २८ मार्च  रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. व्हायोलिन ,सरोद ,गायनाच्या माध्यमातून ‘वसंत ‘ ऋतूचे स्वागत करणाऱ्या रचना ,एकल प्रस्तुती सादर करण्यात येणार आहे .
 
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत हा ७२ वा कार्यक्रम आहे.
उर्वशी शाह प्रस्तुत  हा  कार्यक्रम  ‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रस्ता  येथे होणार आहे, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली.
पंडित पार्थसारथी (सरोद ),अंजली सिंगडे -राव (व्हायोलिन ),पंडित रामदास पळसुले (तबला ),लीलाधर चक्रदेव (हार्मोनियम ) हे कलाकार सहभागी होणार आहेत . उर्वशी शाह  गायन करणार आहेत .

विज्ञान परिषदेतर्फे ‘मेंदू आणि व्यक्ती विकास’वर डॉ. श्रुती पानसे यांचे व्याख्यान

0

पुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ या विषयावर डॉ. श्रुती पानसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. मयूर कॉलनीतील इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात गुरुवार, दिनांक २८ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता हे व्याख्यान होणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. तासनतास मोबाईल हातात धरून गेम खेळणाऱ्या टीनएजर्सच्या मेंदूत नक्की काय घडतंय? मेंदूतील ‘ग्रे मॅटर’ नावाचा भाग काय विचार करतो? गेम खेळण्याच्या आणि सोशल मीडियाच्या लालसेतून मोबाईल- इंटरनेट व्यसन होते का? आणि व्यसनी माणसाच्या मेंदूतला ‘ग्रे मॅटर’ संकुचित होतो का? त्याचा व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो? अशा अनेक प्रश्नांचा वेध डॉ. श्रुती पानसे आपल्या व्याख्यानात घेणार आहेत. तेव्हा अधिकाधिक विज्ञानप्रेमी, विद्यार्थी व पालकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र. यांनी केले आहे.

ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर यांना २०१९ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

0
पुणे: पुण्यभूषण फाऊंडेशन’(त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘ पुण्यभूषण पुरस्कार’ २०१९   ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर  यांना देण्यात  येणार आहे. हा पुरस्कार पुरातत्वशास्त्र   क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत आहे, अशी माहिती ‘ पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली.
एक लाख रूपये रोख आणि सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरित असलेली  बालशिवाजींची प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ठपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कारार्थीना गौरविण्यात येणार आहे.
पुरस्काराचे यंदाचे ३१ वे वर्ष आहे. या पुरस्काराबरोबर सीमेवर लढताना जखमी झालेल्या ५  सैनिकांना आणि एका वीरमातेलाही गौरविण्यात येणार आहे. यात वीरमाता लता नायर ,रायफल मॅन थानसिंग ,ग्रेनेड मॅन बलबीर सिंग ,नाईक फुलसिंग ,हवालदार प्रमोद सपकाळ ,हवालदार गोविंद बिरादार यांचा समावेश आहे .
पुण्यभूषण पुरस्कारार्थींचे नाव  पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या  अध्यक्षतेखालील निवड समितीने निश्चित केले . 
लवकरच हा पुरस्कार  प्रदान करण्यात येणार आहे.भगतसिंग ,सुखदेव ,राजगुरू यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी या पुरस्काराची घोषणा केली जाते . या तीन हुतात्म्यांची प्रेरणा समोर ठेवून ‘त्रिदल ‘ पुणे संस्थेची स्थापना झाली . या संस्थेने हा पुरस्कार सुरु केला . ————————
पुण्यभूषण पुरस्कार इतिहास 
यापूर्वी ज्येष्ठ गायक पं.भीमसेन जोशी, राजा दिनकर संग्रहालयाचे कै. काका केळकर, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ. बानुबाई कोयाजी, सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी. के. एस.अय्यंगार, डॉ. रा. ना. दांडेकर, डॉ. मोहन धारिया, डॉ. जयंत नारळीकर,  प्रतापराव उर्फ तात्या गोडसे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदु बोर्डे, कै. जयंतराव टिळक, डॉ. जब्बार पटेल, श्री. राहुलकुमार बजाज, डॉ. के. बी. ग्रँट, विख्यात नृत्यसाधिका डॉ. रोहिणी भाटे, डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, विख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. रा. चिं.ढेरे, डॉ. ह. वि. सरदेसाई, श्रीमती निर्मलाताई पुरंदरे, श्री. सुधीर गाडगीळ,  डॉ. सायरस पूनावाला, श्री. प्रतापराव पवार, श्री. भाई वैद्य आणि  डॉ. के. एच. संचेती ,गेल्या वर्षी डॉ प्रभा अत्रे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 तत्कालीन राष्ट्रपती श्री. प्रणब मुखर्जी, माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती मा. श्री.हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी सभापती श्री.सोमनाथ चटर्जी, श्री. मनोहर जोशी, श्री. शरद पवार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिलदेव व सचिन तेंडूलकर, परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, वसंतराव साठे, कै. नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी.सुब्रह्मण्यम्, कै. मधु दंडवते, दि हिंदू चे संस्थापक-संपादक एन.राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, श्री. सुशिलकुमार शिंदे, सी.पी.आय.(एम)जनरल सेक्रेटरी मा.श्री.सिताराम येचुरी, नाट्यदिग्दर्शक श्री.गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.एस.एल.भैरप्पा, प्रसिद्ध नाटककार श्री. महेश एलकुंचवार, मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण, डॉ. विकास आमटे, आशा भोसले, श्री. नारायणमूर्ती,  श्री. शरद यादव, केंद्रिय मंत्री श्री. नितीन गडकरी ,हरिप्रसाद चौरासिया ,अमजद अली खान ,शिवकुमार शर्मा आदि मान्यवरांनी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करून नामांकित पुणेकरांचा सन्मान केला आहे.

बँकिंग व्यवस्थेला सनदी लेखापालांनी बळ द्यावे -सुब्रह्मण्यम स्वामी यांचे मत

0
यसीएआय’तर्फे दोन दिवसीय ‘बँक ऑडिट कॉनक्लेव्ह’
पुणे : “भारतीय बँकिंग व्यवस्था अतिशय चांगली आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये आलेल्या मंदीतही भारताची अर्थव्यवस्था त्यामुळेच तग धरू शकली होती. महसूल निर्माण, संचयी मालमत्ता यामध्ये भारतीय बँका चांगली कामगिरी करत आहेत. नियमांचे उल्लंघन आणि गैरमार्गाने दिलेली कर्जे यामुळे गेल्या १० वर्षात बँकिंग व्यवस्था कमकुवत झाली आहे. सनदी लेखापालांना बँकेच्या व्यवहारांची माहिती असते. त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात आणून देत सनदी लेखापालांनी बँकिंग व्यवस्थेला बळकट करावे,” असे मत राज्यसभा खासदार आणि अर्थतज्ज्ञ सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम भारत विभागीय परिषद (डब्ल्यूआयआरसी), पुणे शाखा आणि पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘बँक ऑडिट कॉनक्लेव्ह’च्या उद्घाटनप्रसंगी सुब्रह्मण्यम स्वामी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत होते. बाणेर रस्त्यावरील यशदा येथे होत असलेल्या या परिषदेला कॉसमॉस बँकेचे चेअरमन सीए मिलिंद काळे, ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय सदस्य सीए आनंद जाखोटिया, ‘आयसीएआय’ पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, ‘आयसीएआय’ पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए संतोष संचेती, सीए समीर लड्डा, सीए काशिनाथ पाठारे आदी उपस्थित होते.
सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, “बँकांनी गेल्या काही वर्षात नियमबाह्य पद्धतीने कोणत्याही प्रकारचे तारण न घेता निरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांच्यासारख्या लोकांना कर्जे दिली. राजकीय हस्तक्षेपाने ही मंडळी कर्जे बुडवून परदेशात पळाली आहेत. आयसीआयसीआय बँकेत पदाचा गैरवापर झाला. हे टाळण्यासाठी सनदी लेखापालांनी पुढाकार घ्यायला हवा. तरच आगामी काळात बँकिंग व्यवस्था आणखी सक्षम बनेल.’
सीए मिलिंद काळे म्हणाले, “लेखापाल हा नियंत्रकाच्या भूमिकेतही असायला हवा. बँकिंग क्षेत्रातील घोटाळे व्यवस्थेचे अपयश आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लेखापालांनी काम केले पाहिजे. आपण वापरत असलेली प्रणाली पुरेशी आहे का, याचाही विचार केला पाहिजे. केवळ क्रेडिट रिस्क (जमा जोखीम) आणि अनुत्पादित कर्जाचे वर्गीकरण एवढेच काम अपेक्षित नाही. बँकिंग व्यवस्थेचा पुरेसा अभ्यास असणेही गरजेचे आहे.”
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “कोणत्याही कंपनीच्या आर्थिक व्यवहारात लेखापाल महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे पारदर्शक व्यवहारावर त्याने अधिक भर दिला पाहिजे. बँकांना अधिकाधिक पारदर्शक कारभारासाठी सल्ला दिला पाहिजे. समाजातील आर्थिक बाबींचे आरोग्य जपणाऱ्या लेखापालाला अधिक सक्षम करण्यासाठी सीए इन्स्टिट्यूट अद्ययावत तंत्रप्रणाली आणि माहितीचा साठा उपलब्ध करून देत आहे.”
रिझर्व्ह बँकेच्या प्रसिद्धिपत्रकानुसार व्यावसायिक बँकांचे लेखापालन करताना अहवालात गंभीर त्रुटी किंवा अफरातफर आढळल्यास रिझर्व्ह बँकेच्या लेखापालाच्या यादीतून नाव कमी होऊ शकते. त्यामुळे लेखापालांनी योग्य ती काळजी घेणे महत्वाचे असल्याचे सीए ऋता चितळे यांनी नमूद केले. सीए संतोष संचेती यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए अभिषेक धामणे यांनी आभार मानले.
दोन दिवसांच्या या परिषदेत ‘आगाऊ रकमेची पडताळणी’, ‘एनपीए-आयआरएसी नॉर्म्स’, ‘गैरव्यवहार तपास’, ‘लेखापरीक्षणाचे नियोजन’, ‘सीबीएस ऑडिट’, ‘आंतरराष्ट्रीय व्यवहारातील तरतुदी’, ‘कर लेखापरीक्षण’, ‘बँक ब्रँच ऑडिट’ आदी विषयांवर सीए आय. बी. सोनावाला, सीए धंनजय गोखले, सीए नितांत त्रिलोकेकर, सीए सुहास देशपांडे, सीए उदय कुलकर्णी, सीए गोकुळ राठी, सीए निरंजन जोशी, व्ही. सोमासेखर आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत वाडेश्वर विझार्डस संघाचा बाद फेरीत प्रवेश

0

वाडेश्वर विझार्डसच्या हिमांशू जैनचा स्पर्धेतील सर्वाधिक 107 गुणांचा ब्रेक

पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत गटसाखळी फेरीत ह गटात वाडेश्वर विझार्डस संघाने सलग तिसरा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत ह गटात वाडेश्वर विझार्डस संघाने रॅक एम अप संघाचा 3-0असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. पहिल्या सामन्यात वाडेश्वर विझार्डसच्या आशुतोष पाधीने रॅक एम अपच्या मयंक भावसारचा 01-38, 67-05, 44-37, 57-44 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. दुसऱ्या सामन्यात ह्रितिक जैन याने सुमित सादुलकरचा 30-32, 74-42, 51-04, 61-39 असा पराभव करून वाडेश्वर विझार्डसला 2-0अशी आघाडी मिळवून दिली.तिसऱ्या लढतीत वाडेश्वर विझार्डसच्या हिमांशू जैन याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत विशाल वायावर 19-47, 50-63, 42-37, 115(107)-15, 38-36 असा सनसनाटी विजय मिळवला. यामध्ये हिमांशू जैन याने चौथ्या फ्रेममध्ये 107 गुणांचा ब्रेक नोंदवून संघाचा विजय सुकर केला. अन्य लढतीत वाडेश्वर विझार्डस संघाने अनुक्रमे एमपी स्ट्रायकर्स व कॉर्नर पॉकेट शूटर्स संघाचा 2-1अशा सारख्याच फरकाने पराभव करून आपले बाद फेरीतील स्थान निश्चित केले.

ब गटात अरुण बर्वे, रोहित नारगोलकर, सलील देशपांडे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी जायंट्स संघाने डेक्कन रुकीज संघावर 3-0 अशा फरकाने विजय मिळवला. ग गटात द बॉल हॉग्ज संघाने147 पूल अँड स्नूकर संघाचा 3-0 असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून अशोक शांडिल्या, लौकिक पठारे, आदित्य अगरवाल यांनी सुरेख कामगिरी बजावली. तर,  दुसऱ्या  सामन्यात द बॉल हॉग्ज संघाने बीएसएसए मास्टर्स संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. तिसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्ज संघाने पूना क्लब ब संघावर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. इ गटात केएसबीए संघाने डेक्कन रायनोजचा 2-1असा तर दुसऱ्या सामन्यात ऑटो पॉट्स संघाचा 2-1 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:

गट अ: क्यू मास्टर्स ब वि.वि.क्यू क्लब किलर्स 2-1(आर्यन राजहंस पराभूत वि.विशाल रजनी 00-48, 60-27, 16-27, 27-61; तुषार सावदी  वि.वि.प्रसाद पराडे 44-01, 54-33, 22-20; अभिषेक श्रीवास्तव वि.वि.अमरदीप घोडके 09-40, 54-62, 43-09, 55-41, 31-12);

गट ब: पीवायसी जायंट्स वि.वि.डेक्कन रुकीज 3-0(अरुण बर्वे वि.वि.श्रीवत्स शेवडे 30-40, 37-44, 44-33, 51-40, 40-21; रोहित नारगोलकर वि.वि.राजेंद्र आढाव 41-09, 11-61, 30-05, 60-24; सलील देशपांडे वि.वि.अश्विन पळणीतकर 22-35, 63-56, 18-26, 78-45, 53-21);

गट क: कॉर्नर पॉकेट क्युईस्ट वि.वि.क्यू क्लब ऍक्सेस् 3-0(राहुल सचदेव वि.वि.सत्चित जामगावकर 27-37, 115(100)-08, 45-10, 78-23; मुकुंद भराडिया वि.वि.निलेश पाटणकर 69(46)-00, 76-25, 50(50)-10; हसन बदामी वि.वि.अभिषेक बोरा 50-25, 61(61)-00, 42-11);

गट इ: केएसबीए वि.वि.डेक्कन रायनोज 3-0(योगेश कुमार वि.वि.प्रशांत पोवार 47-01, 62-38, 36-09; एम.एस.अरुण वि.वि.संतोष धर्माधिकारी  45-00, 65-18, 38-16; दक्ष रेड्डी वि.वि.विठ्ठल ढमाले 34-16, 83-30, 48-30);     

गट इ: केएसबीए वि.वि.ऑटो पॉट्स 2-1( एम.एस.अरुण वि.वि.पारस शहा 05-33, 53-52, 47-07, 59-60, 36-26;  दक्ष रेड्डी पराभूत वि.सिद्देश मुळे 28-35, 19-63, 46-15, 53-64; योगेश कुमार वि.वि.लव बोरीचा 19-40, 69-19, 40-11, 35-45, 49-16);

गट ग: द बॉल हॉग्ज वि.वि.बीएसएसए मास्टर्स 2-1(अशोक शांडिल्या वि.वि.अभिमन्यू गांधी 36-33, 67-55, 29-09; आदित्य अगरवाल पराभूत वि.आनंद रघुवंशी 37-40, 45-70, 17-44; लौकिक पठारे वि.वि.रोवीन डिसुझा 40-02, 31-52, 61-36, 73-69, 41-01);

गट ग: द बॉल हॉग्ज वि.वि.147 पूल अँड स्नूकर 3-0( अशोक शांडिल्या वि.वि.मनोज गाडगीळ 46-16, 70-25, 37-02;  लौकिक पठारे वि.वि.चैतन्य हळबे 28-18, 21-57, 35-42, 68-41, 49-00;  आदित्य अगरवाल वि.वि.सचिन बिचे 58-00, 70-10, 40-12);

गट ग: द बॉल हॉग्ज वि.वि.पूना क्लब ब 3-0(आदित्य अगरवाल वि.वि.पंकज परमार 59-07, 74-09, 80-18; रोहन साकळकर वि.वि.कुणाल वासवानी 39-09, 51-10, 18-27, 59-25; लौकिक पठारे वि.वि.कुमार शिंदे 35-14, 58-78, 35-25, 74-67);

गट ह: वाडेश्वर विझार्डस वि.वि.रॅक एम अप 3-0(आशुतोष पाधी वि.वि.मयंक भावसार 01-38, 67-05, 44-37, 57-44; ह्रितिक जैन वि.वि.सुमित सादुलकर 30-32, 74-42, 51-04, 61-39; हिमांशू जैन वि.वि.विशाल वाया 19-47, 50-63, 42-37, 115(107)-15, 38-36);

गट ह: वाडेश्वर विझार्डस वि.वि.एमपी स्ट्रायकर्स 2-1(आशुतोष पाधी वि.वि.केतन चावला  19-39, 64-35, 37-33, 67-55; ह्रितिक जैन वि.वि.भरत सिसोडिया 34-16, 80-11, 37-24; हिमांशू जैन पराभूत वि.अनुराग गिरी 06-56, 80-00, 44-16, 50-60, 17-38);

गट ह: वाडेश्वर विझार्डस वि.वि.कॉर्नर पॉकेट शूटर्स 2-1(आशुतोष पाधी पराभूत वि.साद सय्यद 05-45, 14-63, 02-32; हिमांशू जैन वि.वि.तहा खान 00-(52)61, 83-47, 43-21, 77-08; ह्रितिक जैन वि.वि.संकेत मुथा 43-17, 72-04, 45-33);

शक्ति स्थापना दिनानिमित्त सविता कुलकर्णी आणि रेश्मा राठोड यांना पुरस्कार जाहीर

0

पुणे-शारदा शक्ति या महाराष्ट्रातील महिला संघटनेतर्फे शक्ति स्थापना दिवस निमित्त रविवार दि. २४ मार्च रोजी
सामाजिक योगदान देणाऱ्या औरंगाबादच्या सविता कुलकर्णी यांना शक्ति प्रेरणा पुरस्कारआणि युवा
कर्तृत्वाबद्दल बदलापूरच्या रेश्मा राठोड या युवतीसआय शक्ति सपोर्ट; या पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
राष्ट्रसेविका समितीच्या पुणे कार्यवाह मीनाताई कानडे कार्यक्रमाच्या प्रमुख असतील. हा कार्यक्रम कर्वे
रस्त्यावरील डेक्कन कॉर्नर येथे असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे दिनांक २४ मार्च रोजी
सकाळी १० वाजता सुरु होणार आहे.


विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरणासाठी शक्ति ही संस्था देशात कार्यरत आहे.
दिनांक २२ मार्च या राष्ट्रीय शक्ति स्थापना दिनानिमित्त शारदा शक्ति या पुणे शाखेतर्फे २४ मार्च रोजी
पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सातत्याने सामाजिक काम करणारी महिला आणि परिस्थितीशी संघर्ष करीत यश मिळवणाऱ्या युवतीस
दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविले जाते. मानपत्र आणि भेटवस्तू, असे शक्ति प्रेरणा पुरस्काराचे स्वरूप आहे.
तसेच प्रशस्तीपत्र, ५००० रुपये रोख आणि भेटवस्तू असे आय शक्ति सपोर्ट पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्त्री शक्ति प्रेरणापुरस्काराच्या यंदाच्या मानकरी औरंगाबादच्या सविता कुलकर्णी या बालपणापासून
राष्ट्रसेविका समितीशी संबंधित असून त्यांनी बीड, आंबेजोगाई, रायगड जिल्हा आदि ठिकाणी सामाजिक
जबाबदाऱ्या पार पाडल्या. १९९२ पासून औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या डॉ.
हेडगेवार रुग्णालयाअंतर्गत गुरुवर्य लहूजी साळवे आरोग्य केंद्रात सामाजिक कामास त्यांनी प्रारंभ केला.
याबरोबरच सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाची त्यांनी स्थापना केली. तसेच ४५ महिला बचत
गटांची स्थापना केली. याशिवाय अन्नपूर्णा अन्नपदार्थ प्रशिक्षण, रचना शिवणकला प्रशिक्षण, दर्पण ब्युटीशियन
प्रशिक्षण, आभूशिका आभूषण प्रशिक्षण केंद्रांद्वारे १५०० हून अधिक महिलांना प्रशिक्षण देऊन महिलांना
रोजगाराची संधी उपलब्ध केली. तेजस्विनी महिला प्रकल्पाच्या माध्यमातून २५ सेवा वस्त्यांमध्ये सामाजिक
नेतृत्वगुण विकास, रक्तक्षय निवारण, नवदांपत्य समुपदेशन, स्वावलंबन या विषयातही त्या काम करीत आहेत.
याशिवाय २५ सेवा केंद्रांमध्ये किशोरी प्रकल्प आणि ममता बालवाडीचे त्यांचे काम चालू आहे. त्यांना अनेक
पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
यंदाच्या ;आय शक्ति सपोर्ट पुरस्काराची मानकरी बदलापूरची रेश्मा राठोड ही राष्ट्रीय खो-खो पटू आहे.
बदलापूरमध्ये एका लहान घरात राहणाऱ्या रेश्माने मोठा भाऊ व बहिण यांच्या प्रोत्साहनाने खो खो खेळत
आंतरशालेय खो-खो स्पर्धा, महापौर चषक खो-खो स्पर्धा याबरोबरच जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय
पातळीवरील खो खो स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपल्या क्रीडा नैपुण्याची चमक दाखवली. भोपाळ येथे झालेल्या
राष्ट्रीय कुमार-कुमारी खो-खो स्पर्धेत तिच्या खेळामुळेच महाराष्ट्राला विजेते पद मिळाले. याचवर्षी प्रतिष्ठेच्या
जानकी पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले. तसेच खेलो इंडिया खेलो= चा ऑल राऊंडर हा
पुरस्कारही तिला देण्यात आला. नुकतीच तिने १२ वी ची परीक्षा दिली आहे.

हॉटेल मॅनेजमेंटच्या तरुणांसाठी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये क्रूज कंपन्या, पंचतारांकित हॉटेलांचा नोकरी मेळावा उत्साहात

0
पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि ईक्लाट हॉस्पिटॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत जॉबफेअरचे आयोजन करण्यात आले होते. कार्निव्हल जगातील सर्वात मोठ्या क्रूजसह अन्य क्रुज कंपन्या आणि देशविदेशातील पंचतारांकित हॉटेल्स या जॉबफेअरमध्ये सहभागी झाले होते. बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल-टुरिझममध्ये हॉटेल मॅनेजमेंट संबंधित सर्वांसाठी आयोजिलेल्या या मेळाव्यात ७०० पेक्षा अधिक तरुणांनी मुलाखती दिल्या. या मेळाव्याचे उद्घाटन बावधनच्या सरपंच पियुषा दगडे पाटील, बबन दगडे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व ईक्लॅट हॉस्पिटालिटीच्या दीपाली पात्रीकर ‘सुर्यदत्ता’च्या संचालिका (जनसंपर्क) कॅप्टन शालिनी नायर, चेतन मुनगंटीवार, नुतन गवळी, ईक्लॅटच्या अनुराधा खोत आदी उपस्थित होते. या मेळाव्यात पुणे-मुंबईसह रत्नागिरी, नुंदुरबार, नाशिक आदी जिल्ह्यातून विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के अभ्यासक्रम पूर्ण केलेले (फ्रेशर्स) होते.

 

रोजगाराभिमुख कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप जागतिक दर्जाचे केंद्र बनले आहे. आज संस्थेतील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या कंपन्यांवर उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम करीत आहेत. त्यामध्ये कार्निवल क्रूझलाइन, हिल्टन साल्सा रिसॉर्ट ओमान, डॅनबुल्स हॉटेल लंडन, अल खलीज पॅलेस दुबई, ओबेरॉय त्रिडंट मुबई यासारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यात प्लेसमेंट्स मिळालेल्या आहेत. यापुढचे पाऊल म्हणजे, ईक्लॅट हॉस्पिटॅलिटीच्या सहकार्याने ‘ग्लोबल सीएसआर इनिशिएटिव्ह फॉर इंटर्नशिप अँड प्लेसमेंट’ उपक्रमांतर्गत सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी व काम करत असलेले तरुण यांच्यासाठी मेगा जॉबफेअरचे आयोजन केले गेले. यामध्ये  पी अँड ओ क्रुजेस, कोस्टा, हॉलंड अमेरिका लाईन, कुनार्ड, सीबर्न, प्रिन्सेस क्रुजेस आदी क्रूज कंपन्या, त्याचबरोबर रिट्झ कार्लटन, ताज विवांता, ल मेरिडियन, नोवाटेल, डबल ट्री बाय हिल्टन, हयात रिजेन्सी, ओकवुड रेसिडन्स, आयबीस, कॉनरॅड, द प्राईड, हॉलिडे इन यांचा समावेश होता. पहिल्यांदाच कार्निवल क्रूज कंपनीने आपल्या क्रूजवर फ्रेशर्सना संधी दिली आहे.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांबरोबरच इतर महाविद्यालयातील तरुणांनाही संधी मिळावी, या सामाजिक भावनेतून हॉटेल मॅनेजमेंटशी संबंधित सर्वांसाठी हा नोकरी मेळावा होता. राज्यभरातून विद्यार्थ्यांनी याला प्रतिसाद दिला, याचा आनंद आहे. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदविका, पदवी आणि पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले व सध्या काम करत असलेल्या तरुणांनी मुलाखती दिल्या. त्यांना त्याचा लाभ होईल, हा विश्वास आहे. या कार्यक्रमाचे नियोजन सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केले.”

‘ एसएई तिफण २०१९’ राष्ट्रीय स्पर्धेत अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय विजेते

0
पुणे :सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (एसएई  इंडिया )  आयोजित ‘ एसएई तिफण २०१९’ स्पर्धेत अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय (संगमनेर) ला प्रथम क्रमांक मिळाला . महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी ) येथे झालेल्या ‘सेल्फ प्रॉपेल्ड ओनियन हार्वेस्टर ‘ निर्मिती  राष्ट्रीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २० मार्च रोजी राहुरी येथे झाला .
सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (एसएई  इंडिया )  ने जॉन डिअर , कमिन्स ,महिंद्रा अँड महिंद्रा ,किर्लोस्कर , बीकेटी ,अलटायर ,आन्सीस ,एआरएआय यांच्या सहकार्याने या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले होते .
पदमभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (सांगली ) यांना द्वितीय तर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (कोल्हापूर ) यांना तृतीय क्रमांक मिळाला . स्पर्धेत देशातील २६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला .
डॉ . के . पी विश्वनाथ (कुलगुरू ,महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी ),डॉ . इंद्र मणी (अध्यक्ष ,आयएसएई),डॉ . डी डी पवार (अधिष्ठाता ,  महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी ),ट्रॉयडेन क्रुझ (वरिष्ठ सरव्यवस्थापक ,जॉन डियर टीसीआय ),निलेश पाठक (प्रमुख ,मॉड्युल इंजिनियरिंग,जॉन डियर इंडिया  ),संदीप महाजन (सरव्यवस्थापक ,जॉन डियर आणि समन्वयक ,तिफण २०१९) यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले .
स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे .  शेतातील कांदा सहज काढण्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त  असे ‘सेल्फ प्रॉपेल्ड ओनियन हार्वेस्टर ‘ हे यंत्र निर्मितीचे आव्हान विद्यार्थ्यांना देऊन ही स्पर्धा झाली . अभिनवता ,उत्पादकता ,इंधनाची बचत ,निर्मिती खर्च ,यंत्रवापरातील सहजता या मुद्द्यांवर तज्ज्ञांनी परीक्षण केले .
 १८ मार्च रोजी स्पर्धेचे उदघाटन राहुरी येथे झाले . संदीप महाजन यांनी स्वागत केले . अभिनव वराडे यांनी स्पर्धेची माहिती दिली . संजय निबंधे यांनी सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (एसएई  इंडिया ) चा स्पर्धा आयोजनामागचा हेतू सांगितला . निलेश पाठक यांनी ऑफ हायवे बोर्ड च्या कामाची माहिती दिली . कुलगुरू डॉ . के . पी विश्वनाथ यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांपुढील आव्हानांचा उल्लेख करून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कौशल्याना वाव देणाऱ्या या अभिनव स्पर्धेचे कौतुक केले .
बेस्ट डिझाईन पारितोषिक अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय,बेस्ट कॉस्ट पारितोषिक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (जबलपूर ),बेस्ट प्रॉडक्टिव्हिटी पारितोषिक छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (औरंगाबाद ),बेस्ट सेल्स -मार्केटिंग पारितोषिक दयानंद सागर विद्यापीठ (बंगळुरू ),बेस्ट फ्युएल इकॉनॉमी पारितोषिक डॉ शिंदे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (राहुरी ) याना मिळाले .

बापटांसाठी दिल्ली दरवाजे ,काकडेंसाठी पुण्याचे दरवाजे खुले…

0
मुंबई-पुण्यातील स्थानिक राजकारणावर नाराज असलेल्या भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची नाराजी दूर करत त्यांच्यावर लोकसभेसाठी पश्चिम महाराष्ट्राच्या प्रचाराची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपविल्याचे घोषित केले  आहे . या वृत्ताने काकडे यांचे भाजपतील स्थानिक स्पर्धक मानले जाणारे गिरीश बापट यांना पुण्याच्या लोकसभेच्या रणांगणात उतरवून त्यांच्यासाठी दिल्लीचे दरवाजे उघडून देण्यात येतील तर काकडे यांच्यावर लोकसभेनंतर पुण्याच्या नेतृत्वाचे दरवाजे उघडतील असा कयास राजकीय वर्तुळातून लावला जातो आहे .
काकडे हे भाजपाची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. खुद्द काकडे यांनी आपण लवकरच काँग्रेस प्रवेश करीत पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांचे मन वळवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. त्यामुळे संजय काकडेंनी उचललेली बंडाची जाहीर पावले थबकली असून ते भाजपासोबतच राहणार आहेत. हे आज स्पष्ट झाले आहे .

मुंबईत आज काँग्रेसचे प्रविण छेडा आणि राष्ट्रवादीच्या भारती पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी खासदार संजय काकडे यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती . या कार्यक्रमातच मुख्यमंत्र्यांनी काकडे भाजपासोबत राहणार असल्याची घोषणा केली. ते स्थानिक राजकारणाने रागवले होते ,रागारागात दिल्लीपर्यंत गेलेही होते पण आता ते आपल्या सोबतच राहतील तसेच त्यांच्यावर लोकसभेसाठी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.काकडे यांचे काम चांगले आहे..त्यांना कॉंग्रेसने तिकीट हि देवू केले होते. पण आता नानांनी निर्णय घेतला कि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम करायचे , स्थानिक पातळीवरील त्यांच्या बाबतचे राजकारण आपण याच पातळीवर संपुष्टात आणू ,नाना आता कुठे अशी शंका नको नाना आता इथेच ..त्यांच्या स्थानिक अडचणी आपण दूर करू असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे .

गेल्या अनेक महिन्यांपासून संजय काकडे हे पुण्यातील भाजपाच्या नेत्यांवर नाराज होते. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठीही ते आग्रही होते. तसेच भाजपाकडून काकडेंना डावलले जात असल्याची चर्चा वारंवार सुरु होती, त्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर होते. तशी त्यांनी घोषणाही केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस हे आपल्या भावासारखे असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले होते. त्यामुळे काकडेंची मनधरणी करण्यात त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध कामाला आल्याचे बोलले जात आहे.

देवेंद्र भुजबळ यांनी निवडणूक लढवावी, मित्रमंडळीचा आग्रह !

0

मुंबई  – देशातील विद्यमान राजकीय परिस्थितीत एकमेकांवर व्यक्तीगत द्वेषापोटी करण्यात येत असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय पक्षांकडे जनहितासाठी ठोस भूमिकेचा अभाव आणि स्वार्थी राजकारण या सगळ्या परिस्थितीतीला कंटाळलेल्या जनतेला समर्थ पर्याय निर्माण करुन देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने केवळ लोक कल्याणाचा ध्यास असणाऱ्या आणि निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींना निवडणे ही काळाची गरज आहे.त्यामुळे त्यागी वृत्तीने काम करणार्‍या निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह असंख्य मित्रमंडळीने त्यांच्याकडे धरला आहे.
श्री भुजबळ यांना निवडणुकीस उभे करण्याबाबत नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीत भुजबळ यांनी खरोखरच निवडणुकीला उभे रहायचे का? भुजबळ यांच्यासारख्या सुसंस्कृत, अभ्यासू, सामाजिक, सांस्कृतिक,आर्थिक, राजकीय जाण व प्रशासकीय ज्ञान असलेल्या व्यक्तींनी निवडून येण्याची कशी गरज आहे, ठाणे लोकसभा मतदारसंघात सध्याच्या घडीला कोणते प्रश्न महत्वाचे आहेत, त्यांची खऱ्या अर्थाने कोण सोडवणूक करु शकते ? ठाणे लोकसभा मतदार संघात कोणत्या समस्यांना जनतेला तोंड द्यावे लागते या व अशा अनेक प्रश्नांवर सांगोपांग चर्चा झाली. मित्रमंडळीचा आग्रह, जनतेची गरज,आपले विचार लक्षात घेऊन लवकरच आपली भूमिका स्पष्ट करू,असे यावेळी भुजबळ यांनी सांगितले. यावेळी विचारवंत,लेखक डॉ. त्र्यंबक दूनबळे,चित्रकार, समीक्षक डॉ. सुभाष पवार, सौंदर्यतज्ञ डॉ. आशिष शिरूरकर,”गप्पागोष्टी”कार जयंत ओक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अभ्यासक तथा निवृत्त तहसीलदार सुभाष कनवाळू,कथाकार गोपीनाथ देवकर गुरुजी,सामाजिक कार्यकर्त्या लीना कुलदीप आढे,सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री भीमसेन तपासे,चंद्रकांत सोनावणे,मेदारी आदी उपस्थित होते.

अडवाणींच्या ऐवजी गांधीनगर मधून अमित शहा तर मोदी वाराणसीतून,महाराष्ट्रातली 16 नावं पहा

0

दिल्ली- लोकसभा निवडणुकीला काही दिवसच उरले आहेत. अशातच सर्व पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. भाजपनेदेखील धुलिवंदनाचे मुहुर्त साधून आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 184 उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या काही जागांचा भाजपच्या पहिल्या यादीत समावेश आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील अनेक अपेक्षित मतदारसंघातील उमेदवारांची नावंही जाहीर झाली आहेत.यात यादीत 182 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

या यादीत महाराष्ट्रातील 16 जागांचा समावेश आहे.लातूरमधील विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड आणि नगरमधून विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. लातूरमधून सुधाकर शृंगारे यांना तर नगर मधून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शाह निवडणूक लढवणार आहे. गांधीनगरमधून यापूर्वी लालकृष्ण अडवाणी या मतदारसंघातून निवडणूक लढवायचे.
  • नितीन गडकरी नागपूरमध्ये निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा मुकाबला काँग्रेसच्या नाना पटोलेंशी होणार आहे.
  • लखनौमधून गृहमंत्री राजनाथ सिंह निवडणूक लढवणार आहेत.
  • अमेठीतून स्मृती इराणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात लढणार आहेत.
  • लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अनेक ज्येष्ठांना घरी बसवलं जाईल, अशी शक्यता माध्यमांमधून व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातली 16 नावं जाहीर-

1- नागपूर – नितीन गडकरी
2- नंदुरबार – हिना गावित
3- धुळे – सुभाष भामरे
4- रावेर – रक्षा खडसे
5- अकोला – संजय धोत्रे
6- वर्धा – रामदास तडस
7- चिमूर-गडचिरोली – अशोक नेते
8- जालना – रावसाहेब दानवे
9- भिवंडी – कपिल पाटील
10- मुंबई नॉर्थ – गोपाळ शेट्टी
11- मुंबई नॉर्थ सेंट्रल – पूनम महाजन
12- नगर – सुजय विखे
13- बीड – डॉ. प्रीतम मुंडे
14- लातूर – सुधाकरराव श्रृंगारे
15- सांगली – संजयकाका पाटील
16- सुजय विखे पाटील

महाराष्ट्रा बाहेरील –

1)वाराणसी – नरेंद्र मोदी

२)गांधीनगर – अमित शाह

3)लखनऊ – राजनाथ सिंह

४)बागपत – सत्यपाल सिंग

५)गाझियाबाद – व्ही. के. सिंग

6)मथुरा – हेमा मालिनी

विजयसिंह मोहितेंना अनेकदा फोन करुनही त्यांनी उचलला नाही : अजित पवार

0

पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार निश्चित केली होती. मात्र, त्यांचा आग्रह दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचा होता. त्या व्यक्तीच्या उमेदवारीला माळशिरस मतदारसंघ वगळता इतर पाच विधानसभा मतदारसंघातून विरोध होता. त्यानंतरही आम्ही विजयसिंह मोहिते पाटलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांनी आपला मोबाईल बंद ठेवून निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिले. हे स्पष्टीकरण देताना अजित पवार यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांचे नाव घेणे टाळले.

अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालय येथे झालेल्या या मेळाव्यास राष्ट्रवादीच्या राज्यसभा सदस्या खा. अॅड. वंदना चव्हाण, शहराध्यक्ष चेतन तुपे, आमदार अॅड. जयदेवराव गायकवाड, पालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, माजी आमदार बापू पठारे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.