Home Blog Page 2955

विकासकामांवर चर्चा करण्याचे कॉंग्रेस ला आव्हान-आमदार विजय काळे

पुणे-
गेल्या पन्नास वर्षांत कॉंग‘ेस पक्षाच्या नाकर्तेपणा मुळे पुणे शहराच्या विकासाचा खेळखंडोबा झाला. युती सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या काळातचे शहराच्या विकासाला गती मिळाली. शहराच्या विकासकामांवर चर्चा करण्यास कॉंग‘ेस धजावत नाही. त्यामुळे वैयक्तिक चारित्र्यहनन करणारे बिनबुडाचे आरोप केले जातात. कॉंग‘ेसने विकासकामांवर जाहीर चर्चा करावी, आम्ही त्यासाठी तयार आहोत असे आव्हान आमदार विजय काळे यांनी दिले.
महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ आज झालेल्या पत्रकार परिषद आमदार काळे बोलत होते. शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रशांत बधे, प्रचार प्रमुख राजेंद्र शिंदे, आरपीआयचे प्रचार प्रमुख ऍड मंदार जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार काळे म्हणाले, ‘गेली अनेक वर्षे कॉंग‘ेस पक्षाची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती. परंतु पुण्याच्या विकासाकडे कॉंगेसने कायमच दुर्लक्ष केले. कॉंग‘ेस राष्ट्रवादीतील सत्ता संघर्ष आणि श्रेयवादाच्या लढाईत पुण्याच्या विकासाला खीळ बसली. युती सरकारच्या पाच वर्षांच्या राजवटीत जेवढी आर्थिक तरतूद पुण्यासाठी केली तेवढी कॉंग‘ेसच्या चाळीस वर्षांत झाली नाही. पुणकरांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहराचा नियोजनबद्ध विकासाचा कार्यक‘म आम्ही हाती घेतला आहे. मेट्रो, रिंगरोड, पीएमआरडीए, एचसीएमटीआर, समान पाणीपुरवठा, नदी सुधार योजना, नदीकाठ संवर्धन, पंतप्रधान आवास योजना, विद्युत महामंडळाचे सक्षमीकरण असे अनेक विकासाचे कार्यक‘म आम्ही हाती घेतले आहेत. त्यामुळे कॉंग‘ेस पक्षाने हवेत आरोप न करता विकासकामांवर चर्चा करावी आम्ही त्यासाठी कधीही तयार आहोत असे जाहीर आव्हान मी देतो.’
आमदार काळे पुढे म्हणाले, ‘गेल्या साडेचार वर्षांत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग, विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपूल, विद्यापीठ व जुन्या पुणे मुंबई रस्त्याचे रूंदीकरण, कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी राज्य शासनाचा विकास निधी, पाटील इस्टेट झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन, पोलीसांचा घरांचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. त्यामुळे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला मोठे मताधिक्य मिळेल असा विश्‍वास वाटतो.’

पाण्याचं राजकारण करणाऱ्यांना पुणेकर बुडवितील पाण्यात -गिरीश बापट

 
पुणे-मतदान झाल्यानंतर भाजप पुण्याच्या पाण्यात कपात सुरु करेल अशी भीती व्यक्त करणाऱ्या कॉंग्रेसला ‘ पाण्याचं राजकारण करणाऱ्यांना पुणेकर पाण्यात बुडवीतील असा टोला लगावत पुण्याचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी विविध प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे पुणेकर नागरिकांना शुद्ध, नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली.
बापट यांच्या प्रचारार्थ पर्वती विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रचार  फेरीच्या समारोप प्रसंगी श्री. बापट बोलत होते. अप्पर इंदिरा नगर येथे पदयात्रेला प्रारंभ झाला. लोअर इंदिरा नगर, संभाजी नगर, तीन हत्ती चौक, सहकार नगर, अरण्येश्‍वर मंदीर, लक्ष्मीनगर, गजानन महाराज चौक परिसरमार्गे पर्वती दर्शन येथे समारोप झाला.
श्री. बापट पुढे म्हणाले, ‘पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. कॉंग‘ेसच्या कार्यकाळात पाणीपुरवठ्याचेही राजकारण करण्यात आले. महायुतीने गेल्या पाच वर्षांत पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले. बहुचर्चित व प्रलंबित समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाने गती घेतली आहे. धरण साठ्यातील पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले जात आहे. त्यामुळे शहराच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी संपणार आहे. भामा-आसखेड प्रकल्प यावर्षी कार्यान्वित होईल. त्यामुळे नगर रस्त्यावरील पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. पर्वती येथे २५० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आणि पर्वती ते लष्कर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या परिसराचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यास मदत होणार आहे.’
आमदार माधुरी मिसाळ, शहर सरचिटणीस दीपक मिसाळ, नगरसेवक बाळा ओसवाल, राजू शिळीमकर, राजश्री शिळीमकर, वर्षा साठे, रूपाली धाडवे, महेश वाबळे, साईदिशा माने, महेश लडकत, धीरज घाटे, सरस्वती शेंडगे, स्मिता वस्ते, रघुनाथ गौडा, अशोक हरणावळ, अर्जुन जानगवळी, सूरज लोखंडे, श्रीकांत पुजारी, हरिष परदेशी आदी मान्यवर सहभागी झाले होते.

लोहियानगरमधील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्वार

0

पुणे-रामनवमीनिमित्त लोहियानगरमधील श्रीराम समता मंडळाच्यावतीने श्रीराम मंदिराचा जीर्णोद्वार व श्री प्रभू रामाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली . यावेळी महापूजा , होमहवन करण्यात आले . त्यानंतर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला . यावेळी स्थानिक नगरसेवक अविनाश बागवे यांच्याहस्ते प्रसाद वाटप करण्यात आले .

यावेळी मधुकर चांदणे , संतोष माने , बाळू  कसबे , रमेश चांदणे , विष्णू साबळे , राजू भरगुडे , अनिल भोसले , उमेश चांदणे , विलास कसबे व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले . 

क्षितीची कसरत ‘सेलिब्रिटी’पद राखण्यासाठी!

0

आजकाल सर्वत्र फोफावलेल्या सोशल मीडियाच्या युगात सर्वसामान्यांपासून असामान्यांपर्यंत प्रत्येकाचीच या समाज माध्यमात दिसण्या-वावरण्याची स्पर्धा सुरु आहे. मग त्यात सेलिब्रिटीं कसे बरं मागे राहतील? त्यांच्यासाठी तर हे माध्यम सुवर्णमृगच जणू! पण आपल्या मराठी कलावंतांना याचे विशेष सोयरसुतक नाही. काही अपवाद वगळता आपलं काम भलं आणि आपण भले असा विचार करणारे मराठी कलावंत अजूनही आहेत! पण या ‘प्लॅटफॉर्मचा’ वापर न करणाऱ्यांविषयी त्यांचे फॉलोअर्स बोंबा मारताना दिसतात. अश्याच सेलिब्रिटींपैकी ‘क्षिती जोग’!

सध्या ह्या अभिनेत्रीची खूपच तारांबळ उडत आहे. पण ही तारांबळ सोशल मीडियासाठी नव्हे तर प्रयोगांसाठी आहे. तिचं नवं नाटक ‘Knock! Knock!सेलिब्रिटी’ आलं आहे. या नाटकात ती आणि सुमीत राघवन हे दोनच कलाकार आहेत. अर्थातच संपूर्ण डोलारा त्या दोघांवरच आहे. एकावेळी एकच कलाकार स्टेजवर सलग वावरत असल्याने त्याची दमछाक तर होणारच! त्यात क्षितीने आधी घेतलेल्या टीव्ही आणि चित्रपटांमुळे  तिची खरीखुरी ‘कसरत’ ‘Knock! Knock!सेलिब्रिटी’ साठी होताना दिसतेय. सकाळ-संध्याकाळ मालिकांचे चित्रीकरण त्यानंतर प्रयोग करून रात्री चित्रपटांचं चित्रीकरणही ती करतेय. जोगांच्या तिसऱ्या पिढीची हि शिलेदार इतकी दमूनही नाटकात तिची एनर्जी तसूभरही कमी पडू देत नाहीये. तिचं म्हणणं आहे, नाटक हे कलाकाराचं टॉनिक असतं! ते दमवत नाही तर माझा थकवा दूर करते! आणि ‘नॉक नॉक…. ‘  सारखं नाटक करायला मिळणं हेच माझं टॉनिक आहे.

-शरद लोणकर (9423508306)

युवकांना मिळणार उद्योजकतेचे मोफत मार्गदर्शन

0

पुणे  : युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता  स्वतःचा  व्यवसाय  सुरु करावा, युवा वर्गात  उद्योजकता वाढीस  लागावी  म्हणून  यशस्वी एकेडमी  फॉर स्किल्स  व भारतीय युवा शक्ती  ट्रस्ट  (बीवायएसटी )संस्थानी  सहकार्य  करार  केला आहे.

या करारानुसार  ‘यशस्वी’ संस्थेच्या   विद्यार्थ्यांना  त्यांचे  संस्थेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर  स्वतःचा  स्वयंरोजगार किंवा व्यवसाय सुरु करावयाचा असल्यास  आता त्यांना  भारतीय युवा शक्ती  ट्रस्टतर्फे व्यवसायाची निवड कशी करावी, व्यवसाय सुरु कसा करावा, व्यवसायासाठी बॅंकेडून  कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी तसेच असलेला व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाणार आहे.

व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना एखादया व्यवसायासाठी लागणारे विविध परवाने, व्यवसायाची जागा, ग्राहक  व बाजारपेठेची निवड, व्यवसायातील जोखीम, अडचणी आदी सर्व बाबींचे सविस्तर मार्गदर्शन  करण्यासाठी बीवायएसटीचे तज्ञ् सल्लागार मदत करणार आहेत.

‘यशस्वी’ संस्थेच्या  विविध स्किल डेव्हलपमेंट  सेंटर मधून कौशल्य विकास  अभ्यासक्रमांचे  प्रशिक्षण   घेणाऱ्या  विदयार्थी -विद्यार्थीनींना यामुळे  आपले उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा सहजसाध्य होणार आहे.

देशात एकीकडे  कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या  विविध योजना व स्किल इंडिया मिशनमुळे युवकांना कौशल्य प्रशिक्षण  तर उपलब्ध  होत आहे शिवाय मुद्रा लोन सारख्या योजनांमुळे त्यांना अर्थसहाय्यदेखील उपलब्ध होत आहे, मात्र उद्योजक होण्यासाठी जी  मेंटॉर अर्थात मार्गदर्शकाची  मुख्य गरज असते ती गरज बीवायएसटीसारख्या संस्था पूर्ण करू शकतात, आणि त्यामुळे उद्योजकतेची खरी सुरुवात होण्यास  मदत होईल असे मत यावेळी ‘यशस्वी’ चे संचालक अभिषेक कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले.

या सहकार्य करार प्रसंगी ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने संचालक अभिषेक कुलकर्णी यांनी तर  बीवायएसटीच्यावतीने  राष्ट्रीय समन्वयक राधाकृष्णन  निपाणी यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी ‘यशस्वी’ चे संचालक अजय रांजणे, संजय सिंग व  बीवायएसटीचे पुणे विभागाचे क्लस्टर हेड   रोशन अहिरे, क्षेत्रीय अधिकारी विशाल चव्हाण आदी उपस्थित होते.

क्रीडाविश्‍वातून उलगडते संघटनात्मक उत्कृष्टता-ज्येष्ठ पत्रकार अयाज मेमन

0
पुणे:वैयक्तिक व संघटनात्मक उत्कृष्टतता समजून घेण्यासाठी क्रीडाविश्‍व हे एक उत्तम उदाहरण आहे,असे प्रतिपादन प्रसिध्द क्रीडा समालोचक व ज्येष्ठ पत्रकार अयाज मेमन यांनी येथे व्यक्त केले. द इंडस आंत्रप्रेन्युअर्स तर्फे आयोजित टायकॉन 2019 या स्टार्टअप्ससाठी हॉटेल वेस्टीन येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी द इंडस आंत्रप्रेन्युअर्स पुणे चे अध्यक्ष किरण देशपांडे,टायकॉन 2019 चे आयोजन समितीचे अध्यक्ष विनित पटनी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
याप्रसंगी बोलताना अयाज मेमन म्हणाले की,खेळामुळे एकनिष्ठता,अचुकता,दृढ निश्‍चय,सांघिक प्रयत्न आणि खेळाडू वृत्ती याला चालना मिळते.खेळ हा आपल्याला सकारात्मक दृष्टीकोन शिकवितो आणि जेव्हा जेव्हा आपण खाली पडतो तेव्हा परत उठायला शिकवितो.थोडक्यात खेळाच्या वृत्तीमुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आपला दृढ निश्‍चय वाढविण्यात मदत होते.कुठल्याही खेळात जिंकणे हे सर्वांत महत्त्वाचे असते आणि त्यासाठी आत्मविश्‍वास महत्त्वाचा असतो.या सर्व गुणांमुळे क्रीडाविश्‍वाद्वारे आपले व्यक्तिमत्त्व व चारित्र्य तयार करण्यास मदत होते.क्रीडाविश्‍वातून आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे फक्त प्रतिभा पुरेशी नसते तर परिश्रम,वचनबध्दता आणि योग्य निर्णयातून साध्य झालेली कामगिरी तेवढीच महत्त्वाची असते.प्रतिभा ही एक पहिली पायरी असते,परंतु नंतरच्या प्रवासाला अथक परिश्रम करावे लागतात.
 
सध्याच्या भारतातील क्रीडा क्षेत्राबाबत बोलताना अयाज मेमन म्हणाले की,भारतात आपण जरी या क्षेत्रात पहिल्या टप्प्यात असलो तरी अनेक नवीन महत्त्वाच्या घडामोडी दिसत आहेत.सोशल मिडियाचा वापर,लक्षणीय वाढला असून यामुळे खेळ बघण्याची साधने बदलली आहेत.त्यामुळे डिजिटल राईटला देखील मोठे मूल्य प्राप्त होत आहे.मात्र खेळाची लोकप्रियता अजून वाढवायची असेल तर खेळामधील गुंतवणूकीला सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे.तसेच खेळामध्ये महिलांचे प्रमाण वाढणे महत्त्वाचे आहे.करिअरच्या दृष्टीने प्रशिक्षणाबरोबरच स्पोर्टस सायन्स,स्पोर्टस थेरपीस्ट,स्पोर्ट न्युट्रीशन्स असे असंख्य नवीन पर्याय उपलब्ध होत आहेत.ज्यामुळे भारतातील क्रीडा विश्‍वाला चालना मिळेल.
 
खेळाबद्दल आपली आवड व्यक्त करताना ते म्हणाले की,वानखेडेच्या प्रेसबॉक्समध्ये बसून मॅचेस पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता.सचिन तेंडूलकरसारख्या जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना बघणे या अद्वितीय अनुभव आहे.हे महान खेळाडू आपला एक वारसा मागे सोडतात ज्यामुळे आपल्याला अभिमान वाटतो व त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो.

समाजाला जोडणारा बंधुतेचा विचार रुजावा – भास्करराव आव्हाड

0
पुणे : “आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत संवेदना, सहवेदना याची आवश्यकता असून, माणसांचे संघटन व्हायला हवे. समाजाचे ज्ञान वाढले आहे, परंतु ‘शहाणपण’ हरवले आहे. अशावेळी समाजाला शहाणे करणाऱ्या आणि एकमेकांशी जोडणाऱ्या बंधुतेच्या विचारांची रुजवण होणे गरजेचे आहे,” असे मत ज्येष्ठ साहित्यिक विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘त्रिवेणी संगम’ कार्यक्रमात भास्करराव आव्हाड बोलत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, नवी दिल्ली येथे होणाऱ्या २१ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया व सहाव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष प्रा. अरुण आंधळे (ऑडिटर, रयत शिक्षण संस्था सातारा ) यांचा सत्कार आणि कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘काळी आई’ काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन असा ‘त्रिवेणी संगम’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंधुताचार्य प्रकाश रोकडे होते. परिषदेचे सरचिटणीस शंकर आथरे, स्वागताध्यक्ष उद्योजक विनोद गलांडे पाटील, बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत रोकडे उपस्थित होते.
 भास्करराव आव्हाड म्हणाले, “गाडगेबाबा, बहिणाबाई हे अशिक्षित, मात्र प्रज्ञावंत होते. समाजाला जोडण्याचे आणि शहाणे करण्याचे काम त्यांनी आपल्या साहित्यातून केले. आज बौद्धिक दिवाळखोरी असलेले लोक नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे विचारवंतांनी पुढे येत बंधुतेचा, सामाजिक न्यायाचा विचार जनसामान्यात रुजवला पाहिजे. त्यातून समाज एकसंध ठेवण्यास मदत होईल.”
डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, “भगवान महावीर, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश दिला. हाच संदेश सर्वत्र पोहोचवून भेद आणि संघर्षमुक्त जीवन यासाठी बंधुता साहित्य संमेलन प्रयत्नशील आहे. बंधुतेचा विचार दिल्लीच्या व्यासपीठावरून मांडण्याची संधी २१ व्या साहित्य संमेलनामुळे मिळाली आहे.”
डॉ. अरुण आंधळे म्हणाले, “बाबासाहेबांचे विचार आणि बंधुतेचे मूल्य जपले तर विधायक जनशक्ती निर्माण होईल. कवी, लेखक विद्यार्थ्यांसमोर आणून त्यांच्यात वाचनाची चळवळ आणखी व्यापक करण्यासाठी विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन उपयुक्त ठरेल.”
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “गेल्या ३० वर्षांपासून आम्ही सगळे एकत्र आहोत. बंधुता साहित्य संमेलनाचे हे २१ वे वर्षे आहे. बंधुता या जागतिक मूल्याचा विसर पडता कामा नये. यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत. बंधुतेच्या व्यासपीठावर कोणत्याही विचारांचा, जाती-धर्माचा भेदभाव न करता काम केले जाते.”
कार्यक्रमाची सुरुवात भीम गायकवाड व संगीता झिंजुरके यांच्या गायनाने झाली. विनोद गलांडे पाटील यांनी स्वागत केले. कवी चंद्रकांत वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंझुरके यांनी सूत्रसंचालन केले, तर शंकर आथरे यांनी आभार मानले.

राम निर्विवाद असून हिंदूंच्या चौकटीत बंदिस्त नाही-डॉ.श्रीपाल सबनीस

0
पुणे: संपूर्ण जगात वाद चालू आहे. परंतू रामेश्‍वर (रूई) येथील राम हा निर्विवाद असून तो हिंदूंच्या चौकटीत बंदिस्त नाही. येथे सर्वधर्माचा अर्क म्हणजेच वारकरी हा दिसतो. कारण वारकर्‍याच्या खांद्यांवर तिरंगा दिसतो. त्यातूनच राष्ट्रीयत्वाची बेरीज दिसून येते.  असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे  व रामेश्‍वर (रूई) ग्रामस्थांच्या वतीने मानवतातीर्थ म्हणून साकार झालेल्या रामेश्‍वर (रूई) येथे प्रभू श्रीरामचंद्र जन्मसोहळा व श्रीराम रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन.पठाण हे होते.
     विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, सौ. उषा विश्‍वनाथ कराड, सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड,  श्री. तुळशीराम दा. कराड, श्री. काशीराम दा. कराड,  एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड,  कमाल राजेखाँ पटेल, डॉ. सुचित्रा कराड-नागरे, प्रा. सुनीता मंगेश कराड, डॉ. हनुमंत तु. कराड आदी उपस्थित होते.
     डॉ.श्रीपाल सबनीस म्हणाले, रामनवमीच्या निमित्त निघालेल्या रथयात्रेत  प्रथमच रामनामाच्या जयजयकारा बरोबर बुध्दम् शरणम् गच्छामि हे वाक्य ऐकले. या गावात सर्वधर्मएकतेचे प्रतीक दिसून आले.  मुस्लिम धर्मात मूर्तिपूजा नसतांनाही रथयात्रेच्या वेळी मस्जिद येथे मुस्लिम बांधवांनी रामाच्या मूर्तिला हार घातला. त्यावेळेस राम-रहिमच्या जयजयकारांनी संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिला गेला. येथील गोपाळबुवा हे देवत्वाला पोहचलेले होते. त्यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या या मंदिरातून  सात्विकता आणि देवत्वाने प्रत्येक व्यक्तीमध्ये यावे अशा पवित्र ठिकाणी येऊन मन प्रसन्न झाले. दोन धर्माच्यामधील अंतर कमी करण्यासाठी राम-रहिम सेतू बांधण्यात आलेला आहे.  या सेतू मध्ये सर्व धर्मांचे सूत्र मांडण्यात आलेले आहे आणि या धर्माचा अर्क म्हणजे वारकरी आहे.
डॉ. कराड हे सर्वांना पेलून नेणारे विश्‍वनाथ आहेत. ते सामान्य माणसांसाठी हरिभक्त, मौलवी, भन्ते असे सर्वधर्मसमावेशक आहेत.  त्यांनी या गावात प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळण्यासाठी  केलेले कार्य हे भौतिकवादी आहे. तसेच येथे ज्ञानगंगे बरोबरच पैलवानांसाठी आखाडा निर्माण केला आहे. त्यांनी केवळ भक्ती केली नाही तर शिक्षणांची गंगा दारोदारी पोहचविली आहे. रामेश्‍वर या गावात सर्व धर्मांची प्रतीके साकारलेली असल्याने भविष्यात या गावाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, मानवता आणि विश्‍वबंधुत्व व शांतीचा संदेश जगाला दिला जाईल.
     डॉ.एस.एन. पठाण म्हणाले, धर्माच्या नावाने जगामध्ये जो वणवा पेटला आहे. तो थांबविण्याचे कार्य बर्‍याच ठिकाणी सुरू आहे. परंतू या देशामध्ये रामेश्‍वर रूई हे गाव असे आहे, जे सर्वांसाठी आदर्श ठरू शकते. येथे सर्वधर्मसमभाव दिसून येतो. भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे. त्याचे दर्शनही येथे दिसून येते. येथे मानवतातीर्थ उभारले आहे. त्यामुळे येणारा काळ हे संपूर्ण विश्‍वाला त्याचा संदेश देईल. भारतीय संस्कृती ही रूपात आहे. ती प्रतीकामध्ये परिवर्तित झाल्यामुळे समाजावर संस्कार घडविण्याचे कार्य करीत आहे. श्रध्दा व सहिष्णुता निर्माण करण्याचे कार्य हे भारतीय संस्कृतीमुळे घडते आहे.
प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे मुर्तिमंत प्रतीक प्रभू श्रीराम हे आहेत.  राजा कसा असावा, बंधू कसा असावा व सखा कसा असावा याचे प्रतीक श्रीराम आहेत. त्यांच्या गुणांचा आदर्श आम्हाला घ्यावयाचा आहे. अयोध्येतील राम हा आज रामेश्‍वमध्ये अवतरला आहे असा भास होत आहे. म्हणून रामाशी एकरूप होणे गरजेचे आहे. श्रीरामच्या जीवनाची तत्त्वे आपल्या जीवनात उतरविली पाहिजेत . २१व्या शतकात भारत विश्‍वगुरू म्हणून उदयास येईल. त्याचे दायित्व आपल्या सर्वांवर आहे.
ह.भ.प. श्री. बालयोगी हरिहर महाराज दिवेगावकर (बनकरंजा, ता. केज) यांनी काल्याच्या  कीर्तनात सांगितले की, प्रभू श्रीराम हे सर्वगुणसंपन्न होते. त्यांनी संपूर्ण समाजाला एक आदर्श दिला आहे. त्यांच्यातील कोणत्यातरी एका सद्गुणाला आत्मसात करून आचरणात आणावे. ज्ञान मार्ग व भक्ती मार्गावर चालून समाजातील वाढत जाणार्‍या व्यसनाधीनतेला आळा घालावा. हाच संदेश श्रीराम जन्म सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांनी स्वीकारावा.
     भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान, त्याग आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक, तसेच, समस्त भारतीयांचे श्रध्दास्थान असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र जन्मसोहळ्याच्या निमित्ताने सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेली भारतीय संस्कृती दर्शन – ‘श्रीराम’ रथयात्रा श्रीराम मंदिरापासून सुरू झाली. ही  रथयात्रा गौतम बुद्ध विहार येथे पोहचल्यानंतर बौद्ध बांधवांनी स्वागत केले. तसेच, जामा मस्जिद व जैनुद्दीन चिश्ती दर्ग्याजवळ मुस्लिम बांधवांनीही  तिचे स्वागत केले.
     संत गोपाळबुवा मंदिर येथून निघालेल्या रथयात्रेने ग्रामप्रदक्षिणा करून राम मंदिर येथे समारोप झाला. रामेश्‍वरच्या रथयात्रेसाठी पंचक्रोशीतील महिला व पुरूष भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला. तसेच, मिरवणूकीच्या दरम्यान शालेय विद्यार्थिनी कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.
प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी प्रास्ताविक केले.

मोदींची निवडणूक पाकच्या मुद्द्यावर तर राहुल-प्रियांकाची‘न्याय’च्या मुद्यावर

0
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा निव्वळ पाकिस्तान ला आपण कसे धाकात ठेवू शकतो ,दहशतवाद्यांशी सामना कसा करू शकतो याच मुद्द्यांवर निवडणूक लढवीत असल्याचे दिसून येते आहे तर राहुल आणि प्रियांका गांधी हे २ भावंडे ‘न्याय ‘ या योजनेवर भर देत त्या आधारे गरिबी हटाव चा इंदिराजींचा नारा देत या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे दिसते आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीत पेट्रोल ,डीझेल ,गॅस दरवाढीने हैराण झालेली जनता ,घरांच्या,जमिनींच्यावाढत राहणाऱ्या आवाक्याबाहेरील  किमती म्हणजेच ..महागाई,बेरोजगारी …’रोटी ,कपडा और मकान’ अशा व्यक्तिगत पण महत्वाच्या  विषयांना निवडणुकीतील प्रचारात आता स्थान मिळेनासे झालेले दिसते आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी दक्षिण भारताच्या दौऱ्यावर होते. राहुल यांनी तामिळनाडूत ४ सभा घेतल्या. त्यांनी २१ दिवसांत ४४ सभा घेतल्या. मोदींनी १३ दिवसांतच ४२ सभा घेतल्या. मोदींनी ३५ सभांत पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकचा, तर राहुल यांनी ३१ सभांत ‘न्याय’ या किमान उत्पन्न हमी योजनेचा उल्लेख केला. दुसरीकडे मोदींनी प्रत्येक सभेत काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्या पक्षाला पाकिस्तान समर्थक ठरवले. काँग्रेसला तुकड्यांची टोळी म्हटले.  एवढेच काय शिवसेनेने यावेळी कॉंग्रेस च्या राजवटीत झालेल्या मुंबई वरील दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत कॉंग्रेसवर टीका करणारी जाहिरात बाजी सुरु केली आहे.आणि पाकिस्तानवर केलेल्या लष्करी कारवाईचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न अशा जाहिरातीतून शिवसेना करताना दिसते आहे .

कमलनाथांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर छाप्यांचा रोज उल्लेख
-मोदींनी गेल्या १० सभांत भोपाळमधील छाप्यांचा उल्लेख तुघलक रोड घोटाळा असा केला.

-याउलट, सरकार घाबरलेले आहे, असे काँग्रेस म्हणत आहे.

– मोदी सरकार ,पोलीस ,सीबीआय ,सह सरकारी यंत्रणांचा वापर विरोधकाना ब्लॅकमेल करण्यासाठी करत असल्याचा कॉंग्रेस आरोप करत आली आहे.

– मोदींनी चौकीदार, नामदार, कामदार, तुकड्या-तुकड्यांची टोळी यांसारख्या शब्दांचा जास्त उल्लेख आपल्या भाषणातून केला. या वेळी ‘शहजादा’ शब्दाचा फक्त दोनदाच उल्लेख.

-मोदींच्या सभेत काँग्रेसमुक्त भारत आणि ‘सबका साथ-सबका विकास’ शब्द ऐकू आले नाहीत.

– राहुल यांनी सर्वात जास्त नरेंद्र मोदी, अनिल अंबानी, नीरव मोदी, मल्ल्या आणि चौकसीचे नाव घेतले. तीन सभांत त्यांनी दहशतवादी अझहर मसूदचाही उल्लेख केला.
-राहुल यांनी राफेल चा  उल्लेख फक्त तीन सभांत. युवक, नोटबंदी, शेतकरी, जीएसटीचा उल्लेख आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त सभांत केला.

प्रामाणिक चौकीदार चालेल की भ्रष्टाचारी?

-देश एका सुरात बोलत आहे याचा मला आनंद आहे. जे प्रथमच मत देणार आहेत त्यांना मी विचारू इच्छितो की, राष्ट्राशी समझोता मंजूर आहे? प्रामाणिक चौकीदार चालेल की भ्रष्टाचारी नामदार हे आता निश्चित करायचे आहे.असे  नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात नमूद केले आहे .

पीएम मोदी चित्रपट स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात 15 एप्रिलला सुनावणी

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावर निवडणूक आयोगाने स्थगिती आणली होती. परंतु , आयोगाच्या या निर्णयाविरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावरील स्थगिती उठवण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर १५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

निवडणुकीच्या काळात ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास मतदार प्रभावित होऊ शकतात, असे कारण पुढे करत विरोधकांनी आक्षेप घेतला होता. त्या विरोधात राजकीय पक्षांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने हा निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला होता. या चित्रपटावर निवडणूक आयोगाने स्थगिती आणली होती.

चरित्रपटांमध्ये व्यक्तीच्या कामाबद्दल आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती दिलेली असते. निवडणुकांच्या काळात अशाप्रकारचे चरित्रपट प्रदर्शित करता येऊ शकत नाहीत , असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने त्यावेळी दिले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आता निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. न्यायालयानं त्यांची याचिका दाखल करून घेतली असून त्यावर १५ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे.

रात्रीस खेळ चाले… (सीरिअल VS  क्रिकेट) : लेखिका -पूर्णिमा नार्वेकर

0

“१०.३० वाजायला आलेत, आता ‘रात्रीस खेळ चाले’ सुरू होईल”, सासूबाई उठून रिमोट घेणार इतक्यात…”आजी ‘रात्रीस खेळ चाले’ कुठे पाहते आता, हा बघ इथे रात्रीचा खेळ रंगात आला आहे” ओमकार झटकन म्हणाला. वानखडेवर चालू असलेला ‘मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब’ हा आयपीएलचा क्रिकेटचा सामना जबरदस्त रंगात आला होता. प्रत्येक बॉलला छातीचे ठोके वाढत होते. १० षटकांत मुंबईला फक्त ६५ धावांपर्यंत मजल मारता आली होती. पोलार्डने मात्र फलंदाजीची एक बाजू भक्कम सांभाळत पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चालवला होता आणि अशा वेळी मॅच मधेच बघायची थांबून सीरिअल लावणे काही शक्य नव्हते. सासूबाईंच्या हे लक्षात आल्यावर त्याही निमूटपणे मॅच बघत बसल्या. मॅच ऐन रंगात आली होती. पोलार्डने हाणलेल्या प्रत्येक चौकार-षटकाराला घरातही मोठ्याने आरोळ्या मारत मॅचवरचे निस्सीम प्रेम व्यक्त केले जात होते. पोलार्डच्या फटकेबाजीने मुंबई नक्क्की जिंकणार, असे वाटू लागले असतानाच मोक्याच्या क्षणी तो आऊट झाला. पुन्हा आता काय होणार, कोण सरशी साधणार याची मनात धाकधुक सुरू झाली. शेवटच्या षटकात ही उत्कंठा तर टिपेला पोहोचली…कोण जिंकतंय, मुंबई की पंजाब?? आता पंजाब जिंकतोय असं वाटत असतानाच शेवटच्या बॉलला मॅच फिरली आणि मुंबई जिंकली. रात्रीचा हा खेळही रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक झाला. आयपीएल सुरू होण्याआधी मार्चमध्येच ओमकारने आजीला साळसूदपणे सांगितले होते,  “आजी आता तुझा सीरिअलचा प्राईम टाइम चुकणार. आता आयपीएल आणि नंतर वर्ल्ड कप म्हणजे आमचा प्राईम टाइम चालू होणार.

गार्डनमध्ये संध्याकाळी राऊंड मारताना सुद्धा याचा प्रत्यय आला. नेहमी मुलांचा गोंगाट चालू असतो त्या मैदानात सामसूम होती. गार्डनमध्ये महिला मंडळाचा ग्रुप ७. ३० वाजले तरी गप्पा मारत होता. साधारणपणे ५ ते ६.३०-७  या वेळेत असणारा हा ग्रुप आता  गेल्या  काही दिवसांपासून उशिरापर्यंत चक्क गार्डनमध्ये कसा? आश्चर्य वाटले म्हणून ग्रुपमधीलच ओळखिच्या मावशींकडे चौकशी केली. “आता रोजच मॅच चालू असते गं, टीव्हीवर सीरिअल वगैरे काही बघायला मिळत नाही; मग आम्ही रिपीट टेलिकास्ट बघून उशिरा संध्याकाळी इकडे येतो”… मावशींनी आयपीएलच्या नावाने बोटे मोडली.

संध्याकाळी ६.३०. ते रात्री ११ हा सीरिअलचा, विशेषतः गृहिणींचा प्राईम टाइम. रात्रीच्या जेवणाची तयारी लगोलग करून रिमोटचा कंट्रोल आपल्याकडे घेऊन सीरिअलचा आस्वाद घ्यायचा हे प्रातिनिधिक चित्र, परंतु त्याच वेळेला मॅच चालू झाली की मात्र त्रागा. घरातल्या घरात द्वंद्वयुद्ध – सीरिअल विरुद्ध मॅच! सीरिअल रेकॉर्ड करून मागाहून बघता येते हो पण मॅचचं तसं नाही ना…ती लाईव्ह बघण्यातच खरी मजा. त्यामुळे आता आयपीएल ते थेट वर्ल्ड कपपर्यंत तरी हा माहोल धुमसत राहणार बहुदा.

वानखडेला पंजाबवर रोमांचक क्षणी मात करून मुंबईने विजयाची हॅटट्रिक साजरी केली. मॅच संपली की  रात्री उशिरा सीरियल. काही झालं तरी ‘रात्रीस खेळ चाले’चे एपिसोड रात्रीच बघण्यात मजा. क्रिकेटमध्ये मिनिटागणिक जशी वाढत जाते अगदी तशीच उत्कंठा …आज सरिता कशी वागणार आणि वच्छीची सून- शोभा, सरिताला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी कोणत्या नवीन क्लुप्त्या शोधणार…दोन्हीही रात्रीचे हे खेळ रंगात आणणारे!

लेखिका -पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग, 

दहिसर फाटक जवळ, दहिसर (प.), मुंबई – 400068

नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी दिले गावकऱ्यांना आरोग्याचे धडे

0

पुणे-प्राथमिक आरोग्य केंद्र,खामगाव. ता. दौंड, जि. पुणे, येथे कम्युनिटी रुरल हेल्थ नर्सिंगच्या प्रात्यक्षिक अनुभवा करीता गेलेल्या श्रीमती सुभद्रा के. जिंदाल कॉलेज ऑफ नर्सिंग शिवाजीनगर पुणे येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले यामध्ये आरोग्य केंद्रा मध्ये येणाऱ्या गरोदर महिलांचा ओटी भरून सन्मान केला व तेथील आरोग्य कर्मचार्यांच्या मदतीने आशा भागिनिना व गावकऱ्याना विविध आजारांबद्दल माहिती दिली त्यात क्षयरोग,मधुमेह,रक्तदाब,रक्तक्षय,अतिसार आणि मलेरिया ईत्यादींचा समावेश आहे तसेच विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली.

गावामध्ये व शाळांमध्ये जाऊन कुटुंब नियोजन व वैयक्तिक स्वच्छता याविषयांवर पथनाट्याचे सादरीकरण केले तसेच काहि सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन केले. यासाठी महाविद्यालयाचे शिक्षक श्रीमती एन्जेला ब्रेवर, श्रीमती प्रज्ञा जाधव व श्री अमोल कानडे यांनी विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीमती रुपाली लोखंडे व श्री विलास माने तसेच ग्रामस्थांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले आणि यापुढे देखील आम्ही असेच नवनवीन व वेगवेगळे उपक्रम सादर करू असे आश्वासन महाविद्यालयाने गावकऱ्याना दिले.

विदूषकाच्या वेशात स्काऊट–गाईडच्या विद्यार्थ्यांनी केली धमाल !

0

पुणे-माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात कब-बुलबुल, स्काऊट–गाईडशिबीर आयोजित करण्यात आले.

या दिवशी सकाळी ७.३० वाजता झेंडावंदन करण्यात आले.  राष्ट्रगीत, झेंडागीत, प्रार्थना यानंतर BPG व्यायाम करण्यात आले.  शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना धालेवाडीकर यांनी मुलांशी संवाद साधला.  स्वावलंबन व शिस्त याचे महत्व सांगितले.  हा उपक्रम राबविण्यामागचे उद्दिष्ट सांगितले.

नाश्ता झाल्यानंतर सर्व मुलांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.  या सांघिकचित्रकला स्पर्धेचे परीक्षण सौ. मिताली पिंपळे यांनी केले.  न्यू इंग्लिशस्कूल येथे श्री.रामदासी सरांनी तारांगण दाखविले.  श्री. बापट सरांनी गाणे शिकविले.  जोशपूर्ण घोषणा दिल्या.  वर्तमान पत्रापासून जोकर तयार करणे ही सांघिक स्पर्धा घेण्यात आली.  जेवणानंतर वर्ग सजावट स्पर्धा घेण्यात आली.  त्यानंतर waxपेंटिंगरुमालावर तयार करून घेण्याचे कृतीसत्रसौ.स्वातीराजगुरूयांनी घेतले.  श्री. लंके सर यांनी स्काऊट–गाईडच्यासंघनायकानेरिपोर्टिंग कसे करावे हे सांगितले.  गटाचे ध्येय असावे, समूहगीत तयार करावे हे सांगितले.  श्री.ज्ञानेश वैद्य यांनी मागांच्या खुणा सांगितल्या, उपयोग सांगितले.  आरोळ्या दिल्या.  सौ. धनश्री कुंटे यांनी कब-बुलबुलच्या मुलांना गोष्टी व गाणी सांगितली.  सर्व मुलांना सरबत देण्यात आले.  सौ. मयुरी काळे यांनी मुलांकडून गाण्यावर एरोबिक्सचे प्रकार करून घेतले.  यानंतर भेळ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली.  ध्वज उतरवल्यानंतर समारोप व बक्षीस समारंभ घेण्यात आला.  सौ. मंजिरी पारुंडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.  सौ. वरदा पटवर्धन यांनी बक्षीसपात्र मुलांची यादी वाचली.  निलयमालुसरेयाला उत्कृष्ट संघनायक व मृदुला कासोदेकर हिला उत्कृषसंघनायिका निवडण्यात आले.  स्पर्धांचे परीक्षण सौ. अंजली पवार, सौ.वरदा पटवर्धन, सौ. सुप्रिया देवढे व सौ. मंजिरी पारुंडेकर यांनी केले.  सर्व उपक्रमांमध्ये शिक्षक प्रतिनिधी सौ. वर्षा दिवेकर यांनी सहकार्य केले.  पर्यवेक्षक श्री. विकास दिग्रसकर यांनी सौ. कुंटे यांचे आभार मानले.  या शिबिराचे नियोजन सौ. स्वाती राजगुरू, सौ. मयुरी काळे यांनी केले.  सौ. कल्पना धालेवाडीकर यांच्या नियोजनाखाली शिबीरउत्तमरित्या पार पाडले.  सर्व मावशी-काकांनी यासाठी खूप सहकार्य केले.

महावितरणच्या मानव संसाधन विभागाच्या पहिल्या संचालकपदी ब्रिगेडियर पवनकुमार गंजू यांची निवड

0

मुंबई :- महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदावर ब्रिगेडियर पवनकुमार गंजू यांची निवड थेट भरती प्रक्रियेने झाली असून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे नुकतीच प्रकाशगड मुख्यालयात स्वीकारली. संचालक (मानव संसाधन) पद हे नव्याने निर्माण करण्यात आले असून या महत्वाच्या पदावर ब्रिगेडियर पवनकुमार गंजू यांची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च विद्याविभूषित गंजू यांना मानव संसाधन क्षेत्राचा दीर्घ अनुभव आहे.

जम्मू काश्मीर येथील मूळचे असलेले ब्रिगेडियर पवनकुमार गंजू यांची सेनादलात ३८ वर्षे सेवा झाली असून त्यांनी विविध महत्वाच्या पदावर काम केले आहे. भारतभर विविध ठिकाणी सेनादलाच्या सेवाकाळात त्यांनी महत्वाच्या पदांची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे.

ब्रिगेडियर पवनकुमार गंजू हे विज्ञान शाखेतील पदवीधर असून त्यांनी व्यवस्थापन, पत्रकारिता, कर्मचारी व्यवस्थापन व औद्योगिक संबंध, मार्केटींग, फूड अॅनालायसीस इत्यादी विषयात विविध विद्यापीठातून पदव्युत्तर पदव्या संपादन केल्या आहेत. याशिवाय त्यांनी सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी अनेक महत्वपूर्ण विषयाचे प्रशिक्षण घेतले असून त्यांनी सेना प्रशासनात मानव संसाधन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. महावितरणच्या मानव संसाधन विभागात अधिक सकारात्मक बदल करण्याचा मानस ब्रिगेडियर पवनकुमार गंजू यांनी व्यक्त केला आहे.

मेट्रोमुळे शहराच्या शाश्‍वत व गतीमान विकासाला गती मिळेल-गिरीश बापट 

0

पुणे-सार्वजनिक वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी शहरभर मेट्रोचे जाळे विणण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार असून शहराच्या शाश्‍वत व गतीमान विकासासाठी गती मिळेल असा विश्‍वास महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या वतीने आयोजित केलेल्या व्यापारी मेळाव्यात बापट बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक महेश लडकत, राजेश येनपुरे, विशाल धनवडे, ऍड. मंदार जोशी, सुरेश धर्मावत, पल्लवी जावळे, उमेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बापट म्हणाले, ‘विकासकामे वेगाने मार्गी लागावीत यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती कॉंग‘ेस पक्षात नाही. त्यामुळे मेट्रोसारखा महत्त्वाचा प्रकल्प पंधराहून अधिक वर्षे रखडला. केंद्र, राज्य व महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली. रामवाडी ते शिवसृष्टी, स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मार्गिंकाबरोबर शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे.’ 
बापट पुढे म्हणाले, ‘मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) सादर केलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात सुमारे १९५.२६ किलोमीटरचे लांबीचे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाव्यतिरिक्त  आठ मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहरभर मेट्रोचे जाळे विणले जाईल.’
मेट्रो प्रकल्पामुळे सार्वजनिक वाहतूकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रोमुळे ६१ हजारांहून अधिक खासगी वाहने रस्त्यावर येण्याची कमी होऊन वार्षिंक १.२२ लाख टन इंधनाची बचत होईल. त्यामुळे पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होणार आहे. पुणेकरांना गतीमान व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे. मेट्रो प्रकल्प पर्यावरणस्नेही आहे. मेट्रो स्थानकांचाही बहुविध वाहतूक केंद्र म्हणून विकास केला जाणार आहे. व्यापारी संकुलांमुळे व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे पुणे शहराचा चेहरामोहरा बदलणार असून, विकासकामांना गती मिळणार आहे.