Home Blog Page 2808

महाराष्ट्राच्या वैभव श्रीराम, मधुरीमा सावंत यांचा अव्वल मानांकीत खेळाडूंवर विजय

0

औरंगाबाद: एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स्‌ सनराईज्‌ 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात वैभव श्रीराम, अधिरी अवल व  सिद्धार्थ मराठे यांनी तर मुलींच्या गटात  साहिरा सिंग,  परी चव्हाण,  सायना देशपांडे व  अमोदीनी नाईक यांनी मानांकीत खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. 

इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस्‌ कॉम्पलेक्स्‌ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत वैभव श्रीरामने हरियाणाच्या अव्वल मानांकीत वंश नांदलचा 3-6, 6-1, 7-5 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या अधिरी अवलने चौथ्या मानांकीत महाराष्ट्रच्या वितीन राठीचा 6-2, 6-2 असा तर महाराष्ट्राच्या सिद्धार्थ  मराठेने कर्नाटक नवव्या मानांकीत स्कंद रावचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. 

मुलींच्या गटात उप-उपांत्यपुर्व फेरीत महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत मधुरीमा सावंतने तेलंगणाच्या अव्वल मानांकीत चांदनी श्रीनिवासनचा 6-1, 6-0 असा सहज पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. पंजाबच्या बिगर मानांकीत साहिरा सिंगने दिल्लीच्या तिस-या मानांकीत रिया सचदेवचा 6-2,6-4 असा पराभव करत खळबलजनक निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या नवव्या मानांकीत परी चव्हाणने तेलंगणाच्या सातव्या मानांकीत सौम्या रोंडेचा 6-4, 6-0 असा पराभव केला. महाराष्ट्राच्या सायना देशपांडेने उत्तर प्रदेशच्या दहाव्या मानांकीत सौम्रीती वर्माचा 6-3, 6-3 असा तर कर्नाटकच्या अमोदीनी नाईकने दिल्लीच्या पाचव्या मानांकीत समिक्षा दबसचा 6-2,7-6(7) असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: उप-उपांत्यपुर्व फेरी:

वैभव श्रीराम (महाराष्ट्र)वि.वि.  वंश नांदल(1)(हरियाणा) 3-6, 6-1, 7-5

अधिरी अवल(दिल्ली) वि.वि वितीन राठी(4)(महाराष्ट्र)6-2, 6-2
सिद्धार्थ मराठे(महाराष्ट्र)वि.वि. स्कंद राव(9)(कर्नाटक) 6-2, 6-2
विनिथ मुत्याला(महाराष्ट्र)  वि.वि  अर्णव कोकणे(महाराष्ट्र) 7-6(6),7-6(6),6-1
काहिर वारीक(महाराष्ट्र)(6)वि.वि. भारत फुलवारीया(दिल्ली) 6-4, 6-4
जैष्णव शिंदे(महाराष्ट्र) वि.वि.  सार्थ बनसोडे(महाराष्ट्र) 6-3, 6-1
ऋषील खोसला(2)(कर्नाटक)वि.वि.  रुरीक रजनी (तमिळनाडू)6-2, 6-2

मुली: उप-उपांत्यपुर्व फेरी:
मधुरीमा सावंत(महाराष्ट्र)वि.वि चांदनी श्रीनिवासन(1)(तेलंगणा)  6-1, 6-0
साहिरा सिंग(पंजाब) वि.वि रिया सचदेव(3)(दिल्ली) 6-2,6-4
परी चव्हाण(9)(महाराष्ट्र) वि.वि सौम्या रोंडे(7)(तेलंगणा)6-4, 6-0
सायना देशपांडे(महाराष्ट्र) वि.वि सौम्रीती वर्मा(10)(उत्तर प्रदेश)6-3, 6-3
अमोदीनी नाईक(12)(कर्नाटक) वि.वि समिक्षा दबस(5)(दिल्ली)6-2,7-6(7)
कुंदना भंडारू(4)(तमिळनाडू) वि.वि ध्वनी कवद(गुजरात)6-3, 6-3
रुमा गायकैवारी(6)(महाराष्ट्र) वि.वि पुष्टी लध्दा(तेलंगणा) 6-4, 6-2

सिद्धार्थ टेंबे, चैतन्य दिक्षीत, अश्विन पळणीतकर यांचे विजय

0

पुणे: द पूना क्लब लिमिटेड आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने आयोजित बीएसएएम सिक्स रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत सिद्धार्थ टेंबे, चैतन्य दिक्षीत, अश्विन पळणीतकर, पिनाक अनप  या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून शानदार सुरुवात केली.

पूना क्लब येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत डबल एलिमनेशन फेरीत पहिल्या सामन्यात पुण्याच्या संकेत मुथा याने आपली विजयी मालिका कायम ठेवत पोरस शहाचा 4-2(39-03, 48-23, 12-36, 50-21, 14-31, 32-21) असा तर, दुसऱ्या सामन्यात संकेत याने आपला शहर सहकारी योगेश लोहियाचा 4-3(09-37, 43-32, 31-21, 37-21, 26-33, 40-63, 49-01) असा संघर्षपूर्ण पराभव करून तिसरा विजय मिळवला.

पुण्याच्या सिद्धार्थ टेंबे याने चिपळूणच्या ओंकार गोरेचा 4-1(19-50, 42-21, 35-07, 39-21, 39-26) असा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली. नागपूरच्या चैतन्य दिक्षीत याने पुण्याच्या पंकज परमारचा 4-1(51-33, 27-19, 27-32, 39-06, 56-13) असा सहज पराभव करून विजय मिळवला. अतितटीच्या लढतीत पुण्याच्या पिनाक अनपने मुंबईच्या शुभोजित रॉयचा 4-3(37-10, 49-11, 57-16, 08-41, 01-48, 30-39, 40-30)असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: डबल एलिमनेशन फेरी:
संकेत मुथा(पुणे)वि.वि.पोरस शहा(एमजी) 4-2(39-03, 48-23, 12-36, 50-21, 14-31, 32-21);
अश्विन पळणीतकर(पुणे)वि.वि.चिंतामणी जाधव(कॉर्नर पॉकेट) 4-2(33-22, 34-01, 25-36, 16-48, 36-25, 34-01);
संकेत मुथा(पुणे)वि.वि.योगेश लोहिया(पुणे) 4-3(09-37, 43-32, 31-21, 37-21, 26-33, 40-63, 49-01);
पिनाक अनप(पुणे)वि.वि.शुभोजित रॉय(मुंबई) 4-3(37-10, 49-11, 57-16, 08-41, 01-48, 30-39, 40-30);
पोरस शहा(मुंबई)वि.वि.प्रशांत नातू(पुणे) 4-2(24-29, 52-21, 43-15, 48-20, 16-33, 44(40)-00);
सुरज राठी(मुंबई)वि.वि.अमरदीप घोडके(पुणे) 4-0(46-32, 54-25, 37-21, 36-05);
शाह्यान राझमी(मुंबई)वि.वि.माधव जोशी(पुणे) 4-2(50-19, 14-45, 37-04, 40-01, 32-38, 38-24);
सिद्धार्थ टेंबे(पुणे)वि.वि.ओंकार गोरे(चिपळूण) 4-1(19-50, 42-21, 35-07, 39-21, 39-26);
चैतन्य दिक्षीत(नागपूर)वि.वि.पंकज परमार(पुणे) 4-1(51-33, 27-19, 27-32, 39-06, 56-13).

खारी बिस्कीटच्या शिरपेचात मानाचा तुरा, चित्रपटाला आय़एमडीबीवर 8.9 रेटिंग्स

0

झी स्टुडियोज् आणि दिपक पांडुरंग राणे निर्मित खारी बिस्कीट हा सिनेमा फिल्ममेकर संजय जाधव ह्यांची 50 वी कलाकृती आहे. सध्या ‘ड्रिमिंग ट्वेंटि फोर सेव्हन’ निर्मित खारी बिस्कीट सर्वत्र हाऊसफुल होत असतानाच आता ह्या सिनेमाच्या टीमसाठी दुग्धशर्करा योग म्हणजे, आयएमडीबीवर सिनेमाला 8.9 रेटिंग्स मिळालेली आहेत. गेल्या काही महिन्यात सिनेमागृहांमध्ये झळकलेल्या मराठी सिनेमांपैकी ‘खारी बिस्कीट’ हा एकमेव सिनेमा आहे, ज्याला हाऊसफुल सिनेमाहॉल्ससोबतच आयएमडीबीकडून अशाप्रकारे कौतुकाची थापही मिळाली आहे.

सूत्रांच्या माहितीनूसार, खारी आणि बिस्कीट ह्या बहिण-भावाच्या जोडगोळीची कथा प्रेक्षकांना अगदी आपलीशी वाटतेय. ‘तुला जपणारं आहे’, आणि ‘खारी’ ह्या दोन्ही गाण्यांना मिलयन्समध्ये व्ह्युज मिळून सोशल मिडीयावर ट्रेंडिंग असलेली ही गाणी अनेकांच्या कॉलर ट्युन्स बनलेल्या आहेत. गेल्या कित्येक महिन्यात मराठी सिनेसृष्टीला एका सुपरहिट सिनेमाची गरज होती. खारी बिस्कीट त्यातल्या निरागसतेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, तुहिरे ह्या संजय जाधव ह्यांच्या सुपरहिट सिनेमांपेक्षाही ‘खारीबिस्कीट’ला जास्त आयएमडीबी रेटिंग्स मिळाली आहेत.

16व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2019-20 स्पर्धेत 32 संघांचा समावेश

0
पुणे- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 16व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2019- 20 स्पर्धेत पुणे व परिसरातील एकुण 32 आयटी कंपन्यांच्या संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धात 9 नोव्हेंबर 2019 पासून व्हेरॉक क्रिकेट मैदान, पुना क्लब क्रिकेट मैदान, पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदान येथे सुरू होणार आहे.
 
स्पर्धेत टीसीएस, केपीआयटी, टीएटो, आयडीयाज्‌,फिनआयक्यू, कॅपजेमिनी, विप्रो, टिबको, इन्फोसीस, कॉग्निझंट, ग्लोबाकॉम, एलटीआय, सिमेंस, टेक महिंद्रा, झेंन्सर, हर्मन, मर्क्स, अॅटॉस्‌, बार्कलेज, क्रेडीट सुईस, अँमडॉक्स, गालघर, सुनर्झीप, पबमॅटीक, आयबीएम, सनगार्ड एएस, प्रिंगर नेचर, दसॉल्ट सिस्टिम्स, सायबेज, यार्डी,  सिनेक्रॉन आणि एफआयएस ग्लोबल या 32 संघ सहभागी झाले आहेत. 
 
स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. 32 संघांची 8 गटांमध्ये प्रत्येकी 4 संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघ 3 सामने खेळणार आहेत. 
 
स्पर्धेत एकूण 1 लाख 20 हजार रूपयंची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 60हजार रुपयेतर उपविजेत्या संघाला करंडक व 40हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. मालिकावीर खेळाडूला करंडक व 10 हाजर रूपये, सर्वोत्तम फलंदाज व गोलंदाजाला प्रत्येकी 5 हजारूपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार, लवकरच बातमी मिळेल- सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई- राज्यात सध्या सत्ता स्थापनेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. यात आता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व निर्णय झाले असून, लवकरच गोड बातमी मिळेल आणि देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असा विश्वास भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेचे गुढ आता निर्णायक वळणावर आले आहे. दिल्लीतून मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली होती. बैठकीत भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेसोबत निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा होणार झाली आणि लवकरच गोड बातमी मिळेल, असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. तसेच, देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पुण्यात गुरुवारी पाणी नाही…

0

पुणे-पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी-वारजे आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे गुरुवारी (७ नोव्हेंबर) विद्युत आणि पंपिंग तसेच स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (८ नोव्हेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेतह्ण

पर्वती जलकेंद्र -शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी रस्ता परिसर, स्वारगेट, पर्वती, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, विधी महाविद्यालय रस्ता, मिठानगर, शिवनेरीनगर आणि पद्मावती वडगाव जलकेंद्र- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक

चतु:शृंगी- एसएनडीटी, वारजे जलकेंद्र- पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधा नगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध-बावधन, सूस, सुतारवाडी आणि भूगांव रस्ता

लष्कर जलकेंद्र – लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महमंदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर आणि सातववाडी नवीन होळकर पंपिंग- विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर आणि नगर रस्ता

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार- भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

0

 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केले.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कोअर कमिटीची मुंबईत बैठक झाली. त्यानंतर मा. प्रदेशाध्यक्ष बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि भाजपा प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष – शिवसेना महायुतीला सत्ता स्थापनेचा स्पष्ट जनादेश दिला आहे. या जनादेशाचा आदर करुन आम्ही लवकरात लवकर महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहोत.”

ते म्हणाले की, “सरकार स्थापनेसाठी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तो प्रस्ताव ते लवकरात लवकर देतील. त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची दारं २४ तास खुली आहेत. भारतीय जनता पक्ष सर्वांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतत्वाखाली स्थापन होणाऱ्या या सरकारसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही मान्यता मिळाली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांनी  देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड केली आहे. संपूर्ण भारतीय जनता पार्टी  फडणवीस यांच्या पाठीशी उभी आहे.  फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होईल.”

उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एनिमेटेड ई -लर्निंग सॉफ्टवेअर

0
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पै आयसीटी ऍकेडमी’ ने पहिली ते दहावी उर्दू  माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एनिमेटेड ई -लर्निंग सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरचे उदघाटन महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एम ए गफार,अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष इलाहाजुद्दीन फारुकी ,आदिल प्रकाशनचे संचालक कामिल शेख यांच्या हस्ते झाले.
हे सॉफ्टवेअर हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट चे विश्वस्त तन्वीर इनामदार यांनी तयार केले आहे. देशातील अशा स्वरूपाचे हे पहिले सॉफ्टवेअर आहे. डेस्कटॉप-लॅपटॉप  संगणक ,मोबाईल आणि टॅब  हे  सॉफ्टवेअर चालते आणि अभ्यासक्रमाप्रमाणे दरवर्षी सुधारित आवृत्ती वापरता येते ,अशी माहिती तन्वीर इनामदार यांनी दिली .
‘शिक्षण हेच प्रगतीचे महाद्वार असून अत्याधुनिक संगणकीय शिक्षण प्रणाली गरीब वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल . मागे पडलेल्या वर्गाची प्रगती हेच विकसित तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट असायला हवे ‘असे उदगार डॉ पी ए इनामदार यांनी काढले .मुमताज सय्यद यांनी प्रास्ताविक केले.यावेळी १०० शैक्षणिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

८ नोव्हेंबर रोजी’रागभावरंग

0

पुणे ः

‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत’रागभावरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार,८ नोव्हेंबर २०१९ सायं ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम  होणार आहे. ‘रागभावरंग’ ही शास्त्रीय संगीतावर आधारित मराठी व हिंदी नाटयगीते, भावगीते,भक्ती गीते, लावणी, निसर्ग गीत, चित्रपट गीतांची मैफिल  आहे.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

या कार्यक्रमात डॉ. सौ. अनघा राजवाडे, नीरज केतकर व चंद्रकांत निगडे(गायन),उदय शहापूरकर(हार्मोनियम),अशोक मोरे(तबला),रमेश मंगळूरकर(तालवाद्य),प्राजक्ता मांडके(निवेदन) हे सहभागी होणार आहेत.

ग्रामीण भारताच्या प्रगतीत उपेक्षितांचा समावेश ‘ विषयावर परिषदेत होणार चर्चा

0
पुणे :
 ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘तर्फे  पुण्यात  ‘रुरल इंडिया ‘  या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे .   ‘ग्रामीण भारताच्या प्रगतीत उपेक्षितांचा समावेश ‘ या विषयावर परिषदेत चर्चा होणार असून देशभरातील तज्ज्ञ ,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी ,धोरणकर्ते ,संशोधक त्यात सहभागी होणार आहेत . पुण्याच्या ‘बाएफ ‘ संस्थेच्या सभागृहात  ७ ते ९ नोव्हेंबर रोजी ही परिषद होणार आहे . राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी स्टडीज  चे संचालक  विजय महाजन यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता  होणार आहे . गिरीश सोहनी (संचालक ,बाएफ ),आदिनाथ चव्हाण (संपादक ,ऍग्रोवन ) हे मान्यवरही उदघाटन कार्य्रक्रमात उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे आयोजक असलेले   ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ हा टाटा ट्रस्ट्स चा एक सामाजिक उपक्रम आहे .
  ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘ चे संचालक संजीव फणसळकर ,सल्लागार अजित कानिटकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.  पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात ‘भारतातील कृषी भवितव्य -सामाजिक उद्योजकतेच्या भारतातील प्रेरणादायक कथा ‘ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे . या पुस्तकात भारतातील विविध राज्यामध्ये काम करीत असलेल्या,कृषी क्षेत्रातील १५ सामाजिक उद्योजकांचा (सोशल इंटरप्रायजेस ) चा परिचय करून देण्यात आला आहे . परिषदेच्या उदघाटन सत्रात  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे .
गीतांजय साहू (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ),बिश्वदीप घोष (अर्घ्यम संस्था ),व्ही. विवेकानंदन ,पूर्णेन्दु कावुरी हे मान्यवर परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेतील विविध विषयांवरील चर्चासत्रात दिना जीजीभॉय(फाउंडेशन फॉर इक्विटी अँड वेल बीइंग ),डॉ शर्वरी शुक्ला (सिम्बायोसिस स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ),सरस्वती पद्मनाभन (टाटा ट्रस्टस )डॉ अन्वर जाफरी ,अमीर उल्लाह खान ,अशोक दलवाई (रेनफेड एग्रीकल्चर ऍथॉरिटी ,केंद्रीय कृषी मंत्रालय ),श्रीजित मिश्रा हे मान्यवर सहभागी होणार आहेत .  परिषदेत महाराष्ट्र आणि भारतातील अनेक राज्यातून सुमारे १५० तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत .
  ग्रामीण भारताशी संबंधित मह्त्वाच्या विषयांवर ‘विकासान्वेष फाउंडेशन ‘  ने वर्षभर केलेले संशोधन या परिषदेत मांडले जाणार आहे . देशभरातील संशोधकांचे संशोधनपर निबंध सादर केले जाणार आहेत. शाश्वत शेतीच्या पद्धती ,ग्रामीण भागातील उपजीविका ,मुस्लिम समाजाचे उच्च शिक्षणातील कमी प्रमाण ,स्थलांतर ,’विकास आणि प्रसारमाध्यमे ‘अशा अनेक विषयांवर तीन दिवस  चर्चा होणार आहे .

पुण्यात 6 ते 8 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय शाश्वत पाणी व्यवस्थापन परिषदेचे आयोजन

0

पुणे –  जलशक्ती मंत्रालय, जलसंसाधन व नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पा अंतर्गत जलसंपदा विभागाच्या सहकार्याने 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत दुस-या आंतरराष्ट्रीय शाश्वत पाणी व्यवस्थापन परिषदेचे आयोजन पुणे येथे करण्यात आल्याची माहिती जलसंपदा लाभ क्षेत्रविकास व जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार यांनी दिली.

             सिंचन भवन येथे आंतरराष्ट्रीय शाश्वत पाणी व्यवस्थापन परिषदे संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  राष्ट्रीय जलविज्ञान प्रकाल्पाचे  वरिष्ट सह आयुक्त राकेश कश्यप, वरिष्ट सहआयुक्त दीपक कुमार, महासंचालक एन.व्ही. ‍शिंदे, विशेष प्रकल्पाचे मुख्य अभियंता वि.जी. रजपूत, मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते,  जलविज्ञान प्रकल्पाचे मुख्य अभियंता श. द. भगत, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स.द. चोपडे, कुकडी पाटबंधारे मंडळाचे  अधीक्षक अभियंता ह. तु. धुमाळ, पुणे पाटबंधारे प्रकल्पाचे  अधीक्षक अभियंता प्रविण कोल्हे, अधीक्षक अभियंता श्रीमती सु. न. जगताप,  अधीक्षक अभियंता अ. आ. दाभाडे आदी उपस्थित होते.

                        राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावरील परिषदेचे पुण्यात आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून पवार म्हणाले,  राष्ट्रीय जलविज्ञान  प्रकल्प राबविणा-या विविध राज्ये व संस्था यांचे मार्फत या परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील कार्यरत अभियंते, शास्त्रज्ञ, शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासक, निर्णय प्रक्रियेतील अधिकारी यांना नियमितपणे एकत्र येण्याचे आणि भारतातील जलव्यवस्थापनाबाबत निर्माण होणा-या आव्हाने व संधीवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

                   सचिव पवार म्हणाले,  आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही दुसरी परिषद असून यापुर्वी चंदीगड येथे अशा स्वरूपाची परिषद झाली आहे. पुण्यात होणारी ही आतंरराष्ट्रीय स्तरावरील दुसरी परिषद असून जलसंपदा विभागाच्या सहकार्याने ही परिषद होणार आहे. या परिषदेसाठी जागतिक बँक तसेच सिंचन व निचरा  विषयक कमिशन कमिशनचे तज्ज्ञ  तसेच ऑस्ट्रेलिया, यु.एस. यु.के.नेदरलँड, कॅनडा, दक्षिण कोरीया, युरोपियन युनियन, जर्मनी, थायलंड, श्रीलंका आणि नेपाळ,  या देशांमधील आंतरराष्ट्रीय  तज्ज्ञ  सहभागी होणार आहेत. सदर परिषदेमध्ये 12 तांत्रिक सत्र आयोजित करण्यात आले असून यामध्ये तज्ज्ञ आपले अनुभव सांगणार आहेत. जलसंधारणाच्या उत्कृष्ट  पध्दतीवर समर्पित एक पुर्ण सत्र आयोजित करण्यात आले आहे.जलयुक्त स्त्रोतांच्या संवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध सरकारी संस्था आणि स्वयंसेवी संस्था आपले अनुभव कथन करण्यासाठी सहभागी होणार आहेत.

जलसंपदा विकास आणि व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधन व कला तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या संशोधकांसाठी एक पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

       6 नोव्हेंबर 2019 रोजी हॉटेल हयात रीजेंसी येथे होणा-या परिषदेचे उदघाटन जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री

 गजेंन्द्रसिंग शेखावत यांच्या हस्ते व जलसंपदा मंत्री यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तर 7 नोव्हेंबर रोजी परिषदेचा समारोप जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही सचिव पवार यांनी सांगितले.

महिंद्रा बाहा एसएईइंडिया 2020च्या 13व्या पर्वाची सुरुवात

0

282 इंजिनीअरिंग कॉलेजांतील 253 प्रवेशिका अंतिम फेरीसाठी ठरल्या पात्र

पुणे,: एसएईइंडिया या प्रोफेशनल सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्सने महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या सहयोगाने, बाहा एसएईइंडिया सीरिजचे 13वे पर्व सुरू झाल्याचे आज जाहीर केले आहे. ही अंतिम फेरी 23 ते 26 जानेवारी 2020 या कालावधीत इंदोर जवळील पिठमपूर येथे एनएटीआरआयपी (NATRIP) येथे होणार असून, त्यानंतर 6 ते 8 मार्च 2020 या कालावधीत चंडीगडनजिक चित्कारा विद्यापीठ येथे होणार आहे.

बाहा एसएईइंडिया 2020 साठी देशभरातील 486 एसएईइंडिया कॉलिजिएट क्लबमधील 282 प्रवेशिका स्वीकारण्यात आल्या, त्यातील 200 टीम पारंपरिक एम-बाहासाठी आणि 53 टीम व्हर्च्युअल फेरीतील ई-बाहासाठी निवडण्यात आल्या.

बाहा एसएईइंडिया चार दिवसांमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांच्या मालिकेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सिंगल-सीटर चार-चाकी ऑल-टिरेन व्हेइकलचे (एटीव्ही) डिझाइन, बिल्ड, टेस्ट व वैधता साकार करण्याची कामगिरी दिली होती. या कार्यक्रमामध्ये टेक्निकल सस्पेन्शन, तसेच डिझाइन, कॉस्ट व सेल्स प्रेझेंटेशन असे स्टॅटिक इव्हॅल्युएशन आणि अक्सिलरेशन, स्लेज पुल, मॅनोव्हरेबिलिटी असे डायनॅमिक घटक समाविष्ट असणार आहेत. सस्पेन्शन व ट्रॅक्शननंतर 4 तासांचा कार्यक्रम घेण्यात आला.

बाहा एसएईइंडियाचे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक वर्षी नवीन मध्यवर्ती संकल्पना. या वर्षी बाहा 2020 साठी ‘ब्रेकिंग कन्व्हेन्शन्स‘ ही संकल्पना असून, हे ईबाहा असो किंवा सर्व मुलींची टीम असो, पारंपरिक विचारांना आव्हान देणाऱ्या बाहाचे प्रतिक आहे.

आज भारतीय मोबिलिटी उद्योगापुढे काही आव्हाने आहेत. बाहा एसएईइंडियाला देशातील उदयोन्मुख इंजिनीअरसाठी या आव्हानांचे रूपांतर संधींमध्ये करायचे आहे आणि त्यांना भविष्याच्या दृष्टीने सज्ज करायचे आहे. त्यांना डिझाइन व अंमलबजावणी यातील पारंपरिक विचारसरणीला व कल्पनांना छेद देता येईल आणि भारतीय वाहतुकीच्या भविष्याला आकार देणारे नावीन्यकार म्हणून स्थान मिळवता येईल.

बाहा एसएईइंडियाने भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटी सुरू झाल्याचा लाभ घेण्यासाठी 2015 मध्ये ईबाहा सीरिज सुरू केली. पारंपरिक बाहा वाहने 10 एचपी ब्रिग्स अँड स्ट्रॅटन गॅसोलिन इंजिनावर चालतात. सर्व बाहा टीमसाठी हे सामायिक आहे. तर, ईबाहा वाहने 6 kW पीक इलेक्ट्रिक पॉवर असलेल्या व रिचार्जेबल लिथिअम-आयन बॅटरी पॅकचे पाठबळ असणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरवर चालतील. येथे, विद्यार्थ्यांना मोटर, कंट्रोलर व बॅटरी संपादित करण्याची आणि स्वतःची बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम डिझाइन करण्याची मुभा आहे. या वर्षी, इलेक्ट्रिक वाहनांसाठी मनुष्यबळाची गरज विचारात घेता, या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उत्तेजन दिले आहे.

बाहा एसएईइंडिया 2020 साठी, अंतिम फेरीमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील 66 प्रवेशिकांमध्ये पुण्यातील 25 कॉलेजांचा समावेश आहे. बाहा एसएईइंडिया सीरिजच्या गेल्या काही आवृत्तींमध्ये, महाराष्ट्रातून आलेल्या प्रवेशिकांमध्ये जास्तीत जास्त प्रवेशिका पुणे शहरातील होत्या. गेल्या काही वर्षांत, अंतिम फेरीमध्ये पुण्यातील कॉलेजांनी जास्तीत जास्त पुरस्कार जिंकले आहेत.

बाहा अंतिम फेरीसाठी देशभरातील इंजिनीअरिंग कॉलेजांतून आलेल्या प्रवेशिकांची तपासणी जुलै 2019 मध्ये पंजाबमधील चित्कारा विद्यापीठ येथे करण्यात आली. त्यामध्ये, प्रवेशिकांनी अंतिम फेरीमध्ये सादर केल्या जाणाऱ्या बाहा बग्गी वाहनासाठी त्यांची डिझाइन सादर केली.

पात्र ठरलेल्या टीमची निवड त्यांच्या कॅड डिझाइनचे विश्लेषणाने, सीएई विश्लेषणाने आणि रोल केज, सस्पेन्शन, स्टीअरिंग व ब्रेक यांच्या डिझाइनच्या अनुषंगाने करण्यात आली. तसेच, त्यांचे रूल बुक व्हायव्हा सेशन घेण्यात आले व त्यांना दिलेल्या विषयाच्या बाबतीत मूल्यमापन करण्यात आले. व्हर्च्युअल बाहामध्ये सादर करण्यात आलेल्या प्रवेशिका सहभागींच्या अचूक तपशिलाने तयार केल्या जाऊ शकतील. अंतिम फेरीतील टीमनी बग्गी रेस कार निर्माण केली असेल आणि ते ऑटोमोबाइलबद्दल असणारी त्यांची कौशल्ये, आकलन व पॅशन दर्शवतील.

यानिमित्त बोलताना, बाहा एसएईइंडिया 2020 चे समन्वयक एस. बलराज यांनी सांगितले, “बाहा एसएईइंडियासारखे उपक्रम भविष्यातील डिझाइनर व नेतृत्व घडवण्यासाठी आवश्यक असणारा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना यासाठी गरजेचे असलेले व्यासपीठ देतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या टीम त्यांच्या सर्वोत्तम क्षमता दर्शवतील, अशी अपेक्षा आहे.”

भारतात, बाहा एसएईइंडियाने (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्स) 2007 मध्ये वाटचाल सुरू केली आणि डॉ. पवन गोएंका (एसएईइंडिया अध्यक्ष यांच्या कार्यकालादरम्यान) यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. के. सी. व्होरा यांच्या समन्वयाअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला. एसएईइंडियाने इतक्या भव्य स्वरूपाच्या उपक्रमाचे आयोजन करायचे ठरवले. एनएटीआरआयपीने इंदूरमधील पिठमपूर येथे असणाऱ्या नॅट्रॅक्स या आगामी मैदानात विशेष झोन उपलब्ध करून मदतीचा हात दिला. याचप्रमाणे, आयआयटी रोपरने रूपनगर येथे बाहा एसएईइंडिया 2018च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन करण्याची तयारी दाखवली.

एसएईइंडियाचा इंजिनीअरिंग एज्युकेशन बोर्ड व बाहा कोअर टीम लवकरच बाहा 3 ची घोषणा करणार आहेत. त्याचे आयोजन दक्षिण भारतातील एखाद्या इंजिनीअरिंग सिटीमध्ये केले जाणार आहे, यामुळे बाहाची वाटचाल भारताच्या दक्षिण भागातील विद्यार्थ्यांच्या निकट जाणार आहे.

पुण्यात देशातील तनाएराचे सातवे स्टोअर

0

पुणे : टायटनचा सर्वात नवीन ब्रँड तनाएराचा भारतीय उपखंडात व्यवसाय विस्तार करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना आखली गेली आहे.  आज तनाएराच्या महाराष्ट्रातील पहिल्या स्टोअरचा शुभारंभ करण्यात आला.  पुण्यात औंध येथे पुष्पक पार्क येथे सुरु करण्यात आलेल्या नवीन तनाएरा स्टोअरचे उदघाटन तनाएराच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्रीमती राजेश्वरी श्रीनिवासन व प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  सौंदर्यवती अभिनेत्री श्रुती मराठे यांनी यावेळी परिधान केलेली तनाएरा ब्रॅण्डची जरीचे नाजुक नक्षीकाम असलेली शानदार सिल्क साडी अतिशय खुलून दिसत होती. यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.

 

३६०० चौरस फुटांचे हे स्टोअर पुण्यात औंध येथील आयटीआय रोडवर वॉर्ड नंबर ८पुष्पक पार्क येथे आहे.  भारतातील हे तनाएराचे सातवे स्टोअर आहे.  भरपूर सूर्यप्रकाशखेळती हवा असलेल्या तनाएराच्या औंध स्टोअरमधे भिंतींवरील आरशांमधून परावर्तित होणाऱ्या नैसर्गिक सूर्यप्रकाशामुळे स्टोअरचे रूप अतिशय खुलून दिसते.  अगदी मोक्याच्या जागी असलेल्या या स्टोअरमधे देशभरातील हातमागासाठी प्रसिद्धी असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून उत्तमोत्तमशानदार हाताने विणण्यात आलेल्या साड्या उपलब्ध करवून देण्यात आल्या आहेत.  हातमागावरील साड्या विणण्याची कला आणि अप्रतिम कारिगरीची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे.  या परंपरेला आधुनिक साजामध्ये पुनर्जीवित करणारी आकर्षक कलेक्शन याठिकाणी उपलब्ध आहेत.  बनारसी सिल्कअनोखे नक्षीकाम असणाऱ्या कांजीवरममध्य प्रदेशची खासियत असलेल्या चंदेरी व महेश्वरीबंगालची ओळख म्हणून नावाजली जाणारी जामदानीगुजरातमधून इकत यांच्या बरोबरीने आंध्र प्रदेश व ओडिशा या राज्यातील अनोख्या कलांचे सौंदर्य ल्यालेल्या शानदार साड्या याठिकाणी आहेत.  भारताचे रेशीम म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या टसर साड्यांचे विशाल कलेक्शन या स्टोअरमधे उपलब्ध आहे.

 तनाएराच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्रीमती राजेश्वरी श्रीनिवासन यांनी सांगितलेदिल्लीबंगलोर व हैदराबाद या शहरांमधील आमच्या स्टोअर्सना मिळत असलेल्या भरघोस प्रतिसाद पाहता पुण्यातही आमचा ब्रँड ग्राहकांच्या पसंतीस उतरेल याची आम्हाला खात्री आहे.  पुणेकरांनी आमच्या ट्रंक शोला खूप छान प्रतिसाद दिला होता.  म्हणूनच आज महाराष्ट्रातील आमचे पहिले स्टोअर आम्ही पुण्यात सुरु करत आहोत.  भारतातील प्राचीन हातमाग कला आणि कारिगरीहाताने बनविलेलेनैसर्गिक कपडे यांचा सन्मान तनाएरा ब्रँडमध्ये केला जातो.  पुण्यातील आमच्या नवीन स्टोअरमधे भारतातील प्रसिद्ध ठिकाणांहून खास डिझाईन करण्यात आलेल्या उत्तमोत्तम साड्या उपलब्ध करवून देण्यात आल्या आहेत.  आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी विश्वास आणि आदर असलेल्यापरंपरांविषयी प्रेम असलेल्या आणि तरीही प्रगतिशील विचार करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला हे कलेक्शन नक्की आवडेल.  पुण्यातील आधुनिकचोखंदळ,

 प्रगतिशील स्त्रियांना तनाएरा आपलेसे वाटेल याची आम्हाला खात्री आहे.  सक्ती म्हणून नव्हे तर स्वतःची आवड म्हणून साडी परिधान करणाऱ्यापरंपरा साजऱ्या करणाऱ्या परंतु त्यामध्ये गुरफटून न राहणाऱ्या स्त्रियांसाठी तनाएरा बनले आहे.” 

 भारतातील विविध ठिकाणच्या कारीगरांनी हाताने बनविलेल्या शुद्धनैसर्गिक कापडांपासून डिझाईन करण्यात आलेल्या साड्यांचे तनाएरा स्टोअर हे एक अनोखे ठिकाण आहे.  साड्यालग्नात नवरीसाठीसणसमारंभांना घालण्याचे लेहंगेतयार ब्लाऊज असे विविध प्रकार याठिकाणी आहेत.  साड्यांची शानदारविशाल श्रेणी हे तनाएराचे वैशिष्टय आहेचशिवाय त्यांचे स्टोअर देखील अतिशय अनोखे आहे.  ड्युस्टुडिओचे ऑरोविल स्थित डिझायनर धर्मेश जडेजा यांनी स्टोअर डिझाईन केले आहे.  उच्च अभिरुचीची जाण आणि आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे स्टोअर पाहताक्षणी आवडेल.  भारतातील हातमाग परंपरासंस्कृतीसंकल्पना यांची जादू या संपूर्ण स्टोअरमधे जाणवते.

 फक्त आमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आलेल्या उदघाटन समारंभात मान्यवर उपस्थितांच्या शुभेच्छाकलासौंदर्यसंगीतचविष्ट पदार्थ यामुळे शानदार वातावरण निर्माण झाले होते.

 तनाएरा

फेब्रुवारी २०१७ मध्ये सुरु करण्यात आलेला तनाएरा हा टायटन कंपनी लिमिटेडचा सर्वात नवीन ब्रँड आहे.  हाताने विणल्या गेलेल्या साड्यांचा ब्रँड तनाएरामध्ये भारतातील ७० पेक्षा जास्त ठिकाणांहून खास निवडल्या गेलेल्या जवळपास ३००० साड्या आहेत.  त्याठिकाणची प्रत्येक साडी भारतातील अनोख्या कारिगरीचे प्रतीक आहे.  एखादा सण असो किंवा लग्नरोजच्यासाठी बनविण्यात आलेल्या साड्या किंवा खास समारंभासाठीच्या साड्या असोततनाएरामध्ये प्रत्येक प्रकारच्या उत्तमोत्तम साड्यांचे विशाल कलेक्शन आहे.

 टाटा समूहाचा भाग असलेल्या तनाएरा ब्रँडमध्ये अस्सल उत्पादनांची हमीआपल्या पसंतीच्या साड्या निवडण्यासाठी आरामदायी जागाखरेदीचे समाधान आणि आनंद देणारा अनुभव असा परिपूर्ण स्टाईल स्टुडिओ उपलब्ध करवून देण्यात आला आहे.  तनाएरा हा शब्द दोन शब्दांनी बनला आहे – तन म्हणजे शरीर आणि इरा हे देवी सरस्वतीचे नाव आहे.  देवी सरस्वती ही कलासंगीतहस्तकला व ज्ञानाची देवी आहे.  ग्रीक भाषेत इरा शब्दाचा अर्थ धरती असा आहे.  अनोखी डिझाइन्सवैविध्यपूर्ण कारिगरीहातमागाचा अस्सलपणाशुद्ध व नैसर्गिक कापड – भारतातील सर्वोत्तम पारंपरिक संपदा एकाच ठिकाणी उपलब्ध करवून देणारा तनाएरा ब्रँड आहे.  परंपरेविषयी प्रेम असणाऱ्या आणि तरीही प्रगतिशील आचार व विचार असलेल्या आधुनिक भारतीय स्त्रियांना नक्की आवडेल असा हा ब्रँड आहे.

हॅलोच्या #अँटिडेंग्यू अभियानाने मिळवले तब्बल 150+ दशलक्ष व्ह्यूज

0

हॅलो या भारतातील आघाडीच्या सोशल मीडिया सुविधेने #अँटिडेंग्यू या अभियानाची यशस्वी सांगता केली आहे. हे अभियान सुरू झाल्यापासून 12 दिवसांमध्ये या अभियानाने 150 दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. हॅलो केअर उपक्रमांचा भाग म्हणून, #डेगू से मुक्ति (हिंदी), #ਡੇਂਗੂ ਮੁਕਤ ਭਾਰਤ (पंजाबी) या हॅशटॅगचा वापर करून, हॅलोवर उपलब्ध असणाऱ्या सर्व 14 भारतीय भाषांमध्ये डेंग्यूच्या तापाविषयी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी 14 ऑक्टोबर रोजी इनअॅप अभियान सुरू करण्यात आले. अभियान सुरू केल्यापासून आठवडाभरातच व्हायरल झाले. त्यास 90 दशलक्ष व्ह्यूज व 6000 हून अधिक पोस्ट मिळाल्या.

50 दशलक्षहून अधिक सक्रिय युजरना उपयुक्त माहिती व दृष्टिकोन देण्याच्या प्राथमिक उद्देशाने, हॅलोने युजरना सहभागी करून घेण्यासाठी विविध इनअॅपउपक्रमांचे आयोजन केले, जसे डेंग्यूचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांबाबत मल्टिपल चॉइस क्विझ, नोटिफिकेशन, स्प्लॅश स्क्रीन. या उपक्रमांमुळे डेंग्यूविषयीचे अनेक गैरसमज दूर करण्यासाठी आणि युजरमध्ये जागृती करण्यासाठी मदत झाली. अभियानाचा भाग म्हणूनयुजरनी विविध समस्यांवरील उपाय व डेंग्यूचा ताप बरा करण्यासाठी उपाय यावर रंजक व उपयुक्त व्हीडिओ तयार केले. बीबीसी न्यूज, एनडीटीव्ही तामिळ अशा अनेक न्यूज चॅनेलनी आणि रित्विका बशीर बशी अशा नामवंत सेलिब्रेटींनीही आपापल्या हॅलो अकाउंटवरील महत्त्वाच्या कण्टेण्टच्या मार्फत या अभियानासाठी योगदान दिले.

“#अँटिडेंग्यू अभियान हे युजर व त्यांच्या प्रियजनांच्या सुरक्षेसाठी व कल्याणासाठी हॅलोने हाती घेतलेल्या अनेक हॅलो केअर प्रकल्पांपैकी एक आहे.   50 दशलक्षहून अधिक वैविध्यपूर्ण सक्रिय युजरना सेवा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि त्यांच्या अधिकाधिक मूल्य देण्यासाठी माहितीच्या देवाण-घेवाण करणाऱ्या कॅम्पेन यापुढेही राबवणार आहोत,” असे हॅलोचे कण्टेण्ट ऑपरेशन्स हेड श्यामंगा बरूआह यांनी सांगितले.

50 दशलक्षहून अधिक सक्रिय युजर असणाऱ्या हॅलोची निर्मिती आपल्या स्थानिक भाषेत संवाद साधण्यास प्राधान्य देणाऱ्या भारतीय मोबाइल युजरसाठी करण्यात आली आहे. हॅलो आपल्या युजरना वापरण्यास सोप्या साधनांद्वारे विशेष व दर्जेदार कण्टेण्ट निर्माण करण्यासाठी, समविचारी युजर्सबरोबर सहभागी होण्यासाठी व नवे ट्रेंड शेअर करण्यासाठी सहाय्य करते.

हॅलो केअरविषयी:

हॅलो केअर हा हॅलो या भारतातील आघाडीच्या सोशल मीडिया सुविधेचा सामाजिक सबलीकरण उपक्रम आहे. या उपक्रमामुळे प्रत्येकाला शिक्षण, संस्कृती, समाज व स्वच्छता यावर केंद्रीत विषयांसाठी स्वयंसेवा करण्याची संधी मिळते. गरज असणाऱ्या व्यक्तींना मदत करण्याच्या हेतूने, सेलिब्रेटी, मतांवर प्रभाव घडवणारे, निर्माते व सामाजिक संस्था यांना एकत्र आणून या विषयांना पाठिंबा दिला जातो.

हॅलोविषयी

हॅलो ही भारतातील आघाडीची प्रादेशिक सोशल मीडिया सुविधा आहे. तुमच्या स्वतःच्या भाषेत कण्टेण्ट निर्माण व शेअर करण्याची, नव्या व ट्रेंडिंग बातम्यांविषयी माहिती मिळवण्याची, तसेच जास्तीत जास्त लोकांशी जोडलेले राहण्याची सोय देऊन, तुमच्या जीवनामध्ये रंग आणणे आणि सर्वांना एकत्र आणणे, हे हॅलोचे उद्दिष्ट आहे. हिंदी, तेलुगु, मल्याळम यासह 14 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणारे हॅलो 2018 मध्ये गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यात आलेल्या आघाडीच्या अॅपमध्ये समाविष्ट होते. हॅलोचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे व हॅलो आयओएस व अँड्रॉइड यासाठी अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, सौदी अरेबिया, यूएई, ओमान, कुवेत, कतार, नेपाळ, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका व बांगलादेश येथे उपलब्ध आहे

फत्तेशिकस्त’ला शिवकालीन संगीताचा साज

0

सुमधूर संगीत ही भारतीय सिनेमांची खासियत मानली जाते. मराठी सिनेसृष्टीमध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच ब्लँक अँड व्हाईटच्या जमान्यापासून आजच्या डिजीटल युगापर्यंतची फार मोठी संगीतमय परंपरा मराठीला लाभली आहे. कथेला अनुसरून गीत-संगीताची किनार जोडली जाणं हा त्यातील महत्त्वाचा पैलू मानला जातो. त्यामुळेच फत्तेशिकस्त हा आगामी महत्त्वाकांक्षी सिनेमाही शिवकालीन संगीताचा साज लेऊन सजल्याचं सिनेरसिकांसोबतच संगीतप्रेमींनाही अनुभवायला मिळणार आहे. लेखन-दिग्दर्शनासोबतच फत्तेशिकस्तमध्ये आपल्या अभिनयाची झलकही दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकरनं फत्तेशिकस्तच्या माध्यमातून रसिकांसाठी जणू संगीताचा नजराणाच पेश केला असून संगीतकार देवदत्त मनिषा बाजी यांच्या दृष्टीतून तो प्रभावीपणे सादर झाला आहे.

‘रणी फडकती लाखो झेंडे’… हे एक भव्य दिव्य गाणं फत्तेशिकस्तमधील गाणं प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेल्या या गाण्यात २०० नर्तक, मावळातील १००० कार्यकर्ते, २०० ढोलवादक आणि २०० ध्वजधारकांचा नृत्याविष्कार सादर करण्यात आला आहे. कोरिओग्राफर सुभाष नकाशे यांनी या गाण्याचं अप्रतिम नृत्य दिग्दर्शन केलं आहे. ‘रणी फडकती…’ची आणखी एक खासियत म्हणजे हे गाणं सिनेमातील सर्व कलाकारांच्या आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. फत्तेशिकस्तमधील तुंबडी रसिकांच्या स्मरणात राहणारी ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात शाहिरी सादर करणारे अज्ञान दास यांचे १७ वे  वंशज असलेल्या हरिदास शिंदे यांनी ही तुंबडी गायली आहे. त्यामुळे फत्तेशिकस्तमधील या तुंबडीला कळत-नकळत शिवकालीन वारसा लाभला आहे. कूट प्रश्नांच्या या तुंबडीच्या माध्यमातून त्या काळी महाराजांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम केलं जायचं.

माऊलींच्या पूजेचा मान ज्यांच्याकडे आहे त्या अवधूत गांधी यांच्या स्वरातील ‘हेचि येळ देवा नका’… हे गीतही लक्षवेधी ठरणारं आहे. या कारुण्यपूर्ण अभंगाद्वारे ऑनस्क्रीन छत्रपती शिवाजी महाराज साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरची एंट्री होणार आहे. महाराष्ट्रीय लोकपरंपरेचा अविभाज्य भाग असलेला जोगवाही फत्तेशिकस्तमध्ये आहे. ‘तू जोगवा वाढ माई’… या जोगव्याचं वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे सर्व वीरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. शिवकालीन इतिहासात मराठीइतकंच हिंदी आणि उर्दू शब्दांचा उच्चारही सर्रास केला जायचा. तोच धागा पकडत फत्तेशिकस्तमध्ये हिंदी-उर्दूचा समावेश असलेल्या कव्वालीचा समावेश आहे. या सिनेमाला आधुनिकतेची किनार जोडत लोकपरंपरेचा वारसा लाभलेलं संगीत देण्यात आलं आहे. यासाठी लोकप्रिय धनगरी ढोलाचा वापर करण्यात आला आहे. या सिनेमात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, वि. स. खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांनी रचलेल्या गीतरचनांचा वापर करण्यात आला असून, संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी यांनी दिलं आहे.

‘स्वराज्यातील पहिला सर्जिकल स्ट्राईक’ असं वर्णन केला जाणाऱ्या ‘फत्तेशिकस्तचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरनं केलं आहे. ए. ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेला फत्तेशिकस्त‘ १५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे,  समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके या मराठमोळ्या कलाकारांनी या सिनेमात विविध ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. अनुप सोनी हा हिंदीतला प्रसिद्ध चेहरा फत्तेशिकस्तमध्ये शाहिस्ता खान साकारत मराठीकडे वळला आहे.

या कलाकारांना पौर्णिमा ओक यांनी वेशभूषा केली असून, रंगभूषा सानिका गाडगीळ यांनी केली आहे. डीओपी रेशमी सरकार यांनी फत्तेशिकस्तसाठी सिनेमॅटोग्राफी करण्याचं धाडस केलं असून, यातील साहसदृश्यांचं दिग्दर्शन बब्बू खन्ना यांनी केली आहेत. संकलन प्रमोद कहार यांचं असून, ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केलं आहे. अजय आरेकर यांची निर्मिती असलेल्या या सिनेमासाठी इल्युजन ईथिरीअल स्टुडियोज यांनी व्हीएएक्स केले आहेत. उत्कर्ष जाधव यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे