Home Blog Page 2803

१५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान ‘कोन्निचिवा पुणे’ महोत्सव

0
पुणे : भारत आणि जपान यांच्यामध्ये सांस्कृतिक, शैक्षिणक आणि व्यवसायिक पातळीवर देवाण-घेवाण व्हावी या उद्देशाने ‘इंडो जपान बिझिनेस कौन्सिल’, ‘कॉन्सुल जनरल ऑफ जपान इन मुंबई’ आणि ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोन्निचिवा पुणे २०१९’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले आहे. ‘कोन्निचिवा पुणे २०१९’मध्ये १५ नोव्हेंबर रोजी पुण्यातील एमसीसीआयए येथे उद्योग परिषद, तर १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी फिनिक्स मॉल येथे सांस्कृतिक महोत्सव होणार आहे, अशी माहिती इंडो-जपान बिझनेस कौन्सिलचे अध्यक्ष श्रीकांत अत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कौन्सिलचे उपाध्यक्ष सिद्धार्थ देशमुख, अभिषेक चौधरी, ‘एमआयटी’चे प्र-कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस आदी उपस्थित होते.
श्रीकांत अत्रे म्हणाले, “दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण संबंध दृढ होण्यास चालना मिळावी, यासाठी हा महोत्सव महत्वपूर्ण ठरणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १५) सकाळी १०.०० वाजता सेनापती बापट रस्त्यावरील एमसीसीआयएच्या सभागृहात होणार आहे. कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई मिचिओ हरडा, जपान एक्सटर्नल ट्रेंड ऑर्गनायझेशनचे  डायरेक्टर जनरल मुनेनोरी मात्सुनगा, जपान नॅशनल टुरिझमचे कार्यकारी संचालक युसुके यामामोटो, प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. जळगावचे खासदार उन्मेष पाटील, एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल कराड, ऑल निप्पोन एअरवेजचे जनरल मॅनेजर योशीयुकी मिझुची, द जपान फाउंडेशनचे पश्चिम विभागीय संचालक हिरोको ओझांकी यांच्यासह इतर तज्ज्ञ आणि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय आणि जापानी व्यवसाय, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था, भारतीय व जपानी कलाकार, जपानी द्विभाषिक तज्ञ या महोत्सवात सहभागी होणार आहेत. निरनिराळे संस्कृतिक कार्यक्रम, माहितीपट स्क्रीनिंग, वैविध्यपूर्ण गोष्टींची प्रदर्शने, बिझनेस फेअर, बिझनेस सेमिनार, चर्चासत्रे, फूड स्टॉल असणार आहेत.”
“यामध्ये आयोजित चर्चासत्रांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. ‘स्मार्टसिटीसाठी विकसित होणारा हैप्पीनेस इंडेक्स’, ‘भारत आणि जपान यांच्यात अनुकूल वातावरण‘, ‘2020 ऑलिम्पिक दरम्यान जपानचा दौरा’ आणि ‘जपानमधील करिअर आणि शैक्षणिक संधी’  या विषयांवर होणाऱ्या या चर्चासत्रांमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, माजी आयुक्त दिलीप बंड, आर्किटेक्ट अनीता बेनिंजर-गोखले, मशाल एनजीओचे संस्थापक शरद महाजन, लेफ्टनंट कर्नल शशी आनंद, सिद्धार्थ देशमुख, मुन्नेरी मत्सुनागा, ओनिशी तातसुनोर, शैलेंद्र गोस्वामी, अभिषेक चौधरी, योशियुकी मिझुची, झेलम चौबळ, सुधीर पाटील, मुकुंद यत्नाळकर, श्रीकांत अत्रे, हिरोको ओझाकी, एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रा. मिलिंद पांडे, पीआयसीटीचे प्रा. प्रल्हाद कुलकर्णी, पीआयबीएमचे अध्यक्ष रमण प्री, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉ. गीताली टिळक मोने आदी सहभाग घेणार आहेत,” असे सिद्धार्थ देशमुख यांनी नमूद केले.
डॉ. रवीकुमार चिटणीस म्हणाले, “फिनिक्स मार्केटसिटी येथे रंगणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात भारत आणि जपानमधील उत्साही आणि समविचारी व्यक्ती एकत्र येतील. तसेच यानिमित्ताने दोन्ही देशामध्ये कला, शिक्षण आणि उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून परस्पराशी जोडले जातील. कला, संस्कृती, संगीत, नृत्य आदीचे दर्शन घडणार आहे. खास जपानी संगीत आणि नृत्य अनुभवण्याची संधीही पुणेकरांना आहे.”

लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनांना वेगळे वळण देण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये-रमेश बागवेंचा इशारा

0

पुणे-मागासवर्गीयांवर अन्याय होताना गप्प बसायचे आणि न्याय मागायला लोकशाही मार्गाने आंदोलने करू पाहणाऱ्यांना वेगळ्या वळणावर न्यायचे असे पाप प्रशासनाने करू नये असा सज्जड इशारा माजी गृहराज्यमंत्री आणि पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष मातंग समाजाचे नेते रमेश बागवे यांनी येथे दिला. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मातंग एकता आंदोलन यांच्या वतीने धरणे आंदोलन बागवे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांना स्पीकर वरून बोलण्यास सुरुवातीला मज्जाव करण्यात आला . त्यानंतर बागवे येथे येताच त्यांच्या कानावर हि बाब कार्यकर्त्यांनी घातली तेव्हा बागवे यांनी संबधित अधिकाऱ्याला जाब विचारला .

यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले ,’लाखोंच्या संख्येने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देणे म्हणजे मागासवर्गीयांच्या विकासाची दारे बंद करून त्यांची अधोगती करण्यासारखे आहे हे खरंतर काही पक्ष व अधिकारी जे मनुविचारांनी कार्य करतात. ते पुन्हा मनु संस्कृती समाजामध्ये रुजू होण्याच्या दृष्टीने मागासवर्गीय आणि दलितांनी शिक्षण घेऊ नये, व्यवसाय करू नये त्यांनी अजूनही शोषितच् रहावे या माध्यमातून काम करत आहेत. त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही मातंग समाज महासंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून शांततेत मोर्चा काढून आमच्या मागण्या शासनाकडे दिल्या होत्या, परंतु सरकारने व शासनाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येते यामुळे समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत जोपर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही व इतर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे यावेळी रमेश बागवे यांनी म्हणाले .

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रकरणे लाल फितीत -अविनाश बागवे(व्हिडिओ)

0

पुणे- मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या लालफितीत अडवून प्रशासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रगतीची दारे अडवून ठेवू नयेत या मागणीसह मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मातंग एकता आंदोलन यांच्या वतीने धरणे आंदोलन शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी बोलताना नगरसेवक आणि मातंग समाजाच्या संघटनेचे पदाधिकारी अविनाश बागवे म्हणाले ,’सन २०१४ पासून भाजपचे मोठे मोठे नेते, दिवंगत गोपीनाथजी मुंडे, माजी खासदार अनिल शिरोळे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतरांनी संगमवाडी येथील आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक शासनाच्या वतीने लवकरात लवकर करण्यात येईल अशा घोषणा केल्या. पुणे मनपाने सन २०१४ पासून अंदाजपत्रकात तरतूद करून आतापर्यंत जवळ जवळ ३० कोटी रु. शासनाकडे जमा केले. गेल्या वर्षी सन २०१८ ला नोव्हेंबर महिन्यात देवेंद्र फडणवीस लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधी स्थळी येऊन कार्यक्रमात म्हटले होते की येत्या १५ दिवसात स्मारकाचे काम सुरू होईल परंतु चुकीच्या पद्धतीची एक समिती गठीत करण्यापलीकडे प्रशासनाने काहीही केले नाही.तसेच सन २०१७ -१८ मध्ये पुणे शहर व राज्यातील लाखो विद्यार्थ्याना ३,१९,५८६ वैध अर्जा पैकी केवळ १,९६५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली ही अत्यंत गंभीर बाब आहे. तरी उर्वरित सर्व मागासवर्गीय विद्याथ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. सन २०१८ – १९ मध्ये ४,१६,४१४, पैकी एकही विद्यार्थ्याला अजूनही शिष्यवृत्ती मिळाली नाही हि अतिशय गंभीर बाब आहे. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी भारत सरकारची फ्री शिप, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती साठी विद्यार्थी आज करतात. समाज कल्याण विभागात महाराष्ट्र राज्यातून ५,७१,३२४ विद्यार्थीनी अर्ज केले त्यामध्ये पुणे मधून ५८,१३१ विद्यार्थीनी अर्ज केले हिते त्या पैकी केवळ १२८ विद्यार्थीना शिष्यवृत्ती मिळाली.
सन २०१९-२० मध्ये ३,६७,५९५, विद्यार्थ्यानी अर्ज केले होते छाननी नंतर काही अर्ज बाद झाले तर ३,१९,५८६ अर्जाची पडताळणी करण्यात आली व १,०२,५१७ अर्ज कॉलेज ने मंजूर केले एकूण अर्ज पैकी २,१६,९६९ अर्ज कॉलेज कडे आजही प्रलंबित आहेत शासनाकडे पाठविलेल्या अर्जा पैकी २६,००१ एवढेच अर्ज मंजूर करण्यात आले. तर ७६,५१६ इतके अर्ज जिल्हा कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. केवळ १,९६५ मागासवर्गीय विद्यार्थ्यालाच शिष्यवृत्ती मिळाली असल्याचे माहिती अधिकार अंतर्गत स्पष्ट झाले आहे. या वरून शासन मागास वर्गीयाच्या विद्यार्थ्याच्या बाबतीत किती सक्रिय आहे हेच दिसून येते.
मातंग समाजाचा आयोग शासनाच्या वतीने जो क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज आयोग स्थापन करण्यात आला होता. त्याच्या शिफारशी शासनाकडे आजही प्रलंबित असल्यामुळे शासनाने त्याची दखल न घेतल्यामुळेच मातंग समाजाचा सर्वांगीण विकासापासून दूर आहे. अशा प्रलंबित आयोगाच्या शिफारशीची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी.
मातंग समाजाला अनुसूचित जाती मध्ये अ ब क ड प्रमाणे लोकसंख्येच्या आधारावर स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे.सरकार व प्रशासन नेहमीच मातंग समाजाची दिशाभूल करत आले असून, यापुढे प्रशासनाने समाजाच्या या मागण्यांकडे गांभीर्यपूर्वक पाहिले नाही व येत्या १५ दिवसात जर सर्व विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती दिली नाही तर सर्व समाज रस्त्यावर उतरेल व समाजाच्या या तीव्र भावनेमुळे अनुचित प्रकार घडला तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असे मत नगरसेवक अविनाश बागवे यांनी व्यक्त केले.
आंदोलनाचे नेतृत्व राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले व आयोजन पुणे मनपा नगरसेवक व संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष श्री. अविनाश बागवे व शहराध्यक्ष विठ्ठल थोरात यांनी केले होते.
प्रशासनाने या मागण्या तातडीने मान्य केल्या नाही तर या पुढील काळात तीव्रआंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे शहराध्यक्ष विठ्ठल थोरात यांनी दिला.

बाल-कुमारांच्या कवितांनी रसिकांना केले विचारप्रवृत्त

0
पिंपरी :
‘लहान तोंडी मोठा घास’ ही उक्ती खरी ठरवत बाल-कुमारांनी दुष्काळ, पर्यावरण, अवकाळी पाऊस, स्त्री भ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या अशा महाराष्ट्रापुढील गंभीर विषयांवर कविता सादर करीत सभागृहाला विचारप्रवृत्त केले.
          शब्दधन जीवन गौरव काव्यमंचातर्फे आयोजित पहिल्या शब्दधन जीवन गौरव राज्यस्तरीय बाल-कुमार साहित्य संमेलनात दुपारच्या सत्रात निमंत्रित बालकांचे कविसंमेलन संपन्न झाले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष अरुण पवार, संमेलनाचे समन्वयक प्रा. संपत गर्जे, शब्दधन जीवन गौरव काव्यमंचाचे अध्यक्ष दिगंबर शिंदे, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, सरोज पंडित, विजय अंधारे, बापू डिसोजा, पुनम पाटील, मीनाक्षी डफळ, अलका बोर्डे, विजय लोंढे, पांडुरंग पवार, सीमा गांधी, पुष्पा सदाकाळ, उत्कर्ष शिरसाट, अनुष्का गर्जे, विकास बोडके, सभा शेख, उत्कर्ष बुधवंत, आर्या शेवाळे, ऐश्वर्या कुलकर्णी, गणेश पाचारणे, आदिती वायाळ, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रमुख पितामह कोष्टी होते.
             साधना शेलार या बालकवयित्रीने सादर केलेली ‘मुलगी’ ही कविता रसिकांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली. स्त्रीभ्रूण हत्या रोखा, जन्मापूर्वी मला गर्भातच मारू नका, असा या कवितेचा अन्वयार्थ होता. ईश्वरी गवळी हिने ‘आई वडिलांच्या अपेक्षा’ कविता सादर करत मुलगी वाचवा हा संदेश दिला. कृष्णा कांबळे या कवीने दमदार आवाजात सादर केलेली ‘पाऊस’ कविता अंगावर शहारे आणणारी होती. या कवितेने रसिकांच्या उत्स्फूर्त दाद घेतली. ‘पावसाने दिला शाप’ कविता सादर करीत पल्लवी सुपुत्रे हिने दुष्काळ, अवकाळी पावसामुळे शेती- घरेदारांचे झालेले प्रचंड नुकसानाने खचलेल्या मनाचा ठाव कवितेतून घेतला.
         ‘सकाळ झाली उठुया, रात्रीला बाय बाय करूया, स्वच्छ भारत करूया, रोगांना आपण घालवूया’, कविता सादर करून स्वच्छ भारतासाठी मूल्ये जपण्याचे आवाहन गौरव अनारसे या विद्यार्थ्याने आपल्या कवितेतून रसिकांना केले. पूर्वा वैभव सोनवणे या चार वर्षाच्या चिमुकलीने ‘आभाळातून पडले कमळाचे फुल’ कविता सादर करीत रसिकांची वाहवा मिळविली. टाळ्यांच्या कडकडाटात तिच्या कवितेला उत्स्फूर्त दाद दिली. शिवांजली वणारसे हिने पाऊस कविता सादर केली.
       समीक्षा लहिरे या विद्यार्थिनीने ‘धर्म’ कविता सादर केली. तिने कवितेतून ‘आपण सर्व एकाच धर्माचे आहोत, त्यामुळे भेदाभेद विसरून सशक्त भारत घडवूया हा संदेश दिला. आरती जाधव हिने ‘गरज फक्त परिवर्तनाची’ कवितेतून कर्जमाफी, आत्महत्या करण्याच्या मनोवृत्तीतून बाहेर पडावे, समान हक्क मिळावेत, पर्यावरणाचा समतोल राखला जावा अशा अपेक्षा व्यक्त करीत रसिकांना विचारप्रवृत्त केले. वैशाली वाळके हिने पक्ष्यांची शाळा सादर करीत शाळेविषयी संकल्प केला. सार्थक हिंगणे याने मला सहलीला जायचंय कविता सादर केली. ऐश्वर्या कुलकर्णी हिने ‘निसर्गाचा नियम’ कविता सादर केली. यातून तिने वृक्षतोड, प्रदूषण याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कैलास गुंजाळने ‘देवाकडे मागणे’ सादर करीत रसिकांना बालपणाच्या आठवणींत नेऊन ठेवले. स्वानंद पारखी, गौरी शिंदे, भक्ती बुधवंत, प्रीती पठारे, गौरी कारके, स्तुती क्षेत्रे, दीपाली लोणारे यांनीही कविता सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
          तत्पूर्वी, सोमनाथ वाघ यांनी ‘खैरलांजी पुन्हा घडणार नाही’, हा नाट्याविष्कार सादर करीत रसिकांना विचारप्रवृत्त केले. कलीम तांबोळी यांनी कथाकथन सादर करीत संपूर्ण रसिकांना हास्यकल्लोळात घेऊन गेले. नाट्याविष्कार व कथाकथन या सत्राच्या अध्यक्षस्थानी नागेश शेवाळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पारू कडाळे, दीपक अमलिक, प्रा. अनिता सुळे उपस्थित होते.
          सूत्रसंचालन निरुमा भेंडे, सोमनाथ वाघ, वंदना इंनानी, मनिषा भोसले यांनी केले.

पं.विजय घाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘शिखर सन्मान’ पुरस्कार जाहीर

0

 

पुणे– मध्य प्रदेश राज्य शासनाच्या संस्कृती विभागाच्या वतीने साहित्य, संगीत  आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी मान्यवरांना ‘शिखर सन्मान’ पुरस्कार प्रदान केला जातो. अतिशय मानाच्या या पुरस्कारासाठी यंदा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांची निवड करण्यात आली आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार दि. १८ नोव्हेंबर २०१९ रोजी भोपाळ येथे पं. विजय घाटे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

बीएसएएम सिक्स रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत पुण्याच्या शिवम अरोरा याला विजेतेपद

0
पुणे: द पूना क्लब लिमिटेड आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने  बीएसएएम सिक्स रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत माजी सिक्स रेड स्नूकर विजेता शिवम अरोरा याने मुंबईच्या मानव पांचाळचा 7-4(35-33, 51-11, 65-00, 39-17, 22-33, 22-38, 48-18, 28-42, 23-30, 36-10, 41-04) असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पूना क्लब येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात पुण्याच्या शिवम अरोरा याने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित मुंबईच्या मानव पांचाळ याचा 7-4(35-33, 51-11, 65-00, 39-17, 22-33, 22-38, 48-18, 28-42, 23-30, 36-10, 41-04) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 2तास 40मिनिटे चाललेल्या सामन्यात शिवम याने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले. सामन्यात 4-0अशा फरकाने आघाडीवर असताना मानवने सुरेख खेळ करत पिछाडी भरून काढली व त्यामुळे सामन्यात 5-4अशी स्थिती झाली. पण त्यानंतर मानव याने केलेल्या चुकांचा फायदा घेत शिवमने पुढील दोन्ही फ्रेम जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
यावेळी शिवम म्हणाला कि, मानव हा उत्तम पॉटर आहे. सामन्यात सुरुवातीला मी 4-0अशा फरकाने आघाडीवर होतो. पण पिछडीवरून जोरदार कमबॅक करत सामन्यात 5-4अशी स्थिती निर्माण केली. पण पुढील दोन्ही फ्रेममध्ये मला वर्चस्व राखता आले. हा विजय माझ्यासाठी खूप महत्वाचा असून माझ्या कारकिर्दीतील हे पहिले राज्यस्तरीय स्पार्धेतील विजेतेपद आहे.
याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दुसऱ्या मानांकित मुंबईच्या मानव पांचाळने आपला सहकारी शाहबाज खानचा 6-5(22-34, 31-37, 47-10, 35-12, 12-51, 50-16, 35-17, 29-32, 57(52)-01, 33-39, 34-31) असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. 2तास चाललेल्या या सामन्यात निर्णायक फ्रेममध्ये शाहबाज खान हा 31-00अशा फरकाने आघाडीवर होता. पण विजयाच्या जवळ असताना शाहबाजकडून फ्लक झाला व याचाच फायदा घेत मिळालेल्या संधीचे सोने करत मानव याने ही फ्रेम 34-31 अशी जिंकून विजय मिळवला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत पुण्याच्या शिवम अरोराने मुंबईच्या अव्वल मानांकित हसन बदामीचास 6-1(48-25, 35-26, 42-17,  55-00, 36-12, 13-44, 30-19) असा सनसनाटी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
हसन बदामी(मुंबई), मानव पांचाळ(मुंबई), अभिषेक बोरा(पुणे), शिवम अरोरा(पुणे), माधव जोशी(पुणे), तहा खान(पुणे), शाहबाज खान(मुंबई), संकेत मुथा)मुंबई)या खेळाडूंची आगामी 2020 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेसाठी झाली असून आणखी दोन महाराष्ट्राच्या खेळाडूंना बीएसएएम तर्फे वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात येणार असल्याचे बीएसएएमचय अध्यक्ष राजन खिंवसरा यांनी सांगितले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
शिवम अरोरा(पुणे)वि.वि.हसन बदामी(मुंबई)(1) 6-1(48-25, 35-26, 42-17,  55-00, 36-12, 13-44, 30-19);
मानव पांचाळ(मुंबई)(2)वि.वि.शाहबाज खान(मुंबई) 6-5(22-34, 31-37, 47-10, 35-12, 12-51, 50-16, 35-17, 29-32, 57(52)-01, 33-39, 34-31);
अंतिम फेरी: शिवम अरोरा(पुणे)वि.वि.मानव पांचाळ(मुंबई)(2) 7-4(35-33, 51-11, 65-00, 39-17, 22-33, 22-38, 48-18, 28-42, 23-30, 36-10, 41-04).

काँग्रेसने घेतली उद्धव ठाकरेंसह शिवसेना आमदारांची भेट

0

मुंबई – राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू असतानाच मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यानंतरही सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरूच आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बुधवारी किमान समान कार्यक्रमावर एक समिती नेमली. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 5-5 सदस्य नेमण्यात आले. या समितीमध्ये सामिल असलेल्या काँग्रेस नेत्यांनी संजय राउत यांची रुग्णालयात जाऊन भेट देखील घेतली. यानंतर काही वेळातच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाहेर पडत असताना महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि लवकरच सरकार स्थापित होईल असे दावा राउत यांनी केला आहे.

किमान समान कार्यक्रमात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीकडून या समितीमध्ये जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांना सामिल करण्यात आले आहे. या समितीने शेतकऱ्यांचा मुद्दा आणि कर्जमाफी केंद्रस्थानी ठेवण्याचा निर्णय घेतला. यानंतर काँग्रेस नेत्यांनी ट्रायडेंट हॉटेल येथे जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदारांची भेट घेतली. आजपासून चर्चेला सुरुवात झाली याशिवाय उद्धव यांनी माध्यमांशी काहीही बोलण्यास नकार दिला.

उद्धव ठाकरेंसोबत केवळ सदिच्छा भेट -काँग्रेस

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांसोबत झालेली भेट ही सदिच्छा भेट होती असे सांगितले आहे. हॉटेल ट्रायडेंटमध्ये झालेल्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते एकमेकांशी सविस्तर चर्चा करतील. त्यानंतर आवश्यकता वाटल्यास आणखी एकदा उद्धव यांच्याशी चर्चा केली जाईल असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

युती ची दारे बंद झाली असतील तर ती आम्ही नाही केली भाजपने केली -उद्धव ठाकरे

0

मुंबई-निवडणुकी नंतर भाजपचा ऑप्शन मी नाही खतम केला ,तर तो भाजपनेच केला. ठरलेले अमलात आणा असेच आमचे म्हणणे होते . युतीची दारे एकमेकांना बंद झाली असतील तर ती आम्ही नाही केली भाजपनेच केली ,आता घाई काय , राज्यपालांनी महिने दिले आहेत ,राजनीती आहे असे सांगत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपालांच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी  नाराजी व्यक्त केली मात्र राष्ट्रपती राजवटी विरोधात न्यायालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत युती तुटली का? हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी बगल दिली आहे. भाजपा अजूनही संपर्कात आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की रोज नवनवे प्रस्ताव येत असतील तर त्या चर्चेला काही अर्थ नाही. जे काही ठरलं होतं ते ठरलं होतं, मला खोटं ठरवण्यात आलं त्यामुळे माझा संताप झाला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजपाने परवा आम्हाला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मित्राचा सल्ला आम्ही ऐकला आहे असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. जे काही ठरेल ते जगजाहीर होणार आहे आम्ही लपूनछपून

महाराष्ट्राचं सरकार चालवणं हा काही पोरखेळ नाही. संख्याबळ आणि पाठिंब्याची पत्रं आमच्याकडे नव्हती. त्यामुळेच आम्ही ४८ तासांची मुदत मागितली होती. मात्र राज्यपालांनी आम्हाला मुदत दिली नाही. राष्ट्रपती राजवट लागल्याने आम्हाला सहा महिन्यांचा कालवाधी दिला आहे. एवढे दयावान राज्यपाल आम्हाला लाभलेच नव्हतेच. वेगळ्या विचारधारेचे प्रश्न एकत्र कसे येणार हा सगळ्यांसमोर पडलेला प्रश्न आहे. भाजपा आणि मुफ्ती मोहम्मद कसे एकत्र आले? पासवान आणि भाजपा कसे एकत्र कसे आले? चंद्राबाबू आणि भाजपा एकत्र कसे आले होते? याची माहिती मागितली आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

भाजपाने आमच्यासोबत ठरवलेल्या गोष्टी होत्या त्यात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरवलंच होतं. मात्र भाजपाने मला खोटं ठरवलं आणि ते माझ्यासाठी संतापजनक होतं. हिंदुत्त्व ही आमची विचारधारा आहे. हिंदुत्त्वाला वचनबद्धता हे महत्त्वाची आहे. देशात रामराज्य आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण रामराज्य आणावं ही आमची संकल्पना आहे. अरविंद सावंत यांना धन्यवाद द्यायचे आहेत कारण शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक म्हणून मला अभिमान वाटतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे ४८ तासांची मुदत मागितली. आम्ही सरकार बनवू इच्छितो हा दावा आम्ही केला. मात्र आम्हाला ४८ तासांची मुदत दिली नाही. मात्र राज्यपाल खूप दयावान आहेत त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करुन आम्हाला सहा महिन्यांची मुदत दिली आहे असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. गेल्या अनेक वर्षांत एवढी दयावान व्यक्ती आपल्या राज्याला लाभली नव्हती असाहीट टोला त्यांनी लगावला.

  • राष्ट्रपती राजवटीविरोधात याचिका केली नाही.
  • राज्यपालांच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंकडून नाराजी व्यक्त
  • राज्यपालांनी ४८ तासांची मुदत न दिल्याबद्दल टोला
  • आता आम्हाला ६ महिन्याचा अवधी
  • शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा कायम
  • वेळ वाढून न देणाऱ्या राज्यपालांवर टीका
  • भाजप आणि मेहबुबा कसे एकत्र आले? उद्धव ठाकरेंचा सवाल
  • हिंदुत्व आमची विचारधारा आहे
  • अरविंद सावंतांना मंत्री पदाचा मोह नाही
  • अरविंद सावंत कडवट शिवसैनिक
  • युती तुटली का? प्रश्नाला उद्धव ठाकरेंची बगल
  • आता शिवसेना आणि आघाडी एकत्र बरसतील
  • महाराष्ट्रत सरकार बनवणं चेष्टा नाही
  • हिंदुत्व आमची विचारधारा
  • भाजपशी चर्चा आम्ही नाही बंद केली तर भाजपनं बंद केली
  • जे ठरलं ते अमलात आण एवढेच आम्ही म्हटले होते .
  • आता जे आमचं ठरेल ते जगजाहीर असेल, लपून छपून काही होणार नाही

आता कुठे शिवसेनेशी चर्चा सुरु होणार … कॉंग्रेस -राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेतला सूर

0
मुंबई-शिवसेनेने आम्हाला कालच संपर्क साधला आहे. त्यामुळे आम्ही आज मुंबईत आलो. मात्र शिवसेनेसोबत जाण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आधी दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा होईल. किमान समान कार्यक्रम ठरेल, त्यानंतरच आम्ही शिवसेनेसोबत काही मुद्द्यांवर चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, असं  काँग्रेसने स्पष्ट केलं.
राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे आता आम्हाला घाई नाही. आम्हाला भरपूर सवड आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र मिळून निवडणूक लढवलं होतं. त्यावेळी आम्ही एकत्रित निवडणूक अजेंडा तयार केला होता. आता नवं सरकार बनवताना किमान समान कार्यक्रम तयार करण्यात येईल. त्यासाठी शिवसेनेचं काय धोरण आहे. किमान समान कार्यक्रम कसा असावा? याबाबत शिवसेनेशी चर्चा करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ. विचारधारासमोर ठेवूनच आम्ही पुढे जाणार आहोत. आता कुठे आमच्यात चर्चा सुरू झाली आहे, असं पवारांनी स्पष्ट केलं. यावेळी अहमद पटेल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारने कधीच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही. त्यांनी गोव्यापासून ते मणिपूरपर्यंत कायद्याचं उल्लंघन केलं आहे. राष्ट्रपती राजवट हा भाजपचा मनमानी कारभार आहे. त्यामुळेच आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निषेध करत आहोत, असं पटेल म्हणाले. राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेचा दावा करण्याचं निमंत्रण दिलं. पण काँग्रेसला बोलावलं नाही, हे अत्यंत चुकीचं होतं, असंही ते म्हणाले.

जुन्नरमध्ये देशी बनावटीचे पिस्तुल जप्त

0
स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर बस स्थानकात एका संशयितरित्या आढळलेल्या व्यक्तीकडून मंगळवारी (दि. १२) पहाटे देशी बनावटीच्या पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषन विभाग पुणे ग्रामीणने ही कारवाई केली असून आदिनाथ दिलीप जाधव (वय-२२, रा. जामगाव, ता. गंगापूर, औरंगाबाद) या इसमाला दुचाकीसह अटक करण्यात आले आहे.
मंगळवारी पहाटे गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला हा संशयित इसम बस स्थानक आवारात आढळल्यावर पोलिसांनी त्याची झडती घेतली होती. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांचे आदेशान्वये आणि पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शंकर जम, सुनील जावळे, शरद बांबळे, दिपक साबळे व पोलिस मित्र प्रसाद पिंगळे यांनी केली आहे.
देशी बनावटीचे पिस्तुल, काडतुसे, दुचाकी आदी मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणी करून आरोपीला मुद्देमालासह पुढील कार्यवाही करीता जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीने सदरचा कट्टा व काडतुसे कोणत्या हेतूने जुन्नरला आणली होती, हे जाबजबाबानंतर उघड होण्याची शक्यता आहे.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद, राष्ट्रवादीचा शिवसेनेला प्रस्ताव ?

0

मुंबई-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा सोमवारी शिवसेनेने राज्यपालांकडे केला असला तरी १४५ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यास पक्षाला अपयश आले. पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळून राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा न देता थेट सत्तेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.असे येथे वृत्त आले आहे.

भाजपा आणि शिवसेना सत्ता स्थापन करण्यात असमर्थ ठरल्यानंतर राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं असून रात्री ८.३० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु असून काय निर्णय घेतील याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही रिट्रीट हॉटेलमध्ये आमदारांशी चर्चा करत आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालांकडे राष्ट्रपती शिफारस लागू करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन वेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असून ही तिसरी वेळ आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे, असा शिवसेनेचा प्रयत्न होता. यातूनच शिवसेनेने केंद्रातील सरकारमधून बाहेर पडावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी व काँग्रेसने व्यक्त केली होती. यानुसार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. सरकार स्थापण्याबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चाही झाली. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यास विरोध झाला होता. पण राज्यातील नेत्यांची तीव्र भावना लक्षात घेता, पुन्हा बैठक बोलाविण्यात आली.

काँग्रेसने सुमारे साडेतीन तासांच्या बैठकीनंतरही काहीच निर्णय घेतला नाही. काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र प्राप्त होईल, अशी चर्चा सुरू झाली. साडेसातपर्यंत राज्यपालांनी शिवसेनेला मुदत दिली होती. शिवसेना नेते पावणेसात वाजता राजभवनवर पोहोचले. पण काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्रच प्राप्त झाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा गृहीत धरून शिवसेनेने सरकार स्थापण्याचा दावाही केला होता. पण पाठिंब्याचे पत्र सादर करू शकले नाहीत.

काँग्रेसची बैठक रात्री आठपर्यंत सुरू होती. काँग्रेसने पाठिंब्याबाबत वेळेत पत्रच दिले नाही. काँग्रेसचे पत्र न आल्याने राष्ट्रवादीनेही राज्यपालांना पत्र दिले नाही. मित्र पक्षांनी तत्त्वत: मान्यता दिली असली तरी पत्र नंतर सादर करू, असे शिवसेनेच्या वतीने राज्यपालांना विनंती करण्यात आली. पण राज्यपालांनी पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यास नकार दिला.

टेलिव्हिजन व फिल्म मेकिंग क्षेत्रातील संधींचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, यासाठी ‘सूर्यदत्ता प्रॉडक्शन्स’ची स्थापना

0
पुणे : ”महाविद्यालयात दिल्या जाणाऱ्या ज्ञानाला कृतिशीलतेची जोड देण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना अनुभवसंपन्न बनविण्याकरिता सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने नियमित नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. त्या पद्धतीचे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. सध्या संस्थेत इंटिरिअर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, ब्युटी अँड वेलनेस, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल, टुरिजम, एव्हिएशन, जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन, ग्राफिक्स, मल्टिमीडिया, ऍनिमेशन, परफॉर्मिंग आर्टस् अशा प्रकारचे ६५ हुन अधिक कमी कालावधी व पूर्णवेळ अभ्यासक्रम चालविले जातात. टेलिव्हिजन, फिल्म मेकिंग क्षेत्रात असलेल्या अफाट संधींचा लाभ विद्यार्थ्यांसह तरुणांना व्हावा, यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ‘सूर्यदत्ता प्रॉडक्शन्स’ हा विभाग सुरु करण्यात येणार आहे. त्यामार्फत या क्षेत्राशी निगडित विविध लघुकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या फिल्मची निर्मिती करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे संस्थेच्या विद्यार्थ्यांसह इतर तरुणांना आणि मनोरंजन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या कोणालाही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे,” अशी माहिती सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे सल्लागार सचिन इटकर, संचालिका कॅप्टन शालिनी नायर, अक्षित कुशल, अनिमेशन विभागाचे प्रमुख प्रा. अंकित जैन, कुलसचिव नूतन गवळी, प्रशासन व्यवस्थापक रोहित संचेती आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या कौशल्य विकास अभियानांतर्गत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या एंटरप्रेन्युअरशिप अँड स्किल डेव्हलपमेंटअंतर्गत सूर्यदत्ता इन्स्टिट्युट ऑफ मास कम्युनिकेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट आणि मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल कौंन्सिल (एमइएससी) यांच्यात नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. गोरेगाव येथील मुक्ता आर्टसमध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, स्किल इंडिया अभियान, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मंथन’ या कार्यक्रमात दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या सामंजस्य कराराचे आदानप्रदान केले गेले. मुंबईतील या कार्यक्रमात मीडिया अँड स्लिक कौन्सिल साऊथ रिजनल विभागाच्या ज्योती जोशी, मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सुब्बा राव, व्हिसलिंग वुड इंटरनशनलच्या उपाध्यक्ष चैतन्य चिंचलीकर, ‘एमइएससी’चे मोहित सोनी, सिनेमा अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे अमित बेहेल, ‘एमइएससी’चे आणि व्हिसलिंग वुड इंटरनशनलचे संचालक सुभाष घई, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते. मीडिया आणि एंटरटेनमेंट, चित्रपट निर्मिती, तसेच या क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधी याविषयी ‘मंथन’मध्ये मार्गदर्शन झाले. सुभाष घई यांनी त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील आजवरच्या कारकिर्दीतील अनुभव व आठवणीना उजाळा दिला. ‘सूर्यदत्ता’सह चंदिगड येथील चितकारा, दिल्लीमधील शारदा व सेंच्युरीअन, चेन्नईमधील इरिट्रिया, कोलकत्ता येथील जेआयएस या विद्यापीठासोबतही शैक्षणिक सामंज्यस्य करार करण्यात आले आहे.”
या शैक्षणिक सामंजस्य कराराविषयी बोलताना डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ”सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या २० वर्षापासून विविध अभ्यासक्रम राबविले जात आहेत. संस्थेच्या कार्याची, अनुभवाची व गुणवत्तेची दखल घेत हा शैक्षणिक सामंजस्य करार झाला आहे. आमच्यासाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे. संस्थेत चालणाऱ्या विविध अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यंना निरनिराळ्या क्षेत्रात संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांना अभिनय, मीडिया इन कम्युनिकेशन, ऍनिमेशन फिल्म एंटरटेनमेंट ऍण्ड व्हीएफएक्स, फिल्म मेकिंग, परफॉर्मिंग आर्टस या विषयातील पदवीचे शिक्षण दिले जात असून, या विषयातील तीन, सहा महिने आणि एक वर्षाच्या कालावधीचे अभ्यासक्रम सुरु आहेत. याशिवाय जर्नलिझम इन मास कम्युनिकेशन, मास्टर इन जर्नालिझम ऍण्ड मास कम्युनिकेशन, डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट आदी विषयांचे अभ्यासक्रम संस्थेत राबविले जात आहेत. ‘सूर्यदत्ता प्रॉडक्शन’मुळे विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रॉजेक्ट करण्याचे अनुभव मिळतील. शॉर्ट फिल्म, ऍनिमेशन, बायोपिक आदी विविध प्रोजेक्ट्साठी त्यांना मदत होईल. संस्थेतून बाहेर पडलेला विद्यार्थी पूर्णपणे तयार होऊन बाहेर पडेल. आजवर संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यर्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले. तसेच ते विविध नामवंत कंपन्यात उच्च पदावर कार्यरत आहेत. सूर्यदत्ताने केलेल्या करारामुळे तसेच प्रोडक्शन हाऊसमुळे चित्रपट, ऍनिमेशन, इव्हेन्ट मनजमेंट, जाहिरात, रेडिओ, डिजिटल आणि प्रिंट मीडिया आदी क्षेत्रात रोजगाराच्या आणि व्यवसायच्या संधी उपलब्ध होतील.” विद्यार्थ्यांमध्ये दडलेले गुण शोधून त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी लागणाऱ्या बऱ्याचशा सुविधा संस्थेच्या कॅम्पसमध्ये आहेत. उर्वरित सोयी लवकरच उभारल्या जाणार असून, बहुउद्देशीय विभाग सुरु होणार आहे.

सचिन इटकर म्हणाले, ”नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या सूर्यदत्ता ग्रुपने मनोरंजन क्षेत्रात टाकलेले पाऊल कौतुकास्पद आहे. शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच होत आहे. या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत स्टुडिओ निर्मिती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच पुणे आणि परिसरातील संस्थांना व तरुणांना याचा फायदा होईल. येथे येणाऱ्या लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, तंत्रज्ञ अशा विविध तज्ज्ञांकडून मुलांना नवीन काहीतरी शिकायला मिळेल. मनोरंजन क्षेत्राशी संबंधित काम करू इच्छिणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि कौशल्यासह प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव या ‘सूर्यदत्ता प्रॉडक्शन्स’मधून मिळेल, असा विश्वास वाटतो.”

पाचव्या किड्स मॅरेथॉन स्पर्धेत भार्गव बरफ, अनन्या विजय, अवनिश मुळे, ज्ञानेश्वरी फडतरे यांना विजेतेपद

0

पुणे: सिम्पल स्टेप्स यांच्या वतीने पाचव्या किड्स(लहान मुलांच्या) मॅरेथॉन स्पर्धेत 7कि.मी. मुलांच्या गटात भार्गव बरफ व मुलींच्या गटात  अनन्या विजय यांनी तर  5कि.मी. मुलांच्या गटात अवनिश मुळे व मुलींच्या गटात  ज्ञानेश्वरी फडतरे यांनी अव्वल क्रमांक पटकवत विजेतेपद संपादन केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पार पडलेल्या या शर्यतीत 1750धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचा फ्लॉग ऑफ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्हाईस चन्सलर नितिन करमरकर व निवृत एसीपी सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.  7 कि.मी शर्यतीत मुलांच्या गटात  भार्गव बरफने 29ः6  सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला तर  आकाश साळुंखेने 29ः59  सेकंद व  करण वाघने 30ः42  सेकंद अशी वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात  अनन्या विजयने 32ः42  सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला तर रमा टोनपेने 33ः09  सेकंद व हरीका खत्तीने 33ः10 सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

5 कि.मी शर्यतीत मुलांच्या गटात अवनिश मुळेने 23ः06सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला तर शौर्य कुलकर्णीने 24ः22सेकंद व राम मगदुमने 24ः46सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात  ज्ञानेश्वरी फडतरेने 23ः12सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला तर हरिणी व्ही हीने 29ः01सेकंद व मोक्षदा चौधरीने 32ः23सेकंद अशी वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील अव्वल तीन स्पर्धकांना पदक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. तर शर्यत पुर्ण करणा-या सर्व स्पर्धकांना पदक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण जम्पस्टार्टचे आदित्य व स्नेहा तापडीया, आदर पुनावाल क्लिन सिटी उपक्रमाचे मल्हार करवंदे व  सिम्पल स्टेप्सचे फाउंडर आशिष कसोदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: (प्रथम, व्दितीय व तृतीय या क्रमानुसार):

7कि.मी. मुले: 1. भार्गव बरफ(29ः6से), 2. आकाश साळुंखे(29ः59से), 3. करण वाघ(30ः42से)

7कि.मी. मुली: 1. अनन्या विजय(32ः42से), 2. रमा टोनपे(33ः09से), 3.हरीका खत्ती (33ः10से)

5कि.मी. मुले: 1.  अवनिश मुळे(23ः06से), 2. शौर्य कुलकर्णी(24ः22से), 3. राम मगदुम(24ः46से)

5कि.मी.मुली: 1. ज्ञानेश्वरी फडतरे(23ः12से), 2. हरिणी व्ही(29ः01से), 3.मोक्षदा चौधरी(32ः23से)

‘खरं सांगायचं तर..’ अव्वल…

0

कराड : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडळाचे ‘खरं सांगायचं तर’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले. तर बारामती परिमंडलाचे ‘ब्रीज’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

बारामती परिमंडल आयोजित येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनामध्ये (टाऊन हाँल) मंगळवारी (दि. 12) दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचा समारोप झाला. महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सचिन तालेवार, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके, मुख्य अभियंता श्री. अनिल भोसले (कोल्हापूर परिमंडल), प्रभारी मुख्य अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर (बारामती परिमंडल) यांच्याहस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर परिक्षक सौ. सुप्रिया भागवत, श्री. प्रशांत गोखले, श्री. राज कुबेर यांची उपस्थिती होती.

नाट्यस्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी (दि. 12) पुणे परिमंडलाने उदय नारकर लिखित ‘खरं सांगायचं तर..’ हे नाटक सादर केले. मानवी नात्यांचा उत्कंठावर्धक नाट्यातून वेध घेणार्‍या सादरीकरणाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार दिग्दर्शित या नाटकामध्ये अपर्णा मानकीकर, संतोष गहेरवार, सचिन निकम, विजय जोशी, शैलेंद्र भालेराव आदी प्रमुख भूमिकेत होते. कोल्हापूर परिमंडलाने हणमंत नलवडे दिग्दर्शित ‘चरणदार चोर’ हे सामाजिक विषयावरील नाटक सादर केले व नाट्यरसिकांची दाद मिळविली. या नाटकामध्ये महेश कांबळे, नजीर अहमद मुजावर, शिवराज आणेकर, सोनाली बेंद्रे आदी कलावंतांनी भूमिका केल्या.

नाट्यस्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून पुणे परिमंडलाच्या ‘खरं सांगायचं तर..’ या नाटकाला  प्रथम तर बारामती परिमंडलाच्या ‘ब्रीज’ या नाट्यकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला. यासोबतच दिग्दर्शनप्रथम – पंकज तगलपल्लेवार (पुणे), द्वितीय – श्रीकृष्ण वायदंडे (बारामती), अभिनय (स्त्री) – प्रथम – अपर्णा माणकीकर (पुणे), द्वितीय- सोनाली बेंद्रे (कोल्हापूर), अभिनय (पुरुष) – प्रथम- संतोष गहेरवार (पुणे), द्वितीय – राम चव्हाण (बारामती), नेपथ्य – भरत अभंग व राजेंद्र हवालदार (पुणे), द्वितीय – अभिमन्यू राख (बारामती), प्रकाशयोजना – प्रथम – किरण दौंड व कुमार गवळी (पुणे), द्वितीय – महावीर शेंडगे (बारामती), पार्श्वसंगीत – संजय नायकवडी व पवन देशमुख (पुणे), द्वितीय – नीलेश गव्हाणे (बारामती), रंगभूषा व वेशभूषा – प्रथम – कीर्ती भोसले, द्वितीय नितीन सावर्डेकर (कोल्हापूर) तर अभिनयाच्या उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी रुकय्या शिलदार (बारामती), निकिता खैरनार (पुणे), व मंगेश कांबळे (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली. कल्याण येथे या महिन्यात होणार्‍या महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘खरं सांगायचं तर..’ हे नाटक पुणे प्रादेशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

पारितोषिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक बारामती परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष भोसले यांनी केले तर श्री. स्वप्नील जाधव यांनी यांनी आभार मानले.

सुहास कुलकर्णी, अनिल रसम , नितिन तोशनीवाल, मनिष रावत, सतिश कुलकर्णी, सुबोध देशपांडे, सारिका वरदे , अनघा जोशी, उज्वला मराठे यांना विजेतेपद

0
  •  टी लॅक अकादमी , पीवायसी हिंदू जिमखाना अ या संघांना विजेतेपद 

पुणे-  पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब यांच्या वतीने आयोजीत दुस-या डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक प्रौढ राज्य मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत सुहास कुलकर्णी,  अनिल रसम , नितिन तोशनीवाल,  मनिष रावत,  सतिश कुलकर्णी,  सुबोध देशपांडे,  सारिका वरदे  , अनघा जोशी व उज्वला मराठे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले. सांघिक गटात  टी लॅक अकादमी व पीवायसी हिंदू जिमखाना अ या संघांनी विजेतेपद पटकावले. 

पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत 65 वर्षावरील पुरूषांच्या गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत सुहास कुलकर्णीने मुंबई उपनगरच्या तिस-या मानांकीत  पार्सी मेहताचा 11/7,12/10,11/9 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.   60 वर्षावरील पुरूष गटात मुंबई उपनगरच्या दुस-या मानांकीत अनिल रसमने मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत  प्रकाश केळकरचा  7/11,8/11,11/6,11/8,11/7 असा तर  50 वर्षावरील पुरूषांच्या गटात  सोलापुरच्या अव्वल मानांकीत नितिन तोशनीवालने मुंबई उपनगरच्या तिस-या मानांकीत राम कदमचा 12/10,11/2,11/3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 40 वर्षावरील पुरूष गटात सोलापुरच्या अव्वल मानांकीत मनिष रावतने पुण्याच्या  केदार मोघेचा 11/4,11/8,11/9 असा तर 70 वर्षावरील पुरूष गटात  मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत  सतिश कुलकर्णीने पुण्याच्या दुस-या मानांकीत दिलिप कुडतरकरचा  11/6,7/11,11/5,11/7  आणि 75 वर्षावरील पुरूष गटात  पुण्याच्या सुबोध देशपांडेने  नाशिकच्या  अव्वल मानांकीत   सतिश शिरसाटचा  11/3,11/1,11/4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 

 40 वर्षावरील महिला गटात पुण्याच्या तिस-या मानांकीत सारिका वरदेने ठाण्याच्या अव्वल मानांकीत सुषमा मोगरेचा 13/15,8/11,11/3,12/10,11/6 असा तर 50 वर्षावरील महिला गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत अनघा जोशीने मुंबई उपनगरच्या दुस-या मानांकीत  स्नेहा पाध्येचा 11/4,11/2,11/4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 60 वर्षावरील महिलांच्या गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत  उज्वला मराठेने पुण्याच्या तिस-या मानांकीत सुहासीनी बकरेचा  11/7,11/2,11/4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 

सांघिक गटात 40 व 50 वर्षावरील गटात टी लॅक अकादमी संघाने पीटीकेएस अ संघाचा 3-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. यात ओंकार जोग,  दिवेंदू सी व पंकज यांनी विजयी कामगिरी केली. 60वर्षावरील गटात  पीवायसी हिंदू जिमखाना अ संघाने फोर्झा संघाचा 3-1  असा पराभव करत विजेतेपद पटकावले. यात  सुहास कुलकर्णी, प्रकाश केळकर यांनी एकेरी व दुहेरी अशा दोन्ही गटात चमकदार कामगिरी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. 

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक पारितोषिक देण्यात आले. सांघिक गटात विजेत्या संघांना करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे, क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे, डॉ विद्या मुळ्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ अरुंधती मुळ्ये, डॉ संजय मुळ्ये, पुणे जिल्हा टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, एमएसटीटीएचे सुहास दांडेकर, मानसी परळे, वसंत चिंचाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.  उपेंद्र मुळ्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.     

स्पर्धेचा सविस्तर निकाल
उपांत्य फेरी- 65 वर्षावरील पुरूष  

सुहास कुलकर्णी(1,मुंबई उपनगर) वि.वि उल्हास शिर्के(4,मुंबई उपनगर)11/7,11/4,11/3
पार्सी मेहता (3,मुंबई उपनगर) वि.वि जीतू मवानी (7,मुंबई उपनगर)    11/7,11/9,11/7
अंतिम फेरी-  सुहास कुलकर्णी(1,मुंबई उपनगर) वि.वि  पार्सी मेहता (3,मुंबई उपनगर)  11/7,12/10,11/9

उपांत्य फेरी- 60 वर्षावरील पुरूष    
प्रकाश केळकर (1,मुंबई उपनगर)  वि.वि जयंत कुलकर्णी  (5,मुंबई उपनगर)8/11,12/10,11/5,11/7
अनिल रसम(2,मुंबई उपनगर) वि.वि रोहिदास गरुड(3, पुणे)12/10,7/11,11/4,11/9

अंतिम फेरी- अनिल रसम(2,मुंबई उपनगर) वि.वि  प्रकाश केळकर (1,मुंबई उपनगर)   7/11,8/11,11/6,11/8,11/7

उपांत्य फेरी- 50 वर्षावरील पुरूष     
नितिन तोशनीवाल(1, सोलापुर) वि.वि अजय कोठावले(4, पुणे)11/13,9/11,11/9,11/8,11/9
राम कदम(3,मुंबई उपनगर)वि.वि विवेक आलवणी(7, जळगाव) 11/8,4/11,9/11,11/5,11/6
अंतिम फेरी- नितिन तोशनीवाल(1, सोलापुर) वि.वि राम कदम(3,मुंबई उपनगर) 12/10,11/2,11/3
 
उपांत्य फेरी- 40 वर्षावरील पुरूष   
मनिष रावत(1, सोलापुर) वि.वि दिपेश अभ्यंकर(4, पुणे)11/5,11/6,8/11,11/8
केदार मोघे(15, पुणे) वि.वि पंकज रहाणे(3, नाशिक) 11/8,11/8,9/11,7/11,11/7
अंतिम फेरी-   मनिष रावत(1, सोलापुर) वि.वि   केदार मोघे(15, पुणे)  11/4,11/8,11/9

उपांत्य फेरी- 70 वर्षावरील पुरूष   
सतिश कुलकर्णी(1, मुंबई उपनगर) वि.वि कामेश भोंडे(पुणे)11/3,11/5,11/3
दिलिप कुडतरकर(2,पुणे)वि.वि रमेश थडानी(पुणे) 9/11,11/5,11/4,8/11,11/9
अंतिम फेरी – सतिश कुलकर्णी(1, मुंबई उपनगर) वि.वि  दिलिप कुडतरकर(2,पुणे)  11/6,7/11,11/5,11/7

उपांत्य फेरी- 75 वर्षावरील पुरूष     
सतिष शिरसाट(1, नाशिक) वि.वि विकास सातारकर(पुणे) 11/8,11/8,8/11,9/11,11/8
सुबोध देशपांडे(पुणे) वि.वि झरीर खंडादीया(मुंबई उपनगर) 11/9,11/9,4/11,14/12
अंतिम फेरी-  सुबोध देशपांडे(पुणे) वि.वि   सतिष शिरसाट(1, नाशिक) 11/3,11/1,11/4

उपांत्य फेरी- 40 वर्षावरील महिला

सुषमा मोगरे(1, ठाणे) वि.वि सिवाप्रिया नाईक (मुंबई उपनगर)11/6,11/6,11/7
सारिका वरदे(3, पुणे) वि.वि श्रावणी धप्रे(2, मुंबई उपनगर) 12/10,11/4,9/11,13/11
अंतिम फेरी- सारिका वरदे(3, पुणे) वि.वि  सुषमा मोगरे(1, ठाणे)  13/15,8/11,11/3,12/10,11/6
 
उपांत्य फेरी- 50 वर्षावरील महिला  
अनघा जोशी(1, अनघा जोशी) वि.वि चंद्रमा रामकुमार(पुणे) 11/6,7/11,11/8,8/11,11/8
स्नेहा पाध्ये(2, मुंबई उपनगर) वि.वि वैशाली मालवणकर(मुंबई उपनगर)13/11,11/9,9/11,14/16,11/7
अंतिम फेरी-  अनघा जोशी(1, मुंबई उपनगर) वि.वि  स्नेहा पाध्ये(2, मुंबई उपनगर)  11/4,11/2,11/4
उपांत्य फेरी- 60 वर्षावरील महिला    
उज्वला मराठे(1, मुंबई उपनगर)वि.वि मिना शहा(पुणे)11/4,12/10,11/9
सुहासीनी बकरे(3, पुणे)वि.वि रंजना पत्की(पुणे) 11/4,12/10,12/10
अंतिम फेरी-   उज्वला मराठे(1, मुंबई उपनगर)वि.वि सुहासीनी बकरे(3, पुणे)  11/7,11/2,11/4

सांघिक गट: 40 व 50 वर्षावरील गट: अंतिम फेरी:
टी लॅक अकादमी वि.वि पीटीकेएस अ3-2(एकेरी- पंकज आर पराभुत वि सुहास  11-6, 11-8, 9-11, 6-11, 7-1; ओंकार जोग पराभूत वि समिर 6-11, 11-8, 3-11, 11-9, 5-11; ओंकार जोग वि.वि सुहास 1-8, 13-11, 11-1; दिवेंदू सी वि.वि रवी 11-7, 11-6, 11-6; दुहेरी- पंकज/दिवेंदू वि.वि समिर/रवी 11-6, 11-8, 11-4)
 
60वर्षावरील गट: 
पीवायसी हिंदू जिमखाना अ वि.वि फोर्झा 3-1 (एकेरी- सुहास कुलकर्णी वि.वि पर्सी मेहता 11-2, 11-8, 13-15, 5-11, 12-10; प्रकाश केळकर वि.वि दिपक दुधाणे 11-8, 11-6, 11-9; प्रकाश केळकर वि.वि पर्सी मेहता 7-11, 12-10, 11-6, 6-11,11-6; दुहेरी- सुहास/ प्रकाश पराभूत वि जयंत/ पर्सी मेहता 7-11, 5-11, 11-9, 9-11 )