Home Blog Page 268

गंगाधाम अपघाताने संतप्त कार्यकर्त्यांचा पथविभाग प्रमुख पावसकरांना घेराव

0

पुणे-गंगाधाम चौकात पुन्हा एका महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याने महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिकेत पथ विभाग प्रमुख यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घालून खेळण्यातले ट्रक भेट देत वाहतूक नियोजनाला सोडून केलेले रस्ते याबद्दल संताप व्यक्त केला यावेळी पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, अमोल परदेशी,प्राजक्त जाधव,लखन वाघमारे,विद्या ताकवले,समीर पवार, अमोल ननावरे, प्राजक्ता जाधव , फारुख शेख, निलेश पवार, विद्या ताकवले, हर्षवर्धन दिघे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्ते म्हणाले कि,’ आज दिनांक ११ जून २०२५ रोजी गंगाधाम मार्केट यार्ड चौक, बिबवेवाडी येथे एका भरधाव ट्रकच्या धडकेत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्यावर्षीही याच भागात एका डंपरच्या धडकेत अशाच प्रकारे एका महिलेचा मृत्यू झाला होता.या दोन्ही घटनांसाठी थेट जबाबदार महापालिकेचे रस्त्यावरील दुर्लक्षित नियोजन आणि वाहतूक व्यवस्थेतील पोलीस प्रशासनाची निष्क्रियता हे मुख्य कारण आहे. नागरिकांचे प्राण हे राजकीय हस्तक्षेप, भ्रष्ट प्रशासन आणि निष्क्रिय यंत्रणेमुळे धोक्यात आले आहेत.याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस – पुणे शहर यांच्या वतीने मुख्य अभियंता (पथ विभाग), पुणे महानगरपालिका अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे निवेदन देत तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनावेळी अमोल परदेशी यांनी अंगाला रक्त लावून, डोक्याला पट्ट्या बांधून, जणू अपघातग्रस्त व्यक्तीच्या रूपात स्वतःला सादर करून महापालिकेच्या संवेदनशून्यतेविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. या रूपातून त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होत असलेल्या जीवितहानीचे वास्तव मांडले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात “खेळण्यातला ट्रक” मुख्य अभियंत्यांना भेट देऊन प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. हा ट्रक म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी चाललेल्या महापालिकेच्या “खेळा”चे प्रतीक होता.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर यांची प्रमुख मागण्या:

अपघातप्रवण रस्त्यांचे तातडीने पुनर्निर्माण

वाहनगती नियंत्रणासाठी यंत्रणा उभारणे

वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती

अपघात पीडित कुटुंबाला त्वरित मदत

महापालिकेच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई

जर प्रशासनाने यापुढेही दुर्लक्ष केले, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर यांच्यातर्फे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

 एसबीआय तर्फे 13,455  ज्युनियर असोसिएट्सची भरती

·  एसबीआय अध्यक्ष : विकसित होत असलेल्या कार्यात्मक आणि तंत्रज्ञानात्मक आवश्यकतांनुसार  सुसंगठित कौशल्य विकास कार्यक्रम राबवून आमची मनुष्यबळ विकास क्षमता अधिक बळकट करण्याचे आमचे ध्येय आहे.

मुंबई, जून 11, 2025: देशातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक विश्वासार्ह बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने देशभरातील शाखांमध्ये ग्राहकांना मिळणारा अनुभव समृद्ध करण्यासाठी 13,455 ज्युनियर असोसिएट्सची (कनिष्ठ सहयोगी) भरती केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी आता बँकेच्या अधिकृत करिअर्स पोर्टलवर उपलब्ध आहे.

ही भरती 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रिक्त पदे भरून काढण्यासाठी करण्यात आली. त्यायोगे ही भरती मोहीम या उद्योगातील एक लक्षणीय बाब ठरली आहे.

या निवड प्रक्रियेची सुरुवात फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक परीक्षांपासून झाली आणि मुख्य परीक्षा एप्रिल 2025 मध्ये घेण्यात आली. काटेकोर आणि पारदर्शक मूल्यमापन प्रक्रियेनंतर 13,455 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

या घोषणेबाबत बोलताना एसबीआय चे अध्यक्ष श्री सी. एस. शेट्टी म्हणाले, “वेगवेगळ्या श्रेणी अंतर्गत आमच्याकडे सुमारे 18,000 लोकांची भरती करण्यात येत आहे. त्यापैकी सुमारे 13,500 ही लिपिक श्रेणीतील भरती असेल, 3,000 जणांची भरती प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि स्थानिक अधिकारी म्हणून असेल. ही नवी प्रतिभावान भरती करत असताना विकसित होत असलेल्या कार्यात्मक आणि तंत्रज्ञानात्मक आवश्यकतांनुसार सुसंगठित कौशल्य विकास कार्यक्रम राबवून आमची मनुष्यबळ विकास क्षमता अधिक बळकट करण्याचे आमचे ध्येय आहे.”

2,36,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देणारी भारतीय स्टेट बँक अर्थपूर्ण रोजगार निर्माण करण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्रातील पुढील पिढीला घडवण्यासाठी कटिबद्ध आहे.

भारतीय स्टेट बँकेबद्दल :

मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भारतीय स्टेट बँक ही सर्वात मोठी व्यापारी बँक आहे. देशातील सर्वात मोठ्या तारण कर्जदारांपैकी एक असलेल्या या बँकेने आतापर्यंत सुमारे 30 लाख भारतीय कुटुंबांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण केले आहे. बँकेचा गृहकर्जाचा पोर्टफोलिओ 8.3 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. मार्च 2025 पर्यंत, 39.97% च्या CASA गुणोत्तरासह बँकेकडे 53.82 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी आहेत आणि 42.20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज वितरण केले आहे. ‘न्यूजवीक’नुसार जगातील चौथ्या क्रमांकाची विश्वासार्ह बँक म्हणून स्थान मिळवलेल्या एसबीआयचा गृह कर्ज आणि वाहन कर्जामध्ये अनुक्रमे 27.3% आणि 20.2% मार्केट शेअर आहे. एसबीआयच्या भारतात 22,937 शाखा आणि 63,791 एटीएम / एडीडब्ल्यूएमचे सर्वात मोठे जाळे असून 77,000 हून अधिक बीसी आउटलेट्स आहेत. इंटरनेट बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 13.9 कोटी आहे. एसबीआयचे डिजिटल धोरण मार्गी लागल्याने, आर्थिक वर्ष 2025 मध्ये बँकेने 64% नवीन बचत खाती एकात्मिक डिजिटल आणि लाइफस्टाइल प्लॅटफॉर्म योनोद्वारे उघडली आहेत. 8.77 कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते असलेल्या योनोमध्ये आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीत 24.1 लाख नवीन योनो नोंदणी झाली. डिजिटल कर्जाच्या बाबतीत, बँकेने आर्थिक वर्ष 2025 दरम्यान योनोद्वारे 6,375 कोटी रुपयांचे प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन (पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर वैयक्तिक कर्ज) वितरित केले. 31 मार्च 2025 पर्यंत एसबीआयचे फेसबुकवर 19 दशलक्ष फॉलोअर्स, इन्स्टाग्रामवर 3 दशलक्ष फॉलोअर्स, एक्सवर 4.8 दशलक्ष फॉलोअर्स आणि यूट्यूबवर 5.71 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्सवर भारतीय स्टेट बँक जागतिक स्तरावर सर्वाधिक फॉलो केली जाणारी बँक आहे.

विधानसभेतील ‘मतचोरी’ विरोधात उद्या गुरुवार १२ जून रोजी काँग्रेसचे राज्यभर मशाल मोर्चे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीतील आंदोलनात सहभागी होणार.

मुंबई, दि. ११ जून २०२५

विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला असून या मतचोरीची चौकशी केली जात नाही. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली असून लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे. म्हणून प्रदेश काँग्रेस उद्या गुरुवार दिनांक १२ जून रोजी राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती करणार आहे तसेच विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीमधील आंदोलनात सहभागी होत आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील आंदोलनात पक्षाचे नेते सहभागी होतील.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मोठे यश मिळावे व भाजपा युतीचे पानीपत झाले होते. विधानसभा निवडणुकीत युती १०० जागाही जिंकू शकणार नाही अशी परिस्थिती असताना भाजपा युतीला प्रचंड बहुमताचा निकाल आला तो अनाकलनीय व अविश्वसनीय आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्केवारवरही संशय निर्माण झालेला आहे. मतदान संपल्यानंतर ५८ टक्के जाहीर केलेले मतदार दुसऱ्या दिवशी मात्र ६६.५ टक्के दाखवून तब्बल ७.८३ टक्क्यांची वाढ दाखवली. हा एक मोठा घोटाळा आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष व पारदर्शी निवडणूका घेणे त्यांचे कर्तव्यच आहे पण त्यांच्यावरच संशयाचे ढग जमा होत असतील तर ते लोकशाही साठी घातक आहे. लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी व निवडणूक आयोगावर निर्माण झालेले हे संशयाचे ढग दूर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीतील मॅच फिक्सिंगची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. या आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ नेते, आजी माजी खासदार, आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

१२ ते १४ जूनला राज्यभर काँग्रेसचे मशाल मोर्चे:-कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी

राहुलजी गांधी यांच्या लेखाने
भाजप हादरले

फडणवीसांचे उत्तर
महाराष्ट्राची दिशाभूल करणारे

पुणे – महाराष्ट्रातील भाजप युती सरकार मतदानाच्या चोरीचा पॅटर्न वापरून सत्तेवर आले आहे. यावर प्रकाशझोत टाकणारा लेख लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी वर्तमानपत्रात लिहीला, त्यामुळे भाजप नेते हादरले. या लेखाला उत्तर देणारा मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लेख हा मूळ मुद्द्याला बगल देऊन, महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारा आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी लेखामध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दलच आक्षेप घेतले आहेत. यावर निवडणूक आयोगाकडून उत्तर अपेक्षित असताना मुख्य मंत्री फडणवीस उत्तर का देत आहेत? त्यांच्या लेखामुळे निवडणूक घोटाळ्याबाबतचा संशयच बळावला आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी घटनेत बदल केला. निवड समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश या तिघांचा समावेश असे. पण, घटनेत बदल करून मोदी यांनी सरन्यायाधीशांना बाजूला केले आणि त्याजागी गृहमंत्री अमित शहा यांची नेमणूक केली. निवड समितीवर वर्चस्व मिळवले. मोदी यांच्या या डावपेचातूनच निवडणूक घोटाळ्याची सुरूवात झाली. याबाबत फडणवीस यांच्या लेखात अवाक्षरही का नाही? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाने निवडणूक आयुक्त नेमताना पारदर्शक भूमिका घेतली, राजकीय हस्तक्षेप केला नाही आणि त्यांनी नेमलेल्या निवडणूक आयुक्तांबाबत कोणीही आक्षेप घेतले नाहीत. ही वस्तुस्थिती फडणवीस यांनी हेतुत: नजरेआड केली आणि लेखामध्ये उथळ आरोप केले. जनतेची दिशाभूल केली. २०२४ साली विधानसभेसाठी मतदारांची संख्या वाढली याबद्दल महाराष्ट्रातील जनतेत आजही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मतदानाची वेळ संपल्यावरही काही ठराविक मतदारसंघात मतदान झाले. त्याबाबतही फडणवीस यांनी बगल दिलेली आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली आहे, लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे, हे लक्षात घेऊन प्रदेश काँग्रेस १२ ते १४ जूनला राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती करणार आहे, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.

पुणे नगर रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षेच्या आणि वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात

पुणे: पुणे-नगर रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी, अपुऱ्या सुविधा, रस्त्यांची दुरवस्था व पादचारी मार्गांच्या असुरक्षित अवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या वाहतूक संबंधित समस्यांवर तातडीने उपाययोजना व्हाव्यात यासाठी वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी महानगरपालिका प्रशासन, वाहतूक नियंत्रण विभाग, पुणे शहर वाहतूक शाखेकडे निवेदनाद्वारे मागण्या मांडल्या आहेत.

तत्पूर्वी, येरवडा, शास्त्री नगर, कल्याणीनगर, रामवाडी, विमाननगर, टाटा गार्डन, खराडी बायपास, जनक बाबा दर्गा, युवान आयटी पार्क, खराडी जकात नाका या परिसरांमध्ये सिग्नल फ्री योजना अंमलात आणली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग वाढला असला, तरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना प्रलंबित असल्याचे दिसून येते. याच पार्श्वभूमीवर बापूसाहेब पठारे यांनी मागणीद्वारे उपाययोजना सुचवल्या आहेत.


बापूसाहेब पठारे यांनी सूचवलेल्या प्रमुख उपाययोजना:

  • बीआरटी मार्ग काढल्यानंतर विस्कळीत झालेला डिव्हायडर रस्त्याच्या मध्यभागी नेणे, ज्यामुळे रचना संतुलित व सुरक्षित होईल.
  • झेब्रा क्रॉसिंग, फूटपाथ व काही सेकंदाचे पादचारी सिग्नल यांची उभारणी.
  • डिव्हायडर सुरू होणाऱ्या ठिकाणी प्रतिबिंबित फलक
  • प्रमुख भागांकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक, रस्ता मार्गदर्शक सूचना फलक
  • विमाननगर व चंदननगर येथील भुयारी मार्गांची तातडीने दुरुस्ती, प्रकाशयोजना व साफसफाई
  • वाहतूक नियंत्रणासाठी स्मार्ट सिग्नल यंत्रणा

याशिवाय, दुसऱ्या निवेदनाद्वारे पठारे यांनी विमाननगर व चंदननगर येथील भुयारी मार्गांची अत्यंत खराब स्थिती अधोरेखित केली आहे. या भुयारी मार्गांची तातडीने दुरुस्त करून नागरिकांना सुरक्षित वापरासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी महानगरपालिका मुख्य अभियंता केली आहे. या भुयारी मार्गांमध्ये प्रकाशयोजना अपुरी असून, स्वच्छतेचा अभाव आहे. त्यामुळे महिला, मुली, विद्यार्थीवर्ग तसेच वृद्ध नागरिकांना या मार्गांचा वापर करताना असुरक्षितता वाटते.

एकूणच मागण्यांबाबत बोलताना बापूसाहेब पठारे म्हणाले, की “वडगावशेरी मतदारसंघामधील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने विविध माध्यमातून मी प्रयत्नशील आहे. वाहतूक कोंडी फोडून सुरळीत वाहतुकीसोबतच सुरक्षित वाहतूक असणेही गरजेचे आहे. मी मांडलेल्या मागण्यांचा विचार प्रशासन दरबारी होईल, ही खात्री आहे. वाहतूक व दळणवळण नागरिक बांधवांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्या दृष्टीने कोणतीही तडजोड होऊ नये.”

“सामाजिक उपक्रमातून साजरा केलेला वाढदिवस सर्वोत्तम” – ना. चंद्रकांतदादा पाटील.

0

“दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध संस्थांना क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने उपयुक्त साहित्य भेट” – संदीप खर्डेकर.

पुणे :माझाच वाढदिवस नव्हे तर कोणाचाही वाढदिवस किंवा कोणताही आनंदाचा प्रसंग साजरा करताना त्याला समाजोपयोगी उपक्रमाची जोड दिली तर तो समारंभ अधिक आनंददायी होतो व आपला आनंद इतरांसोबत वाटल्याने त्याचे महत्व ही वाढते असे मत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिएटिव्ह फाउंडेशन, मुकुलमाधव फाउंडेशन, ग्लोबल ग्रुप आणि वेस्टर्न इंडिया फोर्जिंग यांच्या वतीने आठवडाभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले.
यावेळी ग्राहक पेठेचे प्रमुख सूर्यकांत पाठक, नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर, नगरसेवक राजेश येनपुरे,वेध निसर्गोपचार व आयुर्वेदिक संशोधन केंद्राचे डॉ. अजय कुलकर्णी, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी,डेक्कन वरील स्वामी समर्थ मठाचे रामभाऊ दिघे,सौ. कल्याणी प्रतीक खर्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्राहक पेठ परिवार, महाराष्ट्र ब्राह्मण सभा व स्वामी समर्थ मठास स्पीकर सेट भेट देण्यात आला तर डॉ. अजय कुलकर्णी यांच्या निसर्ग व आयुर्वेदिक उपचार केंद्रास व्हीलचेयर भेट देण्यात आली.
ना. चंद्रकांतदादांची शिकवण ही “अधिकाधिक गरजुंना मदत करावी आणि समाजात जिथे जे कमी आहे ते यथाशक्ती भरून काढण्यासाठी कार्य करावे” अशी आहे आणि त्यास अनुसरूनच आम्ही वाटचाल करत आहोत असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. काही कार्यक्रम प्रकाशात येतात मात्र क्रिएटिव्ह चे कार्य अखंडित पणे सुरु असून अनेक सेवाभावी संस्थांना मदतीची गरज असते हे समजून घेऊन समाजातील दानशूरांनी आपले योगदान देत राहिले पाहिजे असेही खर्डेकर म्हणाले.
यावेळी डॉ.सचिन बोधनी यांनी भगवान परशुराम यांचा पुतळा भेट देऊन दादांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त सौ.मंजुश्री खर्डेकर व सौ.कल्याणी प्रतीक खर्डेकर यांनी संयोजन केले.

वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्या

पुणे दि.११ : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची निर्देश असून नागरिकांनी वाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एका रिट याचिकेत दिलेल्या निकालानुसार राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याची तरतूद आहे. त्यानुसार परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत जुन्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे कामकाज गतीने सुरू आहे, याकामात अधिक गतीमानता येण्याकरीता विशेष उपाययोजना करण्याकरीता आयुक्तालयाच्यावतीने निर्देश देण्यात आले आहे.

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जून्या परिवहन संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवानाविषयक कामकाज व खाजगी संवर्गातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज वगळून वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे किंवा उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, नाहरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे आदी वाहनविषयक सर्व कामकाज एचएसआरपी बसविल्याशिवाय १६ जून २०२५ पासून करण्यात येणार नाही. तथापि, वाहन मालकांनी एचएसआरपी बसविण्यासाठी पूर्व नियोजित दिनांक व वेळ घेतली असल्यास त्या पावतीची खातरजमा करून त्यांच्या वाहनांचे कामकाज करण्यात येईल. १६ जून २०२५ पासून एचएसआरपी न बसवलेल्या वाहनांचे कामकाज करण्यात येणार नाही, असे पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

‘नारायण राणे असताना नितेश राणेंचे बाप फडणवीस कसे झाले कळलं नाही’, अंबादास दानवेंनी डिवचलं

भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन अडचणीत येत असल्याचं वारंवार दिसून येतं. अशातच धाराशिवमध्ये केलेल्या त्या वक्तव्यामुळे महायुतीतील पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. नितेश राणेंच्या वक्तव्याचे पडसाद काल (मंगळवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिसून आले. धाराशिव येथील संवाद मेळाव्यात भाषण करताना, नितेश राणेंनी तेथील स्थानिक शिवसेना नेत्यांना उद्देशून बोलताना भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसलेला आहे, असे वक्तव्य केलं त्याला आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना दिला. राणेंच्या वक्तव्याचे पडसाद सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नारायण राणेंचं नाव घेत डिवचलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नारायण राणेंचं नाव घेत नितेश राणेंना डिवचलं, माध्यामांच्या प्रश्नावर उत्तर देताना दानवे म्हणाले, नितेश राणे यांचे बाप नारायण राणे आहेत. हे सगळं असताना देवेंद्र फडणवीस त्यांचे बाप कसे झाले, ते मलाही कळालं नाही.

धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना इशारा दिला. कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असा दमच नितेश राणेंनी दिला होता. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकीच नितेश राणेंनी स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांना दिली. कुणी कितीही ताकद दाखवली , कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असेही नितेश राणे म्हणाले होते. त्यावरती शिवसेना नेते व महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही टीका झाली. तर, मंत्रिमंडळ बैठकीतही आज तो विषय निघाला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी राणेंना समज दिली.

नितेश राणेंच्या वक्तव्याचे पडसाद काल (मंगळवारी) मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाले. आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना दिला. तसेच, कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, संबंधित मंत्र्यांशी मी बोललो, ते म्हणाले माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, पण मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनात जो काही अर्थ असेल त्यापेक्षा जे परसेप्शन जातं ते राजकारणात महत्त्वाचं असतं, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो:तो जनतेचा सेवक असतो, नारायण राणेंनी टोचले नितेश राणेंचे कान

धाराशिव -मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिली आहे, असे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे बोलताना महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद पेटला होता. त्यानंतर नीलेश राणे यांनी देखील ट्विट करत नितेश राणे यांना विधाने जपून करावीत असा सल्ला दिला होता. आता नारायण राणे यांनी देखील समज दिल्याचे समजते.

नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिली आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. मी मुख्यमंत्री असताना मी सांगायचो की, मला साहेब म्हणू नका सेवक म्हणा. नारायण राणे हे धाराशिव येथे आले होते. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोणाचा निधी अडवणे हे चुकीचे आहे, त्याबद्दल मी सूचना देणार असल्याचे देखील राणे यांनी म्हटले आहे.

नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, प्रकाश महाजन हा मेंटल माणूस आहे. त्याच्याशी माझी तुलना का करता? मी दिल्लीला होतो आणि तो इकडे कुठे उभा राहतो क्रांती चौकात, त्याला भेटायला मी यायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, याबद्दल मला माहीत नाही. ते एकत्र आले तर चांगलीच गोष्ट आहे.

नितेश राणे काय म्हणाले होते?

धाराशिव येथील कार्यक्रमात नितेश राणे यांनी भाषण केले. यावेळी ते म्हणाले होते की, कोणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले तरी महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसला आहे हे लक्षात ठेवा, असे विधान केले होते. यावरून त्यांच्यावर महायुतीमधील इतर पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली होती.

ठाण्यात तीन हात नाका परिसरात शिवसेना ठाकरे गटाकडून नितेश राणे यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले होते. ठाकरे गटाचे सहप्रवक्ता तुषार रसाळ यांनी भलामोठा बॅनर लावला होता. यावर ‘मी तुषार दिलीप रसाळ.. दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता (बाप). श्री. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत’, असा मजकूर लिहिला होता. या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर ठाणे मनपाने हे बॅनर हटवले आहेत.

डिजीलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

मुंबई दि. ११ जून, २०२५- आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सुरक्षित ठेऊन हवे तेव्हा उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र सरकारच्या डिजिलॉकर या ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणची वीजबिलेही उपलब्ध झाली असून वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी बुधवारी केले.

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वीज ग्राहकांना ईज ऑफ लिव्हिंगच्या आधारे अधिकाधिक सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने केंद्र सरकारच्या डिजिलॉकरशी वीजबिले जोडली आहेत. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या मोबाईल फोनमध्ये डिजिलॉकर ॲपमध्ये ठेवलेल्या महत्त्वाच्या दाखल्यांसोबतच वीजेची बिलेही उपलब्ध होणार आहेत. त्यांना वीजबिल भरण्यासाठी तसेच गरजेनुसार हे बिल कोणाला पाठविण्यासाठी किंवा त्याचा प्रिंट काढण्यासाठी याचा उपयोग होईल.

डिजिलॉकर हा केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू केलेला महत्त्वाचा उपक्रम आहे. त्याचा वापर करून नागरिकांना आपले पॅन कार्ड, वाहन नोंदणी कागदपत्रे, रेशन कार्ड, दहावी मार्कशीट, बारावी मार्कशीट, निवासाचा दाखला असे अनेक दस्तऐवज ॲपमध्ये सुरक्षित ठेवता येतात आणि गरजेनुसार त्यांचा वापर करता येतो. सर्व दाखले मोबाईलच्या ॲपमध्ये ठेवलेले असल्याने ते सदैव सोबत उपलब्ध राहतात. देशात आतापर्यंत ५२ कोटी ८९ लाख नागरिकांनी डिजिलॉकरचा वापर सुरू केला असून त्यांनी त्यात ८५९ कोटी कागदपत्रे ठेवली आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या नियमावलीनुसार डिजिलॉकरमधील दस्तऐवज मूळ कागदी प्रत्यक्ष दाखल्याच्या समान समजले जातात व त्याला कायदेशीर दर्जा आहे.

महावितरणने आपल्या संगणकीय व्यवस्थेतील बिलांची माहिती डिजिलॉकर सुविधेला उपलब्ध करून दिली आहे. वीज ग्राहकाने आपल्या डिजिलॉकर ॲपमध्ये गेल्यानंतर महावितरण वीज कंपनीची निवड करून आपला वीज ग्राहक क्रमांक दाखल करण्याची कृती एकदाच करायची आहे. त्यानंतर त्या ग्राहकाला आपल्या डिजिलॉकरमध्ये विजेचे चालू महिन्याचे बिल उपलब्ध होईल.

गंगाधाम चौकात ट्रकने घेतला एका तरुण महिलेचा बळी

पुणे: गंगाधाम चौकात शिस्तीने दुचाकी चालविणाऱ्या ला ट्रकने मागून धडक एका तरुणीचा बळी घेतला.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की,
आज रोजी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये गंगाधाम चौकामध्ये सकाळी 11:15 वाजे च्या दरम्यान ट्रक क्रमांक MH 14 AS 8852 याने एक स्कूटर गाडी …स्कूटर चालक जगदीश पन्नालाल सोनी वय 61 (जखमी) व पाठीमागे बसलेली महिला नामे दिपाली युवराज सोनी वय 29 (मयत) हे सिग्नल सुटून पुढे जात असताना पाठीमागचे बाजूने त्यांना धडक दिली.

त्यामध्ये वरील महिला दिपाली सोनी या जागीच मयत झाल्या आहेत . सोबतचा इसम जखमी आहे. जखमीला स्पायरल हॉस्पिटल गंगाधाम चौक या ठिकाणी उपचारांसाठी पाठवलेले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.
सदर ट्रक ताब्यात घेतलेला आहे.ड्रायव्हर शौकत आली पापालाल कुलकुंडी वय 51 राहणार भवानी पेठ पुणे यास ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी चालू आहे.BNSS कलम 105 (आयपीसी 304) प्रमाणे गुन्हा दाखल करत आहोत.सध्या रोड पूर्णपणे चालू असून कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न नाही.
भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून वाहतूक पोलीस व महानगरपालिका या अनुषंगाने योग्य ती कारवाई करत आहोत.

‘आधुनिक जंगल‌’मधून उलगडले मुलांचे भावविश्व : मृणालिनी कानिटकर-जोशी

.कविता वाचनातून मुलांवर होतात शब्दसंस्कार : मृणालिनी कानिटकर-जोशी
ज्योती उटगीकर-देशपांडे लिखित ‌‘आधुनिक जंगल‌’ बालकविता संग्रहाचे प्रकाशन

पुणे : सध्याच्या बालसाहित्यातून वास्तवता मांडली जात असली तरी त्यातून रम्यता, कल्पकता हरवत चालली असल्याचे दिसून येत आहे. मात्र ज्योती उटगीकर-देशपांडे लिखित ‌‘आधुनिक जंगल‌’ बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी केले.
उत्कर्ष प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‌‘आधुनिक जंगल‌’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी लोकमान्य नगरमधील रुईया मूकबधीर विद्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी जोशी बोलत होत्या. ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, स्नेह सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राधा संगमनेरकर, प्रकाशक सु. वा. जोशी, प्राचार्य श्याम भुर्के, एकपात्री कलाकार बंडा जोशी मंचावर होते.
कविता वाचनातून मुलांवर शब्दसंस्कार होतात, असे सांगून मृणालिनी कानिटकर-जोशी म्हणाल्या, बालवयात मुलांना चांगले, सकस साहित्य वाचायला मिळाल्यास मुलांची जडणघडण चांगल्या माणसात होईल.
अंजली कुलकर्णी म्हणाल्या, ‌‘आधुनिक जंगल‌’ या बालकविता संग्रहातून जुन्याचे आधुनिकतेशी संधान साधले गेले आहे. लहान मुलांसाठी साहित्यनिर्मिती करणे ही फार अवघड गोष्ट असते. मुलांच्या अंतरंगात शिरून व्यक्त व्हावे लागते, बालसुलभ कुतुहलता, जिज्ञासा असावी लागते. ज्योती उटगीकर-देशपांडे यांनी तन्मयतेतून लिखाण केले आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा काव्यामुळेच मिळाला असल्याचे सांगून श्याम भुर्के म्हणाले, ज्योती उटगीकर-देशपांडे यांच्या कविता अंतर्मुख करायला लावणाऱ्या आहेत. बंडा जोशी म्हणाले, मराठी वाचनासाठी मुलांना उद्युक्त केले पाहिजे त्याच प्रमाणे शाळा-शाळांमध्ये बालकवितांच्या वाचनाचे कार्यक्रम व्हावेत. सु. वा. जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
पुस्तक लिखाणाविषयी ज्योती उटगीकर-देशपांडे यांनी भूमिका विशद केली. चित्रकार अशोक बोकील यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली अत्रे यांनी केले.

गायिका सुनिधी चौहान यांची गाण्यातून वडिलांना साद

वडील आणि मुलीच्या नात्यातील गोडवा शब्दांतून व्यक्त करणं तसं अवघडच. जन्मापासून
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वडिलांची साथ, पाठिंबा महत्त्वाचा असतो याची जाणीव मुलींना
नक्कीच असते. या सुंदर नात्यावर आधारलेलं एक गीत लवकरच आपल्या भेटीला येत आहे.
आगामी ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटातील हे गीत सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिने
गायलंय.
का रे बाबा … का रे पप्पा
कुठे हरवल्या तुझ्या छान-छान गप्पा….
तू सांग ना तू सांग ना
तू सांग ना…. हा माझ्या बाबा

असे बोल असलेलं हे गीत अरविंद भोसले यांनी लिहिलं असून श्रेयस देशपांडे यांचे संगीत
गीताला लाभले आहेत. बाप लेकीचे भावनिक नाते उलगडणारं ‘अवकारीका’ चित्रपटामधील
ह्रदयस्पर्शी गाणं ‘आपल्या आयुष्यात असलेले वडिलांचे स्थान आणि त्यांनी आपल्यासाठी
घेतलेले कष्ट या सर्वांची जाणीव करुन देते. येणाऱ्या ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने हे गीत वडील
मुलीच्या नात्यासाठी सुंदर भेट ठरेल. हे गीत गाताना खूप मजा आली. प्रेक्षकांच्या अंतर्मनाचा
ठाव हे गाणं घेईल, असा विश्वास गायिका सुनिधी चौहान यांनी व्यक्त केला.
रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टला भेटीला येणाऱ्या ‘अवकारीका’
चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण
जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता
सिंग यांची आहे.

पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट…विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या पावसाची शक्यता

पुणे-

आज दिनांक 11/06/2025 रोजी पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील ३ ते ४ तासांत आपल्या जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या पावसासह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे.असे आवाहन मंत्रालय, मुंबई कडून करण्यात आले आहे हि माहिती सचेत अँप वर देण्यात आली आहे.

दरम्यान ११ जून, आज सकाळी ताज्या उपग्रह निरीक्षणातून… असे सांगण्यात आले आहे कि गेल्या २४ तासांत काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला, नांदेड, परभणी…आणि अन्य भागात पुढील ४,५ दिवस महाराष्ट्रात सक्रिय हवामानाची शक्यता वर्तविली आहे.

बिर्ला इस्टेट्सने दोन प्रकल्पांसाठी IFC कडून मिळविली 420 कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक

मुंबई – आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेड (पूर्वीची सेंच्युरी टेक्सटाइल्स
अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड) ची पूर्ण मालकीची उपकंपनी बिर्ला इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड
(BEPL) ने वर्ल्ड बँक समूहाचा सदस्य असलेल्या इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC)
कडून गुंतवणुकीसाठी करारांवर स्वाक्षऱ्या केल्याची घोषणा केली. या गुंतवणूकीतून बिर्ला
इस्टेट्सची संपूर्ण भारतात शाश्वत आणि उच्च दर्जाची बांधकाम विकासकामे करण्याची
बांधिलकी अधोरेखित होते. अंदाजे 50 दशलक्ष (420 कोटी रु.) अमेरिकन डॉलर इतकी ही
गुंतवणूक बिर्ला इस्टेट्सच्या दोन मुख्य प्रकल्पांमध्ये करण्यात येणार आहे: सुमारे 148 कोटी
रु. पुण्यातील मांजरी प्रकल्पासाठी (सुमारे 3.13 दशलक्ष चौ.फुट विक्रीयोग्य क्षेत्र) आणि सुमारे
272 कोटी रु. बिर्ला इस्टेट्सच्या ठाण्यातील प्रकल्पासाठी (सुमारे 6.43 दशलक्ष चौ.फुट
विक्रीयोग्य क्षेत्र).
हे प्रकल्प बिर्ला इस्टेट्सच्या मालकीच्या आणि नियंत्रणाखालील दोन विशेष उद्देश वाहक
कंपन्यांद्वारे (Special Purpose Vehicles – SPVs) विकसित केले जाणार आहेत. IFC ही
गुंतवणूक या SPVs मध्ये करेल. दोन्ही प्रकल्पांच्या विकासासाठी त्या प्लॅटफॉर्म म्हणून काम
करतील. या रचनेनुसार, बिर्ला इस्टेट्स या SPVs मध्ये 56% आर्थिक सहभाग ठेवेल, तर
IFC चा 44% आर्थिक सहभाग राहील.
बिर्ला इस्टेट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. के. टी.
जितेंद्रन म्हणाले, “शाश्वत आणि उच्च दर्जाच्या रिअल इस्टेट विकासाद्वारे शहरी
जीवनशैलीला पुर्नआकार देण्याच्या आमच्या कार्यात मौल्यवान गुंतवणूकदार म्हणून IFC चे
स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. ही गुंतवणूक आमच्या विकास तत्वज्ञानाला
मान्यता देते आणि जबाबदारीने विस्तार करण्याची आमची क्षमता मजबूत करते. IFC चा
शाश्वत गुंतवणुकीतील जागतिक अनुभव आणि आमची खोलवरची बाजारपेठीय समज यांचा
समन्वय करून आम्ही भारतीय रिअल इस्टेटमध्ये नवीन मापदंड स्थापित करण्याचे उद्दिष्ट
ठेवत आहे.”
IFC चे दक्षिण आशिया विभागासाठीचे प्रादेशिक संचालक इमाद एन. फखुरी म्हणाले,
“गृहनिर्माण हा रोजगार, आनंद, आर्थिक विकास यासाठीचा एक प्रभावी प्रेरक घटक आणि
IFC साठी एक मुख्य प्राधान्यक्रमाची गोष्ट आहे. बिर्ला इस्टेट्ससोबतची आमची भागीदारी
विशेषतः पहिल्यांदाच घर घेणाऱ्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करून भारतातील वाढत्या
लोकसंख्येसाठी शाश्वत, उच्च दर्जाच्या गृहनिर्माणाची उपलब्धता आणि पोहोच वाढवून