Home Blog Page 2412

उमेश गायकवाड यांच्यासारखी दानत हवी – आ. चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)

0

 मागच्या सरकारांनी अनुदाने देऊन लोकांना पंगु बनविले

 रोजगार  निर्मिती आणि पगारवाढी साठी भाजपच्या पुण्यातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत

 पुणे- कोरोनाच्या काळात असंख्य गोरगरीब लोकांचे ,ज्यांचे हातावर पोट आहे अशांचे हाल झाले ,पण भाजपचे नगरसेवक उमेश गायकवाड आणि त्यांचे बंधू दिनेश गायकवाड यांनी कोणताही विचार न करता लोकांना मदत करणारे अनेक कार्यक्रम राबविले आणि लोकांना मदतीचा हाथ पुढे केला. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहेच या सर्वांनी .पण आता कोरोना नंतर काय? याचा हि विचार करायला हवा ,पुण्यात भाजपचे ६ आमदार आहेत ,१०३ नगरसेवक आहेत , ४० वर्षाचा भक्कम अनुभव असलेले खासदार गिरीश बापट इथे नेते आहेत .  या सर्वांनी आता या पुढे ज्याला ४ हजार  पगार आहे त्याला ८ हजार रुपये पगार कसा मिळेल आणि रोजगार निर्मिती करून तरुणाईला स्वपायावर कसे उभे करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे व्यक्त केले .कोरेगाव पार्क मधील भाजपचे नगरसेवक उमेश गायकवाड यांनी  १ नोव्हेंबर पासून प्रभागातील १५००० कुटूंबांना घरोघरी जाऊन दिवाळी रेशन किट चे वाटप करणे आणि सोसायटी मधील ५ हजार कुटुंबाना दिवाळी भेट देणे या उपक्रमाचा आज औपचारिक प्रारंभ आ. पाटील यांच्या हस्ते केला यावेळी खासदार गिरीश बापट , भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,राजेश पांडे,राहुल कुल ,आ. सुनील कांबळे ,दिलीप कांबळे , श्रीनाथ भिमाले,बाप्पू मानकर ,योगेश पिंगळे, ,निवृत्त लेफ्टनंट कर्नल शेकटकर ,सुनील माने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्च महिन्यात कोरोना चा फैलाव सुरु झाल्यापासून गायकवाड बंधू यांनी केलेल्या कार्याची माहिती देऊन या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील आणि महापालिका स्तरावरील अधिकारी यांना कोविड बद्दल केलेल्या कामांबाबत सन्मानित करण्यात आले. यावेली बोलताना आ. पाटील म्हणाले ,’ पैसा अनेकांकडे असतो ,पण अडचणीच्या काळात तो हलाखीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला वापरणे याला दानत लागते ती गायकवाड यांच्याकडे आहे. पुण्यातील अनेक लोक हे करू शकतात . त्यांनी पुढे आले पाहिजे . कोरोना आला तेव्हा लॉकडाऊन चा निर्णय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षावधींचे प्राण वाचविले आणि आरोग्यव्यवस्थेच्या स्तरावर अगदीच दुर्बल असलेल्या देशाला सबळ करून दाखविले . जगदीश मुळीक यांचेही यावेळी भाषण झाले . प्रास्तविक उमेश गायकवाड यांनी केले तर आभार दिनेश गायकवाड यांनी मानले. 

मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा

0
  • संशोधक अरविंद गुप्ता, लीना मेहेंदळे यांच्या हस्ते रविवारी होणार उद्घाटन

पुणे : भारतीय विद्यार्थ्यांमध्ये कल्पक आणि कलात्मक दृष्टी असते. या विद्यार्थ्यांना, तरुणांना प्रोत्साहन देऊन भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देण्यासाठी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला संबोधित करताना भारतीय बनावटीची खेळणी आणि गेम्स बनविण्याचे, तसेच भारतीय मूल्य जपणारे क्रीडाप्रकार आणि खेळणी तयार करावीत, असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत मुलांमधील या कलात्मकतेला आणि कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी पुण्यातील भारतीय विद्या भवन संचालित मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘खेल खेल में’ : टॉय अँड गेम डिझाईन स्पर्धा (Online) आयोजिली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन येत्या रविवारी (दि. १ नोव्हेंबर २०२०) रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले संशोधक पद्मश्री अरविंद गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी भारतीय विद्या भवन, पुणे केंद्राच्या अध्यक्षा लीना मेहेंदळे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, तो ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी विज्ञान शोधिका केंद्राचे मानद संचालक अनंत भिडे, उपसंचालक नेहा निरगुडकर, समन्वयक अभिषेक अनगोळे, रजत अगरवाल आदी उपस्थित होते. 

नंदकुमार काकिर्डे म्हणाले, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच गोष्टी व्हर्च्युअल होत आहेत. शिक्षणही ऑनलाईन झाले आहे. अशातही मुलांच्या डोक्यात अनेक नवकल्पना घोळत असतात. शाळेचे उपक्रम, प्रकल्प करताना मुले त्याच्यात रमतात. मुलांच्या सर्जनशीलतेला आव्हान देण्यासाठी ‘खेल खेल में’ ही एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत खेळणी, विविध गेम्स आणि प्रकल्प विद्यार्थी बनवू शकतात. भारतीय संस्कृती, पौराणिक कथा, ऐतिहासिक किंवा भौगोलिक संकल्पनेवर आधारित खेळणी, गेम्स आणि प्रकल्पांची नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि मेंदूला खुराक देणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात येण्याच्या प्रक्रियेचा आनंद घेण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे हाच या स्पर्धेचा उद्देश आहे. नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन येणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना संस्थेच्या वतीने सहकार्य केले जाणार आहे.”

अनंत भिडे म्हणाले, “ही स्पर्धा प्रामुख्याने कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन गटात होणार आहे. कनिष्ठमध्ये ५ वी ते १० वी, तर वरिष्ठमध्ये ११ वी व त्यापुढील विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. स्पर्धा दोन टप्प्यात पार पडेल. पहिला टप्पा संकल्पनेचा असून, त्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या संकल्पना स्पर्धेसाठी पाठवाव्या लागतील. त्याची अंतिम तारीख आहे १० डिसेंबर आहे. दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना त्या संकल्पनेला प्रत्यक्ष मूर्त रूप द्यायची आहे. त्यासाठीची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२१ अशी आहे. सर्व सहभागी खेळणी आणि गेम्सचे ऑनलाईन प्रदर्शन राष्ट्रीय विज्ञान दिवशी अर्थात २८ फेब्रुवारी २०२१ रोजी ऑनलाईन स्वरूपात भरवण्यात येईल. स्पर्धेतील विविध विभागात दोन लाखांपर्यंतची बक्षिसे देण्यात येतील.”

नेहा निरगुडकर म्हणाल्या, “या स्पर्धेच्या निमित्ताने २० नोव्हेंबरपासून शैक्षणिक मालिका सुरू केली जाणार आहे. ही मालिका सर्वांसाठी मोफत असेल. त्यामध्ये विविध ऑनलाईन अभ्यासक्रम, कार्यशाळा, तज्ज्ञांची व्याख्याने असतील. या मालिकेतून गेम डिझाईन, विचार कौशल्य, खेळण्यांची निर्मिती, फ्रॅब्रिकेशन तंत्रज्ञान, प्रोग्रामिग, इलेक्ट्रॉनिक आदी विषयांचे शिक्षण मिळेल. समाज माध्यमांवर विद्यार्थ्यांना मोफत सल्ला आणि विद्यार्थी- शिक्षक संवादांचे आयोजन केले जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, शिक्षक यांनी या संधीचा लाभ घ्यावा.”

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी साठवणूक क्षमता १५०० मे.टन एवढी वाढवून द्या

0

मुंबई दिनांक 31: कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये  थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा ही 25 मेट्रिक टनावरून वाढवून 1500 मे.टन एवढी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसे पत्र त्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण  मंत्री पियुष गोयल यांना पाठवले आहे.

मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात, केंद्र शासनाने दिनांक 29 ऑक्टोबर 2020 च्या सूचनेप्रमाणे एपीएमसीतील कांदा खरेदीच्या दिनांकापासून ग्रेडींग/ पॅकेजिंगसाठी 3 दिवसांचा कालावधी दिला आहे. हा कालावधीही खूप कमी असून तो सात दिवसांचा करण्यात यावा.

केंद्र शासनाने 23 ऑक्टोबर 2020 रोजी जीवनावश्यक वस्तू कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून घाऊक कांदा व्यापाऱ्यांसाठी 25 मे.टन तर किरकोळ कांदा व्यापाऱ्यांसाठी फक्त 2 मे. टनापर्यंत साठवणुकीचे निर्बंध घातले आहेत.  त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापारी दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

100 लाख मे.टन कांदा

रब्बी कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य असून एकूण उत्पादनाच्या 1/3 उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. देशाच्या एकूण कांदा निर्यातीमध्येही महाराष्ट्राचा हिस्सा ८० टक्के असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे. यासंबंधी अधिक माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी मागील हंगामात रब्बी  हंगामातील कांदा उत्पादनाचे क्षेत्र वाढले असून अंदाजे 100 लाख मे.टन कांद्याचे उत्पादन झाल्याची माहिती दिली आहे.

कांद्याचे नुकसान

मागील काही वर्षात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. असे असले तरी मागील रब्बी हंगामाच्या साठवलेल्या कांद्याचे ढगाळ वातावरणामुळे नुकसान झाले आहे.  प्रतिकूल हवामानामुळे खरीपाचा नवा कांदा येण्यास उशीर झाला आहे. यावर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध प्रदेश, मध्य प्रदेश अशा कांदा उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीने शेतातील उभ्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2020 मध्ये कांद्याचे भाव वाढलेले दिसून येत आहेत.

पुरवठा साखळीवर परिणाम

केंद्र शासनाने जीवनावश्यक वस्तू कायद्यातील  नियंत्रण आदेशात  सुधारणा करून कांदा साठवणुकीची मर्यादा घाऊक व्यापाऱ्यांकरिता 25 मे.टन एवढी कमी केल्याने एपीएमसीमधील कांदा व्यापारी जे शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करत होते यावर परिणाम झाला. त्यांच्याकडून कांदा साठवणुकीची ही मर्यादा 1500 मे.टनापर्यंत वाढवून देण्याची मागणी सातत्याने होत आहे. 23 ऑक्टोबर 2020 च्या नोटिफिकेशनद्वारे कांद्याच्या आयातीला स्टॉक मर्यादेतून सूट देण्यात आली आहे.  त्याच धर्तीवर एपीएमसीमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांची कांदा साठवणूक मर्यादा 1500 मे.टनापर्यंत वाढवावी अशी मागणी कांदा व्यापाऱ्यांकडुन होत आहे.

फक्त 25 मे.टन साठवणुकीच्या मर्यादेमुळे सध्या एपीएमसीमधील कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणे थांबवले असून त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होत आहे. परिणामत: किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढताना दिसत असून त्याचा ग्राहकांवर भार पडत आहे.

लॉकडाऊनमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आधीच नुकसान

याप्रमाणचे खरिपाचा कांदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येणे सुरु होणे अपेक्षित आहे. खरिपाचा कांदा अत्यंत नाशवंत स्वरूपाचा असतो त्यामुळे जर सध्याच्या साठवणूक क्षमतेच्या निकषामुळे व्यापाऱ्यांकडून हा कांदा खरेदी झाला नाही तर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. मागील सहा महिन्यात कोविड-19 च्या लॉकडाऊन काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आधीच मोठे नुकसान सोसले आहे.  ही परिस्थिती पाहता एपीएमसीमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या  व्यापाऱ्यांची कांदा साठवणूक क्षमता ही 1500 मे.टन करावी अशी मागणी करण्यात येत आहे

बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

0

मुंबई दि. 31 : संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून, मला त्यांचे सान्निध्य, आशीर्वाद लाभले हे माझे भाग्य आहे; अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. रामराव बापू महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

डॉ. रामराव बापू महाराज यांना कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठातून डी. लिट. पदवी देऊन सन्मानित केले होते. त्यांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ट रूढी – परंपरा, बालविवाह, अंधश्रद्धा विरोधात समाज प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ उभी केली. केवळ बंजारा समाजच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी सुधारणावादी विचारांनी महाराजांनी संत सेवालाल महाराजांचा वारसा समर्थपणे चालवला.

श्री . मुंडे यांनी डॉ. रामराव बापूंच्या स्मृतींना उजाळा दिला. महाराजांना वाशिम येथील पोहरादेवी तीर्थ क्षेत्रासह अनेक ठिकाणी भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांचे सान्निध्य लाभले हे माझे भाग्यच म्हणावे लागेल असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. नुकतेच मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना धनंजय मुंडे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती.

डॉ. रामराव बापू महाराजांच्या निधनाने अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, महाराजांचे बंजारा समाज, व्हीजेएनटी आरक्षण लढ्यातील योगदान, त्यांचे अध्यात्मिक व सामाजिक कार्य सदैव स्मरणात राहील तसेच पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

0

मुंबई, दि. 31:-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र आदरांजली वाहिली आहे.

मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहिली.

मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, कणखर आणि विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व म्हणून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जगभरात ओळख होती. स्वर्गीय इंदिराजींचे भारताच्या विकासात अमूल्य असे योगदान आहे. आधुनिक भारताच्या उभारणीसाठी तसेच देशाला एकात्म, अखंड ठेवण्यासाठी त्यांनी कणखरपणे निर्णय घेतले. त्यासाठी त्यांना बलिदानही द्यावे लागले. त्यांच्या बलिदानातून आपल्याला देश महासत्ता बनविण्याची प्रेरणा घ्यावी लागेल. त्यासाठी आजच्या राष्ट्रीय संकल्प दिवसाचेही आपण गांभीर्यपूर्वक स्मरण करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

ब्राह्मण समाजाच्या महामंडळाबाबत राज्य सरकारला निर्देश देणार – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0

मुंबई.- – ब्राह्मण समाजाच्या महामंडळाबाबत राज्य सरकारला निर्देश देणार असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबईतील राजभवनात समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता आश्वासन दिले असल्याची माहिती येथे देण्यात आली .

यावेळी समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाबाबात चर्चा केली असता राज्यपालांनी राज्य सरकारला सकारात्मक निर्देश देण्याचे वचन दिले. तसेच ब्रम्ह महा शिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजीत देशपांडे यांनी ब्राह्मण समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या व त्यांच्या ग्रामीण भागातील अडचणी मांडल्या. तर मकरंद कुलकर्णी यांनी राज्य सरकार सोबत आजमितीस झालेला पत्रव्यवहार व आजची स्थिती कथन केली. त्याच बरोबर संजीवनी पांडे यानी ब्राह्मण समाजातील महिला त्यांची आर्थिक व शैक्षणिक स्थिती बाबत अडचणी कथन केली. तसेच ॲड. आरती सदावर्ते – पुरंदरे यांनी ब्राह्मण समाजावर होणाऱ्या लिखाणावर बंदी घालावी व ब्राह्मण समाजाच्या  संरक्षणासाठी कडक कायदे करावे असे ही त्या म्हणाले.

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सगळ्या अडचणी ऐकून घेऊन तसेच सकारात्मक चर्चा करून राज्य सरकारला निर्देश देण्याचे अभिवचन दिले. या शिष्टमंडळात ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी, ब्रम्ह महा शिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजीत देशपांड, मकरंद कुलकर्णी, संजीवनी पांड, ॲड. आरती सदावर्ते – पुरंदरे हे उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देणा-या विशेषांकाचे प्रकाशन

0

मुंबई, दि. ३१ – कोरोनाच्या कठीण प्रसंगी कोविड सेंटरला दिलेल्या भेटी तसेच निसर्ग चक्रिवादळाची परिस्थिती असो वा महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे प्रसंग पण प्रत्येक संकटाच्या काळात केवळ स्वस्थ बसून न राहता जनतेमध्ये प्रत्यक्ष फिरून व त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम कोविड योध्दे देवेंद्र फडणवीस यांनी ख-या अर्थाने केले. देवेंद्रजी यांनी केलेल्या या सामाजिक कार्याची नोंद घेऊन प्रकाशित करण्यात आलेले ‘जनसेवक’ हा विशेषांक पुढच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी व दिशादर्शक ठरेल असा ठाम विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देणारे तसेच कोरोनोच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या सेवाकार्याचा समावेश असलेल्या ‘जनसेवक‘ या विशेषांकाचे प्रकाशन आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते व भाजपा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तसेच जनसेवक विशेषांकाचे अतिथी संपादक माधव भांडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ, हिन्दुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, भाजपाचे मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, दिपाली मोकाशी, रविंद्र गोळे आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात विवेक साप्ताहिक प्रकाशित ‘जनसेवक‘ विशेषांक सोहळा पार पडला.
विवेक साप्ताहिकाने या विशेषांकाच्या माध्यमातून आदर्श उपक्रम रावबिला आहे. त्यांनी एका चांगल्या विशेषांकाचे प्रकाशन केले असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, विवेकने प्रकाशित केलेला हा विशेषांक म्हणजे प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यासाठी संग्रही ठेवा आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना सारख्या कठिण प्रसंगी राज्य सरकारची यंत्रणा सर्वच स्तरावर अपयशी ठरत असताना देवेंद्रजी यांनी कोविड सेंटरचा दौरा केला. ज्यावेळी राज्य सरकारची यंत्रणा कुचकामी ठरत होते व प्रशासनाचे प्रमुख घरी बसले होते. तेव्हा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संकटात सापडलेल्या जनतेला धीर दिला. मग फक्त कोरोनाचा काळ नव्हे तर त्यानंतर आलेले निसर्ग चक्रिवादळ तसेच राज्यातील अतिवृष्टी या संकटसमयी ते प्रत्यक्ष घटनास्थळी गेले. आपण स्वत: या सर्व घटनांचे साक्षीदार आहोत. कारण या प्रत्येक ठिकाणी आपण त्यांच्यासमेवत सामाजिक कार्य करीत होतो. त्यामुळे या सर्व काळात त्यांनी अविरत परिश्रम केले. राज्यातील जनतेला धीर दिला व त्यांच्या या सामाजिक कार्याची नोंद विवेक या साप्ताहिकाने घेतली व एका अर्थाने जनतेच्यावतीने त्यांच्या योगादनाप्रति कृतज्ञता व्यक्त केली असे आपले मत असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणून गेली पाच वर्षे दिवस रात्र राज्यातील जनेतेची सेवा देवेंद्रजी यांनी केलीच, पण विरोधी पक्ष नेता या नात्याने त्यांनी वेळ प्रसंगी आपला जीव धोक्यात टाकून जनसेवेचे कार्य केले त्यामुळे जनतेने फडणवीस यांना जनसेवक हा किताब दिल्याचे उद्गार देरकर यांनी काढले.
देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिमत्व हे नेहमीच विवेकशील व संयमी राहिले आहे, त्यामुळे विवेक साप्ताहिकाने देवेंद्रजी यांच्यावर विशेषांक प्रकाशित करणे हा सुध्दा एक योगायोग आहे असे सांगतानच दरेकर म्हणाले की, विवेक चा उपक्रम अतिशय आदर्श असा आहे. त्यांनी प्रकाशित केलेला पुस्तरुपी ठेवा संग्रही ठेवण्यासारखा आहेच, पण ख-या अर्थाने पुढच्या युवा पिढीला प्रेरणादायी व दिशादर्शक असा आहे असेही त्यांनी सांगितले.
देवेंद्रजी यांनी एमएमआरडीए रिजन, महाराष्ट्रातील सर्वच भाग या कठिण काळात पालथा घातला. त्यातच पक्षाने त्यांच्याकडे बिहार विधानसभा निवडणूकीची जबाबदारी सोपविली, तेथेही त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली, पण अखेर त्यांना कोरोनाने गाठले असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, अन्य राजकीय नेते कोरोना झाल्यावर पंचातारांकित रुग्णालयात उपचार घेत असतानाच फडणवीस यांनी सेंट जॉर्ज या सरकारील रुग्णालयात उपचार घेणे पसंत केले. एका प्रकारे त्यांनी सरकारी यंत्रणेवर विश्वास दाखविला असेही त्यांनी सांगितले.

सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना राज्यपालांचे अभिवादन

0

मुंबई, दि. 31 : दिवंगत उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अभिवादन केले.

देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत श्रीमती इंदिरा गांधी यांची आज 36 वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने राज्यपालांनी इंदिरा गांधी यांच्याही प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी व उपस्थित पोलीस जवान यांचेसह राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली.

देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा राखण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपले योगदान देण्याची शपथ यावेळी देण्यात आली.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, उपसचिव श्वेता सिंघल, खासगी सचिव उल्हास मुणगेकर तसेच अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0

मुंबई, दि. 31 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोहपुरूष माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.

मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिवंगत सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाच्याही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, राष्ट्रीय ऐक्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले योगदान अभूतपूर्व असे आहे. पूर्णतः वास्तववादी विचारसरणीच्या सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य संग्रामात तसेच पुढे संस्थांनांच्या विलिनीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. अखंड आणि बलशाली भारत हा सरदार पटेल यांचा ध्यास होता. त्याचसाठी त्यांनी आयुष्य वेचले. सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या अखंड भारताच्या प्रयत्नांना वंदन करण्यासाठी साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसांच्याही सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

मुख्यमंत्री काँग्रेस महापालिकांना निधी देत नाहीत, अशोक चव्हाणांनी लावला गंभीर आरोप

0

महाविकास आघाडीमध्ये काहीही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत असते. तिन्ही पक्षांमध्ये काहीच ताळमेळ नसल्याच्या चर्चा नेहमीच केल्या जात असतात. आज पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आला आहे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधीत देत नसल्याचा गंभीर आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

अशोक चव्हाण याविषयी बोलताना म्हणाले की, ‘काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी दिला जात नाही. याच कारणामुळे नांदेडलाही निधी मिळालेला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला’ असे वक्तव्य अशोक चव्हाणांनी केले आहे. अशोक चव्हाण हे परभणीतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा आढावा चव्हाणांनी घेतला.

अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, आपण सत्तेत असतो तेव्हा आपल्या भागाचा विकास व्हायला हवा या मताचा मी आहे. मात्र दुर्देवाने कोरोनामुळे 30 टक्केच निधी मिळाला. मात्र मराठवाड्यात जास्तीत जास्त निधी देण्याची माझी भूमिका असल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले. यासोबतच चव्हाणांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याविषयीही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. मात्र राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

0

मुंबई, दि. 31 : माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय  इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखत देशाला ‘महासत्ता’ बनण्याच्या वाटेवर आणण्यात स्वर्गीय इंदिराजींचं नेतृत्व, कर्तृत्व, त्याग, बलिदानाचं योगदान सर्वाधिक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन कृतज्ञता व्यक्त केली.

स्वर्गीय इंदिराजींच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात व स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत इंदिराजींनी दिलेले योगदान, केलेल्या त्यागाबद्दल देशवासीय त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञ राहतील. इंदिराजींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. तुरुंगवास भोगला. पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून देशाच्या विकासाचा पाया भक्कम केला. आशियाई खेळांचं आयोजन असो की, अलिप्त राष्ट्रांचं नेतृत्व करण्याची क्षमता, इंदिराजींच्या अनेक निर्णयांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा गौरव वाढवला. देशाच्या एकता, अखंडता, सार्वभौमत्वासाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या महान नेतृत्वास कृतज्ञतापूर्वक अभिवादन, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली.

शरद पवारांमुळे आता राजकारणाचा केंद्रबिंदू ‘पुणे’ – खा. संजय राऊत

0

हा तर महाराष्ट्राचा अपमान ! राज्यपालांच्या त्या भेटीवरून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

पुणे-महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदु पुणे आहे. बाळासाहेब ठाकरे होते तो केंद्रबिंदु हा मुंबईत होता. अनेक काळ देशाचे आणि राज्याचे राजकारण मुंबईतून घडत होते. आता सर्व प्रमुख हे पुण्यात असल्याचे विधान संजय राऊतांनी केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सरकारमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते सर्वांना मार्गदर्शन करतात. जर सरकार शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते? असा सवालही राऊतांनी विरोधकांना उपस्थित केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावर आज शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान. मुख्यमंत्री लोकनियुक्त असतात, राज्यपालांना अधिकार नसतात.

राज्यपालांसाठी राजभवन उत्तम जागा आहे त्यांनी आरामात राहावं. त्यांची नियुक्ती केंद्राकडून होते, खर्च राज्य शासन करते. राजभवन राजकारण करण्याची जागा नाही. बाहेर या मैदानात आम्ही राजकारण करू, असे आव्हान खासदार राऊत यांनी राज्यपालांना त्यांचे नाव न घेता दिले.

आता या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे
संजय राऊतांनी पुण्यात बोलताना विरोधकांवर टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारविषयी बोलताना राऊत म्हणाले की, ‘हे सरकार होणारच होते. हे सरकार होणार नाही असे काहींना वाटत होते, मात्र माझ्यासारख्या काही लोकांना सरकार अशा प्रकारे घडेल असे वाटत होते आणि तसेच झाले. नंतर हे सरकार 15 दिवसांत कोसळेल अशाही काही लोकांच्या पैजा लागल्या होत्या. पण सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकार पूर्ण ताकदीने चालले आहे आणि सरकार पाच वर्ष टीकेल’ असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

पवारांचा सल्ला घेतला तर पोटदुखी का होते?
मुख्यमंत्री काही करत नाही शरद पवार हे सरकार चालवतात असे विरोधकांकडून अनेकदा बोलले जाते. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ‘शिवसेना- भाजप युतीचे सरकार होते तेव्हा देखील बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवत असल्याचा आरोप केला जात होता. जेव्हा तीन पक्षांचे सरकार असते, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करतात. तिकडे मोदी देखील इतर राज्यांना मार्गदर्शन, सल्ला देत असतात. सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असतील तर कुणाला पोटदुखी का होते? असा सवालही राऊतांनी विरोधकांना विचारला आहे.

राऊतांचा राज्यपालांना खोचक टोला
नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. यामध्ये वाढिव वीज बिल आणि दुधाच्या दरांचा प्रश्न त्यांनी मांडला. दरम्यान राज्यपालांनी त्यांना शरद पवारांशी बोलून घेण्याचा सल्ला दिला होता. यावर बोलताना राऊत म्हणाले की, भाजपचे बहुतेक नेते शरद पवारांना नेता मानतात आता राज्यपालही शरद पवारांना नेता मानत असतील तर आनंदच आहे. असे म्हणत राऊतांनी राज्यपालांना खोचक टोला लगावला आहे

‘महाराष्ट्राचा अपमान करताना पहा खुद्द संजय राऊत’मनसेने फोटो शेअर करत म्हटले …

0

राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. वाढीव वीज बिल आणि दुध दराविषयीचा प्रश्न त्यांनी राज्यपालांसमोर मांडला. यावरुन संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हाच महाराष्ट्राचा अपमान असल्याचे राऊत म्हणाले होते. यावरुन मनसेने संजय राऊतांचा फोटो शेअर करत ‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ असे शिर्षक देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1322471881425866752/photo/1

संजय राऊतांना राज ठाकरेंच्या राज्यपालांच्या भेटीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा ते म्हणाले होते की, ‘महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांची भेट घेणे हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांची त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मनसेने आता यावर आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांचा एक फोटो ट्विट केला आहे. राऊतांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांची भेट घेतली होती. याच भेटीचा फोटा ट्विट केला आहे. तसेच फोटो ट्विट करुन ‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ असं म्हणत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

हॉटेल व्यवसायाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी शासनाने आर्थिक पॅकेज द्यावे

0

 पुणे-लॉकडाऊनच्या काळात हॉटेल व्यवसाय बंद असला तरी कामगारांचा पगार, लाईट बिल, कर्जाचे हप्ते, मिळकतकर, भाडे, मेंटेनन्स, नुतनीकरण यांसारखे खर्च सुरुच होते. त्यामुळे उत्पन्न शून्य असताना खर्च झालेला आहे. या आर्थिक संकटातून हॉटेल व्यावसायिकांना सावरण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी पुणे रेस्टॉरंट अॅंड हॉटेल असोसिएशन (ग्रामीण)च्या वतीने मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे.हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक संकटाला कंटाळून काही हॉटेल व्यावसायिकांनी आत्महत्या केली आहे.या कडेही लक्ष वेधले जाते आहे.

मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारोनाच्या संकट काळात सात महिने राज्यातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट, तसेच स्नॅक सेंटर्स, रसवंती गृह, अमृतुल्य, मिल्क पार्लर यांसारखे व्यवसाय बंद होते. हे सर्व व्यवसाय 5 ऑक्टोबर पासून काहीअटी व शर्तींवर चालू झाले. प्रत्येक ग्राहकाकडे आरोग्य सेतू अॅप असावे. प्रत्येक ग्राहक, ग्रुप मधील व्यक्तीचे नाव , संपर्क क्रमांक, ईमेल आयडी, दिनांक व वेळ यांची नोंद ठेवणे. सर्व हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियमित कोविड चाचणी करणे अशा अनेक अटी शासनाने लावल्या आहेत.

त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या तपासणी पथकांना 50 हजार रुपयांपर्यंत दंड करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाने किराणा दुकाने, भाजी मार्केट, जिम, सलून, मॉल, रेशन दुकाने, ट्रान्सपोर्ट, एस. टी. बस, रेल्वे यांसारख्या अस्थापना सुरु करताना अशा जाचक अटी लावल्याचे दिसत नाही. मग हॉटेल व्यावसायिकांनाच जाचक अटी का ?असा सवाल पुणे रेस्टॉरंट अॅंड हॉटेल असोसिएशन (ग्रामीण) कडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शासनाने हॉटेल व्यावसायिकांना एक वर्षाची नुतनीकरण फी, विक्री कर, लाईट बिल माफ करावे आणि हॉटेल व्यावसायीकांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी आणि त्यांना व्यवसायामध्ये उभारी घेण्यासाठी आर्थिक पॅकेज द्यावे. महापालिका क्षेत्रातील सुधारित वेळेप्रमाणे ग्रामीण भागातही रात्री साडे अकरा वाजेपर्यंत हॉटेल चालू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी. तसेच राज्यउत्पादन शुल्काची मिशन ऑल आउट प्रभावीपणे राबवून अवैध मद्यविक्री, मद्य वाहतूक, हातभट्टी, बनावट देशी/विदेशी मद्य निर्मिती या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे. अवैध दारू विक्रेत्यांना वाइन शॉप मधून मद्यसाठा मिळणार नाही, यावर कडक कारवाई करावी. एफ एल 3 अनुज्ञप्ती धारकांनी परवाना कक्ष सुरू करण्यापूर्वी नुतनीकरण शुल्कापोटी दोन लाख रूप भरण्याचे आदेश रद्द करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

आज राज्यात 6,190 नवीन रुग्णांचे निदान: 127 रुग्णांचा मृत्यू

0
  • आज ८,२४१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५,०३,०५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate९.८५ % एवढे झाले आहे.
  • आज राज्यात ६,१९० नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यात आज १२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९,०६,८२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,७२,८५८ (१८.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २५,२९,४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,४११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण १,२५,४१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई२५६५०५२२६६८७१०२६१५३०१९०२७
ठाणे२२२५०७१९८५९७५३३११८५७८
पालघर४२८७२३८९३८९५० २९८४
रायगड५९४२९५४०५११४००३९७६
रत्नागिरी९९८४८२८५३७६ १३२३
सिंधुदुर्ग४९९९४२४५१३३ ६२१
पुणे३३३१०६३०१८६०६६७१२४५७३
सातारा४७३७३४१३५२१४०७४६१२
सांगली४६६७१४२१८२१५२९ २९६०
१०कोल्हापूर४७१६३४४४४३१६०८ १११२
११सोलापूर४३८१९३९०३६१४३८३३४४
१२नाशिक९३९३८८७४७८१५४० ४९२०
१३अहमदनगर५५९२१४९५५६८५३ ५५१२
१४जळगाव५३४७३४९९८२१३४५ २१४६
१५नंदूरबार६३६९५७४२१४१ ४८६
१६धुळे१४१९६१३४९१३४०३६३
१७औरंगाबाद४१७३६३९११७९७८ १६४१
१८जालना१०३५२९४९२२८२ ५७८
१९बीड१३७८८१२३१९४१४ १०५५
२०लातूर२०६७८१८०२२६१० २०४६
२१परभणी६६२४५६७७२३७ ७१०
२२हिंगोली३६३५३०३१७४ ५३०
२३नांदेड१९१५५१६५७४५१९ २०६२
२४उस्मानाबाद१५२८८१३६०६४९६ ११८६
२५अमरावती१६९७३१५८५५३४९ ७६९
२६अकोला८५४१७६७९२७८५८३
२७वाशिम५७४१५३८११३६२२३
२८बुलढाणा१०४९१८३०७१६७ २०१७
२९यवतमाळ१०८३७९८८८३१४ ६३५
३०नागपूर१०१८७३९३७६७२७२७१०५३६९
३१वर्धा६५७७५८६०२०४५१२
३२भंडारा८८३३७४९११९३ ११४९
३३गोंदिया९८३६८८१९११२ ९०५
३४चंद्रपूर१६१६८११५८०२४१ ४३४७
३५गडचिरोली५२५९४२३२३६ ९९१
 इतर राज्ये/ देश२१४८४२८१४७ १५७३
 एकूण१६७२८५८१५०३०५०४३८३७५५३१२५४१८

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ६,१९० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६,७२,८५८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
मुंबई महानगरपालिका११४५२५६५०५३२१०२६१
ठाणे८४३४३६९८३१
ठाणे मनपा२११४६४९११२११
नवी मुंबई मनपा१६१४७७५७१०१७
कल्याण डोंबवली मनपा१५९५३८०६९४१
उल्हासनगर मनपा१७१०३०७३२३
भिवंडी निजामपूर मनपा१८६२५४३४९
मीरा भाईंदर मनपा८७२३५२३६५९
पालघर३२१५४६२३००
१०वसई विरार मनपा७६२७४१०६५०
११रायगड८४३४७३६८७८
१२पनवेल मनपा८५२४६९३५२२
 ठाणे मंडळ एकूण२१५९५८१३१३५११७९४२
१३नाशिक३०२२५३२५५२१
१४नाशिक मनपा२१८६४४९९८६८
१५मालेगाव मनपा४११४१५१
१६अहमदनगर१९७३७६४०५२१
१७अहमदनगर मनपा५४१८२८१३३२
१८धुळे१०७६८५१८७
१९धुळे मनपा१८६५१११५३
२०जळगाव४१४११८०१०५९
२१जळगाव मनपा१५१२२९३२८६
२२नंदूरबार२२६३६९१४१
 नाशिक मंडळ एकूण८८३२२३८९७४२१९
२३पुणे३२२७६९६६१५७१
२४पुणे मनपा२७७१७१७६६३९००
२५पिंपरी चिंचवड मनपा१५३८४३७४१२००
२६सोलापूर१४८३३५७८९१२
२७सोलापूर मनपा३०१०२४१५२६
२८सातारा२६०४७३७३१४०७
 पुणे मंडळ एकूण११९०४२४२९८२१९५१६
२९कोल्हापूर५०३३५४८१२१४
३०कोल्हापूर मनपा१९१३६१५३९४
३१सांगली८९२७४७८९६२
३२सांगली मिरज कुपवाड मनपा२०१९१९३५६७
३३सिंधुदुर्ग१३४९९९१३३
३४रत्नागिरी३०९९८४३७६
 कोल्हापूर मंडळ एकूण२२११०८८१७३६४६
३५औरंगाबाद२०१४५१५२७७
३६औरंगाबाद मनपा२६२७२२१७०१
३७जालना९२१०३५२२८२
३८हिंगोली१७३६३५७४
३९परभणी१५३७०१११७
४०परभणी मनपा२९२३१२०
 औरंगाबाद मंडळ एकूण१७७६२३४७१३१५७१
४१लातूर३११२४१३४०८
४२लातूर मनपा२८८२६५२०२
४३उस्मानाबाद४५१५२८८४९६
४४बीड७९१३७८८४१४
४५नांदेड२७१०२२४२८०
४६नांदेड मनपा२४८९३१२३९
 लातूर मंडळ एकूण२३४६८९०९२०३९
४७अकोला३८४६१०८
४८अकोला मनपा१४४६९५१७०
४९अमरावती२६६२४५१४८
५०अमरावती मनपा३०१०७२८२०१
५१यवतमाळ५७१०८३७३१४
५२बुलढाणा११५१०४९११६७
५३वाशिम२४५७४११३६
 अकोला मंडळ एकूण२७२५२५८३१२४४
५४नागपूर१००२४३९०५०३
५५नागपूर मनपा४३२७७४८३२२२४
५६वर्धा२८६५७७२०४
५७भंडारा९०८८३३१९३
५८गोंदिया८६९८३६११२
५९चंद्रपूर१४९९६५३११४
६०चंद्रपूर मनपा४८६५१५१२७
६१गडचिरोली११०५२५९३६
 नागपूर एकूण१०४३१४८५४६११३५१३
 इतर राज्ये /देश११२१४८१४७
 एकूण६१९०१६७२८५८१२७४३८३७

(टीप–  ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )