Home Blog Page 1937

बीड जिल्ह्यात सातत्याने मोठया प्रमाणात अवैधरित्या गर्भपात:कडक कार्यवाही आणि SOP तयार करा : विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आदेश

0

औरंगाबाद, ता. ८ : बक्करवाडी ता.गेवराई जि.बीड येथे आणखी महिलेचे अवैध गर्भपात प्रकरण उघडकीस आले आहे. यात अतिरक्तस्त्रावामुळे सीता गाडे या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी गेवराईच्या महिला एजंटला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पिंपळनेर ता.गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज बीड जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे.
तसेच या प्रकरणी जिल्हास्तरीय समित्या स्थापन करून या घटनेची सखोल तपास करावा असे निर्देश गृह सचिवांना पत्राद्वारे दिले आहेत.

त्यांनी याबाबत पत्रात म्हटले आहे की, या घटनेनंतर परळी येथील सुदाम मुंडे प्रकरणानंतर लिंगनिदान चाचणी करणारी मोठी टोळी उघड होण्याची शक्यता वाटत आहे.

तसेच या घटनेतील आरोपी नर्सने देखील आत्महत्या केली आहे त्यामुळे यास संबंधित आणखी किती व्यक्ती यांनी गायब आहेत याच तपास तात्काळ करण्याबाबत सुचविले आहे. त्या आपल्या पत्रात म्हणतात, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सातत्याने बीड जिल्ह्यात अवैधरित्या घटना घडत असल्याने पुढील सूचना त्यांनी दिल्या आहेत.
१) या घटनेतील सर्व संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून आयपीएस कलम ३०२ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात विधी विभागाकडून तपासून कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधीक्षक यांना द्याव्यात.
२) PCPNDT आणि MTP कायद्याअंतर्गत गुन्हा संबंधित आरोपींवर दाखल करण्यात यावा.
३) केंद्रीय गर्भधारणा वैद्यकीय
समाप्तीच्या कायदा (Medical Termination of Pregnancy Act) जुन २१ मधील तरतुदीनुसार जिल्हास्तरीय समिती स्थापन केल्याशिवाय अवैध गर्भपातांना आळा बसणार नाही. त्यामुळे PCPNDT व MTP अंतर्गत जिल्हास्तरीय गृह विभागाच्या समिती स्थापन करण्यात यावी. तथापि अद्याप या जिल्हास्तरीय समित्या अस्तित्वात आलेल्या नाहीत. या अभावी अल्पवयीन मुलींच्या अपुर्ण व अवैध गर्भपात होत आहेत. त्यामुळे जिल्हानिहाय तात्काळ या समित्या नेमण्या बाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी.
४) यातील आरोपी नर्सने आत्महत्या केली आहे त्यामुळे या घटनेशी किती लोक संबंधित आहेत याचा तपास करण्यात यावा.
५) यातील सर्व आरोपींच्या मोबाईल रेकॉर्ड तपासण्यात यावा.

महिंद्रातर्फे कार्गो आणि पॅसेंजर प्रकारात नवीन अल्फा सीएनजी सादर

मुंबई,8 जून २०२२: महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने लोकप्रिय अल्फा ब्रँडवर आधारित नवीन अल्फा सीएनजी पॅसेंजर आणि कार्गो प्रकार सादर केली. नवीन प्रकाराची आकर्षक किंमत अल्फा पॅसेंजर डीएक्स BS6 सीएनजी साठी ₹  2,57,570.00 आणि अल्फा लोड प्लस साठी ₹ 2,58,580.00 आहे (एक्स-शोरूम, लखनऊ). याव्यतिरिक्त, अल्फा कार्गो आणि पॅसेंजर मालक डिझेल कार्गो थ्री-व्हीलरच्या तुलनेत ५ वर्षांमध्ये ₹ 4,00,000.00 अतिरिक्त इंधन खर्चात बचत करू शकतात. ही वाहने उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, बिहार, झारखंड, केरळ आणि मध्य प्रदेशमधील महिंद्रा डीलरशिपवर उपलब्ध असतील.

महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा बोलल्या “नवीन अल्फा सीएनजी कार्गो आणि पॅसेंजर सादर केल्याने आमच्या ग्राहकांना त्यांच्या विविध गतिशीलतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रिक, डिझेल आणि सीएनजीसह अनेक पर्याय सादर करून आम्हाला पूर्ण श्रेणीचे उत्पादक बनवले आहे. भारतातील काही सीएनजी स्टेशन्सच्या वाढत्या घनतेसह अल्फा कार्गो आणि पॅसेंजर ही मोठी बचत करू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय होइल”

महिंद्रा अल्फा सीएनजीची वैशिष्ट्ये

1.       ५ वर्षात ₹ 4,00,000.00 अतुलनीय बचत

डिझेल थ्री-व्हीलरच्या तुलनेत (लखनऊ मध्ये मार्च २०२२ पर्यंत CNG ₹ 68.1/kg, आणि

डिझेल = ₹ 90.92/litre)  5 वर्षात ₹ 4,00,000.00 इंधन खर्चाची बचत

2. विभागातील सर्वोत्तम मायलेज

·         अल्फा डीएक्स पॅसेंजर 40.2 km/kg तर  लोड प्लस 38.6 km/kg मायलेज देते (ARAI चाचण्यांनुसार). हे अतिशय उत्तम ऑपरेटिंग रेंजचे प्रदान करते.

3. विभागातील सर्वोत्तम इंजिन क्षमता आणि टॉर्क

·         395 cm³, वॉटर-कूल्ड इंजिन त्याच्या वर्गातील सर्वात मोठे आहे आणि दीर्घकालीन विश्वासार्हतेची खात्री देते

·         इंजिन 23.5 Nm चे विभागातील सर्वोत्तम टॉर्क सादर करते ज्यामध्ये रहदारीच्या पुढे राहण्यास मदत होण्यासाठी कमी वेगात जास्तीत जास्त 20 Nm टॉर्क उपलब्ध

4. अतुलनीय विश्वसनीयताटिकाऊपणा

·         खडबडीत  प्लॅटफॉर्मवर आधारित, 0.90 mm सर्वोत्कृष्ट शीट मेटल जाडीसह, पॅसेंजर सीएनजी तसेच कार्गो प्रकार उच्च टिकाऊपणा देतात.

·         संपुर्ण भारतामध्ये 800 हून अधिक डीलर टच पॉइंट्ससह महिंद्रा  सीएनजीची देखभाल सुलभ पोहोच मध्ये

‘ईट राईट चॅलेंज’ स्पर्धेमध्ये पुणे विभागाची उल्लेखनीय कामगिरी: अन्न प्रशासनची मोलाची भूमिका

पुणे, दि. ८:- ‘ईट राईट चॅलेंज’ स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याने देशात १० वा क्रमांक तर सोलापूर जिल्ह्याने २१ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अन्न व औषध प्रशासन पुणे विभागांतर्गत अन्न प्रशासनाने यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.

भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणातर्फे ‘ईट राईट चॅलेंज’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अन्न सुरक्षा व मानके कायद्याची अंमलबजावणी व ग्राहक जागृती, अन्न व्यावसाईकांचे प्रशिक्षण, ‘ईट राईट कँपस’, धार्मिक स्थळांमधील प्रसादाची स्वच्छता व सुरक्षा, पदपथावर विक्री होणाऱ्या अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत हमी आदी निकषावर उत्तम कामगिरी करणाऱ्या देशभरातून ७५ जिल्ह्याची निवड करण्यात आली. त्यामधे पुणे व सोलापूर जिल्ह्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. काल ७ जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित समारोहात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन या जिल्ह्यांचा बहूमान करण्यात आला.

पुणे विभाग अन्न प्रशासनाच्या पथकाने या स्पर्धेमध्ये सर्व स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. दैनंदिन अंमलबजावणीसह पुण्यातील जंगली महाराज (जेएम) कॉर्नर या ठिकाणाला ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’ चा दर्जा मिळवून दिला. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर मंदिर, नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिरामधील अन्न छत्राला स्वच्छ प्रसाद निर्मिती आणि वाटपासाठी प्रमाणपत्र मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, यशदा, येरवडा कारागृह, सिरम इन्स्टिट्यूट येथील उपहारगृहांना ‘ईट राईट कँपस’ चा दर्जा मिळाला आहे. पुणे आकुर्डी, कॅम्प, बारामती, देहू – १ व २, चाकण, चिंचवड व लोणावळा येथील फळे व भाजीपाला मार्केट साठी ‘क्लिन अॅण्ड फ्रेश फ्रूट अॅण्ड व्हेजिटेबल मार्केट’ चा दर्जा मिळालेला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील ११६ हॉटेल्सना हायजिन रेटींगचा दर्जा मिळालेला आहे.

पुणे जिल्ह्याला हा बहुमान मिळवून देण्यासाठी अन्न प्रशासनचे पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) संजय नारगुडे, अर्जुन भुजबळ, बाळू ठाकूर, साहेबराव देसाई, श्रीकांत करकाळे तसेच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय काम केले.

बळीराजाच्या आरोग्यासाठी…

0

कोरोना संकटकाळात शेतकरी बांधवांमुळे अर्थव्यवस्थेला ताकद मिळाली. त्यामुळे कृषी क्षेत्राचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. कृषिप्रधान संस्कृतीचा शेतकरी हा कणा आहे. देशाच्या, राज्याच्या अर्थव्यस्थेचा शेतकरी आधार आहे. मात्र सर्वांच्या पोटाची काळजी घेणाऱ्या शेतकरी बांधवांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची शासनाने काळजी घेतली आहे. कृषी विभाग आता शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे वाण मोफत देणार आहे. यामुळे पोषणमूल्यांची गरज भागण्यास मदत होणार आहे. ‘आत्मांतर्गत पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना सन 2022-23’ च्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य ठरले आहे.

विषमुक्त सुरक्षित अन्न

शेतकरी कुटुंबाला भाजीपाला, कडधान्य बीयाणे कीट पुरवठा करून त्यांची लागवड केल्यास त्यातून येणाऱ्या पोषणमूल्यांची गरज भागविता येऊ शकते. पोषणमूल्य असणाऱ्या वाणांची लागवड करून त्यातून येणाऱ्या भाज्या, कडधान्यांचा शेतकरी कुटुंबाने स्वत:च्या आहारात  वापर करायचा आहे. आपण स्वत: लागवड केलेल्या शेतात किड रोगांसाठीच्या विषारी औषध फवारण्याचे प्रमाण मर्यादित ठेऊन किंवा पूर्णता टाळून विषमुक्त सुरक्षित अन्न शेतकरी कुटुंबाला मिळू शकते.

लाभार्थ्यांची निवड

शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना पोषणयुक्त व सुरक्षित अन्नाचा पुरवठा करणे, संतुलित अन्नाचा पुरवठा करणे, विषमुक्त सुरक्षित अन्नाचा पुरवठा करणे, ग्रामीण भागातील पोषणमूल्याअभावी होणारे कुपोषण कमी करणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आली आहे. सुरूवातीला प्रत्येक गावात 10 किट देण्यात येणार आहेत. त्यांनतर टप्प्याटप्प्याने कीट देण्याचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. डीपीसी, सीएसआर, पंचायत समिती सेस, जिल्हा परिषद सेस, फलोत्पादन विभागाची परसबाग योजना यासाठी उपयोगात आणली जाणार आहे. आत्माचे प्रकल्प संचालक यासाठी प्रयत्नशिल आहेत.

या योजनेसाठी 50 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असून गावातील कुपोषित बालके असलेल्या कुटुंबाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच गावातील अनुसूचित जाती/जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असून उर्वरित लाभार्थी आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट,महिला बचत गटातील असणार आहेत. ग्राम कृषी विकास समितीच्या मान्यतेने लाभार्थी अंतिम करण्यात येणार आहेत.

बियाणे

भोपळा, शिरी दोडका, चोपडा दोडका, भेंडी, चवळी, वाल, मेथी, गाजर, गवार, मिरची, कोथिंबीर या बियाणांचे वाण शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. हे बियाण्यांचे किट एक गुंठ्यासाठी पुरेसे असून एका शेतकरी कुटुंबाची दैनंदिन गरज भागू शकणार आहे. शेतकऱ्यांनी बियाणे बँक तयार करून स्वत: वापरून इतरांनाही बियाणे द्यावयाचे आहेत. या बियाणांच्या लागवडीनंतर हंगामाच्या शेवटी येणाऱ्या बिया पुढच्या वर्षी वापरायचा आहेत. या बीयाण्यांचा पुरवठा महाबीज करणार असून गुणवत्तेची जबाबदारी महाबीजची आहे.

अशी करावी लागवड

या बियाण्यांच्या लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी जागा निवडावी. जागा शक्यतो राहत्या घराजवळ जागा असावी, जणेकरून देखरेख करणे सोईचे होईल. लागवड करताना मशागत करून माती भुसभुशीत करून शेणखत टाकावे. पालेभाज्यांसाठी गादी वाफे तयार करावेत. फळभाज्यांसाठी सरीवरंबे, हंगामानुसार येणाऱ्या पिकांची लागवड करावी. भाजापाल्याचे आहारातील महत्व, लागवड, जोपासना, कीड व रोग, बीयाणे बँक यासाठी ग्रामस्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबाचे पोषणमान उंचावणार असून शेतकरी कुटुंब रोगमुक्त जीवन जगू शकणार आहे.

अन्न सुरक्षेबरोबरच पोषण सुरक्षितता

शेतकरी कुटुंबाच्या अन्न सुरक्षेबरोबरच पोषण सुरक्षितताही महत्वाची आहे. आहारात प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे इत्यादी आवश्यक पोषणमुल्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. कुपोषण हे अन्न कमतरतेमुळे नसून पोषणमूल्यांच्या अभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. पोषणमूल्यांच्या अभावी लहान मुलांमध्ये तसेच महिलांमध्ये रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता आढळून येते. त्यामुळे ॲनिमियासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. पोषण मूल्यांच्या कमी सेवनामुळे ग्रामीण भागातील मुलांमध्ये वाढ खुंटण्यासारखे गंभीर परिणाम दिसून आल्याचे अधोरेखित केले जात आहे. त्यामुळे रोजच्या आहारात  कडधान्य, भाज्या असणे आवश्यक आहे.

सागरकुमार कांबळे

सहायक संचालक(माहिती)

महिंद्रा ट्रॅक्टरतर्फे महाराष्ट्रातील युवो टेक+ मालिकेतील सहा नवीन ट्रॅक्टर मॉडेल्स सादर

·         37 – 50 एचपी  (27.6 36.7 kW) विभागामध्ये नवीन सादर केलेल्या युवो टेक+ ब्रँड अंतर्गत 6 नवीन मॉडेल्स सादर

·         उत्कृष्ट पॉवर, टॉर्क आणि मायलेजसाठी महिंद्रा ट्रॅक्टरच्या प्रगत ३-सिलेंडर एम-झेडआयपी इंजिन आणि ४-सिलेंडर ईएलएस इंजिनद्वारे समर्थित

·         12 F + 3 R ट्रान्समिशन, ट्रू-साइड शिफ्ट, हाय प्रिसिजन हायड्रॉलिक, 4-व्हील ड्राइव्ह, ड्युअल क्लच, SLIPTO, 2-स्पीड PTO यासारख्या अनेक क्लास-अग्रणी वैशिष्ट्यांसह परिपूर्ण

·         सुलभ आणि सुव्यवस्थित कामकाजासाठी महिंद्राच्या 6-वर्षांच्या वॉरंटी कार्यक्रमाचे पाठबळ

पुणे, ८ जून २०२२: महिंद्रा ट्रॅक्टर, महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या आणि संख्येने जगातील सर्वात मोठे ट्रॅक्टर उत्पादक असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने आज नुकत्याच सादर केलेल्या युवो टेक + ब्रँड अंतर्गत सहा नवीन मॉडेल्सचे अनावरण केले असून त्यामुळे कंपनीने गेल्या वर्षी सादर केलेल्या ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मला आणखी बळ मिळाले आहे.

महिंद्रा युवो टेक + चेन्नईतील महिंद्राज रिसर्च व्हॅली (MRV) येथे जागतिक दर्जाच्या मानकांनुसार डिझाइन आणि विकसित केले आहे. ब्रँड श्रेणीचा विस्तार करताना, सहा नवीन ट्रॅक्टर महिंद्रा ट्रॅक्टरच्या नवीन एम-झेडआयपी इंजिन 3-सिलेंडर आणि ईएलएस ४-सिलेंडर इंजिनद्वारे समर्थित आहेत आणि ते सर्वोत्तम पॉवर, टॉर्क आणि मायलेज देतात.

सहा नवीन मॉडेल्स ट्रॅक्टर 37 – 50 एचपी (27.6 36.7 kW) पॉवर बँडमध्ये सादर केलेले असून ४-व्हील ड्राइव्ह, ड्युअल क्लच, SLIPTO, ऑक्झिलरी व्हॉल्व्ह आणि २-स्पीड पीटीओ या प्रमुख वैशिष्ट्यांसह येतात. ३० हून अधिक कृषी सुविधांसाठी ते योग्य आहेत.

युवो टेक + रेंज १२ एफ (फॉरवर्ड) + ३आर(रिव्हर्स) ट्रान्समिशन तंत्रज्ञानासह, ड्युअल क्लच आणि ४ डब्ल्यूडीसह ३-स्पीड श्रेणी पर्याय (H-M-L) सह चांगल्या कामगिरीसाठी येते. वेगवेगळ्या मातीच्या प्रकारांवर आणि कृषी अनुप्रयोगांवर आधारित गती निवडण्यात मदत करते. उच्च तंतोतंत नियंत्रण वाल्वसह आणि १७०० किलो पर्यंतची सर्वोत्तम श्रेणीतील उचलून घेण्याची क्षमता यांसह, नवीन ट्रॅक्टर जड अवजारे सहजपणे आणि अचूकपणे हाताळू शकतात. SLIPTO वैशिष्ट्य बेलर्स सारख्या अवजारांसाठी सहज कार्य करण्यास सक्षम करते.महिंद्रा ट्रॅक्टरने ३-सिलेंडर एम-झेडआयपी इंजिनसह २७५ युवो टेक+, ४०५ युवो टेक+ आणि ४१५ युवो टेक+ आणि 4 सिलेंडर ईएलएस इंजिनसह ४७५ युवो टेक+, ५७५ युवो टेक+ आणि ५८५ युवो टेक+ सादर केले.

नवीन उत्पादने लवकरच येत्या काही महिन्यांत संपूर्ण भारतात सादर केली जातील.

या सादरीकरणाबद्दल बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले, “शेतीक्षेत्रात परिवर्तन आणून जीवन समृद्ध करण्याच्या महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टरच्या उद्देशाला अनुसरून युवो टेक+ ‘तंत्रज्ञानात नंबर 1, हर काम में नंबर 1’ हे आपले ब्रँडचे ब्रीदवाक्य जपत आहे. शेतकरी वेग आणि कार्यक्षमतेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना सर्वाधिक प्रगत आणि आपल्या विभागातील बहुपयोगी युवो टेक+ ची रचना भारतीय शेतकऱ्यासाठी अधिक चांगली कमाई करण्यासाठी उत्पादकता, आराम आणि बचतीचे एक विजयी सूत्र सादर करण्यासाठी विकसित केले आहे. या सादरीकरणामुळे आम्हाला खात्री आहे की युवो टेक+ मालिकेतील ही उत्पादने ट्रॅक्टर मार्केटमध्ये आमचे नेतृत्व स्थान आणखी मजबूत करतील.”

नवीन महिंद्रा युवो टेक + ट्रॅक्टर श्रेणीची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे:

·         इंजिन- टेक्नॉलॉजी अशी जी पॉवर आणि मायलेज मध्ये असेल नंबर १-प्रगत आणि शक्तिशाली ३-सिलेंडर एम-झिप इंजिन आणि ४ सिलेंडर ईएलएस इंजिन

·         उच्च बॅक अप टॉर्क – गियर न बदलता लोड अचानक बदलून देखील चांगले कार्य करते

·         उच्च कमाल टॉर्क – किमान आरपीएम ड्रॉप १९७ एनएमसह विविध अॅप्लिकेशन्स खेचते

·         सर्वोत्कृष्ट पीटीओ पॉवर – दीर्घ कामकाज तास आणि मोठ्या उपकरणांसह जलद

टर्नअराउंड ३३.९ kW (४५.५HP)

·         सर्वोत्तम श्रेणीतील मायलेज – इंधन खर्च वाचवते

·         समांतर इंजिन कूलिंग – स्टॉल फ्री दीर्घ कामाचे तास सुनिश्चित करते

ट्रान्समिशन: टेक्नॉलॉजी ऐसी जो स्पीड ऑप्शन्स में हो नंबर १

·         १२ फॉरवर्ड + ३ रिव्हर्स- सुलभ कामकाजासाठी अनेक वेग पर्याय

·         H-M-L स्पीड रेंज- इतर ट्रॅक्टरच्या तुलनेत अधिक चांगले वेगाचे पर्याय

·         विश्वसनीय आणि टिकाऊ प्लॅनेटरी रीडक्शन – दीर्घकाळ आयुष्य

·         जास्त भार वाहून नेण्यासाठी हेलिकल गियर क्षमता

·         फुल कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन- सुलभ गियर शिफ्ट आणि ट्रू साइड शिफ्ट.

हायड्रोलिक्स: हायड्रॉलिकमध्ये मध्ये प्रथम क्रमांकावर असलेले तंत्रज्ञान

·         हाय-प्रिसिजन कंट्रोल व्हॉल्व्ह – एकसमान खोली साठी

·         उचलून घेण्याची वर्धित क्षमता – १७०० किलो पर्यंत मजबूत अवजारांसह कार्य करते.

·         जलद खाली करणारी आणि उचलून घेणारी अवजारे

कम्फर्ट: टेक्नॉलॉजी ऐसी जो ड्रायव्हिंग कंफर्ट मे हो नंबर १

·         साइड शिफ्ट गियर – कार सारखा आराम

·         सर्वोत्तम श्रेणीतील अर्गोनॉमिक्स

·         दुहेरी अभिनय संतुलित पॉवर स्टीयरिंग- आरामदायक ड्रायव्हिंग

+प्लस: इतर तंत्रज्ञान वैशिष्ट्ये

·         ६ वर्षांची वॉरंटी

·         उत्तम सेवा अंतराल (४०० तास)- सेवा केंद्राला कमी वेळा भेट देण्याची गरज

·         फॅक्टरी फिट केलेले टिपिंग ट्रेलर पाईप

·         ४ डब्ल्यूडी- चारही टायर्सला जास्त पॉवर. जास्त ट्रॅक्टर आणि कमी टायर. विशेषतः पुडलिंग दरम्यान ट्रान्समिशनमध्ये पाणी टाळण्यासाठी यांत्रिक सील

·         ड्युअल क्लच: वेगळे मुख्य क्लच आणि पीटीओ क्लच. सीआरपीटीओ आणि आरसीआरपीटीओ चोकिंग होत नाही आणि शेतीच्या विविध कामांमध्ये मदत मिळते.

·         SLIPTO: सिंगल लीव्हर स्वतंत्र पीटीओ सर्व क्रिया सुलभ करते

·         ५४० इकॉनॉमी पीटीओ कमी आरपीएमवर चालण्यास आणि इंधन बचत करण्यात मदत करते

महिंद्रा तीन दशकांहून अधिक काळ भारतातील प्रथम क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड आहे. इंटरनॅशनल हार्वेस्टर इंक., यूएसए आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे १९६३ मध्ये त्यांचा पहिला ट्रॅक्टर बाजारात आल्यानंतर, मार्च २०१९ मध्ये ३ दशलक्ष ट्रॅक्टर विकणारा पहिला भारतीय ट्रॅक्टर ब्रँड बनला. यामध्ये जागतिक पातळीवरील ग्राहकांना केलेल्या विक्रीचाही समावेश होता.

खडबडीत जमिनीवरतीही अपवादात्मक उभारणी गुणवत्ता कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या, महिंद्राच्या ट्रॅक्टरने कंपनीला डेमिंग अवॉर्ड आणि जपानी क्वालिटी मेडल्स दोन्ही मिळवून दिले आहे. ही कामगिरी करणारी ही कंपनी एकमेव ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असून कंपनीतर्फे आज देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी बहु-कार्यक्षम वापरासाठी विविध श्रेणीतील ट्रॅक्टर्स विकसित केले जातात.

महिंद्राचे काम सहा खंडांतील ५० हून अधिक देशांमध्ये असून अमेरिका ही भारताबाहेरील कंपनीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आज महिंद्राचे जगभरात उत्पादन आणि असेम्ब्लीचे काम असून सहाय्यक कंपन्यांच्या माध्यमातून उत्तर अमेरिका, ब्राझील, मेक्सिको, फिनलंड, तुर्की आणि जपान येथे काम सुरु आहे.

अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचाबारावीचा निकाल सलग नवव्या वर्षी शंभर टक्के

पुणे, दि. ८ जून २०२२ : महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल सलग नवव्या वर्षी शंभर टक्के लागला आहे. सुमारे २०८ मुलांना डिस्टिंक्शन मिळाले असून, उज्वल निकालाची परंपरा कायम राखल्याचे समाधान संस्थेच्या चेअरमन सुमन घोलप यांनी व्यक्त केले.
पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ज्ञानदानाचे कार्य गेली अनेक वर्ष नेटाने करत असून, येथील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी गुणवत्ता जोपासत आहेत. यावेळी शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे परिश्रमाला उचित फळ मिळाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अभिनंदन करण्यासाठी संस्थेचे चेअरमन सुमन घोलप, सचिव प्रसाद मारुतराव आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, सदस्य प्रज्योत आबनावे, गौरव आबनावे, ज्युनिअर कॉलेजच्या रेखा दराडे, प्राचार्य विद्या कांबळे आदी उपस्थित होते. 
सुमन घोलप यांनी संस्थेचे शिक्षक व कर्मचारी यांना गुणवत्ता कायम राखण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रसाद आबनावे यांनी ज्ञानदानाचे कार्य असेच कायम ठेवून विद्यार्थ्यांना घडवणे हेच पुण्याचे काम आहे, असे सांगितले. संस्थेचे मानद अध्यक्ष मोहन जोशी यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज

0

सांगली जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. जिल्ह्यात खरीपाची 633 व रब्बीची 103 गावे आहेत. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 8 लाख 61 हजार हेक्टर असून निव्वळ लागवडीखालील क्षेत्र 5 लाख 76 हजार 903 हेक्टर आहे. यामध्ये सिंचनाखालील क्षेत्र 3 लाख 63 हजार 890 हेक्टर असून भूपृष्ठावरील सिंचीत क्षेत्र 2 लाख 80 हजार 747 हेक्टर आहे. ठिबक सिंचनाचे क्षेत्र 56 हजार 700 हेक्टर तर 83 हजार 219 विहीरी जिल्ह्यात आहेत. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बी-‍बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी तसेच साठेबाजीला आळा घालण्यासाठी नियोजन केले आहे. खरीप हंगामासाठी सांगली जिल्हा कृषी विभाग सज्ज झाला आहे.

जिल्ह्यात भात, खरीप ज्वारी, रब्बी ज्वारी, बाजरी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमुग, सोयाबीन, ऊस, गहू, हरभरा यासारखी पिके प्रामुख्याने घेतली जातात. गतवर्षी जिल्ह्यात 1 लाख 24 हजार 977 हेक्टर क्षेत्रावर ऊसाची त्याखालोखाल 56 हजार 124 हेक्टर क्षेत्रावर बाजरीची, 51 हजार 755 हेक्टरवर सोयाबीन, 44 हजार 651 हेक्टरवर मका, 38 हजार 791 हेक्टरवर खरीप ज्वारी यांची पेरणी झाली. तर खरीप हंगाम सन 2022-23 साठी 1 लाख 22 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर ऊस, 60 हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरी, 38 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर खरीप ज्वारी, 44 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर मका, 38 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर भुईमुग, 51 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, 18 हजार 200 हेक्टरवर उडीद, 15 हजार 700 हेक्टरवर भात, 11 हजार 800 हेक्टरवर तूर, 9 हजार 500 हेक्टरवर मूग, 8 हजार 300 हेक्टरवर इतर कडधान्य पेरणीचे उद्दिष्ट असून उत्पादन व उत्पादकता या दोहांमध्ये वाढ करण्यासाठीही जिल्ह्यातील शेतकरी आणि विभाग प्रयत्नशील आहेत.

सांगली जिल्ह्यात गत काही वर्षांमध्ये पर्जन्यमान चांगले राहिले आहे. गतवर्षी 770 मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला आहे. खरीप हंगाम सन 2022 साठी 64 हजार 24 क्विंटल बियाणांची आवश्यकता असून महाबीजकडून या हंगामासाठी 15 हजार 175 क्विंटल तर खाजगीरित्या 22 हजार 815 क्विंटल बियाणांची उपलब्धता आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडे 63 हजार 336 क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी, एनपीके अशा विविध प्रकारची 1 लाख 51 हजार 530 मेट्रीक टन खतांची उपलब्धता आहे. तर सध्याचा शिल्लक साठा 43 हजार 111 मेट्रीक टनाचा आहे.

रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी खतांचा वापर वाढविण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. नॅनो युरियाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून सध्या सांगली जिल्हा नॅनो युरिया वापरामध्ये राज्यात अग्रेसर आहे. जीवाणू खत वापरासाठी बीज प्रक्रिया मोहिम हाती घेण्यात आली आहे. पोटॅशला पर्यायी खतांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. ऊस पिकासाठी बेसल व भरणी डोसेसमध्ये BIO-Enriched Organic Mannure चा वापर केल्यास रासायनिक खतांमध्ये 30 ते 40 टक्के बचत व खर्चात 50 टक्केपर्यंत बचत होणार आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये साधारणपणे 2 हजार 249 बियाणे, 2 हजार 947 खते व 2 हजार 450 कीटकनाशके परवानाधारकांच्या माध्यमातून कृषि निविष्ठांचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गुणवत्तापूर्ण निविष्ठा वितरीत व्हाव्या यासाठी कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग यांनी मिळून 32 गुणनियंत्रण निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सन 2021-22 मध्ये 30 बियाणे व 11 रासायनिक खते अप्रमाणित नमुन्यांवर केसेस दाखल केल्या आहेत. 104 बियाणे, 140 रासायनिक खते व 14 कीटकनाशके परवानाधारकांवर निलंबनांची कारवाई कृषी विभागाने केली आहे. तर 11 बियाणे, 39 रासायनिक खते व 44 कीटकनाशके परवानाधारकांना विक्री बंदी करण्यात आली आहे.

खरीप हंगाम सन 2022-23 साठी निविष्ठा गुणनियंत्रण नियोजन करण्यात आले असून 11 भरारी पथके जिल्ह्यात स्थापन केली आहेत. जिल्हास्तरावर 30 मार्च पासून सनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून 15 हजार 880 शेतकऱ्यांना 7 हजार 940 हेक्टर क्षेत्रासाठी ठिबकचा तर 140 शेतकऱ्यांना 115 हेक्टरसाठी तुषार सिंचन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 1 लाख 42 हजार 223 शेतकऱ्यांना तर रब्बी हंगामासाठी 79 हजार 430 शेतकऱ्यांना सन 2021-22 मध्ये 2 हजार 188 कोटी 11 लाख रूपये कर्ज विविध बँकाच्या माध्यमातून वितरीत करण्यात आले आहे. सन 2022-23 मध्येही बँकनिहाय पतपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असून खरीपसाठी 1 हजार 994 कोटी 64 लाख तर रब्बीसाठी 855 कोटी 37 लाख रूपये पीक कर्ज वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना विनासहायास, विनाविलंब पीक कर्ज वितरण करण्याचे आदेश सर्व बँकांना दिले आहेत.

शेतकऱ्यांनी 75 ते 100 मि. मी. पाऊस झाल्याशिवाय व जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये. खरीप हंगाम 2022 साठी खते व बियाणे निविष्ठा उपलब्धतेसाठी अडचणी उद्भवल्यास जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी 0233-2601412, 0233-2601413, 0233-2372718 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

श्रीमती वर्षा पाटोळे,

जिल्हा माहिती अधिकारी,

सांगली

लाभार्थींची संख्या वाढणार याचा आनंद – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

0

मुंबई, दि. 8 : 28 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 4 महामंडळाचे भागभांडवल वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी होत असून, राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे.

या शासन निर्णयानुसार महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल पूर्वी 500 कोटी होते, ते वाढवून एक हजार कोटी करण्यात आले आहे. त्याचबरोबर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे भागभांडवल 73 कोटींवरून वाढवून एक हजार कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे भागभांडवल 300 कोटींवरून वाढवून एक हजार कोटी आणि राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे भागभांडवल 50 कोटींवरून दहा पटीने वाढवून 500 कोटी करण्यात आले आहे.

महामंडळाच्या भागभांडवल वाढीसाठी राज्य सरकारने भरभरून निधी दिला असून अतिरिक्त निधी टप्प्याटप्प्याने महामंडळांना वितरित करण्यात येईल. या महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्यक्ष लाभ मिळणाऱ्या गरजू लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून, त्यांना थेट लाभ मिळाल्याने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचा विशेष आनंद असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

0

मुंबई, दि. 8: रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये अजूनही युद्ध सुरु आहे. यादरम्यान युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम शिकण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी गेले आहेत. यातील काही विद्यार्थी परत आले असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यात युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता यांच्यासह युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, सध्या राज्यामध्ये २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये (३ हजार ६५० जागा), महानगरपालिकेची ५ वैद्यकीय महाविद्यालये (९०० जागा), शासन अनुदानित १ वैद्यकीय महाविद्यालय (१०० जागा), खाजगी विनाअनुदानित १९ वैद्यकीय महाविद्यालये (२ हजार ७७० जागा) आणि १२ अभिमत वैद्यकीय महाविद्यालये (२ हजार २०० जागा) यामध्ये एकूण ९ हजार ६२० इतक्या एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या जागा उपलब्ध आहेत. या सर्व महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. चे प्रवेश अखिल भारतीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या नीट-युजी प्रवेश परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार करण्यात येतात. नीट-यूजीच्या गुणवत्तेच्या अभावी अथवा अन्य कारणास्तव राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी युक्रेनसह रशिया, फिलिपाईन्स किंवा इतर देशात वैद्यकीय प्रवेश घेत असतात.

सध्या अजूनही रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु असून ही युद्धाची परिस्थिती किती दिवस राहील हे सांगता येणार नाही. शिवाय युद्धासारखी परिस्थिती आल्यामुळे आता भारतासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे बहुतांश पालक आपल्या मुलांना पुन्हा तेथे पाठविण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेता येण्यासाठी केंद्र शासनाचे परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य विभाग याबरोबरच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत या तिन्ही ठिकाणी पाठपुरावा करुन या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी परवानगी मागण्यात येईल, असे मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.

भारतामध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने विहित केलेला वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम तसेच युक्रेन या देशातील विद्यापीठांमार्फत शिकविण्यात येणारा अभ्यासक्रम यामध्ये समानता नाही. वैद्यकीय शिक्षण पाठ्यक्रम, शैक्षणिक कालावधी, सत्र निहाय विषय व प्रात्यक्षिक यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे युक्रेन येथून एमबीबीएस अभ्यासक्रम शिक्षणाकरिता गेलेल्या व राज्यात परत येत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांबाबत केंद्र शासनामार्फत ठरविण्यात येणाऱ्या धोरणानुसार योग्य तो निर्णय घेणे योग्य राहील. 15 मे 2022 पर्यंत युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या 532 विद्यार्थ्यांची माहिती, वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत संकलित करण्यात आली आहे. तसेच युक्रेनमधल्या विद्यार्थ्यांची निवेदने, अडचणी जाणून घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण सहसंचालक अजय चंदनवाले हे नोडल अधिकारी असतील, असेही मंत्री श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.

ज्येष्ठ नेते खासदार श्री.पवार म्हणाले, युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्यांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम करता येईल. तसेच या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांचे ग्रंथालयही वापरता येईल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे त्यांना दूरस्थ शिक्षण (Foster Education) सुविधा देण्याची तयारी वैद्यकीय शिक्षण विभागाने ठेवली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी दूरस्थ शिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही सुरु करावी, अशा सूचना यावेळी श्री. पवार यांनी दिल्या.

खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबत सचिवस्तरावर समिती स्थापन करावी-उपमुख्यमंत्री

0

मुंबई, दि. 8 : राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना व शिवछत्रपती पुरस्कारार्थींना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात अभ्यास करुन धोरण ठरविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

मध्य प्रदेश सरकारच्या विक्रम क्रीडा पुरस्काराच्या धर्तीवर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्तीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देशातील इतर विविध राज्यातील खेळाडूंच्या थेट नियुक्तीबाबत असलेल्या धोरणांचा अभ्यास करुन क्रीडा विभाग, गृह विभाग, वन विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग अशा विविध विभागात खेळाडूंची थेट नियुक्ती करण्याकरीता धोरण ठरविण्यात यावे. तसेच आपल्या राज्यातील प्रमुख खेळांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा. तसेच मध्य प्रदेश सरकारच्या विक्रम क्रीडा पुरस्कारांच्या धर्तीवर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात धोरणात विचार करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले की, खेळाडूंच्या शासकीय सेवेत थेट नियुक्ती करताना क्रीडा विभागात सुरुवातीला पाच वर्ष काम करण्यास प्राधान्य द्यावे, जेणेकरुन राज्यातील खेळाडूंना त्यांच्या अनुभवाचे मार्गदर्शन मिळेल. छत्रपती पुरस्कार विजेत्यांची संख्या आणि रिक्त पदांचा धोरणामध्ये विचार करण्यात यावा. समितीने अहवाल याच महिन्यात द्यावा, असे त्यांनी यावेळी सुचविले.

क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, खेळाडूंना नियुक्ती देताना खेळाडूंचे शिक्षण आणि पद याबाबत विचार करावा. थेट नियुक्त खेळाडूंसाठी सेवाविषयक नियमही पाहण्यात यावे.

मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव म्हणाले की, नियुक्त समिती खेळाडूंच्या शासकीय थेट नियुक्तीबाबत अभ्यास करुन या महिन्याच्या शेवटी अहवाल सादर करेल.

बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

0

मुंबई, दि 8 : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे कडक कारवाई करावी, वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी भरारी पथक तैनात करावे, ही मोहीम कायमस्वरूपी राबवावी असे, निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्याबाबत आज मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार महेश शिंदे, गृहविभागाचे प्रधान सचिव(विशेष) संजय सक्सेना, वाहतूकचे अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, महामार्ग पोलीस अधिक्षक संजय जाधव, सुनिता साळुंखे-ठाकरे, परिवहनचे वरिष्ठ उपायुक्त अभय देशपांडे, तर दूरदृष्यप्रणालीद्वारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मुंबई ते पुणे-कोल्हापूर येथील महामार्गावर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे वाहतूकीची शिस्त बिघडते. अशा वाहन चालकांमुळे वाहतूक ठप्प होणे, अपघात, वाहतूक ठप्प झाल्याने सर्वसामान्यांना होणारा त्रास, विनाकारण प्रवासाला होणारा विलंब आदी समस्या उद्भवल्याचे निदर्शनास येत आहे. या वाहनचालकांवर कडक कारवाई केली पाहिजे. यासाठी महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीसांनी संयुक्तपणे कायमस्वरूपी मोहीम राबवावी. बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायमस्वरूपी भरारी पथकाची नियुक्ती करावी. यामुळे  महामार्गावरील वाहतूकीला शिस्त लागेल.

उपलब्ध मनुष्यबळातून दैनंदिन नियोजन करावे. राबविलेल्या मोहिमेचा परिणाम दिसावा, यासाठी काटेकोर नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे, अशा सूचनाही गृहराज्यमंत्र्यांनी दिल्या. या महामार्गावरी पोल 36 ते 45 पर्यंत रात्री होणारे अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दिव्यांच्या खांबांची तसेच इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. महामार्गावर निर्माण होणाऱ्या नैसर्गिक अडचणी सोडवूच, परंतु मानवनिर्मित अडचणींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

चांगल्या प्रकल्प निर्माणासाठी स्थापत्य अभियंता,वास्तुविशारद यांच्यातील परस्पर सहयोग महत्वाचा-डॉ. उज्ज्वला चक्रदेव 

 ‘एईएसए’तर्फे एम. बी. नाम्बियार यांना जीवनगौरव पुरस्कार
पुणे : “स्थापत्य अभियांत्रिकी आणि वास्तुकला एकमेकांना पूरक आहेत. वास्तुविशारद प्रकल्पाच्या बांधकामाचा आराखडा तयार करतो, तर त्याला मूर्त रूप देण्याचे काम स्थापत्य अभियंते करतात. त्यामुळे चांगल्या प्रकल्प निर्माणासाठी स्थापत्य अभियंता, वास्तुविशारद यांच्यातील परस्पर सहयोग महत्वाचा ठरतो,” असे मत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी व्यक्त केले. 
आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर असोसिएशनच्या (एईएसए) वतीने २७ व्या एईएसए पुरस्कारांचे वितरण नुकतेच झाले. ज्येष्ठ स्थापत्य अभियंता एम. बी. नाम्बियार व ज्येष्ठ आर्किटेक्ट श्रीकांत निवसरकर यांना ‘एईएसए जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक अशोक चोरडिया, ‘एईएसए’चे अध्यक्ष पुष्कर कानविंदे, उपाध्यक्ष पराग लकडे, आर्किटेक्ट ख्रिस्तोफर बेनिंजर, संयोजक विश्वास कुलकर्णी आदी उपस्थित होते.
नाम्बियार यांनी अनेक गुणवत्तापूर्ण आणि आव्हानात्मक प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण केले आहेत. जवळपास सहा दशके त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. बांधकाम क्षेत्रातील गुणवत्ता आणि सुरक्षा याबद्दल त्यांना अनेक नामवंत संस्थांनी गौरवले आहे. बांधकाम क्षेत्राबरोबरच त्यांनी वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा छंद जोपासला आहे. नाम्बियार यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा ‘एईएसए जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
एम. बी. नाम्बियार म्हणाले, “या संस्थेशी गेली अनेक वर्षे संलग्न आहे. ८० व्या वाढदिवसाच्या दिवशी हा मोठा सन्मान प्राप्त होतोय, याचा आनंद आहे. कोणताही व्यवसाय टीमवर्कच्या योगदानातून यशस्वी होतो. माझ्या प्रवासातही माझे सर्व सहकारी, कुटुंबीय यांच्या एकत्रित योगदानामुळे मिलेनियम इंजिनिअर्सचा व्यवसाय यशस्वीपणे उभा राहिला. हा पुरस्कार माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. अनेक अभियंते, आर्किटेक्ट या प्रवासात मिळाले. प्रत्येक प्रकल्पातून शिकायला मिळाले. तरुण पिढीने ही शिकण्याची वृत्ती ठेवून सुंदर निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे.”
पुष्कर कानविंदे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. पराग लकडे यांनी आभार मानले

ताउलू प्रकारात पुण्याला सर्वसाधारण विजेतेपद; १९वी राज्यस्तरीय सब-ज्युनियर (मुले-मुली) अजिंक्यपद वुशू स्पर्धा

पुणे : ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन तर्फे आयोजित  १९ व्या राज्यस्तरीय सब-ज्युनियर मुले -मुलींच्या गटाच्या अजिंक्यपद वुशू स्पर्धेत ताउलू प्रकारात पुणे संघाने सांघिकमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. कोल्हापूर संघ दुसऱ्या, तर मुंबई शहर संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

पानशेत रोड, पुणे येथे  ही स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले. यावेळी ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महासचिव सोपान कटके, संदीप बेलदरे, किरकिटवाडीचे उपसरपंच किरण हगवणे, बाजीराव पारगे, थोपटेवाडीचे उपसरपंच तानाजी थोपटे, अजित म्हात्रे, संदीप शेलार, दीपक भिसेन, महेश इंदापुरे, राहुल बर्वे, राम कोटप  उपस्थित होते.

स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. सोन्सूमध्ये मुंबई शहर संघाने प्रथम क्रमांक पटकावला. धुळे संघ दुसऱ्या, तर नागपूर व औरंगाबाद संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

ताउलू – ग्रुप सी – चंनक्वॉन – मुले – (प्रथम तीन क्रमांक) अनिरुद्ध कुलकर्णी (पुणे), दर्श कोंद्रे (पुणे), शंभुराजे नवले (पुणे). दाउशू – दर्श कोद्रे (पुणे). गुनशू – दर्श कोंद्रे (पुणे), नोमान सिद्दीकी (औरंगाबाद), चैतन्य दांदडे (नागपूर). चंनक्वॉन – मुली – समृद्धी शिंदे (पुणे), इच्छा भिसे (पुणे), आराध्या शिंदे (पुणे). दाउशू – महेश्वरी सुतार (कोल्हापूर), निसर्गा कारंडे (कोल्हापूर), सिमरण शेलार (पुणे). गूनशू – इच्छा भिसे (पुणे), अस्मी सावंत (मुंबई शहर), निसर्गा कारंडे (कोल्हापूर).

ताउलू – ग्रुप बी – चंनक्वॉन – मुले – (प्रथम तीन क्रमांक) राघवेंद्र कुलकर्णी (पुणे), आलोक गिरी (पुणे), आर्यन रेवणकर (मुंबई शहर). दाउशू – बलराम पारेक (कोल्हापूर).  ननक्वॉन – मुली – अनुष्का जैन (औरंगाबाद), संस्कृती कोंद्रे (पुणे), आयुषी चौधरी (वर्धा).

सान्सू – मुले – सात ते बारा वर्षे -२१ किलो – (प्रथम तीन क्रमांक) देशू परदेशी (धुळे), राजदीप हेमाडे (धुळे), अबुसाट पठाण (औरंगाबाद), शेख हम्मद (औरंगाबाद). २४ किलो – जिवेश भंडारी (पुणे), सिद्धार्थ बनसोडे (बीड), जित हाके (सांगली). २७ किलो – सत्यजित बोराडे (मुंबई शहर), स्वयंम पाटील (सांगली), भार्गव गुरव (सातारा), वैभव डबडे (बीड). ३० किलो – अर्जुन सोनी (धुळे), वृत्तेश शेवाळे (मुंबई शहर), उत्कर्ष खोड (बीड), आयुष कदम (बीड). ३३ किलो – विरा परदेशी (धुळे), निरेक रावत (पालघर), अब्दुल रेहमान (ठाणे). ३६ किलो – ऋषित शेट्टी (मुंबई शहर), प्रद्युम्न बारपाक्षे (नागपूर), सर्वेश लांडगे (सांगली), सुश्रयान अलीमुल्ला (सांगली).

१३ ते १४ वर्ष – ३९ किलो – (प्रथम तीन क्रमांक) सक्षम मोहोळ (नागपूर), वेदांत खोट (सांगली), शुभम तांबे (मुंबई शहर), सम्राट शेख (मुंबई उपनगर). ४२ किलो – मुस्तफा शेख (मुंबई शहर), चैतन्य देवतळे (वर्धा), ओम औटे (सांगली), आदित्य हजारे (ठाणे). ४८ किलो – विश्वजित नवले (औरंगाबाद), दक्ष शहा (ठाणे), अरमान खान (मुंबई शहर), समाधान साळवे (बीड). ५६ किलो – पार्थ मिराशे (नागपूर), अरहम शेख (औरंगाबाद), चैतन्य जोगदंड (बीड). ६० किलो – गौरव सोनावणे (धुळे), जितसिंग बरार (पालघर), यश भगत (ठाणे).

सान्सू – १२ वर्षे – मुली – २१ किलो – (प्रथम तीन क्रमांक) युगंधरा बावणे (नागपूर), सय्यज जैनाम (औरंगाबाद), सिमरा मोमिन (औरंगाबाद), अम्रिता मिल्ला (धुळे). २४ किलो – गौरी लोखंडे (धुळे), सृष्टी लांडे (धुळे), विनया यादव (सांगली), किशोरी बेंडे (वर्धा), २७ किलो – तनिष्का पाटील (ठाणे), कल्याणी घुगे (बीड), परी सोनी (धुळे), विहाना परमार (पालघर). ३० किलो – योगेश्वरी खैरनार (धुळे), नायला मित्तल (ठाणे), खुशी तालमले (नागपूर), अल्फिया पठाण (औरंगाबाद). ३३ किलो – अंतरा कांबळे (मुंबई शहर), फैका पठाण (रायगड), विश्वा अंगाणे (मुंबई उपनगर). ३६ किलो – आर्या डुंबरे (ठाणे), आरिका जोशी (मुंबई उपनगर), ध्रुवी खाडे (रायगड), स्वरा कंकलवार (गडचिरोली).

१३ ते १४ वर्षे मुली -(प्रथम तीन क्रमांक) आयुषी घेवारे (औरंगाबाद), वृत्तिका शेवाळे (मुंबई शहर), सब्बा शेख (नागपूर), स्नेहा दुधमळ (नांदेड). ४२ किलो – कुमिदिनी बिसेन (नागपूर), श्रेया शिंदे (सांगली), सिद्धी मोहिते (सांगली), गुणिका आंबवले (ठाणे). ४५ किलो – स्विटी मिशराम (नागपूर), सृष्टी सिसाळ (सांगली), चिन्मयी भोईर (मुंबई शहर), सरस्वती रोंगे (औरंगाबाद). ४८ किलो – सेजल तायडे (औरंगाबाद), प्रगती पांडये (मुंबई शहर), अमीषा सिंग (पालघर), तनिषा प्रधान (नागपूर). ५२ किलो – आर्या कोळी (रायगड), दानिया काजी (पालघर), किमया केदारे (मुंबई शहर), सई तोडकर (सांगली). ५६ किलो – मृदुला पाटील (सांगली), देवश्री विरकर (पालघर), भूमी शेळके (बीड), भूमिका साहू (नागपूर).

ताउलू मिक्स ग्रुप – (प्रथम तीन क्रमांक) अथर्व चव्हाण (पुणे), अस्मी सावंत (मुंबई शहर), मानसी कुलकर्णी (परभणी). सृष्टी कुमकर, कनिष्का अमृतवार, नेत्रा मंत्री. समर्थ गुळुंजकर, वैष्णवी नाईक, संस्कृती शिरसाट, क्षीतिज भोसले, श्रीनिती धावडे, समृद्धी नेवल. यश कोंद्रे, शौर्य आल्मे, प्रणया काकडे. ग्रंथाली प्रधान, आर्यन रेवणकर, श्रीरगा दिगरसकट. श्रावर्णा जाधव, संस्कृती मुराडी. अपूर्वा भगत, प्रणय मगर. दर्श कोंद्रे, अथर्व चव्हाण. श्रद्धा दिवेकर, सोहम मगर. संस्कृती कोंद्रे, शिवम मगर, मिरेल डिसूजा, गोविंद घात.

​जावा- येझदी मोटरसायकल्सने लडाखच्या वाटेवर त्यांच्या कम्युनिटी सदस्यांसाठी केली ‘सर्व्हिस इज ऑन अस’ उपक्रमाची घोषणा

पुणे: लडाखच्या आव्हानात्मक आणि नयनरम्य केंद्रशासित प्रदेशात जाणाऱ्या राइडिंग सीझनच्या आगमनाच्या वेळी जावा येझदी मोटरसायकलने देशभरातून या प्रदेशात जाण्याची योजना आखत असलेल्या कम्युनिटी सदस्यांसाठी नुकताच एक सेवा उपक्रम सुरू केला आहे. ‘सर्व्हिस इज ऑन अस’ हा उपक्रम देशाच्या प्रमुख भागांतून लडाखच्या प्रदेशात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर मोटरसायकल स्वारांना मोफत सेवा सहाय्य देईल.

या उपक्रमांतर्गत मार्गालगत असलेल्या प्रमुख शहरांमध्ये असलेली सेवा केंद्रे रायडर्सना आवश्यक सेवा सहाय्य पुरवतील. ठराविक कालावधीसाठीचे कामगार शुल्क आणि चालू दुरुस्तीसाठी कामगार शुल्क पूरक आणि विनामुल्य असेल.  रायडर्स लेह सर्व्हिस स्टेशनवर पूरक २६ पॉइंट जनरल चेक-अप देखील करून  घेऊ शकतात. कंपनी आवश्यक साधने आणि सुटेभाग यांसह  सुसज्ज असलेले तज्ञ तंत्रज्ञ लेह येथे देखील तैनात करेल. आरएसए धोरण मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरएसए पॉलिसीधारक मार्गातील ब्रेकडाउन सहाय्यासाठी पात्र असतील तर गैर- आरएसए पॉलिसी धारक सशुल्क आधारावर असे करण्यास सक्षम असतील.

जावा आणि येझदी समुदायाच्या रायडर्सना हा सेवा उपक्रम समर्पित करताना क्लासिक लिजेंड्स मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सिंग जोशी म्हणाले, “एखाद्याच्या स्वप्नातील गंतव्यस्थानापर्यंत जाण्यासाठी खूप नियोजन करावे लागते आणि या ‘सर्व्हिस इज ऑन अस’ उपक्रमाच्या साथीने आमच्या रायडर्सना एका गोष्टीची कमी काळजी करावी लागेल आणि ती म्हणजे संपूर्ण मार्गात मिळणारे सेवा पाठबळ. जावा आणि येझदी रायडर्सच्या मुक्त उत्साहीपणाला आणि शोध घेण्याच्या त्यांच्या ऊर्मीला हा उपक्रम समर्पित आहे. आणि ते या प्रवासात असताना सेवा सहाय्य पुरविण्याच्या बाबतीत त्यांना संपूर्ण मन:शांती मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे.”   

लडाखला जाण्यासाठी दोन सर्वात लोकप्रिय मार्गांनी NCR मध्ये विलीन होणाऱ्या देशाच्या जवळजवळ प्रत्येक कानाकोपऱ्यातून निघालेल्या रायडर्सना सर्वसमावेशक सेवा कवच देण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.  एक चंदीगड आणि मनाली मार्गे आणि दुसरा जम्मू, श्रीनगर आणि कारगिल मार्गे. पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांमधूनप्रवासाला सुरुवात करणारे जावा-येझदी कम्युनिटीचे सदस्य खाली नमूद केलेल्या तपशिलानुसार या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

दिल्लीहून रायडर्स नोएडा, गाझियाबाद आणि गुडगाव येथील सेवा केंद्रांचा वापर हरियाणा-फरीदाबाद, अंबाला आणि कर्नाल, चंदीगड, हिमाचल प्रदेश-मंडी, पंजाब – होशियारपूर आणि पठाणकोट, जम्मू-काश्मीर-जम्मू आणि श्रीनगर येथे जाण्यासाठी करू शकतात.

कोलकाता, पश्चिम बंगालपासून सुरू होणारा हा मार्ग झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली/एनसीआर, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमधून जातो. दिल्लीच्या पुढे वर उल्लेख केलेला मार्ग घेताना या मार्गावर धोरणात्मकरित्या निवडलेली प्रमुख सेवा स्थाने झारखंड धनबाद, बिहार – आराह आणि पटना, उत्तर प्रदेश – लखनौ आणि आग्रा असतील.

बंगळुरू, कर्नाटक येथून येणाऱ्या रायडर्ससाठी पसंतीचा मार्ग तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली/एनसीआर, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमधून जातो. या मार्गावरील सेवा स्थाने तेलंगणा – हैदराबाद, महाराष्ट्र – नागपूर, मध्य प्रदेश – ग्वाल्हेर आणि भोपाळ, उत्तर प्रदेश – झाशी आणि आग्रा असतील.

मुंबईहून लडाखला जाताना गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली/NCR, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांतून जाणाऱ्या मार्गावर गुजरात- सुरत, भरूच, वडोदरा आणि अहमदाबाद , राजस्थान – उदयपूर, अजमेर आणि जयपूर येथे सेवा स्थाने असतील.

रायडर्स जावा आणि येझदीच्या अधिकृत वेबसाइटवरील डीलर लोकेटर विभागात त्यांच्या मार्गात येणाऱ्या डीलरशिप आणि सेवा केंद्रांची सर्वसमावेशक यादी देखील तपासू शकतात.

आता क्रेडिट कार्डवरुन देखील करता येणार युपीआय पेमेंट, रुपे कार्डपासून होणार सुरवात

0

ई-मॅनडेट व्यवहारांची मर्यादा 15,000 रुपयांपर्यंत शिथिल करण्याचा निर्णय

मुंबई|  जून 8, 2022

प्रमुख दर -भारतीय रिझर्व बँकेने आज 2022-23 या आर्थिक वर्षातील आपला दुसरा पतधोरण आढावा आज जारी केला. सहा ते आठ जून 2022 या काळात, आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली, पतधोरण आढावा समिती-एमपीसीची बैठक झाली. या बैठकीत, रेपो दरात अर्ध्या टक्क्याची वाढ करत तो 4.90 % करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने सलग दुसऱ्यांदा रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. 
त्यानुसार, स्थायी ठेव सुविधा दर देखील आता  4.65% इतके झाले आहेत तर सीमान्त स्थायी  सुविधा दर आणि बँक दर  5.15% एवढे असतील. 

पुढे वाटचाल करतांना एकीकडे विकासाला पाठबळ देत, महागाई दर निश्चित लक्ष्याच्या आत ठेवण्याच्या दृष्टीने, एमपीसीने हस्तक्षेप कमी करण्यावर (withdrawal of accommodation)वर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. 

महागाई: 

2022 या वर्षात मोसमी पाऊस सरासरीच्या सामान्य असेल, तसेच भारतात, कच्च्या तेलाच्या किमती प्रती पिंप 105 डॉलर्स असतील, असे गृहीत धरत, 2022-23 या वर्षासाठी महागाई दर 6.7% टक्के असेल असा अंदाज या आढाव्यात वर्तवण्यात आला आहे. 
पहिली तिमाही  – 7.5% 
दुसरी तिमाही  – 7.4% 
तिसरी तिमाही  – 6.2% 
चौथी तिमाही – 5.8%

वृद्धीचा अंदाज 

जागतिक अर्थव्यवस्थेत, महागाई दर अद्याप अत्यंत चढा आहे, तसेच वृद्धीदर मंदावला आहे हे एमपीसी ने लक्षात घेतले आहे. त्याशिवाय, भूराजकीय तणाव आणि त्यामुळे असलेले निर्बंधही कायम असल्याने कच्चे तेल तसेच अनेक वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहे. त्याशिवाय कोविड-19 चा प्रभाव अद्यापही कायम असल्याने, पुरवठा साखळीत देखील अडथळे येत आहेत. 


एप्रिल -मे महिन्यातील आर्थिक निर्देशांकांनुसार, भारतात, आर्थिक घडामोडी सुधारण्याची व्याप्ती वाढत असल्याचे दिसले आहे. शहरी भागात मागणीत वाढ होते त्याचवेळी ग्रामीण भागातही थोडी सुधारणा होते आहे. मे महिन्यात व्यापारी निर्यातीत दुहेरी अंकांची वाढ झाली, गेले सलग 15 महीने, निर्यात क्षेत्रांत उत्तम वाढ होते आहे. तेल आणि सोने वगळता इतर वस्तूंची निर्यात वाढत असल्याने, देशांतर्गत मागणी आता वाढल्याचे सूचित होत आहे. 
वर्ष 2022-23 साठी वास्तविक जीडीपी दर 7.2% राहण्याचा अंदाज 


पहिली तिमाही  – 16.2% 
दुसरी तिमाही  – 6.2% 
तिसरी तिमाही  – 4.1% 
चौथी तिमाही -4.0%

एनएसओच्या 31 मे रोजी जारी झालेल्या प्राथमिक अंदाजानुसार, 2021-22 मध्ये भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादनाचा विकासदर 8.7% असेल असं अंदाज वर्तवण्यात आला होता. हा कोविडपूर्व स्थितीपेक्षा अधिक आहे. 


सहकारी बँकांना लाभ मिळवून देण्यासाठीच्या उपाययोजना.

गेल्यावेळी मर्यादा शिथिल केल्यापासून घरांच्या वाढलेल्या किमती आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता, सहकारी बँकांची वैयक्तिक गृहकर्ज मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार टियर I/II शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मर्यादा अनुक्रमे ₹30 लाख/₹70 लाख ते ₹60 लाख/₹ 140 लाख. निव्वळ मूल्यांकन ₹100 कोटींपेक्षा कमी असणाऱ्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ही मर्यादा ₹20 लाखांहून वाढवून ₹50 लाख करण्यात आली आहे, आणि इतर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ही मर्यादा ₹30 लाखांहून वाढवून ₹75 लाख करण्यात आली आहे.


नागरी सहकारी बँका आता ग्राहकांना घरपोच बँकिंग सेवा पुरवू शकतील. यामुळे या बँकांना ग्राहकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करता येतील, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग ग्राहकांना त्याचा लाभ मिळेल.

ग्रामीण सहकारी बँका आता सध्याच्या एकूण मालमत्तेच्या 5% गृह कर्ज मर्यादेत राहून व्यावसायिक बांधकामांना कर्ज देऊ शकतील (रहिवासी गृह संकुल प्रकल्पांना कर्ज)

ई- मँडेट व्यवहारांवर असलेली मर्यादा शिथिल करणे. 


अधिक मूल्याचे सदस्यत्व, विमा हप्ते आणि शैक्षणिक शुल्क पेमेंटसाठी ग्राहकांना सुविधा व्हावी म्हणून ई- मँडेट व्यवहारांवर असलेली प्रती व्यवहार मर्यादा शिथिल करत ₹ 5,000 ती ₹15,000 करण्यात आली आहे.

यू पी आय पेमेंट व्यवस्थेची व्याप्ती वाढविणे. 

आता क्रेडिट कार्ड देखील यू पी आय प्लॅटफॉर्मशी जोडले जाऊ शकेल, याची सुरुवात रूपे कार्ड पासून होईल. यामुळे वापरकर्त्यांना अधिक सुलभता मिळेल आणि डिजिटल व्यवहारांची व्याप्ती वाढेल. भारतात यू पी आय हे पेमेंट करण्याचे सर्वसमावेशक माध्यम बनले आहे. सध्या 26 कोटी पेक्षा जास्त वापरकर्ते आणि 5 कोटीपेक्षा जास्त व्यापारी यू पी आय प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत.

गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यासह पतधोरण आढावा समितीत डॉ शशांक भिडे, डॉ अशीमा गोयल, प्राध्यापक जयंत आर वर्मा, डॉ राजीव रंजन आणि डॉ मायकेल देबब्रत पात्रा यांचा समावेश होता.
पतधोरण आढावा समितीची पुढील बैठक 2-4, 2022ऑगस्ट दरम्यान होणार आहे.