Home Blog Page 193

शनी शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांची आत्महत्या

शनी शिंगणापूर आणि परिसरात अनेक तर्क-वितर्क

शनी शिंगणापूर-शनी शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी त्यांच्या निवासस्थानी शनी शिंगणापूर परिसरात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागिल काही दिवसांपासून शनी शिंगणापूर संस्थान विविध मुद्यांमुळे चर्चेत आहेत. महिनाभरापूर्वी 114 मुस्लिम कर्मचारी घेतल्यामुळे संस्थानच्या विश्वस्त मंडळावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना काढण्यात आले होते. त्यानंतर देवस्थानचे बनावट ॲप्स तयार करून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप देखील झाला होता. या प्रकरणात सध्या चौकशी सुरु होती.

वास्तविक नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली? या बाबत अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र, विश्वस्त मंडळाने केलेल्या अनियमिततेबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच शेटे यांनी आत्महत्या केल्याने या अपहाराशी याचा संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नितीन शेटे हे आमदार शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. ते संस्थानमध्ये उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. मात्र, अनियमितता समोर आल्यानंतर हे विश्वस्त मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर आता शेटे त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही तरी देखील यासंदर्भात शनी शिंगणापूर आणि परिसरात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. सध्या पोलिसांच्या वतीने शेटे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून यामध्ये काय निष्पन्न होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पोलिसांनी अद्याप या घटनेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे चौकशीत काय समोर येणार? हे पहावे लागेल.

पुण्यात भर रस्त्यात धावत्या दुचाकीवर जोडप्याचे चाळे:सोशल मीडियावर VIDEO व्हायरल


पुणे-पुण्यात एका जोडप्याचे चक्क सार्वजनिक रस्त्यावर प्रेम प्रदर्शन करत वाहतूक नियमांना आणि सामाजिक संकेतांना धाब्यावर बसवले. या तरुण-तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खेड शिवापूरजवळील शिंदेवाडी परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकी चालवत आहे आणि त्याच्या पेट्रोल टँकवर एक तरुणी उलटी बसलेली दिसते. विशेष म्हणजे, ती तरुणी धावत्या दुचाकीवर तरुणाला मिठी मारताना, जवळीक साधताना स्पष्टपणे दिसते. या धक्कादायक प्रकाराकडे आसपासचे अनेकजण आश्चर्याने पाहत होते, तर काहींनी आपापल्या मोबाईलमध्ये या दृश्याचे चित्रीकरणही केले. पण या प्रेमीयुगलाला ना इतरांची पर्वा होती, ना वाहतुकीच्या नियमांची फिकीर.

तरुणीने स्कार्फने चेहरा झाकलेला असला तरी तिचे आणि दुचाकीस्वाराचे वर्तन अत्यंत बिनधास्त होते. रस्त्यावर वाहनांचा वेग असतानाही त्यांनी अशा पद्धतीने प्रेमाचे प्रदर्शन केल्याने ना फक्त अपघाताचा धोका वाढतो, तर इतर वाहनचालकांची एकाग्रताही भंग होते.या व्हिडिओमुळे समाज माध्यमांवर चांगलीच खळबळ उडाली आहे.अशा धोकादायक आणि बेजबाबदार वर्तनामुळे रस्त्यावरील इतर वाहनधारकांचे प्राणही संकटात येऊ शकतात, हे विसरून चालणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

जुन्नरच्या आमदार शरद सोनवणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्याने! पारधी-रामोशी समाजात संतापाची लाट,अट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी –

पुणे – जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद भिमाजी सोनवणे यांनी पारधी आणि रामोशी समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह आणि जातीयवादी वक्तव्यामुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याचा तीव्र निषेध करत नगरसेविका राजश्रीताई काळे यांनी अट्रॉसिटी कायद्यांतर्गत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात आमदार शरद सोनवणे यांनी पारधी आणि रामोशी समाजाला उद्देशून खालच्या पातळीचे वक्तव्य केले, ज्यामध्ये त्यांनी या समाजांना थेट चोरीसारख्या गुन्ह्यांशी जोडले. हे वक्तव्य केवळ सामाजिक सलोख्याला बाधा आणणारे नाही, तर वंचित समाजाच्या सन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारे आहे. या वक्तव्यमुळे शिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रगतीसाठी झटणाऱ्या या समाजांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.नगरसेविका राजश्रीताई काळे यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “आमदार शरद सोनवणे यांचे वक्तव्य निंदनीय आणि लोकशाहीच्या मूल्यांविरुद्ध आहे. संपूर्ण समाजाला गुन्हेगार ठरवणे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होत आहे.

आम्ही सरकार ला मागणी करतो की, त्यांच्यावर अट्रॉसिटी कायद्यांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी.”त्यांनी पुढे सांगितले, “पारधी आणि रामोशी समाज हा आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आम्ही या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढा देऊ.”या वक्तव्यमुळे पारधी आणि रामोशी समाजासह अनेक आदिवासी पारधी विकास परिषद, आदी समाजातील विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते यांनी एकजुटीने कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी सोनवणे यांच्या वक्तव्याविरुद्ध आंदोलने आणि निषेध मोर्चांचे आयोजन करण्याची तयारी दर्शवली आहे.या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ (अट्रॉसिटी कायदा) हा सामाजिक भेदभाव आणि अत्याचार रोखण्यासाठी लागू आहे. याअंतर्गत कोणत्याही समाजाला अपमानित करणारी वक्तव्ये किंवा कृती गंभीर गुन्हा मानली जातात. दोषी आढळल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कायद्यांतर्गत कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.नगरसेविका राजश्रीताई काळे यांनी प्रशासनाला निवेदन सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक सामाजिक संघटनांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.नगरसेविका राजश्रीताई काळे यांनी सर्व समाजाला एकजुटीने या अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले आहे. “आमदारांनी जबाबदारीने बोलावे आणि समाजात सलोखा राखावा. आम्ही कोणत्याही समाजाविरुद्ध भेदभाव सहन करणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसारखे काम करावे – अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांचे आवाहन

  • श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा वासा पूजन सोहळा संपन्न

पुणे : – संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात लाखो भाविक येत असतात मात्र पोलिसांची संख्या ही तुलनेत कमी असते. त्यामुळे गणेश मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पोलिसांसारखे काम करावे, असे आवाहन पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी केले.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चा वासा पूजन कार्यक्रम बनसोडे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाचे सुनिल रासने, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, छत्रपती राजाराम मंडळाचे अरुण गवळे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे, पोलिस निरीक्षक प्रशांत भुरुमे, संतोष पांढरे, अरुण घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बनसोडे म्हणाले, ‘‘हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणेश मंडळाच्या वासा पूजनाचा मान दिल्याबद्दल मी ट्रस्टचा आभारी आहे. गणेशोत्सवाची आता सुरवात होत आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा होईल, त्यासाठी रंगारी ट्रस्टसह सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची आम्हाला मदत होईल, असा विश्वास आहे.वासा पूजन सोहळ्यापुर्वी रंगारी भवनात बाप्पाची आरती झाली. यावेळी शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने केलेल्या वादनाने उपस्थित गणेश भक्तांची मने जिंकली.

‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वासा पूजन सोहळ्याने गणेशोत्सवाची सुरवात झाली आहे. यावर्षी आम्ही रत्नमहल हा देखावा साकारणार आहोत. भारतील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि मोती यांचा मिलाप या रत्नमहलमध्ये असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रथाला बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तो यावर्षीही कायम राहणार आहे.’’

पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा वासा पूजन सोहळा संपन्न

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसारखे काम करावे – अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांचे आवाहन

पुणे : – संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात लाखो भाविक येत असतात मात्र पोलिसांची संख्या ही तुलनेत कमी असते. त्यामुळे गणेश मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पोलिसांसारखे काम करावे, असे आवाहन पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी केले.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चा वासा पूजन कार्यक्रम बनसोडे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाचे सुनिल रासने, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, छत्रपती राजाराम मंडळाचे अरुण गवळे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे, पोलिस निरीक्षक प्रशांत भुरुमे, संतोष पांढरे, अरुण घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बनसोडे म्हणाले, ‘‘हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणेश मंडळाच्या वासा पूजनाचा मान दिल्याबद्दल मी ट्रस्टचा आभारी आहे. गणेशोत्सवाची आता सुरवात होत आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा होईल, त्यासाठी रंगारी ट्रस्टसह सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची आम्हाला मदत होईल, असा विश्वास आहे.’’

वासा पूजन सोहळ्यापुर्वी रंगारी भवनात बाप्पाची आरती झाली. यावेळी शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने केलेल्या वादनाने उपस्थित गणेश भक्तांची मने जिंकली.
*‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वासा पूजन सोहळ्याने गणेशोत्सवाची सुरवात झाली आहे. यावर्षी आम्ही रत्नमहल हा देखावा साकारणार आहोत. भारतील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि मोती यांचा मिलाप या रत्नमहलमध्ये असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रथाला बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तो यावर्षीही कायम राहणार आहे.’’ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा वासा पूजन सोहळा संपन्न

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसारखे काम करावे – अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांचे आवाहन

पुणे : प्रतिनिधी – संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात लाखो भाविक येत असतात मात्र पोलिसांची संख्या ही तुलनेत कमी असते. त्यामुळे गणेश मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पोलिसांसारखे काम करावे, असे आवाहन पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी केले.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चा वासा पूजन कार्यक्रम बनसोडे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाचे सुनिल रासने, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, छत्रपती राजाराम मंडळाचे अरुण गवळे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे, पोलिस निरीक्षक प्रशांत भुरुमे, संतोष पांढरे, अरुण घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बनसोडे म्हणाले, ‘‘हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणेश मंडळाच्या वासा पूजनाचा मान दिल्याबद्दल मी ट्रस्टचा आभारी आहे. गणेशोत्सवाची आता सुरवात होत आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा होईल, त्यासाठी रंगारी ट्रस्टसह सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची आम्हाला मदत होईल, असा विश्वास आहे.’’

वासा पूजन सोहळ्यापुर्वी रंगारी भवनात बाप्पाची आरती झाली. यावेळी शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने केलेल्या वादनाने उपस्थित गणेश भक्तांची मने जिंकली.

कोट
*‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वासा पूजन सोहळ्याने गणेशोत्सवाची सुरवात झाली आहे. यावर्षी आम्ही रत्नमहल हा देखावा साकारणार आहोत. भारतील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि मोती यांचा मिलाप या रत्नमहलमध्ये असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रथाला बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तो यावर्षीही कायम राहणार आहे.’’

पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त.

दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्काराने गाथा जाधव-आयगोळे यांचा गौरव

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे स्व. दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्काराने आज (दि. २७) गझलकारा गाथा जाधव-आयगोळे (कल्याण) यांचा गौरव करण्यात आला.
पत्रकार भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन मंचावर होते.
सातत्य आणि यश हातात घालून चालत असतात. त्यामुळे कार्यक्रमातील सातत्य आम्ही कायम ठेवत आलो आहोत. रंगत-संगत प्रतिष्ठानला ३३ वर्षे झाली. दीड हजाराच्यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. दीपक करंदीकर यांच्यासारखे गझलप्रेमी कायम स्मृतीत राहावेत यासाठी गझलकारास पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार युवा पिढीच्या साहित्यक्षेत्रातील कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ते करत असलेल्या कार्यासाठी कौतुकाची थाप म्हणून देण्यात येतो, असे प्रमोद आडकर यांनी या प्रसंगी सांगीतले.
सत्काराला उत्तर देताना गाथा जाधव-आयगोळे म्हणाल्या, लिहिण्याचा वारसा वडिलांकडून मिळाला. शाळेत असताना पहिल्यांदा लिहायला घेतले. जेव्हा जसे सुचले तसे लिहित गेले आणि लिहीत राहिले. लग्नाआधी वडिलांनी आणि नंतर पतीने माझ्यासोबत माझ्या लिखाणालाही पाठिंबा दिला. घरातूनच आधार मिळाला की स्त्री काहीही करू शकते. त्यामुळे अशी साथ प्रत्येक स्त्रीला मिळायला हवी. गझल लिखाणासोबतच सध्या गझलांवर सुरू असलेल्या संशोधनाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करत आहे. प्रज्ञा महाजन यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि स्वरचित गझल सादर केली.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त निमंत्रितांचे गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात प्राजक्ता पटवर्धन, प्रभा सोनवणे, अजय जोशी, स्वाती यादव, चैतन्य कुलकर्णी शउर, रेखा कुलकर्णी, शीला टाकळकर, कविता क्षीरसागर, चंचल काळे, अमिता पैठणकर, डॉ. मृदुला कुलकर्णी खैरनार या निमंत्रितांनी गझल सादर केली.
वासंती वैद्य, ऋचा कर्वे, प्राजक्ता वेदपाठक उपस्थित होते. शिल्पा देशपांडे आणि वैजयंती आपटे यांनी सूत्रसंचालन केले.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा ‘बिझनेस टायटन्स’ पुरस्काराने सन्मान

मुंबई, दि. २७ जुलै २०२५: घरगुती वीजग्राहकांना सुमारे २५ वर्ष मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा ‘रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स अवॉर्ड’ने शनिवारी (दि. २६) फुकेत (थायलंड) येथे गौरव करण्यात आला. या सन्मानाबद्दल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

‘विकसित भारत’चे उद्दिष्ट व भविष्यातील भक्कम अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या सुमारे १५० खासगी कंपन्या व सार्वजनिक उपक्रमाच्या कंपन्यांचे संचालक व प्रतिनिधींसाठी फुकेत येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ज्येष्ठ अभिनेते श्री. बोमन इराणी यांच्याहस्ते महावितरणला पुरस्कार प्रदान करण्यात आला. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार व विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट यांनी हा पुरस्कार स्विकारला.

देशातील १ कोटी घरगुती ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी भारताचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर केली आहे. सुमारे ७५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून स्वतःची वीज निर्मिती करण्यासाठी निवासी कुटुंबांना सक्षम करण्यात येत आहे. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनात तसेच अपर मुख्य सचिव सौ. आभा शुक्ला व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रात २ लाख ४२ हजार ७१४ घरगुती ग्राहकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून त्याची क्षमता ९१९ मेगावॅट आहे. तर या योजनेत सहभागी ग्राहकांना आतापर्यंत तब्बल १६८५ कोटी ४२ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या या उल्लेखनीय राष्ट्रीय कामगिरीची दखल घेत महावितरणचा गौरव करण्यात आला.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत घरगुती ग्राहकांना छतावरील १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी आहे. एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

कोकेन,गांजा,दारू व बियरच्या बॉटल, हुक्का प्लेवर…गाजणाऱ्या रेव्ह पार्टीत ५ पुरुष अन २ महिला, ४१ लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे- बहुधा रेव्ह पार्टी म्हटले कि अनेकांच्या डोळ्यापुढे तरुणाईची गर्दी अंमली पदार्थांचा सुळसुळाट, दारूच्या विदेशी बाटल्यांचा खणखणाट, अन DJ चा हैदोस असे काहीसे चित्र येते पण खराडीतील staybird azure suite hotel kharadi pune येथील रूम नंबर १०२ मध्ये झालेली रेव्ह पार्टी जी गाजते आहे. त्या पार्टीत अवघे ७ जण होते , त्यात अवघ्या २ महिला … अर्थात पार्टीच रूम मध्ये होती ना… हॉटेलच्या एका रूम मध्ये .. पण हि पार्टी गाजते आहे ती माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई या पार्टीत पकडले गेल्यामुळे… जे महिला नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत .आणि त्यांनी सरकारवर गेली काही महिने टीकेची झोड उठविली आहे . यामुळे या पार्टीला रंगारंग महत्व आले आहे. या पार्टीत कोकेन,गांजा,दारू व बियरच्या बॉटल, हुक्का प्लेवर असे सारे काही होते …गाजणाऱ्या या रेव्ह पार्टीत पोलिसांनी तब्बल ४१ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आणि १) प्रांजल मनिष खेवलकर, वय ४१ वर्षे, रा. प्लॉट नं. ५७,५८ इंद्रप्रस्त सोसायटी, हडपसर पुणे, २) निखिल जेठानंद पोपटाणी, वय ३५ वर्षे, रा. सी १०५, डीएसके सुंदरबन, अॅमनोरा पार्क टाउनचे मागे, माळवाडी रोड, पुणे, ३) समीर फकीर महमंद सय्यद, वय-४१ वर्षे, रा. २०५, हेरीटेज, पॅलेस ओरचड सोसायटी, एनआयबीएम रोड, पुणे. ४) सचिन सोनाजी भोंबे, वय- ४२ वर्षे, रा. प्लॉट नं. ५१, द्वारका नगर, डायमंड वॉटर पार्क रोड, वाघोली पुणे. ५) श्रीपाद मोहन यादव, वय २७ वर्षे, रा. आनंदी सुंदर निवास बंगला, साई होमसच्या पाठिमागे, पंचतारा नगर, पांडरकर वरती, आकुर्डी, पुणे तसेच महिला नामे १) ईशा देवज्योत सिंग, वय २२ वर्षे, रा. ए ६, २०३ कुमार बिर्ला सोसायटी वॉर्ड नंबर ८, नागरस रोड, औध पुणे २) प्राची गोपाल शर्मा वय २३ रा. गोदरेज ग्रिन को. म्हाळुंगे पुणे यांना अटक केली.

पोलिसांनी सविस्तर सांगितलेली हकीकत अशी ,….२७/०७/२०२५ रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवित असताना पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा राजेन्द्र मुळीक, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस निरीक्षक संखे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक वासनिक, महिला पोलीस उपनिरीक्षक लाड गुन्हे शाखा पुणे शहर असे खराडी पोलीस स्टेशन हद्दीत मिळालेल्या गोपनिय माहितीच्या अनुषंगाने दि.२७/०७/२०२५ रोजी पहाटे ०३/२० वा चे सुमा. रूम नंबर १०२, स्टेबर्ड अझुर सुट, हॉटेल, खराडी staybird azure suite hotel kharadi pune पुणे याठिकाणी छापा कारवाई केली असता काही इसम हे हुक्का आणि ड्रग्स पार्टी करत असताना मिळुन आले. सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी आपली नावे १) प्रांजल मनिष खेवलकर, वय ४१ वर्षे, रा. प्लॉट नं. ५७,५८ इंद्रप्रस्त सोसायटी, हडपसर पुणे, २) निखिल जेठानंद पोपटाणी, वय ३५ वर्षे, रा. सी १०५, डीएसके सुंदरबन, अॅमनोरा पार्क टाउनचे मागे, माळवाडी रोड, पुणे, ३) समीर फकीर महमंद सय्यद, वय-४१ वर्षे, रा. २०५, हेरीटेज, पॅलेस ओरचड सोसायटी, एनआयबीएम रोड, पुणे. ४) सचिन सोनाजी भोंबे, वय- ४२ वर्षे, रा. प्लॉट नं. ५१, द्वारका नगर, डायमंड वॉटर पार्क रोड, वाघोली पुणे. ५) श्रीपाद मोहन यादव, वय २७ वर्षे, रा. आनंदी सुंदर निवास बंगला, साई होमसच्या पाठिमागे, पंचतारा नगर, पांडरकर वरती, आकुर्डी, पुणे तसेच महिला नामे १) ईशा देवज्योत सिंग, वय २२ वर्षे, रा. ए ६, २०३ कुमार बिर्ला सोसायटी वॉर्ड नंबर ८, नागरस रोड, औध पुणे २) प्राची गोपाल शर्मा वय २३ रा. गोदरेज ग्रिन को. म्हाळुंगे पुणे असे सांगितले. त्यांचे ताब्यात २.७० ग्रॅम कोकेन सदृश अमली पदार्थ, ७० ग्रॅम गांजा सदृश अमली पदार्थ, एकुण १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट, दारू व बियरच्या बॉटल, हुक्का प्लेवर असा असा एकुण ४१,३५,४००/- रू.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत खराडी पोलीस स्टेशन गु.र.नं.१५४/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) (।।) अ, २१ (ब), २७कोटपा ७ (२),२० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस निरीक्षक संखे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक वासनिक, सहा. पो. निरी. राजेश माळेगावे, सहा.पो.निरी. नितिनकुमार नाईक, महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व पोलीस अंमलदार गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे.

रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?
जर आपण रेव्हचा अर्थ पाहिला तर केंब्रिज विद्यापीठाच्या वेबसाइटनुसार, जेव्हा कोणी कोणत्याही नियंत्रणाशिवाय बोलतो तेव्हा त्याला रेव्ह म्हणतात. अशा परिस्थितीत, बरेच लोक त्याचा संबंध अनियंत्रिततेशी जोडतात. त्याच वेळी, पार्टी म्हणजे एक सामाजिक कार्यक्रम ज्यामध्ये काही लोक एकाच ठिकाणी भेटतात आणि खातात, पितात, नाचतात आणि आनंद घेतात. अशा परिस्थितीत, ज्या पार्ट्यांमध्ये लोक कोणत्याही निर्बंधाशिवाय मजा करतात त्यांना रेव्ह पार्ट्या म्हणता येईल. तसेच यात मोठ्या प्रमाणात संगीत वाजवले जाते.

सिक्रेट पार्टी म्हणजे काय? सिक्रेट पार्टी म्हणजे अशी पार्टी ज्याचे तपशील, विशेषतः स्थान, सार्वजनिकरित्या जाहीर केले जात नाही किंवा व्यापकपणे ज्ञात नाही. हे कार्यक्रम बहुतेकदा तोंडी किंवा आमंत्रण पद्धतींवर अवलंबून असतात. जेणेकरून उपस्थिती विशिष्ट लोकांच्या गटापुरती मर्यादित राहते. गुप्त पार्टी घनिष्ठ मेळाव्यांपासून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांपर्यंत असू शकतात. या अतिशय गुप्त पद्धतीने साजऱ्या करण्यात येतात. यामुळे खराडी येथील छाप्याला रेव्ह पार्टी म्हणायचे की सिक्रेट पार्टी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भरपावसात दीड किलोमीटर विजेचा खांब वाहून नेत सुरळीत केला वीजपुरवठा

पुणे, दि. २७ जुलै २०२५:- पिकांचे नुकसान टाळत भरपावसामध्ये दीड किलोमीटर अंतरावर विजेचा लोखंडी खांब कामगारांनी वाहून नेत पाच दिवसांपासून खंडित असलेला वीजपुरवठा रविवारी दुपारी सुरळीत केला आहे. 

राजगड (वेल्हे) तालुक्यातील वेल्हा बुद्रुक या गावातील ५५ ग्राहकांचा वीजपुरवठा खांब तुटल्यामुळे खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्थानिक ग्राहकांसह नेतेमंडळीचा पाठपुरावा सातत्याने सुरू होता. परंतु काम अवघड होते. त्यामुळे मे. अग्रवाल या ठेकेदार एजन्सीची मदत घेण्यात आली. संततधार पाऊस व जोराच्या वाऱ्यामुळे काम करणे अवघड जात होते. मात्र कामगारांनी लोखंडी खांब अंगाखांद्यावर वाहून नेला. तसेच तो उभा करताना भात पिकांचे नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली. खांब उभा करून तारा ओढून घेतल्यावर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी महावितरण व ठेकेदार कामगारांचे कौतुक केले.

तसेच महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता युवराज जरग, मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता देविदास बैकर, नसरापूरचे उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनसळे यांनीही वेल्हा शाखा अभियंता सचिन कुलकर्णी, वीज कर्मचारी व ठेकेदार मे. अग्रवाल इलेक्ट्रिकल्स यांचे कौतुक केले आहे.

केवळ मुस्लीम म्हणून हिंदुत्ववाद्यांकडून भारतीय सैन्य दलात माजी सैनिक असणाऱ्या मुस्लिम कुटुंबीयांवर दहशत माजवण्याचा प्रयत्न

पुणे : चंदननगर येथील भारतीय सैन्य दलात माजी सैनिक असणाऱ्या मुस्लिम कुटुंबीयांवर स्वतःला हिंदुत्ववादी बनवणाऱ्या 70 ते 80 समाजकंटकांनी रात्री बारा वाजता घरात घुसून महिला व लहान मुलांवर दहशत पसरवण्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे. यासंदर्भामध्ये पोलीस स्टेशनला माहिती देवुन सुद्धा त्यांनी गुन्हा दाखल न करता समाजकंटकांच्या दबावाखाली कोणतीच कारवाई केली नसल्याचा प्रकार अत्यंत निंदव्य जनक असल्याने याप्रकरणी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा अशी मागणी परिमंडल क्रमांक चार चे पोलीस उपयुक्त सोमय्या मुंडे यांच्याकडे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे. अशी माहिती येथे राहुल डंबाळे यांनी दिली .

ते म्हणाले,’चंदननगर येथील शमशाद अली शेख कुटुंबीयांचे आजोबा व चुलते भारतीय सैन्य दलामध्ये आपली सेवा बजावत निवृत्त झालेले आहेत. त्यांना भारतीय सैन्यामध्ये चांगली सेवा केल्याबद्दल अनेक पदके देखील मिळालेले आहेत. हे कुटुंबीय सुमारे 55 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून चंदननगर भागामध्ये राहत असून त्यांच्याच कुटुंबीयांना हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या समाजकंटकांच्या टोळक्याने दिनांक 26 जुलै रोजी रात्री बारा वाजता घरात घुसून गोंधळ घालून रोहिंग्या , लांडे इत्यादी आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून तुम्ही इथून निघून जा अशा प्रकारचा दबाव निर्माण केला होता.या संपुर्ण घटनेवेळी त्यांच्या समवेत पोलीस देखील उपस्थित होते व ते हा संपूर्ण प्रकार केवळ मूकपणे पाहत होते ही गंभीर बाब समोर आलेली आहे. रात्री साडेतीन वाजेपर्यंत समाजकंटकांच्या दबावामुळे सैन्य दलातील कुटुंबीयांना पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आले होते. यामध्ये वयोवृद्ध महिला , जेष्ठ नागरिक यांच्यासह तेरा व बारा वर्षाच्या लहान मुलांचा देखील समावेश आहे.

“ अलीकडच्या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या घटना शहरांमध्ये वाढत असल्याने या घटनांना वेळीच आवर घालावा अशी विनंती मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात येणार असून आजच पोलीस उपायुक्त सोमय्या मुंडे यांच्याशी फोन द्वारे चर्चा झाली असून त्यांना लेखी निवेदनाद्वारे पत्र देखील पाठवण्यात आले “ असल्याचे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी यावेळी कळविले आहे.

दरम्यान सदर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी गुरुवार दिनांक ३१ जुलै रोजी येरवडा येथिल पोलिस उपायुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.असेही राहुल डंबाळे यांनी सांगितले .

जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर ‘नाफा जीवन गौरव – २०२५ पुरस्कारने सन्मानित!

“भविष्यात ‘नाफा’च्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्नं पूर्ण होतील”-जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर
मधुर भांडारकर यांच्यासह डॉ. मोहन आगाशे, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी यांचाही ‘नाफा फिल्म अवार्ड नाईट’मध्ये विशेष गौरव!

सॅन होजे : ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशन’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘नाफा जीवन गौरव पुरस्काराने’ यंदा जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांना गौरवण्यात आले. हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, मल्याळम भाषांतील चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार आणि परिपक्व अभिनयाने रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अमोल पालकरांच्या कार्याचा सन्मान अमेरिकेतील तमाम मराठी प्रेक्षकांच्या उपस्थिती सॅन होजेतील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये २५ जुलै रोजी संपन्न झालेल्या ‘नाफा ग्लॅमरस फिल्म अवार्ड नाईट’ या भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार आणि नाफाचे संस्थापक अभिजीत घोलप यांसह मराठी चित्रपटक्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंत, प्रेक्षक उपस्थित होते. “भविष्यात ‘नाफा’च्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्नं पूर्ण होतील” असे गौरवोद्गार अभिनेते अमोल पालेकरांनी हा पुरस्कार स्वीकारताना काढले.

या सोहळ्यात पुढे बोलताना सन्मानीय अमोल पालेकर म्हणाले, “माझा हा सन्मान केलात, गौरव केला याबद्दल नाफाचे, अभिजीत घोलप आणि तुम्हा सर्व रसिकप्रेक्षकांचे मनापासून आभार. काही वर्षांपूर्वी गौरी देशपांडेंच्या कथेवर बेतलेला सिनेमा करण्याची तयारी मी सुरु केली होती. त्या सिनेमामध्ये निकोल किडमन आणि अमिताभ बच्चन या दोघांना घेऊन मराठी सिनेमा बनविण्याचे माझे स्वप्न होते. आम्ही निकोल पर्यंत पोहचलो, त्याला ती पटकथा आवडली आणि त्याने तात्काळ होकारही दिला. मात्र हॉलिवूड मधील कोणत्याही एका स्टुडिओला सोबत घेण्याची अट घातली. या किचकट गोष्टीची कल्पना असल्याने तो विचार मी सोडून दिला. पण त्यावेळेला जर NAFA सारखी संस्था, असे कार्यकर्ते आणि अभिजित सारखी व्यक्ती असती तर तो प्रकल्प पुढे नेता आला असता. पण आता, NAFAच्या माध्यमातून अशी स्वप्नं पूर्ण होतील, अशी मला आशा आहे.”

जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांना हा पुरस्कार प्रदान करतेवेळी नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले, “यंदाचा नाफा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत आहे. पालेकरांच्या हळुवार, खुसखुशीत रोमँटिक भूमिकांनी आणि त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने तमाम भारतीय प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान आहे. जुबिलीस्टार अशीही त्यांची ओळख भारतीय चित्रपटसृष्टीत आहे, अश्या महान कलावंताचा हा सन्मान अमेरिकेतील तमाम मराठी रसिकांच्या हृदयातून, आपलेपणाने केला जात आहे. पालेकरांनी हा सन्मान स्वीकारून ‘नाफा’चाच सन्मान वाढविला आहे.

अमोल पालेकर हे प्रसिद्ध भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मोलाची भर घातली आहे. ते एक उत्कृष्ट अभिनेते म्हणून ओळखले जातात, तसेच त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी ललित कलांमध्ये शिक्षण घेतले आणि ‘सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’ मधून पदवी मिळवली. त्यांनी सुरुवातीला चित्रकार म्हणून काम केले, पण नंतर अभिनयात पदार्पण केले. पालेकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘शांतता! कोर्ट चालू आहे!’, ‘गोलमाल’, ‘बातों बातों में’, ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘चित्तचोर’, ‘घरौंदा’, ‘मेरी बीवीकी शादी’, ‘नरम-गरम’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘आक्रीत’, ‘बनगरवाडी’, ‘ध्यासपर्व’, ‘कैरी’, ‘अनाहत’, ‘धूसर’, ‘थोडासा रूमानी हो जाय’, ‘पहेली’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी अभिनय केलेल्या सर्वच चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या आहेत.

नाफाच्या फिल्म अवार्ड नाईटची सुरुवात झाली ती ‘रेड कार्पेटवरील एन्ट्रीने. सर्वप्रथम स्वप्नील जोशी एका नव्या लूकमध्ये रेड कार्पेटवर अवतरला. त्याला पाहून प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवून त्याचे स्वागत केले. त्यानंतर वैदेही परशुरामी, आदिनाथ कोठारे, अमोल पालेकर आणि संध्या गोखले, सोनाली कुलकर्णी तिच्या मुलीसह, अश्विनी भावे, सचिन खेडेकर, गजेंद्र अहिरे, महेश कोठारे, डॉ. मोहन आगाशे आणि मधुर भांडारकर यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची एंट्री झाली. या सोहळ्यातील मनोरंजनपर कार्यक्रमात मराठी लोकनृत्याचे सादरीकरण पाहायला मिळाले आणि त्यानंतर कलाकारांना सन्मानचिन्हं देण्यात आली. अवधूत गुप्ते यांना प्रेक्षकांनी ‘बाई बाई मनमोराचा’ आणि ‘आयुष्य हे’ या गाण्यांची फर्माइश केली.

“देवेंद्र फडणवीस हे चारित्र्यसंपन्न, नम्र आणि दूरदृष्टीचे लोकनेते” – मंत्री चंद्रकांतदादा पाटील.

देवेंद्र फडणविसांच्या वाढदिवसानिमित्त मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे आरोग्य किट व इतर वस्तू वाटप – संदीप खर्डेकर.

पुणे- देवेंद्र फडणवीस हे चारित्र्यसंपन्न,नम्र आणि दूरदृष्टी असलेले लोकनेते आहेत असे गौरवोदगार उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. त्यांचे कार्य हे लोकाभिमुख आहे म्हणूनच त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फ्लेक्सबाजी न करता रक्तदान किंवा अन्य सेवाकार्य करण्याचे आवाहन केले आणि त्याचे कार्यकर्त्यांनी तंतोतंत पालन केल्यामुळे विक्रमी रक्त संकलन पार पडले असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.त्यालाच अनुसरून क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन तर्फे 50 संस्थांना आरोग्य किट व इतर उपयुक्त वस्तू भेट देण्यात येत आहे हे कौतुकास्पद असल्याचेही चंद्रकांतदादा म्हणाले. सर्वांनी आपले वाढदिवस अश्या उपक्रमांनी साजरे केले तर त्याचा समाजातील गरजुंना लाभ होईल व त्यांना अधिक सेवाकार्य करता येईल असेही ते म्हणाले.
मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने CM देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा सप्ताहांतर्गत विविध संस्थांना आरोग्य किट, स्वामी आंगण वृद्धाश्रमास टी व्ही, वामन निवास ज्येष्ठ नागरिक संघास कपाट,तर बाल नवयुग मित्र मंडळ मॉडर्न कॉलोनी,आझाद मित्र मंडळ प्रभात रस्ता,ह्या मंडळाना स्पीकर सेट भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, प्रदीप चांदेरे,माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या सौ.कल्याणी खर्डेकर, स्वामी आंगण वृद्धाश्रम च्या संचालिका आनंदी जोशी, वामननिवास ज्येष्ठ नागरिक संघाचे सुरेश थिटे, तसेच सनी लांडे, आशिष मोहळ ,सागर थरकुडे ,अजिंक्य बोत्रे,प्रथमेश वरघडे,कुणाल जोगवडे,सचिन पवार,निखिल शिंदे,विशाल गायकवाड
व इतर मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन ने लोकोपोयोगी साहित्य वाटप करण्याचे ठरविले असे संदीप खर्डेकर म्हणाले.सध्या आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यात ही बीपी व डायबेटीस चे प्रमाण वाढत आहे त्यामुळे 50 संस्थांना आरोग्य किट भेट देण्याचे ठरविले व त्यानुसार ब्लडप्रेशर तपासणी यंत्र, रक्तशर्करा तपासणी यंत्र आणि प्रथमोपचार पेटी भेट देण्यात येत आहे असेही संदीप खर्डेकर म्हणाले.आमच्याकडे विविध कारणांसाठी मदत मागणारे येतात, विविध सण, उत्सव येवढेच नव्हे तर अगदी “आखाड” करायचाय म्हणून आर्थिक मदत मागणारेही येतात, मात्र यापुढे आर्थिक मदत न करता मंडळाच्या परिसरातील नागरिकांना गरजेची असणारी “वस्तुरूपी” मदत करण्याचे आम्ही ठरविले असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.
ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः वृद्धाश्रमातील नागरिकांना टीव्ही आणि उपयुक्त असे कपाट भेट देताना आनंद होतं असल्याचे मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी म्हणाले, तसेच येणाऱ्या काळात ही अश्याच पद्धतीने गरजुंना वस्तुरूपी मदत करण्यात येणार असल्याचेही श्री. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे संयोजन सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी केले.

बाणेर बालेवाडी मिसिंग लिंक आणि वाहतूक कोंडी प्रश्न:जमीन अधिग्रहणाच्या समस्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार

ना. चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

पुणे-कोथरुड मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी-पाषाण- सोमेश्वरवाडी- सुतारवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मिसिंग लिंक पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, यातील अनेक विषय जमीन अधिग्रहणाअभावी प्रलंबित पडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे, ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यास महापालिकेला अपयश येत असल्याबद्दल तीव्र नाराजी ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बाणेर-बालेवाडी-पाषाण- सोमेश्वरवाडी- सुतारवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी आढावा बैठक झाली. या बैठकीला वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, महापालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, उपअभियंता दिलीप काळे, कनिष्ठ अभियंता शिवानंद पाटील, भाजपा सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, भाजप नेते प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, सचिन पाषाणकर, उमाताई गाडगीळ, उत्तर मंडल सरचिटणीस अस्मिता करंदीकर, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर आदी उपस्थित होते.

सुरुवातीला मागील बैठकीतील इतिवृत्तानुसार काय कार्यवाही झाली याची माहिती ना. पाटील यांनी घेतली. यात प्रामुख्याने बाणेर-पाषाण लिंक रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे दोन महिन्यांत संपादन करून जमीन ताब्यात आल्यानंतर चार महिन्यांच्या कालावधीत हा रस्ता पूर्ण करावा,’ असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला दिले असतानाही अद्याप सदर विषयावर कार्यवाही झाली नाही, त्यावर ना. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर मधील लक्ष्मीमाता मंदिर येथील रस्ता रुंदीतरण यांसह वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे, खड्डेमय रस्ते, नादुरुस्त पदपथ आदींवर चर्चा झाली. त्यासोबतच मिसिंग लिंकची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण होत नसल्याने त्यावर ही नापसंती व्यक्त केली.

त्यामुळे सदर प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, वाहतूककोंडीस कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

माझ्या जावयाला रेव्ह पार्टीत अडकवले हा कटाचा भाग, कधी तरी कट होणार हे ठाऊक होतेच – एकनाथ खडसे

जळगाव – खराडी परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर रंगेहाथ पकडले गेले . गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खडसे यांच्या जावयाची अटक झाल्याने चर्चेला आणखी उधाण आले आहे. हे होणारच होते, मला आधीच माहीत होते. अनेक दिवसांपासून विरोधात बोलणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हा देखील त्याचाच एक भाग असू शकतो, असा संशय एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

खराडीमधील उच्चभ्रू वसाहतीतील एका महागड्या फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. ऑनलाईन बुकिंगद्वारे घेण्यात आलेल्या या ठिकाणी दारू, हुक्का आणि अमली पदार्थ आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या पार्टीत सहभागी असलेल्या पाच जणांना अटक केली असून, त्यात तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यात प्रांजल खेवलकर यांचे नाव असल्याने प्रकरण अधिक गाजू लागले आहे.

या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आपल्या पहिल्या प्रतिक्रिया दिल्या. “यासंदर्भातील माहिती मला तुमच्याकडूनच मिळते आहे आणि हे होणारच होते, हे मला आधीच माहीत होते,” असे सांगत खडसे यांनी या कारवाईमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “अनेक दिवसांपासून विरोधात बोलणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हा देखील त्याचाच एक भाग असू शकतो.”

एकनाथ खडसे यांनी याप्रकरणात स्थानिक पोलिस तपास करणार नसल्याचा संशयही व्यक्त केला. “स्थानिक पोलिस दबावाखाली असू शकतात. दोषी असेल तर शिक्षा झालीच पाहिजे, पण मला संपूर्ण माहिती मिळाल्यावरच स्पष्टपणे बोलणे शक्य आहे,” असे ते म्हणाले. “जो दोषी आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे, पण जर हे षड्यंत्र असेल, तर तेही समोर आले पाहिजे,” असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पुण्यातील खराडी भागातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली. या रेव्ह पार्टीत अंमली पदार्थ, दारूचे व्यसन केले जात होते. पोलिसांनी कारवाई करून एकूण 5 जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांनी आमदार एकनाथ खडसे यांचे आमदार आणि रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेतले आहे. प्रांजल खेवलकर यांचा 1 मित्र आणि 2 महिलांचा या रेव्ह पार्टीत सहभाग होता.

राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर..ठाकरे समर्थकांत राजकीय उत्साह शिगेला

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे फारच क्वचित प्रसंगी मातोश्रीवर गेले होते. मात्र, आज ते कोणतेही राजकीय किंवा कौटुंबिक बंधन न ठेवता स्वखुशीने उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी साडे अकरा वाजता दादर येथील आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानातून मातोश्रीकडे रवाना झाले आणि साधारणतः बारा वाजता ते मातोश्रीवर पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी खास उद्धव ठाकरे आणि संजय राऊत स्वतः बाहेर आले होते. राज ठाकरे यांचे स्वागत करताना दोघांच्याही चेहऱ्यावर सौहार्दपूर्ण स्मितहास्य झळकत होते.यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना आपल्या सोबत घेऊन मातोश्रीबाहेर उभारलेल्या व्यासपीठावर आणले. तेव्हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लाल गुलाबांचा पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांनी एकत्र फोटोसेशन केले. यावेळी त्यांच्यातील भावनिक स्नेह स्पष्टपणे जाणवत होता. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना काही वेळ थांबण्याची विनंती केली आणि मग ते राज ठाकरे यांना घेऊन घरात गेले.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मातोश्री निवासस्थानी जल्लोषाचे वातावरण आहे. मातोश्रीबाहेर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, ठिकठिकाणी शुभेच्छा देणारे बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल झाले असून, आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

याआधी अमितच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवरराज ठाकरे यांचे मातोश्रीवर आगमन हे अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरत आहे. शिवसेना पक्षातून बाहेर पडल्यापासून त्यांनी मातोश्रीला भेट देण्याचे प्रसंग अत्यंत मर्यादित ठेवले होते. जेव्हा कधी ते गेले, तेव्हा कोणतेतरी विशेष, अपरिहार्य कारणच त्यामागे होते. यापूर्वी ते अमित ठाकरेंच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी गेले होते. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. राज ठाकरे हे पहिल्यांदाच पूर्णपणे स्वेच्छेने मातोश्रीवर पोहोचले आहेत. त्यामुळे ही भेट केवळ एक साधा स्नेहविनिमय नसून, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नव्या समीकरणांची नांदी ठरू शकते, अशी चर्चा सध्या रंगत आहे.

अलीकडेच पार पडलेल्या मराठी मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये आलेली जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. परंतु त्यानंतर कोणतीही ठोस युतीसदृष चर्चा झाली नाही. त्यामुळे मनसे-ठाकरे गटाची युती बारगळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आता राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर गेले असल्याने, दोन्ही बंधूंच्या राजकीय एकत्र येण्याची शक्यता पुन्हा बळावली आहे.

विशेषतः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांची युती झाल्यास ती सत्ताधारी भाजपसाठी मोठे आव्हान ठरू शकते. त्यामुळे राज ठाकरे यांची मातोश्री भेट केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छांपुरती मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाची नांदी ठरेल, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.