पुणे-संक्रांतीचे औचित्य साधून ..संक्रांतीचे वाण असे संबोधून प्रभाग क्रमांक १३ तर्फे क्रिएटिव्ह फौंडेशन आणि कै.माधवराव आचवल ट्रस्ट यांच्या सहकार्याने नयनतारा आय क्लिनिक च्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी,नेत्र व दंत तपासणी आणि मोफत कांचबिंदू, मोतीबिंदू आणि तिरळेपणाची शस्त्रक्रिया ( ऑपरेशन ) अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
संक्रातीचा सण साजरा करत असताना महिलांचे हळदीकुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले जातात,यात वाण म्हणून काहीतरी वस्तू देण्याची परंपरा आहे,पण एखाद्या वस्तूपेक्षा केवळ महिलांनाच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना उत्तम आरोग्य लाभण्याची गरज आहे अशी संकल्पना घेऊन आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केला असल्याचे यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.कोरोनाच्या काळात जनरल तपासणी किंवा तत्सम आरोग्य शिबिरे झाली नाहीत व वस्ती विभागात महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून एकूणच स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले जाते ही बाब लक्षात घेता संक्राती निमित्ताने अनारोग्याचे वाण देण्याची योजना असून आज दहा चाळ येथील नागरिकांच्या आरोग्य तपासणी नंतर सर्वच वस्त्यांमध्ये अश्या कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याचे ही मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
वस्ती विभागातील नागरिकांना गरज आहे म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला असे नव्हे तर अश्या सेवाकार्यातून आम्हाला ही समाधान लाभते आणि आपला समाज सुदृढ रहावा ही भावना यामागे आहे असे डॉ.अनिल परांजपे यांनी सांगितले.
यावेळी संयोजिका नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक जयंत भावे,नगरसेवक दीपक पोटे,भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर,प्रभाग १३ चे अध्यक्ष राजेंद्र येडे,सरचिटणीस ॲड.प्राची बगाटे,महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे,कोथरूड मंडल सरचिटणीस अनुराधा एडके,उपाध्यक्ष राज तांबोळी,संगीताताई आदवडे,रमाताई डांगे,जयश्रीताई तलेसरा,सुवर्णाताई काकडे,अपर्णाताई लोणारे,माणिकताई दीक्षित,महिला मोर्चा आय टी सेलच्या पुणे शहर प्रमुख कल्याणी खर्डेकर,अमोल डांगे,वैभव जमदाडे इ मान्यवर उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य आणि स्वच्छता या विषयांवर भर दिला असून क्रिएटिव्ह फौंडेशनच्या वतीने असे आरोग्य विषयक शिबीर सर्वत्र आयोजित केले जातील असे फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.वस्ती विभागात महिला घराचा एकखांबी तंबू असतो पण त्यांच्याच प्रकृतीकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते किंबहुना घरकाम करणाऱ्या भगिनी कधी आजारी पडल्या तरी आजारपण लपवून त्या काम करत राहतात यासाठी त्यांची वेळेवर आरोग्य तपासणी होणे व औषधोपचार होणे गरजेचे असल्याचे मत ही संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.यावेळी जयंत भावे,मिताली सावळेकर,राजेंद्र येडे,प्राची बगाटे यांनीही उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
डॉ अनिल परांजपे,डॉ मेधा परांजपे,डॉ मधुरा आचवल,डॉ अमोल पाठक,डॉ.मिहिर परांजपे यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली.
सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक व संयोजन केले,संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले,राजेंद्र येडे व वैभव जमदाडे यांनी उपस्थितांचा सत्कार केला तर संगीताताई आदवडे यांनी आभार मानले.