मुंबई – मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेतील 1 हजार 844 कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले आहेत.मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेतघो टाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे राज्यपालांनी आश्रय योजनेतील झालेला गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांना दिले आहेत.
काय आहे प्रकरण
सफाई कामगारांसाठी आश्रय योजनेतून पक्की घरे बांधली जातात. या योजनेच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या 39 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनते आतापर्यंत मुंबई महापालिकेने 1 हजार 844 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावावर भाजपने आक्षेप नोंदवला होता. मात्र त्यानंतरही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लोकायुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली.
याआधीही लोकायुक्तांना चौकशीचे आदेश
परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना आदेश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.