Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

इथे बदला घ्या बदला ! शिवरायांच्या अपमानानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प का ? संजय राऊतांची टीका

Date:

मुंबई-राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून 72 तास उलटले आहेत. तरीही राज्याचे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस गप्प का?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.तसेच, राज्यपालांचा राजीनामा घेऊन इथे बदला घ्या बदला, असा जोरदार टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला.

आज पत्रकार परिषदेत राज्यपाल भगितसिंह कोश्यारी यांनी काल औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत भाजप व शिंदे गटावर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले, राज्यपालांचे वक्तव्य हे दळभद्री आहे. एवढेच नव्हे तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली, असे वक्तव्य एका नॅशनल चॅनेलवर केले.

भाजपची हीच भूमिका आहे का?

पुढे संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचा स्वाभिमान वैगरे शब्दच्छल करीत भाजपने शिवसेना फोडली व एक मिंधे सरकार सत्तेवर आणले. छत्रपती शिवाजमहाराजांचा अपमान भाजपचे राज्यपाल आणि राष्ट्रीय प्रवक्ते खुलेआम करीत असताना स्वाभिमानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का? भाजपचीदेखील हीच भूमिका आहे का? संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय.

राज्यपालांना जोडे मारणार का?

संजय राऊत म्हणाले, राज्यपालांनी यापूर्वीही शिवाजी महाराजांचा तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला आहे. एका वर्षात या राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चार वेळेस दुखावले आहे. हीच आपली अधिकृत भूमिका आहे का?, हे आता भाजपला सांगावेच लागेल. वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त बोलल्यास भाजप पेटून उठतो. जोडे मारो आंदोलन करतो. त्याचे स्वागत आहे. मात्र, शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल हे जोडे आता कोणाला मारणार. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना मारणार की राज्यपालांना मारणार?

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्यांविषयी असे वक्तव्य आम्ही सहन करू शकत नाही. मोठमोठ्या स्वाभिमानाच्या गप्पा मारत मिंधे गट मविआतून बाजूला झाला. आता या 40 आमदारांचा स्वाभिमान कुठे गेला? एकानेही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकृतपणे राज्यपालांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा शिवसैनिक जोडे मारो आंदोलन करणार. शिवसैनिकांचे जोडे कसे असतात, हे तेव्हा तुम्हाला कळेल.

संजय राऊत म्हणाले, शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालत असेल तर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेतात? नौदलाला शिवरायांचे बोधचिन्ह का देण्यात आले आहे? शिवरायांचा अपमान सहन करता तर अफझल खान, औरंगजेबाची कबर पाडण्याचे नाटक का करता? वीर सावरकर हे शिवरायांची आरती करत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे वीर सावरकरांचे प्रेरणास्त्रोत होते. केवळ सत्तेला चिकटून बसण्यासाठी मिंधे गट आता शांत आहे. महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय, अशा शब्दांत राऊतांनी आज टीका केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...