फिनलंडची  शिक्षणपध्दती भारतासाठी उपयुक्त-अविनाश धर्माधिकारी

Date:

 एमआयटी डब्ल्यूपीयूत “शिक्षणगंगा – फिनलंडमधून आपल्या दारी’ या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ०६ जून : “भारतात नवीन शिक्षणपध्दती विकसित होत असताना फिनलंड सारख्या शिक्षणक्षेत्रात उत्तुंग असलेल्या देशाकडून त्यांचे शिक्षणाचे तंत्र अवलंबून त्याचा भारतासाठी उपयोग केल्यास भारतीय शिक्षणपध्दतीत अमूलाग्र बदल होईल.” असे उद्गार माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळाचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांनी काढले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिटी, पुणे व कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन (सीसीई फिनलंड)  तर्फे शिरीन कुलकर्णी व हेरंब कुलकर्णी लिखित “शिक्षणगंगा – फिनलंडमधून आपल्या दारी’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे  संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते. सीसीई फिनलंडचे शिक्षणतज्ञ श्रीमती नेल्ली लुहिवूरी, शिक्षणतज्ञ श्री. ख्रिस्तोफ  फेनेव्हेसी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. >
यावेळी सीसीई फिनलंडचे संस्थापक व लेखक हेरंब कुलकर्णी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे डॉ. रत्नदीप जोशी व श्रीमती धनिक सावरकर हे उपस्थित होते.
श्री.धर्माधिकारी म्हणाले, “शिक्षणगंगा फिनलंडमधून आपल्या दारी हे पुस्तक संस्कृतीचे लेणं आहे. यापुस्तकामध्ये फिनलंड या देशामध्ये तेथील सरकारने शिक्षण आणि आरोग्य हे या दोन्हींवर भर देऊन ना
सृजनशील शिक्षण देऊन विद्यार्थी घडविले जात आहेत. या देशाने ३० वर्षात शिक्षणक्षेत्रात भरारी घेतलेली आहे. या शिक्षणपध्दतीचा भारताला फायदा होणार आहे. फिनलंडमध्ये शिक्षकाचे स्थान महत्त्वाचे आहे. नवनवीन प्रयोगकरून भावी पिढी घडवित आहे. लहानपणी आई हिच खरी शिक्षिका आहे. त्यानंतर वडिल आणि त्यानंतर शिक्षक हाच गुरू आहे. शिक्षक हा शिकविण्याच्या नवीन पध्दतीचा अवलंब करून दर्जेदार विद्यार्थी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ”    
प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “वैश्‍विक मूल्याधिष्ठित शिक्षणपध्दतीचा वापर करणे ही काळाची गरज आहे. यातून सर्वगुणसंपन्न असा विद्यार्थी घडला जाईल. शरीर आणि बुध्दीचा विचार आजच्या शिक्षणातून केला जात आहे. परंतू आत्मा आणि मनाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. मातृ देवो भव, पितृ देवो भव, अतिथी देवो भव आणि आचार्य देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे शिक्षकाला समाजामध्ये मानाचे स्थान आहे.”  
श्री.हेरंब कुलकर्णी म्हणाले, “फिनलंडमध्ये ज्ञानाचा विकास करून विद्यार्थ्यांना हसत -खेळत शिक्षण दिले जाते. त्याठिकाणी क्लासरूम नाहीत परंतू ते निसर्गाच्या सानिध्यात राहून मुलांना सृजनशील शिक्षण दिले जात आहे. तोच प्रयोग भारतातील छत्तीसगढ राज्यातील वनवासी भागामधील विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून अंकगणिताचे शिक्षण दिले आणि चांगल्या प्रकारचे विद्यार्थी निर्माण केले आहेत. माझे यापुढचे पुस्तक हे भारतातील शिक्षणाची गंगा जगाकडे हे असणार आहे.”    
 डॉ. रत्नदीप जोशी यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. सूत्रसंचालन अमेय खरे यांनी केले.
धनिका सावरकर यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी प्रस्तावित जागा खासगी विकासकाकडून परत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे महानगरपालिकेने विकासकास बांधकाम परवानगी नाकारणे हे स्मारकाच्या दृष्टिकोनातून...

आबा बागुल संपूर्ण परिवारासह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल …

ठाणे |पुणे- संपूर्ण हयात ज्या परिवाराने कॉंग्रेस मध्ये घालविली,...