पुण्यातून लाखावर कामगारांचे मूळ गावी होणार स्थलांतर

Date:

पुणे-टाळेबंदीमुळे पुण्यात एक लाख आठ हजार ६०८ मजूर, कामगार अडकले असून ही संख्या प्रशासनाने शोधलेल्या व्यक्तींची आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील २५ हजार ८१६, बिहारमधील १३ हजार, मध्य प्रदेशातील दहा हजार ६०२, पाच हजार १६८ झारखंड आणि इतर अन्य राज्यांमधील आहेत.आतापर्यंत पुण्यातून बारा हजार मजूर, कामगार त्यांच्या मूळगावी गेले आहेत. त्यामध्ये मध्य प्रदेशात चार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे प्रत्येकी एक रेल्वे गाडी सोडण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तरांचल, झारखंड, पश्चिम बंगाल अशा विविध राज्यांमधील पुण्यात अडकलेल्या मजूर, कामगारांना मूळ गावी सोडण्यासाठी येत्या आठवडाभरात २३ रेल्वे गाडय़ा पुण्यातून पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील उद्योग, व्यवसाय सुरू होत असल्याने आतापर्यंत ३०० मजुरांनी मूळ गावी जाण्यास नकार दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

टाळेबंदीमुळे पुण्यात अडकलेल्या मजूर, कामगारांना सोडण्यासाठी संबंधित राज्यांशी संपर्क करण्यात येत आहे. त्यानुसार मजुरांची यादी करण्यात आली असून दररोज दोन ते तीन यानुसार येत्या आठवडय़ात २३ रेल्वे गाडय़ा पुण्यातून विविध राज्यांत पाठवण्यात येतील. तसेच पुण्यातून महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्य़ात जाण्यासाठी एसटी आणि खासगी बसगाडय़ांची सोय करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत १५० बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...