पुणे- पुण्यात आलो कि प्रथम भेडसावते ती वाहतूक समस्या ,त्यामुळे मी प्रथम वाहतूक समस्या आणि सर्वाधिक चर्चा होणारा पाणी प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देईल , सामान्य माणसाच्या समस्या याच माझ्या समस्या राहतील असे प्रतिपादन करीत माझे दरवाजे सदैव खुले राहतील आणि माझी थेट भेट देखील लोक घेवू शकतील असा मी कसोशीने प्रयत्न करेल असे नूतन आयुक्त शेखर गायकवाड यांनी म्हटले आहे. आज महापालिका आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांची ओळख करवून घेतली यावेळी औपचारिक पणे बोलताना त्यांनी या बाबी स्पष्ट केल्या .