पुणे : चुकीची आर्थिक धोरणे राबवून भाजपने या देशाला “कॅशलेस’ केले आहे. सर्व सामान्यांची बचत करण्याची शक्तीही त्यांनी काढून घेतली असल्याची टिका कॉंग्रेसचे खासदार राजीव गौडा आणि प्रवक्त्या अमी यागनिक यांनी बुधवारी केली.
खासदार गौडा आणि यागनिक या पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारच्या करभारावर जोरदार टिका केली. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, उल्हास पवार, अभय छाजेड, अरविंद शिंदे, रमेश अय्यर आदी उपस्थित होते. यावेळी यागनिक आणि गौडा यांनी गेल्या पाच वर्षातील मोदीच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुंळे देशात कशी मंदीची परिस्थीती निर्माण झाली आहे, यांची माहीती दिली.दिवाळी नुकतीच संपली. मात्र, सामन्य माणसाजवळ पैसा दिसला नाही.नोटबंदीमुळे सर्व पैसा गेला. डॉ. मनमोहन सिंग यांनी ही सुरुवात असल्याचे म्हटले होते, ते आता खरे होत आहे, ही तर सुरुवात आहे, आणखी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार, असा इशाराही यावेळी देण्यात आला. बेरोजगारांना रोजगार नाही. दोन कोटी रोजगार देणार असल्याच्या अश्वासनाचे काय झाले? छोट्या मोठ्या कंपन्या बंद पडत आहेत. पण, सरकार काहीही बोलायला तयार नाही. छोट्याशा पाकिस्तानवर चर्चा होते. मात्र, मुलांचे भविष्य मोदी सरकारला दिसत नाही. ते शिक्षणावर का बोलत नाही? असा सवालही अमी यागणिक यांनी उपस्थित केला.
कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देत आहेत. पण, यातून लोकांच्या खिशातून पैसे काढण्याचे काम सुरू आहे. देशात गरिबी झपाट्याने वाढती आहे. शेतकऱ्यांसाठी काहीही योजना नाही. ‘राईट टू एज्युकेशन’ चे काय झाले? किती लोकांना रोजगार दिले? काहीही बोलत नाही.
‘पीएमसी’ बँक घोटाळ्यावर काहीही बोलत नाहीत. ‘मेक इन इंडिया’चे काय झाले? ‘आरबीआय’ मधून पैसा काढण्यात आला. तो कुठे गेला? तरीही ‘इकॉनॉमी’ खाली का जात आहे? 5 ट्रेलियन डॉलर इकॉनॉमी काशी पूर्ण होणार? असे अनेक सवाल राजीव गौडा आणि अमी यागणिक यांनी उपस्थित केले.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोनिया गांधी, प्रियंका गांधी प्रचारात सहभागी न झाल्याने काँग्रेसचे नुकसान झाले? असे सांगितले असता, याची कल्पना सोनिया गांधी यांना देणार असल्याचे राजीव गौडा यांनी सांगितले.
कॉंग्रेस सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाचा आर्थिक विकासाचा दर टिकून राहीला होता. परंतु, भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर आर्थिक विकासाचा दर घसरत चालला आहे. चुकीची आर्थिक धोरण राबविल्याचा परीणाम भोगावा लागत आहे. नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला पहीला धक्का बसला, त्यानंतर जीएसटीची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केल्याने भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण सुरु झाली. देशांत गेल्या 45 वर्षांत प्रथमच सर्वांत जास्त बेरोजगारी निर्माण झाली, असे गौडा यांनी सांगितले.
खासगी क्षेत्रातील गुंतवणुक गेल्या 16 वर्षांत प्रथमच कमी झाली, औद्योगिक विकास, उत्पादन क्षेत्राचा विकास दर, निर्यात यासर्वच ठिकाणी घसरण सुरू आहे. बॅंकीग क्षेत्रात सुमारे 8 लाख कोटी रुपये इतका एनपीए आहे. बॅंकींग क्षेत्रात 1 लाख 74 हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे.
“मेक इन इंडीयाचे काय झाले’, असा सवाल करून यागनिक म्हणाल्या, “नोटबंदीचे परीणाम आता दिसु लागले आहे. लघुउद्योगाला त्याचा फटका बसला आहे, अनेक कंपन्यांना कुलुप लावण्याची वेळ आली आहे. एकीकडे डिजीटल व्यवहार करण्याची भाषा केली जाते. पण त्याचवेळी इंटरनेटचे नेटवर्कच उपलब्ध नसते अशी स्थिती आहे.”