पुणे- २४ तास पाणी पुरवठा करनार म्हणून गेली २ वर्षे सातत्याने दरवर्षी पाणीपट्टीत १५ टक्के दरवाढ करण्याच्या प्रस्तावाला आज पुन्हा विरोध करत नगरसेवक अविनाश बागवे यांनी या प्रस्तावाचा फेरविचार करावा अशी मागणी केली . यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त पदावर असताना कुणालकुमार यांनी केलेल्या कारभारावर ताशेरे ओढले .सध्या पाणीपुरवठ्याची अवस्था पहा . दर आठवड्याला दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवला जातो . महापालिका २४ तास पाणी पुरवठा अजूनही करू शकलेली नाही . आणि गेली २ वर्षांपासून २४ तास पाणीपुरवठ्या च्या नावाखाली दरवर्षी १५ टक्के दरवाढ पाणीपट्टीत करते आहे . ज्या प्रस्तावानुसार हि दरवाढ केली जाते त्या प्रस्तावाचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केली .खराडीतील आय टी कंपन्या आणि काही बिल्डर यांना करत सवलत देण्यासाठी गुपचूप अभय योजना राबविल्या गेल्याचा आरोप हि त्यांनी या वेळी केला. एकी कडे सामान्य नागरिकांकडून दर वाढवून कर वसूल केला जात असताना पाणीपट्टी ची साडेपाचशे कोटीची थकबाकी सरकारी कार्यालयाकडे असल्याचे त्यांनी सांगितले . सरकारी कार्यालयेच अशा प्रकारे आदर्श घालून द्यायला लागल्यावर काय करायचे महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा असे ते म्हणाले.