कोरोना फाईट -डॉक्टर,नर्स,सफाई कामगार,अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी २५ लाख रुपयांचा विमा महापालिकेने करावा -आबा बागुल
पुणे-कोरोनाशी सुरु असलेल्या या लढ्यात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी,डॉक्टर,नर्स,सफाई कामगार यांच्या आरोग्याची काळजी घेणे पुणे महानगरपालिकेची जबाबदारी असून त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे देखील आपले काम आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी २५ लाख रुपयांचा एक वर्षाचा विमा पुणे महानगरपालिकेने काढून त्याचा एक वर्षाकरिता येणारा प्रीमियम भरावा.अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ,माजी उपमहापौर आबा बागुल यांनी महापालिका आयुक्तांसह राज्य सरकारकडे केली आहे.
बागुल यांनी या संदर्अभात से म्हटले आहे कि, भरात कोरोना विषाणूचे संकट आले असून या विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र,राज्य शासन तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून योग्यता खबरदारी घेण्यात येत आहे. पंतप्रधानांनी २१ दिवस लॉकडाउन करून नागरिकांना घरातून बाहेर न येण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संशयित व कोरोना बाधित नागरिकांवर उपचार सुरु आहेत. सर्व आपत्कालीन व्यवस्थेमधील कर्मचारी आपल्या जीवाची व कुटुंबाची काळजी न करता आपले कर्तव्य पार पाडत आहेत. कोरोना विषाणूशी लढा देत आहेत. यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी,डॉक्टर,नर्स,सफाई कामगार व इतर सेवक यांचा सहभाग लाख मोलाचा असून आपल्या कर्त्यव्याशी एकनिष्ठतेने प्रामाणिकपणे आपली सेवा करत आहेत. अश्या कर्त्यव्य दक्ष सेवकांची काळजी घेणे हि देखील पुणे महानगरपालिका व आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे आबा बागुल म्हणाले,
कोरोनाशी सुरु असलेल्या या लढ्यात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी,डॉक्टर,नर्स,सफाई कामगार यांच्या आरोग्याची काळजी घेणे पुणे महानगरपालिकेची जबाबदारी असून त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे देखील आपले काम आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी २५ लाख रुपयांचा एक वर्षाचा विमा पुणे महानगरपालिकेने काढून त्याचा एक वर्षाकरिता येणारा प्रीमियम भरावा. त्यामुळे कोरोना विषाणूच्या लढाईत कर्मचाऱ्यांवर कोणते संकट आल्यास त्याला सामोरे जाण्यास हे कर्मचारी आणखी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास वाटतो. यासाठी आपण लवकरात लवकर पावले उचलून या कर्मचाऱ्यांचा एक वर्ष मुदतीचा विमा काढावा याबाबत आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी पत्रव्यवहार सुरु असल्याचे आबा बागुल म्हणाले .
बेघर ,गरीब मजुरांची निवारा सोय मंगल कार्यालयात करा- सूचना
दरम्यान पोटापाण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या आणि आता कोरोना च्या भीतीने महारष्ट्र सोडून गावी निघालेल्या बेघर,गरीब ,हातावर पोट असणाऱ्यांना मंगलकार्यालयात आसरा देण्यात यावा अशी सूचना त्यांनी महारष्ट्र सरकारकडे केली आहे.