मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – अलीकडच्या काळात समाज माध्यमांचा वापर घातक ठरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने माध्यमांचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे. सर्वानी स्वल्पविराम घेत माध्यमांचा वापर केल्यास चुकीच्या सवयींना आळा घालता येईल ,असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. जागतिक महिला हिंसाचार विरोधी दिनानिमीत्त स्त्री आधार केंद आणि राज्य महिला आयोगातर्फे महिला हिंसाचार विरोधी मोहीम व डिजिटल साक्षरता मोहिमेचे उदघाटन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, मोबाईल, सोशल मीडिया याबाबत असलेला शिष्टाचार प्रत्येकाने पाळला पाहिजे. सध्या सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टी खातरजमा न करताच पाठवण्याची पद्धत सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आपण कोणता संदेश पाठवतो याबाबत खातरजमा करूनच तो पुढे पाठवावा. समाज माध्यमे सुरक्षित पणे वापरता येणे ही हिंसाचार मुक्त महिला विश्वाकडे जाण्यासाठी पहिली पायरी आहे. यावेळी अँड. ऊज्वला पवार यांनी बलात्कार पीडित महिला किंवा मुलींचे खटले चालवताना कोणत्या अडचणींचा सामना सरकारी वकिलांना करावा लागतो याची माहिती दिली. जन्मेजय काळे यांनी डिजिटल मीडिया मध्ये माध्यमांचा वापर कसा करावा ? फसवणूक होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी ? याची माहिती दिली मिनी बेदी यांनीही महिला विकास विषयक आढावा आवश्यक असुन या कामासाठी संशोधन सुरु असल्याचे सांगितले.
त्यावेळी जिल्हा सरकारी वकील ऍड. उज्वला पवार, डी.एस.टी सामाजिक संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त मिनी बेदी, आय.टी. ईक्सपर्ट जन्मेजय काळे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त शोभा कोठारी, जेहलम जोशी, साहित्यिका अंजली कुलकर्णी, सानिया गार्चा – बेदी तसेच रमेश शेलार, अनिता शिंदे, आश्लेषा खंडागळे, अपूर्वा गोंधळेकर, अंजली वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.