गरजुंना व्यक्तींना तसेच प्राणिमात्रांना आपल्या घासातला घास द्या – आबा बागुल
पुणे-
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण भारतात पंतप्रधानांनी लॉक डाउन केले असून नागरिकांना घराबाहेर न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशभरात अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या असून सर्व कामाची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांचे हातावरचे पोट आहे काम केल्याशिवाय घरामध्ये अन्न शिजत नाही. आर्थिक टंचाईमुळे अश्या नागरिकांची अन्नाविना दाना-दान होत आहे. कित्येक जणांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. या सर्वांचा विचार करून पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे अमित बागुल यांच्या स्वयंसेवकांसह अश्या गरजू नागरिकांना आठवडाभर पुरेल एवढा मोफत किराणा वाटप करण्यास सुरुवात केली असून या मध्ये साखर,चहा पावडर, पोहे, तांदूळ,तेल,साबण,मीठ, मसाले, बिस्कीट याचे पॅकेट करून घरपोच देण्यात येत आहे. या साहित्याची वाटप आज पासून शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत ,संजयनगर झोपडपट्टी येथून सुरु असून गरजू नागरिकांना टप्या टप्याने या सर्व वस्तूंचे केले जाणार आहे. आपण घरातून बाहेर पडू नये घरात राहून आपण कोरोनावर मत करू शकतो. यासाठी आपण घरातच राहून कोरोनाला हरवूया असे आबा बागुल म्हणाले.
आबा बागुल म्हणाले की, एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ज्ञानेश्वरांच्या ओवी स्मरून नागरिकांनी एकमेकांना सहाय्य केले पाहिजे. आपल्याकडे २० दिवसांचा किराणा असेल तर त्यापैकी एका आठवड्याचा किराणा आपल्या गरजू शेजाऱ्यांना द्यावा. अन्नावाचून आपला शेजारी उपाशी राहू नये याची खबरदारी प्रत्येक नागरिकांनी घेऊन या आणीबाणीच्या काळात आपण सर्वानी एकमेकांच्या मागे खंबीरपणे उभे राहून माणुसकीचे दर्शन घडवण्याची हि वेळ आहे.
माणूस आपल्या गरजा व्यक्त करू शकतो परंतु पक्षी , प्राणी मुक्या जनावरांचे काय ? हा प्रश्न वारंवार मनामध्ये घर करून जातो. यासाठी आपल्याला जमेल तसे मुक्या जनावरांसाठी अन्नाची सोय आपल्या परिसरात करून या पक्षी, प्राणी मुक्या जनावरांना जागवण्यासाठी कटिबद्ध होऊन आलेल्या प्रसंगाला सर्वाना साहाय्य करून एकमेकांना मदत करून सामोरे जाऊया. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये पोलीस बांधव व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींना सहकार्य करावे असे आवाहन आबा बागुल यांनी केले .
-टुरिझम सर्व्हिस टॅक्स आकारावा
पुणे शहरात दररोज पर्यटन , व्यवसाय, लग्न, शिक्षण अशा वेगवेगळ्या कारणांसाठी लाखो लोक येतात. पुणे शहरात येऊन ते शहरातील विविध सुविधांचा वापर करतात. त्यामुळे शहरातील मूलभूत सुविधांवर त्याचा ताण येतो व पुणे महानगरपालिकेला शहरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविणे मोठे कठीण होते. व त्यामुळे पुणेकरांकडून दरवेळेला विविध कर आकारून यासर्व बाबींची भरपाई करावी लागते.
पुणेकरांवर अतिरिक्त कर लावण्यापेक्षा शहरात विविध कारणांसाठी येणाऱ्या व्यक्तींकडून हा कर घेऊन पुणे शहराच्या मूलभूत सुविधा अत्यंत प्रभावीपणे नागरिकांना देता येतील व पुणेकरांची अतिरिक्त कर वाढीतुन सुटका होईल. यासाठी पुणे शहरात येणाऱ्या व ५ , ४ , ३ स्टार व अन्य हॉटेल मध्ये वास्तव्य करणाऱ्या टुरिस्ट व्यक्तीसाठी अनुक्रमे ५००,३०० व २०० रुपये प्रतिदिन विविध सुविधांसाठी टुरिझम सर्व्हिस टॅक्स घेण्यात यावा. यातून पुणे महानगरपालिकेला करोडो रुपयांचे उत्पन्न मिळेल व शहराचा विकास करण्यास चालना मिळेल. असे आबा बागुल म्हणाले
सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मागील सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या सर्व बाबींचा विचार करता आपत्कालीन परिस्थितीत पुणे महानगरपालिकेकडे आपत्कालीन निधी असणे गरजेचे आहे. पुणे शहरात विविध कारणांसाठी येणाऱ्या व्यक्तींकडून टुरिझम सर्व्हिस टॅक्स आकारल्यास आपत्कालीन निधी रिझर्व राहील व पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नात देखील भर पडून शहराच्या मूलभूत सुविधा देण्यास महानगरपालिका अधिक सक्षम होईल असे आबा बागुल म्हणाले .
यासाठी पुणे शहरात लवकरात लवकर टुरिझम सर्व्हिस टॅक्स लावण्यात यावा म्हणून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी महानगरपालिका स्तरावर निर्णय घ्यावा कोणते टॅक्स घ्याचे याबाबत महाराष्ट्र म्युन्सिपल ऍक्ट मध्ये आयुक्तांना टॅक्स घेणेबाबत अधिकार असून त्यांनी हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा व अंदाजपत्रकात आपत्कालीन निधी असा स्वतंत्र हेड काढावा असे आबा बागुल म्हणाले.