Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वसईच्या संरक्षित जागेवर अतिक्रमणे -महापालिका, जिल्हाधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात याचिका

Date:

मुंबई : वसई, विरार शहरातील संरक्षित क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. विशेष म्हणजे बांधकाम करणाऱ्या विकासकांना दंडाची आकारणी न केल्याने पालिकेचा कोटय़वधी रुपयांचा महसूलदेखील बुडाला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात पालिका, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए आणि नगरविकास खात्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून सप्टेंबरमध्ये या शासकीय यंत्रणांना आपले स्पष्टीकरण सादर करावे लागणार आहे

वसई विरारचा विकास आराखडा मंजूर झाला तेव्हा एकूण क्षेत्रफळापैकी ८ हजार ३२४ हेक्टर जागेवर म्हणजे २१ टक्के जागेवरच बांधकाम करण्यास परवानगी होती. तर उर्वरित ७८ टक्के क्षेत्रफळ म्हणजे २९ हजार ६७६ हेक्टर जागा ही संरक्षित तसेच ना विकास क्षेत्र म्हणून राखीव होती. त्यात हरित पट्टा, कांदळवन, वनीकरण क्षेत्र, ना विकास क्षेत्र तसेच पर्यावरणीय दृष्टिकोनातील संवेदनशील क्षेत्राचा समावेश होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून या ७८ टक्के संरक्षित जागेवर मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे करण्यात आली.

डोंगर पोखरणे, नैसर्गिक नाल्यावर बेकायदा भराव करून अनधिकृत बांधकामे करणे, कांदळवनाची कत्तल करणे आदी प्रकार करून अनधिकृत बांधकामे करण्यात आले. ही बांधकामे करताना कुठल्याच नियमांचे पालन केले नसल्याने शहराचे नियोजन बिघडले. ही बांधकामे होत असताना महसूल विभाग, महापालिका, एमएमआरडीए तसेच नगरविकास खात्याने काहीच प्रतिबंध घातला नाही आणि कसलीच कारवाई केली नाही. त्यामुळे पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि ग्रीन रिफ्लेक्शन ट्रस्टचे अध्यक्ष चरण भट यांनी या शासकीय यंत्रणेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका (रिट पिटिशन) दाखल केली आहे. त्यावर सप्टेंबर महिन्यात या यंत्रणांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विकासक मोकाट, सर्वसामान्यांवर शास्ती
अनधिकृत बांधकाम करणारे विकासक, भूमाफिया यांच्यावर दंड आकारण्याची जबाबदारी पालिकेची होती. मात्र त्यांनी केवळ काही प्रमाणात अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यापलीकडे काही केले नाही. निवासी अनधिकृत इमारती आणि चाळीत राहणाऱ्या नागरिकांना शास्ती भरावी लागत आहे. मात्र विकासक मोकाट आहेत. पालिकेने त्यांच्याकडून दंडाची रक्कम का वसूल केली नाही, असा सवाल याचिकेत केला आहे. हेतुपुरस्सर विकासकांना फायदा व्हावा यासाठी न्यायालयातून स्थगिती देणे, तांत्रिक त्रुटी काढून त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू होते. दंड आकारला तर पालिकेला किमान ७०० ते ८०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा दावा याचिकाकर्ते भट यांनी केला आहे. डोंगर पोखरून अनधिकृत बांधकामे होत असताना जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील काहीच कारवाई केली नाही. वसईतील भूमाफियांवर केवळ २२ कोटी रुपये दंडाची नोटीस आकारण्यापलीकडे काहीच झाले नाही.

या अनधिकृत बांधकामांमुळे वसई, विरारच्या भौगोलिक रचनेत बदल झाला असून पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. यासाठी अनधिकृत बांधकामे झालेल्या भागांचे सर्वेक्षण करणे, किती ठिकाणी डोंगर पोखरले, कांदळवने नष्ट केली त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. विकासकांना शोधून दंडाची आकारणी करणे, आरक्षित जागा वाचविणे, आदी मागण्या या याचिकेत करण्यात आल्या आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...